* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASTRONAUT SUNITA WILLIAMS
  • Availability : Available
  • Translators : CHITRA WALIMBE
  • ISBN : 9788177668674
  • Edition : 7
  • Publishing Year : JULY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUNITA WILLIAMS STAYED IN THE SPACE FOR 6 MONTHS; SHE HAD ATTRACTED ATTENTION OF MANY DURING THIS STAY OF 6 MONTHS. SHE HAS A WORLD RECORD OF SPACEWALK OF 29 HOURS AND 17 MINUTES; SHE IS FIRST FEMALE ASTRONAUT TO HAVE SUCH RECORD. THIS IS THE STORY OF AN EXCEPTIONAL WOMAN. POSITIVE THINKING, DEVOTION, DEDICATION, AND COMPETITIVE THINKING ALL THESE TURNED THE SMALL GIRL INTO AN ASTRONAUT WHO ACTUALLY WANTED TO BE A VETERINARY DOCTOR. SHE WAS BROUGHT UP VERY CAREFULLY IN A LOVING FAMILY. HER FAMILY ALWAYS ENCOURAGED HER TO PURSUE HER SUCCESS, THEY WERE VERY PROUD OF HER SUCCESS. SUNITA LEFT NO STONE UNTURNED WHILE ACHIEVING IT. SHE STRUGGLED HARD FOR IT. HER FATHER, DR. DEEPAK PANDYA IS A WELL KNOWN NEUROANATOMIST; HE PRESERVES THE VALUES OF AMERICA AND CULTURE OF INDIA. HER MOTHER URSALENE BONNY PANDYA HAS EUROPEAN CULTURE. SUNITA HAS LOVED THE OCEANS, BEEN TO THE OCEAN FLOORS, FOUGHT A WAR, PURSUED THE CAMPAIGNS FOR HUMANITY, GONE BEYOND THE SKY INTO THE SPACE AND HAS NOW COME BACK TO REST ON THE EARTH. SHE HERSELF IS A LIVING LEGEND.
सुनीता विल्यम्स हिनं अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात, जगभरातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २९ तास १७ मिनिटांचा स्पेसवॉक करून तिनं महिलांच्या अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. एका असामान्य स्त्रीची ही कथा आहे. समर्पण, निष्ठा, स्पर्धात्मक विचारधारा, आणि सकारात्मक दृष्टीकोणामुळं, पशुवैद्य बनण्याची इच्छा असलेल्या मुलीचं रुपांतर झालं एका यशस्वी अंतराळवीरामध्ये! आणि आता ती झाली आहे एक आदर्श! सुनीता एका प्रेमळ कुटुंबात लहानाची मोठी झाली, सुनीताच्या यशाचा अभिमान बाळगणा-या कुटुंबानं तिच्यातला उपजत गुणांना वाव दिला, पाठिंबा दिला आणि सुनीतानं अपरिमित कष्ट करून उत्तमतेकडे वाटचाल केली. अमेरिकन भूमीची मुल्यं जपणा-या, आणि भारतीयत्वाच्या खुणा दाखवणा-या सुनीताचे वडील डॉ. दीपक पंड्या हे एक नावाजलेले न्युरोअ‍ॅनाटामिस्ट, तर आई उर्सालिन बोनी पंड्या या युरोपियन वारसा जपणा-या! सुनीता सागरात रमली आहे, समुद्रतळाशी जाऊन आली आहे, लढाईवर गेली आहे, मानवतावादी मोहिमांसाठी गेली आहे, अवकाशात उसळी मारून पुन्हा पृथ्वीवर विसावली आहे - ती एक चालतीबोलती आख्यायिका आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#29 HOURS 17 MINUTES #SPACEWALK #DR.DEEPAKPANDYA #URSLEEN BONI #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #SUNITA WILLUMS #ANTARALVEER #ASTRONAUTS #CHITRAWALIMBE #CAPT S.SESHADRI # AR#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #ARADHIKA SHARMA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2007

