* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BY GOD, I DID NOT TOUCH WINE, I DID NOT DRINK IT. UNNECESSARILY DO NOT BLAME ME.` AS RAU KHOT TOTALLY REFUSED EVERYONE PRESENT WAS ASTONISHED, THEY ALL STARTED LAUGHING HEARTILY. SEEING THIS RAU KHOT SAID, DO NOT LAUGH AT ME, I AM TELLING YOU THE TRUTH. I DID NOT DRINK.` RAMBHAU SAID WITH A SMILE,MY DEAR, YOUR EYES ARE DECEIVING YOU.ANNA, WHAT ARE MY EYES SAYING? NOW JUST SHUT UP FOR GOD`S SAKE.OH, YOU MEAN TO SAY THAT WE SHOULD KEEP QUIET TILL YOU ARE OFF THE HANGOVER?BUT AS I DID NOT DRINK, SO THERE IS NO QUESTION OF A HANGOVER!ARE YOU STILL DENYING THAT YOU ARE HAVING A HANGOVER?DO NOT MENTION IT AT ALL. I DID NOT EVEN TOUCH IT, FORGET ABOUT HAVING IT.` ONE OF THE SPECTATORS CAME FORWARD AND SAID LOUDLY, IF YOU DID NOT EVEN TOUCH IT, THEN WHY WERE YOU HIDING?OH! NOW LOOK, WHAT ARE YOU TALKING ABOUT? WHY DO YOU THINK I WAS HIDING?YES, YOU WERE HIDING ON THE LOFT, OTHERWISE, WHY WOULD YOU GO THERE?WHAT WAS I DOING ON THE LOFT? WHAT A QUESTION, I WAS FAST ASLEEP ON THE LOFT. WHY SO? WAS THERE NO SPACE ON THE GROUND BELOW?` WHY ARE YOU SO CONCERNED WITH IT? IT IS NONE OF YOUR BUSINESS. I WILL SLEEP WHEREVER I PLEASE, BE IT THE GROUND OR THE LOFT.` LISTENING TO RAU`S DIALOGUE EVERYONE AGAIN STARTED LAUGHING HEARTILY.
‘‘म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.’’ राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, ‘‘हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई.’’ रामभाऊ हसून म्हणाले – ‘‘गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!’’ ‘‘अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा.’’ ‘‘उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?’’ ‘‘अहो, काय चढलीया काय मला?’’ ‘‘अजून चढली न्हाई म्हणतोस?’’ ‘‘अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नगा. शिवल्याला न्हाई म्या त्याला!’’ एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, ‘‘शिवल्यालं न्हाई, तर मग दडून का बसला होतास?’’ ‘‘शेबास! मी काय दडून बसलो होतो काय?’’ ‘‘दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास?’’ ‘‘माळ्यावर काय करतोय! गडद झोपलो होतो?’’ ‘‘मग खाली जागा नव्हती काय?’’ ‘‘ते तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू!’’ राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.
DHIND
No Records Found
No Records Found
Keywords
#GARVEL#JALE#UMALA#TAKICHEGHAV#KARVAN#AAG#AANN#EKJORDARKARYAKARTA#DHANYADHANYAHANARDEHO#RANDAVPUNAV#MIFEDALELEEKKARJ#GHAT#STORYANIBANITALI#NEMANEMI#DAV#MITING#KHADDA#KADHANI#
Customer Reviews
  • Rating StarRitika Mohan

    Atishay oghavatya shailit lihilel sundar pustak.....

  • Rating StarAbhijit Kalane

    शंकर पाटलांची एक एक कथा म्हणजे टॉनिक गोळी सारखी आहे.. रटाळ जीवनात तरतरी देवून जातात...!

  • Rating StarDAINIK AIKYA 08-07-2007

    ग्रामीण ढंगाच्या अस्सल कथा… ग्रामीण कथाकार म्हणून लोकप्रिय ठरलेल्या, गावरान बोलीचा ठसका प्रकट करणाऱ्या शंकर पाटील यांचे कथासंग्रह नव्या देखण्या स्वरुपात मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे मराठी रसिकांच्या भेटीला आले आहेत. शंकर पाटील यांची कोल्हापूरकडील गावरन बोलीभाषा, चटपटीत संभाषणांचा इरसाल बेरकीपणा, ग्रामीण जीवनातला पिढीजात शहाणपणा, परंपरेचा सामूहिक अंत:स्तर आणि कथानिवेदनातील उत्कंठावर्धक अनपेक्षित बाज यांनी मराठी ग्रामीण साहित्य आणि चित्रपटांना सत्तर-ऐंशीच्या दशकात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अस्सल मराठी मातीचा कणखरपणा आणि बेरकीपणा पाटील यांनी जसा पकडला, तसा तो इतर लेखकांना सहजी पकडता आला नाही. कथाकथनाच्या माध्यमातून अनुभवविश्वात स्थानापन्न केले आणि खेड्यांपासून मनोमन दूर गेलेल्या नगरजनांनाही आपली नाळ नेमकी कुठे जोडलेली आहे हे उत्कटपणे दाखवून दिले. पाटलांच्या कथा केवळ ग्रामीण जीवनदर्शन घडवत नाहीत, केवळ गावरान किस्से सांगून थांबत नाहीत, शहरी वाचकांचे दोन क्षण नर्मविनोदी हास्याने रंजन करावे एवढ्यापुरती ती कथा मर्यादित नाही असे डॉ. भालचंद्र फडके यांच्या सारख्या अभ्यासकाचे मत आहे. पाटील यांच्या एकूणच लेखनामागे सामाजिक जाणीव आहे. ज्या समाजव्यवस्थेत ग्रामीण मन वाढत आहे त्यात स्वातंत्र्य-समता-बंधुता अशा मूल्यांची चपखल रुजवण झालेली नाही याची त्यांना मनोमन खंत वाटते; जे परिवर्तन घडते आहे ते बेगडी आहे, पुस्तकी आहे, फसवे आहे, हे ग्रामीण भागात पदोपदी जाणवते. त्याबद्दल ते आतून धुमसत असतात. खेड्यातील आर्थिक स्थित्यंतराचे ग्रामीण समाजमनावर उमटणारे पडसाद- सरंजामशाही मनोवृत्तीला हादरा देण्याएवढे जोरदार नाहीत याचेही शल्य त्यांना जाणवत असावे. पाटील यांच्या आयुष्यातील पहिली पंधरा वीस वर्षे खेड्यात गेली. त्यामुळे त्या खेड्यापाड्यातील बारा बलुत्यातील शेकडो व्यक्ती आणि शेकडो घटना त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या त्या व्यक्तींना, त्या घटनांना अस्सल कोल्हापुरी बोलीत जिवंत करण्याची त्याची हातोटी विलोभनीयच! त्यामुळे आता खेडी बदलत असली तरी पाटलांच्या या कथांतील माणसे आणि घटना अजूनही आपल्याला साद घालू शकतात. ‘धिंड’ ही कथा पाटील यांच्या लेखनाची सगळी वैशिष्ट्ये प्रकट करणारी आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा त्यांच्या गाजलेल्या कथांमध्ये गणली जाते. जो कोणी मद्य प्राशन करील त्याची गावातून धिंड काढायची असा ठराव ग्रामपंचायतीत १५ ऑगस्टला मंजूर होतो आणि चार दिवसांनी तशी पहिलीच केस राऊ खोताची मिळते, तेव्हा सगळ्या गावात एकच धमाल उडते. भातमाऱ्याचा शिरपा धापा टाकत चावडीत येतो आणि राऊ खोत दारु पिऊन हाल्ट झालाय... घरातच बायकोसंग धुमडी घालतोय अशी बातमी देतो. पाटील आपले बूड हलवत पुढं झुकून नव्या हुरुपानं ह-ह-ह करीत समद्यांना आज्ञा देतात, ‘अरं बघा बघा, त्याला घेऊन या जाव!’ तराळाला ते सांगतात, ‘बघत काय ऱ्हायलाईस?’ खोताचा रा, दारू पिऊन हाल्ट झालाय... अगुदर दवंडी द्यायला भाईर पड. पाक सारं गाव गोळा व्हायला पाहिजे. सूट म्हणावं. राऊ खोताची गाढवावरनं धिंड काढायची हाय. लगोलग सगळे चावडीवर या. ऐका हो ऐका. चावडीवर लगेच ही गर्दी होते. पंचमंडळी येतात. राऊ खोत येताच पोरं शिट्ट्या मारू लागतात. गाढव उधळतं, सरपंच रामभाऊ विभुते खोताला विचारतात. ‘दारू प्यालास की न्हाई?’’ गुन्हा कबूल हाय का न्हाई? खोत नागाच्या फडीगत झुलल्यागत म्हणतो, ‘‘म्या दारुला शिवला न्हाई’... उगा इनकारणी माझ्यावर अदावत घेऊ नका. ‘मग माळ्यावर तिनीसांजचा काय करत होतास? गडद झोपलो होतो. दारू घेतली न्हवतीस तर घरात बायकूसंग वाद का घालत होतास? मग कुणासंग वाद घालायचा? तुमच्याबरोबर कबूल कर. वास घ्या की त्याच्या तोंडाचा. सबंध चावडीत वास दरवळत होता. वास याचाच की! त्यो तुमच्या नाकात बसलायगा. पाटील मग शेवटचा फ़ैसला सुनावतात. काय लागलाय त्याच्या नादाला?सबंध चावडी घानाय लागलीय. भपकारा याय लागलाय...ते काय सुद्दीत न्हाय... सरळ बोलेना. उचला आणि ठेवा गाढवावर याला. राऊ खोताला गाढवावर उलटं बसवतात. तोंड मागं, पाठ पुढं, खेटराची माळ घालतात. बचकभर गुलाल उधळतात. लेजीम, हलगी, एकच गदारोळ. मारू लागतो. डांग टिकटाक टिक डांग टिकटिक. त्याच्या त्या नादावर लोक नाचू लागतात. गल्लीबोळानं धिंड फिरते. रात्रीचे दोन वाजतात. राऊ तरीही गाडवावरनं उतरायला नकार देतो. अजून म्हारुडा ऱ्हायलाय, मांगुडा ऱ्हायलाय... संबंध गाव म्हंजे संबंध गाव पालथा घालय पायजे. अर्धी धिंड काढता का माझी? लोक दमून गेल्यात. तुला हौस असंल तर उद्या परत फिरु, रामभाऊ समजावू पाहतात. उद्याचं काय नका सांगू... ते कोण चाललेत परत? बोलवा त्यांना... राऊ कुणाल जाऊ देईना. मधनं गेलं तर त्याच्या सात पिढ्या भाईर काढीन अशी धमकी तो देतो. अखेर चांदणी उगवेपर्यंत ही धिंड चालू राहते. रात्रीच्या जागरणानं आणि दमणुकीनं लोक घरोघर निवांत घोरत पडतात. तिसऱ्या प्रहरी राऊ खोत चावडीवर येतो. सगळे सनदी गोळी लागून गडद झोपलेले. राऊ तराळला सांगतो, दवंडी द्याला भाईर पड... येळ घालवू नको. वाजापाची जोडणी करा. पाटील, सरपंच, पंच सारा लवाजमा गोळा करा. नव्या धिंडीची तयारी चालू होते. गावात पिणाऱ्याचा काय तोटा? ग्राम पंचायतीने ठराव केला म्हणून काय झाले? ठरावाने पिणारे थांबतात थोडेच? पकडले जायची भीती... पण तीही किती दिवस वाटणार? ग्रामीण भागातील ही वास्तवता... नाट्यपूर्ण शैलीत धिंड द्वारे समोर येते. समाजातले वेगवेगळे घटक, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांची विशिष्ट कामे वा व्यवसाय... या सर्वांचा कोलाज त्यातून उभा राहतो. शंकर पाटील यांची कुठलीही कथा घ्या. संभाषणातून ती फुलत जाते, खुलत जाते. उलगडत जाते. तिच्यातला विनोद नकळत होत असतो. बोलणाऱ्यातला आपण विनोदी काही बोलतोय याची कल्पनाही बहुतांशी नसते. तमाशा या कथेत देसायांचे तीन गडी खळ्याजवळ रात्री राखणीला बसलेले असतात. जवळच जत्रेत तमाशा चालू असतो. त्या तमाशाला जाण्याची तिघांनाही अनावर इच्छा असते. आता तमाशाला जायचे तरी कसे? ते वेगवेगळे पर्याय विचारात घेतात. एका वेळी दोघांनी जायचे– एकाने राखण करायची. पण मग तू बघायला जाणार- आम्ही काय मांजर मारलंय व्हय? मी काय घोडं मारलंय व्हयं? म्हणजे एक आंबा आणि खाणार तिघं. त्यो कापायचा न्हाई, सोलायचा न्हाई, पिळायचा न्हाई, अन वर तूबी खा आणि आम्हालाही दे, असंच बोलणं आहे तुमचं. आंबा एक त्याला अडवणूक अशी! मग आपण सगळेच गेलो तर? ... आणि चोर आले तर? तीन गडी खळ्याभोवतीनं पडलेत असा सगळा सीन करायचा- लवकरच माघारी यायचं. विरुबाच्या नावानं चांगभलं करू अन् फेडा धोतरं... बांधा एकमेकाला. तेवढ्यात मालक येताना दिसतो आणि सगळ्यांना घाम फुटतो. अशा वेगवेगळ्या घटनांची मालिका उभी करतानाही शंकर पाटील शक्य तेवढे पर्याय पेश करतात. कथेची लांबण त्यामुळे कधीकधी वाढत जाते. परंतु कुठलाही पर्याय डावलला गेला असे वाटू नये यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे आज या कथा वाचताना ग्रामीण मानसिकतेबरोबर कथाकार म्हणून तपशीलातील बारकाव्यांवर भरपूर मेहनत घेणारे शंकर पाटील यांचे निवेदन कौशल्यही आपल्याला खिळवून ठेवते. ...Read more

  • Rating StarKOLHAPUR SAHITYA PARAMPARA 15-9-2009

    ‘कथा सांगती जनक कथांचे’ कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या भागात शंकर पाटील यांचा धावता उल्लेख झाला. पण साहित्यक्षेत्रातील त्यांची कारकीर्द अशी धावत्या उल्लेखापुरती नाही. शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ ला पट्टणकोडोलीत झाला. ‘धिंड’, ‘नाटक’, ‘िटिंग’, ‘तक्रार’ यांसारख्या त्यांच्या कथा कथनाच्या शैलीमुळे खूप लोकप्रिय झाल्या हे खरे असले तरी प्रारंभीच्या काळात शंकर पाटील यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर साहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले. १९५९ साली एशिया फाउंडेशनकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीतून शंकर पाटलांनी ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करत ‘टारफुला’ नावाची एक कादंबरी लिहिली. १९६० ते ७० हा शंकर पाटील यांच्या बहराचा काळ. याच सुमारास त्यांनी आठवी ते दहावी इयत्तांसाठी ग.प्र.प्रधान यांच्यासमवेत ‘साहित्य सरिता’ या वाचनमालेचे संपादन केले. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयाचे विशेष अधिकारी म्हणूनही श्री. पाटील यांनी काम केले. ‘वळीव’ हा त्यांचा प्रकाशित झालेला पहिला कथासंग्रह होता. त्यानंतर ‘भेटीगाठी’, ‘धिंड’, ‘वावरी शेंग’, ‘खुळ्याची चावडी’, ‘फक्कड गोष्टी’, ‘खेळखंडोबा’, ‘आभाळ’, असे अनेक कथासंग्रह देणाऱ्या शंकर पाटील यांनी ‘गल्ली ते दिल्ली’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, यासारखी वगनाट्येही लिहिली. ‘पिंजरा’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पाहुणी’, ‘लक्ष्मी’, ‘भुजंग’, या गाजलेल्या मराठी चित्रपटासंसाठीही त्यांनी लेखन केले होते. या ग्रामीण कथाकाराला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविण्याची संधी मिळाली. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more