* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FIFTY YEARS OF SILENCE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9789353172879
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GRIPPING AND INSPIRING, THIS ACCOUNT TELLS THE STORY OF JAN RUFF-O’HERNE AND THE SHATTERING OF HER IDYLLIC CHILDHOOD IN DUTCH COLONIAL INDONESIA. DEPICTING THE JAPANESE INVASION OF JAVA IN 1942, THIS RIVETING AUTOBIOGRAPHY RECOUNTS HOW SHE WAS TAKEN FROM HER MOTHER AND TWO YOUNGER SISTERS AND FORCED INTO SEXUAL SLAVERY IN A MILITARY BROTHEL. FOLLOWING THE BEATINGS AND RAPES SHE SUFFERED DURING A PERIOD OF THREE MONTHS, THIS RECORD REVEALS HOW SHE WAS FINALLY RETURNED TO PRISON, ONLY TO HAVE HER FAMILY’S LIVES THREATENED IF SHE EVER SPOKE THE TRUTH ABOUT THE ATROCITIES INFLICTED UPON HER. HER SILENCE OVER FIVE DECADES IS PORTRAYED HERE, BROKEN ONLY BY HER WITNESSING KOREAN WAR RAPE VICTIMS MAKING PUBLIC APPEALS FOR JUSTICE AND HER RESOLUTION TO TESTIFY AND SUPPORT THEM. DOCUMENTING HER COURAGEOUS CONFESSION TO HER FAMILY AND HER TIRELESS WORK TO PROTECT THE RIGHTS OF WOMEN IN WAR AND ARMED CONFLICT, THIS RECOLLECTION IS A TRIBUTE TO ONE WOMAN’S INNER STRENGTH, CONSTANT FAITH, AND UNBREAKABLE SURVIVAL.
मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली, नव्हे, गाडलेली ही गोष्ट आपल्या मुलींना, नातवंडांना कशी सांगायची? ही गोष्ट साधीसुधी नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजिरवाणी, दुर्दैवी भोगवटा होता. असा भोगवटा ज्याचं दु:ख, अपमान, लाज इतक्या प्रदीर्घ काळानंतरही तब्बल पन्नास वर्षांनंतरही यात्किंचितही कमी झालेली नाही. एक दिवस आपलं मन त्यांच्याजवळ मोकळं करावंच लागणार आहे, त्याची जाणीव मला होतीच पण मी कुठल्या तोंडानं त्यांना हे सांगणार होते.. ‘‘मग ठरवलं, ते सगळं आपण लिहून काढायचं, कागदावर उतरवायचं.’’ आयुष्याचं अर्धशतक– थोडीथोडकी नव्हे, पन्नास वर्षं जॅननं मनात धुमसत राहिलेला कोंडमारा सहन केला. पण १९९२ साली या कोंडमाऱ्यांचा उद्रेक झाला. ऐन तारुण्यात जॅनला जो शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला त्याचं हृदयद्रावक कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. ‘सुखदायिनी’ हे गोड बिरुद ज्या स्त्रियांना लावण्यात आलं ते एखाद्या इंगळीप्रमाणे त्यांना जन्मभर डसत राहिलं पण त्यांना तोंडातून वेदनेचा हुंकार काढण्याचीही सोय नव्हती. कारण मृत्यूची टांगती तलवार तर त्यांच्या डोक्यावर होतीच शिवाय घरादाराची अब्रू वेशीवर टांगली जाईल ही भीतीही होती. लैंगिक अत्याचारांमुळे जो अपमान, जे दु:ख तिला सोसावं लागलं त्याची ही कहाणी.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे पुरस्कार २०१२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #FIFTYYEARSOFSILENCE #फिफ्टीईअर्सऑफसायलेन्स #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR #नीलाचांदोरकर #JANRUFFOHERNE #जॉनरफओहेर्न"
Customer Reviews
  • Rating StarSatish Joshi

    जगात तुम्ही पुर्वला, पश्चिमेला, दक्षीणेला किंवा उत्तरेला कोठेही जा, स्त्रीयांनवर होणारे अत्याचार, बलात्कार हे जवळ,जवळ सारखेच असतात. असेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांकडून अनेक वेळा बलात्कार झालेल्या स्त्रीची ही आठवणक गाथा म्हणजेच "मनाचे पंन्नास वर्षे. मुळ इंग्रजी लेखक जँन रफ्-ओ`हर्न आहेत. अनुवाद निला चांदोरकर यांनी केला आहे. पुस्तकाचे थोडक्यात वर्णन करायचे म्हटलेतर भयोत्कुट, ह्रदयस्पर्शी, भीषण, वास्तववादी, मानवीमुल्यांचे हनन होणारे अत्याचार असे करता येईल. मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली नव्हे तर मनात गाडलेली ही गोष्ट, आपल्या मुलींना नातवंडांना कशी सांगायची ? ही गोष्ट साधीसुधी नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजीरवाणी, दुर्दैवी भोगवाटा होता. असा भोगवाटा की ज्यांच दु:ख, अपमान, लाज, इतक्या प्रदिर्घ काळानंतरही तब्बल पंन्नास वर्षानंतरही यंत्किंचितही कमी झालेली नाही. एक दिवस आपल मन आपल्या मुली, नातवंडांना जवळ मोकळ करावंच लागणार आहे. याची जाणीव तिला होतीच पण ती हे कुठल्या तोंडाने सांगणार होती.. " मग ठरल ते सगळं आपण लिहून काढायचं, कागदावर उतरवायचं." असे तिने ठरवले. आयुष्यांच अर्धशतक- थोडीथोडकी नव्हे, पंन्नास वर्ष जाँननं मनात धुमसत राहीलेला कोंडमारा सहन केला. पण 1992 साली या कोंडमाऱ्याचा उद्रेक झाला. ऐन तारुण्यात जँनला जो शारीरिक आणि माणसिक छळ सोसावा लागला. त्याच ह्रदयद्रावक कथन या पुस्तकात वाचायला मिळेतं. `सुखदायिनी` हे गोड बिरुद्ध ज्या स्त्रीयांना लावण्यात आलं ते एखाद्या इंगळीप्रमाणे त्यांना जन्मभर डसत राहिलं. पण त्यांना तोंडातून वेदनेचा हुंकार काढण्याची सोय नव्हती. कारण मृत्यूची टांगती तलवार तर त्यांच्या डोक्यावर होतीच शिवाय घरदाराची अब्रु वेशीवर टांगली जाईल ही भीतीही होतीच. लैगिक अत्याचारांमुळे जो अपमान, जे दु:ख तिला सोसावं लागलं त्याची ही करुण, ह्रदयस्पर्शी, मनाला चटका आणी हुर, हुर लावणारी कहाणी. वाचणीय पुस्तक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.