* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASTRONAUT SUNITA WILLIAMS
  • Availability : Available
  • Translators : CHITRA WALIMBE
  • ISBN : 9788177668674
  • Edition : 7
  • Publishing Year : JULY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUNITA WILLIAMS STAYED IN THE SPACE FOR 6 MONTHS; SHE HAD ATTRACTED ATTENTION OF MANY DURING THIS STAY OF 6 MONTHS. SHE HAS A WORLD RECORD OF SPACEWALK OF 29 HOURS AND 17 MINUTES; SHE IS FIRST FEMALE ASTRONAUT TO HAVE SUCH RECORD. THIS IS THE STORY OF AN EXCEPTIONAL WOMAN. POSITIVE THINKING, DEVOTION, DEDICATION, AND COMPETITIVE THINKING ALL THESE TURNED THE SMALL GIRL INTO AN ASTRONAUT WHO ACTUALLY WANTED TO BE A VETERINARY DOCTOR. SHE WAS BROUGHT UP VERY CAREFULLY IN A LOVING FAMILY. HER FAMILY ALWAYS ENCOURAGED HER TO PURSUE HER SUCCESS, THEY WERE VERY PROUD OF HER SUCCESS. SUNITA LEFT NO STONE UNTURNED WHILE ACHIEVING IT. SHE STRUGGLED HARD FOR IT. HER FATHER, DR. DEEPAK PANDYA IS A WELL KNOWN NEUROANATOMIST; HE PRESERVES THE VALUES OF AMERICA AND CULTURE OF INDIA. HER MOTHER URSALENE BONNY PANDYA HAS EUROPEAN CULTURE. SUNITA HAS LOVED THE OCEANS, BEEN TO THE OCEAN FLOORS, FOUGHT A WAR, PURSUED THE CAMPAIGNS FOR HUMANITY, GONE BEYOND THE SKY INTO THE SPACE AND HAS NOW COME BACK TO REST ON THE EARTH. SHE HERSELF IS A LIVING LEGEND.
सुनीता विल्यम्स हिनं अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात, जगभरातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २९ तास १७ मिनिटांचा स्पेसवॉक करून तिनं महिलांच्या अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. एका असामान्य स्त्रीची ही कथा आहे. समर्पण, निष्ठा, स्पर्धात्मक विचारधारा, आणि सकारात्मक दृष्टीकोणामुळं, पशुवैद्य बनण्याची इच्छा असलेल्या मुलीचं रुपांतर झालं एका यशस्वी अंतराळवीरामध्ये! आणि आता ती झाली आहे एक आदर्श! सुनीता एका प्रेमळ कुटुंबात लहानाची मोठी झाली, सुनीताच्या यशाचा अभिमान बाळगणा-या कुटुंबानं तिच्यातला उपजत गुणांना वाव दिला, पाठिंबा दिला आणि सुनीतानं अपरिमित कष्ट करून उत्तमतेकडे वाटचाल केली. अमेरिकन भूमीची मुल्यं जपणा-या, आणि भारतीयत्वाच्या खुणा दाखवणा-या सुनीताचे वडील डॉ. दीपक पंड्या हे एक नावाजलेले न्युरोअ‍ॅनाटामिस्ट, तर आई उर्सालिन बोनी पंड्या या युरोपियन वारसा जपणा-या! सुनीता सागरात रमली आहे, समुद्रतळाशी जाऊन आली आहे, लढाईवर गेली आहे, मानवतावादी मोहिमांसाठी गेली आहे, अवकाशात उसळी मारून पुन्हा पृथ्वीवर विसावली आहे - ती एक चालतीबोलती आख्यायिका आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#29 HOURS 17 MINUTES #SPACEWALK #DR.DEEPAKPANDYA #URSLEEN BONI #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #SUNITA WILLUMS #ANTARALVEER #ASTRONAUTS #CHITRAWALIMBE #CAPT S.SESHADRI # AR#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #ARADHIKA SHARMA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2007

