* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHEN FRIENDSHIP HURTS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789386342294
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
  • Available in Combos :FRIENDSHIP DAY COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN WHEN FRIENDSHIP HURTS, JAN YAGER, RECOGNIZED INTERNATIONALLY AS A LEADING EXPERT ON FRIENDSHIP, EXPLORES WHAT CAUSES FRIENDSHIPS TO FALTER AND EXPLAINS HOW TO MEND THEM - OR END THEM. IN THIS STRAIGHTFORWARD, ILLUMINATING BOOK FILLED WITH DOZENS OF QUIZZES AND REAL-LIFE EXAMPLES. THE FIRST HIGHLY PRESCRIPTIVE BOOK TO FOCUS ON THE COMPLEXITIES OF FRIENDSHIP, WHEN FRIENDSHIP HURTS DEMONSTRATES HOW, WHY, AND WHEN TO LET GO OF BAD FRIENDS AND HOW TO DEVELOP THE POSITIVE FRIENDSHIPS THAT ENRICH OUR LIVES ON EVERY LEVEL. FOR EVERYONE WHO HAS EVER WONDERED ABOUT FRIENDS WHO BETRAY, HURT, OR REJECT THEM, THIS AUTHORITATIVE BOOK PROVIDES INVALUABLE INSIGHTS AND ADVICE TO RESOLVE THE PROBLEM ONCE AND FOR ALL.
सदर पुस्तक मैत्रीतील विश्वासघात, नकारात्मक संबंधांची हाताळणी कशी करायची? खरे मित्र ओळखण्याच्या कसोट्या, मैत्रीची व्याख्या, मैत्रीतील कच्चे दुवे या पैलूंवर भाष्य करते. प्रत्येकाच्याच आयुष्यात ‘मैत्री’ ही खूपच महत्त्वाची बाब असते. पण ‘मैत्री’ प्रत्येकवेळी सकारात्मक असेल असे नाही. नकारात्मक मैत्री व त्यामुळे घडणारे अनर्थ याचा आपण विचारच करत नाही. मैत्रीत होणारे विश्वासघात जर आपण मित्रांना काही कसोट्यांमधून समजावून घेतले तर टाळता येऊ शकतात. सकारात्मक, निरोगी (मनाने) मित्र कसे ओळखावे. याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. मित्र-मैत्रीणींचा खरे-खोटेपणा, मैत्रीतील अपेक्षा अपेक्षित वर्तन, बदल किंवा सुधारणा, तुटणारी मैत्री वाचवणे, स्त्री-पुरुष दोघांच्या दृष्टीने मैत्रीची गरज या दृष्टीने सदर पुस्तक उदाहरणांसहीत स्पष्टीकरण देते. मैत्रीच्या नात्यातील बारकाव्यांचे सूक्ष्म निरीक्षण लेखिकेने केले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
FRIENDSHIP #BETRAYAL #NEGATIVE #POSITIVE# FRIENDS# HONESTY# SECRETS# SELFLESS# SELF-DENYING# TRUST NATURE# COUNSELOR# TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI#SUPRIYAVAKIL#सुप्रियावकील#JANYAGER
Customer Reviews
  • Rating StarDakasha Mokashi

    बऱ्याच दिवसानंतर गेल्या महिन्यात लायब्ररीत जाणे झाले.सध्या कोरोना मुळे तिथे मेम्बर्स ना पुस्तक हाताळायला देत नाहीत, रॅक वरची पुस्तके तिथल्या ग्रंथ सेवकाकडे पहायला मागू शकता किंवा एक यादी ठेवली आहे त्यातला क्रमांक सांगून ते पुस्तक मागून घेऊ शकता.मला लंबून चं हे पुस्तक दिसलं, नावं च इतकं इंटरेस्टिंग वाटलं की मी हेच पुस्तक वाचायचं ठरवून लगेच मागून घेतलं. "मैत्री अशी आणि तशी" मूळ जँन येगर या इंग्रजी लेखिकेने लिहिलेल्या "when friendship hurts" या इंग्रजी पुस्तकाचा श्रीम. सुप्रिया वकील यांनी लिहिलेला हा अनुवाद.जँन येगर या गेली 20 वर्ष नात्यांचा अभ्यास करत आहेत.त्यात "मैत्री" हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय आहे.नातेसबंधावर लेखन करणाऱ्या आणि व्याख्याता म्हणून त्या जगभर प्रसिध्द आहेत मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक हवा हवासा असा रेशीम बंध , आवडते विसाव्याचे, विरंगुळ्याचे असे ठिकाण. आजवर एकही मित्र किंवा मैत्रीण नाही किंवा कधी कुणाशी मैत्री करावी अस वाटलं च नाही असा माणूस सापडणं तस विरळाच.