* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YOGA TO BANISH BACKACHE
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788177668384
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 64
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK IS SPECIALLY DESIGNED FOR THOSE WHO SUFFER FROM BACK ACHE DUE TO VARIOUS REASONS SUCH AS CERVICAL SPONDYLITIS, SLIP DISC, SCIATICA PROLAPSED, INTESTINAL PROBLEMS OR SCOLIOSIS. THIS BOOK EXPLAINS ALL THESE PROBLEMS AND THE VARIOUS SIMPLE AND NATURAL YOGAMUDRA TO OVERCOME THEM. AT THE END OF THE BOOK, SHE ALSO SUGGESTS US ABOUT THE IDEAL WAY TO SET OUR ROUTINE. SHE SUGGESTS THE PROPER WAY TO SIT AND STAND, THE WAY TO MAINTAIN OUR CALORIES INTAKE. SHE ALSO GIVES GUIDELINES ABOUT WHEN AND HOW TO PERFORM THE YOGA EVERY DAY.
या पुस्तकामध्ये वाचकांना मानेच्या मणक्यांना सूज येणं (सव्र्हायकल स्पॉण्डिलायटिस), स्लिप-डिस्क, सायटिका प्रोलॅप्स, आतड्यांमधील वायुदोष आणि स्कोलिओसिस यांसारख्या विविध प्रकारच्या पाठीच्या दुखण्यांसंबंधी आणि त्यावरील साध्या, सोप्या पण तरीही परिणामकारक योगिक आणि नैसर्गिक उपायांची माहिती मिळेल. बिजयालक्ष्मी होता या एक नामांकित योगचिकित्सक असून गेली पंचवीस वर्षं या क्षेत्रात काम करत आहेत. अस्थमा, सांधेदुखी, पाठदुखी इ. पासून ते विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर) आणि कर्वÂरोगापर्यंत अनेक आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PATHDUKHIGHALAVANYASATHIYOGSADHANA #YOGATOBANISHBACKACHE #पाठदुखीघालविण्यासाठीयोगसाधना #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #BIJOYLAXMIHOTA #बिजयालक्ष्मीहोता "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI (KOLHAPUR)

    पाठदुखीग्रस्तांसाठी उपयुक्त मार्गदर्शक... सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीसोबत पाठदुखी ही पाठराखण करायला आल्यासारखी आणि कायम ठाण मांडून बसलेली दिसते. स्त्री-पुरुष तसेच सर्व वयोगटांत पाठदुखी सर्रास आढळते आहे त्यामुळे अर्थातच माणसाची कार्यक्षमता खालवते आे, हालचालींवर मर्यादा येतायत. ‘पेनकिलर हा तात्पुरता दिलासा ठरत असला तरी त्यामुळं पाठदुखी काही कायमची पाठ सोडत नाही. शिवाय शरीराला या औषधांची मात्राही लागू पडेनाशी होते तो प्रश्न व या औषधांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या वेगळ्याच! मात्र, पाठदुखीने त्रस्त व्यक्तींना आता एक पुस्तकरूपी मार्गदर्शक व दिलासा लाभला आहे. नामांकित योगचिकित्सक विजयालक्ष्मी होता. यांनी ‘पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना’ या छोटेखानी पुस्तकात पाठीच्या विविध प्रकारच्या दुखण्यासंबधी आणि त्यावरील साध्या, सोप्या पण परिणामकारक योगिक व नैसर्गिक उपयांची सुबोध माहिती दिली आहे. प्रशांत तळणीकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. ‘पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना’ या पुस्तकात पाठदुखीचे