* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JOHAR MAI BAAP JOHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981964
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 350.00 gms
  • Pages : 352
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK TRULY PROVES TO ITS TYPE OF BEING A NOVEL. WHILE AS A NOUN IT IS NOVEL, AS AN ADJECTIVE IT IS NOVEL TOO; SIMPLY SUPERB. `JOHAR`IS THE SYNONYM OF `HAYAT`, IT IS THE WAY IN WHICH THE LOWCASTE PEOPLE USED TO GREET THE HIGHCASTE AND HIGHCLASS PEOPLE BY BOWING DOWN BEFORE THEM AND OFFERING A `NAMASKAR`USING THEIR RIGHT HAND. CENTURIES BEFORE, THERE WAS A TERRIBLE DISCRIMINATION BETWEEN THE CLASSES AND MASSES. CASTEISM PREVAILED IN THE SOCIETY THEN. IT WAS BELIEVED THAT ONLY THE HIGHCASTE PEOPLE HAVE THE RIGHT TO ENTER THE TEMPLES. UNTOUCHABILITY WAS THE MOST AGHAST WAY OF MISTREATMENT. SANT CHOKHA MELA WAS BORN THEN. JOHAR… THE TRUE STORY OF CHOKHA MELA, WHO WAS BORN IN THE `MAHAR`COMMUNITY IN THE 16TH CENTURY. THE INTIMACY HE FELT TOWARDS LORD VITTHALA TOOK HIM TO SUCH HEIGHTS THAT EVEN THE GOD HIMSELF HAD TO COME TO VISIT HIM…. OFTEN. ONE OF THE MOST DEDICATED DEVOTEES, CHOKHA HAD TO PROVE HIS TRUE INTENTIONS TOWARDS THE GOD AGAIN AND AGAIN. HE HAD TO ENDURE WORST HARDSHIPS WHILE DOING SO. THOUGH BORN IN A MAHAR FAMILY, HE WAS SUPPORTED BY HIS PARENTS AND LATER BY HIS WIFE. THEY ALSO DEVOTED THEMSELVES TO LORD VITTHALA. BUT CHOKHA WAS LAST TO LEAVE THIS WORLD. IT WAS ONLY WHEN HE HAD NO OTHER THOUGHT BUT THAT OF LORD VITTHALA THAT HIS SOUL WAS ALLOWED TO LEAVE THE BODY, THAT TO AFTER EXPERIENCING THE UTMOST SORROW OF LIFE AND HARDSHIPS. HE HAD FALLEN PREY IN THE CLUTCHES OF DESTINY. IT WAS ONLY AFTER HIS DEATH THAT HIS SOUL WAS PRAISED AND COULD BECOME ONE WITH THAT OF THE GOD HIMSELF. THIS NOVEL IS THE MIRROR TO THE CONTEMPORARY THINKING, THE STRICT DIVISION OF THE SOCIETY BASED ON CASTE, THE ADVERSITY, AND THE MISFORTUNE THAT THE LOWERCLASS PEOPLE HAD TO SUFFER. THE AUTHOR HAS AN ENDLESS POWER TO CAPTIVATE THE MINDS OF THE READERS. HER ASTUTE THOUGHTS REFLECT A CONTINUOUS FLOW OF EMOTIONS. SHE SUCCEEDS IN CARRYING OUR MINDS INTO THE PERIOD OF THE LAST CENTURIES. ONCE A `TRUE READER`STARTS READING THIS BOOK, HE OR SHE WILL NEITHER BE ABLE TO CONTROL THE GUSH OF EMOTIONS NOR THE TEARS.
चोखोबा तर कधीपासून या दिवसाची प्रतीक्षा करत होता. दीपमाळ तर कधीच बांधून झाली होती. सगळ्या पणत्यांतून तेलवात घालून झाली, तेव्हा शुक्राची चांदणी आकाशात दिसत होती. दोन्ही दीपमाळांवरच्या सगळ्या पणत्यांच्या वाती त्यानं पेटवल्या आणि क्षणार्धात सारा आसमंत तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला. त्या गहिया अंधारात त्याची आभा क्षितिजापर्यंत पोहोचली आणि क्षितीजही प्रकाशमान झालं. चंद्रभागेच्या पाण्यावर उठणाया तरंगांमध्ये त्या पणत्यांची लक्षावधी प्रतििंबबं हिंदकळून परावर्तित झाली आणि त्यांच्या तेजानं चंद्रभागा नदीचा कणन्कण जणू थरारला. दोन्ही काठ लख्ख उजळून निघाले. चंद्रभागेचं सगळं पाणी लखलखत होतं आणि चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर अंगभर पणत्यांचं प्रकाशमंडळ लेवून लखलखणाया दोन दीपमाळा उभ्या होत्या. त्या पणत्यांच्या प्रकाशानं चंद्रभागेचं पाणी तेजाळलं होतं. परिसरातल्या साNया अंधकाराला छेदत प्रकाशाची ती रेषा सगळा आसमंत उजळून टाकत होती. अंधकाराला छेदत ती प्रकाशरेषा चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर वसलेल्या पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराच्या गाभायापर्यंत पोहोचली. विठ्ठलाची अवघी मूर्ती उजळली. विठ्ठलाच्या सावळ्या मूर्तीवर तर ते प्रकाशाचे बिंदू अंगभर लेवून जणू दिमाख मिरवीत होते. पूजा बांधण्याच्या आधीच विठ्ठलाची ती सावळी मूर्ती विलक्षण देखणेपणा घेऊन उजळली होती. त्या तेजस्वी कणात न्हाऊन निघालेल्या विठ्ठलाच्या सावळ्या चेहयावर एक विलक्षण हास्य विलसत होतं. काय नव्हतं त्या हास्यात? विलक्षण समाधान, विजयाचा कैफ, लाडक्या भक्ताबद्दलचा ओसंडून वाहणारा अभिमान, त्याचा संकल्प सिद्धीस गेल्याबद्दलचा आनंद आणि चिकाटीनं त्यानं ते काम पूर्ण केलं, त्याबद्दलचं कौतुक!
* खामगाव येथील `कै.वरणगावकर` स्मृती पुरस्कार, २०१२. * संत गाडगेमहाराज अध्यासन पुरस्कार २०१४.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MANJUSHRIGOKHALE #TUKYACHIAVALI #JOHARMYBAAPJOHAR #OMKARACHIREKHJANA #DNYANSURYACHISAVALI
Customer Reviews
  • Rating StarUjjwala Dharma

