* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHEN FRIENDSHIP HURTS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789386342294
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
  • Available in Combos :JAN YEGER BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN WHEN FRIENDSHIP HURTS, JAN YAGER, RECOGNIZED INTERNATIONALLY AS A LEADING EXPERT ON FRIENDSHIP, EXPLORES WHAT CAUSES FRIENDSHIPS TO FALTER AND EXPLAINS HOW TO MEND THEM - OR END THEM. IN THIS STRAIGHTFORWARD, ILLUMINATING BOOK FILLED WITH DOZENS OF QUIZZES AND REAL-LIFE EXAMPLES. THE FIRST HIGHLY PRESCRIPTIVE BOOK TO FOCUS ON THE COMPLEXITIES OF FRIENDSHIP, WHEN FRIENDSHIP HURTS DEMONSTRATES HOW, WHY, AND WHEN TO LET GO OF BAD FRIENDS AND HOW TO DEVELOP THE POSITIVE FRIENDSHIPS THAT ENRICH OUR LIVES ON EVERY LEVEL. FOR EVERYONE WHO HAS EVER WONDERED ABOUT FRIENDS WHO BETRAY, HURT, OR REJECT THEM, THIS AUTHORITATIVE BOOK PROVIDES INVALUABLE INSIGHTS AND ADVICE TO RESOLVE THE PROBLEM ONCE AND FOR ALL.
सदर पुस्तक मैत्रीतील विश्वासघात, नकारात्मक संबंधांची हाताळणी कशी करायची? खरे मित्र ओळखण्याच्या कसोट्या, मैत्रीची व्याख्या, मैत्रीतील कच्चे दुवे या पैलूंवर भाष्य करते. प्रत्येकाच्याच आयुष्यात ‘मैत्री’ ही खूपच महत्त्वाची बाब असते. पण ‘मैत्री’ प्रत्येकवेळी सकारात्मक असेल असे नाही. नकारात्मक मैत्री व त्यामुळे घडणारे अनर्थ याचा आपण विचारच करत नाही. मैत्रीत होणारे विश्वासघात जर आपण मित्रांना काही कसोट्यांमधून समजावून घेतले तर टाळता येऊ शकतात. सकारात्मक, निरोगी (मनाने) मित्र कसे ओळखावे. याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. मित्र-मैत्रीणींचा खरे-खोटेपणा, मैत्रीतील अपेक्षा अपेक्षित वर्तन, बदल विंÂवा सुधारणा, तुटणारी मैत्री वाचवणे, स्त्री-पुरुष दोघांच्या दृष्टीने मैत्रीची गरज या दृष्टीने सदर पुस्तक उदाहरणांसहीत स्पष्टीकरण देते. मैत्रीच्या नात्यातील बारकाव्यांचे सूक्ष्म निरीक्षण लेखिकेने केले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
FRIENDSHIP #BETRAYAL #NEGATIVE #POSITIVE# FRIENDS# HONESTY# SECRETS# SELFLESS# SELF-DENYING# TRUST NATURE# COUNSELOR# TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI#SUPRIYAVAKIL#सुप्रियावकील#JANYAGER
Customer Reviews
  • Rating StarDakasha Mokashi

    बऱ्याच दिवसानंतर गेल्या महिन्यात लायब्ररीत जाणे झाले.सध्या कोरोना मुळे तिथे मेम्बर्स ना पुस्तक हाताळायला देत नाहीत, रॅक वरची पुस्तके तिथल्या ग्रंथ सेवकाकडे पहायला मागू शकता किंवा एक यादी ठेवली आहे त्यातला क्रमांक सांगून ते पुस्तक मागून घेऊ शकता.मला लंबून चं हे पुस्तक दिसलं, नावं च इतकं इंटरेस्टिंग वाटलं की मी हेच पुस्तक वाचायचं ठरवून लगेच मागून घेतलं. "मैत्री अशी आणि तशी" मूळ जँन येगर या इंग्रजी लेखिकेने लिहिलेल्या "when friendship hurts" या इंग्रजी पुस्तकाचा श्रीम. सुप्रिया वकील यांनी लिहिलेला हा अनुवाद.जँन येगर या गेली 20 वर्ष नात्यांचा अभ्यास करत आहेत.त्यात "मैत्री" हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय आहे.नातेसबंधावर लेखन करणाऱ्या आणि व्याख्याता म्हणून त्या जगभर प्रसिध्द आहेत मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक हवा हवासा असा रेशीम बंध , आवडते विसाव्याचे, विरंगुळ्याचे असे ठिकाण. आजवर एकही मित्र किंवा मैत्रीण नाही किंवा कधी कुणाशी मैत्री करावी अस वाटलं च नाही असा माणूस सापडणं तस विरळाच.