    सुनीताचे पंख मुलींना... अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या कर्तबगारीने भारतीय मुलींना भारावून टाकले आहे. त्यामुळेच त्यांना कॅ. एस. शेषाद्री व आराधिका शर्मा यांनी लिहिलेली सुनीताची अंतराळभरारीची कहाणी वाचायला आवडेल. खरे तर राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंताळवीर. अवकाशात भरारी घेऊन परतला तेव्हापासून भारतीयांना या क्षेत्राची ओढ वाटू लागली. कल्पना चावला हिचा अंतराळयानाबरोबर दुर्दैवी मृत्यू भारतीयांना दु:खी करून गेला. त्या पार्श्वभूमीवर सुनीताचे यश भारतीयांसाठी आनंदउधाण आणणारे ठरले. कल्पना जशी पूर्णत: भारतीयच होती, तशी सुनीता नाही. सुनीता जन्माने अमेरिकनच. पण संस्काराने भारतीय मन घेऊन वावरणारी. म्हणूनच तिने अंतराळात जाताना गणेशमूर्ती, भगवद्गीता सोबत ठेवली होती. बर्गरपेक्षा सामोसा तिला आवडतो. या तिच्या भारतीय मनामुळे तिने भारतीयांमध्ये विशेष भावनिक जवळीक निर्माण केली. तिची कथा आपल्याही मुलींनी वाचावी असे जागरूक माता-पित्यांना नक्की वाटेल. -धरित्री जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 05-08-2007

    तुमच्या घरातल्या सुनीतासाठी… राकेश शर्मा पहिला भारतीय अंतराळवीर, अंतराळातून ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना सांगितल्यावर भारतीयांना अंतराळ स्वप्नं पडायला लागली. ही स्वप्नं पाहणाऱ्या पिढीची प्रतिनिधी ्हणजे कल्पना चावला. तिचा अंतराळ प्रवासातच दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी तिनं स्वप्नं प्रत्यक्षात येऊ शकतात असा विश्वास दिला. या विश्वासाला वास्तवाचं कोंदण दिलं सुनीता विल्यम्सनं. खरंतर सुनीता ही कल्पनासारखी जन्माने भारतीय नाही. पण सुनीताला टिपिकल भारतीय समोसा आवडतो. भगवतगीता आणि गणपतीची मूर्ती घेऊन ती अंतराळात गेली होती या सगळ्या तिच्या गोष्टी भारतीयांना विशेषत: शहरी, मध्यमवर्गीयांना खास जोडून घेणाऱ्या ठरल्या. जागतिकीकरणाचा प्रवाह अनुकूल ठरलेल्या या वर्गाला आताच्या काळात आपल्या मुलीनं लग्न करून निव्वळ सुखाचा संसार करावा असं वाटत नाही. स्वप्न पाहणाऱ्या भरारी घेऊ इच्छिणाऱ्या मुलीच्या पंखांना बळ देण्याची मानसिकता या वर्गात आता यायला लागली आहे. आजच्या तमाम जागरूक पित्यांना आपल्या मुलीनं सुनीता विल्यम्स व्हावं, सानिया मिर्झा व्हावं असं वाटत असतं. आपल्या मुलीही असं काही बनू शकतात हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हायला या उदाहरणामुळेच मदत झाली आहे. कॅप्टन एस, शेषाद्री आणि अराधिक शर्मा यांनी लिहिलेलं आणि चित्रा वाळिंबे यांनी अनुवाद केलेलं मेहता प्रकाशनाचं अंतराळवीर सुनीता विल्यम्स हे पुस्तक आपल्या घरात कर्तबगारीची बाळपावलं टाकणाऱ्या चिमुकलीसाठी वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarNEWS PAPER REVIEW

