* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CIRCLE OF LIGHT
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788184981001
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 250.00 gms
  • Pages : 432
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KIRANJIT AHLUWALIA`S STORY IS HARROWING AND SHOCKING, BUT ULTIMATELY TRIUMPHANT. IT IS A STORY OF SURVIVAL AND HOPE IN THE FACE OF ALMOST INSURMOUNTABLE ODDS. BORN INTO A WELL-OFF FAMILY IN INDIA, KIRANJIT AHLUWALIA CAME TO ENGLAND IN 1979 TO BE MARRIED TO A MAN SHE HARDLY KNEW. SHE WAS A CHEERFUL, OPTIMISTIC YOUNG WOMAN, FULL OF HOPE FOR A HAPPY MARRIED LIFE, BUT LITERALLY FROM THE DAY OF THE WEDDING IT WAS CLEAR THAT ALL WAS NOT WELL. THE NEXT TEN YEARS WERE TO BE A NIGHTMARE OF CONSTANT PHYSICAL AND MENTAL ABUSE AT THE HANDS OF HER VIOLENT HUSBAND. THERE WAS NO ONE SHE COULD TURN TO FOR HELP AND SUPPORT, AS DOMESTIC VIOLENCE IS VIRTUALLY A TABOO SUBJECT FOR MANY ASIANS IN BRITAIN, AND FAMILY HONOUR- IZZAT - IS THE SUPREME CONSIDERATION. IN 1989, EXHAUSTED, CONFUSED AND DRIVEN BEYOND ENDURANCE BY THE SUFFERING SHE HAD UNDERGONE, KIRANJIT KILLED THE MAN WHO HAD MADE HER LIFE A MISERY. AT HER TRIAL, THE PROCEEDINGS OF WHICH SHE BARELY UNDERSTOOD, KIRANJIT WAS FOUND GUILTY OF MURDER, AND SENTENCED TO LIFE IMPRISONMENT. AS THE DETAILS OF HER CASE EMERGED FOLLOWING A CAMPAIGN CO-ORDINATED BY SOUTHALL BLACK SISTERS, A WOMEN`S CENTRE OPERATING ON A SHOESTRING BUDGET, NATIONWIDE ATTENTION FOCUSED ON HER PLIGHT, AND SHE WAS SET FREE IN 1992. AFTER HER RELEASE, KIRANJIT MET THE PRINCESS OF WALES, WHO URGED HER TO WRITE A BOOK ABOUT HER EXPERIENCES. CIRCLE OF LIGHT IS THAT BOOK. IT IS A REMARKABLE FIRST-HAND ACCOUNT OF ONE OF THE MOST CONTROVERSIAL AND TROUBLING ISSUES OF RECENT YEARS. KIRANJIT AHLUWALIA`S CASE IS UNIQUE, BUT IT REVEALS THE DISTURBING HIDDEN TRUTH ABOUT MANY WOMEN`S LIVES IN BRITAIN TODAY.
किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CIRCLEOFLIGHT #CIRCLEOFLIGHT #सर्कलऑफलाइट #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #USHAMAHAJAN #उषामहाजन #RAHILAGUPTA #KIRANJITAHLUWALIA "
Customer Reviews
  • Rating Starसई (पुस्तकप्रेमी समूह)

