JOHN GRAY

About Author

Birth Date : 28/12/1951


JOHN GRAY WAS BORN IN 1951 IN HOUSTON, TEXAS. IN 1982, HE RECEIVED HIS DOCTORATE IN PSYCHOLOGY AND HUMAN SEXUALITY FROM COLUMBIA PACIFIC UNIVERSITY. HE WORKED AS A CERTIFIED FAMILY THERAPIST FOR ALMOST FIFTEEN YEARS. HE HAS BEEN CONDUCTING WORKSHOPS ON PERSONALITY DEVELOPMENT FOR OVER THIRTY YEARS.

जॉन ग्रे यांचा जन्म १९५१ साली टेक्सासमधील ह्यूस्टन या गावी झाला. १९८२ साली त्यांनी कोलंबिया पॅसिफिक युनिव्हर्सिटीतून मानसशास्त्र आणि मानवी लैंगिकता या विषयातील डॉक्टरेट मिळवली. एक प्रमाणित कौटुंबिक उपचारक म्हणून ते जवळजवळ पंधरा वर्षे काम करत होते. तीस वर्षांहून अधिक काळ ते व्यक्तिमत्त्व विकसनावर कार्यशाळा घेत आहेत. ते फँमिली जर्नल चे संपादकीय सल्लागार आहेत. संभाषण कौशल्य आणि नातेसंबंध या विषयातील ते आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या कार्यशाळा, पुस्तके, सीडीज आणि डीव्हीडीज यांतून ते लोकांचे मनोरंजन तर करतातच; पण आपले संभाषण कौशल्य आणि नातेसंबंध वृद्धिंगत करण्यास प्रेरितही करतात. जॉन ग्रे हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय वक्ते आहेत. टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत. अनेक नियतकालिकांमध्ये त्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. इंग्लंड, कॅनडा, मेक्सिको, कोरिया यांसारख्या अनेक देशांतील वर्तमानपत्रांत त्यांचे स्तंभलेख छापून येत असतात. त्यांनी आत्तापर्यंत सोळा पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यातील मार्स-व्हीनस मालिकेतील पुस्तकांच्या, जगभरातील पंचेचाळीस भाषांमध्ये मिळून चाळीस दशलक्ष प्रती वाचकांपर्यंत पोचल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
CHILDREN ARE FROM HEAVEN Rating Star
Add To Cart INR 595
27 %
OFF
JOHN GRAY COMBO OFFER - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1740 INR 1276
S SUKHACHA Rating Star
Add To Cart INR 295
TO ANI TEE Rating Star
Add To Cart INR 550
TULA ATHAVTANA Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more