* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 20 MINUTES TO TOTAL FITNESS
  • Availability : Available
  • Translators : GANGADHAR MAHAMBRE
  • ISBN : 9788177665345
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN ESSENTIAL AND PRACTICAL GUIDE TO EVERYTHING YOU NEED TO KNOW ABOUT FITNESS HOW DO YOU FIND THE TIME TO EXERCISE? WHAT IS THE MOST SUITABLE EXERCISE PROGRAMME FOR YOU? HOW DO YOU ASSESS YOUR FITNESS LEVEL? HOW SHOULD YOU CHOOSE A GYM? HOW DO YOU SET UP A GYM AT HOME? WHAT EXERCISES SHOULD YOU DO IF YOU ARE PREGNANT? WHAT EXERCISES SHOULD YOU DO IF YOU ARE SUFFERING FROM HEART DISEASE, ASTHMA OR DIABETES? HOW DO YOU KEEP FIT WHEN TRAVELLING? DO YOU KNOW THE LANGUAGE OF FITNESS? THIS ACCESSIBLE AND INFORMATIVE BOOK SHOWS YOU HOW TO SOLVE YOUR SPECIFIC PROBLEMS TO ACHIEVE THE FITNESS LEVEL YOU HAVE ALWAYS LONGED FOR. THE INTERACTIVE QUESTIONNAIRES AND EVALUATION TESTS HELP DETERMINE YOUR GOALS AND PROGRAMMES, AND DETAILED EXERCISE PLANS FOR EVERY SITUATION MAKE IT POSSIBLE FOR YOU TO FIND EXACTLY WHAT YOU NEED. WHETHER YOUR GOAL IS WEIGHT REDUCTION OR BODYBUILDING, WHETHER YOU HAVE NEVER EXERCISED OR WHETHER YOU ARE LOOKING FOR WAYS TO BENEFIT MORE FROM YOUR PRESENT EXERCISE REGIME, DR SHELLY BATRA EXPLAINS THE MEDICAL THEORY BEHIND FITNESS AND THE PRACTICAL WAYS IN WHICH TO ACHIEVE IT SO THAT YOU CAN MAKE POSITIVE CHOICES TO IMPROVE THE QUALITY OF YOUR LIFE.
`दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे...` या २० मिनिटांचा व्यायाम तुमचे आयुष्य बदलू शकेल! आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे कार्यक्षम असूच शकत नाही. अशी कार्यक्षमता असणारी व्यक्ती ही केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी नसते तर मानसिक संतुलन सांभाळणारी, भावनात्मकदृष्ट्या समतोल आणि सामाजिक वातावरणाशी जुळते घेणारी असते. परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती – फिटनेसची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्यासाठीच `२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी` हे पुस्तक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DR.SHELLYBATRA #GANGADHARMAHAMBRE #HEALTHCARE #20 MINUTES TO TOTAL FITNESS #२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 13-03-2005

    व्यायामाचे महत्त्व... बदलती जीवनशैली आणि बैठे काम यामुळे बऱ्याच जणांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. तज्ज्ञ डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी धावाधाव होते. मग आपण व्यायाम करायला हवा हे लक्षात येते. आहारावर नियंत्रण, व्यायाम या गोष्टी आवश्यक आहेत हे सुद्धासमजते. प्रत्येकाने दररोज वीस मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे, असे पुस्तकाचे शीर्षक सुचवते. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद गंगाधर महम्बरे यांनी केला आहे. पुस्तकात तीन भाग आहेत. त्यामधील प्रत्येक विभागात विविध प्रकरणे आहेत. तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने वाचावे, असे हे पुस्तक आहे. -डॉ. शेली बात्रा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 18-09-2005

    व्यायामाचे तंत्र आणि मंत्र... शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम लाभदायक ठरतो हे सर्वांना कळत असले, तरी फार थोड्या जणांना वळत असते. फिटनेस चाचण्या, कसरती हे सर्व खेळाडू आणि सैनिकांसाठी असतात. असाच अनेकांचा ग्रह असतो. त्यातही जे मोजके लोक ्यायाम करतात तोही बहुधा शास्त्रशुद्ध नसतो. व्यायामशाळेइतका तंतोतंत आणि शास्त्रशुद्ध व्यायाम घरच्या घरी करता येण्यासाठी ‘२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी’ हे शेली बात्रा यांचे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक आहे. ‘२० मिनिटस् टु टोटल फिटनेस’ या डॉ. शेली बात्रा यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा गंगाधर महाम्बरे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे. एकेकाळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या नवी दिल्ली येथील विख्यात संस्थेत कार्यरत असणाऱ्या आणि आता विविध रुग्णालयांत सयंत्रक (कन्सल्टंट) म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. शेली बात्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत व्यायामाचे विविध प्रकार, त्यासाठी लागणारी विविध साधने, व्यायाम करताना पाळावयाची पथ्ये, घ्यावयाची काळजी इ. विषयांची माहिती पुस्तकात नोंदविली आहे. घरच्या घरी व्यायाम करणाऱ्यांना हे पुस्त उपयुक्त टीप्स पुरविते. पुस्तकाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे अवघी वीस मिनिटे व्यायाम करून आपण तंदुरुस्त राहू शकतो. असा विश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे आणि विविध तक्ते, आकृत्या आणि कोष्टकांनी व्यायामाचे अतिशय पद्धतशीरपणे विश्लेषण केले आहे. अगदी तीन-चार ओळींच्या परिच्छेदांतून पुस्तकात अनेक मौलिक माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. या पुस्तकाचे चार विभाग आहेत. प्रारंभिक विभागात व्यायामाचे महत्त्व, तुमच्या निरोगीपणाच्या पातळीचे मापन, व्यायामच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना एरोबिक व्यायाम, अ‍ॅनएरोबिक व्यायाम, सुयोग्य वातावरण, सुयोग्य पेहेराव या विषयांची माहिती देण्यात आली आहे. ‘२० मिनिटे सराव योजना’ या दुसऱ्या विभागात व्यायामाचा कार्यक्रम, वॉर्म-अप आणि शरीराला ताणण्याचे व्यायाम, ताकदीसाठी व्यायाम, तर तिसऱ्या विभागात गर्भावस्था, व्याधीवस्था आणि प्रवासात उपयुक्त ठरणाऱ्या व्यायाम प्रकारांची माहिती आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more