* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PACHUCHE BET
  • Availability : Available
  • Translators : SHIRDHANKAR BHANU
  • ISBN : 9789353171964
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"AS THE SHIP ‘DOLY’ DOCKS INTO THE YARD AT NUKUHEVA PORT, TWO OF ITS SAILORS DECIDE TO RUN AWAY FROM ITS ATROCITIES. THEY ARE SCARED TO TRAVEL BACK ON THE WORN OUT SHIP ON A LIFE-LONG VOYAGE. INSTEAD, THEY WANT TO ENJOY LIFE WITH THE TRIBAL PEOPLE THERE. INITIALLY, WHEN THE TWO HAD JOINED THE SHIP, THEY WERE SHOWN MANY RED AND JUICY CARROTS. BUT, OVER THE PERIOD, THEY REALIZED THAT THE OFFICERS ABOARD WOULD OFTEN BREAK ALMOST EVERY RULE. THE TREATMENT GIVEN TO THE LOWER RANKS WAS HIDEOUS. EXPLOITATION HAD BECOME THE FIRST RULE OF CONDUCT FOR THE HIGH-RANKING OFFICERS. AS THE VOYAGE CONTINUED FOR A VERY LONG PERIOD, EVERYONE WAS ANXIOUS TO SEE THE LAND. WHILE TRAVELING TOWARDS THE MARKISUS ISLANDERS, TWO OF ITS SAILORS TOMO-THE AUTHOR AND HIS FRIEND TOBO DECIDE TO RUN AWAY. AS THEY DROPPED THE ANCHOR AT NUKUHEWA, THE CAPTAIN PERMITTED THEM TO STROLL AROUND THE PORT. THEY SAW A GOLDEN OPPORTUNITY TO FULFIL THEIR PLAN. TO STAY AWAY FROM THE SHIP, THEY START RUNNING. THEY CANNOT AFFORD TO HALT AT ANY PLACE. INITIALLY, THEY ENTER THE TAIPI REGION. ALL THEY HAVE WITH THEM ARE A FEW LOAVES AND BISCUITS. THEY SURVIVE THE HARDSHIPS BUT AFTER TRAVELLING THUS FOR A WEEK OR SO, THE TAIPI DETAIN THEM. FOR FOUR MONTHS THEY REMAIN WITH THE TAIPI. HOW DID THEY SURVIVE DURING THIS PERIOD IS WORTH READING. "
डॉली जहाजावरील दोन खलाशी नूकूहेवा बंदरात जहाज आल्यावर जहाजावरून फरार होतात. आणि लपतछपत थेट नरभक्षक टैपी लोकांच्या प्रदेशात दाखल होतात. माणसाचं मांस खाणाऱ्या या जमातीच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांचं नक्की काय होतं? या उत्कंठावर्धक अनुभवांची थरारक कहाणी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#हर्मन मेलव्हिल#भानू शिरधनकर#पाचूचे बेट# #HERMAN MELVILL#BHANU SHIRDHANKEAR#
Customer Reviews
  • Rating StarRashmi Sasane

