* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE ROAD OF LOST INNOCENCE
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788184981100
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A RIVETING, RAW, AND BEAUTIFUL MEMOIR OF TRAGEDY AND HOPE: THE LIFE OF A CAMBODIAN WOMAN WHO EMERGED FROM YEARS OF SEXUAL SLAVERY TO BECOME A RESCUER OF GIRLS FROM THE HELLISH BROTHELS OF SOUTHEAST ASIA. SOMALY MAM`S LIFE STORY IS AN UNFORGETTABLE AND INSPIRING STORY OF TRIUMPH OVER UNTHINKABLE ADVERSITY. WRITTEN IN EXQUISITE, SPARE, UNFLINCHING PROSE, THE ROAD OF LOST INNOCENCE RECOUNTS THE EXPERIENCES OF SOMALY MAM`S EARLY LIFE, WHEN SHE WAS SOLD INTO SEXUAL SLAVERY AS A GIRL AND SPENT A DECADE BEING SHUTTLED THROUGH THE SOUTHEAST ASIAN SEX TRADE. IT TELLS THE STORY OF HER AWAKENING AS AN ACTIVIST AND HER BRAVE FIGHT AGAINST THE POWERFUL AND CORRUPT FORCES THAT STEAL THE LIVES OF THESE GIRLS. SHE HAS ORCHESTRATED RAIDS ON BROTHELS AND RESCUED SEX WORKERS, SOME AS YOUNG AS FIVE AND SIX YEARS OLD; SHE HAS BUILT SHELTERS, STARTED SCHOOLS, AND FOUNDED AN ORGANISATION THAT HAS SO FAR SAVED OVER 3,400 WOMEN AND CHILDREN IN CAMBODIA, THAILAND, VIETNAM AND LAOS. SOMALY MAM`S MEMOIR - ALREADY AN INTERNATIONAL BESTSELLER - WILL LEAVE YOU AWESTRUCK BY THE TENACITY AND COURAGE OF THIS MODERN-DAY HEROINE AND WILL RENEW YOUR FAITH IN THE POWER OF AN INDIVIDUAL TO BRING ABOUT CHANGE.
स्वत:वर होत असलेला, झालेल्या अन्यायामुळे, अत्याचारामुळे पेटून उठलेल्या निर्भर, निराधार सोमाली. फक्त स्वत:ची सुटका करून थांबली नाही तर भ्रष्टाचारी समाजाच्या विरोधात उभं ठाकून स्वत:सारख्या अनेक जणींची सुटका केली आहे. तिचं आयुष्य चटका लावणारं तर आहेच. पण त्याहून अधिक थक्क करून टाकणारं आहे. मनात आशेचा स्फुल्लिंग जागृत ठेवणारं आहे.
* म.सा.प.- स.ह. परितोषिक २०१० * `द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स,न्यू दिल्ली` तर्फे प्रथम पुरस्कार २०११
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEROADOFLOSTINNOCENCE #THEROADOFLOSTINNOCENCE #दरोडऑफलॉस्टइनोसन्स #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BHARATIPANDE #भारतीपांडे #SOMALYMAM "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 03-09-2010

    प्रवाहाविरोधातला यशस्वी प्रवास… बालपण हरवलेल्या अनेक जणींना देहविक्रयाच्या दुष्टचक्रातून जाताना काय यातना सहन करायला लागतात याचं चित्रण म्हणजे द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स. सोमाली माम हिचं हे आत्मकथन. तिच्यासारख्या अनेक जणींच्या वेदना यामधून व्यक्त होतात. या पुस्तकाचं कव्हरच खूप बोलकं आहे. मुखपृष्ठावरच्या चित्रातील ओठांना घातलेली शिवण या पुस्तकाची प्रस्तावना, मलपृष्ठावरील पुस्तकाची ओळख असं काहीच न वाचताही या आत्मकथनाचं सार सांगते. मुकाटपणे सोसायला लागलेल्या छळाचं हे चित्ररूप आहे... हा छळ आहे बालपण म्हणजे नेमकं काय याचा अर्थ कळत नाही तोच शरीरविक्रयाच्या चक्रामध्ये अडकलेल्या अनेकींचा. त्यांची वेदना लेखिका सोमाली माम ‘द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स’मधून