* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989106
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :KALYANIRAMAN BENNURWAR BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BIOGRAPHY OF GREAT LEADER NETAJI PALKAR
हिंदवी स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मांतरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे; महाराजांनी त्यांना कौल देणे व शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून आलेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या व अंगलट आलेल्या राजकारणाचा अनिवार्य परिपाक होता असा श्रीकल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतींचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत; त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख व सूचक सूत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट व महत्त्वाच्या घटना किंवा प्रदीर्घ कालखंड केवळ एक-दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर व तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शिवरायांची स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्यभिचारी निष्ठा, साध्य व साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्याबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतक्र्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यास सहज सिद्ध होतात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AGNIDIVYA #AGNIDIVYA #अग्निदिव्य(नेताजी पालकर) #BIOGRAPHY #MARATHI #KALYANIRAMANBENNURWAR "
Customer Reviews
  • Rating StarBhawari Chandrakant

    स्वराज्याचे सरनोबत छञपती शिवरायांचा डावा हात तसेच प्रतीशिवाजी म्हणून ओळखले जाणारे सरनोबत नेताजी पालकर स्वराज्यातून तडकाफडकी निघून प्रथम आदिलशाही नंतर मुघलांना जाऊन मिळतात. परंतू छञपतींच्या एवढ्या जवळचा माणूस त्यांच्याशी व स्वराज्याशी गद्दारी करेलच कस आणि त्यांना परत स्वराज्यात आणण्यासाठी महाराज एवढी धडपड कशाला करतील.महाराजांनी खेळलेला हा एक गनिमी कावा तर नसेल?या सर्व प्रश्नांची उत्तरे कल्याणीरमण बैन्नुरवार यांच्या अग्निदिव्य या कादंबरीतून मिळतात. ...Read more

  • Rating Starहेंबाडे चंद्रभान

    पुस्तक खूप छान आहे.त्यामध्ये महारांजाची दुरद्रुष्टी आणि नेताजींचा कणखर पणा आणि सहनशीलता खूप छान वर्णन केलेली आहे.

  • Rating StarDAINIK AIKYA 03-01-2016

    हिंदवी स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मातरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे, महाराजांनी त्याला कौल देणे आणि शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून लेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या आणि अंगलट आलेल्या राजकारणाचा अनविार्य परिपाक होता, असा कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतीचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत. त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख आणि सूचक सुत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट आणि महत्त्वाच्या घटना किंवा प्रदिर्घ कालखंड केवळ एक दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर आणि तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शिवरायांनी स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्याभिचारी निष्ठा, साध्य आणि साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्यांबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतर्क्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यात सहज सिद्ध होतात. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 07-02-2016

    छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान! हे दैवत आपल्या आदराचे आणि श्रद्धेचे आहे. तसेच त्यांनी ज्यांना आपले म्हटले त्यांचा योग्य तो त्याग महाराजांनी यथोचित सत्कार करून, मानाच्या पदव्या देऊन श्रेष्ठत्व बहाल केले. स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर हे क श्रेष्ठव्यक्तीमत्व! अफझल खान वधासाठी निघताना महाराजांनी त्यांच्यावर स्वराज्य निरविले होते. वैऱ्यांच्या गोटात प्रतिशिवाजी म्हणून पालकरांचा जबरदस्त दरारा होता. अफाट पराक्रमी शिवसैनिक उच्च पदावर असताना मानमरातबासाठी मुसलमान झालच कसा? या सत्याचा शोध घेता घेता कल्याणीरमण बेन्नुरवार यांनी जे लेखन केले तेच हे ‘अग्निदिव्य.’ शिवराय हे रत्नपारखी होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांचे सहकारी बुद्धीमान, पराक्रमी होते. सरदार येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर असे विश्वासू मर्द मावळे त्यांच्या सेवेत होते. आबाजी सोनदेव कल्याणचा सुभेदार होता. त्याचा भाऊ निळोजी हा मुजुमदार झाला. माणकोजी दहातोंडे हा सरनोबत होता. तो वारला म्हणून नेताजी पालकर यांना ती जागा महाराजांनी दिली. पालकरांनी फौज वाढविली. राघोबल्लाळ कोरडे याजकडे फौजेची सबनिशी होती. छत्रपवती शिवरायांना भेटले. स्वराज्य सेवेत पुन्ह हिंदू होऊन रुजू झाले ते कसे? याचे उत्तर या कादंबरीतून मिळते. उत्तम संवाद, सुरस समरप्रसंग, ओघवती भाषा आणि उत्कृष्ट वर्णने हे सारेच शिवप्रेमींना आवडेल, इतके स्फूर्तिदायक आहे. सतीश भावसारांचे झकास मुखपृष्ठ या कादंबरीला लाभले आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more