DR. L. C. GUPTA

About Author


ABOUT FIFTEEN YEARS AGO AN ALLOPATHIC DOCTOR CALLED DR. A. K. SAXENA WAS INFORMED ABOUT THE TECHNIQUE OF ACUPRESSURE. CHANDIGARH DR. DR. ATTAR SINGH TAUGHT SAXENA THE ART AND TECHNIQUE OF ACUPRESSURE. AFTER THAT, USING THE TECHNIQUE OF ACUPRESSURE, DR. SAXENA STARTED TREATING HER FAMILY AND FRIENDS.

साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी एका अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरने डॉ. ए. के. सक्सेना यांना अ‍ॅक्युपे्रशर या तंत्राची माहिती दिली. चंदीगड येथील डॉ. अत्तार सिंग यांनी डॉ. सक्सेना यांना अ‍ॅक्युप्रेशरची कला व तंत्र शिकविले. त्यानंतर अ‍ॅक्युप्रेशरच्या तंत्राचा वापर करून डॉ. सक्सेना यांनी आपले कुटुंबीय व मित्रांवर उपचार करण्यास सुरुवात केली. या उपचाराचे उत्तम परिणाम दिसून आल्यावर त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि या अपारंपरिक उपचार पद्धतीचा प्रचार करण्यास डॉ. सक्सेना यांनी सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट प्रसारमाध्यमांचाही उपयोग करून घेतला. या उपचारपद्धतीबाबत सामान्य जनात जनजागृती करण्यासाठी तसेच लोकांना आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव करून देण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ इंडिया’ने डॉ. सक्सेना यांना मदतीचा हात दिला. डॉ. सक्सेना यांनी २५००पेक्षाही अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. हे रुग्ण विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त झाले होते. त्यांचे रुग्ण हे जवळजवळ सर्व क्षेत्रांशी निगडित होते. अगदी सामान्य माणसे, नोकरशहा, न्यायाधीश, पोलिसदलातील विविध अधिकारी, लष्करी अधिकारी इत्यादी सर्व क्षेत्रातील लोकांनी डॉक्टर सक्सेनांकडून उपचार घेतले आहेत. डॉ. सक्सेना यांनी अनेक लोकांना अ‍ॅक्युप्रेशरचे तंत्र शिकविले आहे. या उपचारपद्धतीस फार मोठे यश मिळाले आहे. या तंत्रास लवकरच उपचारपद्धती म्हणून मान्यता मिळेल. डॉ. सक्सेना यांनी अनेक वरिष्ठ अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांवर या तंत्राचा वापर करून यशस्वी उपचार केले आहे. याचा परिणाम म्हणून हे डॉक्टर्सदेखील अ‍ॅक्युप्रेशर या तंत्राचा वापर औषधांच्या जोडीने करण्याबाबत सल्ला देत आहेत. डॉ. एल. सी. गुप्ता – M.D.D.SC (HON) (एम.डी.डी.एससी.(ऑनर्स) • ९६ वैद्यकीय पुस्तके लिहिण्याचा विश्वविक्रम • २००२ साली मिलेनियम मेडिकल ऑथर ऑफ सार्वÂ कन्ट्रीज (SAARC) हा पुरस्कार. • १९८८ साली बी.सी.रॉय नॅशनल अ‍ॅवॉर्ड हा पुरस्कार • १९९३ साली उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार पदक (PRESIDENTS POLICE MEDAL) मिळाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MIRACULOUS EFFECTS OF ACUPRESSURE Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more