    आताच संत चोखामेळा यांच्या जीवनावरील कादंबरी "जोहार मायबाप जोहार"ही वाचून संपवली। मंजुश्री गोखले यांनी ही सुंदर,मनोवेधक कादंबरी लिहिली आहे।मला संत चोखामेळा यांच्याबद्दल फारच थोडी माहिती होती। अगदी मोजके अभंग माहिती होते।पण या कादंबरीने त्यांचा मनाला पळ पाडणारा,डोळ्यात वेळोवेळी पाणी उभे करणारा जीवनपट उभा केला।लहानपणची अंधुक आठवण आहे-गावातील संडास स्वच्छ करायला माणसे यायची त्याची।आता आठवले तरी काटा येतो अंगावर आणिएक माणूस दुसरया माणसाला इतका हीन कसा लेखू शकतो याची शरम वाटते।लेखिकेने तो सगळा काळ इतका सुंदर चितारले आहे।चोखोबांचं रोजचं जीवन,पदोपदी आलेल्या अडचणी, समाजाकडून झालेले भयंकर हाल आणि या सगळ्यातून त्यांचा विठ्ठलावरचा अढळ विश्वास आणि ती निस्वार्थ ,निष्पाप,निर्मळ भक्ती। नमन,शतशहा नमन चोखोबा तुम्हाला। ...Read more

