* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789394258006
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE SMALL FAMILY CONSISTING OF AAI, BABA, SHAMI AND BALU IS A HAPPY AND SATISFIED FAMILY. THESE MEMBERS ARE ALWAYS LOST IN POEMS, INTERESTING TOPICS RELATED WITH LANGUAGE OR SOMETIMES IN NATURE AND ENCHANTING SUNSET ALSO. READERS WILL ENJOY THIS TREASURE OF PLEASURE OF NATURE, NEIGHBOURHOOD, LOVE AND AFFECTION WITH FAMILIAR ATMOSPHERE, INTERESTING AND KNOWLEDGE PROVOKING CONVERSATIONS, SIMPLE BUT APT AND SHORT POEMS THROUGH THESE STORIES.
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा खास मुलांसाठीचा हा नवा कथासंग्रह... ‘खळाळता अवखळ झरा!’ यातील सर्व कथा मनोरंजक तर आहेतच, पण रंजनाबरोबर त्यात विज्ञान, भाषाज्ञान, जीवनमूल्ये, सामाजिक भान वगैरे कथेच्या ओघात स्वाभाविकरीत्या येत असल्याने मुलांकडून सहजगत्या आत्मसात होण्याजोग्या गोष्टी आहेत. कथांच्या ओेघातच मुलांनी आनंदाने म्हणाव्यात अशा कविताही आहेत. मुलांना जे जे रुचेल ते देतानाच खुबीने त्यातून संस्कार घडावेत अशी प्रत्येक कथेची रचना आहे. एकनाथ आव्हाड यांचा हा सातवा बालकथासंग्रह आहे. पहिल्या सहा कथासंग्रहांप्रमाणेच यातील मुख्य व्याQक्तरेखा शमी आणि बाळू हे बहीण-भाऊ आहेत. ही दोन्ही पात्रे बालवाचकांना आव्हाड यांच्या कथासंग्रहांमधून सतत भेटल्याने, परिचित झाल्याने आपलीशी वाटणे, त्यामुळेच शमी आणि बाळूच्या या नव्या कथा वाचण्याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. या कथांची कथानकेसुद्धा मुलांचा उत्साह, उत्सुकता वाढविणारी आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#खळाळताअवखळझराआणिइतरकथा #एकनाथआव्हाड #बालकथा #बाळू #शमी #आई-बाबा #सुंदरलखलखीतमन #भाषेचीगोडी #गूगलआजी #कमलची जिद्द मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #KHALALTAAWAKHALZARAANIITARKATHA #EKNATHAWHAD #BALKATHA #BALU #SHAMI #AAIBABA #SUNDAR LAKHLAKHITMANN #BHASHECHIGODI #GOOGLEAAJJI #KAMALCHIJIDDA #MARATHIBOOKS #MARATHIPRAKASHAK #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating Starसाप्ताहिक सकाळ.. अशोक कौतिक कोळी १९.डिसेम्बर २०२२

    एकनाथ आव्हाड यांचे `खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा` हे बाल -किशोर कथांचे बहुरंगी, दर्जेदार पुस्तक, आकर्षक मुखपृष्ठ, बहुरंगी चित्र व सुबक मांडणी यामुळे हे पुस्तक फारच देखणे झाले आहे. एकनाथ आव्हाड यांनी खास मुलांसाठी म्हणून लिहिलेल्या ` खळाळताअवखळ झरा आणि इतर कथा ` या पुस्तकामध्ये नाविन्यपूर्ण, मनोरंजक तसेच डोक्याला खुराक पुरविणारा अद्भुत खजिना आहे. त्यात मौजमजेचा खजिना तर आहे, पण त्याशिवाय कल्पनाशक्तीला वाव आणि सर्जनशीलतेचा विकासही आहे. पुस्तकातील पहिलीच कथा `खळाळता अवखळ झरा` खूपच टवटवीत रसरशीत झाली आहे. खरेतर हा झरा केवळ खळाळता नाही, तर चैतन्यदायी आहे. या कथेत एवढे चैतन्य, साहस, कल्पना, अद्भुतता, भूतदया भरलेली आहे,की ती एक सर्वांगसुंदर कथा होऊन जाते. साने गुरुजींप्रमाणे प्रचंड निरागसता, यशोदाबाईंची अतोनात प्रेमळ करूणा