* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ARE UNABLE TO KNOW THE ACTUAL MEANING OF LIFE UNTIL WE FIND THE ACTUAL MEANING OF DEATH. ONLY TAKING A BIRTH IS NOT ENOUGH. WE SHOULD RISE AFTER DEATH ! ONLY THEN WE COULD FIND THE MEANING OF LIFE. I TRIED TO FACE DEATH THREE TIMES, BUT CAUGHT WITH A SPECIFIC SCENE EVERY TIME . I LOST MY SENSES, FELT LIKE WHELMED WITH WATER IN MY HEAD, AS I CAN’T EVEN BREATH YET CAN’T STEP OUT. AS I’M TRYING TO RISE AND SOMEBODY IS PULLING MY LEG DOWN, SURROUNDED WITH BLACKISH GREEN… GOING DEEP AND DEEP AND DEEP…… THAT’S TRUE. WE CAN’T KNOW THE IMPORTANCE OF LIFE UNTIL WE PAY FOR IT. I HAVEN’T FACED A SITUATION LIKE THIS YET. NOT UNDERGONE A TERRIBLE DISTRESS YET TO ATTEMPT A SUICIDE. THEN, DO I KNOW THE IMPORTANCE OF LIFE ?? CAN I SAY YES I’M AWARE OF IT ?? HOW MY MEDITATION WORKS ?? BY READING AND INTERPRETATING ‘CLASSIC’ LITERATURE. ! TAKING AN EVENING WALK WITH THE COLD BREEZES IN THE AIR…. COFFEE AND DISCUSSIONS ON THE CHARACTERS OF A RECENT BOOK WE READ….TRYING NOT TO HURT ANYONE….!! IS LIFE THIS SIMPLE ???? NOT AT ALL…….
मरणाचा अर्थ समजेपर्यंत जीवन समजत नाही. केवळ जन्मणं त्यासाठी पुरेसं नाही. मरून जन्माला आलं पाहिजे. त्यानंतरच जीवनाचा खरा अर्थ समजतो. तीन वेळा मरायचा प्रयत्न केला, तरी विशिष्ट प्रकारचाच अनुभव आला. शुद्ध गेल्यासारखं - डोक्यात पाणी भरल्यासारखं - श्वास कोंडून जीव गुदमरत असतानाही पाण्याबाहेर यायला जमू नये, तसं. चढायला धडपडत असताना कुणी तरी पुन्हा गर्तेत लोटून द्यावं, तसं. भोवताली काळपट हिरवेपणा भरून राहावा ... खोल बुडत जावं ... खरंय् हे. मरण समजल्याशिवाय जीवनाची विंÂमत समजत नाही. मला असा अनुभव कधीच आला नाही. आत्महत्या करावी. इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे काय? ठाऊक आहे, असं म्हणता येईल काय? माझं चिंतन कशा प्रकारे चालतं? साहित्य वाचणं - ते ‘क्लासिक’ आहे, याची काळजी घेत! पुस्तकं विकत घेणं, संध्याकाळच्या थंड सुखद हवेत फिरून येणं ... उत्तम कॉफीचे घुटके घेत साहित्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं, प्रत्यक्ष आयुष्यात शक्यतो कुणालाही न दुखवता जगत राहणं! जीवन म्हणजे एवढंच? अंहं ...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PARISHODH #ANVESHAN #परिशोध #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPA S.L. #भैरप्पा एस.एल. "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विश्वनाथ नावाच्या मनस्वी तरुणाची भ्रमण-गाथा, कंठी जोईस, देशपांडे वकील, जक्काजी मास्तर, रंगनाथ स्वामी, गंगण्णा, सुनंदा, हेडमास्तर– अशा अनेकांच्या जीवनात काही काळ विश्व येऊन जातो. यातला प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो ही प्रत्येकाची आपापल्या जीवनाचा परिशोध घेण्याची धडपड आहे. त्यातून साकारलेली, जीवनातील गुंतागुंत दर्शवणारी ही कादंबरी. तत्त्वचिंतक भैरपांचा एक जीवन-स्पर्शी लेखनानुभव! ‘मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. आत्महत्त्या करावी इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे असं म्हणता येईल काय?’ ‘केवळ क्लासिक साहित्य वाचणं... उत्तम कॉफीचे घुटके घेत त्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं... जीवन म्हणजे एवढंच? अंहं– एका जीवघेण्या संघर्षाचा चिरंतन परिशोध. मराठी अनुवाद सौ. उमा. वि. कुलकर्णी यांच्या ओघवती भाषेत! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    परिपूर्ण शोध… बिनीच्या कानडी कादंबरीकारांपैकी डॉ. शिवराम कारंथ, डॉ. यु. आर. अनंतमूर्ती यांच्याप्रमाणेच डॉ. एस. एल. भैरप्पा यांचेही नाव जाणकार मराठी वाचकाच्या परिचयाचे आहे. ‘गृहभंग’, ‘वंशवृक्ष’, ‘काठ’, ‘पर्व’ अशा त्यांच्या काही कादंबऱ्या मराठीत भाषांरित झाल्या आहेत. ‘परिशोध’ ही मराठीत येणारी त्यांची पाचवी कादंबरी. तत्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या भैरप्प्यांच्या कादंबऱ्यांतही तत्त्वचिकित्सेचा अंत:प्रवाह वाहात असतो. त्यांच्या कादंबऱ्यातील पात्रांना पडणारे प्रश्न वाचकाला तत्त्वज्ञानाच्या खोल आणि चक्रावून सोडणाऱ्या प्रवाहात खेचत नेतात, अंतर्मुख बनवतात आणि एकंदर मानवी जीवनाच्या (आणि मृत्युच्या) अर्थाचा विचार करायला लावतात. शोध घ्यायला प्रवृत्त करतात. ‘परिशोध’ ही कादंबरीही याला अपवाद नाही. ‘परिशोध’ हा शब्द काही मराठीत रुढ आहे, असे म्हणता येणार नाही. पण मूळ ‘अन्वेषण’ या शीर्षकाचा प्रतिशब्द म्हणून भाषांतरकर्त्या उमा कुलकर्णी यांनी तो चपखलपणाने योजला आहे. ‘अन्वेषण’ म्हणजे शोध. पण ‘शोध’ला ‘परि’ या उपसर्गाची जोड देऊन कादंबरीचे सार त्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न उमा कुलकर्णी यांनी केला आहे. ‘परिशोध’ म्हणजे परिपूर्ण शोध, अनेक तऱ्हांनी घेतलेला सखोल शोध. या कादंबरीच्या केंद्रबिंदूच्या जागी असलेल्या विश्वनाथचा, त्याच्याशी संबंध आलेल्या सर्वांनी घेतलेला शोध म्हणजे ‘परिशोध’ ही कादंबरी. हा शोध आहे तो पूर्वघटनांचे निवेदन व विश्लेषण यांच्याद्वारा, त्यामुळे वाचकाचा विश्वनाथशी प्रत्यक्ष संबंध कधीच येत नाही. विश्वनाथ उर्फ विश्व (ह्या नावातील प्रतिकात्मता सहज लक्षात यावी.) ह्या केंद्राभोवतीच्या परीघावर असलेल्या सात व्यक्तींच्या जाणीवप्रवाहात लेखक उतरतो आणि त्या द्वारा विश्वच्या जीवनातील घटना आणि त्याचे काही गुणविशेष बुद्धिमत्ता, निर्भयता, शिक्षणाची आवड, नैतिकता, निष्ठा - यांचा वाचकाला प्रत्यय येत जातो. अस्थिर ‘विश्व’चे अनुभव विश्वची आई नजंम्मा हिची शोकांतिका भैरप्पांनी ‘गृहभंग’ या कादंबरीतच साकार केली आहे. खवीस बाप. आळशी व अप्पलपोटा नवरा, छळ करणारी सासू आणि भोवतीच्या समाजातील इतर अनेकजण नंजम्माचे विविध प्रकारे शोषण करतात. सर्व प्रकारच्या प्रतिकुलतेशी झगडत ‘घर’ उभे करू पाहाणाऱ्या एका दुर्दैवी गृहिणीची कहाणी ‘गृहभंग’ मध्ये येते. ‘परिशोध’मध्ये तिच्या मुलाची परवड होताना दिसते. अनेक गुण अंगी असूनही मनस्वीपणा, परखडपणा, नैतिकतेबद्दलच्या स्वत:च्या कल्पनेशी प्रामाणिक राहाण्याचा अट्टहास यामुळे विश्व कुठेच स्थिर होऊ शकत नाही. भिक्षांदेही’ करून त्याला जगवू व शिकवू पाहाणाऱ्या महादेवय्या या जंगमाच्या (संन्याशाच्या) मृत्यूनंतर विश्वचे