व्यक्त करते. एका गरीब कंबोडियन कुटुंबामध्ये जन्माला आलेली सोमाली... कंबोडियामध्ये होत असलेल्या उलथापालथीच्या काळात तिचा जन्म झाला. तिच्या आईवडलांबद्दल तिला माहिती नव्हती. ती तिच्या आजोबांसोबत जंगलात राहत होती. या दरम्यान तिची आजीही तिला सोडून निघून गेली आणि ती अनाथ झाली. सोमाली स्वत:च्या अनाथपणाविषयी फार तटस्थपणे सांगते. अनाथ असणं कंबोडियामध्ये खूपच सामान्य आहे. भीती वाटण्याइतकं सामान्य... सोमालीचा हा तटस्थपणा अंगावर येतो. ती सांगते, लहानपणी आपलं दु:ख आणि वेदना मी जंगलातल्या झाडांनो सांगायची. या वातावरणातच तिचं भविष्य रेखाटलं गेलं. तिला नऊ-दहा वर्षांची असताना पन्नास-पंचावन्न वर्षांच्या एका माणसाकडे सोपवण्यात आलं. तिला सांगण्यात आलं की ते आजोबा कदाचित तिचे नातेवाईक शोधायला तिची मदत करतील. तिला विकण्यात आलं होतं का याबद्दल तिला कधीच कळलं नाही. सुरुवातीला आधारभूत वाटलेले ते आजोबा नंतर मात्र तिचा छळ करायला लागले आणि सोमालीला कळलं की तिची स्वप्नं ही केवळ ही केवळ स्वप्नंच राहणार आहेत. ती त्या आजोबांच्या नव्या घरात सगळी कामं करायला लागली. त्यांच्यासाठी पैसेही कमवायला लागली. या काळामध्ये तिला सपाता नावाची गोष्ट आयुष्यात पहिल्यांदा मिळाली. तिच्या आयुष्यातल्या या लहान-लहान घटना तिच्या जीवनाचा आलेख अगदी सहज डोळ्यासमोर ठेवतात. म्हणूनच आत्मकथनात आलेल्या या लहान लहान घटनांना मोठं महत्त्व प्राप्त होतं. गावातल्या लोकांची कामं करता करता त्या गावतल्या शाळेच्या शिक्षकांची आणि तिची ओळख झाली. त्यांनी तिच्या आजोबांकडून शाळेमध्ये पाठवण्याची परवानगी मिळवली. त्याच शिक्षकांनी तिचं नाव सोमाली माम असं ठेवलं. हळूहळू सोमाली त्यांच्या कुटुंबाचा एक घटक बनली. लहानशा गावामध्ये सुरू असलेल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्याना सैनिकी शिक्षणही मिळायचं. दहा-बारा वर्षांची मुलं बंदुका साफ करत, चालवतही. एवढंच नाही तर हातबाँबही फेकायचं प्रशिक्षण त्यांना दिलं जायचं असं सोमाली सांगते. तिचा मित्र एका सैनिकाकडून अपघाताने सुटलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये मारला गेला होता. अशा काही गोष्टी सोमाली केवळ जाता जाता म्हणून सांगते, पण त्यामुळे त्या आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जगणाऱ्या लहानग्यांचं तेव्हाचं आयुष्य काय असेल याची सहज कल्पना येते. तिचं वयात येणं, त्यानंतर तिच्या आजोबांनी सुरू केलेले किळसवाणे प्रकार, तिच्या आजोबांची उधारी असलेल्या चिनी वाण्याने तिच्यावर केलेला बलात्कार आणि मग तिचं वयाच्या चौदाव्या वर्षी लावून देण्यात आलेलं लग्न.. अर्थात या सगळ्यामध्ये तिला काही बोलायची संधीच नव्हती. याच वयात वैद्यकीय शिक्षणाचा गंधही नसलेल्या सोमालीने पैसे मिळतात एवढ्याच कारणासाठी दवाखान्यात काम पत्करलं. ती मेलेली माणसं, शरीराचे तुटलेले अवयव यांना स्पर्श करायची. औषधांचा साठा संपत आला की त्यामध्ये पाणी घालून वाढवायची. यामध्ये तिचं बालपण केव्हाच कुस्करलं गेलं. बालपण हरवलेल्या अनेक मुलींना किती त्रास सहन करावा लागतो याचं उदाहरण म्हणजे हे आत्मकथन आहे. दरम्यान, लग्न म्हणजे पूर्णविराम असं वाटलेल्या सोमालीला तिच्या आजोबाने स्वत:ला पैसे मिळावेत म्हणून वेश्याव्यवसायात अडकवलं. तिचा नवरा युद्धभूमीवर निघून गेल्यावर सोमालीला तिच्या