तीत काठोकाठ भरलेली आहे,. एकनाथ आव्हाड यांनी निर्माण केलेल्या पात्रांना निसर्गाची व गावाकडची ओढ आहे. `खळाळता झरा` या कथेतील बाळू आणि शमी यांना अशी ओढ आतुरतेने लागलेली आहे,. प्रचंड उकाडा आणि उन्हाळ्याची पर्वा न करता ती गावाकडे जाता. अर्थातच हा गाव मामाचा आहे. तेथील गमती जमती, निसर्गात ते आकंठ बुडून जातात. पोहणे, खेळणे, मजा करणे, गप्पा करणे यात रमून जातात. केवळ मजाच नाही , तर गावगाडा, तेथील निसर्गाशी एकरूप होऊन जातात, त्याही पुढे जाऊन गावात आलेल्या सर्कशीमधील जोकर मुलाशी मैत्री करत त्याला मदत करतात. अशी सुंदर कथा आहे. मनोरंजनासोबतच मुलांवर संस्काराची झूल पांघरते. त्यात कुठलाही बडेजाव किंवा अधिकारवाणीचा लवलेश नाही. हीच तर खरी गंमत आहे. आनंद, अभिमान आणि आचरण सहज शिकायला मिळते. लेखक एकनाथ आव्हाड यांच्या लेखनाचे हेच तर वैशिष्ट्ये आहे. `सुंदर लखलखित मन` या कथेत कल्हई करणाऱ्या कारागिरावर लेखकाने लिहीले आहे. मला लेखकाचे कौतुक यासाठीच आहे, की ते शहरी-ग्रामीण अशा चौखूर विषयांना हात घालतात व आपल्या बालवाचकांची मने समृद्ध करतात. मनांना उभारी देत ज्ञानात भर घालतात. या कथेतून कल्हई म्हणजे काय? ती कोणत्या भांड्याना करतात? का करतात? याची सविस्तर माहिती मळते. या कथेत पण कल्हई करणाऱ्या कारागिरांवर, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल नाह्कच शंका घेतली, याबाबतची पश्चातापाची भावना बाळू, शमी आणि त्यांच्या आईच्या मनात निर्माण होते. खरेतर हा सहअनुभव वाचकांनाही मिळतो. म्हणून हि गोष्ट सुंदर आणि परिणामकारक होते. मानलं लखलखकीत करून जाते. एकनाथ आव्हाड पुस्तकात विविध प्रयोग करतात. पुस्तक गोष्टीचे असले तरी त्यात गाणी, कविता, कोडी, खेळाचे विविध प्रकार, नाविन्यपूर्ण माहितीचा खजिना-असे खूप काही असते. या संग्रहातसुद्धा अशी धमाल आहे. एक कथा तर केवळ म्हणींवर आधारित आहे. मुलांच्या रोजच्या खेळातून कथा फुलत जाते व मजेशीर अनुभव देत जाते. याच आशयाची `भाषेची गोडी` लावणारी दुसरी एक कथा या संग्रहात आहे. त्यामधून तर नवीनच गोष्ट शिकायला मिळते. वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज कसे असतात व त्यांचा मराठी भाषेत उच्चार कसा कला जातो, याची गोष्टीतून छान गुंफण केली आहे. हि गुंफण गंप्पाच्या ओघात काव्यमय आहे. यातून पक्ष्यांची किलबिल, कावळ्यांची कावं काव, कोकिळेची कुहूकुहू, गाईचे हंबरणे, म्हशीचे रेकणे, मोराचा केकराव, हंसाचा कलरव, मधमाशांचा गुंजारव, कुत्र्याचे भुंकणे, कोंबड्याचे आरवणे, बेडकाचे डरावणे, वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, घोड्याचे खिंकाळणे ,हत्तीचे चित्कारणे अशा आवाजांची माहिती होते. मनोरंजनाबरोबरच शब्दसंग्रह वाढतो. मराठी भाषा आणि या भाषेतील सौंदर्य जणू लेखक येथे उलगडत जातात. गोष्टीतून भाषेचा संस्कार रुजवण्याचे मोठेच काम लेखकाने केले आहे . हा संस्कार चिरकाल टिकणार आहे. `श्रावणसरी आल्या घरी` या कथेतून तर लेखकाने चक्क नामवंत कवी आणि त्यांच्या टोपणनावांची माहिती करून दिलेली आहे. सोबतच त्या त्या कवींच्या पावसावरील कवितांची मेजवानी सादर केली आहे. हा प्रयत्न मला खूपच मोलाचा आणि अनोखा वाटतो. अगदी घरातील गप्पांमधून हा प्रवास उलगडत जातो. एक