* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669473
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE WERE MORE THAN SIX HUNDRED AND FIFTY PRINCELY STATES IN INDIA AT THE TIME OF INDEPENDENCE. THESE WERE NOT UNDER THE DIRECT RULE OF BRITISH. THEY WERE ALL INDEPENDENT RULERS. A FEW OF THEM HAD EVEN STARTED THEIR OWN RAILWAYS. BARODA WAS ONE SUCH STATE. THE FIRST RAILWAY TRACK IN INDIA WAS BUILT IN 1853 FROM BORIBANDAR (NOW NAMED AS CHHATRAPATI SHIVAJI TERMINUS OR CST) TO THANE BY A BRITISH COMPANY UNDER THE BRITISH SUPERVISION. THIS IN TURN HELPED IN FAST PROGRESS OF OUR NATION. RAILWAY HELPED IN BUSINESS AS TRANSPORTATION BECAME EASIER. SEEING THE GOOD RESULTS OF RAILWAY, THE STATESMEN WERE NATURALLY INCLINED TO BUILD THEIR OWN RAIL TRACKS. THE FIRST RAIL TRACK WAS THUS BUILT BY THE STATE OF BARODA IN 1862. BUT OWING TO SOME TECHNICAL DIFFICULTIES A TRAM PULLED BY BULLOCK CART WAS ALL THAT COULD RUN INSTEAD OF THE STEAM ENGINE DRIVEN RAILWAY. FINALLY, AFTER
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात सुमारे साडेसहाशे संस्थानं होती. ही संस्थानं ब्रिटिश अमलाखाली नव्हती. त्यांची स्वत:ची स्वतंत्र राज्यव्यवस्था होती. त्यांच्यापैकी काहींनी स्वत:ची रेल्वेही सुरू केली होती. बडोदा हे अशा संस्थानांपैकी पहिलं. भारतातला पहिला रूळमार्ग (रेल्वे) ब्रिटिश अमलाखालच्या भागात बोरीबंदर (आताचं सी.एस.टी. – छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते ठाणे असा १८५३ साली बांधला गेला आणि देशात वेगाचं युग सुरू झालं. हे काम एका ब्रिटिश वंÂपनीनं केलं होतं. रेल्वेमुळे व्यापार जोमानं वाढू लागला आणि दळणवळण सुलभ झालं. त्या अनुभवावरून संस्थानिकांनाही आपल्या राज्यात रेल्वेसेवा सुरू करण्याची इच्छा झाली नसती तरच नवल. सर्वांत पहिला संस्थानी रूळमार्ग सुरू करण्याचा मान बडोदा संस्थानाकडे जातो. ते काम १८६२ साली सुरू झालं, पण तांत्रिक त्रुटींमुळे वापेÂच्या इंजिनानं ओढल्या जाणाNया आगगाडीऐवजी बैलांनी ओढली जाणारी ट्रॅम सुरू झाली. अखेर १८७३ साली डभोई ते करजण-मियागाम हा साधारण २० मैलांचा (३१-३२ कि.मी.) रूळमार्ग सुरू झाला. तेव्हा बडोद्यावर मल्हारराव गायकवाड राज्य करत होते. हा मार्ग सुरू होण्याच्या काळात बडोद्यात बरीच राजकीय उलथापालथ होत होती आणि त्यामुळे समाजजीवन ढवळून निघत होतं. बडोद्यातील ब्रिटिश रेसिडेंट आणि मल्हारराव यांच्या संघर्षाचा तो काळ होता. ब्रिटिशांच्या वाढत्या प्रभावाचा काळ होता. अखेरीस ब्रिटिशांनी मल्हाररावांना पदच्युत केलं आणि सयाजीराव गायकवाड राज्यावर आले. १८७५ पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. या काळातल्या बडोद्यातील धामधुमीचं आणि बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचं चित्रण करणारी शुभदा गोगटे यांची ही कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SANDHA BADALTANA #SHUBHADA GOGATE #NARAYAN #LAXMI #DURGA #VISHWNATH #KAVERI #RAMABAI #KHANDERAO #BARODA #MUMBAI #ENGINE #STATION #1853 #MALLHARRAO GAIKWAD