    कालखंड कोणताही असो, एखाद्या दर्यावर्दी खलाशाचं जीवन हे नेहमीच रोमांचकारी घटनांनी भरलेले असतं. दर्यावरच्या मोहिमेत प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठीचा एक नवीनच अनुभव असतो. आजच्या विज्ञानयुगात माहिती मिळवण्याची अनेक साधने हाताशी आहेत. अनेकानेक गोष्टींविषीच ज्ञान सहजपणे मिळू शकतं. त्यामुळे कदाचित या सागरी मोहीमा थोड्याफार सुकर झालेयत, अस आपण नक्कीच म्हणू शकतो. पण जर समजा , हा कालखंड अठराव्या शतकातील असेल तर? ज्यावेळेस माहिती मिळवण्याची साधनं तुटपुंजी होती. अगदी समुद्राच्या एखाद्या भागाची, एखाद्या बेटाची माहिती मिळवायची असेल तर त्या भागात भेट देऊन आलेल्या व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून राहावं लागायचं. त्या व्यक्तीने दिलेली माहिती ही परीपूर्ण असेलच अस ही नव्हतं.पुढे ती माहिती एकमेकांना सांगताना तिखटमीठ लावून सांगितली जायची. आणि मग त्या माहितीच्या गुढरम्य कहाण्याच बनून जायच्या. ` Typee ` ही पण एक गुढरम्य कहाणीच आहे. १८४२ मध्ये हर्मन मेलव्हिल हा खलाशी एका सागरी मोहिमेत सहभागी झाला. या प्रवासातील घटनांचे शब्दचित्र म्हणजे हे पुस्तक, ` Typee ` या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केलाय भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. पँसिफिक महासागरात मासेमारीच्या मोहीमेसाठी जहाजे उतरत. या मोहिमा अगदी चार - पाच वर्षे सतत चालत. या मुदतीचं वर्णन करताना लेखक म्हणतो, या मोहिमेत सहभागी झालेले कोवळे तरुण आपल्या आईचा निरोप घेऊन रवाना झाले ते पुन्हा परत आपल्या बंदरात आले त्यावेळी अर्धम्हातारे झाले होते. जहाजावरील सोयी- सुविधांच्या अभावी निर्माण झालेली गचाळ परिस्थिती, कधीकधी जहाजाला मिळालेला विक्षिप्त, हट्टी कप्तान आणि महिनोनमहिने दुर्लभ झालेल जमिनीच दर्शन यामुळे या सागरी मोहिमा म्हणजे एक नाईटमेर असत. लेखक हर्मन मेलव्हिल ` डॉली ` नावाच्या जहाजावर खलाशी म्हणून सहभागी होतो. ही मोहिम एवढी लांबते की जहाजावरील अन्नधान्य संपत येऊ लागतं, जहाजावरील खलाशांच मनोधैर्य डळमळू लागत. आणि अशा परिस्थितीत लेखक जहाजावरुन फरार होण्याचा निर्णय घेतो, जो फार धोकादायक निर्णय असतो. नुकूहेवा नावाच्या बेटावर त्यांचे जहाज थोड्या काळासाठी थांबले असताना लेखक त्या जहाजावरुन फरार होण्यात यशस्वी होतो. यात त्याला जहाजावरचा आणखी एक खलाशी ही सामील होतो, ज्याचं नाव असतं, टॉबी. आणि इथून सुरु होते ,त्यांची थरारक, ` फरार - सफर `. या प्रवासाच वर्णन लेखकाने बहारदार केलयं. समुद्राच्या लगत असणाऱ्या बेटावरचं हवामान, वातावरण, उंचच उंच टोकदार डोंगर, खोल दऱ्या, घनदाट जंगलाने व्यापलेला परीसर अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर साकारतो. या बेटावरील रहिवासी तर खासचं. त्यांची पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारी जीवनशैली, त्यांची अगम्य भाषा आणि हो, त्यांच्या नरभक्षी असण्याच्या अफवा (?) शेवटी कितीही भिती वाटत असली , जीवघेणा धोका वाटत असला तरी या दोन फरार लोकांना या बेटावरच्या आदीम लोकांनाच धरून राहावं लागणार असतं. त्याप्रमाणे हे दोन फरार खलाशी त्यांच्या कल्पनेतही नसणारा असा अनपेक्षित धोकादायक प्रवास करून अखेरीस एका खोऱ्यात उतरतात....टैपी जमातीच्या खोऱ्यात. आणि ही टैपी जमात नरभक्षी म्हणून कुप्रसिद्ध असते. मग या दोन खलाशांना त्यांचा काय अनुभव येतो? ही सगळी कहाणी सांगण्यासाठी ते जिवंत कसे राहतात?सर्व दर्यावर्दी लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे हे टैपी लोक खरचं का नरभक्षी असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे. Typee हे पुस्तक म्हणजे लेखक हर्मन मेलव्हिल चा पोलिनीशीनय बेटावर घालवलेल्या चार महिन्यांचा ऐतिहासिक लेखाजोखा आहे की ज्यामध्ये हर्मन मेलव्हिल ने या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी वास्तवात घडल्या आहेत, असा दावा केलाय. १८४६ मध्ये पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकात वर्णन केलेल्या घटनांच्या सत्यतेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. हे पुस्तक म्हणजे कल्पनाविलास की वास्तविकता , यावर चर्चा घडू लागल्या होत्या. अगदी हर्मन मेलव्हिल नावाची व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे का? यावरही संशय घेतला जाऊ लागला होता. या वादळी चर्चा शिगेला पोहोचल्यावर ज्यावेळेस हर्मन मेलव्हिलची इतिहासकार म्हणून कारकीर्द धोक्यात येतीय अस वाटल्यावर , त्याने स्वतः त्याच्या डिफेन्स मध्ये एक निनावी लेख प्रकाशित करण्याचे ठरवले पण त्या आधीच या कथेची सत्यता सिद्ध करण्यासाठी लेखकाचा, त्याच्या फरार- मोहीमेतील दुसरा साथीदार, टोबी त्याच्या मदतीला आला. आणि त्याच्या साहाय्याने हर्मन मेलव्हिल ने Typee चा उत्तरार्ध, The story of Toby, A sequal of Typee लिहीला. त्यामुळे या पुस्तकाच्या सत्यतेविषयीचा उठलेला संशयाचा धुरळा खाली बसला. पुस्तकातील ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या कामाविषयीच्या नकारात्मक वर्णनावर पण काही वाचक नाराज होतेच, पण लेखक आपल्या त्या मतांवर ठाम राहिला. एकुणच Typee हे एका अज्ञात संस्कृती चे छोटेखानी दर्शन घडवणारं पुस्तक ठरतं. एका आयुष्यात अनेक प्रकारच्या आयुष्याचे अनुभव देण्याची क्षमता पुस्तकात असते , मग ते अनुभव आपल्यासाठी काल्पनिक का असेनात . त्यापैकी Typee हे पुस्तक आहे. अनुवादाविषयी:: Typee या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केला आहे, भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. अनुवाद इतका सुंदर, ओघवता झाला आहे की आपण एक अनुवाद वाचतोय हे लक्षातच येत नाही. ...Read more

