* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AGNIDIVYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989106
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
N\A
हिंदवी स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मांतरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे; महाराजांनी त्यांना कौल देणे व शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून आलेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या व अंगलट आलेल्या राजकारणाचा अनिवार्य परिपाक होता असा श्रीकल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतींचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत; त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख व सूचक सूत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट व महत्त्वाच्या घटना किंवा प्रदीर्घ कालखंड केवळ एक-दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर व तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शिवरायांची स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्यभिचारी निष्ठा, साध्य व साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्याबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतक्र्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यास सहज सिद्ध होतात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AGNIDIVYA #AGNIDIVYA #अग्निदिव्य(नेताजी पालकर) #BIOGRAPHY #MARATHI #KALYANIRAMANBENNURWAR "
Customer Reviews
  • Rating StarBhawari Chandrakant

    स्वराज्याचे सरनोबत छञपती शिवरायांचा डावा हात तसेच प्रतीशिवाजी म्हणून ओळखले जाणारे सरनोबत नेताजी पालकर स्वराज्यातून तडकाफडकी निघून प्रथम आदिलशाही नंतर मुघलांना जाऊन मिळतात. परंतू छञपतींच्या एवढ्या जवळचा माणूस त्यांच्याशी व स्वराज्याशी गद्दारी करेलच कस आणि त्यांना परत स्वराज्यात आणण्यासाठी महाराज एवढी धडपड कशाला करतील.महाराजांनी खेळलेला हा एक गनिमी कावा तर नसेल?या सर्व प्रश्नांची उत्तरे कल्याणीरमण बैन्नुरवार यांच्या अग्निदिव्य या कादंबरीतून मिळतात. ...Read more

  • Rating Starहेंबाडे चंद्रभान

    पुस्तक खूप छान आहे.त्यामध्ये महारांजाची दुरद्रुष्टी आणि नेताजींचा कणखर पणा आणि सहनशीलता खूप छान वर्णन केलेली आहे.

  • Rating StarDAINIK AIKYA 03-01-2016

    हिंदवी स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मातरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे, महाराजांनी त्याला कौल देणे आणि शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून लेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या आणि अंगलट आलेल्या राजकारणाचा अनविार्य परिपाक होता, असा कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतीचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत. त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख आणि सूचक सुत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट आणि महत्त्वाच्या घटना किंवा प्रदिर्घ कालखंड केवळ एक दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर आणि तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शिवरायांनी स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्याभिचारी निष्ठा, साध्य आणि साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्यांबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतर्क्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यात सहज सिद्ध होतात. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 07-02-2016

    छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान! हे दैवत आपल्या आदराचे आणि श्रद्धेचे आहे. तसेच त्यांनी ज्यांना आपले म्हटले त्यांचा योग्य तो त्याग महाराजांनी यथोचित सत्कार करून, मानाच्या पदव्या देऊन श्रेष्ठत्व बहाल केले. स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर हे क श्रेष्ठव्यक्तीमत्व! अफझल खान वधासाठी निघताना महाराजांनी त्यांच्यावर स्वराज्य निरविले होते. वैऱ्यांच्या गोटात प्रतिशिवाजी म्हणून पालकरांचा जबरदस्त दरारा होता. अफाट पराक्रमी शिवसैनिक उच्च पदावर असताना मानमरातबासाठी मुसलमान झालच कसा? या सत्याचा शोध घेता घेता कल्याणीरमण बेन्नुरवार यांनी जे लेखन केले तेच हे ‘अग्निदिव्य.’ शिवराय हे रत्नपारखी होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांचे सहकारी बुद्धीमान, पराक्रमी होते. सरदार येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर असे विश्वासू मर्द मावळे त्यांच्या सेवेत होते. आबाजी सोनदेव कल्याणचा सुभेदार होता. त्याचा भाऊ निळोजी हा मुजुमदार झाला. माणकोजी दहातोंडे हा सरनोबत होता. तो वारला म्हणून नेताजी पालकर यांना ती जागा महाराजांनी दिली. पालकरांनी फौज वाढविली. राघोबल्लाळ कोरडे याजकडे फौजेची सबनिशी होती. छत्रपवती शिवरायांना भेटले. स्वराज्य सेवेत पुन्ह हिंदू होऊन रुजू झाले ते कसे? याचे उत्तर या कादंबरीतून मिळते. उत्तम संवाद, सुरस समरप्रसंग, ओघवती भाषा आणि उत्कृष्ट वर्णने हे सारेच शिवप्रेमींना आवडेल, इतके स्फूर्तिदायक आहे. सतीश भावसारांचे झकास मुखपृष्ठ या कादंबरीला लाभले आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more