* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CIRCLE OF LIGHT
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788184981001
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 432
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KIRANJIT AHLUWALIA`S STORY IS HARROWING AND SHOCKING, BUT ULTIMATELY TRIUMPHANT. IT IS A STORY OF SURVIVAL AND HOPE IN THE FACE OF ALMOST INSURMOUNTABLE ODDS. BORN INTO A WELL-OFF FAMILY IN INDIA, KIRANJIT AHLUWALIA CAME TO ENGLAND IN 1979 TO BE MARRIED TO A MAN SHE HARDLY KNEW. SHE WAS A CHEERFUL, OPTIMISTIC YOUNG WOMAN, FULL OF HOPE FOR A HAPPY MARRIED LIFE, BUT LITERALLY FROM THE DAY OF THE WEDDING IT WAS CLEAR THAT ALL WAS NOT WELL. THE NEXT TEN YEARS WERE TO BE A NIGHTMARE OF CONSTANT PHYSICAL AND MENTAL ABUSE AT THE HANDS OF HER VIOLENT HUSBAND. THERE WAS NO ONE SHE COULD TURN TO FOR HELP AND SUPPORT, AS DOMESTIC VIOLENCE IS VIRTUALLY A TABOO SUBJECT FOR MANY ASIANS IN BRITAIN, AND FAMILY HONOUR- IZZAT - IS THE SUPREME CONSIDERATION. IN 1989, EXHAUSTED, CONFUSED AND DRIVEN BEYOND ENDURANCE BY THE SUFFERING SHE HAD UNDERGONE, KIRANJIT KILLED THE MAN WHO HAD MADE HER LIFE A MISERY. AT HER TRIAL, THE PROCEEDINGS OF WHICH SHE BARELY UNDERSTOOD, KIRANJIT WAS FOUND GUILTY OF MURDER, AND SENTENCED TO LIFE IMPRISONMENT. AS THE DETAILS OF HER CASE EMERGED FOLLOWING A CAMPAIGN CO-ORDINATED BY SOUTHALL BLACK SISTERS, A WOMEN`S CENTRE OPERATING ON A SHOESTRING BUDGET, NATIONWIDE ATTENTION FOCUSED ON HER PLIGHT, AND SHE WAS SET FREE IN 1992. AFTER HER RELEASE, KIRANJIT MET THE PRINCESS OF WALES, WHO URGED HER TO WRITE A BOOK ABOUT HER EXPERIENCES. CIRCLE OF LIGHT IS THAT BOOK. IT IS A REMARKABLE FIRST-HAND ACCOUNT OF ONE OF THE MOST CONTROVERSIAL AND TROUBLING ISSUES OF RECENT YEARS. KIRANJIT AHLUWALIA`S CASE IS UNIQUE, BUT IT REVEALS THE DISTURBING HIDDEN TRUTH ABOUT MANY WOMEN`S LIVES IN BRITAIN TODAY.
किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CIRCLEOFLIGHT #CIRCLEOFLIGHT #सर्कलऑफलाइट #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #USHAMAHAJAN #उषामहाजन #RAHILAGUPTA #KIRANJITAHLUWALIA "
Customer Reviews
  • Rating Starसई (पुस्तकप्रेमी समूह)