अशा या मैत्री च्या नात्याचं महत्व ओळखून लेखिकेने दीर्घ संशोधन करून हा विषय या पुस्तकात मांडला आहे. कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊन मुळे का होईना आपल्या सर्वांना च अचानक खूप वेळ हातात आला तो आपण जसा कुटूंबासाठी दिला तसा त्या निमित्ताने का होईना मैत्री साठी ही दिला rather कुटुंब सारखाच मैत्री मुळे ही हा काळ सुखावह झाला असे ही म्हणायला हरकत नाही मग ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याने झालेली मैत्री असो किंवा जुन्या मित्र मैत्रिणी नची फोन, व्हिडीओ कॉल यातून पुन्हा नव्याने बहरलेली मैत्री असो,अशा या मैत्री चे खरं तर खूप महत्वाचे स्थान असते आपल्या आयुष्यात. अशी ही मैत्री आपली कायम सोबत करते , आपल्या ला आधार देते , धीर देते , वेळप्रसंगी आपल्या पाठीशी उभी राहते आणि याच मैत्री ची वीण जर उसवत गेली तर हीच मैत्री आयुष्य वैराण ही करू शकते. हेच मैत्री च नातं जोडण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे.ज्यातून आपले आयुष्य अधिक सुंदर ,सुखावह होईल तसेच अपायकारक लोक आधीच कसे ओळखता येतील आणि अशा लोकांशी कसे डील करावे यासाठी नकारात्मक मित्रांचे/मैत्रिणी चे 21 प्रकार या पुस्तकात लेखिकेने दिलेले आहेत.शिवाय मैत्री चे ही काही अलिखित नियम असतात ते कोणते , ते का पाळले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टी एक हजार लोकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि मुलाखती घेऊन लेखिकेने यात मांडलेल्या आहेत. आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या तुन वेळ मिळाला तर मैत्री असे नसून , मैत्री ही खास वेळ काढून आनंद मिळवण्याची गोष्ट आहे.मैत्री ही नुसतीच मानसिक नाही तर आपले शारीरिक स्वास्थ्य ही कसे उत्तम ठेवते याबद्दल ही लेखिकेने यात मार्गदर्शन केलेले आहे.अशी ही मैत्री जोडण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्यातला आनंद मिळवण्यासाठी तसेच मैत्री तुन उदभवणारे संघर्ष टाळण्यासाठी, नकारात्मक मैत्री वर मात करण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे. © ऍड.सौ.दक्षा मोकाशी. ...Read more

  • Rating StarVYAPARI MITRA - MAY 2017

    ‘‘व्हेन फेंडशिप हार्ट्स’’ या इंगजी पुस्तकाच्या लेखिका जॅन येगर म्हणतात, या पुस्तकासाठी संशोधन व लेखन करण्याच्या निमित्तानं मला अपूर्व व मौल्यवान संधी मिळाली. या पुस्तकामध्ये मैत्रीच्या व्याख्येपासून ते समाजशास्त्रीयदृष्ट्या ‘मैत्री’ या विषयाबद्दल सर् नमूद केले आहे. मैत्री कशी जुळते, ती कशी जपली जाते, तिची अखेर कशी होते, आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील मैत्रीबद्दल लिहिले आहे. मैत्री एक महत्त्वाचे नाते आहे ते जपण्यासाठी वेळ काढण्याचीही गरज आहे. पुस्तकाची मांडणी एकूण ५ भागात केली असून भाग १ : मैत्री - मुलभूत बाबी; भाग २ - मित्रच मित्रांना का दुखावतात; भाग ३ - यशस्वी लढा; भाग ४ - बिझनेस, काम आणि मित्र-मैत्रिणी आणि भाग ५ - नव्याने सुरुवात करा. तसेच सुरुवातीला ‘जेव्हा मैत्री अपकारक वळणावर येते.’ त्याबाबत उहापोह केला आहे. या पुस्तकातून तुम्ही संघर्ष मिटविण्याची जी कौशल्ये शिकाल. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे अडचणीत सापडलेले मैत्रीचे नात वाचवू शकाल. तसेच मुळात मैत्री कुणाशी करावी, तसेच नकारात्मक मित्र / मैत्रिणीला कसे तोंड द्यावे. ज्यायोगे तुम्ही मैत्रीची अखेर करू शकल ती सुद्धा सुत्र-सूत्र सुरू होण्याची शक्यता कमी करून याबद्दल मार्गदर्शन मिळेल. मैत्री हा आयुष्यातील एक सुरेख रेशीमबंध असतो जो आयुष्यातील चढ-उतारात आपली सोबत करतो, उमेद वाढवितो. या नात्याची वीण उसवत गेली तर माणसाचे आयुष्य वैराण होऊ शकते. अशा या मैत्री या नात्याचे महत्त्व ओळखून ‘जॅन येगर’ या लेखिकेने यामध्ये या विषयाची सविस्तर मांडणी केली आहे. पुस्तकाची मराठी भाषा सोपी असून पुस्तक वाचायला घेतल्यावर नकळत आपण ते सर्व वाचून काढल्याशिवाय ठेऊच शकत नाही.‘मैत्री’ संबंधी ज्या कोणाला इत्थंभूत माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - MAY 2017

    इंग्रजी लेखिका जॅन येगर यांच्या ‘व्हेन फ्रेंण्डशिप हर्ट्स’या पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी केलेला अनुवाद म्हणजे ‘मैत्री अशी आणि तशी’ हे पुस्तक. ‘यह दोस्ती हम नही तोंडेगे’ ‘यारी है ईमान मेरा’अशी बॉलीवुडी गाणी सतत आपल्या यारी-दोस्तीतल्या इमानची, सच्चाईची, ताकदीची आठवण करून देतात. मैत्री ही सगळ्यांच्याच आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट असते. एकसुद्धा मित्र किंवा मैत्रीण नाही, अशी एकही व्यक्ती समजात सापडणार नाही. कारण मैत्रीमधली सोबत, शेअरिंग हे एखाद्या टॉनिकसारखं असतं. ‘जीवन सुंदर आहे, कारण तुमच्यासारखे मित्र सोबत आहेत’ वगैरे प्रकारचे गोड गोड संदेशही समाजमाध्यांमध्ये फिरत असतात. असे सगळ्या प्रकारे दोस्तीचे गोडवे गात असतानाच जेव्हा ‘मैत्री अशी आणि तशी’ हे पुस्तक समोर येतं तेव्हा मैत्रीची नेमकी व्याख्या काय? मैत्रीचे प्रकार कोणते? याबरोबरच मैत्रीत होणारी बेइमानी, त्याच्या बदलत जाणाऱ्या पातळ्या अशा काही कटू सत्यांचं भानही येतं. मैत्री हे रक्ताच्या नात्यातूनही वेगळं, छानसं नातं सगळेच मानतात. इतर नात्यांप्रमाणे या नात्यातही अनेकदा समस्या उद्भवता, कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण दोस्तांशी डील करण्याचे प्रत्येकाचे वैयक्तिक हटके फंडे असतात. फ्रेंण्डशिप कोच ही संकल्पना समोर येताच, काही अंशी तत्त्वांचा आणि भावनांचा कल्लोळ उठतो. मैत्रीमध्ये निर्माण होणारे प्रश्न, उडणारे खटके या संदर्भात एखाद्या फ्रेंण्डशिप कोचचं मार्गदर्शन घ्यावं असा विचार भारतात तरी क्वचितच होत असेल. चित्रपट, कथा-कादंबऱ्यामधून मैत्रीचं कितीही गुणगान गायलं जात असलं, तरी पुस्तकात नमूद केलेले अनेक नकारात्मक प्रसंग आपल्याकडेही घडत असतात. अशा मैत्री संबंधांमधून जीवघेणे प्रसंग ओढवल्याची उदाहरणंही आपण बघतो, पण मैत्री जुळताना, ती दृढ होताना, समोरच्या व्यक्तीमध्ये, नातेसंबंधांमध्ये कशा प्रकारे अपयश येतं, त्याचं मूळ काय? शाळा-कॉलेज, नोकरी व्यवसायांची ठिकाणं, समाजमाध्यमांवरची मैत्री या प्रत्येक ठिकाणी मैत्रीची व्याख्या, व्याप्ती बदलत जाते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत जातात, आणि मैत्रीतल्या या बाबींचाही इतका खोल विचार केला जातो हे वाचतानाच, त्यातून समाजातील निरिक्षणं, वैयक्तिक अनुभव याबाबत वाचकांच्या मनात आपोआपच तुलनात्मक विचार सुरू होतो. एखादी विनाशकारी मैत्री कशी तोडायची? विशेषतः ही व्यक्ती जवळची वा अगदी खास असेल तर. जिथं खूप आत्मीय भावना असतात आणि अतिशय खासगी माहितीचं आदान-प्रदान झालेलं असतं अशा ठिकाणी तुमच्या माजी मित्र-मैत्रिणीला तुम्हाला संतप्त करायचं नसतं. बऱ्याचदा