* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YOGA TO BANISH BACKACHE
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788177668384
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 64
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK IS SPECIALLY DESIGNED FOR THOSE WHO SUFFER FROM BACK ACHE DUE TO VARIOUS REASONS SUCH AS CERVICAL SPONDYLITIS, SLIP DISC, SCIATICA PROLAPSED, INTESTINAL PROBLEMS OR SCOLIOSIS. THIS BOOK EXPLAINS ALL THESE PROBLEMS AND THE VARIOUS SIMPLE AND NATURAL YOGAMUDRA TO OVERCOME THEM. AT THE END OF THE BOOK, SHE ALSO SUGGESTS US ABOUT THE IDEAL WAY TO SET OUR ROUTINE. SHE SUGGESTS THE PROPER WAY TO SIT AND STAND, THE WAY TO MAINTAIN OUR CALORIES INTAKE. SHE ALSO GIVES GUIDELINES ABOUT WHEN AND HOW TO PERFORM THE YOGA EVERY DAY.
या पुस्तकामध्ये वाचकांना मानेच्या मणक्यांना सूज येणं (सव्र्हायकल स्पॉण्डिलायटिस), स्लिप-डिस्क, सायटिका प्रोलॅप्स, आतड्यांमधील वायुदोष आणि स्कोलिओसिस यांसारख्या विविध प्रकारच्या पाठीच्या दुखण्यांसंबंधी आणि त्यावरील साध्या, सोप्या पण तरीही परिणामकारक योगिक आणि नैसर्गिक उपायांची माहिती मिळेल. बिजयालक्ष्मी होता या एक नामांकित योगचिकित्सक असून गेली पंचवीस वर्षं या क्षेत्रात काम करत आहेत. अस्थमा, सांधेदुखी, पाठदुखी इ. पासून ते विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर) आणि कर्वÂरोगापर्यंत अनेक आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PATHDUKHIGHALAVANYASATHIYOGSADHANA #YOGATOBANISHBACKACHE #पाठदुखीघालविण्यासाठीयोगसाधना #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #BIJOYLAXMIHOTA #बिजयालक्ष्मीहोता "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI (KOLHAPUR)

    पाठदुखीग्रस्तांसाठी उपयुक्त मार्गदर्शक... सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीसोबत पाठदुखी ही पाठराखण करायला आल्यासारखी आणि कायम ठाण मांडून बसलेली दिसते. स्त्री-पुरुष तसेच सर्व वयोगटांत पाठदुखी सर्रास आढळते आहे त्यामुळे अर्थातच माणसाची कार्यक्षमता खालवते आे, हालचालींवर मर्यादा येतायत. ‘पेनकिलर हा तात्पुरता दिलासा ठरत असला तरी त्यामुळं पाठदुखी काही कायमची पाठ सोडत नाही. शिवाय शरीराला या औषधांची मात्राही लागू पडेनाशी होते तो प्रश्न व या औषधांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या वेगळ्याच! मात्र, पाठदुखीने त्रस्त व्यक्तींना आता एक पुस्तकरूपी मार्गदर्शक व दिलासा लाभला आहे. नामांकित योगचिकित्सक विजयालक्ष्मी होता. यांनी ‘पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना’ या छोटेखानी पुस्तकात पाठीच्या विविध प्रकारच्या दुखण्यासंबधी आणि त्यावरील साध्या, सोप्या पण परिणामकारक योगिक व नैसर्गिक उपयांची सुबोध माहिती दिली आहे. प्रशांत तळणीकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. ‘पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना’ या पुस्तकात पाठदुखीचे