* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TYPEE
  • Availability : Available
  • Translators : SHIRDHANKAR BHANU
  • ISBN : 9789353171964
  • Edition : 2
  • Publishing Year : 1966
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"AS THE SHIP ‘DOLLY’ DOCKS INTO THE YARD AT NUKUHEVA PORT, TWO OF ITS SAILORS DECIDE TO RUN AWAY FROM ITS ATROCITIES. THEY ARE SCARED TO TRAVEL BACK ON THE WORN OUT SHIP ON A LIFE-LONG VOYAGE. INSTEAD, THEY WANT TO ENJOY LIFE WITH THE TRIBAL PEOPLE THERE. INITIALLY, WHEN THE TWO HAD JOINED THE SHIP, THEY WERE FOOLED THAT THERE ARE MANY ATTRACTIONS. BUT, OVER THE PERIOD, THEY REALIZED THAT THE OFFICERS ABOARD WOULD OFTEN BREAK ALMOST EVERY RULE. THE TREATMENT GIVEN TO THE LOWER RANKS WAS HIDEOUS. EXPLOITATION HAD BECOME THE FIRST RULE OF CONDUCT FOR THE HIGH-RANKING OFFICERS. AS THE VOYAGE CONTINUED FOR A VERY LONG PERIOD, EVERYONE WAS ANXIOUS TO SEE THE LAND. WHILE TRAVELING TOWARDS THE MARKISUS ISLANDERS, TWO OF ITS SAILORS TOMO-THE AUTHOR AND HIS FRIEND TOBO DECIDE TO RUN AWAY. AS THEY DROPPED THE ANCHOR AT NUKUHEWA, THE CAPTAIN PERMITTED THEM TO STROLL AROUND THE PORT. THEY SAW A GOLDEN OPPORTUNITY TO FULFIL THEIR PLAN. TO STAY AWAY FROM THE SHIP, THEY START RUNNING. THEY CANNOT AFFORD TO HALT AT ANY PLACE. INITIALLY, THEY ENTER THE TAIPI REGION. ALL THEY HAVE WITH THEM ARE A FEW LOAVES AND BISCUITS. THEY SURVIVE THE HARDSHIPS BUT AFTER TRAVELLING THUS FOR A WEEK OR SO, THE TAIPI DETAIN THEM. FOR FOUR MONTHS THEY REMAIN WITH THE TAIPI. HOW DID THEY SURVIVE DURING THIS PERIOD IS WORTH READING. "
डॉली जहाजावरील दोन खलाशी नूकूहेवा बंदरात जहाज आल्यावर जहाजावरून फरार होतात. आणि लपतछपत थेट नरभक्षक टैपी लोकांच्या प्रदेशात दाखल होतात. माणसाचं मांस खाणाऱ्या या जमातीच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांचं नक्की काय होतं? या उत्कंठावर्धक अनुभवांची थरारक कहाणी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#हर्मन मेलव्हिल#भानू शिरधनकर#पाचूचे बेट# #HERMAN MELVILL#BHANU SHIRDHANKEAR#
Customer Reviews
  • Rating StarRashmi Sasane

