* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CIRCLE OF LIGHT
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788184981001
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 250.00 gms
  • Pages : 432
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KIRANJIT AHLUWALIA`S STORY IS HARROWING AND SHOCKING, BUT ULTIMATELY TRIUMPHANT. IT IS A STORY OF SURVIVAL AND HOPE IN THE FACE OF ALMOST INSURMOUNTABLE ODDS. BORN INTO A WELL-OFF FAMILY IN INDIA, KIRANJIT AHLUWALIA CAME TO ENGLAND IN 1979 TO BE MARRIED TO A MAN SHE HARDLY KNEW. SHE WAS A CHEERFUL, OPTIMISTIC YOUNG WOMAN, FULL OF HOPE FOR A HAPPY MARRIED LIFE, BUT LITERALLY FROM THE DAY OF THE WEDDING IT WAS CLEAR THAT ALL WAS NOT WELL. THE NEXT TEN YEARS WERE TO BE A NIGHTMARE OF CONSTANT PHYSICAL AND MENTAL ABUSE AT THE HANDS OF HER VIOLENT HUSBAND. THERE WAS NO ONE SHE COULD TURN TO FOR HELP AND SUPPORT, AS DOMESTIC VIOLENCE IS VIRTUALLY A TABOO SUBJECT FOR MANY ASIANS IN BRITAIN, AND FAMILY HONOUR- IZZAT - IS THE SUPREME CONSIDERATION. IN 1989, EXHAUSTED, CONFUSED AND DRIVEN BEYOND ENDURANCE BY THE SUFFERING SHE HAD UNDERGONE, KIRANJIT KILLED THE MAN WHO HAD MADE HER LIFE A MISERY. AT HER TRIAL, THE PROCEEDINGS OF WHICH SHE BARELY UNDERSTOOD, KIRANJIT WAS FOUND GUILTY OF MURDER, AND SENTENCED TO LIFE IMPRISONMENT. AS THE DETAILS OF HER CASE EMERGED FOLLOWING A CAMPAIGN CO-ORDINATED BY SOUTHALL BLACK SISTERS, A WOMEN`S CENTRE OPERATING ON A SHOESTRING BUDGET, NATIONWIDE ATTENTION FOCUSED ON HER PLIGHT, AND SHE WAS SET FREE IN 1992. AFTER HER RELEASE, KIRANJIT MET THE PRINCESS OF WALES, WHO URGED HER TO WRITE A BOOK ABOUT HER EXPERIENCES. CIRCLE OF LIGHT IS THAT BOOK. IT IS A REMARKABLE FIRST-HAND ACCOUNT OF ONE OF THE MOST CONTROVERSIAL AND TROUBLING ISSUES OF RECENT YEARS. KIRANJIT AHLUWALIA`S CASE IS UNIQUE, BUT IT REVEALS THE DISTURBING HIDDEN TRUTH ABOUT MANY WOMEN`S LIVES IN BRITAIN TODAY.
किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CIRCLEOFLIGHT #CIRCLEOFLIGHT #सर्कलऑफलाइट #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #USHAMAHAJAN #उषामहाजन #RAHILAGUPTA #KIRANJITAHLUWALIA "
Customer Reviews
  • Rating Starसई (पुस्तकप्रेमी समूह)

    ही कथा ज्या स्त्रीभोवती गुंफली आहे, तिला आयुष्याच्या एका टप्प्यावर गुन्हेगार ठरवलं जातं आणि काही वर्षे तुरूंगात काढावी लागतात. तुरूंग ही जागा तिला “माणूस” म्हणून समृद्ध बनवते . एक महिला संघटना तिच्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करून निकाला चा पुनरविचार कोर्टाला करायला भाग पाडते व तिची या जीवघेण्या जगातून मुक्तता करते ,, ज्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला गवसतो. हा झाला सर्वसाधारण गोषवारा. पण हे पार पडताना तिला युगं लोटल्यासारखी वाटली असतील. राहिल गुप्ता ने तिची मुलाखत घेतली आहे , तिला सांभाळून घेत, तिला अधिक त्रास न देता. सुरूवातीला मुलाखत देताना ही काही तपशील तिला कमीजास्त आठवत होते. काही दुःखदायक होते, काही खाजगी , न सांगण्यासारखे होते. पण हळूहळू सगळ्याला सरावत जात , मोकळं होत ती खुलेपणाने बोलू लागते. एक सर्वसाधारण भारतीय संस्कारी घरात जन्माला आलेली मुलगी किशोरावस्थेत तिच्या आईवडिलांना अंतरते. आपल्या भावांच्या प्रेमाच्या छायेत वाढलेली, सुखाच्या राशीत लोळलेली “किरणजीत“ लग्नायोग्य झाल्यावर भावांच्या चिंतेचे कारण बनते. तिला लग्नापेक्षा शिक्षणात रूची असते. तिचं कोणी ऐकत नाही. ती तिच्या भावाकडे जाते तिथे दिपक तिला पहायला येतो. आपल्या व्यक्तिमत्वाने व मधाळ बोलण्याने तो सर्वांची मने जिंकतो . अखेर ‘हो नाही ‘करत त्यांचे लग्न पार पडते. दिपक , त्याची प्रतिमा, त्याचे घर , त्याची माणसे या सगळ्या चित्राला लवकरच मोठे खिंडार पडते ,, तिच्या सगळ्या स्वप्नांची माती होते. अपेक्षा धुळीला मिळतात. दिपक खूपच unpredictable असतो. त्याचा मूड कधी बदलेल, नूर कधी पालटेल, रागाचा पारा कधी चढेलउतरेल,, स्वतःच्याच माणसांना तो कधी चांगलं म्हणेल, त्यांना कधी वाईट बोलेल. त्याच्या घरची माणसेही किरण ला कधी चांगलं म्हणतील, वाईट बोलतील,, सगळंच अवघड आणि विचित्र होऊन बसलेलं होतं. किरण आशेवर दिवस ढकलत होती. लग्न जुनं होऊ लागलं तसं परिस्थिती गंभीर होत होती. जबरदस्तीने तिच्यावर दोन बाळंतपणं लादली गेली. दिपक चा राग अत्याचारांत बदलू लागला होता. तिला ढकलणे, मारणे, केस पकडणे , गालांवर मारणे हे सामान्य होतं . पैशांच्या तंगीमुळे, वाढत्या गरजा भागवण्यासाठी किरण बाहेर पडू लागली, थोडेफार पैसे मिळवू लागली ,,, तसं घरी पैसे कमी देणे, बाहेरख्यालीपणा करणं दिपकचं सुरू झालं . ती खूप सोसते, सहन करते , त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. दोन दिवस नीट वागून परत “ये रे माझ्या मागल्या” . ती भारताच्या एका ट्रीपमधे इंग्लंडला सासरी न जाण्याचं ठरवते ,,, पण तिच्या माहेरकडची मंडळी तिला समजावून , दिपकला धमकावून परत पाठवतात. एका भांडणात तो तिला इस्त्रीचा चटका देतो चेहरयावर आणि ती प्रक्षुब्ध होऊन उठते. शेवटी ते पाऊल ती उचलते . आणि सगळं संपतं तिला नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते. बाहेरच्या जगात लेक नावे ठेवत असले तरी तुरूंगात तिला सगळे आधार देतात. तू याआधीच असं करायला पाहिजे होतं असं म्हणतात. तिला रीतसर एक वकील मिळते जी तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण किरण कोर्टात लाजेमुळं साक्ष देत नाही. जन्मठेपेची शिक्षा होते. किरणचा जीव मुलांसाठी तुटत असतो. तिचे बहीणभाऊ ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. प्रग्ना पटेल , साउथ हॅाल सिस्टर्सतर्फे ( एशियन स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे) तिच्या आयुष्यात आशेचा किरण बनून येते. खूप धडपड, खटपट करून ती तिची केस तयार करते. इकडे तुरूंगात तिची खास मैत्रीण झालेली सारा तिला प्रथितयश वकील मिळवून देते. प्रग्ना तिच्यासाठी जनजागृती करून तिच्या कहाणीला लोकचळवळीचं स्वरूप देते. तिला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळतो. आधीच्या ज्युरींना तिची केस नीट कळवली च गेली नाही. असा प्रसार होतो. तेव्हा कायद्यात ;मानसिक छळ होऊन,, विचारस्थिती कमकुवत होऊन केला गेलेला एखादा गुन्हा यासंदर्भात तरतूदच नव्हती. पण शेवटच्या सुनावणीत तिची सुटका होते आणि ते जिंकतात. एका हरलेल्या दुःखाच्या क्षणी तिनं सगळं कसं घडवून आणलं हे सांगितलं गेलंय,,,, शेवटी मुलांसोबत ती राहू लागते. खूप अंगांनी विचार करायला लावणारे पुस्तक आहे. तिच्या विचारांची आंदोलनं, कायद्याचे तपशील, घटनांचा क्रम, पात्रांची मांडणी इतकी खोलात जाऊन केलीय की त्याला तोड नाही. “प्रोव्होक्ड” हा ऐश्वर्या राय अभिनित चित्रपट यावर बनवलाय पुस्तक हिमनग आहे आणि हा परिचय तसेच चित्रपटसुद्धा हिमनगाचे टोक आहे. “तुला शिकविन चांगलाच धडा तुझ्या पापांचा भरलाय घडा”” असं म्हणून किरणने जे त्याचे दहन केले , तेव्हा तिला वाटलं पण नसेल कि ती जगप्रसिद्ध होईल आणि ब्रिटिश कायद्यातल्या तरतुदी बदलण्याचं काम करेल. कितीतरी जणींना त्यानंतर तिने प्रेरणा दिलीय. तिची मुलं सुस्थितीत आहेत. तिचं सर्कल ॲाफ लाईट पूर्ण झालंय. सर्वांचे आभार!! ...Read more

