* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Translators : ULKA RAUT
  • ISBN : 9788184985399
  • Edition : 5
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 216
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SMUGGLING, GUN-RUNNING, DRUGS, TERRORISM FOR MANY DECADES, MUMBAI HAS LIVED UNDER THE SHADOW OF THE UNDERWORLD. DAWOOD IBRAHIM, KARIM LALA, VARADARA- JAN MUDALIAR: THESE ARE NAMES THAT ANY INDIAN WOULD RECOGNISE. ANALYSED IN PRINT, IMMORTALISED ON FILM, THEIR LIVES, THEIR GANGS, THEIR `BUSINESSES` ARE OUT THERE FOR ANYONE WHO WANTS THE INFORMATION. BUT THERE HAVE BEEN WOMEN, TOO, WHO HAVE BEEN PART OF THIS MURKY SIDE OF THE CITY, WALKING ALONG SIDE, SOMETIMES LEADING AND MANIPULATING MEN IN THE UNDERWORLD TO RUN THEIR OWN ILLEGAL BUSINESSES. HERE, FOR THE FIRST TIME, CRIME JOURNAL- ISTS S. HUSSAIN ZAIDI AND JANE BORGES EXPLORE THE LIVES OF SOME OF THESE WOMEN, AND HOW, IN COLD BLOOD, THEY WERE ABLE TO MAKE THEIR WAY UP IN WHAT WAS CERTAINLY A MAN`S WORLD. FROM KAMATHIPURA TO DONGRI, FROM ASSASSINS TO MOLLS, THIS IS A COLLECTION THAT TELLS THE STORIES OF WOMEN WHO HAVE BECOME LEGEND IN MUMBAI`S STREETS, LANES AND BACK-ALLEYS. ABSORBINGLY TOLD, IMPECCABLY RESEARCHED, MAFIA QUEENS OF MUMBAI REVEALS A SIDE OF MUMBAI`S UNDERWORLD THAT HAS NEVER BEEN SEEN BEFORE.
दाऊद इब्राहिम, करीम लाला, हाजी मस्तान यांसारख्या मुंबईतील माफियांवर नियतकालिकं, वृत्तपत्रं अशा माध्यमांमधून अभ्यासपूर्ण लिहिलं गेलं आहे. चित्रपटांमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखाही रंगवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांचे तथाकथित ‘व्यवसाय’ यांविषयी बरीच माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. परंतु काही स्त्रियादेखील मुंबईच्या याच गुन्हेगारी विश्वाचा हिस्सा आहेत, ही गोष्ट फारशी ज्ञात नाही. अंडरवर्ल्डच्या भाई आणि दादा लोकांच्या खांद्याला खांदा लावून, तर कधी मार्गदर्शन करून आणि पडद्यामागून सूत्रं हलवून या स्त्रियांनी अंडरवल्र्डचे अवैध धंदे चालवण्यास मदत केलीे. या पुस्तकात प्रथमच अशा काही स्त्रियांच्या जीवनाचा मागोवा घेण्यात आला आहे; आख्यायिका बनलेल्या या स्त्रियांच्या जीवनकहाण्या चित्रित केल्या आहेत.मुंबईच्या अंडरवर्ल्डची यापूर्वी कधीही उजेडात न आलेली बाजू अत्यंत चित्तवेधक शैलीत, सखोल संशोधन करून या पुस्तकात मांडली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#MAFIA QUEENS OF MUMBAI #DONGARIMADHALI MAHADHURT BAI #KAMATHIPURYACHI SAMRADNI #EKA SUNDARICHA SOOD PRAVAS #MADAK PADARTHANCHYA SAMRAJYACHI MAHARANI #GANGSTERCHI PREYA #HINDU DONS CHYA SAHA DHRMACHARINI #GANGSTERCHI PREMAPATRA #MOHAK MADANIKANCHA MAYAJAL ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarRajesh Malashe

