* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOT WATER THERAPY
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788184980967
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DO YOU SUFFER FROM: *TENSION HEADACHES FROM STRESS? *CHRONIC BACKACHE FROM HOURS OF DESK-WORK? *SPRAINS AND STRAINS FROM WEEKEND SPORTS? *INJURIES FROM ACCIDENTS? JOINTS AND MUSCLES DUE TO OVER-EXERTION, AGING OR INACTIVITY? *PAINFUL. HOT WATER THERAPY CAN HELP. THIS BOOK WILL INTRODUCE YOU TO SIMPLE, EFFECTIVE TECHNIQUES YOU CAN USE WHILE RELAXING IN YOUR SHOWER, BATH, OR HOT TUB TO RELIEVE PAIN AND STRENGTHEN ACHING MUSCLES. AND THEY TAKE ONLY A FEW MINUTES TO DO! YOU WILL LEARN THAT YOU CAN SAVE YOUR "BAD BACK` BY USING A COMBINATION OF GENTLE MASSAGE, EXERCISE AND STRETCHING. WHEN YOU BLEND THESE ROUTINES WITH THE SOOTHING, HEALING QUALITIES OF HOT WATER, YOU`LL ENJOY THE AGE-OLD BENEFITS OF SPA TREATMENT - RIGHT IN YOUR OWN BATHROOM!
तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आहे का? तणावामुळे डोकेदुखी ? सतत बैठ्या कामामुळे पाठदुखी सप्ताहाच्या अखेर सुट्टीत खेळल्यामुळे उसण भरणे, लचकणे? अपघातामुळे इजा? अतिश्रमानी, वयोमानापरत्वे अथवा हालचालीच्या अभावामुळे, सांधे व स्नायु दुखणे? गरम पाण्याच्या उपचारपद्धाीची मदत होऊ शकते. दुखऱ्या स्नायुंना आराम देऊन सशक्त करण्याच्या, सोप्या पण परिणामकारक पद्धातींची या पुस्तकात ओळख करून देण्यात आलेली आहे. हे सर्व, गरम पाण्यानी अंघोळ करतांना, टबात डुंबत असतांना करता येत आणि करायला फक्तकाही मिनिटच लागतात ! हलकस मालीश, व्यायाम आणि ताण देण्याचे प्रकार करून, तुम्ही `` वाईट पाठीला सरळ करु शकता. गरम पाण्याच्या औषधी व दु:खशामक गुणांची, या व्यायामाशी सांगड घालून, तुम्ही घरबसल्याप्रसिद्ध स्पा उपचारपद्धाीचा आनंद घेऊ शकता, तेही स्वत:च्या बाथरुममध्ये ! डॉ. पॅट्रिक होरे हे स्नायू आण् अस्थींचे उपचारतज्ञ असून, ते त्यांच्या उपचारपद्धतीत, सुलभ जीवन शैली आणि स्व-संगोपन यावर भर देतात. ते बर्वले, कॅलिफोर्नियामधे कार्यरत आहेत. अमेरिकेतल्या नॉर्दन व्हरमॉन्टच्या कडाक्याच्या थंडीत आपल्या पाठीसाठी गरम पाण्याचे उपचार घेऊन, ते तंदुरुस्त राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50 #USHNAJALPOCHAR #HOTWATERTHERAPY #उष्णजलोपचार #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUBHASHJOSHI #सुभाषजोशी #DAVIDHARPDR.PATRICKHORAY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 18-06-2010