तुम्हाला अशा मैत्रीचा नाट्यपूर्ण शेवट होण्याऐवजी ती विरून जावी असं वाटत असतं; थेट तोंडातोंडी होण्यापेक्षा हा मैत्रीबंध हळूहळू विलग व्हावा असं तुम्हाला वाटत असतं. याचं कारण म्हणजे तुम्हाला तुमच्याविरुद्ध सूडसत्र सुरू व्हायला नको असतं. त्याचबरोबर, तुम्हाला नाट्यमय अखेरही टाळायची असते, कारण त्यासाठी भावनांची प्रचंड खळबळ आणि ऊर्जा खर्च होते. या नात्यासाठी आधीच तुमचे बरेच मौल्यवान साधनस्रोत खर्च झाले आहेत असं तुम्हाला वाटत असतं. जर ‘मजेत जगणं’हा सर्वोत्तम सूड असेल, तर सकारात्मक ‘मैत्री असणं’हा सर्वोत्तम सूड आहे. पुस्तकाच्या मूळ इंग्रजी लेखिका जॅन येगर यांच्या मैत्रीविषयीच्या सखोल अभ्यासातून, संशोधनातून असे अनेक निष्कर्ष या पुस्तकात मांडले आहेत. मैत्रीतील सर्वसाधारण मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय तत्त्व, परिस्थितीनुसार, काळानुसार त्यात होत गेलेले बदल, मैत्रीसंबंधीची काही यशस्वी, अयशस्वी उदाहरणं अशा मैत्रीबद्दलचं अथपासून इतिपर्यंत सगळ्या गोष्टी या पुस्तकात वाचता येतात. मैत्रीबद्दलचं हे लिखाण मराठीत वाचताना ते संशोधनपर असूनही त्यात क्लिष्टता, बोजडपणा जाणवत नाही हे सुप्रिया वकील यांच्या अनुवादाचं कौशल्यच आहे. अपायकारक मैत्री, नकारात्मक मैत्री टिकवण्यासंदर्भात किंवा तिला पूर्णविराम देण्यासंदर्भातली प्रश्नावली आणि टिप्स, मैत्री करण्यापूर्वी माणसं कशी ओळखावीत? ब्रेक के बाद मैत्री जोडताना करायची पडताळणी, प्रश्नावली समाविष्ट असलेलं हे पुस्तक म्हणजे एक मैत्री ही वैश्विक संकल्पना असली, तरी संस्कृती, परंपरा, सामाजिक, आर्थिक, वैचारिक परिस्थितीनुसार तिचे कंगोरे बदलत जातात. त्यामुळे शालेय परीक्षांसाठी विविध विषयाच्या मार्गदर्शक पुस्तकांचा जसा आधार घेतला जातो, तसाच आधार या मार्गदर्शकाचा घेता येऊ शकतो, शालेय पातळीवरील विषयांचं मार्गदर्शक उत्तरं लिहून गुण मिळविण्यासाठी निश्चितच उपयोगी असतं, तसंच हे मार्गदर्शक मैत्री जोडण्या-तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल. पण कृत्रिमपणे.... कारण अर्थातच, मूळ विषयाचं ‘मैत्रीचं’आकलन हे ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार होणार. मैत्रीच्या विविध पैलूंना स्पर्श करत हे पुस्तक आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करतं, अगदी मुखपृष्ठापासून, मनगटावरचे रंगीबेरंगी बॅण्ड्स कितीही आकर्षक असले तरी तुमच्या मैत्रीचे बंध किती दृढ आहेत हे त्यावरून ठरू शकत नाही. त्यासाठी एकमेकांत गुंतणं नाही, तर त्या एकमेकात गुंफलेल्या हातांसारखं गुंफलं जाणं आवश्यक असतं. म्हणूनच मुखपृष्ठावरच सांगितलं आहे, की विश्वासघात करणाऱ्या, नातं तोडणाऱ्या किंवा मनावर घाव घालणाऱ्या मित्रांशी पुन्हा मैत्री करा. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 09-04-2017

    आयुष्यात रक्ताच्या नात्याइतकीच महत्त्वाची असते मैत्री. प्रत्येक चढउतारात मित्रमैत्रिणी सुरेख साथ देतात. आधार देतात. उमेद जागवतात. उत्साह वाढवतात; पण हेच जर मैत्रीचे नाते बिघडले, तर मात्र होत्याचे नव्हते होऊन बसते. जिवाला जीव देणारे हे मित्र जिवावर उठेले आपण पाहतो. त्यात आता हे नाते अधिक संवेदनशील बनत चाललेले आहे. लेखिका जॅन येगर यांनी या एकूणच विषयाची संशोधनपर मांडणी केली आहे. ही मैत्री अधिक चांगली कशी टिकवून ठेवता येईल, हे नात अधिक चांगल्या रीतीने कसे फुलवता येईल, याचे मार्गदर्शन केले आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more