* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LIVING HISTORY
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177666670
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 588
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ONE OF THE MOST INTELLIGENT AND INFLUENTIAL WOMEN IN AMERICA REFLECTS ON HER EIGHT YEARS AS FIRST LADY OF THE UNITED STATES IN A REVEALING BOOK -PERSONAL, POLITICAL AND NEWSMAKING. DURING HER HUSBAND`S TWO ADMINISTRATIONS, HILLARY RODHAM CLINTON REDEFINED THE POSITION OF FIRST LADY. HOW THIS INTENSELY PRIVATE WOMAN NOT ONLY SURVIVED BUT PREVAILED IS THE DRAMATIC TALE OF HER BOOK. HILLARY CLINTON SHARES THE UNTOLD STORY OF HER WHITE HOUSE YEARS AND RECALLS THE CHALLENGING PROCESS BY WHICH SHE CAME TO DEFINE HERSELF AS A WIFE, A MOTHER, AND A FORMIDABLE POLITICIAN IN HER OWN RIGHT. MRS CLINTON WAS THE FIRST FIRST LADY WHO PLAYED A DIRECT ROLE IN SHAPING DOMESTIC POLICY; SHE WAS AN UNOFFICIAL AMBASSADOR FOR HUMAN RIGHTS AND DEMOCRACY AROUND THE WORLD; AND SHE HELPED SAVE THE PRESIDENCY DURING THE IMPEACHMENT CRISIS.
अमेरिकेतील सर्वात हुशार आणि प्रभावशाली महिलांपैकी एकाने तिच्या आठ वर्षांच्या युनायटेड स्टेट्सची फर्स्ट लेडी म्हणून प्रकट केलेल्या पुस्तकात प्रतिबिंबित केले आहे - वैयक्तिक, राजकीय आणि वार्ताहर. तिच्या पतीच्या दोन कारभारादरम्यान, हिलरी रॉडम क्लिंटन यांनी पहिल्या महिला पदाची पुन्हा व्याख्या केली. ही तीव्रपणे खाजगी स्त्री केवळ कशी वाचली नाही तर प्रचलित आहे ही तिच्या पुस्तकाची नाट्यमय कथा आहे. हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या व्हाईट हाऊसच्या वर्षांची अनकथित कहाणी शेअर केली आणि आव्हानात्मक प्रक्रियेची आठवण करून दिली ज्याद्वारे तिने स्वत: ला एक पत्नी, एक आई आणि एक मजबूत राजकारणी म्हणून परिभाषित केले. श्रीमती क्लिंटन या पहिल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी देशांतर्गत धोरणाला आकार देण्यात थेट भूमिका बजावली होती; ती जगभरातील मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी एक अनधिकृत राजदूत होती; आणि महाभियोग संकटाच्या वेळी तिने अध्यक्षपद वाचवण्यास मदत केली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LIVINGHISTORY #LIVINGHISTORY #लिव्हिंगहिस्ट्री #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #HILLARYRODHAMCLINTON "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 07-02-2007

    अ‍ॅड. हिलरीची कर्तृत्ववान कहाणी... जगात सामर्थ्यशाली व समृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाची पत्नी फर्स्ट लेडी ऑफ यू. एस. ए. - हिलरी रॉडहॅम क्लिंटन या जगन्मान्य व जबरदस्त व्यक्तीचे हे तेवढेच जबरदस्त आत्मकथन होय. जगातील ‘पवरफूल लेडिज’ च्या दहा क्रमांकात हिलरी यांचा समावेश झाला, तो केवळ त्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणून नव्हे तर त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रांतल्या प्रचंड कार्यामुळे! थोड्याच अवधीत एक स्त्री इतके प्रचंड कार्य करू शकते. अन् तेही जगभर सतत फिर राहून यावर सकृतदर्शनी विश्वास बसणे कठीण जाते. पण, वाचताना जसजशी पाने पुढे पुढे जाता तसतसे ते निखळ सत्य असल्याचे जाणवते. कारण प्रत्येक प्रसंग व घडलेल्या घटना