* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAFIA QUEENS OF MUMBAI
  • Availability : Available
  • Translators : ULKA RAUT
  • ISBN : 9788184985399
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 216
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SMUGGLING, GUN-RUNNING, DRUGS, TERRORISM FOR MANY DECADES, MUMBAI HAS LIVED UNDER THE SHADOW OF THE UNDERWORLD. DAWOOD IBRAHIM, KARIM LALA, VARADARA- JAN MUDALIAR: THESE ARE NAMES THAT ANY INDIAN WOULD RECOGNISE. ANALYSED IN PRINT, IMMORTALISED ON FILM, THEIR LIVES, THEIR GANGS, THEIR `BUSINESSES` ARE OUT THERE FOR ANYONE WHO WANTS THE INFORMATION. BUT THERE HAVE BEEN WOMEN, TOO, WHO HAVE BEEN PART OF THIS MURKY SIDE OF THE CITY, WALKING ALONG SIDE, SOMETIMES LEADING AND MANIPULATING MEN IN THE UNDERWORLD TO RUN THEIR OWN ILLEGAL BUSINESSES. HERE, FOR THE FIRST TIME, CRIME JOURNAL- ISTS S. HUSSAIN ZAIDI AND JANE BORGES EXPLORE THE LIVES OF SOME OF THESE WOMEN, AND HOW, IN COLD BLOOD, THEY WERE ABLE TO MAKE THEIR WAY UP IN WHAT WAS CERTAINLY A MAN`S WORLD. FROM KAMATHIPURA TO DONGRI, FROM ASSASSINS TO MOLLS, THIS IS A COLLECTION THAT TELLS THE STORIES OF WOMEN WHO HAVE BECOME LEGEND IN MUMBAI`S STREETS, LANES AND BACK-ALLEYS. ABSORBINGLY TOLD, IMPECCABLY RESEARCHED, MAFIA QUEENS OF MUMBAI REVEALS A SIDE OF MUMBAI`S UNDERWORLD THAT HAS NEVER BEEN SEEN BEFORE.
दाऊद इब्राहिम, करीम लाला, हाजी मस्तान यांसारख्या मुंबईतील माफियांवर नियतकालिकं, वृत्तपत्रं अशा माध्यमांमधून अभ्यासपूर्ण लिहिलं गेलं आहे. चित्रपटांमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखाही रंगवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांचे तथाकथित ‘व्यवसाय’ यांविषयी बरीच माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. परंतु काही स्त्रियादेखील मुंबईच्या याच गुन्हेगारी विश्वाचा हिस्सा आहेत, ही गोष्ट फारशी ज्ञात नाही. अंडरवल्र्डच्या भाई आणि दादा लोकांच्या खांद्याला खांदा लावून, तर कधी मार्गदर्शन करून आणि पडद्यामागून सूत्रं हलवून या स्त्रियांनी अंडरवल्र्डचे अवैध धंदे चालवण्यास मदत केलीे. या पुस्तकात प्रथमच अशा काही स्त्रियांच्या जीवनाचा मागोवा घेण्यात आला आहे; आख्यायिका बनलेल्या या स्त्रियांच्या जीवनकहाण्या चित्रित केल्या आहेत.मुंबईच्या अंडरवल्र्डची यापूर्वी कधीही उजेडात न आलेली बाजू अत्यंत चित्तवेधक शैलीत, सखोल संशोधन करून या पुस्तकात मांडली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#MAFIA QUEENS OF MUMBAI #DONGARIMADHALI MAHADHURT BAI #KAMATHIPURYACHI SAMRADNI #EKA SUNDARICHA SOOD PRAVAS #MADAK PADARTHANCHYA SAMRAJYACHI MAHARANI #GANGSTERCHI PREYA #HINDU DONS CHYA SAHA DHRMACHARINI #GANGSTERCHI PREMAPATRA #MOHAK MADANIKANCHA MAYAJAL ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarRajesh Malashe