प्रकार, त्यासाठी आसनं सचित्र दिली आहेत. त्या जोडीनं ध्यानधारात्मक प्राणायाम, योगिक विश्रांती यांची तंत्रंही अगदी सोप्या भाषेत सांगितली आहेत त्याचबरोबर उपचाराच्या इतर पद्धती म्हणजे पायी चालणं, पोहणं, कटिशेक, सूर्यस्नान, मालिश, पोहणं यासंबंधीही या पुस्तकात विवेचन केलं आहे तसंच योगसाधनेचे नियमही सांगितले आहेत. मनापासून साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. -सौ. सुप्रिया वकील ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 16 -12 -2007

    पाठदुखी घालविण्यासाठी योगसाधना आपला संपूर्ण दिवस वाचन-लेखनात जातो. संगणकासमोर तासन्तास आपण बसून राहतो. संध्याकाळी सभासमारंभाला गेल्यावरही आपण बसून राहतो किंवा तास-दोन तास उभे राहतो. स्रिया उंच टाचांच्या चपला घालून फिरतात. या आपल्या जीवनशैलीचा परिणामआपल्या शरीरावर होतो. विशेषत: आपल्या पाठीवर परिणाम होतो याची आपल्याला जाणीवही नसते. पन्नाशीनंतर पाठीची तक्रार सुरू झाली म्हणजे ते उमगते आणि आपल्या हालचालीवर मर्यादा येऊ लागल्यावर वेदनाशामक औषधे घेऊन जगण्याची पाळी येते. या वेदनाशामकांमुळेही शरीरामध्ये विषारी द्रव्ये जातात आणि पचनसंस्था पार पाडता येत नाहीत; कार्यक्षमता कमी होते. आपण झोपतो तेव्हाही आपल्याला शरीरात २० एकक स्नायूसंधित ताण असतो. त्यामुळे पेशींना रक्तपुरवठा कमी होतो. हा ताण टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा. ताण हे पाठदुखीचे एक मोठे कारण असते. स्नायूंना पद्धतशीर व्यायाम मिळाला तर शरीर-मनाचा ताण कमी होऊन शरीराला मोकळे मोकळे वाटते. पाठीच्या कण्याच्या दोन मणक्यांमध्ये जी चकती असते ती आपल्या जागेवरून सरकली तर स्लिप्ड डिस्कचा त्रास सुरू होतो. आपल्या शरीराच्या चौकटीचा पाठीचा कणा हा एकमेव आधार असतो. मेरुदंड असेही त्याला म्हणतात. ३० लहान हाडे (मणके) एकावर एक रचून हा पाठीचा कणा-मेरुदंड तयार होतो. हे मणके अस्थिबंधनाने जोडलेले असतात. पृष्ठमज्जारज्जूने (स्पायनल कॉडने) ते एकमेकांशी दोरीत ओवल्याप्रमाणे व्यवस्थित राहतात. मज्जारज्जूमधून उगम पावतात आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला संदेश पोहोचवतात. मणके एकमेकांना घासू नयेत म्हणून त्यामध्ये चकतीसारखी उशी असते. (इंन्टरव्हॅटेंबल डिस्क) या चकत्या जेलीसारख्या मऊ पदार्थाने भरलेल्या असतात. हा मऊ पदार्थ चकत्यांच्या तंतूंना घट्ट धरून ठेवतो. हालचालीच्या वेळी आवश्यक तो ताण निर्माण करू शकतो. या चकत्यांची झीज होत असते आणि पुरेशी विश्रांती मिळाल्यावर ती झीज भरून निघते. या चकत्यांमध्ये ८० टक्के ताण पडून त्यातील जेली बाहेर सांडते. मणक्यांमध्ये घर्षण उत्पन्न होते आणि पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते. त्यामुळे पाठ आखडून येते. पाठीत वेदना सुरू होते. पाठीचा कणा हा खालच्या बाजूला, म्हणजे कमरेला जोडलेला असल्याने कमर दुखू लागते. स्लिप डिस्कचा त्रास सुरू होतो. मानेच्या मणक्यांवर ताण पडला तर मानेच्या मणक्यातील चकती जागेवरुन सरकते आणि सव्र्हायकल स्पॉडिलायटिसचा त्रास जाणवू लागतो. मान हा पाठीच्या कण्याचा सगळ्यात परिणामप्रवण भाग असतो. लहानमोठा