* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789391151218
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2021
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 532
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : HISTORICAL, POLITICAL & MILITARY
  • Available in Combos :DR.JAYSINGRAO PAWAR & VASUDHA PAWAR COMBO SET- 26 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. JAISINGRAO PAWAR HAS WRITTEN AND EDITED THE BOOK SAMAJKRANTIKARAK RAJARSHI SHAHU CHHATRAPATI". THIS BOOK GIVES A COMPLETE ACCOUNT OF THE LIFE AND WORK OF SHAHU MAHARAJ. LIKE ALL THE OTHER BIOGRAPHIES ABOUT SHAHU RAJE, THIS BOOK DOES NOT ONLY DESCRIBE HIS CAREER BUT ALSO ANALYZE THE WORK FROM THE HISTORICAL POINT OF VIEW, THAT TOO IN A CONSTRUCTIVE WAY. THE BOOK CONTAINS MANY SUCH SMALL AND BIG INCIDENCES FROM THE LIFE OF SHAHU MAHARAJ. THIS LIFE STORY OF THE MAHANAYAK CERTAINLY GIVES A BOOST TO THE NEW GENERATION TO CONTINUOUSLY TRY TO CAPTURE NEW HORIZONS. HE WAS A UNIQUE LEADER OF HIS OWN PEOPLE AND WISHED EVERYONE TO EXCEL IN THEIR RESPECTIVE LIVES.
ज्या वेळी काँग्रेसच्या व्यासपीठावर अस्पृश्यता निवारणाचा केवळ ठराव पास होणेही मुश्कील होत होते, त्या वेळी राजर्षी शाहू महाराज हा कोल्हापूरचा द्रष्टा (दूरदर्शी) राजा आपल्या राज्यात अस्पृश्यतेचा नायनाट करणारे कायदे अमलात आणत होता. एवढेच नव्हे, तर महार, मांग, चांभार आदी अस्पृश्य समाजात मिसळून त्यांच्या हातचे अन्नोदक जाहीरपणे घेत होता; त्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या पंगतीत बसवून त्यांचा सन्मान करत होता! चर्मकार समाजातील एका सुविद्य व्यक्तीला कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या चेअरमनपदावर बसवून देशासमोर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचा आदर्श ठेवत होता! राजर्षी शाहू महाराजांचे जीवनध्येय, त्यांचे विचार व प्रत्यक्ष आचरण यामध्ये किती विलक्षण साम्य होते याची केवळ या एका उदाहरणावरून कल्पना येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#समाजक्रांतिकारकराजर्षीशाहूछत्रपती #डॉजयसिंगरावपवार #व्यक्तिचरित्र #मेहतापब्लिशिंगहाऊस #आगड #सोजीर #संगर #प्रगमनशील #खडखडा #उत्क्रमण #वेठवरळा #रयतावा #फेसाटी #रिसाला #आर्य समाज #सत्यशोधक समाज #चरित्र # मराठीसाहित्य #छत्रपतीसंभाजीस्मारकग्रंथ #राजर्षीशाहू #कर्मवीरभाऊरावपाटीलआणिप्रबोधनकारठाकरे #आमच्याइतिहासाचाशोधआणिबोध #शिवचरित्रापासूनआम्हीकायशिकावे? #राजर्षीशाहूछत्रपतींचीभाषणे #राजर्षीशाहूछत्रपती:एक मागोवा #राजर्षीशाहूछत्रपती:पत्रव्यवहारआणिकायदे #राजर्षीशाहूछत्रपतींचेजाहीरनामेवहुकूमनामे #शिवछत्रपती:एकमागोवा #मराठेशाहीचेअंतरंग #छत्रपतीसंभाजी:एकचिकित्सा #मराठ्यांचेस्वातंत्र्ययुद्ध #छत्रपतीसंभाजी:एकचिकित्सा #मराठ्यांचेस्वातंत्र्ययुद्ध #SAMAJKRANTIKARAKRAJARSHISHAHUCHHATRAPATI #DR.JAYSINGRAOPAWAR #VYAKTICHRITRA #AAGAD #SOJIR #SANGR #PRAGMANSHIL #KHADKHADA #UTKRAMN #VETHVARLA #RAYTAVA#FESATI #RISALA #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more