    गुन्हेगारी जगताबद्दल विषेशतः अंडरवर्ल्ड बद्दल सर्वसामान्य माणसांपासून सगळ्यांनाच भीतीयुक्त कुतूहल असतं. त्यातही मुंबईतले माफिया आणि त्यांचे काळे धंदे यावर विपुल लिखाण झालंय, त्यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित चित्रपट पण निघालेत(दिवार ,वन्स अपॉन या टाईम न मुंबई, शूट आउट at वडाळा.. ही काही उदाहरण) हाजी मस्तान , करीम लाला , वरदराजन मुदलियार यासारख्या नामचीन भाईंपासून सुरू झालेली ही परंपरा आत्ताच्या दाऊद इब्राहिम ते रवी पुजारी पर्यंत अविरत सुरू आहे. यातले सगळे डॉन , माफिया , जास्तकरून पुरुष .. पण या क्षेत्रात एकेकाळी स्त्रियांची पण मक्तेदारी होती किंबहुना मुंबईतील या लेडी डॉन ना मस्तान, करीमलाला , दाऊद सारखे लोक पण वचकून असायचे अस सांगितलं तर कित्येकांना ते खरं वाटणार नाही . पण ही वस्तुस्थिती होती. कित्येकदा दोन टोळ्यांमधल्या मांडवली साठी या लेडी डॉन पुढाकार घेऊन यशस्वी तोडगे काढायच्या. या लेडी माफियांबद्दल माहिती होण्याचं कारण म्हणजे .. पत्रकार एस. हुसैन झैदी आणि जेन बोर्जेस यांनी लिहिलेलं.. माफिया क्विन्स ऑफ मुंबई ` हे पुस्तक. उल्का राऊत ` यांनी मराठीत अनुवाद केलाय. नुकतच वाचनात आलं. अतिशय सुरेख माहिती दिलीय त्यात . कित्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन झैदी आणि बोर्जेस यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग लिहिलेत यात. १.चावलवाली ते दारुवाली असा पल्ला गाठणारी हाजी मस्तान जिला मोठी बहीण मानायचा आणि दाऊद आई मानायचा ती झैनब उर्फ जेनबाई २.कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी अस बिरुद प्राप्त होऊनही इमानदारीत धंदा करणारी गंगुबाई कोठेवाली.. ही प्रत्यक्षात एका खानदानी आणि सधन कठियावडी कुटुंबात जन्मलेली होती. वडील प्रतिथयश वकील होते.. पण नशिबाच्या फेऱ्यात सापडली आणि ... ३.पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम बरोबर दोन हात केलेली.. सपना उर्फ अश्रफ ४.मध्य मुंबईत राहून अमली पदार्थाच्या व्यापारात स्वतःच मोठं साम्राज्य असलेली ..ज्योती आदिरामलिंगम, महालक्ष्मी पापामणी या तत्कालीन लेडी माफिया. त्याचबरोबर पतीच्या खांद्याला खांदा लावून अंडरवर्ल्ड मधे दबदबा असणाऱ्या बायका आशा गवळी..अरुण गवळी ची बायको नीता नाईक..अश्विन नाईक सुजाता निकाळजे..राजन निकाळजे उर्फ छोटा राजन पद्मा पुजारी.. रवी पुजारी या सगळ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी ..`माफिया क्विन्स ऑफ मुंबई ` हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. ...Read more