Customer Reviews
  • Rating StarLOKSATTA 12-04-2009

    `संस्थानी कारभाराचा सांधा बदलताना`… आपल्या देशामध्ये पूर्वापार राजेरजवाड्यांची सत्ता चालत आली आहे. या राजेरजवाड्यांच्या मनमानी आणि एककल्ली कारभारामुळे परकियांना आपली वसाहत येथे स्थापन करण्यास वेळ लागला नाही. समाजातील जाती-पोटजातीचे फुकाचे मोठेपण आणिसत्ताधीशांचे एककल्ली राजकारण यातूनच ब्रिटिशांना आपल्या देशात पाय रोवण्याची संधी मिळाली, पण समाजापासून आणि जनतेपासून फटकून राहणाऱ्या संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये एक होते बडोद्याचे संस्थानिक! त्याकाळी म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या खंडप्राय देशातील प्रगत संस्थानांपैकी एक होते बडोदा संस्थान आणि त्याचे संस्थानिक गायकवाड घराणे. सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि अनेक सामाजिक बदलांची नांदी घडवून आणली, पण सयाजीराव गायकवाडांनी ही नांदी घडवली ती त्या संस्थानाच्या सुधारणावादी संस्कृतीचा कळस होता असे मानायला हरकत नाही. बडोदे संस्थानला लाभलेले गायकवाड घराणे हे अन्य संस्थानिकांपेक्षा वेगळे होते. घराण्यात अंतर्गत वाद, कलह होते पण समाज जागतिक स्तरावर किती पुढारलेला आहे, याची नोंद वेळोवेळी घेत, नव्या बदलांचे स्वागत या घराण्याने केले आहे. इतकेच नाही तर प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या साधनांचा उपयोग आपल्या राज्यात कसा करता येईल, याबाबतही विचार होत असे. ब्रिटीशांनी १८५३ मध्ये भायखळा म्हणजे मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सुरू केली. ती प्रामुख्याने दळणवळण अधिक गतीने व सुलभ व्हावे यासाठी! पण यामुळेच या शहराच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला गती मिळाली. ब्रिटीशांचा अंमल सर्व संस्थानांवर नव्हता. ब्रिटीशांनी रेल्वे सुरू केली आणि त्यातून साधली जाणारी प्रगती पाहून बडोदा संस्थाननेही स्वत:च्या संस्थानात रेल्वे सुरू केली. अर्थात तांत्रिक कारणामुळे ही रेल्वे सुरू न होता ट्राम सुरू झाली. सयाजीराव गायकवाड दत्तक म्हणून या संस्थानाच्या राजेपदी बसण्यापूर्वीचा काळ हा संस्थांनी राजकारणाच्या धामधुमीचा काळ होता. खंडेराव गायकवाड आणि मल्हारराव गायकवाड या भावंडांमध्ये धुसफूस सुरू होती. खंडेराव पोटाच्या विकाराने आजारी होते तर मल्हाररावांना तुरूंगात ठेवण्यात आले होते. या दन भावंडांच्या वादात दरबारी अधिकारी आणि काही प्रतिष्ठित जनता यांच्यातही दोन भाग पडले होते. खंडेरावांच्या निधनानंतर मल्हारराव सत्तेवर आले. खंडेरावांच्या काळात तेथे असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांचे वर्चस्व दरबारावर होते, ते काही प्रमाणात कमी झाले. ब्रिटिशांच्याच मदतीने बडोदा संस्थानात रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न कूर्मगतीने सुरू होता विंâबहुना तो थांबलाच होता. अशा वेळी या कामी `नारायण` संस्थानच्या मदतीला आला. शुभदा गोगटे यांची `सांधा बदलताना` ही कादंबरी या बडोदा संस्थानच्या एकूण सामाजिक-राजकीय परिस्थितीचे यथार्थ वर्णन करणारी आहे. १८६० ते १८७५ या संपूर्ण कालावधीतील बडोदा संस्थानमधील सामाजिक चित्र उभे करतानाच सरकारी पातळीवर कोणतीही योजना कशी राबवली जाते, त्यात कोणकोणते अडथळे येतात, ते अडथळे कसे दूर होतात याचेही बारकावे वाचायला मिळतात. डभोई ते करजण हा २० मैलांचा रेल्वेमार्ग सुरू व्हावा यासाठी बडोदे संस्थान `नारायण` च्या मदतीने प्रयत्न करत असतानाच काही विघ्नसंतोषी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या मदतीने कसा अडसर आणतात, हेही वाचायला मिळते. नारायण हा सर्वसामान्य मराठी कुटूंबातला मुलगा. रेल्वे इंजिनांच्या आवडीमुळे तो रेल्वेत कामाला लागतो. घरच्या पातळीवर तत्कालीन संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे पत्नीचा झालेला छळ तो सहन करू शकत नाही आणि तो विभक्त होतो. पण बऱ्याच वर्षांनी तो घरी येतो तेव्हा घराचे बदललेले रूप पाहून तो अचंबित होतो, पण नंतर पुन्हा आपल्या प्रपंचाकडे वळतो आणि एक नवे आव्हान त्याला बडोदे संस्थानमध्ये रेल्वे सुरू करण्याच्या निमित्ताने मिळते. या कादंबरीत नारायणचे घर आणि नंतर बडोदे संस्थानमधील त्यांची कामगिरी याचा सांधा साधताना लेखिकेची लेखनगती वेगवेगळ्या पातळीवर होते आणि मध्ये सांधा बदलताना नाही तर निखळलेला वाटतो, पण ओघवत्या लेखनशैलीमुळे हे वाचकांच्या विशेष लक्षात येणार नाही. कादंबरीतील सर्वच पात्रे बदलत्या परिस्थितीत स्वत:मध्ये बदल करताना आढळतात. म्हणजेच ते त्यांच्या जीवनाचा सांधा बदलतात. सरळमार्गी जीवन जगताना अनेकदा असा सांधा बदलणे अपरिहार्य असते. त्यातूनच जीवन प्रगतीकडे नेता येते. संस्थानिक आणि ब्रिटिश रेसिडेंट यांच्यातील तो संघर्षाचा काळ होता. १८५७ मध्ये झालेल्या उठावामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. ब्रिटिशांचा प्रभाव वाढू लागला होता. मल्हारराव गायकवाड यांच्या काहीशा छंदीफ़ंदी स्वभावामुळे वैतागलेल्या रेसिडेंटने अखेर मल्हाररावांना सत्ताभ्रष्ट केले आणि दत्तक विधानाच्या माध्यमातून सयाजीरान गायकवाड सत्तेवर आले. या सवे प्रकारात डभोईकरजण रेल्वे सुरू झाली खरी, पण नारायणला पुन्हा आपल्या जागी परतावे लागले. मोठ्या उत्साहाने संपूर्ण कुटूंबासहित बडोद्याला आलेल्या नारायणला तसेच त्याच्या कुटूंबाला परतावे लागते. आपल्या संयुक्त कुटुंबापासून दूर जाताना नारायणने सांधा बदलला, बडोदे संस्थानची नोकरी पत्करताना त्याने दुसऱ्यांदा सांधा बदलला आणि शेवे सत्तसंघर्षातून आपल्याच गावी परतताना त्याला पुन्हा सांधा बदलावा लागला. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर असा नारायणचा सांधा बदलला, त्याचीच ही कहाणी! - प्रसाद मोकाशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more