    गरम पाण्याचा शेक घ्या!... सध्याच्या गतिमान आयुष्यात थोडी विश्रांती घेऊन म्हटले तरी आसपासचे जग आपल्याला ती घेऊ देत नाही. त्यातून वेगवेगळे तणाव निर्माण होत आहेत. रोजच्या ताणामुळे शरीरात व मनात तणाव निर्माण होतात. त्यातून डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी कध मागे लागते, हे नेमके कळत नाही, तर कधी कमरेत लचक भरलीय का, ही शंका येते. फ्रोजन शोल्डरचा कुणाला त्रास होऊ लागतो, तर कुणाचे गुडघे कुरकूर करू लागतात. एखाद्या वेदनाशामक मलमाने मालिश करून आपण तातडीचा आराम मिळवतोही; पण या दुखण्यातून पूर्ण सुटका होत नाही. आपल्याला माहीत असलेले उपचार घ्यावेत, तर ते महागडे तरी असतात किंवा ते करून घेण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला शक्य नसतात आता एक आणखी पर्याय आपल्यापुढे आला आहे, तो म्हणजे ‘उष्ण जलोपचार’! गरम पाण्यात पंचा बुडवून दुखऱ्या ठिकाणी शेक घ्यायची आपली पद्धत होतीच की! पण आजीच्या पद्धतीना अशास्त्रीय ठरवून आपण त्या बाद केल्या आहेत. आता त्या पद्धतीची परदेशी आवृत्ती आली आहे : ‘हॉट वॉटर थेरपी’, डॉ. पॅट्रिक होरे व डेव्हिड हार्प यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा सुरेख अनुवाद सुभाष जोशी यांनी केला आहे. अगदी अंघोळ करता करता दहा मिनिटे राखून ठेवायची आणि उपचार घ्यायचे, हे सोपे सूत्र यामागे आहे. एकीकडे गरम पाण्याचा दुखऱ्या भागाला होणारा स्पर्श आणि त्या भागाला दिलेला थोडासा ताण यामुळे हे उपचार होतात. ही पद्धत सोपी आहे. ती खूप परिणामकारक असल्याचा डॉ. होरे यांचा दावा आहे. या उपचारपद्धतीची खूप चांगल्या रीतीने या पुस्तकात ओळख करून देण्यात आली आहे. ही उपचार पद्धती नेमकी काय आहे? तिचे वेगळेपण कशात आहे? गरम पाण्याने नेमके काय साधते? याविषयी सुरवातीला निवेदन आहे. भारतीयसंस्कृतीने, आयुर्वेदाने पाण्याला अंतर्गत व बाह्यउपचारात महत्त्व दिलेले आहेच. गरम पाण्याची कुंड ही तीर्थक्षेत्रे बनतात, हा आपला अनुभव आहे. आयुर्वेदातील स्वेदनाची आपल्याला माहिती आहे. याचाच वेगळा उपयोग डॉ. होरे यांनी करून घेतलेला आहे. आपल्या प्रभावी कथनशैलीत सोपेपणाने ते शरीराची माहिती करून देतात आणि आपल्याला विश्वासात घेतात. नेमके कुठे दुखते हे कसे ओळखायचे? तिथे आपल्या आपण मसाज कसा करायचा? हे समजावून सांगतात. मग गरम पाण्यात व्यायाम कसा करायचा,शरीराला ताण कसा द्यायचा, हे सांगतात. आपल्या नेहमीच्या शरीरिक क्रियाच व्यायाम म्हणून किंवा ताण देण्यासाठी उपयोगात आणलेल्या असल्याने आपण काहीतरी वेगळे करायचे आहे, ही भवनाच दूर होते व रुग्णांना आत्मविश्वास मिळतो. त्यांनी दैनंदिन सरावाची आखणीही करून दिली आहे. गरम पाण्याच्या उपचारपद्धतीत जसे आयुर्वेदाचे वेगळे रूप तुम्हाला दिसेल, तसे त्यानंतर शरीराला देण्याच्या पद्धतीतही जाणवेल. प्राणायाम, ध्यानधारणा हे उपाय आयुर्वेदाने सांगितले आहेत. शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात. या पद्धतीत थोडा बदल करून अमेरिकन रीतीने मोजणी करीत ध्यानधारणा करण्यास डॉ. होरे सुचवतात. ऐकूण भारतीयांना सहज स्वीकारता येईल, आपल्या जीवनशैलीत असलेलीच अशी ही उपचारपद्धती आहे. ती मुळात अमेरिकनांना सांगितली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अमेरिकन जीवनशैलीनुसार तपशील येतो. भाषांतराच्या वेळी हा तपशील सुधारून घेता आला असता खरा; पण मग कदाचित आपणच म्हणालो असतो, हे तर आपल्याला आजीने आधीच सांगितललेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.