* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOT WATER THERAPY
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788184980967
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DO YOU SUFFER FROM: *TENSION HEADACHES FROM STRESS? *CHRONIC BACKACHE FROM HOURS OF DESK-WORK? *SPRAINS AND STRAINS FROM WEEKEND SPORTS? *INJURIES FROM ACCIDENTS? JOINTS AND MUSCLES DUE TO OVER-EXERTION, AGING OR INACTIVITY? *PAINFUL. HOT WATER THERAPY CAN HELP. THIS BOOK WILL INTRODUCE YOU TO SIMPLE, EFFECTIVE TECHNIQUES YOU CAN USE WHILE RELAXING IN YOUR SHOWER, BATH, OR HOT TUB TO RELIEVE PAIN AND STRENGTHEN ACHING MUSCLES. AND THEY TAKE ONLY A FEW MINUTES TO DO! YOU WILL LEARN THAT YOU CAN SAVE YOUR "BAD BACK` BY USING A COMBINATION OF GENTLE MASSAGE, EXERCISE AND STRETCHING. WHEN YOU BLEND THESE ROUTINES WITH THE SOOTHING, HEALING QUALITIES OF HOT WATER, YOU`LL ENJOY THE AGE-OLD BENEFITS OF SPA TREATMENT - RIGHT IN YOUR OWN BATHROOM!
तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आहे का? तणावामुळे डोकेदुखी ? सतत बैठ्या कामामुळे पाठदुखी सप्ताहाच्या अखेर सुट्टीत खेळल्यामुळे उसण भरणे, लचकणे? अपघातामुळे इजा? अतिश्रमानी, वयोमानापरत्वे अथवा हालचालीच्या अभावामुळे, सांधे व स्नायु दुखणे? गरम पाण्याच्या उपचारपद्धाीची मदत होऊ शकते. दुखऱ्या स्नायुंना आराम देऊन सशक्त करण्याच्या, सोप्या पण परिणामकारक पद्धातींची या पुस्तकात ओळख करून देण्यात आलेली आहे. हे सर्व, गरम पाण्यानी अंघोळ करतांना, टबात डुंबत असतांना करता येत आणि करायला फक्तकाही मिनिटच लागतात ! हलकस मालीश, व्यायाम आणि ताण देण्याचे प्रकार करून, तुम्ही `` वाईट पाठीला सरळ करु शकता. गरम पाण्याच्या औषधी व दु:खशामक गुणांची, या व्यायामाशी सांगड घालून, तुम्ही घरबसल्याप्रसिद्ध स्पा उपचारपद्धाीचा आनंद घेऊ शकता, तेही स्वत:च्या बाथरुममध्ये ! डॉ. पॅट्रिक होरे हे स्नायू आण् अस्थींचे उपचारतज्ञ असून, ते त्यांच्या उपचारपद्धतीत, सुलभ जीवन शैली आणि स्व-संगोपन यावर भर देतात. ते बर्वले, कॅलिफोर्नियामधे कार्यरत आहेत. अमेरिकेतल्या नॉर्दन व्हरमॉन्टच्या कडाक्याच्या थंडीत आपल्या पाठीसाठी गरम पाण्याचे उपचार घेऊन, ते तंदुरुस्त राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50 #USHNAJALPOCHAR #HOTWATERTHERAPY #उष्णजलोपचार #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUBHASHJOSHI #सुभाषजोशी #DAVIDHARPDR.PATRICKHORAY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 18-06-2010