अशा या मैत्री च्या नात्याचं महत्व ओळखून लेखिकेने दीर्घ संशोधन करून हा विषय या पुस्तकात मांडला आहे. कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊन मुळे का होईना आपल्या सर्वांना च अचानक खूप वेळ हातात आला तो आपण जसा कुटूंबासाठी दिला तसा त्या निमित्ताने का होईना मैत्री साठी ही दिला rather कुटुंब सारखाच मैत्री मुळे ही हा काळ सुखावह झाला असे ही म्हणायला हरकत नाही मग ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याने झालेली मैत्री असो किंवा जुन्या मित्र मैत्रिणी नची फोन, व्हिडीओ कॉल यातून पुन्हा नव्याने बहरलेली मैत्री असो,अशा या मैत्री चे खरं तर खूप महत्वाचे स्थान असते आपल्या आयुष्यात. अशी ही मैत्री आपली कायम सोबत करते , आपल्या ला आधार देते , धीर देते , वेळप्रसंगी आपल्या पाठीशी उभी राहते आणि याच मैत्री ची वीण जर उसवत गेली तर हीच मैत्री आयुष्य वैराण ही करू शकते. हेच मैत्री च नातं जोडण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे.ज्यातून आपले आयुष्य अधिक सुंदर ,सुखावह होईल तसेच अपायकारक लोक आधीच कसे ओळखता येतील आणि अशा लोकांशी कसे डील करावे यासाठी नकारात्मक मित्रांचे/मैत्रिणी चे 21 प्रकार या पुस्तकात लेखिकेने दिलेले आहेत.शिवाय मैत्री चे ही काही अलिखित नियम असतात ते कोणते , ते का पाळले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टी एक हजार लोकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि मुलाखती घेऊन लेखिकेने यात मांडलेल्या आहेत. आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या तुन वेळ मिळाला तर मैत्री असे नसून , मैत्री ही खास वेळ काढून आनंद मिळवण्याची गोष्ट आहे.मैत्री ही नुसतीच मानसिक नाही तर आपले शारीरिक स्वास्थ्य ही कसे उत्तम ठेवते याबद्दल ही लेखिकेने यात मार्गदर्शन केलेले आहे.अशी ही मैत्री जोडण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्यातला आनंद मिळवण्यासाठी तसेच मैत्री तुन उदभवणारे संघर्ष टाळण्यासाठी, नकारात्मक मैत्री वर मात करण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे. © ऍड.सौ.दक्षा मोकाशी. ...Read more

  • Rating StarVYAPARI MITRA - MAY 2017

    ‘‘व्हेन फेंडशिप हार्ट्स’’ या इंगजी पुस्तकाच्या लेखिका जॅन येगर म्हणतात, या पुस्तकासाठी संशोधन व लेखन करण्याच्या निमित्तानं मला अपूर्व व मौल्यवान संधी मिळाली. या पुस्तकामध्ये मैत्रीच्या व्याख्येपासून ते समाजशास्त्रीयदृष्ट्या ‘मैत्री’ या विषयाबद्दल सर् नमूद केले आहे. मैत्री कशी जुळते, ती कशी जपली जाते, तिची अखेर कशी होते, आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील मैत्रीबद्दल लिहिले आहे. मैत्री एक महत्त्वाचे नाते आहे ते जपण्यासाठी वेळ काढण्याचीही गरज आहे. पुस्तकाची मांडणी एकूण ५ भागात केली असून भाग १ : मैत्री - मुलभूत बाबी; भाग २ - मित्रच मित्रांना का दुखावतात; भाग ३ - यशस्वी लढा; भाग ४ - बिझनेस, काम आणि मित्र-मैत्रिणी आणि भाग ५ - नव्याने सुरुवात करा. तसेच सुरुवातीला ‘जेव्हा मैत्री अपकारक वळणावर येते.’ त्याबाबत उहापोह केला आहे. या पुस्तकातून तुम्ही संघर्ष मिटविण्याची जी कौशल्ये शिकाल. