* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRUSHNADEVRAI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984217
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VIJAYANAGAR EMPIRE HAS BEEN CONSIDERED AS THE EPITOME OF INDIAN-HINDU CIVILIZATION AND THE ESTABLISHMENT OF A HINDU REPUBLIC. IT HAS MADE AN UNPARALLELED CONTRIBUTION TO RELIGION, CIVILIZATION, THE PERFORMING ARTS, MUSIC AND LITERATURE. AMONGST ALL THE RULERS OF THIS EMPIRE, THE NAME OF KRISHNA DEV RAI STANDS TALL. DURING HIS REIGN, THE VIJAYANAGAR ARMY REMAINED UNVANQUISHED. SHRI CHAITANYA MAHAPRABHU, VALLABHACHARYA, SAINT KANAKDAS, SAINT PURANDARDAS AND OTHER GREAT MEN WERE HONORED BY HIM. THE RENOWNED MADHVACHARYA SHRI VYASTEERTH WAS HIS GURU. KRISHNA DEV RAI WAS NOT ONLY A CAPABLE MILITARY LEADER, BUT ALSO AN EMPEROR WHO TOOK GOOD CARE OF HIS SUBJECTS. HE IMPLEMENTED VARIOUS PROJECTS FOR THE BENEFIT OF HIS POPULACE. WE FIND RELIABLE AND DETAILED INFORMATION ABOUT HIS SOCIAL-CULTURAL WORK IN THE REPORTS OF CONTEMPORARY PORTUGUESE TRAVELLERS. THEY HAD VISITED VIJAYANAGAR AND STAYED THERE FOR SOME TIME. ADDITIONAL INFORMATION ABOUT HIM CAN BE HAD FROM INSCRIBED TABLETS – ‘SHILALEKHA’ HE HAD MADE. HIS EMPIRE EXTENDED IN ALL DIRECTIONS AND INCLUDED BELGAUM, GOA, CUTTACK AND SRI LANKA. KRISHNA DEV RAI’S BOOKS WRITTEN IN KANNADA, TELUGU, TAMIL AND SANSKRIT REVEAL THE WORKINGS OF A SENSITIVE MIND. HIS FAME AS THE ‘BHOJRAJA’ OF ANDHRA HAD SPREAD FAR AND WIDE. GREAT POETS ADORNED HIS DURBAR. HE HAD HONOURED THE POET SHREENATH (KNOWN AS THE ‘TELUGU KALIDASA’) BY DONATING HIS WEIGHT IN GOLD. WITHIN THE SHORT SPAN OF NINETEEN YEARS HE WON ALL THE THIRTY BATTLES THAT HE FOUGHT. ‘AMUKTAMALYADA’, HIS COLLECTION OF POEMS IS CONSIDERED AMONG THE FINEST OF TELUGU POETRY. AS ONE WITH GREAT COMMAND OVER THE SHASTRAS AND TECHNIQUES OF WARFARE, NONE COMES CLOSE TO THE EMPEROR KRISHNA DEV RAI.
विजयनगर साम्राज्य म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीचा,हिंदवी स्वराज्य स्थापनेचा `महोन्नत महामेरू` म्हणून ओळखले जाते. धर्म, संस्कृती, नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत या संदर्भांत या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या इतिहासातील सर्व सम्राटात `कृष्णदेवराय` हा अतुलनीय असा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्री चैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी सत्पुरुषांना त्याने सन्मानित केले. प्रख्यात मध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरू होते. कृष्णदेवराय हा केवळ लष्करी बाण्याचा सम्राट नव्हता, तो लोकहितदक्ष राजाही होता. त्याने आपल्या प्रजेच्या सुखासाठी, लोकहितासाठी अनेक कामे केली. त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी तत्कालीन परकीय पोर्तुगीज प्रवाशांच्या वृत्तांतातून विश्वसनीय माहिती व तपशील उपलब्ध झाले आहेत. या प्रवाशांनी विजयनगरला भेट देऊन तेथे काही दिवस वास्तव्य केले होते. तसेच कृष्णदेवरायाने खोदलेल्या शिलालेखातूनही त्याच्या कार्याची माहिती मिळते. विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत त्याने राज्य केले. कन्नड, तेलुगु, तमिळ, संस्कृत या विविध भाषांतून त्याचे मनोज्ञ असे ग्रंथलेखन केले. आंध्रचा `भोजराजा` म्हणून त्याची ख्याती सर्वदूर दरवळली होती. त्याच्या दरबारात महान असे अष्टदिग्गज कवी होते. `तेलुगु कालिदास` म्हणून सर्वश्रुत असलेल्या `श्रीनाथ` कवीची त्याने सुवर्णतुला केली. अवघ्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तिसाहून अधिक लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. त्याने लिहिलेल्या `अमुक्तमाल्यदा` या काव्यग्रंथाची गणना तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. शस्त्र आणि शास्त्र यांच्यावर अभूतपूर्व हुकमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KRUSHNADEVRAI #KRUSHNADEVRAI #कृष्णदेवराय #BIOGRAPHY #MARATHI #DR.LAXMINARAYANBOLLI #डॉ.लक्ष्मीनारायणबोल्ली "
Customer Reviews
  • Rating StarKrrish Patil

