* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KHALALTA AWAKHAL ZARA ANI ITAR KATHA
  • Availability : Available
  • ISBN : 9789394258006
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE SMALL FAMILY CONSISTING OF AAI, BABA, SHAMI AND BALU IS A HAPPY AND SATISFIED FAMILY. THESE MEMBERS ARE ALWAYS LOST IN POEMS, INTERESTING TOPICS RELATED WITH LANGUAGE OR SOMETIMES IN NATURE AND ENCHANTING SUNSET ALSO. READERS WILL ENJOY THIS TREASURE OF PLEASURE OF NATURE, NEIGHBOURHOOD, LOVE AND AFFECTION WITH FAMILIAR ATMOSPHERE, INTERESTING AND KNOWLEDGE PROVOKING CONVERSATIONS, SIMPLE BUT APT AND SHORT POEMS THROUGH THESE STORIES.
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा खास मुलांसाठीचा हा नवा कथासंग्रह... ‘खळाळता अवखळ झरा!’ यातील सर्व कथा मनोरंजक तर आहेतच, पण रंजनाबरोबर त्यात विज्ञान, भाषाज्ञान, जीवनमूल्ये, सामाजिक भान वगैरे कथेच्या ओघात स्वाभाविकरीत्या येत असल्याने मुलांकडून सहजगत्या आत्मसात होण्याजोग्या गोष्टी आहेत. कथांच्या ओेघातच मुलांनी आनंदाने म्हणाव्यात अशा कविताही आहेत. मुलांना जे जे रुचेल ते देतानाच खुबीने त्यातून संस्कार घडावेत अशी प्रत्येक कथेची रचना आहे. एकनाथ आव्हाड यांचा हा सातवा बालकथासंग्रह आहे. पहिल्या सहा कथासंग्रहांप्रमाणेच यातील मुख्य व्याQक्तरेखा शमी आणि बाळू हे बहीण-भाऊ आहेत. ही दोन्ही पात्रे बालवाचकांना आव्हाड यांच्या कथासंग्रहांमधून सतत भेटल्याने, परिचित झाल्याने आपलीशी वाटणे, त्यामुळेच शमी आणि बाळूच्या या नव्या कथा वाचण्याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. या कथांची कथानकेसुद्धा मुलांचा उत्साह, उत्सुकता वाढविणारी आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#खळाळताअवखळझराआणिइतरकथा #एकनाथआव्हाड #बालकथा #बाळू #शमी #आई-बाबा #सुंदरलखलखीतमन #भाषेचीगोडी #गूगलआजी #कमलची जिद्द मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #KHALALTAAWAKHALZARAANIITARKATHA #EKNATHAWHAD #BALKATHA #BALU #SHAMI #AAIBABA #SUNDAR LAKHLAKHITMANN #BHASHECHIGODI #GOOGLEAAJJI #KAMALCHIJIDDA #MARATHIBOOKS #MARATHIPRAKASHAK #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating Starसाप्ताहिक सकाळ.. अशोक कौतिक कोळी १९.डिसेम्बर २०२२

    एकनाथ आव्हाड यांचे `खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा` हे बाल -किशोर कथांचे बहुरंगी, दर्जेदार पुस्तक, आकर्षक मुखपृष्ठ, बहुरंगी चित्र व सुबक मांडणी यामुळे हे पुस्तक फारच देखणे झाले आहे. एकनाथ आव्हाड यांनी खास मुलांसाठी म्हणून लिहिलेल्या ` खळाळताअवखळ झरा आणि इतर कथा ` या पुस्तकामध्ये नाविन्यपूर्ण, मनोरंजक तसेच डोक्याला खुराक पुरविणारा अद्भुत खजिना आहे. त्यात मौजमजेचा खजिना तर आहे, पण त्याशिवाय कल्पनाशक्तीला वाव आणि सर्जनशीलतेचा विकासही आहे. पुस्तकातील पहिलीच कथा `खळाळता अवखळ झरा` खूपच टवटवीत रसरशीत झाली आहे. खरेतर हा झरा केवळ खळाळता नाही, तर चैतन्यदायी आहे. या कथेत एवढे चैतन्य, साहस, कल्पना, अद्भुतता, भूतदया भरलेली आहे,की ती एक सर्वांगसुंदर कथा होऊन जाते. साने