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे अडचणीत सापडलेले मैत्रीचे नात वाचवू शकाल. तसेच मुळात मैत्री कुणाशी करावी, तसेच नकारात्मक मित्र / मैत्रिणीला कसे तोंड द्यावे. ज्यायोगे तुम्ही मैत्रीची अखेर करू शकल ती सुद्धा सुत्र-सूत्र सुरू होण्याची शक्यता कमी करून याबद्दल मार्गदर्शन मिळेल. मैत्री हा आयुष्यातील एक सुरेख रेशीमबंध असतो जो आयुष्यातील चढ-उतारात आपली सोबत करतो, उमेद वाढवितो. या नात्याची वीण उसवत गेली तर माणसाचे आयुष्य वैराण होऊ शकते. अशा या मैत्री या नात्याचे महत्त्व ओळखून ‘जॅन येगर’ या लेखिकेने यामध्ये या विषयाची सविस्तर मांडणी केली आहे. पुस्तकाची मराठी भाषा सोपी असून पुस्तक वाचायला घेतल्यावर नकळत आपण ते सर्व वाचून काढल्याशिवाय ठेऊच शकत नाही.‘मैत्री’ संबंधी ज्या कोणाला इत्थंभूत माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - MAY 2017

    इंग्रजी लेखिका जॅन येगर यांच्या ‘व्हेन फ्रेंण्डशिप हर्ट्स’या पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी केलेला अनुवाद म्हणजे ‘मैत्री अशी आणि तशी’ हे पुस्तक. ‘यह दोस्ती हम नही तोंडेगे’ ‘यारी है ईमान मेरा’अशी बॉलीवुडी गाणी सतत आपल्या यारी-दोस्तीतल्या इमानची, सच्चाईची, ताकदीची आठवण करून देतात. मैत्री ही सगळ्यांच्याच आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट असते. एकसुद्धा मित्र किंवा मैत्रीण नाही, अशी एकही व्यक्ती समजात सापडणार नाही. कारण मैत्रीमधली सोबत, शेअरिंग हे एखाद्या टॉनिकसारखं असतं. ‘जीवन सुंदर आहे, कारण तुमच्यासारखे मित्र सोबत आहेत’ वगैरे प्रकारचे गोड गोड संदेशही समाजमाध्यांमध्ये फिरत असतात. असे सगळ्या प्रकारे दोस्तीचे गोडवे गात असतानाच जेव्हा ‘मैत्री अशी आणि तशी’ हे पुस्तक समोर येतं तेव्हा मैत्रीची नेमकी व्याख्या काय? मैत्रीचे प्रकार कोणते? याबरोबरच मैत्रीत होणारी बेइमानी, त्याच्या बदलत जाणाऱ्या पातळ्या अशा काही कटू सत्यांचं भानही येतं. मैत्री हे रक्ताच्या नात्यातूनही वेगळं, छानसं नातं सगळेच मानतात. इतर नात्यांप्रमाणे या नात्यातही अनेकदा समस्या उद्भवता, कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण दोस्तांशी डील करण्याचे प्रत्येकाचे वैयक्तिक हटके फंडे असतात. फ्रेंण्डशिप कोच ही संकल्पना समोर येताच, काही अंशी तत्त्वांचा आणि भावनांचा कल्लोळ उठतो. मैत्रीमध्ये निर्माण होणारे प्रश्न, उडणारे खटके या संदर्भात एखाद्या फ्रेंण्डशिप कोचचं मार्गदर्शन घ्यावं असा विचार भारतात तरी क्वचितच होत असेल. चित्रपट, कथा-कादंबऱ्यामधून मैत्रीचं कितीही गुणगान गायलं जात असलं, तरी पुस्तकात नमूद केलेले अनेक नकारात्मक प्रसंग आपल्याकडेही घडत असतात. अशा मैत्री संबंधांमधून जीवघेणे प्रसंग ओढवल्याची उदाहरणंही आपण बघतो, पण मैत्री जुळताना, ती दृढ होताना, समोरच्या व्यक्तीमध्ये, नातेसंबंधांमध्ये कशा प्रकारे अपयश येतं, त्याचं मूळ काय? शाळा-कॉलेज, नोकरी व्यवसायांची ठिकाणं, समाजमाध्यमांवरची मैत्री या प्रत्येक ठिकाणी मैत्रीची व्याख्या, व्याप्ती बदलत जाते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत जातात, आणि मैत्रीतल्या या बाबींचाही इतका खोल विचार केला जातो हे वाचतानाच, त्यातून समाजातील निरिक्षणं, वैयक्तिक अनुभव याबाबत वाचकांच्या मनात आपोआपच तुलनात्मक विचार सुरू होतो. एखादी विनाशकारी मैत्री कशी तोडायची? विशेषतः ही व्यक्ती जवळची वा अगदी खास असेल तर. जिथं खूप आत्मीय भावना असतात आणि अतिशय खासगी माहितीचं आदान-प्रदान झालेलं असतं अशा ठिकाणी तुमच्या माजी मित्र-मैत्रिणीला तुम्हाला संतप्त करायचं नसतं. बऱ्याचदा