तारीख वारासह सूक्ष्म तपशीलात दिलेल्या आहेत. आयुष्यातल्या सगळ्याच भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ‘पारदर्शी आत्मकथनाचा हा एक आदर्श नमुना वाटतो. त्यातून अनुवादिका सुप्रिया वकील यांनी मूळ आशयास मराठीचा सुंदर साज चढविला आहे. मनोगतात लेखिकेने जरी म्हटले आहे, की हे पुस्तक त्यांच्या ‘व्हाईट-हाऊस’ मधील आठ वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे’ तरी खरे ते तसे नसून त्या आठ वर्षांच्या आधीची कित्येक वर्षे व त्यानंतरचीही काही वर्षे यांचा समग्र इतिहास म्हणजे हे पुस्तक आत्मकथन होय. पुस्तकाची सुरुवात अमेरिकेच्या पार्श्वभूमीने होऊन त्याच प्रकरणात लेखिका हिलरी रॉडहॅम क्लिंटन हिने आपला जन्म (२६ ऑक्टों. १९४७), जन्मठिकाण, आपली आई, आजी, वडील, त्यांचा व्यवसाय, दुसऱ्या महायुद्धाचा त्यांच्या व्यवसायावर झालेला परिणाम, काका रसेल व त्यांचा झालेला शोकांतिक अंत अशा आपल्या माहेरच्या परिवाराची माहिती दिली आहे. आजीमुळे आपल्या आईचे बालपण किती खडतर गेले हे आठवून आजही त्यांना वाईट वाटते. आजीच्या वर्तणुकीचा एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे. तो वाचून वाचकांनाही वाईट वाटते. एका छोट्या चुकीसाठी त्यांच्या आजीने त्यांच्या आईला (डोरोथी हॉवेल रॉडहॅम) एक वर्षभर एका खोलीत कोंडून ठेवले. या आजीचे वर्णन हिलरी यांनी ‘एक असमाधानी स्त्री... गूढ व्यक्ती’ असे केले आहे. त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. आपल्या आई-वडिलांच्या आईचे-हन्नाह-वर्णन मात्र ‘एक धीट व निश्चयी स्त्री’ असे केले आहे. आईच्या आईने हिलरींना आपले माहेरचेही आडनाव लावण्याचा आग्रह केल्यामुळे त्यांच्या नावापुढे दोन्ही आडनावे आहेत. महायुद्धाच्या आर्थिक मंदीची झळ या कुटुंबाला लागून गरिबीच्या छायेत त्यांना कसे दिवस काढावे लागले, याचेही वर्णन लेखिकेने खूप मोकळेपणाने केले आहे. त्यांच्या कथनाला हा मोकळेपणा कायम शेवटपर्यंत टिकला आहे. आपल्या कुटुंबात झालेल्या अशोभनीय गोष्टी लेखक टाळत असतात, इथे मात्र लेखिकेने संदर्भाच्या ओघात सहजतेने सांगितल्या आहेत. बिल उच्चपदावर असताना बिलच्या रॉजर नावाच्या लहान सावत्र भावास कोकेन-सेवन व विक्री या गुन्ह्याबद्दल जबरदस्त शिक्षा झाली. त्या वेळी आपल्या अधिकाराच्या जोरावर त्याची सुटका करणे बिलला सहज शक्य झाले असते; पण त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, ‘तुम्ही तुमच्या कायदेशीर मार्गाने जा.’ आपल्या पतीची ही कर्तव्यकठोरता पाहून हिलरींना आपल्या पतीचा खूप अभिमान वाटला. आपल्या पतीबद्दल वाटणारा आदर व प्रेम त्यांनी प्रसंगानुसार अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ‘जे घडले ते कथन केले’ या त्यांच्या दृष्टिकोनामुळे त्यांचे आत्मकथन इतके ‘पारदर्शी’ झाले आहे, की इतरत्र ते क्वचितच आढळते. ‘बिल क्लिंटन’ या पाचव्या प्रकरणात त्यांनी क्लिंटन यांच्या परिवाराविषयी सविस्तर सांगितले आहे. बिल यांचा जन्म १९ ऑगस्ट १९४६चा. त्याच्या वडिलांचा मृत्यू मे १९४६ मधला. म्हणजे बिलच्या जन्मापूर्वी साडेतीन-चार महिने अगोदर त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या २३ वर्षांच्या विधवा आईने भूलतज्ज्ञ परिचारिकेचे प्रशिक्षण पूर्ण करून त्या स्वयंनिर्भर बनल्या. याच प्रकरणात हिलरी, यांनी बिलशी झालेली पहिली भेट, त्यानंतर प्रेम व विवाह (११ ऑक्टो. १९७५) याविषयी वर्णन केले आहे. या वर्णनात त्यांचा दिलखुलास स्वभाव दिसून येतो. लग्ल अत्यंत साध्या पद्धतीने त्यांच्या दिवाणखान्यात झाले. सन १९८० मध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या म्हणतात, १९८० हे वर्ष आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. कारण त्या वर्षांत आम्हाला मातृपितृपद लाभलं होतं.’ संसाराला सुरुवात झाल्यानंतर जुन्या व स्वस्तातल्या वस्तू जमवून किती काटकसरीने त्यांनी दिवस काढले, याचे वर्णन पान १११ वर आलेले आहे. लग्नानंतर बिल अर्कान्सासला (त्यांचे गाव) युनियन ऑफ अर्कान्सास स्कूल ऑफ लॉ मध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले तर हिलरी या ‘येल’ येथील आपले लॉचे शिक्षण सुरू असतानाच ‘चिल्ड्रेन्स डिफेन्स फंड’ (?.?.?.) येथे काम करू लागल्या. जेव्हा वेलस्ली इथे कायद्याचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले त्याच दरम्यान राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्यावर वॉटरगेट प्रकरणी महाभियोग चालवला जाणार होता. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या वकिलांच्या यादीत हिलरी यांचेही नाव होते. त्या निवडीने त्या खूप सुखावल्या, तरी मोठ्या जबाबदारीचे ओझेही त्यांना अस्वस्थ करू लागले. त्यातून ते कार्य अत्यंत गुप्तपणे चालणार असल्याने तीही काळजी त्यांना वाटत होती. व्हाईट हाऊसमध्ये राहत असताना (आठ वर्षे) एकदा अठरा हजार डॉलरच्या धनादेशाचा हिशेब लागत नव्हता. त्या वेळी ‘ट्रॅव्हल गेट’या नावाने त्यांच्यावर माध्यमांनी गदारोळ सुरू केला. अधिक तपासाअंती तो कार्यालयीन घोटाळा झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाबद्दल त्या म्हणतात, ‘बिल व मी व्हाईट हाऊसच्या भूमिकेत अननुभवी असू, पण राजकारणासारख्या आडदांड विश्वात पुरेसे मुरब्बी होतो. आघार दूर सारून सत्य जीवनावर आपले लक्ष कसे केंद्रित करायचे हे आम्ही जाणून होतो.’ (२०९). राजकारणातील आपला आत्मविश्वास, खंबीरपणा, चातुर्य व बुद्धिचापल्य हे अनेक प्रसंगी दोघांनी सिद्ध केले होते. परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत अत्यंत उदार सर्वसमावेशक धोरण स्वीकारून त्यांनी जवळजवळ ७८ देशांचा सदिच्छा दौरा करून अमेरिकेबद्दल अनुकूल मत बनवण्यात ते यशस्वी झाले. अनेकदा हिलरी यांनी एकटीनेही दौरे केले आहेत. जवळजवळ सर्व खंड, उपखंड, युरोपातील श्रीमंत व तंत्रज्ञानात विकसित असलेल्या राष्ट्रांपासून ते दक्षिण आफ्रिकेतल्या अत्यंत गरीब व मागासलेल्या राष्ट्रांपर्यंत व भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यासारख्या विकसनशील देशांत त्यांनी दौरे करून त्या त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या. काही राष्ट्रांना सढळ मदतही केली. या विषयी एके ठिकाणी त्या म्हणतात, ‘मी जेव्हा राष्ट्राध्यक्षांच्या समवेत दौऱ्यावर असायची तेव्हा स्त्रिया व मुले यांच्याशी निगडित समस्या, आरोग्य सुविधा, सार्वजनिक शिक्षण, मानवी हक्क व पर्यावरण अशा प्रश्नांवर विशेष भर द्यायची’ (४१८). जॉर्डन इस्रायल यांच्यातील शांतता करारावर बिल यांच्या स्वाक्षऱ्या असून, हा करार बिलच्या पराराष्ट्रीय संबंधातला एक अत्यंत महत्त्वाचा ‘माईल स्टोन’ ठरला. त्या वेळी त्यांनी इजिप्तलाही भेट देऊन मैत्रीचे संबंध अधिक घट्ट केले. नेल्सन मंडेला यांच्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासानंतर दक्षिण आफ्रिकेचे ते राष्ट्रप्रमुख बनले तेव्हा त्यांच्या सन्मान सोहळ्यास जाताना हिलरी यांनी आपल्या सोबत अनेक आफ्रिकन- अमेरिकन अधिकाऱ्यांनी नेले होते. हेतू हाच होता, की