गुरुजींप्रमाणे प्रचंड निरागसता, यशोदाबाईंची अतोनात प्रेमळ करूणा तीत काठोकाठ भरलेली आहे,. एकनाथ आव्हाड यांनी निर्माण केलेल्या पात्रांना निसर्गाची व गावाकडची ओढ आहे. `खळाळता झरा` या कथेतील बाळू आणि शमी यांना अशी ओढ आतुरतेने लागलेली आहे,. प्रचंड उकाडा आणि उन्हाळ्याची पर्वा न करता ती गावाकडे जाता. अर्थातच हा गाव मामाचा आहे. तेथील गमती जमती, निसर्गात ते आकंठ बुडून जातात. पोहणे, खेळणे, मजा करणे, गप्पा करणे यात रमून जातात. केवळ मजाच नाही , तर गावगाडा, तेथील निसर्गाशी एकरूप होऊन जातात, त्याही पुढे जाऊन गावात आलेल्या सर्कशीमधील जोकर मुलाशी मैत्री करत त्याला मदत करतात. अशी सुंदर कथा आहे. मनोरंजनासोबतच मुलांवर संस्काराची झूल पांघरते. त्यात कुठलाही बडेजाव किंवा अधिकारवाणीचा लवलेश नाही. हीच तर खरी गंमत आहे. आनंद, अभिमान आणि आचरण सहज शिकायला मिळते. लेखक एकनाथ आव्हाड यांच्या लेखनाचे हेच तर वैशिष्ट्ये आहे. `सुंदर लखलखित मन` या कथेत कल्हई करणाऱ्या कारागिरावर लेखकाने लिहीले आहे. मला लेखकाचे कौतुक यासाठीच आहे, की ते शहरी-ग्रामीण अशा चौखूर विषयांना हात घालतात व आपल्या बालवाचकांची मने समृद्ध करतात. मनांना उभारी देत ज्ञानात भर घालतात. या कथेतून कल्हई म्हणजे काय? ती कोणत्या भांड्याना करतात? का करतात? याची सविस्तर माहिती मळते. या कथेत पण कल्हई करणाऱ्या कारागिरांवर, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल नाह्कच शंका घेतली, याबाबतची पश्चातापाची भावना बाळू, शमी आणि त्यांच्या आईच्या मनात निर्माण होते. खरेतर हा सहअनुभव वाचकांनाही मिळतो. म्हणून हि गोष्ट सुंदर आणि परिणामकारक होते. मानलं लखलखकीत करून जाते. एकनाथ आव्हाड पुस्तकात विविध प्रयोग करतात. पुस्तक गोष्टीचे असले तरी त्यात गाणी, कविता, कोडी, खेळाचे विविध प्रकार, नाविन्यपूर्ण माहितीचा खजिना-असे खूप काही असते. या संग्रहातसुद्धा अशी धमाल आहे. एक कथा तर केवळ म्हणींवर आधारित आहे. मुलांच्या रोजच्या खेळातून कथा फुलत जाते व मजेशीर अनुभव देत जाते. याच आशयाची `भाषेची गोडी` लावणारी दुसरी एक कथा या संग्रहात आहे. त्यामधून तर नवीनच गोष्ट शिकायला मिळते. वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज कसे असतात व त्यांचा मराठी भाषेत उच्चार कसा कला जातो, याची गोष्टीतून छान गुंफण केली आहे. हि गुंफण गंप्पाच्या ओघात काव्यमय आहे. यातून पक्ष्यांची किलबिल, कावळ्यांची कावं काव, कोकिळेची कुहूकुहू, गाईचे हंबरणे, म्हशीचे रेकणे, मोराचा केकराव, हंसाचा कलरव, मधमाशांचा गुंजारव, कुत्र्याचे भुंकणे, कोंबड्याचे आरवणे, बेडकाचे डरावणे, वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, घोड्याचे खिंकाळणे ,हत्तीचे चित्कारणे अशा आवाजांची माहिती होते. मनोरंजनाबरोबरच शब्दसंग्रह वाढतो. मराठी भाषा आणि या भाषेतील सौंदर्य जणू लेखक येथे उलगडत जातात. गोष्टीतून भाषेचा संस्कार रुजवण्याचे मोठेच काम लेखकाने केले आहे . हा संस्कार चिरकाल टिकणार आहे. `श्रावणसरी आल्या घरी` या कथेतून तर लेखकाने चक्क नामवंत कवी आणि त्यांच्या टोपणनावांची माहिती करून दिलेली आहे. सोबतच त्या त्या कवींच्या पावसावरील कवितांची मेजवानी सादर केली आहे. हा प्रयत्न मला खूपच मोलाचा आणि अनोखा वाटतो. अगदी