* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YOGA TO BANISH BACKACHE
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788177668384
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 64
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK IS SPECIALLY DESIGNED FOR THOSE WHO SUFFER FROM BACK ACHE DUE TO VARIOUS REASONS SUCH AS CERVICAL SPONDYLITIS, SLIP DISC, SCIATICA PROLAPSED, INTESTINAL PROBLEMS OR SCOLIOSIS. THIS BOOK EXPLAINS ALL THESE PROBLEMS AND THE VARIOUS SIMPLE AND NATURAL YOGAMUDRA TO OVERCOME THEM. AT THE END OF THE BOOK, SHE ALSO SUGGESTS US ABOUT THE IDEAL WAY TO SET OUR ROUTINE. SHE SUGGESTS THE PROPER WAY TO SIT AND STAND, THE WAY TO MAINTAIN OUR CALORIES INTAKE. SHE ALSO GIVES GUIDELINES ABOUT WHEN AND HOW TO PERFORM THE YOGA EVERY DAY.
या पुस्तकामध्ये वाचकांना मानेच्या मणक्यांना सूज येणं (सर्व्हायकल स्पॉण्डिलायटिस), स्लिप-डिस्क, सायटिका प्रोलॅप्स, आतड्यांमधील वायुदोष आणि स्कोलिओसिस यांसारख्या विविध प्रकारच्या पाठीच्या दुखण्यांसंबंधी आणि त्यावरील साध्या, सोप्या पण तरीही परिणामकारक योगिक आणि नैसर्गिक उपायांची माहिती मिळेल. बिजयालक्ष्मी होता या एक नामांकित योगचिकित्सक असून गेली पंचवीस वर्षं या क्षेत्रात काम करत आहेत. अस्थमा, सांधेदुखी, पाठदुखी इ. पासून ते विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर) आणि कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PATHDUKHIGHALAVANYASATHIYOGSADHANA #YOGATOBANISHBACKACHE #पाठदुखीघालविण्यासाठीयोगसाधना #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #BIJOYLAXMIHOTA #बिजयालक्ष्मीहोता "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI (KOLHAPUR)

    पाठदुखीग्रस्तांसाठी उपयुक्त मार्गदर्शक... सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीसोबत पाठदुखी ही पाठराखण करायला आल्यासारखी आणि कायम ठाण मांडून बसलेली दिसते. स्त्री-पुरुष तसेच सर्व वयोगटांत पाठदुखी सर्रास आढळते आहे त्यामुळे अर्थातच माणसाची कार्यक्षमता खालवते आे, हालचालींवर मर्यादा येतायत. ‘पेनकिलर हा तात्पुरता दिलासा ठरत असला तरी त्यामुळं पाठदुखी काही कायमची पाठ सोडत नाही. शिवाय शरीराला या औषधांची मात्राही लागू पडेनाशी होते तो प्रश्न व या औषधांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या वेगळ्याच! मात्र, पाठदुखीने त्रस्त व्यक्तींना आता एक पुस्तकरूपी मार्गदर्शक व दिलासा लाभला आहे. नामांकित योगचिकित्सक विजयालक्ष्मी होता. यांनी ‘पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना’ या छोटेखानी पुस्तकात पाठीच्या विविध प्रकारच्या दुखण्यासंबधी आणि त्यावरील साध्या, सोप्या पण परिणामकारक योगिक व नैसर्गिक उपयांची सुबोध माहिती दिली आहे. प्रशांत तळणीकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. ‘पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना’ या पुस्तकात पाठदुखीचे प्रकार, त्यासाठी आसनं