* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHEN I DIE
  • Availability : Available
  • Translators : DR. AJEY HARDIKAR
  • ISBN : 9789353171902
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PHILIP GOULD WAS A VERY CLOSE FRIEND OF TONY BLAIR, THE EX-PRIME MINISTER OF ENGLAND. IN 2008, AT THE AGE OF 58, PHILIP WAS DIAGNOSED WITH EASOPHAGEAL CANCER. THEREAFTER, FOR CONTINUOUS THREE YEARS HE GAVE A TOUGH FIGHT TO THE DREADFUL DISEASE. HE WAS CURED BUT THEN THE DISEASE RELAPSED CLAIMING THE LIFE OF THE STATESMAN. HIS DISEASE MADE HIM INTROVERT. A STRATEGIST BY NATURE, HE DECIDED TO GIVE A TOUGH FIGHT TO THIS DISEASE, AS IF IT WAS AN ELECTION GAME. HIS HEALTH STARTED DETERIORATING. IT WAS THEN HE DECIDED TO GO PUBLIC WHILE SHARING HIS THOUGHTS REGARDING CANCER. “WHEN I DIE”- AYUSHYACHA ANTIM SANSKAR IS THE RESULT OF HIS STRONG INTENTIONS TO CONVEY HIS THOUGHTS. A VERY TOUCHING JOURNEY, THE BOOK WILL ALSO BE A GREAT HELP TO THE CANCER PATIENTS. THE AUTHOR’S PERSPECTIVE ABOUT LIFE PRESENTS AN IMPORTANT DIMENSION OF HUMAN RELATIONSHIP AND LIFE IN GENERAL.
फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. २००८ साली, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्यातल्या स्ट्रेटेजिस्टने निवडणूक डावपेच रचण्याच्या हिरिरीनेच या भयानक रोगाशी सामना करायचं ठरवलं. जसजशी त्यांची प्रकृती ढासळत गेली तसतसं आपल्या कॅन्सरविषयी आणि मनातल्या विचारांविषयी लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. ‘आयुष्याचा अंतिम संस्कार...’ म्हणजे या तळमळीचाच परिपाक आहे. वाचकाला हेलावून सोडणारी ही कथा स्फुर्तिदायक ठरेल यात शंका नाही. शिवाय मानवी आयुष्य आणि नातेसंबंधांचे मर्मही यात दडले आहे, जे प्रत्येकाला विचार करायला लावेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PHILIPGOULD #DR.AJEYHARDIKAR #BIOGRAPHY #आयुष्याचाअंतिमसंस्कार #AAYUSHYACHA ANTIMSANSKAR"
Customer Reviews
  • Rating StarDIVYA MARATHI 30-11-2019

    आयुष्याचा अंतिम संस्कार एका कॅन्सरग्रस्ताचे हेलावून सोडणारे अनुभव ...कॅन्सर या नावानेसुद्धा कोणत्याही माणसाच्या हृदयाचा थरकाप होतो. दुर्दैवाने जेव्हा एखादया व्यक्तीला कॅन्सर झाल्याचं निदान होतं, तेव्हा त्याचं भावविश्व ढवळून निघतं. त्याच्या नातेवाइकांीही ती सत्त्वपरीक्षा असते. फिलिप गूल्डनाही कॅन्सरचं निदान झालं आणि सुरू झालं उपचारांचं सत्र आणि वेदनांचा प्रवास; पण या वेदनामय प्रवासातही सकारात्मक राहून त्यांनी त्यांच्या उपचारांविषयी, त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीविषयी वर्तमानपत्रात लेखमाला लिहिली आणि त्याच लेखमालेचं नंतर पुस्तक झालं `व्हेन आय डाय`. त्यात त्यांच्या मुलीने आणि पत्नीनेही गूल्ड यांचं आजारपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं आहे. डॉ. अजेय हर्डीकर यांनी `आयुष्याचा अंतिम संस्कार` या शीर्षकासह. इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रेटेजिस्ट असलेल्या फिलिप गूल्डला २९ जानेवारी २००८ रोजी कॅन्सर झाला असल्याचं समजतं. या आजाराला धीरोदात्तपणे सामोरं जाण्याचा निर्धार त्यानं केला. यामध्ये त्याला पत्नी गेल रेबक आणि जॉर्जिया व ग्रेस या त्याच्या दोन मुलींचा तसेच मित्र परिवार आणि नातेवाइकांचा आधार मिळाला. दोन वर्षांच्या काळात शस्त्रक्रिया आणि क्लेशकारक केमोथेरपीनंतर, सर्व चाचण्यांमधून कॅन्सर लुप्त झाल्याचं आढळलं; पण जेमतेम सहा महिन्यांनंतर कॅन्सरचं पुनरागमन झाल्याचं निष्पन्न झालं. मत्यूच्या दिशेनं एका प्रदीर्घ आणि यातनापूर्ण प्रवासाची सुरुवात झाली; परंतु हा प्रवास आशेवर आधारित होता. या काळात त्यानं स्वत:च्या आयुष्याचा, कार्याचा आणि नातेसंबंधांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकामध्ये फिलिप त्याच्या आजाराचं वर्णन करतानाच मृत्यूकडून शिकलेले धडे उलगडून दाखवतो. फिलिपच्या विचारांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचं मनोगतही समोर येतं. अत्यंत सुंदर शब्दांत लिहिलेलं आणि मनाला उभारी देणारं असं हे पुस्तक हेलावून सोडणारं आणि प्रेरणादायीसुद्धा आहे. मृत्यूच्या समीप असताना आपल्या भावना, अनुभव शब्दबद्ध करणं अवघड आहे; पण फिलिप यांनी ते अवघड काम करून कर्करोगाच्या रुग्णांना सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या नातेवाइकांनाही किती यातनामय स्थितीतून जावं लागतं, याचंही वास्तव चित्रण या पुस्तकात आलं आहे. गुल्ड यांच्या सकारात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या या काही ओळी - मृत्यूमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. यात तुम्ही जर नजीकच्या काळात मरणार असाल तर उरलेल्या आयुष्याला जास्तच उत्कटता प्राप्त होते. जीवन कल्पनातीत मौल्यवान बनतं. केवळ तुमचे थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून नव्हे, तर या काळातले अनुभव तुम्हाला परिपूर्ण असल्याचं जाणवतं म्हणून. हे अनुभव तुमचं आयुष्य व्यापणारे आणि उजळून टाकणारे ठरतात. फिलिप यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना डॉ. अजेय हर्डीकरांच्या कुशल अनुवादामुळे वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोचतात. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 12-05-2019