    ही कथा ज्या स्त्रीभोवती गुंफली आहे, तिला आयुष्याच्या एका टप्प्यावर गुन्हेगार ठरवलं जातं आणि काही वर्षे तुरूंगात काढावी लागतात. तुरूंग ही जागा तिला “माणूस” म्हणून समृद्ध बनवते . एक महिला संघटना तिच्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करून निकाला चा पुनरविचार कोर्टाला करायला भाग पाडते व तिची या जीवघेण्या जगातून मुक्तता करते ,, ज्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला गवसतो. हा झाला सर्वसाधारण गोषवारा. पण हे पार पडताना तिला युगं लोटल्यासारखी वाटली असतील. राहिल गुप्ता ने तिची मुलाखत घेतली आहे , तिला सांभाळून घेत, तिला अधिक त्रास न देता. सुरूवातीला मुलाखत देताना ही काही तपशील तिला कमीजास्त आठवत होते. काही दुःखदायक होते, काही खाजगी , न सांगण्यासारखे होते. पण हळूहळू सगळ्याला सरावत जात , मोकळं होत ती खुलेपणाने बोलू लागते. एक सर्वसाधारण भारतीय संस्कारी घरात जन्माला आलेली मुलगी किशोरावस्थेत तिच्या आईवडिलांना अंतरते. आपल्या भावांच्या प्रेमाच्या छायेत वाढलेली, सुखाच्या राशीत लोळलेली “किरणजीत“ लग्नायोग्य झाल्यावर भावांच्या चिंतेचे कारण बनते. तिला लग्नापेक्षा शिक्षणात रूची असते. तिचं कोणी ऐकत नाही. ती तिच्या भावाकडे जाते तिथे दिपक तिला पहायला येतो. आपल्या व्यक्तिमत्वाने व मधाळ बोलण्याने तो सर्वांची मने जिंकतो . अखेर ‘हो नाही ‘करत त्यांचे लग्न पार पडते. दिपक , त्याची प्रतिमा, त्याचे घर , त्याची माणसे या सगळ्या चित्राला लवकरच मोठे खिंडार पडते ,, तिच्या सगळ्या स्वप्नांची माती होते. अपेक्षा धुळीला मिळतात. दिपक खूपच unpredictable असतो. त्याचा मूड कधी बदलेल, नूर कधी पालटेल, रागाचा पारा कधी चढेलउतरेल,, स्वतःच्याच माणसांना तो कधी चांगलं म्हणेल, त्यांना कधी वाईट बोलेल. त्याच्या घरची माणसेही किरण ला कधी चांगलं म्हणतील, वाईट बोलतील,, सगळंच अवघड आणि विचित्र होऊन बसलेलं होतं. किरण आशेवर दिवस ढकलत होती. लग्न जुनं होऊ लागलं तसं परिस्थिती गंभीर होत होती. जबरदस्तीने तिच्यावर दोन बाळंतपणं लादली गेली. दिपक चा राग अत्याचारांत बदलू लागला होता. तिला ढकलणे, मारणे, केस पकडणे , गालांवर मारणे हे सामान्य होतं . पैशांच्या तंगीमुळे, वाढत्या गरजा भागवण्यासाठी किरण बाहेर पडू लागली, थोडेफार पैसे मिळवू लागली ,,, तसं घरी पैसे कमी देणे, बाहेरख्यालीपणा करणं दिपकचं सुरू झालं . ती खूप सोसते, सहन करते , त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. दोन दिवस नीट वागून परत “ये रे माझ्या मागल्या” . ती भारताच्या एका ट्रीपमधे इंग्लंडला सासरी न जाण्याचं ठरवते ,,, पण तिच्या माहेरकडची मंडळी तिला समजावून , दिपकला धमकावून परत पाठवतात. एका भांडणात तो तिला इस्त्रीचा चटका देतो चेहरयावर आणि ती प्रक्षुब्ध होऊन उठते. शेवटी ते पाऊल ती उचलते . आणि सगळं संपतं तिला नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते. बाहेरच्या जगात लेक नावे ठेवत असले तरी तुरूंगात तिला सगळे आधार देतात. तू याआधीच असं करायला पाहिजे होतं असं म्हणतात. तिला रीतसर एक वकील मिळते जी तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण किरण कोर्टात लाजेमुळं साक्ष देत नाही. जन्मठेपेची शिक्षा होते. किरणचा जीव मुलांसाठी तुटत असतो. तिचे बहीणभाऊ ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. प्रग्ना पटेल , साउथ हॅाल सिस्टर्सतर्फे ( एशियन स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे) तिच्या आयुष्यात आशेचा किरण बनून येते. खूप धडपड, खटपट करून ती तिची केस तयार करते. इकडे तुरूंगात तिची खास मैत्रीण झालेली सारा तिला प्रथितयश वकील मिळवून देते. प्रग्ना तिच्यासाठी जनजागृती करून तिच्या कहाणीला लोकचळवळीचं स्वरूप देते. तिला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळतो. आधीच्या ज्युरींना तिची केस नीट कळवली च गेली नाही. असा प्रसार होतो. तेव्हा कायद्यात ;मानसिक छळ होऊन,, विचारस्थिती कमकुवत होऊन केला गेलेला एखादा गुन्हा यासंदर्भात तरतूदच नव्हती. पण शेवटच्या सुनावणीत तिची सुटका होते आणि ते जिंकतात. एका हरलेल्या दुःखाच्या क्षणी तिनं सगळं कसं घडवून आणलं हे सांगितलं गेलंय,,,, शेवटी मुलांसोबत ती राहू लागते. खूप अंगांनी विचार करायला लावणारे पुस्तक आहे. तिच्या विचारांची आंदोलनं, कायद्याचे तपशील, घटनांचा क्रम, पात्रांची मांडणी इतकी खोलात जाऊन केलीय की त्याला तोड नाही. “प्रोव्होक्ड” हा ऐश्वर्या राय अभिनित चित्रपट यावर बनवलाय पुस्तक हिमनग आहे आणि हा परिचय तसेच चित्रपटसुद्धा हिमनगाचे टोक आहे. “तुला शिकविन चांगलाच धडा तुझ्या पापांचा भरलाय घडा”” असं म्हणून किरणने जे त्याचे दहन केले , तेव्हा तिला वाटलं पण नसेल कि ती जगप्रसिद्ध होईल आणि ब्रिटिश कायद्यातल्या तरतुदी बदलण्याचं काम करेल. कितीतरी जणींना त्यानंतर तिने प्रेरणा दिलीय. तिची मुलं सुस्थितीत आहेत. तिचं सर्कल ॲाफ लाईट पूर्ण झालंय. सर्वांचे आभार!! ...Read more

