* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STEVE JOBS : EK ZAPATLELA TANTRADNYA!
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983173
  • Edition : 8
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET-10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STEVE IS NO MORE WITH US, BUT HIS WORK REMAINS AND REMINDS ABOUT THE REVOLUTION CREATED BY HIM MAKING IT SMOOTHER AND EASIER. THE PCS, THE I- PHONES, THE I-PODS, THE TABLET PCS ALL WILL BE A CONSTANT REMINDER OF THE GENUINE AND WITTY WAYS THAT STEVE HANDLED AND FONDLED. HE WAS ALWAYS LOST IN A WORLD OF HIS OWN. HE HUGGED THE GLORY AND THE DOWNFALLS WITH EQUAL ALOOFNESS. NOT ONCE WERE HIS BELIEFS SHATTERED. THROUGHOUT HIS LIFE, HE STRUGGLED AND DARED TO BRING HIS DREAMS COME TRUE. HIS DREAMS HAD A SILVERY LINING OF CONSISTENCY, PERSUASION AND INTENTION. HE WAS UNIQUE IN EVERY WAY. THE LIFE THREATENING DISEASE OF CANCER COULD NOT PREVENT HIM FROM WORKING TILL HIS LAST BREATH, LITERALLY. THOUGH STUBBORN AND DOMINANT BY NATURE HE STOOD AS A MAGICIAN IN THE FIELD OF TECHNOLOGY. HERE IS A SIMPLE GESTURE TO PAY HIM RESPECT AND HONOUR. A MAGNIFICENT JOURNEY PRESENTED AUTHENTICALLY.
तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
STEVEJOBS#ACHYUTGODBOLE#ATULKAHATE# अच्युत गोडबोले#अतुल कहाते#स्टीव्ह जॉब्ज#
Customer Reviews
  • Rating StarAKASH JADHAV - INSIDE MARATHI BOOKS

    स्टीव्ह जॉब्ज या व्यक्तिमत्वावर अनेक पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत पण अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते लिखित स्टीव्ह जॉब्ज एक झपाटलेला तंत्रज्ञ हे पुस्तक अनेक अर्थांनी वेगळं आहे. एकतर मराठी भाषेत स्टीव्ह जॉब्जवर लिहिलेलं हे पाहिलं पुस्तक आहे. अच्युत गोडबोल आणि अतुल कहाते यांनी हे पुस्तक विक्रमी वेळात लिहून पूर्ण केलं आहे. हे पुस्तक स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवतं . अँपल या कंपनीचा गॅरेज ते जगप्रसिद्ध होण्याचा प्रवास आणि स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास या दोन गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतलेल्या आहेत कि त्या वेगळ्या करणे जवळ जवळ अशक्य. लेखकांनी पुस्तकात हा गुंता योग्यरित्या हाताळलेला आहे. ज्यांना स्टीव्ह जॉब्ज अधिकृत चरित्र वाचण्यासाठी वेळ नाहीये त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे. ते आपल्याला स्टीव्हची अँपल कंपनीवर असलेली छाप दाखवून देत. पुस्तकात स्टीव्हची काही कृष्णधवल छायाचित्रंही आहेत जे वाचकांना पुस्तकाच्या नायकाशी कनेक्ट करायला मदत करतात. नक्की स्टीव्ह जॉब्ज कोण होता?? त्याला इतकी प्रसिद्धी कशी मिळाली?? त्याने कोणती उत्पादन बाजारात आणली?? त्याची व्यवस्थापन पद्धत कशी होती?? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. हे पुस्तक विशेषतः कॉम्पुटर / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहित करेल. ...Read more

  • Rating StarVarsha Mahakal

    स्टीव्ह जाॅब्ज.....हे नाव परिचीत नसलेली व्यक्ती आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला कुठेही आढळणार नाही. त्याचं बालपण जितकं खडतर अन रोमांचकारी आहे तितकचं किंबहुना त्याहुनही अधिक त्याच तरूण आयुष्य. अतिशय उंच झेप घेतल्यानंतर तितक्याचं वेगात खाली मिनीवर कोसळणं.....अन पुन्हा झेप घेण्यासाठी पंख पसरले असतांना कॅन्सरसारख्या आजाराने अक्राळविक्राळ रूप धारण करत त्याच्या ध्येयप्राप्तीत अडसर आणणं.... पण त्याचा हट्टी स्वभाव, त्याची जिद्द त्याला त्याचं ध्येय प्राप्त करुन देते.पण हा दुर्धर आजार काही त्याचा पिच्छा सोडत नाही...त्याला आपल्यासोबत घेऊनचं जाॅब्ज या जगाचा निरोप घेतो....आपल्यासाठी खुप काही मागे ठेवुन. स्टीव्ह जाॅब्जच्या रंजक, संघर्षमय अन जिद्दी आयुष्याची ही कहाणी आपल्याला नक्कीचं आवडेल. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 27-11-2011

    तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात प्रसिध्द जादूगार नुकतेच हे जग सोडून गेला. त्याने आपल्या अदभुत अशा कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले संगणक, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स. टॅब्लेट पीसी हे सारे जगाला त्याची आठवण करुन देत राहणार आहेत. जगातील लोकांच्य कल्पनाशक्तीपलिकडची उत्पादने त्याने प्रत्यक्षात आणून दाखवली. पण एका वेगळ्याच विश्वात तो जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आले. सगळ्यांहून वेगळे आणि अगदी सर्वोत्तम करण्यासाठी त्याने सातत्याने धडपड केली. कर्करोगाने शरीर पोखरले तरीही त्याने कल्पनांच्या भराऱ्या अखेरपर्यंत थांबवल्या नाहीत. त्याच्या जगण्याची हीच सफर या पुस्तकातून उलगडते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more