प्रकार, त्यासाठी आसनं सचित्र दिली आहेत. त्या जोडीनं ध्यानधारात्मक प्राणायाम, योगिक विश्रांती यांची तंत्रंही अगदी सोप्या भाषेत सांगितली आहेत त्याचबरोबर उपचाराच्या इतर पद्धती म्हणजे पायी चालणं, पोहणं, कटिशेक, सूर्यस्नान, मालिश, पोहणं यासंबंधीही या पुस्तकात विवेचन केलं आहे तसंच योगसाधनेचे नियमही सांगितले आहेत. मनापासून साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. -सौ. सुप्रिया वकील ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 16 -12 -2007

    पाठदुखी घालविण्यासाठी योगसाधना आपला संपूर्ण दिवस वाचन-लेखनात जातो. संगणकासमोर तासन्तास आपण बसून राहतो. संध्याकाळी सभासमारंभाला गेल्यावरही आपण बसून राहतो किंवा तास-दोन तास उभे राहतो. स्रिया उंच टाचांच्या चपला घालून फिरतात. या आपल्या जीवनशैलीचा परिणामआपल्या शरीरावर होतो. विशेषत: आपल्या पाठीवर परिणाम होतो याची आपल्याला जाणीवही नसते. पन्नाशीनंतर पाठीची तक्रार सुरू झाली म्हणजे ते उमगते आणि आपल्या हालचालीवर मर्यादा येऊ लागल्यावर वेदनाशामक औषधे घेऊन जगण्याची पाळी येते. या वेदनाशामकांमुळेही शरीरामध्ये विषारी द्रव्ये जातात आणि पचनसंस्था पार पाडता येत नाहीत; कार्यक्षमता कमी होते. आपण झोपतो तेव्हाही आपल्याला शरीरात २० एकक स्नायूसंधित ताण असतो. त्यामुळे पेशींना रक्तपुरवठा कमी होतो. हा ताण टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा. ताण हे पाठदुखीचे एक मोठे कारण असते. स्नायूंना पद्धतशीर व्यायाम मिळाला तर शरीर-मनाचा ताण कमी होऊन शरीराला मोकळे मोकळे वाटते. पाठीच्या कण्याच्या दोन मणक्यांमध्ये जी चकती असते ती आपल्या जागेवरून सरकली तर स्लिप्ड डिस्कचा त्रास सुरू होतो. आपल्या शरीराच्या चौकटीचा पाठीचा कणा हा एकमेव आधार असतो. मेरुदंड असेही त्याला म्हणतात. ३० लहान हाडे (मणके) एकावर एक रचून हा पाठीचा कणा-मेरुदंड तयार होतो. हे मणके अस्थिबंधनाने जोडलेले असतात. पृष्ठमज्जारज्जूने (स्पायनल कॉडने) ते एकमेकांशी दोरीत ओवल्याप्रमाणे व्यवस्थित राहतात. मज्जारज्जूमधून उगम पावतात आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला संदेश पोहोचवतात. मणके एकमेकांना घासू नयेत म्हणून त्यामध्ये चकतीसारखी उशी असते. (इंन्टरव्हॅटेंबल डिस्क) या चकत्या जेलीसारख्या मऊ पदार्थाने भरलेल्या असतात. हा मऊ पदार्थ चकत्यांच्या तंतूंना घट्ट धरून ठेवतो. हालचालीच्या वेळी आवश्यक तो ताण निर्माण करू शकतो. या चकत्यांची झीज होत असते आणि पुरेशी विश्रांती मिळाल्यावर ती झीज भरून निघते. या चकत्यांमध्ये ८० टक्के ताण पडून त्यातील जेली बाहेर सांडते. मणक्यांमध्ये घर्षण उत्पन्न होते आणि पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते. त्यामुळे पाठ आखडून येते. पाठीत वेदना सुरू होते. पाठीचा कणा हा खालच्या बाजूला, म्हणजे कमरेला जोडलेला असल्याने कमर दुखू लागते. स्लिप डिस्कचा त्रास सुरू होतो. मानेच्या मणक्यांवर ताण पडला तर मानेच्या मणक्यातील चकती जागेवरुन सरकते आणि सव्र्हायकल स्पॉडिलायटिसचा त्रास जाणवू लागतो. मान हा पाठीच्या कण्याचा सगळ्यात परिणामप्रवण भाग असतो. लहानमोठा