  • Rating Starशुचिता फडके

    हे पुस्तक विक्रीकरता उपलब्ध झाल्यावर केवळ आठ दिवसातच वाचायला मिळालं. लोकसखा ज्ञानेश्वर वाचलं असल्यामुळे संतांबद्दल पुस्तकं वाचावीशी वाटत होतीच. त्या उत्सुकतेपोटी जोहार मायबाप जोहारदेखील हाताळायला घेतलं आणि पहिल्या पानापासून जाणवली ती लेखिकेची आत्मियत, तळमळ. एकदा हातात घेतलेलं पुस्तक खाली ठेवलं, तेच मुळी अर्धा प्रहर रात्र उलटून गेल्यावर. सरळसोप्या भाषेत लिहिलेली चोखामेळ्याची ही गोष्ट काळजाला स्पर्शून गेली. सारखं वाटत राहिलं, की का अशी जीवघेणी उपेक्षा त्यांच्या वाट्याला यावी? का अशी जन्माने जात ठरावी? अनंत प्रश्न, रडून थकलेले डोळे आणि चोखामेळोबद्दलच्या तीव्र सहानुभूतीने गच्च भरलेले मन यापैकी कुणाचं पारडं जड होतं ते जाणण्यात उरली रात्र सरली. पहाटे मात्र जाणवलं एक समाधान. एक सुंदर कलाकृती वाचायला मिळाल्याचा आनंद. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या या भक्तश्रेष्ठाच्या जीवनाबद्दल अतिशय सुरेख माहिती मिळाली आणि प्रकर्षाने जाणवलं की समाजव्यवस्थेमुळे काही विशिष्ट जातीच्या लोकांना काय काय सोसावं लागलं. पुस्तकातील वेदनेचा भाग जितका भिडतो तितकाच विठोबा-रुक्मिणीमधील बंध भावतो. मंजुश्रीतार्इंनी इतकी सुंदर कलाकृती निर्माण केली आहे. भक्तीचा इतका अप्रतिम अविष्कार प्रसवला आहे, की वाटतं, त्यांनी संत चरित्र हा एकमेव उद्देश समोर ठेवावा आणि बहुप्रसवा व्हावे. ...Read more

  • Rating Starसौ. कांचन साठ्ये, पुणे

    नुकतेच एक चांगले पुस्तक वाचनात आले, `जोहार माय बाप जोहार`. या कादंबरीत चोखामेळा यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला आहे. भारताच्या संतपरंपरेतील एक रत्न म्हणजे संत चोखामेळा. अस्पृश्य समाजात जन्म घेऊन विठ्ठल या देवतेची निस्सीम भक्ती करणारा हा संत. त्याकळात पुरोहित वर्गाचे विशेषत: बडव्यांचे प्राबल्य असताना कुठलीही कटुता न येऊ देता मरेपर्यंत आपली विठ्ठलाशी असलेली तन्मयता त्याच्या जीवनपटात दिसते. विठ्ठलाचा हार चोरल्याचा आरोप हा चोख्याच्या आयुष्यातला सर्वात दु:खद प्रसंग. दलित असूनही त्याच्या अभंगातून डोकावणारा अभ्यास थक्क करून जातो. अविनाशी आत्मा हा विषय त्याच्या अभंगातून अतिशय सहजपणे हाताळलेला दिसतो. त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत वर्णन केला आहे. त्याचे अभंग, सेवा, संत सहवास, संतांनी केलेली पाठराखण या सर्वच गोष्टींचा उल्लेख यात आला आहे. कादंबरीचा हृद्य शेवट वाचताना मन भरून आले. प्रकाशकांनी चांगले साहित्य मूल्य असलेली अशी पुस्तके वाचकांना द्यावीत ही अपेक्षा. ...Read more

  • Rating StarPROF B. V. CHOUKHANDE

    आपण लिहिलेलं ‘जोहार मायबाप जोहार’ पुस्तक वाचलं. वाचता वाचता वेचता येणारं लिखाण भासलं. वाचकाला पुढे खेचत नेणारी लेखणी आपली शैली सुखावणारी. त्याच वेळी डोळ्याला धारा लावणारी. चोखोबा मुळात एक उपेक्षित वर्णातील त्यामुळे त्यांचेवर लिहिणारे आजच्या परिस्थिती कमी. बरं आपण हातात घेतलेला हा विषय आपला परिचय करून देणारा भावतो. आपली मांडणी, प्रत्येक प्रसंग शिवाय कोल्हापूरचे असून त्यांचे मूळगाव (मेहुणा) बुलढाणा जिल्ह्यातील शब्दाची मांडणी लिहिताना ‘डफ’ झाली त्यामुळेच भक्तीचा रंग चढला. कालातीत ग्रंथावर भाष्य करणारे लेखक पुढे येतात अन् अप्रतिम दस्तऐवज वाचकासमोर मांडतात यात त्यांचं अभिनंदनीय कर्म श्रेष्ठ ठरतं. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more