आजोबाने कुंटणखान्यात विकलं. त्यानंतर तिच्या आयुष्यातल्या वेदना, अपमान, मानहानी, बीभत्सता, स्वत:बद्दलही वाटलेली किळस याचं प्रमाण खूपच वाढलं. तिच्यावर दहशत बसावी म्हणून कुंटणखान्यातलं आयुष्य जगताना तिच्या अंगावर सापांची वेटोळीही टाकली गेली, असं वर्णन तिने आत्मकथनात केलं आहे. ती सांगते, या लोकांना ठार मारता येत नाही या वैफल्यापोटी ती रडायची. हळूहळू ती परिस्थितीला शरण गेली. आज सोमालीने अनेक मुलींना या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत केली आहे तरी तिच्या त्या भयानक वातावरणाच्या तिच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ती सांगते, एखाद्या मुलीशी तिच्या दुर्दैवी काळातल्या आठवणींबद्दल बोलत असते तेव्हा त्या घाणेरड्या वासाने माझं नाक चोंदून गेलंय असं मला वाटतं. तिला मळमळायला लागतं. तिला वाटतं ती कधीच स्वच्छ होणार नाही. तिने किती सहन केलं असे हे असं स्पष्ट होत जातं. तेव्हाची परिस्थिती इतकी भयानक होती की, घरच्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड लहान मुलींना वेश्या व्यवसायामध्ये गुंतवून केली जायची. मग एक कर्ज फेडलं की नव्या कर्जाची उचल व्हायची. त्या मुलीचं आयुष्य संपलेलंच असायचं. कारण एकदा शरीरविक्रयाच्या व्यवसायामध्ये अडकलेली मुलगी कोणालाच घरी नको असायची. त्यामुळे तिच्या जीवावर घर पोसलं जायचं. सोमालीचे आजोबाही तिला या कुंटणखान्यात विकल्यानंतर अनेकदा तिथे गेल्याचं आणि प्रत्येक वेळी त्याला पैसेही दिल्याचं ती सांगते. अशा मुलींना सोडवण्याचा सोमालीने नंतर वसा घेतला. एकदा सोमालीने त्या कुंटणखान्यातून पळून जायचा प्रयत्नही केला होता. पण तोही फसला. यामध्ये कायद्याचे रक्षक म्हणवल्या जाणाऱ्या पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केल्याचं ती सांगते. त्यानंतरही ती सुटली नाही. तिला पुन्हा एकदा त्याच रस्त्यावरून जावं लागलं. पळून गेल्यामुळे तिला भयंकर छळाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर सोमालीने पळून जाण्याचा विचार रद्द केला. तिने सपशेल शरणागती पत्करली होती. कुंटणखान्यामध्ये विरोध करणाऱ्या मुलींना ठारही केलं जायचं असंही सोमाली सांगते. एका मुलीला तर तिच्याचसमोर ठार मारण्यात आलं होतं. तरी दोन मुलींना तिने पळून जायला मदत केली. त्याबद्दल तिला इलेक्ट्रोडस्नी जाळण्यातही आलं. तिच्या अंगावर त्या खुणा अजूनही असल्याचं ती सांगते. ती सांगते की वेश्यांना होणाऱ्या या शिक्षा भयंकर होत्या. पण आज ज्या प्रकारच्या शिक्षा त्यांना केल्या जातात त्या तर महाभयंकर आहेत. मुलींच्या डोक्यात खिळे ठोकण्यात आल्याचं, वीजेच्या केबल्सनी मारहाण केल्याचं तिने पाहिल्याचं ती सांगते. अशी वेडी झालेली मुलं तिने आपल्या संस्थेमार्फत सोडवली आहेत, असं या आत्मकथनात पुढे सांगण्यात आलं आहे. ती परिस्थितीला शरण गेल्यानंतर डीट्रीश तिच्या आयुष्यात आला. तो आला एक गिऱ्हाइक म्हणूनच पण इतरांपेक्षा त्याने सोमालीला चांगल्या पद्धतीने वागवलं. डीट्रीश तिच्या आयुष्यात आल्यापासून तिचं राहणीमान बदललं. तो तिला इतरांपेक्षा खूप जास्त आर्थिक मोबदला द्यायचा. त्याच पैशांच्या मदतीने ती इतर सर्वसामान्यांसारखं जगायला, कपडे घालायला शिकली. त्यामुळे तिचं या व्यवसायाशी असलेलं नातं लपत होतं. त्यानंतर तिच्या आयुष्यात पिएर नावाचा एक फ्रेच माणूसही आला. त्याने तिच्याशी