तुम्हाला अशा मैत्रीचा नाट्यपूर्ण शेवट होण्याऐवजी ती विरून जावी असं वाटत असतं; थेट तोंडातोंडी होण्यापेक्षा हा मैत्रीबंध हळूहळू विलग व्हावा असं तुम्हाला वाटत असतं. याचं कारण म्हणजे तुम्हाला तुमच्याविरुद्ध सूडसत्र सुरू व्हायला नको असतं. त्याचबरोबर, तुम्हाला नाट्यमय अखेरही टाळायची असते, कारण त्यासाठी भावनांची प्रचंड खळबळ आणि ऊर्जा खर्च होते. या नात्यासाठी आधीच तुमचे बरेच मौल्यवान साधनस्रोत खर्च झाले आहेत असं तुम्हाला वाटत असतं. जर ‘मजेत जगणं’हा सर्वोत्तम सूड असेल, तर सकारात्मक ‘मैत्री असणं’हा सर्वोत्तम सूड आहे. पुस्तकाच्या मूळ इंग्रजी लेखिका जॅन येगर यांच्या मैत्रीविषयीच्या सखोल अभ्यासातून, संशोधनातून असे अनेक निष्कर्ष या पुस्तकात मांडले आहेत. मैत्रीतील सर्वसाधारण मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय तत्त्व, परिस्थितीनुसार, काळानुसार त्यात होत गेलेले बदल, मैत्रीसंबंधीची काही यशस्वी, अयशस्वी उदाहरणं अशा मैत्रीबद्दलचं अथपासून इतिपर्यंत सगळ्या गोष्टी या पुस्तकात वाचता येतात. मैत्रीबद्दलचं हे लिखाण मराठीत वाचताना ते संशोधनपर असूनही त्यात क्लिष्टता, बोजडपणा जाणवत नाही हे सुप्रिया वकील यांच्या अनुवादाचं कौशल्यच आहे. अपायकारक मैत्री, नकारात्मक मैत्री टिकवण्यासंदर्भात किंवा तिला पूर्णविराम देण्यासंदर्भातली प्रश्नावली आणि टिप्स, मैत्री करण्यापूर्वी माणसं कशी ओळखावीत? ब्रेक के बाद मैत्री जोडताना करायची पडताळणी, प्रश्नावली समाविष्ट असलेलं हे पुस्तक म्हणजे एक मैत्री ही वैश्विक संकल्पना असली, तरी संस्कृती, परंपरा, सामाजिक, आर्थिक, वैचारिक परिस्थितीनुसार तिचे कंगोरे बदलत जातात. त्यामुळे शालेय परीक्षांसाठी विविध विषयाच्या मार्गदर्शक पुस्तकांचा जसा आधार घेतला जातो, तसाच आधार या मार्गदर्शकाचा घेता येऊ शकतो, शालेय पातळीवरील विषयांचं मार्गदर्शक उत्तरं लिहून गुण मिळविण्यासाठी निश्चितच उपयोगी असतं, तसंच हे मार्गदर्शक मैत्री जोडण्या-तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल. पण कृत्रिमपणे.... कारण अर्थातच, मूळ विषयाचं ‘मैत्रीचं’आकलन हे ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार होणार. मैत्रीच्या विविध पैलूंना स्पर्श करत हे पुस्तक आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करतं, अगदी मुखपृष्ठापासून, मनगटावरचे रंगीबेरंगी बॅण्ड्स कितीही आकर्षक असले तरी तुमच्या मैत्रीचे बंध किती दृढ आहेत हे त्यावरून ठरू शकत नाही. त्यासाठी एकमेकांत गुंतणं नाही, तर त्या एकमेकात गुंफलेल्या हातांसारखं गुंफलं जाणं आवश्यक असतं. म्हणूनच मुखपृष्ठावरच सांगितलं आहे, की विश्वासघात करणाऱ्या, नातं तोडणाऱ्या किंवा मनावर घाव घालणाऱ्या मित्रांशी पुन्हा मैत्री करा. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 09-04-2017

    आयुष्यात रक्ताच्या नात्याइतकीच महत्त्वाची असते मैत्री. प्रत्येक चढउतारात मित्रमैत्रिणी सुरेख साथ देतात. आधार देतात. उमेद जागवतात. उत्साह वाढवतात; पण हेच जर मैत्रीचे नाते बिघडले, तर मात्र होत्याचे नव्हते होऊन बसते. जिवाला जीव देणारे हे मित्र जिवावर उठेले आपण पाहतो. त्यात आता हे नाते अधिक संवेदनशील बनत चाललेले आहे. लेखिका जॅन येगर यांनी या एकूणच विषयाची संशोधनपर मांडणी केली आहे. ही मैत्री अधिक चांगली कशी टिकवून ठेवता येईल, हे नात अधिक चांगल्या रीतीने कसे फुलवता येईल, याचे मार्गदर्शन केले आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more