सचित्र दिली आहेत. त्या जोडीनं ध्यानधारात्मक प्राणायाम, योगिक विश्रांती यांची तंत्रंही अगदी सोप्या भाषेत सांगितली आहेत त्याचबरोबर उपचाराच्या इतर पद्धती म्हणजे पायी चालणं, पोहणं, कटिशेक, सूर्यस्नान, मालिश, पोहणं यासंबंधीही या पुस्तकात विवेचन केलं आहे तसंच योगसाधनेचे नियमही सांगितले आहेत. मनापासून साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. -सौ. सुप्रिया वकील ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 16 -12 -2007

    पाठदुखी घालविण्यासाठी योगसाधना आपला संपूर्ण दिवस वाचन-लेखनात जातो. संगणकासमोर तासन्तास आपण बसून राहतो. संध्याकाळी सभासमारंभाला गेल्यावरही आपण बसून राहतो किंवा तास-दोन तास उभे राहतो. स्रिया उंच टाचांच्या चपला घालून फिरतात. या आपल्या जीवनशैलीचा परिणामआपल्या शरीरावर होतो. विशेषत: आपल्या पाठीवर परिणाम होतो याची आपल्याला जाणीवही नसते. पन्नाशीनंतर पाठीची तक्रार सुरू झाली म्हणजे ते उमगते आणि आपल्या हालचालीवर मर्यादा येऊ लागल्यावर वेदनाशामक औषधे घेऊन जगण्याची पाळी येते. या वेदनाशामकांमुळेही शरीरामध्ये विषारी द्रव्ये जातात आणि पचनसंस्था पार पाडता येत नाहीत; कार्यक्षमता कमी होते. आपण झोपतो तेव्हाही आपल्याला शरीरात २० एकक स्नायूसंधित ताण असतो. त्यामुळे पेशींना रक्तपुरवठा कमी होतो. हा ताण टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा. ताण हे पाठदुखीचे एक मोठे कारण असते. स्नायूंना पद्धतशीर व्यायाम मिळाला तर शरीर-मनाचा ताण कमी होऊन शरीराला मोकळे मोकळे वाटते. पाठीच्या कण्याच्या दोन मणक्यांमध्ये जी चकती असते ती आपल्या जागेवरून सरकली तर स्लिप्ड डिस्कचा त्रास सुरू होतो. आपल्या शरीराच्या चौकटीचा पाठीचा कणा हा एकमेव आधार असतो. मेरुदंड असेही त्याला म्हणतात. ३० लहान हाडे (मणके) एकावर एक रचून हा पाठीचा कणा-मेरुदंड तयार होतो. हे मणके अस्थिबंधनाने जोडलेले असतात. पृष्ठमज्जारज्जूने (स्पायनल कॉडने) ते एकमेकांशी दोरीत ओवल्याप्रमाणे व्यवस्थित राहतात. मज्जारज्जूमधून उगम पावतात आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला संदेश पोहोचवतात. मणके एकमेकांना घासू नयेत म्हणून त्यामध्ये चकतीसारखी उशी असते. (इंन्टरव्हॅटेंबल डिस्क) या चकत्या जेलीसारख्या मऊ पदार्थाने भरलेल्या असतात. हा मऊ पदार्थ चकत्यांच्या तंतूंना घट्ट धरून ठेवतो. हालचालीच्या वेळी आवश्यक तो ताण निर्माण करू शकतो. या चकत्यांची झीज होत असते आणि पुरेशी विश्रांती मिळाल्यावर ती झीज भरून निघते. या चकत्यांमध्ये ८० टक्के ताण पडून त्यातील जेली बाहेर सांडते. मणक्यांमध्ये घर्षण उत्पन्न होते आणि पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते. त्यामुळे पाठ आखडून येते. पाठीत वेदना सुरू होते. पाठीचा कणा हा खालच्या बाजूला, म्हणजे कमरेला जोडलेला असल्याने कमर दुखू लागते. स्लिप डिस्कचा त्रास सुरू होतो. मानेच्या मणक्यांवर ताण पडला तर मानेच्या मणक्यातील चकती जागेवरुन सरकते आणि सव्र्हायकल स्पॉडिलायटिसचा त्रास जाणवू लागतो. मान हा पाठीच्या कण्याचा सगळ्यात परिणामप्रवण भाग असतो. लहानमोठा