जीवन धारेला लागल्यासारखे होते. आत्महत्येचे प्रयत्न, संभोगाच्या व पोहोण्याच्या अनुभवातून निर्माण झालेली जीवनेच्छा, एका वकिलाच्या घरी काम, नाटक वंâपनीतील नोकरी, मुंबईच्या वेश्यावस्तीतील मुक्काम, तत्त्वजिज्ञासेमुळे एका साधुच्या मठातील वास्तव्य, शिक्षण घेता येण्याच्या आशेने केलेले लग्न आणि सासऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे पत्नीच्या त्याग, आत्महत्या करण्याच्या तिच्या प्रयत्नात विश्वच्या मुलाचा मृत्यू - अशा क्रमाने विश्व भिरभिरत राहातो, त्यामुळे त्याच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येकाला तो एक गूढ वाटत राहातो. पण कादंबरीच्या सात प्रकरणांतील सात व्यक्तीच्या माध्यमातूनच आपण विश्वला भेटत असल्यामुळे विश्व प्रत्यक्षात कसा आहे, हे वाचकाला समजत नाही, त्यामुळे वाचकही त्याचा ‘ शोध’ घेत राहातो. जगणे, उपभोग घेणे, सुख मिळविणे, ‘यशस्वी होणे’ या सर्वसाधारण गोष्टी विश्वाला मोहवू शकत नाहीत, गुंतवून ठेवू शकत नाहीत. या सगळ्याच्या पलीकडे काय आहे हा प्रश्न त्याला पडतो आहे. शेवटच्या प्रकरणात त्याच्या दैनंदिनीतील काही उतारे हेडमास्तरांच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. कादंबरी संपते तीही प्रश्नचिन्हांवरच. विश्वला भेटायचं असं ठरणारे हेडमास्तर स्वत:लाच विचारतात : ‘‘समोर बोलत असतानाही तो कितपत सत्य सांगू शकेल? त्यातलं मी किती जाणू शकेन? संस्कृतीचा अडथळा नाही कादंबरीचा असा समर्थ प्रत्यय भाषांतरातूनही यावा, हे जेवढे लेखकाचे यश आहे, तेवढेच भाषांतरकर्तीचेही आहे. कन्नड नावे (व्यक्ती, स्थळे, खाद्यपदार्थ, वस्तू इ.), रीतीरिवाज, उपासनापद्धती, वेशभूषा, अशा अनेक गोष्टींतून आपल्याला कानडी संस्कृतीच्या अनेक वैशिष्टयांचा परिचय होतो, पण त्यांचा अडथळा मात्र वाटत नाही, हेही उमा कुलकर्णींच्या भाषांतराचे यश आहे. अर्थात काही ठिकाणी मराठीची थोडीशी मोडतोड झालेली दिसते. उदाहरणार्थ, ‘दुखणं उठलं होतं (पृ.१) ‘नतद्रष्ट नशिबावर शिव्यांची लाखोली वाहिली’ (पृ.८) ‘त्या क्षणी दोघांच्याही मनात परस्परांविषयी विश्वास जन्मून वाटल्याचं दोघांनाही जाणवलं. (पृ.२४) ‘नातू कुणाचा आणि वात्सल्य (•कळवळा) कुणाला ! (पृ.३७) ‘नादाला गेलं नाही’ (पृ. ३६) ‘बड्या देसायांच्या घरचे ते (•ती) लेक !’ (पृ.७१) ‘कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन (•स्वार्थ, अपेक्षा) नसलेलं...’ (पृ.७३) ‘यानं वाचायला हवी, अशी आशा निर्माण झाली’ (•हा वाचेल / यानं वाचावी) (पृ.७६), ‘तरीही त्यानं वाचावं अशी आशा मनात निर्माण झाली’ (पृ.७६) (‘परिहार मिळाल्यासारखं वाटलं’ (•झाल्यासारखं) (पृ.२०२) प्रसिद्धी पूर्व संस्कारात अशी स्थळे सहजपणे सुधारून घेता आली असती. मुद्रितशोधनातही अनेक चुका राहून गेल्या आहेत. उदा. – ‘काड्यापेटी’, ‘साडेचार’, ‘पंचवीस’, ‘संन्यासी’, ‘मुळं’ (•मुलं). पण अलिकडील संगणकीय जुळणीच्या व पडद्यावर करावयाच्या मुद्रितशोधाच्या युगात अशा चुका अपिरहार्य ठरू लागल्या आहेत. कादंबरीचे मुखपृष्ठ कादंबरीला पूर्णपणे विशोभित आहे. त्यात कादंबरीच्या आशयाचे प्रतिबिंब नाही किंवा कादंबरीच्या सूत्राचेही सूचन नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more