    कालखंड कोणताही असो, एखाद्या दर्यावर्दी खलाशाचं जीवन हे नेहमीच रोमांचकारी घटनांनी भरलेले असतं. दर्यावरच्या मोहिमेत प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठीचा एक नवीनच अनुभव असतो. आजच्या विज्ञानयुगात माहिती मिळवण्याची अनेक साधने हाताशी आहेत. अनेकानेक गोष्टींविषीच ज्ञान सहजपणे मिळू शकतं. त्यामुळे कदाचित या सागरी मोहीमा थोड्याफार सुकर झालेयत, अस आपण नक्कीच म्हणू शकतो. पण जर समजा , हा कालखंड अठराव्या शतकातील असेल तर? ज्यावेळेस माहिती मिळवण्याची साधनं तुटपुंजी होती. अगदी समुद्राच्या एखाद्या भागाची, एखाद्या बेटाची माहिती मिळवायची असेल तर त्या भागात भेट देऊन आलेल्या व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून राहावं लागायचं. त्या व्यक्तीने दिलेली माहिती ही परीपूर्ण असेलच अस ही नव्हतं.पुढे ती माहिती एकमेकांना सांगताना तिखटमीठ लावून सांगितली जायची. आणि मग त्या माहितीच्या गुढरम्य कहाण्याच बनून जायच्या. ` Typee ` ही पण एक गुढरम्य कहाणीच आहे. १८४२ मध्ये हर्मन मेलव्हिल हा खलाशी एका सागरी मोहिमेत सहभागी झाला. या प्रवासातील घटनांचे शब्दचित्र म्हणजे हे पुस्तक, ` Typee ` या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केलाय भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. पँसिफिक महासागरात मासेमारीच्या मोहीमेसाठी जहाजे उतरत. या मोहिमा अगदी चार - पाच वर्षे सतत चालत. या मुदतीचं वर्णन करताना लेखक म्हणतो, या मोहिमेत सहभागी झालेले कोवळे तरुण आपल्या आईचा निरोप घेऊन रवाना झाले ते पुन्हा परत आपल्या बंदरात आले त्यावेळी अर्धम्हातारे झाले होते. जहाजावरील सोयी- सुविधांच्या अभावी निर्माण झालेली गचाळ परिस्थिती, कधीकधी जहाजाला मिळालेला विक्षिप्त, हट्टी कप्तान आणि महिनोनमहिने दुर्लभ झालेल जमिनीच दर्शन यामुळे या सागरी मोहिमा म्हणजे एक नाईटमेर असत. लेखक हर्मन मेलव्हिल ` डॉली ` नावाच्या जहाजावर खलाशी म्हणून सहभागी होतो. ही मोहिम एवढी लांबते की जहाजावरील अन्नधान्य संपत येऊ लागतं, जहाजावरील खलाशांच मनोधैर्य डळमळू लागत. आणि अशा परिस्थितीत लेखक जहाजावरुन फरार होण्याचा निर्णय घेतो, जो फार धोकादायक निर्णय असतो. नुकूहेवा नावाच्या बेटावर त्यांचे जहाज थोड्या काळासाठी थांबले असताना लेखक त्या जहाजावरुन फरार होण्यात यशस्वी होतो. यात त्याला जहाजावरचा आणखी एक खलाशी ही सामील होतो, ज्याचं नाव असतं, टॉबी. आणि इथून सुरु होते ,त्यांची थरारक, ` फरार - सफर `. या प्रवासाच वर्णन लेखकाने बहारदार केलयं. समुद्राच्या लगत असणाऱ्या बेटावरचं हवामान, वातावरण, उंचच उंच टोकदार डोंगर, खोल दऱ्या, घनदाट जंगलाने व्यापलेला परीसर अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर साकारतो. या बेटावरील रहिवासी तर खासचं. त्यांची पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारी जीवनशैली, त्यांची अगम्य भाषा आणि हो, त्यांच्या नरभक्षी असण्याच्या अफवा (?) शेवटी कितीही भिती वाटत असली , जीवघेणा धोका वाटत असला तरी या दोन फरार लोकांना या बेटावरच्या आदीम लोकांनाच धरून राहावं लागणार असतं. त्याप्रमाणे हे दोन फरार खलाशी त्यांच्या कल्पनेतही नसणारा असा अनपेक्षित धोकादायक प्रवास करून अखेरीस एका खोऱ्यात उतरतात....टैपी जमातीच्या खोऱ्यात. आणि ही टैपी जमात नरभक्षी म्हणून कुप्रसिद्ध असते. मग या दोन खलाशांना त्यांचा काय अनुभव येतो? ही सगळी कहाणी सांगण्यासाठी ते जिवंत कसे राहतात?सर्व दर्यावर्दी लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे हे टैपी लोक खरचं का नरभक्षी असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे. Typee हे पुस्तक म्हणजे लेखक हर्मन मेलव्हिल चा पोलिनीशीनय बेटावर घालवलेल्या चार महिन्यांचा ऐतिहासिक लेखाजोखा आहे की ज्यामध्ये हर्मन मेलव्हिल ने या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी वास्तवात घडल्या आहेत, असा दावा केलाय. १८४६ मध्ये पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकात वर्णन केलेल्या घटनांच्या सत्यतेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. हे पुस्तक म्हणजे कल्पनाविलास की वास्तविकता , यावर चर्चा घडू लागल्या होत्या. अगदी हर्मन मेलव्हिल नावाची व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे का? यावरही संशय घेतला जाऊ लागला होता. या वादळी चर्चा शिगेला पोहोचल्यावर ज्यावेळेस हर्मन मेलव्हिलची इतिहासकार म्हणून कारकीर्द धोक्यात येतीय अस वाटल्यावर , त्याने स्वतः त्याच्या डिफेन्स मध्ये एक निनावी लेख प्रकाशित करण्याचे ठरवले पण त्या आधीच या कथेची सत्यता सिद्ध करण्यासाठी लेखकाचा, त्याच्या फरार- मोहीमेतील दुसरा साथीदार, टोबी त्याच्या मदतीला आला. आणि त्याच्या साहाय्याने हर्मन मेलव्हिल ने Typee चा उत्तरार्ध, The story of Toby, A sequal of Typee लिहीला. त्यामुळे या पुस्तकाच्या सत्यतेविषयीचा उठलेला संशयाचा धुरळा खाली बसला. पुस्तकातील ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या कामाविषयीच्या नकारात्मक वर्णनावर पण काही वाचक नाराज होतेच, पण लेखक आपल्या त्या मतांवर ठाम राहिला. एकुणच Typee हे एका अज्ञात संस्कृती चे छोटेखानी दर्शन घडवणारं पुस्तक ठरतं. एका आयुष्यात अनेक प्रकारच्या आयुष्याचे अनुभव देण्याची क्षमता पुस्तकात असते , मग ते अनुभव आपल्यासाठी काल्पनिक का असेनात . त्यापैकी Typee हे पुस्तक आहे. अनुवादाविषयी:: Typee या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केला आहे, भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. अनुवाद इतका सुंदर, ओघवता झाला आहे की आपण एक अनुवाद वाचतोय हे लक्षातच येत नाही. ...Read more