कुठलाही अपघात झाला तर मानेलाच झटका बसतो आणि मानेतील अस्थिबंधने तुटू शकतात. अस्थिबंधन तुटणे ही गोष्ट हाड मोडण्याएवढीच वेदनादायक असते. मानेला दुखापत झाल्याने, चकती हलल्याने, चकती झिजल्याने, आजूबाजूच्या मज्जातंतूवर दाब पडतो. हात व खांदे दुखतात. त्यांना मुंग्या येतात. हे अवयव बधीर होतात. मानेतल्या कोणत्या मज्जातंतूवर दाब निर्माण झालेला आहे त्यावरुन सव्र्हायकल स्पॉडिलायटिसची लक्षणे ठरतात. कमरेतून निघून पायापर्यंत वेदना जाणवणे, कळ उठणे म्हणजे सायटिका, स्पायनल कॉर्डच्या खालच्या म्हणजे कमरेतून निघून दोन्ही पायांमध्ये मागच्या बाजूने थेट टाचेपर्यंत सायटिक मज्जातंतू किंवा ओघळलेला स्नायू दाब आणत असल्यास सायटिका ही अवस्था उद्भवते. पाठदुखीच्या तक्रारींचे स्वरुप असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. वैद्यकीय उपचार करुनही अनेकदा काही फायदा होत नाही. योगासनांनी पाठदुखी थांबू शकते आणि या तक्रारी दूर होऊ शकतात असा नामांकित योगचिकित्सक विजयालक्ष्मी होता यांचा अनुभव आहे. परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या कृपाप्रसादाने त्यांना योगासनांमध्ये प्रावीण्य संपादन करता आले आणि शेकडो व्यक्तींच्या व्यथावेदना दूर करता आल्या. पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना या पुस्तकात त्यांनी योगासनांचा केव्हा, कसा उपयोग करावा याची माहिती दिली आहे. श्वासन, अद्वासन, मत्सक्रीडासन याद्वारे तीव्र वेदना कमी होऊ शकतात. त्यासाठी कधी दीड-दोन आठवडेही लागू शकतात. तीव्र वेदना कमी झाल्यावर नियमित योगासने करता येतात. तीव्र वेदना असताना सर्व आसने करता येत नाहीत, करुही नयेत. स्लिप डिस्कचा त्रास असेल पाय छातीवर, भुजंगासन, ताडासन, शवासन, मार्जारी आसन करणे श्रेयस्कर ठरते. सव्र्हायकल स्पॉडिलायटिसमध्ये शशांकासन, आकर्ण, धनुरासन, सर्पासन, शवासन आणि हात वरखाली व मागेपुढे करणे फायदेशीर ठरते. सायटिकामध्ये व्याघ्रासन, अर्ध शलभासन, सरल धनुरासन यांच्यामुळे दुखणे थांबवता येते. पाठीचा कणा सदोष असेल तर, स्कोलिऑसिसच्या अवस्थेत समकोनासन, गुप्त पद्मासन, अर्धचंद्रासन, स्पिंक्स, उष्ट्रासन, ताडासन ही आसने उपयुक्त ठरतात. स्कोलिओसिचे दुखणे लहान वयात, शरीर लवचिक असतानाच आटोक्यात येऊ शकते, लहानपणी पोक काढून बसण्याची सवय असेल तर पाठदुखीचा त्रास हमखास होतो. स्कोलिओसिस मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळतो. उसण भरल्याने पाठीचे स्नायू आखडतात. त्यामुळे हालचाल करणे कष्टदायक होते. मान आणि कंबर भरून येते. पोटाच्या पोकळीतला गर्भाशयासारखा अवयव मूळ जागेवरुन खाली सरकरणे याला प्रोलॅप्स म्हणतात. त्यामुळे पाठ दुखते, नौकासन, उत्थानपादासन, कंध्रासन, पश्चिमोत्तानासन, वितरीत करणी मुद्रा, अश्विनी मुद्रा यांनी फायदा होतो. पाठ दुखू नये म्हणून सरळ पाठीच्या खुर्चीवर बसावे. पोक काढून बसू नये, बसल्यावर गुडघे मांड्यांच्या पातळीच्या वर असावे. झोपताना कठीण पृष्ठभागावर झोपावे. त्यामुळे कमकुवत पाठीला आधार मिळतो. अशा अनेक सूचनाही शेवटी दिल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more