आनंदी वातावरण पसरते. डोक्यात सकारात्मक विचार येतात. पहिल्या पावसासोबत येणार मृदगंध जणू आपल्या आसपास दरवळू लागतो. भाषेतील हेच पावसाळी वातावरण लेखक बाळूच्या घरातून थेट शाळेत घेऊन जातात. घरी बाळूचे आई-वडील ज्ञानात भर घालतात, शाळेत हेच कार्य थोरात सर करतात. ते त्याचे मराठीचे शिक्षक आहेत. थोरात सर `पावसाची कविता` एवढ्या तन्मयतेने शिकवितात, की जणू पाहल्या पावसातील भाजलेला मातीचा मृदगंध वाऱ्याबरोबर वर्गात शिरतो. पाऊस नटखट होऊन नाचू-गाऊ लागतो. असे भारावलेले वातावरण येथे आहे. या संग्रहातील सगळ्याच गोष्टी वाचनीय आहेत. यातील पात्रे परोपकारी आहेत. बाळू आणि शमी हि मुख्य पात्रे येथे भेटतात. त्यांच्याभोवती बहुतेक कथांचे कथानक गुंफलेले आहे. शिवाय या पात्रांचे आई-वडील, शिक्षक,मित्र, निसर्ग यांची खास मांडणी आहे. शमीची आई यशोदाबाईंसारखी परोपकारी आहे. वेळोवेळी प्रसंगातून ती शिकवण देते. मुलांचे वडीलसुद्धा तसेच आहेत. मुलांच्या आवडी निवडीची ते जोपासना करतात. शमी गावावरून आलेल्या सीताला शाळेत प्रवेश मिळवून देऊन `मदतीचा चिमुकला हात` पुढे करते. बाळू पिंजऱ्यातल्या पोपटांची सुटका करून `स्वातंत्र्याचे मोल` जोपासतो. पुस्तकाचे महत्व सांगणारी `गुगल आजी` येथे भेटते, तशाच चित्रकला व निसर्गाची गोडी लावणाऱ्या मुळे बाईसुद्धा भेटतात. निसर्ग जणू `परोपकारी संत` असे त्या सांगतात. यात पारंपरिक कथानकाला फाटा देत लेखकाने नवेनवे प्रयोग केले आहेत, यासाठी `खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा` हा कथासंग्रह महत्वाचा आहे. केवळ चिऊ चिऊ आणि पानाफुलांमध्ये रमणाऱ्या या काथा नाहीत. तसेच पारंपरिक सरळधोपट कथन पद्धतही टाकून दिलेली आहे. त्याउलट गप्पा, गोष्ट, खेळ, कोडी, दैनंदिनी प्रसंग यांतून कथा फुलत जातात. यातून नवनीताची शिकवण व प्रेरणादायी सर्जनाची निर्मिती घडत जाते. ...Read more

  • Rating Starप्रा. सुहासिनी कीर्तिकर

    छोट्यामोठ्यांच्या मनाचा ठाव घेणारा खळाळता अवखळ झरा सुप्रसिध्द बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी आजवर जवळपास तीस पुस्तके वाचकांहाती देऊन आनंदाचा झरा खळाळता ठेवला आहे. चाळीसच्या दशकात लोकप्रिय असलेली कवितेतील एक ओळ या संदर्भात सहज आठवून गेली. जो मनोरंजन करी मुलांचे। त्याच्या मुखीं देव वसे।।’ इथे आव्हाडांच्या बाबतीत थोडा बदल करुन ‘मुखीं’ न म्हणता ‘लेखीं’ (म्हणजे लेखणीत असा दूरान्वयाने अर्थ घेऊन) म्हणावेसे वाटते. हे असे मनोरंजन पुस्तकाद्वारे करणे हेदेखील विशेषच कौतुकाचे आणि महत्त्वाचेही. कारण जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी होणारे पूर्वीचे संस्कार बदलत गेले. दैनंदिनी बदलली. समस्या वाढल्या. अशावेळी वाचनछंद हा सुखाचा ‘तिळा उघड’ मंत्र ठरतो. पण बालविश्वाशी एकरूप होऊन, त्यांच्या मानसिक जाणिवा समजून घेऊन, त्यांच्या आनंदाच्या कल्पनांशी समरस होऊन आणि ‘कुटुंब’ संस्थेतील जमेच्या बाजू ठळकपणे स्वीकारून ‘आज’च्या संदर्भातील तरीही काही नवे, अनोखे दिले तरच मुले हा मंत्र म्हणणार. वाचनछंद जोपासून त्यात डुंबणार. एकनाथ आव्हाड हे जाणतात. ‘डुंबणार’ हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण आव्हाडांनी कथासंग्रहाचे नावच ‘खळाळता अवखळ झरा’ असे ठेवले आहे. (...