    गुन्हेगारी जगताबद्दल विषेशतः अंडरवर्ल्ड बद्दल सर्वसामान्य माणसांपासून सगळ्यांनाच भीतीयुक्त कुतूहल असतं. त्यातही मुंबईतले माफिया आणि त्यांचे काळे धंदे यावर विपुल लिखाण झालंय, त्यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित चित्रपट पण निघालेत(दिवार ,वन्स अपॉन या टाईम न मुंबई, शूट आउट at वडाळा.. ही काही उदाहरण) हाजी मस्तान , करीम लाला , वरदराजन मुदलियार यासारख्या नामचीन भाईंपासून सुरू झालेली ही परंपरा आत्ताच्या दाऊद इब्राहिम ते रवी पुजारी पर्यंत अविरत सुरू आहे. यातले सगळे डॉन , माफिया , जास्तकरून पुरुष .. पण या क्षेत्रात एकेकाळी स्त्रियांची पण मक्तेदारी होती किंबहुना मुंबईतील या लेडी डॉन ना मस्तान, करीमलाला , दाऊद सारखे लोक पण वचकून असायचे अस सांगितलं तर कित्येकांना ते खरं वाटणार नाही . पण ही वस्तुस्थिती होती. कित्येकदा दोन टोळ्यांमधल्या मांडवली साठी या लेडी डॉन पुढाकार घेऊन यशस्वी तोडगे काढायच्या. या लेडी माफियांबद्दल माहिती होण्याचं कारण म्हणजे .. पत्रकार एस. हुसैन झैदी आणि जेन बोर्जेस यांनी लिहिलेलं.. माफिया क्विन्स ऑफ मुंबई ` हे पुस्तक. उल्का राऊत ` यांनी मराठीत अनुवाद केलाय. नुकतच वाचनात आलं. अतिशय सुरेख माहिती दिलीय त्यात . कित्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन झैदी आणि बोर्जेस यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग लिहिलेत यात. १.चावलवाली ते दारुवाली असा पल्ला गाठणारी हाजी मस्तान जिला मोठी बहीण मानायचा आणि दाऊद आई मानायचा ती झैनब उर्फ जेनबाई २.कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी अस बिरुद प्राप्त होऊनही इमानदारीत धंदा करणारी गंगुबाई कोठेवाली.. ही प्रत्यक्षात एका खानदानी आणि सधन कठियावडी कुटुंबात जन्मलेली होती. वडील प्रतिथयश वकील होते.. पण नशिबाच्या फेऱ्यात सापडली आणि ... ३.पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम बरोबर दोन हात केलेली.. सपना उर्फ अश्रफ ४.मध्य मुंबईत राहून अमली पदार्थाच्या व्यापारात स्वतःच मोठं साम्राज्य असलेली ..ज्योती आदिरामलिंगम, महालक्ष्मी पापामणी या तत्कालीन लेडी माफिया. त्याचबरोबर पतीच्या खांद्याला खांदा लावून अंडरवर्ल्ड मधे दबदबा असणाऱ्या बायका आशा गवळी..अरुण गवळी ची बायको नीता नाईक..अश्विन नाईक सुजाता निकाळजे..राजन निकाळजे उर्फ छोटा राजन पद्मा पुजारी.. रवी पुजारी या सगळ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी ..`माफिया क्विन्स ऑफ मुंबई ` हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. ...Read more

