* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ORIGINALLY A PHILOSOPHER, BUT HE TURNED TOWARDS NOVEL WRITING TO REVEAL THE MEANING OF LIFE THAT HE UNDERSTOOD. THIS IS ONE OF HIS BEST SELLERS. IT REFLECTS THE CONFLICT BETWEEN ORTHODOX AND TRADITIONAL RITUALS AND THE CHANGING LIFE STYLES AND VALUES OF THIS GENERATION.HE HAS SUPERBLY JOTTED DOWN THE FEELINGS AND UPROAR ON A FAMILY LEVEL. THE ORIGINAL WORK IN KANNADA HAS BEEN BESTOWED UPON BY THE KARNATAKA SAHITYA ACADEMY AWARD WHILE THE KANNADA MOVIE BASED ON THIS HAS WON THE NATIONAL AWARD. AFTER THE SAHITYA ACADEMY DECIDED TO CONFER AWARDS TO TRANSLATED BOOKS, THIS WAS THE FIRST BOOK TO GET THE AWARD IN MARATHI.
तत्त्वज्ञानाचा मार्ग सोडून कादंबरी लेखनातून जीवनाचा अर्थ जाणू पाहणाया लेखकाची डॉ. एस.एल. भैरप्पा यांची अत्यंत लोकप्रिय आशयसंपन्न कादंबरी ‘वंशवृक्ष’. सनातन धर्मपरंपरा आणि मन्वंतरकाळातील बदलती जीवनमूल्ये यांतील संघर्षाचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ प्रभावीपणे चित्रित करणारी कलाकृती. मूळ कन्नड कादंबरीला कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे तर या कादंबरीवरील कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार लाभला आहे. साहित्यअकादमीने अनुवादासाठी पुरस्कार देण्याची योजना आखल्यावर मराठीत सर्वप्रथम हा मान या अनुवादाला मिळाला आहे. त्याचबरोबर मिळणारा ‘महाराष्ट्र गौरव’ ही या अनुवादाने मिळवला आहे. बीजक्षेत्र न्याय आणि वंशवृक्षाची संकल्पना यांचा उहापोह करणारी कलात्मक कादंबरी.
* साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार १९८९ * राज्य पुरस्कार १९९०

No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarRakesh Sawale

    "वंशवृक्ष" धार्मिक पातळीवरील नात्यांची गुंतागुंत...!! एस्. एल. भैरप्पा यांची वाचलेली तिसरी कादंबरी. (पर्व आणि आवरण नंतरची) सुरवात काहीशी संथ वाटू शकते.. पात्र परीचयाची ती गरज आहे हे नंतर कळतं... पण जेव्हा आपण सगळ्यांना ओळखायला लागतो तेंव्ह हीच गोष्ट इतकी जबरदस्त पकड घेते की आपण त्या त्या व्यक्ती प्रमाणे विचार करायाला लागतो... गोष्ट तशी साधी आहे... श्रीनीवास श्रोत्री.. नेहमी धर्माप्रमाणे वागणारे कथेच्या केंद्रस्थानी आहेत. गृहस्थाश्रमाचा मुळ उद्देश हा फक्त "वंशवृद्धी" च आहे, असं मानणारे. त्यांच्या कुटुंबात होणाऱ्या... चढ उतारात आपण पण नकळत ओढले जातो. आणि शेवट नेहमी सारखा अर्धवट सोडल्यासारखा... मन सुन्न करणारा... जर भैरप्पांच्या लेखणीचे चाहते असाल तर जरूर वाचा...!! ...Read more

  • Rating StarPRANAV PATIL

    एस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात. कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे. कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं. ...Read more

  • Rating StarNiranjan N. Kulkarni

    एखाद्या पुस्तकाविषयी मनन करण्याची माझी पहिली वेळ नाही, मात्र लिहू वाटण्याची पहिलीच वेळ आहे. S L भैरप्पांची आवरण आणि तडा ही 2 पुस्तके वाचून झाली होती गेल्या काही दिवसात आणि आता चाहूल होती बहुप्रतिक्षित वंशवृक्ष ह्या पुस्तकाची. काही पुस्तके अशी असतात क त्याविषयी चर्चा करण्यापेक्षा मनातल्या मनात त्याविषयी चिंतन करावे आणि त्याचा आस्वाद घ्यावा. अत्तराची कुपी एखाद्या पेटित ठेवल्यानंतर ती संपून गेल्यावरदेखील त्याचा सुवास त्या पेटीत दरवळत राहावा तशी वंशवृक्ष मनात घर करून राहिली. भैरप्पा यांची पात्र उभी करायची पद्धत इतकी चपखल आहे की तशी हातोटी फार कमी जणांना लाभते. श्रीनिवास श्रोत्री हे धीरोदात्त असं पात्र ह्या कादंबरीभार वावरलंय, सनातन धर्म पद्धती विरुद्ध चिरचेतन चिरनुतन बुद्धिवाद यांच्यातलं द्वंद्व ह्या पुस्तकात रेखाटलं आहे. शेवटी जिंकलं कोण हे दाखवण्याची चूक भैरप्पांनी केली नाही. मंदिरात जाऊन काय मागायचं हा प्रश्न जसा याचकाचा असतो तसं भैरप्पांनी इथे तो वाचकांवर सोडला आहे. ज्याला जे घ्यायचं आहे ते घ्या. उमा कुलकर्णी यांनी ह्या मूळ कन्नड पुस्तकाचा अनुवाद मराठीत केलाय. खरंच हा अनुवाद वाटत नाही हे नक्की. मी पुस्तक परीक्षण करण्यासाठी ही पोस्ट लिहीत नाही, माझी ती योग्यता नाही. चंदनाच्या झाडाला जर बाभळी चिकटली तर त्या बाभळीलादेखील चंदनाचा वास येतो असं म्हणतात, तशीच काहीशी माझी गत झालीये. म्हणजे इतकं उत्तुंग साहित्य वाचल्यावर माझी ही पोस्ट म्हणजे ती बाभळीच.. कुठल्याही मोहाच्या अथवा कठीण प्रसंगात श्रोत्रीन्नी आपला संयम ढळू दिला नाही, तिरस्कारासारखी नकारात्मक भावना मनात ठेवली नाही, जे होईल ते ब्रम्हउपदेश ह्याप्रमाणे ते पुढे सरकत राहिले. शेवटी ज्या मुळावर वंशवृक्ष उभा होता त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. पण अशाही परिस्थितीमध्ये श्रोत्री मनाचा संयम ढळू ना देता सर्व मालमत्ता दान करून संन्यस्त होतात. खूप कमी घटना आपल्या जीवनाचा मार्गक्रम ठरवतात, हे पुस्तक त्या दुर्मिळ गोष्टीत येतं. ...Read more

  • Rating StarSnehal Sherkar

    डॉ. भैरप्पा यांची अतिशय सुंदर आणि वाचनीय कादंबरी आहे.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more