  • Rating StarVaibhav Salunke

    कहाणी महिषासुरमर्दिनीची... काही वर्षांपूर्वी(२००७) ‘प्रोव्हेक्ड’ Provoked नावाचा एक सिनेमा येऊन गेला. ऐश्वर्या रॉयने यात प्रमुख भूमिका केली होती. कान्स चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची दखल घेतली गेली. असं काय होतं या चित्रपटात? मला टिव्हीवर हा सिनमा बघायला मिळाला. एक भारतीय सुशिक्षित मुलगी जिच्या डोळ्यात लग्नाची, संसाराची अनेक स्वप्ने असतात; ती परदेशात नातेवाईकांकडे जाते काय, तिथलंच एक स्थळ तिच्यासाठी येऊन लग्न पार पडतं काय आणि तिचा संसार सुरू होतो काय? सगळंच कल्पनेतलं वाटावं पण वास्तव. या वास्तवाशी तिचा सामाना होतो तोच नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा अनुभव घेत. सासू-सासरे, दीर-नणंद, नवरा अशा एकत्र पद्धतीच्या कुटुंबात ती दाखल होते. नववधूला त्या अनुभवातून, परीक्षेतून जावे लागते. त्याहीपेक्षा कितीतरी अधिक प्रसंग किरणच्या आयुष्यात येतात. नवऱ्याचा सततचा आक्रमक पवित्रा, आरडाओरड, आक्रस्ताळेपणा करण्याचा स्वभाव, हतबल सासू-सासरे, पदरी दोन मुलं असं सगळं किरण सहन करत होती. तिच्यावरचे अन्याय करणारे प्रसंग वाचून डोळ्यात पाणी येते. तब्बल दहा वर्षं किरण आज ना उद्या चांगले बदल होतील या आशेवर छळाचे विष पचवत राहिली. जेव्हा नवऱ्याचे शंभर अपराध भरले शिशुपालांसारखे किरणने त्याला यमसदनी पाठवले. त्याचीच गोष्ट ‘प्रोव्हेक्ड’ मध्ये होती. किरणजीत अहलूवालिया या पंजाबी स्त्रीने सोसलेले चटके या ‘सर्कल ऑफ लाईट’ मधून तुम्हाला वाचायला मिळतील. काही स्त्रियांना पुरुषांकडून अनन्वित छळ सहन करावा लागतो. त्यांच्या सहनशक्तीनुसार त्या सहन करतात. मात्र, कधीतरी तिलासुद्धा रणचंडिकेचा अवतार धारन करावा लागतो. किरणजीतच्या दुर्दैवाचे दशावतार वाचताना तिची बाजू पटते आणि तिने नवऱ्याला निजधामाला पाठवले यात तिचं काहीही चुकलेलं नाही, हे पुन्हा सिद्ध होते. किरणजीतवर खटला चालतो, तिला तुरुंगवासात रहावे लागते; परंतु तिच्या वकिलांनी, मैत्रिणींनी तिच्यावरचा अन्याय जगासमोर आणला. जनमत किरणजीतच्या बाजूने झुकते.किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे. ...Read more