त्यांना ‘आपलं माणूस’ वाटणाऱ्या मंडेलांच्या भव्यदिव्य सत्काराचा आनंद त्यांनीही लुटावा. इतके हिलरी यांचे मन मोठे व कनवाळू होते. मंडेलांशी त्यांचे व त्यांच्या मुलीचे- चेल्सीचे सलोख्याचे संबंध होते. मुलीच्या निकोप वाढीसाठी दक्ष असणारी ही माता मुद्दाम आपल्या मुलीस दौऱ्यावर नेऊन वेगवेगळ्या अनुभवाची संधी द्यायची. एड्स जागृतीच्या कार्यासाठी बिल दांपत्य भारतात आले असताना सोबत त्यांची मुलगीही होती. तिनेही त्या कार्यात सहभाग घेतला होता. आपल्या मुलीने सामान्य मुलीप्रमाणे राहावे, असे संस्कार हिलरीने बालपणापासून तिच्यावर केले होते. जगात निरनिराळ्या देशांत जी हत्याकांडे सुरू होती, त्यावरून बिलने दहशतवादाचा इशारा आपल्या संरक्षण विभागास दिला होता. भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी त्यांच्याजवळ होती. ते ज्या मार्गावरून चालत होते तो राजमार्ग नव्हता, उलट सत्त्वपरीक्षेचे, चारित्र्यहननाचे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले. पण प्रत्येक वेळी असीम मनोबल असलेल्या हिलरीने स्वत: कवच होऊन त्यांचे संरक्षण केले. परमेश्वरावर त्यांची अढळ श्रद्धा होती. गंमत म्हणजे व्हाईट हाऊसमधील घडलेल्या काही घटनांमुळे अतिंद्रिय शक्तीवरही त्यांचा विश्वास होता. त्या स्वत:बरोबर कायम छोटी डायरी ठेवून आपल्या खाजगी कामाच्या नोंदीबरोबर स्फूर्तिदायक वचने, म्हणी व आपल्या आवडत्या पवित्र ग्रंथातील सुवचने लिहून ठेवत. एका कॅन्सर रुग्णाने लिहिलेल्या एका पुस्तकातील एका वाक्याने त्यांना आपल्या कार्याची नवी दिशा मिळाली. ते वाक्य म्हणजे, ‘माझ्या आजाराम मला जाणवलं, की आपल्या समाजामध्ये काहीतरी हरवलं आहे. ते म्हणजे काळीज व बंधुत्वाची भावना.’ संवेदनशील मनच अशा वाक्यातून काही बोध घेऊ शकते. आपल्या वैचारिक घडणीत इलिनार रुझवेल्ट यांचा फार मोठा वाटा असल्याचे त्या आवर्जून सांगतात. सन २०००च्या फेब्रुवारीत ‘न्यूयॉर्क सिनेट’साठी स्टेटयुनिव्हर्सिटीत आपली उमेदवारी जाहीर केली तेव्हा तिथल्या जनसमूहाचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला अन् त्या न्यूयॉर्क सिनेटच्या पहिल्या महिला सदस्य ठरल्या. त्या आनंददायी निकालानंतर त्या म्हणतात, ‘‘आठ वर्षे मला बिरूद होतं, पण पद नव्हतं, आता मात्र मी ‘नवनिर्वाचित सिनेटर’ होते.’’ (५५५) . बिलच्या आठ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर अल गोर यांना मागे टाकून बुश राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले अन् बिल, हिलरी व चेल्सी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले ते तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा व आठवणीरूपी रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ बरोबर घेऊन! मुखपृष्ठावर हिलरी यांचे प्रसन्न छायाचित्र आहे. पान २१४ ते २३४ मधील सुंदर छायाचित्रे म्हणजे या पुस्तकाचे एक आकर्षण आहे. जणू हिलरी व बिल यांचा जीवनपटच आहे. अनुक्रमणिकेत एकूण ३८ प्रकरणे आहेत. (पण त्यांना क्रम नाहीत.) एका जागतिक कीर्तीच्या कर्तृत्वान व संवेदनशील स्त्रीचे हे आत्मकथन असले तरी त्यात जगाचा इतिहास, खंड-उपखंडातील राष्ट्रांचे आपापसातील संबंध म्हणजेच जागतिक राजकारण, जागतिक राजकारणातील अमेरिकेचे स्थान याविषयी महत्त्वाची माहिती मिळत असल्यामुळे इतिहासप्रेमींनी, राजकारणात रुची असणाऱ्यांनी व करियर करणाऱ्या सर्व महिलांनी हे आत्मकथन आवर्जून वाचावे असे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more