    एका कॅन्सरग्रस्ताचे हेलावून सोडणारे अनुभव… कॅन्सर या नावानेसुद्धा कोणत्याही माणसाच्या हृदयाचा थरकाप होतो. दुर्दैवाने जेव्हा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्याचं निदान होतं, तेव्हा त्याचं भावविश्व ढवळून निघतं. त्याच्या नातेवाइकांचीही ती सत्त्वपरीक्षा असे. फिलिप गूल्डनाही कॅन्सरचं निदान झालं आणि सुरू झालं उपचारांचं सत्र आणि वेदनांचा प्रवास; पण या वेदनामय प्रवासातही सकारात्मक राहून त्यांनी त्यांच्या उपचारांविषयी, त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीविषयी वर्तमानपत्रात लेखमाला लिहिली आणि त्याच लेखमालेचं नंतर पुस्तक झालं ‘व्हेन आय डाय’. त्यात त्यांच्या मुलीने आणि पत्नीनेही गूल्ड यांचं आजारपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं आहे डॉ. अजेय हर्डीकर यांनी ‘आयुष्याचा अंतिम संस्कार’ या शीर्षकासह. इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रेटेजिस्ट असलेल्या फिलिप गूल्डला २९ जानेवारी २००८ रोजी कॅन्सर झाला असल्याचं समजतं. या आजाराला धीरोदात्तपणे सामोरं जाण्याचा निर्धार त्यानं केला. यामध्ये त्याला पत्नी गेल रेबक आणि जॉर्जिया व ग्रेस या त्याच्या दोन मुलींचा तसेच मित्र परिवार आणि नातेवाइकांचा आधार मिळाला. दोन वर्षांच्या काळात शस्त्रक्रिया आणि क्लेशकारक केमोथेरपीनंतर, सर्व चाचण्यांमधून कॅन्सर लुप्त झाल्याचं आढळलं; पण जेमतेम सहा महिन्यांनंतर कॅन्सरचं पुनरागमन झाल्याचं निष्पन्न झालं. मृत्यूच्या दिशेनं एका प्रदीर्घ आणि यातनापूर्ण प्रवासाची सुरुवात झाली; परंतु हा प्रवास आशेवर आधारित होता. या काळात त्यानं स्वत:च्या आयुष्याचा, कार्याचा आणि नातेसंबंधांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकामध्ये फिलिप त्याच्या आजाराचं वर्णन करतानाच मृत्यूकडून शिकलेले धडे उलगडून दाखवतो. फिलिपच्या विचारांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचं मनोगतही समोर येतं. अत्यंत सुंदर शब्दांत लिहिलेलं आणि मनाला उभारी देणारं असं हे पुस्तक हेलावून सोडणारं आणि प्रेरणादायीसुद्धा आहे. मृत्यूच्या समीप असताना आपल्या भावना, अनुभव शब्दबद्ध करणं अवघड आहे; पण फिलिप यांनी ते अवघड काम करून कर्करोगाच्या रुग्णांना सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या नातेवाइकांनाही किती यातनामय स्थितीतून जावं लागतं, याचंही वास्तव चित्रण या पुस्तकात आलं आहे. गुल्ड यांच्या सकारात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या या काही ओळी - मृत्यूमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. यात तुम्ही जर नजीकच्या काळात मरणार असाल तर उरलेल्या आयुष्याला जास्तच उत्कटता प्राप्त होते. जीवन कल्पनातीत मौल्यवान बनतं. केवळ तुमचे थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून नव्हे, तर या काळातले अनुभव तुम्हाला परिपूर्ण असल्याचं जाणवतं म्हणून. हे अनुभव तुमचं आयुष्य व्यापणारे आणि उजळून टाकणारे ठरतात. फिलिप यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना डॉ. अजेय हर्डीकरांच्या कुशल अनुवादामुळे वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोचतात. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 14-04-2019

    कॅन्सर लढ्याची हेलावणारी कथा... इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रॅटेजिस्ट फिलिप गूल्ड यांच्या ‘व्हेन आय डाय’ या पुस्तकाचा ‘आयुष्याचा अंतिम संस्कार’ हा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला असून, हे पुस्तक राजकारणाबददल नाही, तर कॅन्सर आणि मृत्यूबद्दल भाष्य करते. सन २००८ मध्ये वयाच्या ५८व्या वर्षी फिलिप यांना अन्ननलिकेचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. पुढच्या तीन वर्षात स्ट्रॅटेजिकच्या भूमिकेतून त्यांनी या भयानक रोगाशी सामना करायचं ठरविलं. या प्रवासातील शारीरिक आणि मानसिक अनुभव लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. प्रस्तुत पुस्तक त्या तळमळीतूनच अवतरले आहे. लेखक, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांची ही कथा असून, ती लेखकाची पत्नी गेल आणि कन्या जॉर्जिया व ग्रेस या तीन व्यक्तींभोवती फिरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.