    ही कथा ज्या स्त्रीभोवती गुंफली आहे, तिला आयुष्याच्या एका टप्प्यावर गुन्हेगार ठरवलं जातं आणि काही वर्षे तुरूंगात काढावी लागतात. तुरूंग ही जागा तिला “माणूस” म्हणून समृद्ध बनवते . एक महिला संघटना तिच्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करून निकाला चा पुनरविचार कोर्टाला करायला भाग पाडते व तिची या जीवघेण्या जगातून मुक्तता करते ,, ज्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला गवसतो. हा झाला सर्वसाधारण गोषवारा. पण हे पार पडताना तिला युगं लोटल्यासारखी वाटली असतील. राहिल गुप्ता ने तिची मुलाखत घेतली आहे , तिला सांभाळून घेत, तिला अधिक त्रास न देता. सुरूवातीला मुलाखत देताना ही काही तपशील तिला कमीजास्त आठवत होते. काही दुःखदायक होते, काही खाजगी , न सांगण्यासारखे होते. पण हळूहळू सगळ्याला सरावत जात , मोकळं होत ती खुलेपणाने बोलू लागते. एक सर्वसाधारण भारतीय संस्कारी घरात जन्माला आलेली मुलगी किशोरावस्थेत तिच्या आईवडिलांना अंतरते. आपल्या भावांच्या प्रेमाच्या छायेत वाढलेली, सुखाच्या राशीत लोळलेली “किरणजीत“ लग्नायोग्य झाल्यावर भावांच्या चिंतेचे कारण बनते. तिला लग्नापेक्षा शिक्षणात रूची असते. तिचं कोणी ऐकत नाही. ती तिच्या भावाकडे जाते तिथे दिपक तिला पहायला येतो. आपल्या व्यक्तिमत्वाने व मधाळ बोलण्याने तो सर्वांची मने जिंकतो . अखेर ‘हो नाही ‘करत त्यांचे लग्न पार पडते. दिपक , त्याची प्रतिमा, त्याचे घर , त्याची माणसे या सगळ्या चित्राला लवकरच मोठे खिंडार पडते ,, तिच्या सगळ्या स्वप्नांची माती होते. अपेक्षा धुळीला मिळतात. दिपक खूपच unpredictable असतो. त्याचा मूड कधी बदलेल, नूर कधी पालटेल, रागाचा पारा कधी चढेलउतरेल,, स्वतःच्याच माणसांना तो कधी चांगलं म्हणेल, त्यांना कधी वाईट बोलेल. त्याच्या घरची माणसेही किरण ला कधी चांगलं म्हणतील, वाईट बोलतील,, सगळंच अवघड आणि विचित्र होऊन बसलेलं होतं. किरण आशेवर दिवस ढकलत होती. लग्न जुनं होऊ लागलं तसं परिस्थिती गंभीर होत होती. जबरदस्तीने तिच्यावर दोन बाळंतपणं लादली गेली. दिपक चा राग अत्याचारांत बदलू लागला होता. तिला ढकलणे, मारणे, केस पकडणे , गालांवर मारणे हे सामान्य होतं . पैशांच्या तंगीमुळे, वाढत्या गरजा भागवण्यासाठी किरण बाहेर पडू लागली, थोडेफार पैसे मिळवू लागली ,,, तसं घरी पैसे कमी देणे, बाहेरख्यालीपणा करणं दिपकचं सुरू झालं . ती खूप सोसते, सहन करते , त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. दोन दिवस नीट वागून परत “ये रे माझ्या मागल्या” . ती भारताच्या एका ट्रीपमधे इंग्लंडला सासरी न जाण्याचं ठरवते ,,, पण तिच्या माहेरकडची मंडळी तिला समजावून , दिपकला धमकावून परत पाठवतात. एका भांडणात तो तिला इस्त्रीचा चटका देतो चेहरयावर आणि ती प्रक्षुब्ध होऊन उठते. शेवटी ते पाऊल ती उचलते . आणि सगळं संपतं तिला नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते. बाहेरच्या जगात लेक नावे ठेवत असले तरी तुरूंगात तिला सगळे आधार देतात. तू याआधीच असं करायला पाहिजे होतं असं म्हणतात. तिला रीतसर एक वकील मिळते जी तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण किरण कोर्टात लाजेमुळं साक्ष देत नाही. जन्मठेपेची शिक्षा होते. किरणचा जीव मुलांसाठी तुटत असतो. तिचे बहीणभाऊ ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. प्रग्ना पटेल , साउथ हॅाल सिस्टर्सतर्फे ( एशियन स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे) तिच्या आयुष्यात आशेचा किरण बनून येते. खूप धडपड, खटपट करून ती तिची केस तयार करते. इकडे तुरूंगात तिची खास मैत्रीण झालेली सारा तिला प्रथितयश वकील मिळवून देते. प्रग्ना तिच्यासाठी जनजागृती करून तिच्या कहाणीला लोकचळवळीचं स्वरूप देते. तिला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळतो. आधीच्या ज्युरींना तिची केस नीट कळवली च गेली नाही. असा प्रसार होतो. तेव्हा कायद्यात ;मानसिक छळ होऊन,, विचारस्थिती कमकुवत होऊन केला गेलेला एखादा गुन्हा यासंदर्भात तरतूदच नव्हती. पण शेवटच्या सुनावणीत तिची सुटका होते आणि ते जिंकतात. एका हरलेल्या दुःखाच्या क्षणी तिनं सगळं कसं घडवून आणलं हे सांगितलं गेलंय,,,, शेवटी मुलांसोबत ती राहू लागते. खूप अंगांनी विचार करायला लावणारे पुस्तक आहे. तिच्या विचारांची आंदोलनं, कायद्याचे तपशील, घटनांचा क्रम, पात्रांची मांडणी इतकी खोलात जाऊन केलीय की त्याला तोड नाही. “प्रोव्होक्ड” हा ऐश्वर्या राय अभिनित चित्रपट यावर बनवलाय पुस्तक हिमनग आहे आणि हा परिचय तसेच चित्रपटसुद्धा हिमनगाचे टोक आहे. “तुला शिकविन चांगलाच धडा तुझ्या पापांचा भरलाय घडा”” असं म्हणून किरणने जे त्याचे दहन केले , तेव्हा तिला वाटलं पण नसेल कि ती जगप्रसिद्ध होईल आणि ब्रिटिश कायद्यातल्या तरतुदी बदलण्याचं काम करेल. कितीतरी जणींना त्यानंतर तिने प्रेरणा दिलीय. तिची मुलं सुस्थितीत आहेत. तिचं सर्कल ॲाफ लाईट पूर्ण झालंय. सर्वांचे आभार!! ...Read more

  • Rating StarVaibhav Salunke

    कहाणी महिषासुरमर्दिनीची... काही वर्षांपूर्वी(२००७) ‘प्रोव्हेक्ड’ Provoked नावाचा एक सिनेमा येऊन गेला. ऐश्वर्या रॉयने यात प्रमुख भूमिका केली होती. कान्स चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची दखल घेतली गेली. असं काय होतं या चित्रपटात? मला टिव्हीवर हा सिनमा बघायला मिळाला. एक भारतीय सुशिक्षित मुलगी जिच्या डोळ्यात लग्नाची, संसाराची अनेक स्वप्ने असतात; ती परदेशात नातेवाईकांकडे जाते काय, तिथलंच एक स्थळ तिच्यासाठी येऊन लग्न पार पडतं काय आणि तिचा संसार सुरू होतो काय? सगळंच कल्पनेतलं वाटावं पण वास्तव. या वास्तवाशी तिचा सामाना होतो तोच नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा अनुभव घेत. सासू-सासरे, दीर-नणंद, नवरा अशा एकत्र पद्धतीच्या कुटुंबात ती दाखल होते. नववधूला त्या अनुभवातून, परीक्षेतून जावे लागते. त्याहीपेक्षा कितीतरी अधिक प्रसंग किरणच्या आयुष्यात येतात. नवऱ्याचा सततचा आक्रमक पवित्रा, आरडाओरड, आक्रस्ताळेपणा करण्याचा स्वभाव, हतबल सासू-सासरे, पदरी दोन मुलं असं सगळं किरण सहन करत होती. तिच्यावरचे अन्याय करणारे प्रसंग वाचून डोळ्यात पाणी येते. तब्बल दहा वर्षं किरण आज ना उद्या चांगले बदल होतील या आशेवर छळाचे विष पचवत राहिली. जेव्हा नवऱ्याचे शंभर अपराध भरले शिशुपालांसारखे किरणने त्याला यमसदनी पाठवले. त्याचीच गोष्ट ‘प्रोव्हेक्ड’ मध्ये होती. किरणजीत अहलूवालिया या पंजाबी स्त्रीने सोसलेले चटके या ‘सर्कल ऑफ लाईट’ मधून तुम्हाला वाचायला मिळतील. काही स्त्रियांना पुरुषांकडून अनन्वित छळ सहन करावा लागतो. त्यांच्या सहनशक्तीनुसार त्या सहन करतात. मात्र, कधीतरी तिलासुद्धा रणचंडिकेचा अवतार धारन करावा लागतो. किरणजीतच्या दुर्दैवाचे दशावतार वाचताना तिची बाजू पटते आणि तिने नवऱ्याला निजधामाला पाठवले यात तिचं काहीही चुकलेलं नाही, हे पुन्हा सिद्ध होते. किरणजीतवर खटला चालतो, तिला तुरुंगवासात रहावे लागते; परंतु तिच्या वकिलांनी, मैत्रिणींनी तिच्यावरचा अन्याय जगासमोर आणला. जनमत किरणजीतच्या बाजूने झुकते.किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे. ...Read more

