* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STEVE JOBS : EK ZAPATLELA TANTRADNYA!
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983173
  • Edition : 8
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STEVE IS NO MORE WITH US, BUT HIS WORK REMAINS AND REMINDS ABOUT THE REVOLUTION CREATED BY HIM MAKING IT SMOOTHER AND EASIER. THE PCS, THE I- PHONES, THE I-PODS, THE TABLET PCS ALL WILL BE A CONSTANT REMINDER OF THE GENUINE AND WITTY WAYS THAT STEVE HANDLED AND FONDLED. HE WAS ALWAYS LOST IN A WORLD OF HIS OWN. HE HUGGED THE GLORY AND THE DOWNFALLS WITH EQUAL ALOOFNESS. NOT ONCE WERE HIS BELIEFS SHATTERED. THROUGHOUT HIS LIFE, HE STRUGGLED AND DARED TO BRING HIS DREAMS COME TRUE. HIS DREAMS HAD A SILVERY LINING OF CONSISTENCY, PERSUASION AND INTENTION. HE WAS UNIQUE IN EVERY WAY. THE LIFE THREATENING DISEASE OF CANCER COULD NOT PREVENT HIM FROM WORKING TILL HIS LAST BREATH, LITERALLY. THOUGH STUBBORN AND DOMINANT BY NATURE HE STOOD AS A MAGICIAN IN THE FIELD OF TECHNOLOGY. HERE IS A SIMPLE GESTURE TO PAY HIM RESPECT AND HONOUR. A MAGNIFICENT JOURNEY PRESENTED AUTHENTICALLY.
तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
STEVEJOBS#ACHYUTGODBOLE#ATULKAHATE# अच्युत गोडबोले#अतुल कहाते#स्टीव्ह जॉब्ज#
Customer Reviews
  • Rating StarAKASH JADHAV - INSIDE MARATHI BOOKS

    स्टीव्ह जॉब्ज या व्यक्तिमत्वावर अनेक पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत पण अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते लिखित स्टीव्ह जॉब्ज एक झपाटलेला तंत्रज्ञ हे पुस्तक अनेक अर्थांनी वेगळं आहे. एकतर मराठी भाषेत स्टीव्ह जॉब्जवर लिहिलेलं हे पाहिलं पुस्तक आहे. अच्युत गोडबोल आणि अतुल कहाते यांनी हे पुस्तक विक्रमी वेळात लिहून पूर्ण केलं आहे. हे पुस्तक स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवतं . अँपल या कंपनीचा गॅरेज ते जगप्रसिद्ध होण्याचा प्रवास आणि स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास या दोन गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतलेल्या आहेत कि त्या वेगळ्या करणे जवळ जवळ अशक्य. लेखकांनी पुस्तकात हा गुंता योग्यरित्या हाताळलेला आहे. ज्यांना स्टीव्ह जॉब्ज अधिकृत चरित्र वाचण्यासाठी वेळ नाहीये त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे. ते आपल्याला स्टीव्हची अँपल कंपनीवर असलेली छाप दाखवून देत. पुस्तकात स्टीव्हची काही कृष्णधवल छायाचित्रंही आहेत जे वाचकांना पुस्तकाच्या नायकाशी कनेक्ट करायला मदत करतात. नक्की स्टीव्ह जॉब्ज कोण होता?? त्याला इतकी प्रसिद्धी कशी मिळाली?? त्याने कोणती उत्पादन बाजारात आणली?? त्याची व्यवस्थापन पद्धत कशी होती?? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. हे पुस्तक विशेषतः कॉम्पुटर / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहित करेल. ...Read more

  • Rating StarVarsha Mahakal

    स्टीव्ह जाॅब्ज.....हे नाव परिचीत नसलेली व्यक्ती आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला कुठेही आढळणार नाही. त्याचं बालपण जितकं खडतर अन रोमांचकारी आहे तितकचं किंबहुना त्याहुनही अधिक त्याच तरूण आयुष्य. अतिशय उंच झेप घेतल्यानंतर तितक्याचं वेगात खाली मिनीवर कोसळणं.....अन पुन्हा झेप घेण्यासाठी पंख पसरले असतांना कॅन्सरसारख्या आजाराने अक्राळविक्राळ रूप धारण करत त्याच्या ध्येयप्राप्तीत अडसर आणणं.... पण त्याचा हट्टी स्वभाव, त्याची जिद्द त्याला त्याचं ध्येय प्राप्त करुन देते.पण हा दुर्धर आजार काही त्याचा पिच्छा सोडत नाही...त्याला आपल्यासोबत घेऊनचं जाॅब्ज या जगाचा निरोप घेतो....आपल्यासाठी खुप काही मागे ठेवुन. स्टीव्ह जाॅब्जच्या रंजक, संघर्षमय अन जिद्दी आयुष्याची ही कहाणी आपल्याला नक्कीचं आवडेल. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 27-11-2011

    तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात प्रसिध्द जादूगार नुकतेच हे जग सोडून गेला. त्याने आपल्या अदभुत अशा कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले संगणक, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स. टॅब्लेट पीसी हे सारे जगाला त्याची आठवण करुन देत राहणार आहेत. जगातील लोकांच्य कल्पनाशक्तीपलिकडची उत्पादने त्याने प्रत्यक्षात आणून दाखवली. पण एका वेगळ्याच विश्वात तो जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आले. सगळ्यांहून वेगळे आणि अगदी सर्वोत्तम करण्यासाठी त्याने सातत्याने धडपड केली. कर्करोगाने शरीर पोखरले तरीही त्याने कल्पनांच्या भराऱ्या अखेरपर्यंत थांबवल्या नाहीत. त्याच्या जगण्याची हीच सफर या पुस्तकातून उलगडते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more