* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ARE UNABLE TO KNOW THE ACTUAL MEANING OF LIFE UNTIL WE FIND THE ACTUAL MEANING OF DEATH. ONLY TAKING A BIRTH IS NOT ENOUGH. WE SHOULD RISE AFTER DEATH ! ONLY THEN WE COULD FIND THE MEANING OF LIFE. I TRIED TO FACE DEATH THREE TIMES, BUT CAUGHT WITH A SPECIFIC SCENE EVERY TIME . I LOST MY SENSES, FELT LIKE WHELMED WITH WATER IN MY HEAD, AS I CAN’T EVEN BREATH YET CAN’T STEP OUT. AS I’M TRYING TO RISE AND SOMEBODY IS PULLING MY LEG DOWN, SURROUNDED WITH BLACKISH GREEN… GOING DEEP AND DEEP AND DEEP…… THAT’S TRUE. WE CAN’T KNOW THE IMPORTANCE OF LIFE UNTIL WE PAY FOR IT. I HAVEN’T FACED A SITUATION LIKE THIS YET. NOT UNDERGONE A TERRIBLE DISTRESS YET TO ATTEMPT A SUICIDE. THEN, DO I KNOW THE IMPORTANCE OF LIFE ?? CAN I SAY YES I’M AWARE OF IT ?? HOW MY MEDITATION WORKS ?? BY READING AND INTERPRETATING ‘CLASSIC’ LITERATURE. ! TAKING AN EVENING WALK WITH THE COLD BREEZES IN THE AIR…. COFFEE AND DISCUSSIONS ON THE CHARACTERS OF A RECENT BOOK WE READ….TRYING NOT TO HURT ANYONE….!! IS LIFE THIS SIMPLE ???? NOT AT ALL…….
मरणाचा अर्थ समजेपर्यंत जीवन समजत नाही. केवळ जन्मणं त्यासाठी पुरेसं नाही. मरून जन्माला आलं पाहिजे. त्यानंतरच जीवनाचा खरा अर्थ समजतो. तीन वेळा मरायचा प्रयत्न केला, तरी विशिष्ट प्रकारचाच अनुभव आला. शुद्ध गेल्यासारखं - डोक्यात पाणी भरल्यासारखं - श्वास कोंडून जीव गुदमरत असतानाही पाण्याबाहेर यायला जमू नये, तसं. चढायला धडपडत असताना कुणी तरी पुन्हा गर्तेत लोटून द्यावं, तसं. भोवताली काळपट हिरवेपणा भरून राहावा ... खोल बुडत जावं ... खरंय् हे. मरण समजल्याशिवाय जीवनाची विंÂमत समजत नाही. मला असा अनुभव कधीच आला नाही. आत्महत्या करावी. इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे काय? ठाऊक आहे, असं म्हणता येईल काय? माझं चिंतन कशा प्रकारे चालतं? साहित्य वाचणं - ते ‘क्लासिक’ आहे, याची काळजी घेत! पुस्तकं विकत घेणं, संध्याकाळच्या थंड सुखद हवेत फिरून येणं ... उत्तम कॉफीचे घुटके घेत साहित्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं, प्रत्यक्ष आयुष्यात शक्यतो कुणालाही न दुखवता जगत राहणं! जीवन म्हणजे एवढंच? अंहं ...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PARISHODH #ANVESHAN #परिशोध #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPA S.L. #भैरप्पा एस.एल. "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विश्वनाथ नावाच्या मनस्वी तरुणाची भ्रमण-गाथा, कंठी जोईस, देशपांडे वकील, जक्काजी मास्तर, रंगनाथ स्वामी, गंगण्णा, सुनंदा, हेडमास्तर– अशा अनेकांच्या जीवनात काही काळ विश्व येऊन जातो. यातला प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो ही प्रत्येकाची आपापल्या जीवनाचा परिशोध घेण्याची धडपड आहे. त्यातून साकारलेली, जीवनातील गुंतागुंत दर्शवणारी ही कादंबरी. तत्त्वचिंतक भैरपांचा एक जीवन-स्पर्शी लेखनानुभव! ‘मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. आत्महत्त्या करावी इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे असं म्हणता येईल काय?’ ‘केवळ क्लासिक साहित्य वाचणं... उत्तम कॉफीचे घुटके घेत त्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं... जीवन म्हणजे एवढंच? अंहं– एका जीवघेण्या संघर्षाचा चिरंतन परिशोध. मराठी अनुवाद सौ. उमा. वि. कुलकर्णी यांच्या ओघवती भाषेत! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    परिपूर्ण शोध… बिनीच्या कानडी कादंबरीकारांपैकी डॉ. शिवराम कारंथ, डॉ. यु. आर. अनंतमूर्ती यांच्याप्रमाणेच डॉ. एस. एल. भैरप्पा यांचेही नाव जाणकार मराठी वाचकाच्या परिचयाचे आहे. ‘गृहभंग’, ‘वंशवृक्ष’, ‘काठ’, ‘पर्व’ अशा त्यांच्या काही कादंबऱ्या मराठीत भाषांरित झाल्या आहेत. ‘परिशोध’ ही मराठीत येणारी त्यांची पाचवी कादंबरी. तत्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या भैरप्प्यांच्या कादंबऱ्यांतही तत्त्वचिकित्सेचा अंत:प्रवाह वाहात असतो. त्यांच्या कादंबऱ्यातील पात्रांना पडणारे प्रश्न वाचकाला तत्त्वज्ञानाच्या खोल आणि चक्रावून सोडणाऱ्या प्रवाहात खेचत नेतात, अंतर्मुख बनवतात आणि एकंदर मानवी जीवनाच्या (आणि मृत्युच्या) अर्थाचा विचार करायला लावतात. शोध घ्यायला प्रवृत्त करतात. ‘परिशोध’ ही कादंबरीही याला अपवाद नाही. ‘परिशोध’ हा शब्द काही मराठीत रुढ आहे, असे म्हणता येणार नाही. पण मूळ ‘अन्वेषण’ या शीर्षकाचा प्रतिशब्द म्हणून भाषांतरकर्त्या उमा कुलकर्णी यांनी तो चपखलपणाने योजला आहे. ‘अन्वेषण’ म्हणजे शोध. पण ‘शोध’ला ‘परि’ या उपसर्गाची जोड देऊन कादंबरीचे सार त्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न उमा कुलकर्णी यांनी केला आहे. ‘परिशोध’ म्हणजे परिपूर्ण शोध, अनेक तऱ्हांनी घेतलेला सखोल शोध. या कादंबरीच्या केंद्रबिंदूच्या जागी असलेल्या विश्वनाथचा, त्याच्याशी संबंध आलेल्या सर्वांनी घेतलेला शोध म्हणजे ‘परिशोध’ ही कादंबरी. हा शोध आहे तो पूर्वघटनांचे निवेदन व विश्लेषण यांच्याद्वारा, त्यामुळे वाचकाचा विश्वनाथशी प्रत्यक्ष संबंध कधीच येत नाही. विश्वनाथ उर्फ विश्व (ह्या नावातील प्रतिकात्मता सहज लक्षात यावी.) ह्या केंद्राभोवतीच्या परीघावर असलेल्या सात व्यक्तींच्या जाणीवप्रवाहात लेखक उतरतो आणि त्या द्वारा विश्वच्या जीवनातील घटना आणि त्याचे काही गुणविशेष बुद्धिमत्ता, निर्भयता, शिक्षणाची आवड, नैतिकता, निष्ठा - यांचा वाचकाला प्रत्यय येत जातो. अस्थिर ‘विश्व’चे अनुभव विश्वची आई नजंम्मा हिची शोकांतिका भैरप्पांनी ‘गृहभंग’ या कादंबरीतच साकार केली आहे. खवीस बाप. आळशी व अप्पलपोटा नवरा, छळ करणारी सासू आणि भोवतीच्या समाजातील इतर अनेकजण नंजम्माचे विविध प्रकारे शोषण करतात. सर्व प्रकारच्या प्रतिकुलतेशी झगडत ‘घर’ उभे करू पाहाणाऱ्या एका दुर्दैवी गृहिणीची कहाणी ‘गृहभंग’ मध्ये येते. ‘परिशोध’मध्ये तिच्या मुलाची परवड होताना दिसते. अनेक गुण अंगी असूनही मनस्वीपणा, परखडपणा, नैतिकतेबद्दलच्या स्वत:च्या कल्पनेशी प्रामाणिक राहाण्याचा अट्टहास यामुळे विश्व कुठेच स्थिर होऊ शकत नाही. भिक्षांदेही’ करून त्याला जगवू व शिकवू पाहाणाऱ्या महादेवय्या या जंगमाच्या (संन्याशाच्या) मृत्यूनंतर विश्वचे