    सुनीताचे पंख मुलींना... अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या कर्तबगारीने भारतीय मुलींना भारावून टाकले आहे. त्यामुळेच त्यांना कॅ. एस. शेषाद्री व आराधिका शर्मा यांनी लिहिलेली सुनीताची अंतराळभरारीची कहाणी वाचायला आवडेल. खरे तर राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंताळवीर. अवकाशात भरारी घेऊन परतला तेव्हापासून भारतीयांना या क्षेत्राची ओढ वाटू लागली. कल्पना चावला हिचा अंतराळयानाबरोबर दुर्दैवी मृत्यू भारतीयांना दु:खी करून गेला. त्या पार्श्वभूमीवर सुनीताचे यश भारतीयांसाठी आनंदउधाण आणणारे ठरले. कल्पना जशी पूर्णत: भारतीयच होती, तशी सुनीता नाही. सुनीता जन्माने अमेरिकनच. पण संस्काराने भारतीय मन घेऊन वावरणारी. म्हणूनच तिने अंतराळात जाताना गणेशमूर्ती, भगवद्गीता सोबत ठेवली होती. बर्गरपेक्षा सामोसा तिला आवडतो. या तिच्या भारतीय मनामुळे तिने भारतीयांमध्ये विशेष भावनिक जवळीक निर्माण केली. तिची कथा आपल्याही मुलींनी वाचावी असे जागरूक माता-पित्यांना नक्की वाटेल. -धरित्री जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 05-08-2007

    तुमच्या घरातल्या सुनीतासाठी… राकेश शर्मा पहिला भारतीय अंतराळवीर, अंतराळातून ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना सांगितल्यावर भारतीयांना अंतराळ स्वप्नं पडायला लागली. ही स्वप्नं पाहणाऱ्या पिढीची प्रतिनिधी ्हणजे कल्पना चावला. तिचा अंतराळ प्रवासातच दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी तिनं स्वप्नं प्रत्यक्षात येऊ शकतात असा विश्वास दिला. या विश्वासाला वास्तवाचं कोंदण दिलं सुनीता विल्यम्सनं. खरंतर सुनीता ही कल्पनासारखी जन्माने भारतीय नाही. पण सुनीताला टिपिकल भारतीय समोसा आवडतो. भगवतगीता आणि गणपतीची मूर्ती घेऊन ती अंतराळात गेली होती या सगळ्या तिच्या गोष्टी भारतीयांना विशेषत: शहरी, मध्यमवर्गीयांना खास जोडून घेणाऱ्या ठरल्या. जागतिकीकरणाचा प्रवाह अनुकूल ठरलेल्या या वर्गाला आताच्या काळात आपल्या मुलीनं लग्न करून निव्वळ सुखाचा संसार करावा असं वाटत नाही. स्वप्न पाहणाऱ्या भरारी घेऊ इच्छिणाऱ्या मुलीच्या पंखांना बळ देण्याची मानसिकता या वर्गात आता यायला लागली आहे. आजच्या तमाम जागरूक पित्यांना आपल्या मुलीनं सुनीता विल्यम्स व्हावं, सानिया मिर्झा व्हावं असं वाटत असतं. आपल्या मुलीही असं काही बनू शकतात हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हायला या उदाहरणामुळेच मदत झाली आहे. कॅप्टन एस, शेषाद्री आणि अराधिक शर्मा यांनी लिहिलेलं आणि चित्रा वाळिंबे यांनी अनुवाद केलेलं मेहता प्रकाशनाचं अंतराळवीर सुनीता विल्यम्स हे पुस्तक आपल्या घरात कर्तबगारीची बाळपावलं टाकणाऱ्या चिमुकलीसाठी वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarNEWS PAPER REVIEW