‘आणि इतर कथा’ हे अनुषंगाने येते.) मुखपृष्ठावर या झऱ्यात डुंबणारी, आनंद लुटणारी मुले दिसताहेत... म्हणून ‘डुंबणे!’ इथेच आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करावेसे वाटते की, मुलांचे मानस रमेल अशा पद्धतीने सर्वभर रंगीत चित्रे येतात, रंगीबेरंगी पाने येतात आणि या कडेकडेने मजकुरातून वाचक पुस्तकभर वाचनप्रवास करतो. ही सर्वच मांडणी आनंददायी आहे. एकूण सोळा कथा आहेत या संग्रहात. पण बाळू, शमी, आई, बाबा, मामा-मामी, मित्रमंडळ असे हसरे, आनंदी कुटुंबच सर्व कथांत नांदते आहे. अक्षरश: ‘नंदंति देवता इति नांदी’ या व्याख्येनुसार हे नांदते कुटुंब वाचकांना आनंद देते. स्वत:चा एक मित्र बनविते. बाळू हा बालनायक सर्वांचाच मित्र बनतो. तो हुशार आहे, कामसू आहे, संस्कारी आहे अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला अक्षरांची, शब्दांची जादू माहीत आहे. त्यामुळे साध्या साध्या प्रसंगी त्याची कल्पना बहरून येते, तो यमक- अनुप्रास इत्यादी अलंकार न आठवताही त्यांच्याशी सहजपणे खेळतो, कविता करतो. शब्दांच्या लयीतील गंमत त्याला खुणावते... अगदी सहजपणे त्याला शमीचीही (बहिणीची) साथ आहे. जसे की; सुरुवातीच्याच पानांवर मामाच्या गावाला जाण्याची ओढ येते. संवाद येतो तेव्हा - बाळू म्हणाला, “आई, अगं मामाच्या गावी झाडांची दाटी, लपाछपी खेळण्याची तिथे गंमतच मोठी.” शमी लगेच म्हणाली, “आई, मामाचा गाव नदीच्या काठावर, आनंदाचे गाणे तिथे मुलांच्या ओठावर.” किती सहज असा वहाता संवाद हा. अशा संवादाने कौटुंबिक, खेळकर, प्रसन्न वातावरण तयार होते. या मुलांना आवडतो तो ‘पुस्तकांचा खाऊ.’ हा खाऊ इतका सकस की बाळू कविताच करू लागतो उत्स्फूर्तपणे. विदूषकावर कविता येते ती अशी. फक्त कवितांच्या नादात नाहीत ही मुलं. चांगले शिकण्याच्या आणि घडण्याच्या संस्कारांचे चुंबकही आहे त्यांना माहीत. मासला म्हणून ‘स्वातंत्र्याचे मोल’ ही कथा पाहता येते. पिंजऱ्यात अडकवलेले पक्षी, त्याचीच होते मग कथेत नक्षी. प्रयत्नें बाळू समजावी, पक्षीविक्याही प्रतिसाद देई... हे प्रतिसाद देणे म्हणजे आदर्श माणुसकीचे दर्शन आहे. त्यामुळे या कथा आदर्श घडविणाऱ्या, कवितांचे सर्जन करणाऱ्या संस्कारी घटना आहेत. ‘ऐकू या चला’ ही बाळूची कविता ध्वनिदर्शक शब्दांची रेलचेल असलेली अनोखी कविता आहे. एकाच पुस्तकाच्या या जादूमय पोतडीत संवादनाट्य, घटनाचित्र, कुटुंबदर्शन, संस्काराचे ठसे, प्रसंगचित्रण, कविता अशी आनंदाचा आस्वाद असणारी भेळ आहे. शेवटच्या कथेत शेवटी आई म्हणते, “बाळांनो, ‘थँक्यू’त मोठी जादू आहे बरं.” ...आपण ही जादू अनुभवून आव्हाडांना वाचनानंद दिल्याबद्दल मनापासून ‘थँक्यू’ म्हणूया. अशीच पुस्तके यापुढेही देत चला, फुलवित आनंदाचा मळा. बाळूला जशा आपल्या प्रतिक्रिया काव्यमय वाहत्या शब्दांत द्याव्याशा वाटतात ना; तसेच वाचक म्हणून ‘थँक्यू’ म्हणताना इतर वाचकांसाठी म्हणावेसे वाटते, - काढून मुद्दाम वेळ आस्वादा ही लेखनभेळ गोष्ट, गाणी, संस्कारांचा हा मेळ खाता खाता जाईल भुर्रकन् वेळ. लेखक आपुले आव्हाड आनंदाचे लाविले झाड संस्कारांची येत त्यास फुले ओंजळीत मग आनंद डुले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more