* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASTRONAUT SUNITA WILLIAMS
  • Availability : Available
  • Translators : CHITRA WALIMBE
  • ISBN : 9788177668674
  • Edition : 7
  • Publishing Year : JULY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUNITA WILLIAMS STAYED IN THE SPACE FOR 6 MONTHS; SHE HAD ATTRACTED ATTENTION OF MANY DURING THIS STAY OF 6 MONTHS. SHE HAS A WORLD RECORD OF SPACEWALK OF 29 HOURS AND 17 MINUTES; SHE IS FIRST FEMALE ASTRONAUT TO HAVE SUCH RECORD. THIS IS THE STORY OF AN EXCEPTIONAL WOMAN. POSITIVE THINKING, DEVOTION, DEDICATION, AND COMPETITIVE THINKING ALL THESE TURNED THE SMALL GIRL INTO AN ASTRONAUT WHO ACTUALLY WANTED TO BE A VETERINARY DOCTOR. SHE WAS BROUGHT UP VERY CAREFULLY IN A LOVING FAMILY. HER FAMILY ALWAYS ENCOURAGED HER TO PURSUE HER SUCCESS, THEY WERE VERY PROUD OF HER SUCCESS. SUNITA LEFT NO STONE UNTURNED WHILE ACHIEVING IT. SHE STRUGGLED HARD FOR IT. HER FATHER, DR. DEEPAK PANDYA IS A WELL KNOWN NEUROANATOMIST; HE PRESERVES THE VALUES OF AMERICA AND CULTURE OF INDIA. HER MOTHER URSALENE BONNY PANDYA HAS EUROPEAN CULTURE. SUNITA HAS LOVED THE OCEANS, BEEN TO THE OCEAN FLOORS, FOUGHT A WAR, PURSUED THE CAMPAIGNS FOR HUMANITY, GONE BEYOND THE SKY INTO THE SPACE AND HAS NOW COME BACK TO REST ON THE EARTH. SHE HERSELF IS A LIVING LEGEND.
सुनीता विल्यम्स हिनं अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात, जगभरातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २९ तास १७ मिनिटांचा स्पेसवॉक करून तिनं महिलांच्या अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. एका असामान्य स्त्रीची ही कथा आहे. समर्पण, निष्ठा, स्पर्धात्मक विचारधारा, आणि सकारात्मक दृष्टीकोणामुळं, पशुवैद्य बनण्याची इच्छा असलेल्या मुलीचं रुपांतर झालं एका यशस्वी अंतराळवीरामध्ये! आणि आता ती झाली आहे एक आदर्श! सुनीता एका प्रेमळ कुटुंबात लहानाची मोठी झाली, सुनीताच्या यशाचा अभिमान बाळगणा-या कुटुंबानं तिच्यातला उपजत गुणांना वाव दिला, पाठिंबा दिला आणि सुनीतानं अपरिमित कष्ट करून उत्तमतेकडे वाटचाल केली. अमेरिकन भूमीची मुल्यं जपणा-या, आणि भारतीयत्वाच्या खुणा दाखवणा-या सुनीताचे वडील डॉ. दीपक पंड्या हे एक नावाजलेले न्युरोअ‍ॅनाटामिस्ट, तर आई उर्सालिन बोनी पंड्या या युरोपियन वारसा जपणा-या! सुनीता सागरात रमली आहे, समुद्रतळाशी जाऊन आली आहे, लढाईवर गेली आहे, मानवतावादी मोहिमांसाठी गेली आहे, अवकाशात उसळी मारून पुन्हा पृथ्वीवर विसावली आहे - ती एक चालतीबोलती आख्यायिका आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#29 HOURS 17 MINUTES #SPACEWALK #DR.DEEPAKPANDYA #URSLEEN BONI #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #SUNITA WILLUMS #ANTARALVEER #ASTRONAUTS #CHITRAWALIMBE #CAPT S.SESHADRI # AR#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #ARADHIKA SHARMA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2007