  • Rating StarNaresh Mohare

    जेव्हा नविन नविन बेटानचा शोध लावला जात होता तेव्हा समुद्रा वरील बोटीतून 2खलाशी पळून जावुन जंगलात जातात आणि तेथे ते जंगलातील नर भक्षक लोकाना भेटतात आणि त्याच्या सोबत काढलेल्या दिवसाचे वर्णन लेखकाने येथे दिले आहेत. वेळ काढून नक्की वाचा.

  • Rating StarKaushik Lele

    युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा काळात इ.स. १८४१ मध्ये या पुस्तकाचा लेखक हर्मन दक्षिण अमेरिकेजवळच्या महासागरात एका समुद्र सफरीवर निघालेल्या जहाजात खलाशी होता. त्यांचे जहाज सतत सहा महिने समुद्रात फिरत होते. शेवटी एकदा त्यांना जमीनदिसली ती पॉलिनेशियन बेटांची. प्रवासाला कंटाळलेला हा खलाशी जहाजावरुन पळून जाऊन त्या बेटांवरच राहायचा बेत आखतो. बोटीवरचा अजून एक जण त्याच्या बरोबर साथ द्यायला तयार होतो. जहाजापासून दूर पळून जातात. बेटावर निसर्गाच्या सान्निध्यात फळं, कंद खात मस्त राहू अशी त्यांची कल्पना. पण कसलं काय. खडतर दिवस त्यांच्या समोर उभे राहतात. डोंगर दऱ्या ओलांडून, भुके तहानलेले राहून ते शेवटी पोचतात त्या बेटावरच्या नरभक्षक “टैपी” लोकांच्या प्रदेशात. आता आपले दिवस भरले अशी त्यांची कल्पना झाली. पण त्या आदिवासींनी त्यांना ठार मारलं नाहीच; उलट त्यांचं चांगलं स्वागत केलं, पाहुणचार केला. त्यांच्या दुखण्यावर उपचार केले. चार दिवस पाहुणचार घेऊन निघू असा विचार केल्यावर मात्र त्यांच्यापुढे नवंच आव्हान उभं राहिलं. ते आदिवासी त्यांना सोडायलाच तयार नव्हते. ते आदिवासी आपला प्रेमाने पाहुणचार करतायत का पुढेमागे बळी देणाऱ्याची तयारी अश्या द्विधा मनःस्थितीत दोघं तिथे राहिले. बरेच महिने राहिले. युरोपियन खलाशी आणि ख्रिश्चन धर्मोपदेशकांनीं जशी “टैपी” लोकांची प्रतिमा रंगवली होती तसे ते क्रूर नव्हते. या आदिवासिंची संस्कृती जवळून बघितली तेव्हा त्याला जाणवलं की युरोपियन लोकांपेक्षा हे लोक खूप मागास असले तरी निसर्गाशी एकरूप झालेले आहेत, त्यांचा त्यांचा दिनक्रम आनंदाने जगतायत. तथाकथित “प्रगत”, “धार्मिक” जगापेक्षा त्यांची समाजव्यवस्था उलट कमी समस्यांची आहे. युरोपियन लोकांमुळेच उलट इथे रोगराई वाढते आहे असं त्याचं मत बनलं . लेखकाला या बेटावरचं जग कसं दिसलं, टैपी लोकांचं खानपान, धार्मिक विधी, मनोरंजनाची साधनं, स्त्रीपुरुष समाजरचना, प्राणिवैविध्य, झाडं-झुडपं असं त्याला जे जे काही दिसलं, जसं दिसलं त्याचं वर्णन त्याने या पुस्तकात केलं आहे. ललित स्वरूपात लिहिलेला एक रिपोर्टच. पुस्तकातली ही काही पानं वाचा म्हणजे कल्पना येईल या बेटांची आधी थोडी ओळख करून घेऊया ...Read more

  • Rating StarHemant Latkar

    छान आहे.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more