कुठलाही अपघात झाला तर मानेलाच झटका बसतो आणि मानेतील अस्थिबंधने तुटू शकतात. अस्थिबंधन तुटणे ही गोष्ट हाड मोडण्याएवढीच वेदनादायक असते. मानेला दुखापत झाल्याने, चकती हलल्याने, चकती झिजल्याने, आजूबाजूच्या मज्जातंतूवर दाब पडतो. हात व खांदे दुखतात. त्यांना मुंग्या येतात. हे अवयव बधीर होतात. मानेतल्या कोणत्या मज्जातंतूवर दाब निर्माण झालेला आहे त्यावरुन सव्र्हायकल स्पॉडिलायटिसची लक्षणे ठरतात. कमरेतून निघून पायापर्यंत वेदना जाणवणे, कळ उठणे म्हणजे सायटिका, स्पायनल कॉर्डच्या खालच्या म्हणजे कमरेतून निघून दोन्ही पायांमध्ये मागच्या बाजूने थेट टाचेपर्यंत सायटिक मज्जातंतू किंवा ओघळलेला स्नायू दाब आणत असल्यास सायटिका ही अवस्था उद्भवते. पाठदुखीच्या तक्रारींचे स्वरुप असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. वैद्यकीय उपचार करुनही अनेकदा काही फायदा होत नाही. योगासनांनी पाठदुखी थांबू शकते आणि या तक्रारी दूर होऊ शकतात असा नामांकित योगचिकित्सक विजयालक्ष्मी होता यांचा अनुभव आहे. परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या कृपाप्रसादाने त्यांना योगासनांमध्ये प्रावीण्य संपादन करता आले आणि शेकडो व्यक्तींच्या व्यथावेदना दूर करता आल्या. पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना या पुस्तकात त्यांनी योगासनांचा केव्हा, कसा उपयोग करावा याची माहिती दिली आहे. श्वासन, अद्वासन, मत्सक्रीडासन याद्वारे तीव्र वेदना कमी होऊ शकतात. त्यासाठी कधी दीड-दोन आठवडेही लागू शकतात. तीव्र वेदना कमी झाल्यावर नियमित योगासने करता येतात. तीव्र वेदना असताना सर्व आसने करता येत नाहीत, करुही नयेत. स्लिप डिस्कचा त्रास असेल पाय छातीवर, भुजंगासन, ताडासन, शवासन, मार्जारी आसन करणे श्रेयस्कर ठरते. सव्र्हायकल स्पॉडिलायटिसमध्ये शशांकासन, आकर्ण, धनुरासन, सर्पासन, शवासन आणि हात वरखाली व मागेपुढे करणे फायदेशीर ठरते. सायटिकामध्ये व्याघ्रासन, अर्ध शलभासन, सरल धनुरासन यांच्यामुळे दुखणे थांबवता येते. पाठीचा कणा सदोष असेल तर, स्कोलिऑसिसच्या अवस्थेत समकोनासन, गुप्त पद्मासन, अर्धचंद्रासन, स्पिंक्स, उष्ट्रासन, ताडासन ही आसने उपयुक्त ठरतात. स्कोलिओसिचे दुखणे लहान वयात, शरीर लवचिक असतानाच आटोक्यात येऊ शकते, लहानपणी पोक काढून बसण्याची सवय असेल तर पाठदुखीचा त्रास हमखास होतो. स्कोलिओसिस मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळतो. उसण भरल्याने पाठीचे स्नायू आखडतात. त्यामुळे हालचाल करणे कष्टदायक होते. मान आणि कंबर भरून येते. पोटाच्या पोकळीतला गर्भाशयासारखा अवयव मूळ जागेवरुन खाली सरकरणे याला प्रोलॅप्स म्हणतात. त्यामुळे पाठ दुखते, नौकासन, उत्थानपादासन, कंध्रासन, पश्चिमोत्तानासन, वितरीत करणी मुद्रा, अश्विनी मुद्रा यांनी फायदा होतो. पाठ दुखू नये म्हणून सरळ पाठीच्या खुर्चीवर बसावे. पोक काढून बसू नये, बसल्यावर गुडघे मांड्यांच्या पातळीच्या वर असावे. झोपताना कठीण पृष्ठभागावर झोपावे. त्यामुळे कमकुवत पाठीला आधार मिळतो. अशा अनेक सूचनाही शेवटी दिल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more