* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHEN I DIE
  • Availability : Available
  • Translators : DR. AJEY HARDIKAR
  • ISBN : 9789353171902
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PHILIP GOULD WAS A VERY CLOSE FRIEND OF TONY BLAIR, THE EX-PRIME MINISTER OF ENGLAND. IN 2008, AT THE AGE OF 58, PHILIP WAS DIAGNOSED WITH EASOPHAGEAL CANCER. THEREAFTER, FOR CONTINUOUS THREE YEARS HE GAVE A TOUGH FIGHT TO THE DREADFUL DISEASE. HE WAS CURED BUT THEN THE DISEASE RELAPSED CLAIMING THE LIFE OF THE STATESMAN. HIS DISEASE MADE HIM INTROVERT. A STRATEGIST BY NATURE, HE DECIDED TO GIVE A TOUGH FIGHT TO THIS DISEASE, AS IF IT WAS AN ELECTION GAME. HIS HEALTH STARTED DETERIORATING. IT WAS THEN HE DECIDED TO GO PUBLIC WHILE SHARING HIS THOUGHTS REGARDING CANCER. “WHEN I DIE”- AYUSHYACHA ANTIM SANSKAR IS THE RESULT OF HIS STRONG INTENTIONS TO CONVEY HIS THOUGHTS. A VERY TOUCHING JOURNEY, THE BOOK WILL ALSO BE A GREAT HELP TO THE CANCER PATIENTS. THE AUTHOR’S PERSPECTIVE ABOUT LIFE PRESENTS AN IMPORTANT DIMENSION OF HUMAN RELATIONSHIP AND LIFE IN GENERAL.
फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. २००८ साली, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्यातल्या स्ट्रेटेजिस्टने निवडणूक डावपेच रचण्याच्या हिरिरीनेच या भयानक रोगाशी सामना करायचं ठरवलं. जसजशी त्यांची प्रकृती ढासळत गेली तसतसं आपल्या कॅन्सरविषयी आणि मनातल्या विचारांविषयी लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. ‘आयुष्याचा अंतिम संस्कार...’ म्हणजे या तळमळीचाच परिपाक आहे. वाचकाला हेलावून सोडणारी ही कथा स्फुर्तिदायक ठरेल यात शंका नाही. शिवाय मानवी आयुष्य आणि नातेसंबंधांचे मर्मही यात दडले आहे, जे प्रत्येकाला विचार करायला लावेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PHILIPGOULD #DR.AJEYHARDIKAR #BIOGRAPHY #आयुष्याचाअंतिमसंस्कार #AAYUSHYACHA ANTIMSANSKAR"
Customer Reviews
  • Rating StarDIVYA MARATHI 30-11-2019

    आयुष्याचा अंतिम संस्कार एका कॅन्सरग्रस्ताचे हेलावून सोडणारे अनुभव ...कॅन्सर या नावानेसुद्धा कोणत्याही माणसाच्या हृदयाचा थरकाप होतो. दुर्दैवाने जेव्हा एखादया व्यक्तीला कॅन्सर झाल्याचं निदान होतं, तेव्हा त्याचं भावविश्व ढवळून निघतं. त्याच्या नातेवाइकांीही ती सत्त्वपरीक्षा असते. फिलिप गूल्डनाही कॅन्सरचं निदान झालं आणि सुरू झालं उपचारांचं सत्र आणि वेदनांचा प्रवास; पण या वेदनामय प्रवासातही सकारात्मक राहून त्यांनी त्यांच्या उपचारांविषयी, त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीविषयी वर्तमानपत्रात लेखमाला लिहिली आणि त्याच लेखमालेचं नंतर पुस्तक झालं `व्हेन आय डाय`. त्यात त्यांच्या मुलीने आणि पत्नीनेही गूल्ड यांचं आजारपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं आहे. डॉ. अजेय हर्डीकर यांनी `आयुष्याचा अंतिम संस्कार` या शीर्षकासह. इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रेटेजिस्ट असलेल्या फिलिप गूल्डला २९ जानेवारी २००८ रोजी कॅन्सर झाला असल्याचं समजतं. या आजाराला धीरोदात्तपणे सामोरं जाण्याचा निर्धार त्यानं केला. यामध्ये त्याला पत्नी गेल रेबक आणि जॉर्जिया व ग्रेस या त्याच्या दोन मुलींचा तसेच मित्र परिवार आणि नातेवाइकांचा आधार मिळाला. दोन वर्षांच्या काळात शस्त्रक्रिया आणि क्लेशकारक केमोथेरपीनंतर, सर्व चाचण्यांमधून कॅन्सर लुप्त झाल्याचं आढळलं; पण जेमतेम सहा महिन्यांनंतर कॅन्सरचं पुनरागमन झाल्याचं निष्पन्न झालं. मत्यूच्या दिशेनं एका प्रदीर्घ आणि यातनापूर्ण प्रवासाची सुरुवात झाली; परंतु हा प्रवास आशेवर आधारित होता. या काळात त्यानं स्वत:च्या आयुष्याचा, कार्याचा आणि नातेसंबंधांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकामध्ये फिलिप त्याच्या आजाराचं वर्णन करतानाच मृत्यूकडून शिकलेले धडे उलगडून दाखवतो. फिलिपच्या विचारांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचं मनोगतही समोर येतं. अत्यंत सुंदर शब्दांत लिहिलेलं आणि मनाला उभारी देणारं असं हे पुस्तक हेलावून सोडणारं आणि प्रेरणादायीसुद्धा आहे. मृत्यूच्या समीप असताना आपल्या भावना, अनुभव शब्दबद्ध करणं अवघड आहे; पण फिलिप यांनी ते अवघड काम करून कर्करोगाच्या रुग्णांना सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या नातेवाइकांनाही किती यातनामय स्थितीतून जावं लागतं, याचंही वास्तव चित्रण या पुस्तकात आलं आहे. गुल्ड यांच्या सकारात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या या काही ओळी - मृत्यूमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. यात तुम्ही जर नजीकच्या काळात मरणार असाल तर उरलेल्या आयुष्याला जास्तच उत्कटता प्राप्त होते. जीवन कल्पनातीत मौल्यवान बनतं. केवळ तुमचे थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून नव्हे, तर या काळातले अनुभव तुम्हाला परिपूर्ण असल्याचं जाणवतं म्हणून. हे अनुभव तुमचं आयुष्य व्यापणारे आणि उजळून टाकणारे ठरतात. फिलिप यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना डॉ. अजेय हर्डीकरांच्या कुशल अनुवादामुळे वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोचतात. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 12-05-2019