घरातील गप्पांमधून हा प्रवास उलगडत जातो. एक आनंदी वातावरण पसरते. डोक्यात सकारात्मक विचार येतात. पहिल्या पावसासोबत येणार मृदगंध जणू आपल्या आसपास दरवळू लागतो. भाषेतील हेच पावसाळी वातावरण लेखक बाळूच्या घरातून थेट शाळेत घेऊन जातात. घरी बाळूचे आई-वडील ज्ञानात भर घालतात, शाळेत हेच कार्य थोरात सर करतात. ते त्याचे मराठीचे शिक्षक आहेत. थोरात सर `पावसाची कविता` एवढ्या तन्मयतेने शिकवितात, की जणू पाहल्या पावसातील भाजलेला मातीचा मृदगंध वाऱ्याबरोबर वर्गात शिरतो. पाऊस नटखट होऊन नाचू-गाऊ लागतो. असे भारावलेले वातावरण येथे आहे. या संग्रहातील सगळ्याच गोष्टी वाचनीय आहेत. यातील पात्रे परोपकारी आहेत. बाळू आणि शमी हि मुख्य पात्रे येथे भेटतात. त्यांच्याभोवती बहुतेक कथांचे कथानक गुंफलेले आहे. शिवाय या पात्रांचे आई-वडील, शिक्षक,मित्र, निसर्ग यांची खास मांडणी आहे. शमीची आई यशोदाबाईंसारखी परोपकारी आहे. वेळोवेळी प्रसंगातून ती शिकवण देते. मुलांचे वडीलसुद्धा तसेच आहेत. मुलांच्या आवडी निवडीची ते जोपासना करतात. शमी गावावरून आलेल्या सीताला शाळेत प्रवेश मिळवून देऊन `मदतीचा चिमुकला हात` पुढे करते. बाळू पिंजऱ्यातल्या पोपटांची सुटका करून `स्वातंत्र्याचे मोल` जोपासतो. पुस्तकाचे महत्व सांगणारी `गुगल आजी` येथे भेटते, तशाच चित्रकला व निसर्गाची गोडी लावणाऱ्या मुळे बाईसुद्धा भेटतात. निसर्ग जणू `परोपकारी संत` असे त्या सांगतात. यात पारंपरिक कथानकाला फाटा देत लेखकाने नवेनवे प्रयोग केले आहेत, यासाठी `खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा` हा कथासंग्रह महत्वाचा आहे. केवळ चिऊ चिऊ आणि पानाफुलांमध्ये रमणाऱ्या या काथा नाहीत. तसेच पारंपरिक सरळधोपट कथन पद्धतही टाकून दिलेली आहे. त्याउलट गप्पा, गोष्ट, खेळ, कोडी, दैनंदिनी प्रसंग यांतून कथा फुलत जातात. यातून नवनीताची शिकवण व प्रेरणादायी सर्जनाची निर्मिती घडत जाते. ...Read more

  • Rating Starप्रा. सुहासिनी कीर्तिकर

    छोट्यामोठ्यांच्या मनाचा ठाव घेणारा खळाळता अवखळ झरा सुप्रसिध्द बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी आजवर जवळपास तीस पुस्तके वाचकांहाती देऊन आनंदाचा झरा खळाळता ठेवला आहे. चाळीसच्या दशकात लोकप्रिय असलेली कवितेतील एक ओळ या संदर्भात सहज आठवून गेली. जो मनोरंजन करी मुलांचे। त्याच्या मुखीं देव वसे।।’ इथे आव्हाडांच्या बाबतीत थोडा बदल करुन ‘मुखीं’ न म्हणता ‘लेखीं’ (म्हणजे लेखणीत असा दूरान्वयाने अर्थ घेऊन) म्हणावेसे वाटते. हे असे मनोरंजन पुस्तकाद्वारे करणे हेदेखील विशेषच कौतुकाचे आणि महत्त्वाचेही. कारण जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी होणारे पूर्वीचे संस्कार बदलत गेले. दैनंदिनी बदलली. समस्या वाढल्या. अशावेळी वाचनछंद हा सुखाचा ‘तिळा उघड’ मंत्र ठरतो. पण बालविश्वाशी एकरूप होऊन, त्यांच्या मानसिक जाणिवा समजून घेऊन, त्यांच्या आनंदाच्या कल्पनांशी समरस होऊन आणि ‘कुटुंब’ संस्थेतील जमेच्या बाजू ठळकपणे स्वीकारून ‘आज’च्या संदर्भातील तरीही काही नवे, अनोखे दिले तरच मुले हा मंत्र म्हणणार. वाचनछंद जोपासून त्यात डुंबणार. एकनाथ आव्हाड हे जाणतात. ‘डुंबणार’ हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण आव्हाडांनी कथासंग्रहाचे नावच ‘खळाळता अवखळ झरा’ असे ठेवले आहे. (...