  • Rating StarAshavajit Narwade

    कालच हूस्सैन झैदी आणि जेन बोर्जस लिखित व उल्का राऊत यांनी मराठी मध्ये अनुवादित केलेले #माफियाक्वीनऑफमुंबई हे पुस्तक वाचले. त्याची समीक्षा इथे मांडतो आहे. आपण सर्वांनी यापूर्वी दाऊद इब्राहिम करीम लाला हाजी मस्तान वरदराजन यासारख्या मुंबईतील माफियाव नियतकालिक वर्तमानपत्र अश्या माध्यमामधून अभ्यासपूर्ण लिखान वाचलेली आहेत. अनेक चित्रपटही याच्यावर चित्रपट काढत असतात ते ही आपण पाहिलेले आहेत . त्यामुळे यांच्या जीवनातील तपशील त्याचे व्यवसाय याबद्दल आपल्याला माहिती आहेच .परंतु काही स्त्रिया देखील मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा हिस्सा आहेत ही गोष्ट आपल्याला फारशी माहिती नसावीत. मुंबई underworld च्या भाई दादा लोकांच्या खांद्याला खांदा लाऊन तर कधी त्यांना मार्गदर्शन करून आणि पडद्यामागून सूत्र हलुन ज्या स्त्रियांनी अंडरवर्ल्डचे काळे धंदे चालवण्यास मदत केली . अश्या आख्यायिका बनलेल्या स्त्रियांच्या जीवनकहाण्या या पुस्तकात दिलेल्या आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्डची यापूर्वी कधीच उजेडात न आलेली बाजू अत्यंत चित्तवेधक शैलीत आणि सखोल अभ्यास करून या पुस्तकात लेखकांनी मांडलेली आहे. त्यातील काही स्त्रियांचा इथे थोडक्यात उल्लेख देतो #जेनाबाईदारूवाली जेनाबाई दारूवाली ही देशातील पहिली महिला डॉन होती. तसेच ती गांधीजी ची समर्थक होती अनेक स्वतंत्र चळवळीत तिने भाग घेतला होता. त्यानंतर तिने धान्याचा काळाबाजार आणि बेकायदा दारूचा धंदा असा आपला व्यवसाय वाढविला . या स्त्रीची मुंबई च्या अंडरवर्ल्ड वर तिची पकड होती ती हाजीमस्तान ते दाऊद यांपर्यंतच्या दादा लोकांना सल्ले द्यायची तसेच पोलीसाची खबरी म्हणून देखील काम करायची . दादा लोक ही तिचा आदर करायचे हाजी मस्तान तिला बहीण मानायचा तर दाऊद तिला मावशी . तिच्या मुलाची एका गँगवार मध्ये हत्या झाल्यानंतर ती व्यथित झाली यानंतर तिने अंडरवर्ल्ड ला रामराम ठोकला त्यानंतर थोड्याच दिवसात आजारपणात तिचा म्रुत्यु झाला . #गंगूबाई काठीयावाड गंगूबाई हिला लग्नाच्या आमिषाने फसवून मुंबईच्या वैश्या वस्तीत विकले होते त्यानंतर तिने तेच आयुष्य स्वीकारले . त्यानंतर वैश्यावस्ती बंद करायच्या सरकारी फर्मानाने ति वैश्याव्यवसाय करणाऱ्या महीलाची नेता बनली एवढंच़ नव्हे तर तिने पंडित जवाहरलाल नेहरूना देखील राखी बांधली होती आज मुंबई च्या वैश्यावस्तीत प्रत्येक घरात तिचा फोटो आहे तिला तिथे देवाचा दर्जा भेटतो . यासारख्या अनेक स्त्रियांच्या रंजक कथा यात दिल्या आहे मी खात्रीने सांगतोय एकदा तुम्ही पुस्तक वाचायला घेतले तर संपेपर्यंत खाली ठेवणार नाही . ...Read more