कुठलाही अपघात झाला तर मानेलाच झटका बसतो आणि मानेतील अस्थिबंधने तुटू शकतात. अस्थिबंधन तुटणे ही गोष्ट हाड मोडण्याएवढीच वेदनादायक असते. मानेला दुखापत झाल्याने, चकती हलल्याने, चकती झिजल्याने, आजूबाजूच्या मज्जातंतूवर दाब पडतो. हात व खांदे दुखतात. त्यांना मुंग्या येतात. हे अवयव बधीर होतात. मानेतल्या कोणत्या मज्जातंतूवर दाब निर्माण झालेला आहे त्यावरुन सव्र्हायकल स्पॉडिलायटिसची लक्षणे ठरतात. कमरेतून निघून पायापर्यंत वेदना जाणवणे, कळ उठणे म्हणजे सायटिका, स्पायनल कॉर्डच्या खालच्या म्हणजे कमरेतून निघून दोन्ही पायांमध्ये मागच्या बाजूने थेट टाचेपर्यंत सायटिक मज्जातंतू किंवा ओघळलेला स्नायू दाब आणत असल्यास सायटिका ही अवस्था उद्भवते. पाठदुखीच्या तक्रारींचे स्वरुप असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. वैद्यकीय उपचार करुनही अनेकदा काही फायदा होत नाही. योगासनांनी पाठदुखी थांबू शकते आणि या तक्रारी दूर होऊ शकतात असा नामांकित योगचिकित्सक विजयालक्ष्मी होता यांचा अनुभव आहे. परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या कृपाप्रसादाने त्यांना योगासनांमध्ये प्रावीण्य संपादन करता आले आणि शेकडो व्यक्तींच्या व्यथावेदना दूर करता आल्या. पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना या पुस्तकात त्यांनी योगासनांचा केव्हा, कसा उपयोग करावा याची माहिती दिली आहे. श्वासन, अद्वासन, मत्सक्रीडासन याद्वारे तीव्र वेदना कमी होऊ शकतात. त्यासाठी कधी दीड-दोन आठवडेही लागू शकतात. तीव्र वेदना कमी झाल्यावर नियमित योगासने करता येतात. तीव्र वेदना असताना सर्व आसने करता येत नाहीत, करुही नयेत. स्लिप डिस्कचा त्रास असेल पाय छातीवर, भुजंगासन, ताडासन, शवासन, मार्जारी आसन करणे श्रेयस्कर ठरते. सव्र्हायकल स्पॉडिलायटिसमध्ये शशांकासन, आकर्ण, धनुरासन, सर्पासन, शवासन आणि हात वरखाली व मागेपुढे करणे फायदेशीर ठरते. सायटिकामध्ये व्याघ्रासन, अर्ध शलभासन, सरल धनुरासन यांच्यामुळे दुखणे थांबवता येते. पाठीचा कणा सदोष असेल तर, स्कोलिऑसिसच्या अवस्थेत समकोनासन, गुप्त पद्मासन, अर्धचंद्रासन, स्पिंक्स, उष्ट्रासन, ताडासन ही आसने उपयुक्त ठरतात. स्कोलिओसिचे दुखणे लहान वयात, शरीर लवचिक असतानाच आटोक्यात येऊ शकते, लहानपणी पोक काढून बसण्याची सवय असेल तर पाठदुखीचा त्रास हमखास होतो. स्कोलिओसिस मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळतो. उसण भरल्याने पाठीचे स्नायू आखडतात. त्यामुळे हालचाल करणे कष्टदायक होते. मान आणि कंबर भरून येते. पोटाच्या पोकळीतला गर्भाशयासारखा अवयव मूळ जागेवरुन खाली सरकरणे याला प्रोलॅप्स म्हणतात. त्यामुळे पाठ दुखते, नौकासन, उत्थानपादासन, कंध्रासन, पश्चिमोत्तानासन, वितरीत करणी मुद्रा, अश्विनी मुद्रा यांनी फायदा होतो. पाठ दुखू नये म्हणून सरळ पाठीच्या खुर्चीवर बसावे. पोक काढून बसू नये, बसल्यावर गुडघे मांड्यांच्या पातळीच्या वर असावे. झोपताना कठीण पृष्ठभागावर झोपावे. त्यामुळे कमकुवत पाठीला आधार मिळतो. अशा अनेक सूचनाही शेवटी दिल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more