‘आणि इतर कथा’ हे अनुषंगाने येते.) मुखपृष्ठावर या झऱ्यात डुंबणारी, आनंद लुटणारी मुले दिसताहेत... म्हणून ‘डुंबणे!’ इथेच आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करावेसे वाटते की, मुलांचे मानस रमेल अशा पद्धतीने सर्वभर रंगीत चित्रे येतात, रंगीबेरंगी पाने येतात आणि या कडेकडेने मजकुरातून वाचक पुस्तकभर वाचनप्रवास करतो. ही सर्वच मांडणी आनंददायी आहे. एकूण सोळा कथा आहेत या संग्रहात. पण बाळू, शमी, आई, बाबा, मामा-मामी, मित्रमंडळ असे हसरे, आनंदी कुटुंबच सर्व कथांत नांदते आहे. अक्षरश: ‘नंदंति देवता इति नांदी’ या व्याख्येनुसार हे नांदते कुटुंब वाचकांना आनंद देते. स्वत:चा एक मित्र बनविते. बाळू हा बालनायक सर्वांचाच मित्र बनतो. तो हुशार आहे, कामसू आहे, संस्कारी आहे अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला अक्षरांची, शब्दांची जादू माहीत आहे. त्यामुळे साध्या साध्या प्रसंगी त्याची कल्पना बहरून येते, तो यमक- अनुप्रास इत्यादी अलंकार न आठवताही त्यांच्याशी सहजपणे खेळतो, कविता करतो. शब्दांच्या लयीतील गंमत त्याला खुणावते... अगदी सहजपणे त्याला शमीचीही (बहिणीची) साथ आहे. जसे की; सुरुवातीच्याच पानांवर मामाच्या गावाला जाण्याची ओढ येते. संवाद येतो तेव्हा - बाळू म्हणाला, “आई, अगं मामाच्या गावी झाडांची दाटी, लपाछपी खेळण्याची तिथे गंमतच मोठी.” शमी लगेच म्हणाली, “आई, मामाचा गाव नदीच्या काठावर, आनंदाचे गाणे तिथे मुलांच्या ओठावर.” किती सहज असा वहाता संवाद हा. अशा संवादाने कौटुंबिक, खेळकर, प्रसन्न वातावरण तयार होते. या मुलांना आवडतो तो ‘पुस्तकांचा खाऊ.’ हा खाऊ इतका सकस की बाळू कविताच करू लागतो उत्स्फूर्तपणे. विदूषकावर कविता येते ती अशी. फक्त कवितांच्या नादात नाहीत ही मुलं. चांगले शिकण्याच्या आणि घडण्याच्या संस्कारांचे चुंबकही आहे त्यांना माहीत. मासला म्हणून ‘स्वातंत्र्याचे मोल’ ही कथा पाहता येते. पिंजऱ्यात अडकवलेले पक्षी, त्याचीच होते मग कथेत नक्षी. प्रयत्नें बाळू समजावी, पक्षीविक्याही प्रतिसाद देई... हे प्रतिसाद देणे म्हणजे आदर्श माणुसकीचे दर्शन आहे. त्यामुळे या कथा आदर्श घडविणाऱ्या, कवितांचे सर्जन करणाऱ्या संस्कारी घटना आहेत. ‘ऐकू या चला’ ही बाळूची कविता ध्वनिदर्शक शब्दांची रेलचेल असलेली अनोखी कविता आहे. एकाच पुस्तकाच्या या जादूमय पोतडीत संवादनाट्य, घटनाचित्र, कुटुंबदर्शन, संस्काराचे ठसे, प्रसंगचित्रण, कविता अशी आनंदाचा आस्वाद असणारी भेळ आहे. शेवटच्या कथेत शेवटी आई म्हणते, “बाळांनो, ‘थँक्यू’त मोठी जादू आहे बरं.” ...आपण ही जादू अनुभवून आव्हाडांना वाचनानंद दिल्याबद्दल मनापासून ‘थँक्यू’ म्हणूया. अशीच पुस्तके यापुढेही देत चला, फुलवित आनंदाचा मळा. बाळूला जशा आपल्या प्रतिक्रिया काव्यमय वाहत्या शब्दांत द्याव्याशा वाटतात ना; तसेच वाचक म्हणून ‘थँक्यू’ म्हणताना इतर वाचकांसाठी म्हणावेसे वाटते, - काढून मुद्दाम वेळ आस्वादा ही लेखनभेळ गोष्ट, गाणी, संस्कारांचा हा मेळ खाता खाता जाईल भुर्रकन् वेळ. लेखक आपुले आव्हाड आनंदाचे लाविले झाड संस्कारांची येत त्यास फुले ओंजळीत मग आनंद डुले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more