    प्रकाशक एखाद्या ताज्या घटनेवर किती झटपट पुस्तकं काढतात याचे उदाहरण म्हणजे सुनीता विल्यमचे चरित्र, अवघ्या तीन आठवड्यात ते प्रसिद्ध झाले. अंतराळात १९४ दिवंस १८ तास १५ मिनिटे राहून विक्रम करणारी सुनीता विल्यम्स ही २२ जून २००७ रोजी पहाटे १ वाजून ११ मििटांनी कॅलिफोर्नियातील एडवर्डस एअर बेसवर सुखरुप उतरली; तेव्हा जगभराच्या लक्षावधी चाहत्यांना हायसे वाटले असणार! या आधी पेâब्रुवारी २००३ मध्ये कल्पना चावला अंतराळात राहून पृथ्वीजवळ पोहोचली; पण कोलंबिया अवकाश यान पेटून तिचा इतर सहा अंतराळवीरांसह अंत झाला होता. त्यामुळे सुनीताच्या बाबतीत तसे काही घडू नये अशी सर्वांच्याच मनात धाकधूक होती. तिचे अटलांटिस अवकाश यान फ्लोरिडामध्ये उतरणार होते; तेथे त्यावेळी ८००० पुâटांवर ढगांची दाटी असल्याने उतरविणे शक्य नव्हते; तेव्हा चोवीस तासांनी ते कॅलिफोर्नियात उतरविण्यात आले आणि १३ जुलैला सुनीताचे चरित्र मराठीतही आले. प्रकाशकांच्या तत्परतेची ही एक अभिनंदनीय झलकच होय! या विक्रमी अंतराळकन्येबद्दल भारतीयांना आत्मीयता वाटणे स्वाभाविकच आहे. कारण तिचा जन्म अमेरिकेत झाला असला आणि ती सध्या अमेरिकन नागरिक असली तरी तिचे वडील डॉ.दीपक पंड्या हे भारतीयच आहेत गुजरातमधील अहमदाबादजवळचे मंगरोळ हे त्यांचे गाव. डॉ. दीपक पंड्या यांनी १९५८ मध्ये इंग्लंडला प्रयाण केले. तेथून ते अमेरिकेतील आहायो येथील युक्लीड हॉस्पिटलमध्ये उमेदवारी करुन अमेरिकेतच स्थायिक झाले. डॉ. दीपक पंड्या यांचे बोनी उर्सालिन त्यालोकार या स्लोव्हेनिअन मुलीवर प्रेम बसले. त्यांचा विवाह झाला मिळवून ‘नेव्हल एव्हिएटर’ म्हणून ती काम करु लागली (१९८९). त्याआधी नेव्हल अॅवॅâडमीमध्येच तिच्या बरोबर असणारा वर्गमित्र मायकेल विल्यम्स याच्याशी तिचे लग्न झाले. हेलिकॉप्टर पायलट म्हणून तिने काम सुरू केले. एअरक्राफ्ट हँडलर, असिस्टंट एअर बॉस ही पदेही तिने भूषविली, परंतु अंतराळवीर बनण्याचे तिचे स्वप्न होते. १९९८ मध्ये २३०० फ्लाइट तासाच्या उड्डाणांचा अनुभव गाठीला बांधून ती अंतराळवीर म्हणून ‘नासा’मध्ये पोहोचली.... अवकाश प्रकलपासाठी तिची निवड झाली. ९ डिसेंबर २००६ रोजी स्पेसशटलने तिने उड्डाण केले; डिसेंबर २००६ रोजी अवकाश स्थानकांत ती पाहोचली. सहा महिन्यांवर तेथे ती राहिली, सुखरुप परत आली . सुनीता विल्यम्स हे पुस्तक तसे छोटे आहे. ११ ऐंशी पृष्ठांचा मजवूâर. ३२ पृष्ठे छायाचित्रे पत्रकारितेच्या अंगाने त्याचे लेखन झाले आहे. त्यात सुनीताचे वडील दीपक पंड्या सुनीताचा भाऊ जय (बोनी) पंड्या, पती, सासू, वृत्तपत्रातील बातम्या, इंटरनेट वगैरेंच्या मदतीने बरेच तपशील दिले गेले आहेत. कॅप्टन एस. शेषाद्री आणि अराधिका शर्मा यांनी मूळ इंग्रजी पुस्तक ‘रुपा प्रकाशन’ साठी तयार केले. चित्रा वाळिंबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. सुनीता विल्यम्स ही आजच्या तरुणतरुणींना महत्त्वाकांक्षेचे क्षितिज विस्तारण्याचा संदेश देते. ‘साहसी बना, उत्तम आरोग्य ठेवा. सातत्याने नवीन गोष्टी आत्मसात करा. पुढे जात रहा.’ अंतराळ स्थानकावर राहताना तिला काय जाणवले? ‘पृथ्वी विशाल आहे. सुंदर आहे. तिला सीमा नाहीत. कुंपणं नाहीत. एखाद्या विशिष्ट भूप्रदेशासाठी लोक का भांडतात, लढाया करतात हेच अनाकलनीय वाटते. त्यामुळेच हे पुस्तक प्रेरणादायक आणि प्रबोधनपर वाटेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more