  • Rating StarDAINIK KESARI

    मुंबई ‘अंडरवर्ल्ड’ मधील स्त्रियांच्या सत्यकथा... ‘अंडरवर्ल्ड’ हे इतके भीषण आणि भयावह असते, की तेथे पुरुष डॉनचाच वावर असू शकतो, असे सामान्य माणसाला वाटले, तर स्वाभाविक आहे; पण आश्चर्य वाटण्याची गोष्ट अशी, की मुंबई माफियात काही स्त्रियांनाही आपला दबदब निर्माण केला. ‘डोंगरी ते मुंबई’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक एस.हुसैन झैदी यांनी जेन बोर्जस यांच्यासह ‘माफिया क्विन्स ऑफ मुंबई’ या नव्या पुस्तकात अशाच स्त्रियांच्या कहाण्या सांगितल्या आहेत. मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद उल्का राऊत यांनी केला आहे. लेखकांनी या पुस्तकात सांगितलेल्या कहाण्या धक्कादायक तर आहेतच; पण स्त्रियाही पुरुषांइतक्याच क्रूर, कपटी, खुनशी होऊन अंडरवर्ल्डमध्ये आपले स्थान निर्माण करू शकतात हे भयावह सत्य उलगडणाऱ्याही आहेत. पुस्तकात अशा आठ स्त्रियांची माहिती आहे. ‘डोंगरीमधली महाधूर्त बाई’ म्हणजे जेनाबाई चौदा वर्षांची असताना तिचा निकाह झाला आणि ती डोंगरीतील चुनावाला बिल्डिंगमध्ये राहायला आली. पुढे १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि जेनाबाईचा पती दरवेशने पाकिस्तानात जायचे ठरविले, नि याचे कारण असे होते तिने स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता; पण हीच जेनाबाई पुढे ‘अंडरवर्ल्ड’शी कशी परिचित नि निगडित झाली, हा सगळा प्रवास लेखकांनी विस्ताराने नि चित्तवेधकपणे कथन केला आहे. सुरुवातीला झटपट पैसा कमविण्यासाठी अन्नधान्याचा काळाबाजार ती करे. मग पैशाचा हव्यास वाढला आणि ती वरदराजन मुदलियासह दारूचा धंदा करू लागली. याच काळात तिची पोलिसांशी जवळीक वाढली नि नंतर याच ‘धंदा’त तिला अटक झाली. सुटकाही झाली; पण सुटकेनंतर एकीकडे ती पोलिसांची खबरेगिरी करी, तर दुसरीकडे पोलिसांना अंधारात ठेवून चोरटा व्यवहारही! अंडरवर्ल्डमध्ये जेनाबाईचा दबादबा वाढू लागला व हाजी मस्तानपासून दाऊदपर्यंत सर्वांनाच जेनाबाईचा आधार वाटू लागला आणि जेनाबाईही धूर्तपणे सगळी कामे करू लागली. वेगवेगळ्या डॉनमध्ये समेट घडविण्यासाठी मध्यस्थीही जेनाबाई करत असे. अशरफ खान उर्फ सपना हीची दाऊदविरुद्धची सूडकथा अशीच भयानक. तिचा पती मेहमूद खान पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला; पण हे एन्काउंटर दाऊदने दिलेल्या माहितीवरून झाले असे तिला कळले आणि ती पेटून उठली. तिला कोणी हुसेन उस्तराचे नाव सांगितले. तोही दाऊदचा कट्टर शत्रू मेहमूदला मारणाराही मेलाच पाहिजे या सूडाने पेटलेल्या अशरफने उस्तराकडून शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. अगदी नेपाळमध्ये दाऊदकडून होणाऱ्या तस्करीवर हल्ले चढविण्यापर्यंत तिची मजल गेली; पण तिने उस्तराला आपल्या जवळ कधी येऊ दिले नाही. उस्तराला अशरफबद्दल प्रेम वाटू लागले, तो सलगी करू लागला पण असल्या मोहात अशरफ अडकली नाही. ती उस्तराला सोडून गेली. पुढे तिने शारजात जाऊन दाऊदला मारण्याचा कट आखला. अर्थात भडक डोक्याची अशरफ शकलीलच्या इशाऱ्यावरून मारली गेली. एका सुंदरीचा सूडप्रवास हा असा दाऊदला मारण्याच्या उद्दिष्टाने सुरू होऊन अशरफ उर्फ सपनाच्याच अंताने संपला. महालक्ष्मी पापमणी दहशत अशीच लेखकांनी वर्णन केली आहे. मोनिका बेदी हिचे वडील डॉक्टर. मूळ पंजाबी; पण नंतर नॉर्वेत गेलेली. मग इंग्लंडला सतराव्या वर्षी गेली, ती इंग्लिश वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी, मात्र बॉलिवूडमध्ये जाण्याच्या इच्छेने तिला पछाडले. तेथे जाऊनही, संघर्ष करूनही यश मिळेना. तेथून तिची वाट बदलली, पुढे अबू सालेमशी तिची ओळख झाली आणि एक वेगळाच प्रवास सुरू झाला, ते सारे सविस्तरपणे लेखकांनी वर्णन केले आहे. हिंदू डॉन्सच्या सहधर्मचारिणी हा अशा गवळी, गँगस्टर अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक, छोटा राजनची पत्नी सुजाता निकाळजे, रवी पुजारीची पत्नी पद्मा यांविषयी लेखकांनी दिलेली माहिती वाचकांना थरारक वाटल्याखेरीज राहणार नाही. अंडरवर्ल्ड मधील एका वेगळ्या पैलूंवर लेखकांनी प्रस्तुत पुस्तकात प्रकाश टाकला आहे. गुन्हेगारी जगतातील या स्त्रिया केवळ पुरुषांच्या आदेशावर काम करणाऱ्या नव्हत्या व नाहीत. त्यांनी जणू स्वत:चे साम्राज्य अंडरवर्ल्डमध्ये उभे केले. प्रत्यक्ष त्या स्त्रियांची मुलाखत घेऊन लेखकांनी या सत्यकथा लिहिल्या आहेत. या स्त्रियांना अंडरवर्ल्डचा भाग न म्हणता ‘माफिया क्वीन्स’ असे म्हटले आहे, ते काय हे समजण्यासाठी प्रस्तुत पुस्तक अवश्य वाचावयास हवे. ...Read more

  • Rating StarAshwini Hinge

    एक नवीनच वेगळीच माहीती मिळते

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more