लग्न करायची इच्छाही व्यक्त केली. पण सोमालीच्या स्वप्नातला श्रीमंत माणूस पिएर नव्हता त्यामुळे तिने सुरुवातीला हे मागणी धुडकावून लावली. पण ती त्याच्याबरोबर राहत होती. मुळात तिलाच कळत नव्हतं की तिचं त्याच्यावर प्रेम आहे की नाही, त्यामुळे ती निर्णय घेऊ शकत नव्हती. व्हिसा मिळवण्याच्या एका प्रक्रियेचा भाग म्हणून तिने पिएरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आधीच्या अनुभवांमुळे लग्न हा प्रकारच तिला नको होता. पण तिने लग्न केलं आणि ती पॅरीसमध्ये गेली. तिथे गेल्यानंतर तिने साफसफाई करण्याची नोकरी पत्करली. त्या माध्यमातून कमावलेले पैसे साठवायलाही ती शिकली. याच काळात ती हळूहळू फ्रेंचही शिकत होती. पिएरमुळे तिच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले पण पिएर मला कधीच आधार देऊ शकला नाही, असं ती स्पष्टपणे आत्मकथनात सांगते. ती फ्रान्समध्ये १८ महिने राहिली. या काळात तिच्यामध्ये मोठे बदल घडून आले. तिचा आत्मविश्वासही वाढला. त्यानंतर कंबोडियामध्ये परत आल्यानंतर तिने दवाखान्यात काम करायला सुरुवात केली. या माध्यमातून तिने वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींवर उपचार करायला सुरुवात केली. ती कुंटणखान्यांमध्येही उपचारासाठी जाऊ लागली. तिने हळूहळू मुलींना कुंटणखान्यातून पळून जायला मदत केली. पण या मुलींना राहायला जागा हवी असल्याचं लक्षात आलं आणि या मुलींना मदत करणारी एनजीओ स्थापन करण्याच्या दिशेने तिने पिएरच्या मदतीने वाटचाल सुरू केली. तोपर्यंत या सगळ्या मुली त्यांच्याच घरामध्ये राहत होत्या. या मुलींना आधार देण्याचं अधिकृत केंद्र सुरू झाल्यावरही सोमालीने वेश्या वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्यासंबंधी मदत करणं सुरूच ठेवलं होतं. कुंटणखान्यावर छापा घालायलाही ती पोलिसांसोबत जायची. त्यामुळेच सोडवलेल्या मुली पोलिसांच्या ताब्यात न जाता एका सुरक्षित वातावरणात आल्या असं ती सांगते. तिला या कामापासून परावृत्त करण्यासाठी तिच्या दत्तक आईवडलांचं घर जाळूनही टाकण्यात आलं. पण सोमालीचे प्रयत्न सुरूच राहिले. तिच्या स्वत:च्या मुलीला मिंगलाही पळवून नेण्यात आलं. अशा अनेक घटनांना तिला सामोरं जावं लागलं. पण ती आजही धीराने उभी आहे. त्यांच्या केंद्राने आत्तापर्यंत तीन हजार मुलींना स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत केली आहे. हा सगळा प्रवास सांगताना सोमालीच्या कथनामध्ये अनेक लहान मुलींनी सहन केलल्या अत्याचाराची वर्णनं येतात. हे सारं अजूनही सुरूच आहे. या सगळ्याबरोबर कंबोडियामधला लैंगिक व्यापार अधिक व्यावसायिक बनायला लागल्याचंही ती सांगते. कंबोडियातून मुली थायलंडमध्ये जातात. हे थांबवण्यासाठी तिच्या परीने ती धडपड करत आहे. तिची ही धडपड कौतुकास्पद तर आहेच पण अनेकांना नवी दिशा देणारीही आहे. सोमालीचा हा प्रवास, तिचं हे आत्मकथन वाचकाच्या मनाला नाही भिडलं तरच नवल. हे वाचल्यानंतर एक नक्की जाणवतं की, हे वाचणाऱ्या पुरुष वाचकाला आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांकडे केवळ एक स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा माणूस म्हणून अधिक आदराने पाहता आलं तरीही खूप झालं. त्यामुळे सोमालीसारख्या अनेकांच्या आयुष्यामध्ये आशेचा एक किरण नक्की निर्माण होईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk