ARUNA ASHOK JAIN

About Author


DR. ARUNA AND DR. ASHOK BIRBAL JAIN IS A PROMINENT DOCTOR COUPLE FROM WARDHA. THEY HAVE BEEN PROVIDING THEIR SERVICES TO THE NEEDY PATIENTS FOR THE PAST 30 YEARS THROUGH THEIR UPDATED KNOWLEDGE AND JAIN HOSPITAL, A HOSPITAL EQUIPPED WITH MODERN EQUIPMENT AND PROVIDING VARIOUS FACILITIES. DR. ARUNA IS ORIGINALLY FROM PUNE AND HER SCHOOL AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN PUNE, THE HOME OF SCIENCE, WHILE DR. ASHOK IS ORIGINALLY FROM DELHI AND HIS SCHOOLING AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN THE NATIONAL CAPITAL. RESOLUTIONS.

डॉ. अरुणा व डॉ. अशोक बिरबल जैन हे वर्धा येथील प्रथितयश डॉक्टर दाम्पत्य आहे. आपले अद्यायावात ज्ञान व ‘जैन हॉस्पिटल’ या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज व विविध सुविधा पुरविणाऱ्या रुग्णालयाच्या माध्यमातून ते गेली ३० वर्षे गरजू रुग्णांना आपली सेवा पुरवित आहेत. डॉ. अरुणा या मूळच्या पुण्याच्या असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत झाले आहे तर डॉ. अशोक हे मूळचे दिल्लीचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देशाच्या राजधानीत झाले आहे. महात्मा गांधींच्या आशीर्वादाने स्वातंत्र्यसेनानी डॉ. सुशिला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोघांनीही आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणानंतर गांधी - विनोबांची पवित्र कर्मभूमी वर्धा येथे आपले रुग्णालय सुरू केले. योगाभ्यास, निसर्गोपचार व वैकल्पिक चिकित्सा यामध्ये दोघांनाही गती आहे. गरजेनुसार रोगनिदान व रोगनिवारणाकरिता ते योग्य उपचारप्रणाली निवडतात. तसेच अनेक शासकीय व अशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता व शाळा कॉलेजमधील अध्यापक व विद्याथ्र्यांकरिता वैद्यकीय उपचारांसोबत आध्यात्मिक जोड देणारे उपक्रम व कार्यशाळा राबवितात. मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण केंद्राचे ते संचालक असून या विषयांवरील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. आजपर्यंत विविध वैद्यकीय विषयांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग केवळ अर्थाजनासाठी न करता सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी करणारे डॉ. जैन दाम्पत्य आजच्या पिढीसमोर रुग्णसेवेचे आदर्श उदाहरण ठरावे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MADHUMEHA : EK AAVHAN Rating Star
Add To Cart INR 380

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more