  • Rating StarNaresh Mohare

    जेव्हा नविन नविन बेटानचा शोध लावला जात होता तेव्हा समुद्रा वरील बोटीतून 2खलाशी पळून जावुन जंगलात जातात आणि तेथे ते जंगलातील नर भक्षक लोकाना भेटतात आणि त्याच्या सोबत काढलेल्या दिवसाचे वर्णन लेखकाने येथे दिले आहेत. वेळ काढून नक्की वाचा.

  • Rating StarKaushik Lele

    युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा काळात इ.स. १८४१ मध्ये या पुस्तकाचा लेखक हर्मन दक्षिण अमेरिकेजवळच्या महासागरात एका समुद्र सफरीवर निघालेल्या जहाजात खलाशी होता. त्यांचे जहाज सतत सहा महिने समुद्रात फिरत होते. शेवटी एकदा त्यांना जमीनदिसली ती पॉलिनेशियन बेटांची. प्रवासाला कंटाळलेला हा खलाशी जहाजावरुन पळून जाऊन त्या बेटांवरच राहायचा बेत आखतो. बोटीवरचा अजून एक जण त्याच्या बरोबर साथ द्यायला तयार होतो. जहाजापासून दूर पळून जातात. बेटावर निसर्गाच्या सान्निध्यात फळं, कंद खात मस्त राहू अशी त्यांची कल्पना. पण कसलं काय. खडतर दिवस त्यांच्या समोर उभे राहतात. डोंगर दऱ्या ओलांडून, भुके तहानलेले राहून ते शेवटी पोचतात त्या बेटावरच्या नरभक्षक “टैपी” लोकांच्या प्रदेशात. आता आपले दिवस भरले अशी त्यांची कल्पना झाली. पण त्या आदिवासींनी त्यांना ठार मारलं नाहीच; उलट त्यांचं चांगलं स्वागत केलं, पाहुणचार केला. त्यांच्या दुखण्यावर उपचार केले. चार दिवस पाहुणचार घेऊन निघू असा विचार केल्यावर मात्र त्यांच्यापुढे नवंच आव्हान उभं राहिलं. ते आदिवासी त्यांना सोडायलाच तयार नव्हते. ते आदिवासी आपला प्रेमाने पाहुणचार करतायत का पुढेमागे बळी देणाऱ्याची तयारी अश्या द्विधा मनःस्थितीत दोघं तिथे राहिले. बरेच महिने राहिले. युरोपियन खलाशी आणि ख्रिश्चन धर्मोपदेशकांनीं जशी “टैपी” लोकांची प्रतिमा रंगवली होती तसे ते क्रूर नव्हते. या आदिवासिंची संस्कृती जवळून बघितली तेव्हा त्याला जाणवलं की युरोपियन लोकांपेक्षा हे लोक खूप मागास असले तरी निसर्गाशी एकरूप झालेले आहेत, त्यांचा त्यांचा दिनक्रम आनंदाने जगतायत. तथाकथित “प्रगत”, “धार्मिक” जगापेक्षा त्यांची समाजव्यवस्था उलट कमी समस्यांची आहे. युरोपियन लोकांमुळेच उलट इथे रोगराई वाढते आहे असं त्याचं मत बनलं . लेखकाला या बेटावरचं जग कसं दिसलं, टैपी लोकांचं खानपान, धार्मिक विधी, मनोरंजनाची साधनं, स्त्रीपुरुष समाजरचना, प्राणिवैविध्य, झाडं-झुडपं असं त्याला जे जे काही दिसलं, जसं दिसलं त्याचं वर्णन त्याने या पुस्तकात केलं आहे. ललित स्वरूपात लिहिलेला एक रिपोर्टच. पुस्तकातली ही काही पानं वाचा म्हणजे कल्पना येईल या बेटांची आधी थोडी ओळख करून घेऊया ...Read more

  • Rating StarHemant Latkar

    छान आहे.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more