  • Rating StarSandeep Chavan

    मी वाचले हे पुस्तक कौटुंबिक हिंसाचार कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे एक उदाहरण आहे काही लोक देश सोडून परदेशात गेले तरी त्यांची रूढी परंपरावादी भारतीय मानसिकता सहजासहजी बदलत नाही हे या घटनेतून दिसते

  • Rating StarEknath Marathe

    सधन कुटुंबात वाढलेली, शिकलेली किरण लंडन मध्ये जातीतल्या तरुणाशी साग्रसंगीत विवाह करते. लग्न झाल्यावर तिचा नवरा , दीपक आपला मूळ रंग दाखवतो. सतत 10 वर्षे तिचा तो सर्व प्रकारे अनन्वित छळ करतो. "खानदान की इज्जत" व दोन लहान मुले सांभाळण्यासाठी ती हे सर्व हन करते. पण एक दिवस या सगळ्याचा कडेलोट होतो व ती नवऱ्याला अद्दल घडवायचा निश्चय करते. त्याचे पाय जाळून त्याला वेदना म्हणजे काय ते दाखवून देण्याच्या तिच्या प्रयत्नात नवरा जळून मरतो व तिच्यावर कट करून नवऱ्याला ठार केल्याचा आरोप सिद्ध होतो व जन्मठेप, 25 वर्षे कारावासाची शिक्षा, ठोठावली जाते. नवऱ्याच्या छळाला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी लढणाऱ्या संघटना , तिची कहाणी ऐकल्यावर तिला न्याय मिळावा म्हणून लढा उभारतात. त्यासाठी खूप मोठी मोहीम उघडतात. सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करण्यास भाग पाडतात. किरणने केलेला नवऱ्याचा खून हा कट नसून त्याने तिच्या वर सतत केलेल्या अत्याचाराचा परिपाक आहे हे अनेक अंगांनी सिद्ध करतात. शेवटी किरणची मुक्तता होते. हा सर्व अनुभव किरणने लिहून काढलेला आहे. नव-याकडून होणारा स्त्रीचा छळ, "खानदान ची इज्जत" सांभाळण्याची तिच्यावर समाजाने टाकलेली सांस्कृतिक जबाबदारी, छळ करणाऱ्याची व तो सहन करणारा मानसिकता, यासंबंधी असलेले सामाजिक कायदे कानून, सरकार व न्यायालयांची या संबंधातली भूमिका, कायद्याचे कंगोरे या सर्व अंगावर पुस्तकात सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. जरूर वाचावे असे पुस्तक. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more