    सुनीताचे पंख मुलींना... अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या कर्तबगारीने भारतीय मुलींना भारावून टाकले आहे. त्यामुळेच त्यांना कॅ. एस. शेषाद्री व आराधिका शर्मा यांनी लिहिलेली सुनीताची अंतराळभरारीची कहाणी वाचायला आवडेल. खरे तर राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंताळवीर. अवकाशात भरारी घेऊन परतला तेव्हापासून भारतीयांना या क्षेत्राची ओढ वाटू लागली. कल्पना चावला हिचा अंतराळयानाबरोबर दुर्दैवी मृत्यू भारतीयांना दु:खी करून गेला. त्या पार्श्वभूमीवर सुनीताचे यश भारतीयांसाठी आनंदउधाण आणणारे ठरले. कल्पना जशी पूर्णत: भारतीयच होती, तशी सुनीता नाही. सुनीता जन्माने अमेरिकनच. पण संस्काराने भारतीय मन घेऊन वावरणारी. म्हणूनच तिने अंतराळात जाताना गणेशमूर्ती, भगवद्गीता सोबत ठेवली होती. बर्गरपेक्षा सामोसा तिला आवडतो. या तिच्या भारतीय मनामुळे तिने भारतीयांमध्ये विशेष भावनिक जवळीक निर्माण केली. तिची कथा आपल्याही मुलींनी वाचावी असे जागरूक माता-पित्यांना नक्की वाटेल. -धरित्री जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 05-08-2007

    तुमच्या घरातल्या सुनीतासाठी… राकेश शर्मा पहिला भारतीय अंतराळवीर, अंतराळातून ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना सांगितल्यावर भारतीयांना अंतराळ स्वप्नं पडायला लागली. ही स्वप्नं पाहणाऱ्या पिढीची प्रतिनिधी ्हणजे कल्पना चावला. तिचा अंतराळ प्रवासातच दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी तिनं स्वप्नं प्रत्यक्षात येऊ शकतात असा विश्वास दिला. या विश्वासाला वास्तवाचं कोंदण दिलं सुनीता विल्यम्सनं. खरंतर सुनीता ही कल्पनासारखी जन्माने भारतीय नाही. पण सुनीताला टिपिकल भारतीय समोसा आवडतो. भगवतगीता आणि गणपतीची मूर्ती घेऊन ती अंतराळात गेली होती या सगळ्या तिच्या गोष्टी भारतीयांना विशेषत: शहरी, मध्यमवर्गीयांना खास जोडून घेणाऱ्या ठरल्या. जागतिकीकरणाचा प्रवाह अनुकूल ठरलेल्या या वर्गाला आताच्या काळात आपल्या मुलीनं लग्न करून निव्वळ सुखाचा संसार करावा असं वाटत नाही. स्वप्न पाहणाऱ्या भरारी घेऊ इच्छिणाऱ्या मुलीच्या पंखांना बळ देण्याची मानसिकता या वर्गात आता यायला लागली आहे. आजच्या तमाम जागरूक पित्यांना आपल्या मुलीनं सुनीता विल्यम्स व्हावं, सानिया मिर्झा व्हावं असं वाटत असतं. आपल्या मुलीही असं काही बनू शकतात हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हायला या उदाहरणामुळेच मदत झाली आहे. कॅप्टन एस, शेषाद्री आणि अराधिक शर्मा यांनी लिहिलेलं आणि चित्रा वाळिंबे यांनी अनुवाद केलेलं मेहता प्रकाशनाचं अंतराळवीर सुनीता विल्यम्स हे पुस्तक आपल्या घरात कर्तबगारीची बाळपावलं टाकणाऱ्या चिमुकलीसाठी वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarNEWS PAPER REVIEW