जीवन धारेला लागल्यासारखे होते. आत्महत्येचे प्रयत्न, संभोगाच्या व पोहोण्याच्या अनुभवातून निर्माण झालेली जीवनेच्छा, एका वकिलाच्या घरी काम, नाटक वंâपनीतील नोकरी, मुंबईच्या वेश्यावस्तीतील मुक्काम, तत्त्वजिज्ञासेमुळे एका साधुच्या मठातील वास्तव्य, शिक्षण घेता येण्याच्या आशेने केलेले लग्न आणि सासऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे पत्नीच्या त्याग, आत्महत्या करण्याच्या तिच्या प्रयत्नात विश्वच्या मुलाचा मृत्यू - अशा क्रमाने विश्व भिरभिरत राहातो, त्यामुळे त्याच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येकाला तो एक गूढ वाटत राहातो. पण कादंबरीच्या सात प्रकरणांतील सात व्यक्तीच्या माध्यमातूनच आपण विश्वला भेटत असल्यामुळे विश्व प्रत्यक्षात कसा आहे, हे वाचकाला समजत नाही, त्यामुळे वाचकही त्याचा ‘ शोध’ घेत राहातो. जगणे, उपभोग घेणे, सुख मिळविणे, ‘यशस्वी होणे’ या सर्वसाधारण गोष्टी विश्वाला मोहवू शकत नाहीत, गुंतवून ठेवू शकत नाहीत. या सगळ्याच्या पलीकडे काय आहे हा प्रश्न त्याला पडतो आहे. शेवटच्या प्रकरणात त्याच्या दैनंदिनीतील काही उतारे हेडमास्तरांच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. कादंबरी संपते तीही प्रश्नचिन्हांवरच. विश्वला भेटायचं असं ठरणारे हेडमास्तर स्वत:लाच विचारतात : ‘‘समोर बोलत असतानाही तो कितपत सत्य सांगू शकेल? त्यातलं मी किती जाणू शकेन? संस्कृतीचा अडथळा नाही कादंबरीचा असा समर्थ प्रत्यय भाषांतरातूनही यावा, हे जेवढे लेखकाचे यश आहे, तेवढेच भाषांतरकर्तीचेही आहे. कन्नड नावे (व्यक्ती, स्थळे, खाद्यपदार्थ, वस्तू इ.), रीतीरिवाज, उपासनापद्धती, वेशभूषा, अशा अनेक गोष्टींतून आपल्याला कानडी संस्कृतीच्या अनेक वैशिष्टयांचा परिचय होतो, पण त्यांचा अडथळा मात्र वाटत नाही, हेही उमा कुलकर्णींच्या भाषांतराचे यश आहे. अर्थात काही ठिकाणी मराठीची थोडीशी मोडतोड झालेली दिसते. उदाहरणार्थ, ‘दुखणं उठलं होतं (पृ.१) ‘नतद्रष्ट नशिबावर शिव्यांची लाखोली वाहिली’ (पृ.८) ‘त्या क्षणी दोघांच्याही मनात परस्परांविषयी विश्वास जन्मून वाटल्याचं दोघांनाही जाणवलं. (पृ.२४) ‘नातू कुणाचा आणि वात्सल्य (•कळवळा) कुणाला ! (पृ.३७) ‘नादाला गेलं नाही’ (पृ. ३६) ‘बड्या देसायांच्या घरचे ते (•ती) लेक !’ (पृ.७१) ‘कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन (•स्वार्थ, अपेक्षा) नसलेलं...’ (पृ.७३) ‘यानं वाचायला हवी, अशी आशा निर्माण झाली’ (•हा वाचेल / यानं वाचावी) (पृ.७६), ‘तरीही त्यानं वाचावं अशी आशा मनात निर्माण झाली’ (पृ.७६) (‘परिहार मिळाल्यासारखं वाटलं’ (•झाल्यासारखं) (पृ.२०२) प्रसिद्धी पूर्व संस्कारात अशी स्थळे सहजपणे सुधारून घेता आली असती. मुद्रितशोधनातही अनेक चुका राहून गेल्या आहेत. उदा. – ‘काड्यापेटी’, ‘साडेचार’, ‘पंचवीस’, ‘संन्यासी’, ‘मुळं’ (•मुलं). पण अलिकडील संगणकीय जुळणीच्या व पडद्यावर करावयाच्या मुद्रितशोधाच्या युगात अशा चुका अपिरहार्य ठरू लागल्या आहेत. कादंबरीचे मुखपृष्ठ कादंबरीला पूर्णपणे विशोभित आहे. त्यात कादंबरीच्या आशयाचे प्रतिबिंब नाही किंवा कादंबरीच्या सूत्राचेही सूचन नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो