* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DHIND
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668087
  • Edition : 26
  • Publishing Year : FEBRUARY 1995
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BY GOD, I DID NOT TOUCH WINE, I DID NOT DRINK IT. UNNECESSARILY DO NOT BLAME ME.` AS RAU KHOT TOTALLY REFUSED EVERYONE PRESENT WAS ASTONISHED, THEY ALL STARTED LAUGHING HEARTILY. SEEING THIS RAU KHOT SAID, DO NOT LAUGH AT ME, I AM TELLING YOU THE TRUTH. I DID NOT DRINK.` RAMBHAU SAID WITH A SMILE,MY DEAR, YOUR EYES ARE DECEIVING YOU.ANNA, WHAT ARE MY EYES SAYING? NOW JUST SHUT UP FOR GOD`S SAKE.OH, YOU MEAN TO SAY THAT WE SHOULD KEEP QUIET TILL YOU ARE OFF THE HANGOVER?BUT AS I DID NOT DRINK, SO THERE IS NO QUESTION OF A HANGOVER!ARE YOU STILL DENYING THAT YOU ARE HAVING A HANGOVER?DO NOT MENTION IT AT ALL. I DID NOT EVEN TOUCH IT, FORGET ABOUT HAVING IT.` ONE OF THE SPECTATORS CAME FORWARD AND SAID LOUDLY, IF YOU DID NOT EVEN TOUCH IT, THEN WHY WERE YOU HIDING?OH! NOW LOOK, WHAT ARE YOU TALKING ABOUT? WHY DO YOU THINK I WAS HIDING?YES, YOU WERE HIDING ON THE LOFT, OTHERWISE, WHY WOULD YOU GO THERE?WHAT WAS I DOING ON THE LOFT? WHAT A QUESTION, I WAS FAST ASLEEP ON THE LOFT. WHY SO? WAS THERE NO SPACE ON THE GROUND BELOW?` WHY ARE YOU SO CONCERNED WITH IT? IT IS NONE OF YOUR BUSINESS. I WILL SLEEP WHEREVER I PLEASE, BE IT THE GROUND OR THE LOFT.` LISTENING TO RAU`S DIALOGUE EVERYONE AGAIN STARTED LAUGHING HEARTILY.
‘‘म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.’’ राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, ‘‘हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई.’’ रामभाऊ हसून म्हणाले – ‘‘गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!’’ ‘‘अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा.’’ ‘‘उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?’’ ‘‘अहो, काय चढलीया काय मला?’’ ‘‘अजून चढली न्हाई म्हणतोस?’’ ‘‘अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नगा. शिवल्याला न्हाई म्या त्याला!’’ एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, ‘‘शिवल्यालं न्हाई, तर मग दडून का बसला होतास?’’ ‘‘शेबास! मी काय दडून बसलो होतो काय?’’ ‘‘दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास?’’ ‘‘माळ्यावर काय करतोय! गडद झोपलो होतो?’’ ‘‘मग खाली जागा नव्हती काय?’’ ‘‘ते तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू!’’ राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.
DHIND
No Records Found
No Records Found
Keywords
#GARVEL#JALE#UMALA#TAKICHEGHAV#KARVAN#AAG#AANN#EKJORDARKARYAKARTA#DHANYADHANYAHANARDEHO#RANDAVPUNAV#MIFEDALELEEKKARJ#GHAT#STORYANIBANITALI#NEMANEMI#DAV#MITING#KHADDA#KADHANI#
Customer Reviews
  • Rating StarRitika Mohan

    Atishay oghavatya shailit lihilel sundar pustak.....

  • Rating StarAbhijit Kalane

    शंकर पाटलांची एक एक कथा म्हणजे टॉनिक गोळी सारखी आहे.. रटाळ जीवनात तरतरी देवून जातात...!

  • Rating StarDAINIK AIKYA 08-07-2007

    ग्रामीण ढंगाच्या अस्सल कथा… ग्रामीण कथाकार म्हणून लोकप्रिय ठरलेल्या, गावरान बोलीचा ठसका प्रकट करणाऱ्या शंकर पाटील यांचे कथासंग्रह नव्या देखण्या स्वरुपात मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे मराठी रसिकांच्या भेटीला आले आहेत. शंकर पाटील यांची कोल्हापूरकडील गावरन बोलीभाषा, चटपटीत संभाषणांचा इरसाल बेरकीपणा, ग्रामीण जीवनातला पिढीजात शहाणपणा, परंपरेचा सामूहिक अंत:स्तर आणि कथानिवेदनातील उत्कंठावर्धक अनपेक्षित बाज यांनी मराठी ग्रामीण साहित्य आणि चित्रपटांना सत्तर-ऐंशीच्या दशकात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अस्सल मराठी मातीचा कणखरपणा आणि बेरकीपणा पाटील यांनी जसा पकडला, तसा तो इतर लेखकांना सहजी पकडता आला नाही. कथाकथनाच्या माध्यमातून अनुभवविश्वात स्थानापन्न केले आणि खेड्यांपासून मनोमन दूर गेलेल्या नगरजनांनाही आपली नाळ नेमकी कुठे जोडलेली आहे हे उत्कटपणे दाखवून दिले. पाटलांच्या कथा केवळ ग्रामीण जीवनदर्शन घडवत नाहीत, केवळ गावरान किस्से सांगून थांबत नाहीत, शहरी वाचकांचे दोन क्षण नर्मविनोदी हास्याने रंजन करावे एवढ्यापुरती ती कथा मर्यादित नाही असे डॉ. भालचंद्र फडके यांच्या सारख्या अभ्यासकाचे मत आहे. पाटील यांच्या एकूणच लेखनामागे सामाजिक जाणीव आहे. ज्या समाजव्यवस्थेत ग्रामीण मन वाढत आहे त्यात स्वातंत्र्य-समता-बंधुता अशा मूल्यांची चपखल रुजवण झालेली नाही याची त्यांना मनोमन खंत वाटते; जे परिवर्तन घडते आहे ते बेगडी आहे, पुस्तकी आहे, फसवे आहे, हे ग्रामीण भागात पदोपदी जाणवते. त्याबद्दल ते आतून धुमसत असतात. खेड्यातील आर्थिक स्थित्यंतराचे ग्रामीण समाजमनावर उमटणारे पडसाद- सरंजामशाही मनोवृत्तीला हादरा देण्याएवढे जोरदार नाहीत याचेही शल्य त्यांना जाणवत असावे. पाटील यांच्या आयुष्यातील पहिली पंधरा वीस वर्षे खेड्यात गेली. त्यामुळे त्या खेड्यापाड्यातील बारा बलुत्यातील शेकडो व्यक्ती आणि शेकडो घटना त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या त्या व्यक्तींना, त्या घटनांना अस्सल कोल्हापुरी बोलीत जिवंत करण्याची त्याची हातोटी विलोभनीयच! त्यामुळे आता खेडी बदलत असली तरी पाटलांच्या या कथांतील माणसे आणि घटना अजूनही आपल्याला साद घालू शकतात. ‘धिंड’ ही कथा पाटील यांच्या लेखनाची सगळी वैशिष्ट्ये प्रकट करणारी आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा त्यांच्या गाजलेल्या कथांमध्ये गणली जाते. जो कोणी मद्य प्राशन करील त्याची गावातून धिंड काढायची असा ठराव ग्रामपंचायतीत १५ ऑगस्टला मंजूर होतो आणि चार दिवसांनी तशी पहिलीच केस राऊ खोताची मिळते, तेव्हा सगळ्या गावात एकच धमाल उडते. भातमाऱ्याचा शिरपा धापा टाकत चावडीत येतो आणि राऊ खोत दारु पिऊन हाल्ट झालाय... घरातच बायकोसंग धुमडी घालतोय अशी बातमी देतो. पाटील आपले बूड हलवत पुढं झुकून नव्या हुरुपानं ह-ह-ह करीत समद्यांना आज्ञा देतात, ‘अरं बघा बघा, त्याला घेऊन या जाव!’ तराळाला ते सांगतात, ‘बघत काय ऱ्हायलाईस?’ खोताचा रा, दारू पिऊन हाल्ट झालाय... अगुदर दवंडी द्यायला भाईर पड. पाक सारं गाव गोळा व्हायला पाहिजे. सूट म्हणावं. राऊ खोताची गाढवावरनं धिंड काढायची हाय. लगोलग सगळे चावडीवर या. ऐका हो ऐका. चावडीवर लगेच ही गर्दी होते. पंचमंडळी येतात. राऊ खोत येताच पोरं शिट्ट्या मारू लागतात. गाढव उधळतं, सरपंच रामभाऊ विभुते खोताला विचारतात. ‘दारू प्यालास की न्हाई?’’ गुन्हा कबूल हाय का न्हाई? खोत नागाच्या फडीगत झुलल्यागत म्हणतो, ‘‘म्या दारुला शिवला न्हाई’... उगा इनकारणी माझ्यावर अदावत घेऊ नका. ‘मग माळ्यावर तिनीसांजचा काय करत होतास? गडद झोपलो होतो. दारू घेतली न्हवतीस तर घरात बायकूसंग वाद का घालत होतास? मग कुणासंग वाद घालायचा? तुमच्याबरोबर कबूल कर. वास घ्या की त्याच्या तोंडाचा. सबंध चावडीत वास दरवळत होता. वास याचाच की! त्यो तुमच्या नाकात बसलायगा. पाटील मग शेवटचा फ़ैसला सुनावतात. काय लागलाय त्याच्या नादाला?सबंध चावडी घानाय लागलीय. भपकारा याय लागलाय...ते काय सुद्दीत न्हाय... सरळ बोलेना. उचला आणि ठेवा गाढवावर याला. राऊ खोताला गाढवावर उलटं बसवतात. तोंड मागं, पाठ पुढं, खेटराची माळ घालतात. बचकभर गुलाल उधळतात. लेजीम, हलगी, एकच गदारोळ. मारू लागतो. डांग टिकटाक टिक डांग टिकटिक. त्याच्या त्या नादावर लोक नाचू लागतात. गल्लीबोळानं धिंड फिरते. रात्रीचे दोन वाजतात. राऊ तरीही गाडवावरनं उतरायला नकार देतो. अजून म्हारुडा ऱ्हायलाय, मांगुडा ऱ्हायलाय... संबंध गाव म्हंजे संबंध गाव पालथा घालय पायजे. अर्धी धिंड काढता का माझी? लोक दमून गेल्यात. तुला हौस असंल तर उद्या परत फिरु, रामभाऊ समजावू पाहतात. उद्याचं काय नका सांगू... ते कोण चाललेत परत? बोलवा त्यांना... राऊ कुणाल जाऊ देईना. मधनं गेलं तर त्याच्या सात पिढ्या भाईर काढीन अशी धमकी तो देतो. अखेर चांदणी उगवेपर्यंत ही धिंड चालू राहते. रात्रीच्या जागरणानं आणि दमणुकीनं लोक घरोघर निवांत घोरत पडतात. तिसऱ्या प्रहरी राऊ खोत चावडीवर येतो. सगळे सनदी गोळी लागून गडद झोपलेले. राऊ तराळला सांगतो, दवंडी द्याला भाईर पड... येळ घालवू नको. वाजापाची जोडणी करा. पाटील, सरपंच, पंच सारा लवाजमा गोळा करा. नव्या धिंडीची तयारी चालू होते. गावात पिणाऱ्याचा काय तोटा? ग्राम पंचायतीने ठराव केला म्हणून काय झाले? ठरावाने पिणारे थांबतात थोडेच? पकडले जायची भीती... पण तीही किती दिवस वाटणार? ग्रामीण भागातील ही वास्तवता... नाट्यपूर्ण शैलीत धिंड द्वारे समोर येते. समाजातले वेगवेगळे घटक, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांची विशिष्ट कामे वा व्यवसाय... या सर्वांचा कोलाज त्यातून उभा राहतो. शंकर पाटील यांची कुठलीही कथा घ्या. संभाषणातून ती फुलत जाते, खुलत जाते. उलगडत जाते. तिच्यातला विनोद नकळत होत असतो. बोलणाऱ्यातला आपण विनोदी काही बोलतोय याची कल्पनाही बहुतांशी नसते. तमाशा या कथेत देसायांचे तीन गडी खळ्याजवळ रात्री राखणीला बसलेले असतात. जवळच जत्रेत तमाशा चालू असतो. त्या तमाशाला जाण्याची तिघांनाही अनावर इच्छा असते. आता तमाशाला जायचे तरी कसे? ते वेगवेगळे पर्याय विचारात घेतात. एका वेळी दोघांनी जायचे– एकाने राखण करायची. पण मग तू बघायला जाणार- आम्ही काय मांजर मारलंय व्हय? मी काय घोडं मारलंय व्हयं? म्हणजे एक आंबा आणि खाणार तिघं. त्यो कापायचा न्हाई, सोलायचा न्हाई, पिळायचा न्हाई, अन वर तूबी खा आणि आम्हालाही दे, असंच बोलणं आहे तुमचं. आंबा एक त्याला अडवणूक अशी! मग आपण सगळेच गेलो तर? ... आणि चोर आले तर? तीन गडी खळ्याभोवतीनं पडलेत असा सगळा सीन करायचा- लवकरच माघारी यायचं. विरुबाच्या नावानं चांगभलं करू अन् फेडा धोतरं... बांधा एकमेकाला. तेवढ्यात मालक येताना दिसतो आणि सगळ्यांना घाम फुटतो. अशा वेगवेगळ्या घटनांची मालिका उभी करतानाही शंकर पाटील शक्य तेवढे पर्याय पेश करतात. कथेची लांबण त्यामुळे कधीकधी वाढत जाते. परंतु कुठलाही पर्याय डावलला गेला असे वाटू नये यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे आज या कथा वाचताना ग्रामीण मानसिकतेबरोबर कथाकार म्हणून तपशीलातील बारकाव्यांवर भरपूर मेहनत घेणारे शंकर पाटील यांचे निवेदन कौशल्यही आपल्याला खिळवून ठेवते. ...Read more

  • Rating StarKOLHAPUR SAHITYA PARAMPARA 15-9-2009

    ‘कथा सांगती जनक कथांचे’ कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या भागात शंकर पाटील यांचा धावता उल्लेख झाला. पण साहित्यक्षेत्रातील त्यांची कारकीर्द अशी धावत्या उल्लेखापुरती नाही. शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ ला पट्टणकोडोलीत झाला. ‘धिंड’, ‘नाटक’, ‘िटिंग’, ‘तक्रार’ यांसारख्या त्यांच्या कथा कथनाच्या शैलीमुळे खूप लोकप्रिय झाल्या हे खरे असले तरी प्रारंभीच्या काळात शंकर पाटील यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर साहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले. १९५९ साली एशिया फाउंडेशनकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीतून शंकर पाटलांनी ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करत ‘टारफुला’ नावाची एक कादंबरी लिहिली. १९६० ते ७० हा शंकर पाटील यांच्या बहराचा काळ. याच सुमारास त्यांनी आठवी ते दहावी इयत्तांसाठी ग.प्र.प्रधान यांच्यासमवेत ‘साहित्य सरिता’ या वाचनमालेचे संपादन केले. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयाचे विशेष अधिकारी म्हणूनही श्री. पाटील यांनी काम केले. ‘वळीव’ हा त्यांचा प्रकाशित झालेला पहिला कथासंग्रह होता. त्यानंतर ‘भेटीगाठी’, ‘धिंड’, ‘वावरी शेंग’, ‘खुळ्याची चावडी’, ‘फक्कड गोष्टी’, ‘खेळखंडोबा’, ‘आभाळ’, असे अनेक कथासंग्रह देणाऱ्या शंकर पाटील यांनी ‘गल्ली ते दिल्ली’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, यासारखी वगनाट्येही लिहिली. ‘पिंजरा’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पाहुणी’, ‘लक्ष्मी’, ‘भुजंग’, या गाजलेल्या मराठी चित्रपटासंसाठीही त्यांनी लेखन केले होते. या ग्रामीण कथाकाराला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविण्याची संधी मिळाली. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more