    एका कॅन्सरग्रस्ताचे हेलावून सोडणारे अनुभव… कॅन्सर या नावानेसुद्धा कोणत्याही माणसाच्या हृदयाचा थरकाप होतो. दुर्दैवाने जेव्हा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्याचं निदान होतं, तेव्हा त्याचं भावविश्व ढवळून निघतं. त्याच्या नातेवाइकांचीही ती सत्त्वपरीक्षा असे. फिलिप गूल्डनाही कॅन्सरचं निदान झालं आणि सुरू झालं उपचारांचं सत्र आणि वेदनांचा प्रवास; पण या वेदनामय प्रवासातही सकारात्मक राहून त्यांनी त्यांच्या उपचारांविषयी, त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीविषयी वर्तमानपत्रात लेखमाला लिहिली आणि त्याच लेखमालेचं नंतर पुस्तक झालं ‘व्हेन आय डाय’. त्यात त्यांच्या मुलीने आणि पत्नीनेही गूल्ड यांचं आजारपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं आहे डॉ. अजेय हर्डीकर यांनी ‘आयुष्याचा अंतिम संस्कार’ या शीर्षकासह. इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रेटेजिस्ट असलेल्या फिलिप गूल्डला २९ जानेवारी २००८ रोजी कॅन्सर झाला असल्याचं समजतं. या आजाराला धीरोदात्तपणे सामोरं जाण्याचा निर्धार त्यानं केला. यामध्ये त्याला पत्नी गेल रेबक आणि जॉर्जिया व ग्रेस या त्याच्या दोन मुलींचा तसेच मित्र परिवार आणि नातेवाइकांचा आधार मिळाला. दोन वर्षांच्या काळात शस्त्रक्रिया आणि क्लेशकारक केमोथेरपीनंतर, सर्व चाचण्यांमधून कॅन्सर लुप्त झाल्याचं आढळलं; पण जेमतेम सहा महिन्यांनंतर कॅन्सरचं पुनरागमन झाल्याचं निष्पन्न झालं. मृत्यूच्या दिशेनं एका प्रदीर्घ आणि यातनापूर्ण प्रवासाची सुरुवात झाली; परंतु हा प्रवास आशेवर आधारित होता. या काळात त्यानं स्वत:च्या आयुष्याचा, कार्याचा आणि नातेसंबंधांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकामध्ये फिलिप त्याच्या आजाराचं वर्णन करतानाच मृत्यूकडून शिकलेले धडे उलगडून दाखवतो. फिलिपच्या विचारांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचं मनोगतही समोर येतं. अत्यंत सुंदर शब्दांत लिहिलेलं आणि मनाला उभारी देणारं असं हे पुस्तक हेलावून सोडणारं आणि प्रेरणादायीसुद्धा आहे. मृत्यूच्या समीप असताना आपल्या भावना, अनुभव शब्दबद्ध करणं अवघड आहे; पण फिलिप यांनी ते अवघड काम करून कर्करोगाच्या रुग्णांना सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या नातेवाइकांनाही किती यातनामय स्थितीतून जावं लागतं, याचंही वास्तव चित्रण या पुस्तकात आलं आहे. गुल्ड यांच्या सकारात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या या काही ओळी - मृत्यूमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. यात तुम्ही जर नजीकच्या काळात मरणार असाल तर उरलेल्या आयुष्याला जास्तच उत्कटता प्राप्त होते. जीवन कल्पनातीत मौल्यवान बनतं. केवळ तुमचे थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून नव्हे, तर या काळातले अनुभव तुम्हाला परिपूर्ण असल्याचं जाणवतं म्हणून. हे अनुभव तुमचं आयुष्य व्यापणारे आणि उजळून टाकणारे ठरतात. फिलिप यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना डॉ. अजेय हर्डीकरांच्या कुशल अनुवादामुळे वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोचतात. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 14-04-2019

    कॅन्सर लढ्याची हेलावणारी कथा... इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रॅटेजिस्ट फिलिप गूल्ड यांच्या ‘व्हेन आय डाय’ या पुस्तकाचा ‘आयुष्याचा अंतिम संस्कार’ हा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला असून, हे पुस्तक राजकारणाबददल नाही, तर कॅन्सर आणि मृत्यूबद्दल भाष्य करते. सन २००८ मध्ये वयाच्या ५८व्या वर्षी फिलिप यांना अन्ननलिकेचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. पुढच्या तीन वर्षात स्ट्रॅटेजिकच्या भूमिकेतून त्यांनी या भयानक रोगाशी सामना करायचं ठरविलं. या प्रवासातील शारीरिक आणि मानसिक अनुभव लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. प्रस्तुत पुस्तक त्या तळमळीतूनच अवतरले आहे. लेखक, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांची ही कथा असून, ती लेखकाची पत्नी गेल आणि कन्या जॉर्जिया व ग्रेस या तीन व्यक्तींभोवती फिरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more