  • Rating StarSandeep Chavan

    मी वाचले हे पुस्तक कौटुंबिक हिंसाचार कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे एक उदाहरण आहे काही लोक देश सोडून परदेशात गेले तरी त्यांची रूढी परंपरावादी भारतीय मानसिकता सहजासहजी बदलत नाही हे या घटनेतून दिसते

  • Rating StarEknath Marathe

    सधन कुटुंबात वाढलेली, शिकलेली किरण लंडन मध्ये जातीतल्या तरुणाशी साग्रसंगीत विवाह करते. लग्न झाल्यावर तिचा नवरा , दीपक आपला मूळ रंग दाखवतो. सतत 10 वर्षे तिचा तो सर्व प्रकारे अनन्वित छळ करतो. "खानदान की इज्जत" व दोन लहान मुले सांभाळण्यासाठी ती हे सर्व हन करते. पण एक दिवस या सगळ्याचा कडेलोट होतो व ती नवऱ्याला अद्दल घडवायचा निश्चय करते. त्याचे पाय जाळून त्याला वेदना म्हणजे काय ते दाखवून देण्याच्या तिच्या प्रयत्नात नवरा जळून मरतो व तिच्यावर कट करून नवऱ्याला ठार केल्याचा आरोप सिद्ध होतो व जन्मठेप, 25 वर्षे कारावासाची शिक्षा, ठोठावली जाते. नवऱ्याच्या छळाला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी लढणाऱ्या संघटना , तिची कहाणी ऐकल्यावर तिला न्याय मिळावा म्हणून लढा उभारतात. त्यासाठी खूप मोठी मोहीम उघडतात. सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करण्यास भाग पाडतात. किरणने केलेला नवऱ्याचा खून हा कट नसून त्याने तिच्या वर सतत केलेल्या अत्याचाराचा परिपाक आहे हे अनेक अंगांनी सिद्ध करतात. शेवटी किरणची मुक्तता होते. हा सर्व अनुभव किरणने लिहून काढलेला आहे. नव-याकडून होणारा स्त्रीचा छळ, "खानदान ची इज्जत" सांभाळण्याची तिच्यावर समाजाने टाकलेली सांस्कृतिक जबाबदारी, छळ करणाऱ्याची व तो सहन करणारा मानसिकता, यासंबंधी असलेले सामाजिक कायदे कानून, सरकार व न्यायालयांची या संबंधातली भूमिका, कायद्याचे कंगोरे या सर्व अंगावर पुस्तकात सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. जरूर वाचावे असे पुस्तक. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more