    प्रकाशक एखाद्या ताज्या घटनेवर किती झटपट पुस्तकं काढतात याचे उदाहरण म्हणजे सुनीता विल्यमचे चरित्र, अवघ्या तीन आठवड्यात ते प्रसिद्ध झाले. अंतराळात १९४ दिवंस १८ तास १५ मिनिटे राहून विक्रम करणारी सुनीता विल्यम्स ही २२ जून २००७ रोजी पहाटे १ वाजून ११ मििटांनी कॅलिफोर्नियातील एडवर्डस एअर बेसवर सुखरुप उतरली; तेव्हा जगभराच्या लक्षावधी चाहत्यांना हायसे वाटले असणार! या आधी पेâब्रुवारी २००३ मध्ये कल्पना चावला अंतराळात राहून पृथ्वीजवळ पोहोचली; पण कोलंबिया अवकाश यान पेटून तिचा इतर सहा अंतराळवीरांसह अंत झाला होता. त्यामुळे सुनीताच्या बाबतीत तसे काही घडू नये अशी सर्वांच्याच मनात धाकधूक होती. तिचे अटलांटिस अवकाश यान फ्लोरिडामध्ये उतरणार होते; तेथे त्यावेळी ८००० पुâटांवर ढगांची दाटी असल्याने उतरविणे शक्य नव्हते; तेव्हा चोवीस तासांनी ते कॅलिफोर्नियात उतरविण्यात आले आणि १३ जुलैला सुनीताचे चरित्र मराठीतही आले. प्रकाशकांच्या तत्परतेची ही एक अभिनंदनीय झलकच होय! या विक्रमी अंतराळकन्येबद्दल भारतीयांना आत्मीयता वाटणे स्वाभाविकच आहे. कारण तिचा जन्म अमेरिकेत झाला असला आणि ती सध्या अमेरिकन नागरिक असली तरी तिचे वडील डॉ.दीपक पंड्या हे भारतीयच आहेत गुजरातमधील अहमदाबादजवळचे मंगरोळ हे त्यांचे गाव. डॉ. दीपक पंड्या यांनी १९५८ मध्ये इंग्लंडला प्रयाण केले. तेथून ते अमेरिकेतील आहायो येथील युक्लीड हॉस्पिटलमध्ये उमेदवारी करुन अमेरिकेतच स्थायिक झाले. डॉ. दीपक पंड्या यांचे बोनी उर्सालिन त्यालोकार या स्लोव्हेनिअन मुलीवर प्रेम बसले. त्यांचा विवाह झाला मिळवून ‘नेव्हल एव्हिएटर’ म्हणून ती काम करु लागली (१९८९). त्याआधी नेव्हल अॅवॅâडमीमध्येच तिच्या बरोबर असणारा वर्गमित्र मायकेल विल्यम्स याच्याशी तिचे लग्न झाले. हेलिकॉप्टर पायलट म्हणून तिने काम सुरू केले. एअरक्राफ्ट हँडलर, असिस्टंट एअर बॉस ही पदेही तिने भूषविली, परंतु अंतराळवीर बनण्याचे तिचे स्वप्न होते. १९९८ मध्ये २३०० फ्लाइट तासाच्या उड्डाणांचा अनुभव गाठीला बांधून ती अंतराळवीर म्हणून ‘नासा’मध्ये पोहोचली.... अवकाश प्रकलपासाठी तिची निवड झाली. ९ डिसेंबर २००६ रोजी स्पेसशटलने तिने उड्डाण केले; डिसेंबर २००६ रोजी अवकाश स्थानकांत ती पाहोचली. सहा महिन्यांवर तेथे ती राहिली, सुखरुप परत आली . सुनीता विल्यम्स हे पुस्तक तसे छोटे आहे. ११ ऐंशी पृष्ठांचा मजवूâर. ३२ पृष्ठे छायाचित्रे पत्रकारितेच्या अंगाने त्याचे लेखन झाले आहे. त्यात सुनीताचे वडील दीपक पंड्या सुनीताचा भाऊ जय (बोनी) पंड्या, पती, सासू, वृत्तपत्रातील बातम्या, इंटरनेट वगैरेंच्या मदतीने बरेच तपशील दिले गेले आहेत. कॅप्टन एस. शेषाद्री आणि अराधिका शर्मा यांनी मूळ इंग्रजी पुस्तक ‘रुपा प्रकाशन’ साठी तयार केले. चित्रा वाळिंबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. सुनीता विल्यम्स ही आजच्या तरुणतरुणींना महत्त्वाकांक्षेचे क्षितिज विस्तारण्याचा संदेश देते. ‘साहसी बना, उत्तम आरोग्य ठेवा. सातत्याने नवीन गोष्टी आत्मसात करा. पुढे जात रहा.’ अंतराळ स्थानकावर राहताना तिला काय जाणवले? ‘पृथ्वी विशाल आहे. सुंदर आहे. तिला सीमा नाहीत. कुंपणं नाहीत. एखाद्या विशिष्ट भूप्रदेशासाठी लोक का भांडतात, लढाया करतात हेच अनाकलनीय वाटते. त्यामुळेच हे पुस्तक प्रेरणादायक आणि प्रबोधनपर वाटेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more