  • Rating StarAshavajit Narwade

    कालच हूस्सैन झैदी आणि जेन बोर्जस लिखित व उल्का राऊत यांनी मराठी मध्ये अनुवादित केलेले #माफियाक्वीनऑफमुंबई हे पुस्तक वाचले. त्याची समीक्षा इथे मांडतो आहे. आपण सर्वांनी यापूर्वी दाऊद इब्राहिम करीम लाला हाजी मस्तान वरदराजन यासारख्या मुंबईतील माफियाव नियतकालिक वर्तमानपत्र अश्या माध्यमामधून अभ्यासपूर्ण लिखान वाचलेली आहेत. अनेक चित्रपटही याच्यावर चित्रपट काढत असतात ते ही आपण पाहिलेले आहेत . त्यामुळे यांच्या जीवनातील तपशील त्याचे व्यवसाय याबद्दल आपल्याला माहिती आहेच .परंतु काही स्त्रिया देखील मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा हिस्सा आहेत ही गोष्ट आपल्याला फारशी माहिती नसावीत. मुंबई underworld च्या भाई दादा लोकांच्या खांद्याला खांदा लाऊन तर कधी त्यांना मार्गदर्शन करून आणि पडद्यामागून सूत्र हलुन ज्या स्त्रियांनी अंडरवर्ल्डचे काळे धंदे चालवण्यास मदत केली . अश्या आख्यायिका बनलेल्या स्त्रियांच्या जीवनकहाण्या या पुस्तकात दिलेल्या आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्डची यापूर्वी कधीच उजेडात न आलेली बाजू अत्यंत चित्तवेधक शैलीत आणि सखोल अभ्यास करून या पुस्तकात लेखकांनी मांडलेली आहे. त्यातील काही स्त्रियांचा इथे थोडक्यात उल्लेख देतो #जेनाबाईदारूवाली जेनाबाई दारूवाली ही देशातील पहिली महिला डॉन होती. तसेच ती गांधीजी ची समर्थक होती अनेक स्वतंत्र चळवळीत तिने भाग घेतला होता. त्यानंतर तिने धान्याचा काळाबाजार आणि बेकायदा दारूचा धंदा असा आपला व्यवसाय वाढविला . या स्त्रीची मुंबई च्या अंडरवर्ल्ड वर तिची पकड होती ती हाजीमस्तान ते दाऊद यांपर्यंतच्या दादा लोकांना सल्ले द्यायची तसेच पोलीसाची खबरी म्हणून देखील काम करायची . दादा लोक ही तिचा आदर करायचे हाजी मस्तान तिला बहीण मानायचा तर दाऊद तिला मावशी . तिच्या मुलाची एका गँगवार मध्ये हत्या झाल्यानंतर ती व्यथित झाली यानंतर तिने अंडरवर्ल्ड ला रामराम ठोकला त्यानंतर थोड्याच दिवसात आजारपणात तिचा म्रुत्यु झाला . #गंगूबाई काठीयावाड गंगूबाई हिला लग्नाच्या आमिषाने फसवून मुंबईच्या वैश्या वस्तीत विकले होते त्यानंतर तिने तेच आयुष्य स्वीकारले . त्यानंतर वैश्यावस्ती बंद करायच्या सरकारी फर्मानाने ति वैश्याव्यवसाय करणाऱ्या महीलाची नेता बनली एवढंच़ नव्हे तर तिने पंडित जवाहरलाल नेहरूना देखील राखी बांधली होती आज मुंबई च्या वैश्यावस्तीत प्रत्येक घरात तिचा फोटो आहे तिला तिथे देवाचा दर्जा भेटतो . यासारख्या अनेक स्त्रियांच्या रंजक कथा यात दिल्या आहे मी खात्रीने सांगतोय एकदा तुम्ही पुस्तक वाचायला घेतले तर संपेपर्यंत खाली ठेवणार नाही . ...Read more