    गरम पाण्याचा शेक घ्या!... सध्याच्या गतिमान आयुष्यात थोडी विश्रांती घेऊन म्हटले तरी आसपासचे जग आपल्याला ती घेऊ देत नाही. त्यातून वेगवेगळे तणाव निर्माण होत आहेत. रोजच्या ताणामुळे शरीरात व मनात तणाव निर्माण होतात. त्यातून डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी कध मागे लागते, हे नेमके कळत नाही, तर कधी कमरेत लचक भरलीय का, ही शंका येते. फ्रोजन शोल्डरचा कुणाला त्रास होऊ लागतो, तर कुणाचे गुडघे कुरकूर करू लागतात. एखाद्या वेदनाशामक मलमाने मालिश करून आपण तातडीचा आराम मिळवतोही; पण या दुखण्यातून पूर्ण सुटका होत नाही. आपल्याला माहीत असलेले उपचार घ्यावेत, तर ते महागडे तरी असतात किंवा ते करून घेण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला शक्य नसतात आता एक आणखी पर्याय आपल्यापुढे आला आहे, तो म्हणजे ‘उष्ण जलोपचार’! गरम पाण्यात पंचा बुडवून दुखऱ्या ठिकाणी शेक घ्यायची आपली पद्धत होतीच की! पण आजीच्या पद्धतीना अशास्त्रीय ठरवून आपण त्या बाद केल्या आहेत. आता त्या पद्धतीची परदेशी आवृत्ती आली आहे : ‘हॉट वॉटर थेरपी’, डॉ. पॅट्रिक होरे व डेव्हिड हार्प यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा सुरेख अनुवाद सुभाष जोशी यांनी केला आहे. अगदी अंघोळ करता करता दहा मिनिटे राखून ठेवायची आणि उपचार घ्यायचे, हे सोपे सूत्र यामागे आहे. एकीकडे गरम पाण्याचा दुखऱ्या भागाला होणारा स्पर्श आणि त्या भागाला दिलेला थोडासा ताण यामुळे हे उपचार होतात. ही पद्धत सोपी आहे. ती खूप परिणामकारक असल्याचा डॉ. होरे यांचा दावा आहे. या उपचारपद्धतीची खूप चांगल्या रीतीने या पुस्तकात ओळख करून देण्यात आली आहे. ही उपचार पद्धती नेमकी काय आहे? तिचे वेगळेपण कशात आहे? गरम पाण्याने नेमके काय साधते? याविषयी सुरवातीला निवेदन आहे. भारतीयसंस्कृतीने, आयुर्वेदाने पाण्याला अंतर्गत व बाह्यउपचारात महत्त्व दिलेले आहेच. गरम पाण्याची कुंड ही तीर्थक्षेत्रे बनतात, हा आपला अनुभव आहे. आयुर्वेदातील स्वेदनाची आपल्याला माहिती आहे. याचाच वेगळा उपयोग डॉ. होरे यांनी करून घेतलेला आहे. आपल्या प्रभावी कथनशैलीत सोपेपणाने ते शरीराची माहिती करून देतात आणि आपल्याला विश्वासात घेतात. नेमके कुठे दुखते हे कसे ओळखायचे? तिथे आपल्या आपण मसाज कसा करायचा? हे समजावून सांगतात. मग गरम पाण्यात व्यायाम कसा करायचा,शरीराला ताण कसा द्यायचा, हे सांगतात. आपल्या नेहमीच्या शरीरिक क्रियाच व्यायाम म्हणून किंवा ताण देण्यासाठी उपयोगात आणलेल्या असल्याने आपण काहीतरी वेगळे करायचे आहे, ही भवनाच दूर होते व रुग्णांना आत्मविश्वास मिळतो. त्यांनी दैनंदिन सरावाची आखणीही करून दिली आहे. गरम पाण्याच्या उपचारपद्धतीत जसे आयुर्वेदाचे वेगळे रूप तुम्हाला दिसेल, तसे त्यानंतर शरीराला देण्याच्या पद्धतीतही जाणवेल. प्राणायाम, ध्यानधारणा हे उपाय आयुर्वेदाने सांगितले आहेत. शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात. या पद्धतीत थोडा बदल करून अमेरिकन रीतीने मोजणी करीत ध्यानधारणा करण्यास डॉ. होरे सुचवतात. ऐकूण भारतीयांना सहज स्वीकारता येईल, आपल्या जीवनशैलीत असलेलीच अशी ही उपचारपद्धती आहे. ती मुळात अमेरिकनांना सांगितली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अमेरिकन जीवनशैलीनुसार तपशील येतो. भाषांतराच्या वेळी हा तपशील सुधारून घेता आला असता खरा; पण मग कदाचित आपणच म्हणालो असतो, हे तर आपल्याला आजीने आधीच सांगितललेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more