    प्रकाशक एखाद्या ताज्या घटनेवर किती झटपट पुस्तकं काढतात याचे उदाहरण म्हणजे सुनीता विल्यमचे चरित्र, अवघ्या तीन आठवड्यात ते प्रसिद्ध झाले. अंतराळात १९४ दिवंस १८ तास १५ मिनिटे राहून विक्रम करणारी सुनीता विल्यम्स ही २२ जून २००७ रोजी पहाटे १ वाजून ११ मििटांनी कॅलिफोर्नियातील एडवर्डस एअर बेसवर सुखरुप उतरली; तेव्हा जगभराच्या लक्षावधी चाहत्यांना हायसे वाटले असणार! या आधी पेâब्रुवारी २००३ मध्ये कल्पना चावला अंतराळात राहून पृथ्वीजवळ पोहोचली; पण कोलंबिया अवकाश यान पेटून तिचा इतर सहा अंतराळवीरांसह अंत झाला होता. त्यामुळे सुनीताच्या बाबतीत तसे काही घडू नये अशी सर्वांच्याच मनात धाकधूक होती. तिचे अटलांटिस अवकाश यान फ्लोरिडामध्ये उतरणार होते; तेथे त्यावेळी ८००० पुâटांवर ढगांची दाटी असल्याने उतरविणे शक्य नव्हते; तेव्हा चोवीस तासांनी ते कॅलिफोर्नियात उतरविण्यात आले आणि १३ जुलैला सुनीताचे चरित्र मराठीतही आले. प्रकाशकांच्या तत्परतेची ही एक अभिनंदनीय झलकच होय! या विक्रमी अंतराळकन्येबद्दल भारतीयांना आत्मीयता वाटणे स्वाभाविकच आहे. कारण तिचा जन्म अमेरिकेत झाला असला आणि ती सध्या अमेरिकन नागरिक असली तरी तिचे वडील डॉ.दीपक पंड्या हे भारतीयच आहेत गुजरातमधील अहमदाबादजवळचे मंगरोळ हे त्यांचे गाव. डॉ. दीपक पंड्या यांनी १९५८ मध्ये इंग्लंडला प्रयाण केले. तेथून ते अमेरिकेतील आहायो येथील युक्लीड हॉस्पिटलमध्ये उमेदवारी करुन अमेरिकेतच स्थायिक झाले. डॉ. दीपक पंड्या यांचे बोनी उर्सालिन त्यालोकार या स्लोव्हेनिअन मुलीवर प्रेम बसले. त्यांचा विवाह झाला मिळवून ‘नेव्हल एव्हिएटर’ म्हणून ती काम करु लागली (१९८९). त्याआधी नेव्हल अॅवॅâडमीमध्येच तिच्या बरोबर असणारा वर्गमित्र मायकेल विल्यम्स याच्याशी तिचे लग्न झाले. हेलिकॉप्टर पायलट म्हणून तिने काम सुरू केले. एअरक्राफ्ट हँडलर, असिस्टंट एअर बॉस ही पदेही तिने भूषविली, परंतु अंतराळवीर बनण्याचे तिचे स्वप्न होते. १९९८ मध्ये २३०० फ्लाइट तासाच्या उड्डाणांचा अनुभव गाठीला बांधून ती अंतराळवीर म्हणून ‘नासा’मध्ये पोहोचली.... अवकाश प्रकलपासाठी तिची निवड झाली. ९ डिसेंबर २००६ रोजी स्पेसशटलने तिने उड्डाण केले; डिसेंबर २००६ रोजी अवकाश स्थानकांत ती पाहोचली. सहा महिन्यांवर तेथे ती राहिली, सुखरुप परत आली . सुनीता विल्यम्स हे पुस्तक तसे छोटे आहे. ११ ऐंशी पृष्ठांचा मजवूâर. ३२ पृष्ठे छायाचित्रे पत्रकारितेच्या अंगाने त्याचे लेखन झाले आहे. त्यात सुनीताचे वडील दीपक पंड्या सुनीताचा भाऊ जय (बोनी) पंड्या, पती, सासू, वृत्तपत्रातील बातम्या, इंटरनेट वगैरेंच्या मदतीने बरेच तपशील दिले गेले आहेत. कॅप्टन एस. शेषाद्री आणि अराधिका शर्मा यांनी मूळ इंग्रजी पुस्तक ‘रुपा प्रकाशन’ साठी तयार केले. चित्रा वाळिंबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. सुनीता विल्यम्स ही आजच्या तरुणतरुणींना महत्त्वाकांक्षेचे क्षितिज विस्तारण्याचा संदेश देते. ‘साहसी बना, उत्तम आरोग्य ठेवा. सातत्याने नवीन गोष्टी आत्मसात करा. पुढे जात रहा.’ अंतराळ स्थानकावर राहताना तिला काय जाणवले? ‘पृथ्वी विशाल आहे. सुंदर आहे. तिला सीमा नाहीत. कुंपणं नाहीत. एखाद्या विशिष्ट भूप्रदेशासाठी लोक का भांडतात, लढाया करतात हेच अनाकलनीय वाटते. त्यामुळेच हे पुस्तक प्रेरणादायक आणि प्रबोधनपर वाटेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more