  • Rating StarDAINIK KESARI

    मुंबई ‘अंडरवर्ल्ड’ मधील स्त्रियांच्या सत्यकथा... ‘अंडरवर्ल्ड’ हे इतके भीषण आणि भयावह असते, की तेथे पुरुष डॉनचाच वावर असू शकतो, असे सामान्य माणसाला वाटले, तर स्वाभाविक आहे; पण आश्चर्य वाटण्याची गोष्ट अशी, की मुंबई माफियात काही स्त्रियांनाही आपला दबदब निर्माण केला. ‘डोंगरी ते मुंबई’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक एस.हुसैन झैदी यांनी जेन बोर्जस यांच्यासह ‘माफिया क्विन्स ऑफ मुंबई’ या नव्या पुस्तकात अशाच स्त्रियांच्या कहाण्या सांगितल्या आहेत. मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद उल्का राऊत यांनी केला आहे. लेखकांनी या पुस्तकात सांगितलेल्या कहाण्या धक्कादायक तर आहेतच; पण स्त्रियाही पुरुषांइतक्याच क्रूर, कपटी, खुनशी होऊन अंडरवर्ल्डमध्ये आपले स्थान निर्माण करू शकतात हे भयावह सत्य उलगडणाऱ्याही आहेत. पुस्तकात अशा आठ स्त्रियांची माहिती आहे. ‘डोंगरीमधली महाधूर्त बाई’ म्हणजे जेनाबाई चौदा वर्षांची असताना तिचा निकाह झाला आणि ती डोंगरीतील चुनावाला बिल्डिंगमध्ये राहायला आली. पुढे १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि जेनाबाईचा पती दरवेशने पाकिस्तानात जायचे ठरविले, नि याचे कारण असे होते तिने स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता; पण हीच जेनाबाई पुढे ‘अंडरवर्ल्ड’शी कशी परिचित नि निगडित झाली, हा सगळा प्रवास लेखकांनी विस्ताराने नि चित्तवेधकपणे कथन केला आहे. सुरुवातीला झटपट पैसा कमविण्यासाठी अन्नधान्याचा काळाबाजार ती करे. मग पैशाचा हव्यास वाढला आणि ती वरदराजन मुदलियासह दारूचा धंदा करू लागली. याच काळात तिची पोलिसांशी जवळीक वाढली नि नंतर याच ‘धंदा’त तिला अटक झाली. सुटकाही झाली; पण सुटकेनंतर एकीकडे ती पोलिसांची खबरेगिरी करी, तर दुसरीकडे पोलिसांना अंधारात ठेवून चोरटा व्यवहारही! अंडरवर्ल्डमध्ये जेनाबाईचा दबादबा वाढू लागला व हाजी मस्तानपासून दाऊदपर्यंत सर्वांनाच जेनाबाईचा आधार वाटू लागला आणि जेनाबाईही धूर्तपणे सगळी कामे करू लागली. वेगवेगळ्या डॉनमध्ये समेट घडविण्यासाठी मध्यस्थीही जेनाबाई करत असे. अशरफ खान उर्फ सपना हीची दाऊदविरुद्धची सूडकथा अशीच भयानक. तिचा पती मेहमूद खान पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला; पण हे एन्काउंटर दाऊदने दिलेल्या माहितीवरून झाले असे तिला कळले आणि ती पेटून उठली. तिला कोणी हुसेन उस्तराचे नाव सांगितले. तोही दाऊदचा कट्टर शत्रू मेहमूदला मारणाराही मेलाच पाहिजे या सूडाने पेटलेल्या अशरफने उस्तराकडून शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. अगदी नेपाळमध्ये दाऊदकडून होणाऱ्या तस्करीवर हल्ले चढविण्यापर्यंत तिची मजल गेली; पण तिने उस्तराला आपल्या जवळ कधी येऊ दिले नाही. उस्तराला अशरफबद्दल प्रेम वाटू लागले, तो सलगी करू लागला पण असल्या मोहात अशरफ अडकली नाही. ती उस्तराला सोडून गेली. पुढे तिने शारजात जाऊन दाऊदला मारण्याचा कट आखला. अर्थात भडक डोक्याची अशरफ शकलीलच्या इशाऱ्यावरून मारली गेली. एका सुंदरीचा सूडप्रवास हा असा दाऊदला मारण्याच्या उद्दिष्टाने सुरू होऊन अशरफ उर्फ सपनाच्याच अंताने संपला. महालक्ष्मी पापमणी दहशत अशीच लेखकांनी वर्णन केली आहे. मोनिका बेदी हिचे वडील डॉक्टर. मूळ पंजाबी; पण नंतर नॉर्वेत गेलेली. मग इंग्लंडला सतराव्या वर्षी गेली, ती इंग्लिश वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी, मात्र बॉलिवूडमध्ये जाण्याच्या इच्छेने तिला पछाडले. तेथे जाऊनही, संघर्ष करूनही यश मिळेना. तेथून तिची वाट बदलली, पुढे अबू सालेमशी तिची ओळख झाली आणि एक वेगळाच प्रवास सुरू झाला, ते सारे सविस्तरपणे लेखकांनी वर्णन केले आहे. हिंदू डॉन्सच्या सहधर्मचारिणी हा अशा गवळी, गँगस्टर अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक, छोटा राजनची पत्नी सुजाता निकाळजे, रवी पुजारीची पत्नी पद्मा यांविषयी लेखकांनी दिलेली माहिती वाचकांना थरारक वाटल्याखेरीज राहणार नाही. अंडरवर्ल्ड मधील एका वेगळ्या पैलूंवर लेखकांनी प्रस्तुत पुस्तकात प्रकाश टाकला आहे. गुन्हेगारी जगतातील या स्त्रिया केवळ पुरुषांच्या आदेशावर काम करणाऱ्या नव्हत्या व नाहीत. त्यांनी जणू स्वत:चे साम्राज्य अंडरवर्ल्डमध्ये उभे केले. प्रत्यक्ष त्या स्त्रियांची मुलाखत घेऊन लेखकांनी या सत्यकथा लिहिल्या आहेत. या स्त्रियांना अंडरवर्ल्डचा भाग न म्हणता ‘माफिया क्वीन्स’ असे म्हटले आहे, ते काय हे समजण्यासाठी प्रस्तुत पुस्तक अवश्य वाचावयास हवे. ...Read more

  • Rating StarAshwini Hinge

    एक नवीनच वेगळीच माहीती मिळते

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more