  • Rating StarVaibhav Salunke

    कहाणी महिषासुरमर्दिनीची... काही वर्षांपूर्वी(२००७) ‘प्रोव्हेक्ड’ Provoked नावाचा एक सिनेमा येऊन गेला. ऐश्वर्या रॉयने यात प्रमुख भूमिका केली होती. कान्स चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची दखल घेतली गेली. असं काय होतं या चित्रपटात? मला टिव्हीवर हा सिनमा बघायला मिळाला. एक भारतीय सुशिक्षित मुलगी जिच्या डोळ्यात लग्नाची, संसाराची अनेक स्वप्ने असतात; ती परदेशात नातेवाईकांकडे जाते काय, तिथलंच एक स्थळ तिच्यासाठी येऊन लग्न पार पडतं काय आणि तिचा संसार सुरू होतो काय? सगळंच कल्पनेतलं वाटावं पण वास्तव. या वास्तवाशी तिचा सामाना होतो तोच नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा अनुभव घेत. सासू-सासरे, दीर-नणंद, नवरा अशा एकत्र पद्धतीच्या कुटुंबात ती दाखल होते. नववधूला त्या अनुभवातून, परीक्षेतून जावे लागते. त्याहीपेक्षा कितीतरी अधिक प्रसंग किरणच्या आयुष्यात येतात. नवऱ्याचा सततचा आक्रमक पवित्रा, आरडाओरड, आक्रस्ताळेपणा करण्याचा स्वभाव, हतबल सासू-सासरे, पदरी दोन मुलं असं सगळं किरण सहन करत होती. तिच्यावरचे अन्याय करणारे प्रसंग वाचून डोळ्यात पाणी येते. तब्बल दहा वर्षं किरण आज ना उद्या चांगले बदल होतील या आशेवर छळाचे विष पचवत राहिली. जेव्हा नवऱ्याचे शंभर अपराध भरले शिशुपालांसारखे किरणने त्याला यमसदनी पाठवले. त्याचीच गोष्ट ‘प्रोव्हेक्ड’ मध्ये होती. किरणजीत अहलूवालिया या पंजाबी स्त्रीने सोसलेले चटके या ‘सर्कल ऑफ लाईट’ मधून तुम्हाला वाचायला मिळतील. काही स्त्रियांना पुरुषांकडून अनन्वित छळ सहन करावा लागतो. त्यांच्या सहनशक्तीनुसार त्या सहन करतात. मात्र, कधीतरी तिलासुद्धा रणचंडिकेचा अवतार धारन करावा लागतो. किरणजीतच्या दुर्दैवाचे दशावतार वाचताना तिची बाजू पटते आणि तिने नवऱ्याला निजधामाला पाठवले यात तिचं काहीही चुकलेलं नाही, हे पुन्हा सिद्ध होते. किरणजीतवर खटला चालतो, तिला तुरुंगवासात रहावे लागते; परंतु तिच्या वकिलांनी, मैत्रिणींनी तिच्यावरचा अन्याय जगासमोर आणला. जनमत किरणजीतच्या बाजूने झुकते.किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे. ...Read more

  • Rating StarSandeep Chavan

    मी वाचले हे पुस्तक कौटुंबिक हिंसाचार कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे एक उदाहरण आहे काही लोक देश सोडून परदेशात गेले तरी त्यांची रूढी परंपरावादी भारतीय मानसिकता सहजासहजी बदलत नाही हे या घटनेतून दिसते

  • Rating StarEknath Marathe

    सधन कुटुंबात वाढलेली, शिकलेली किरण लंडन मध्ये जातीतल्या तरुणाशी साग्रसंगीत विवाह करते. लग्न झाल्यावर तिचा नवरा , दीपक आपला मूळ रंग दाखवतो. सतत 10 वर्षे तिचा तो सर्व प्रकारे अनन्वित छळ करतो. "खानदान की इज्जत" व दोन लहान मुले सांभाळण्यासाठी ती हे सर्व हन करते. पण एक दिवस या सगळ्याचा कडेलोट होतो व ती नवऱ्याला अद्दल घडवायचा निश्चय करते. त्याचे पाय जाळून त्याला वेदना म्हणजे काय ते दाखवून देण्याच्या तिच्या प्रयत्नात नवरा जळून मरतो व तिच्यावर कट करून नवऱ्याला ठार केल्याचा आरोप सिद्ध होतो व जन्मठेप, 25 वर्षे कारावासाची शिक्षा, ठोठावली जाते. नवऱ्याच्या छळाला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी लढणाऱ्या संघटना , तिची कहाणी ऐकल्यावर तिला न्याय मिळावा म्हणून लढा उभारतात. त्यासाठी खूप मोठी मोहीम उघडतात. सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करण्यास भाग पाडतात. किरणने केलेला नवऱ्याचा खून हा कट नसून त्याने तिच्या वर सतत केलेल्या अत्याचाराचा परिपाक आहे हे अनेक अंगांनी सिद्ध करतात. शेवटी किरणची मुक्तता होते. हा सर्व अनुभव किरणने लिहून काढलेला आहे. नव-याकडून होणारा स्त्रीचा छळ, "खानदान ची इज्जत" सांभाळण्याची तिच्यावर समाजाने टाकलेली सांस्कृतिक जबाबदारी, छळ करणाऱ्याची व तो सहन करणारा मानसिकता, यासंबंधी असलेले सामाजिक कायदे कानून, सरकार व न्यायालयांची या संबंधातली भूमिका, कायद्याचे कंगोरे या सर्व अंगावर पुस्तकात सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. जरूर वाचावे असे पुस्तक. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more