    विजयनगर साम्राज्य म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीचा,हिंदवी स्वराज्य स्थापनेचा महोन्नत महामेरू म्हणून ओळखले जाते. धर्म, संस्कृती, नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत या संदर्भांत या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या इतिहासातील सर्व सम्राटा कृष्णदेवराय हा अतुलनीय असा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्री चैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी सत्पुरुषांना त्याने सन्मानित केले. प्रख्यात मध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरू होते. कृष्णदेवराय हा केवळ लष्करी बाण्याचा सम्राट नव्हता, तो लोकहितदक्ष राजाही होता. त्याने आपल्या प्रजेच्या सुखासाठी, लोकहितासाठी अनेक कामे केली. त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी तत्कालीन परकीय पोर्तुगीज प्रवाशांच्या वृत्तांतातून विश्वसनीय माहिती व तपशील उपलब्ध झाले आहेत. या प्रवाशांनी विजयनगरला भेट देऊन तेथे काही दिवस वास्तव्य केले होते. तसेच कृष्णदेवरायाने खोदलेल्या शिलालेखातूनही त्याच्या कार्याची माहिती मिळते. विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत त्याने राज्य केले. कन्नड, तेलुगु, तमिळ, संस्कृत या विविध भाषांतून त्याचे मनोज्ञ असे ग्रंथलेखन केले. आंध्रचा भोजराजा म्हणून त्याची ख्याती सर्वदूर दरवळली होती. त्याच्या दरबारात महान असे अष्टदिग्गज कवी होते. तेलुगु कालिदास म्हणून सर्वश्रुत असलेल्या श्रीनाथ कवीची त्याने सुवर्णतुला केली. अवघ्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तिसाहून अधिक लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. त्याने लिहिलेल्या अमुक्तमाल्यदा या काव्यग्रंथाची गणना तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. शस्त्र आणि शास्त्र यांच्यावर अभूतपूर्व हुकमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही. ...Read more

  • Rating StarManjusha Thatte Joglekar

    मधल्या काळात ही कादंबरी वाचून झाली आणि खरं सांगते मन फार विषण्ण झालं... काही काळ मनात एक प्रकारची पोकळी तयार झाली. काय हे, एवढ्या मोठ्या, दिग्विजयी साम्राज्याची ही अशी अवस्था व्हावी ! हा सम्राट श्रीकृष्णदेवराय स्वतः एक धर्मात्मा राजा होता. तो स्राट असताना धर्माची पताका अतिशय उंच रोवली गेली होती, शिवाय तो एक साहित्यिक होता. अत्युत्तम कवी, उत्तम वादक होता. कानडी, तेलगू, तामिळ, संस्कृत या भाषांमध्ये याने लिहिलेले ग्रंथ आहेत. संगीत, साहित्य, नृत्य, संस्कृती, नाट्य, तसेच धर्म म्हणजेच शस्त्र आणि शास्त्र यांचा उत्तम असा हा जाणकार होता. या सगळ्या क्षेत्रांत याचं अतुलनीय योगदान आहे. अतिशय उत्तम शासक असणार्‍या या राजाच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी आज कुठल्या अवस्थेत आहे, हे सर्वांना माहीत आहे. का घडावं असं ! या विचारांनी मन दुःखी झालं होतं. पण आज हंपी मुस्लिम अतिरेक्यांच्या राजवटीत नाही आणि आपण काळाच्या ओघात खूप पुढे आलो आहोत असा विचार करून मनाला समजावलं. एक कलाकार कोमल मनाचा, भावनाशील असतो आणि भावनेच्या भरात तो खूप वेळा अतिशय नाजूक क्षणी चुकीचे निर्णय घेतो. हा सम्राट जो एक कलाकारही होता, याच्या बाबतीतही हेच घडलं आणि ज्यावेळी आपली चूक त्याला समजली, तेव्हा त्याला बसलेल्या प्रचंड धक्क्यातून हा सम्राट कधी सावरूच शकला नाही. आणि तिथेच हा सम्राट आणि त्या बरोबरीने त्याचं विजयनगर साम्राज्यही लयाला गेलं. आज हंपी आपल्यासमोर आहे... ...Read more

  • Rating StarDilip Moghekar

    Very well book.I Read it

  • Rating StarKaushik Lele

    विजयनगरचं साम्राज्य हे भारतीय इतिहासातलं सुवर्णपान. हरिहर-बुक्क या बंधुद्वयांनी मुसलमानी आक्रमणाला विरोध करत हिंदूधर्मीयांचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्या पुढच्या राजांनी त्याला साम्राज्याचं स्वरूप आणलं. या साम्राज्याच्या भौगोलिक सीमा रुंदावण्याच आणि त्याला समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवण्याचं काम केलं ते कर्तृत्ववान राजा कृष्णदेवराय याने. हे पुस्तक या कृष्णदेवरायाचं हे कादंबरीमय चरित्र आहे. हा राजा होता तरी कसा, हे थोडक्यात सांगतो म्हणजे हे चरित्र वाचण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागून राहील. आपल्या एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीत राजाने राज्याच्या सीमा संपूर्ण दक्षिण भारतभर आणि श्रीलंकेतही पोचवल्या. कटक प्रांतही त्याने जिंकलेला.आदिलशहाचा पराभव करून रायचूर प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या या पराक्रमामुळेच आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा यांच्या दक्षिण भारतातल्या विस्ताराला आळा बसला होता. पण तो नुस्ता साम्राज्यवादी नव्हता तर उत्तम प्रजापालक होता. शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरोवर, कालवे बांधणे; सारा वसुलीमधला अन्याय दूर करणे याबाबत तो जागरूक होता. साहित्य, संगीत,कला यांना त्याने उदार राजाश्रय दिला. कन्नड, तेलुगू, तमिळ आणि संस्कृत भाषेतले कितीतरी कवी त्याच्या राजदरबारी होते. "अष्टदिग्गजलु" अशी उपाधी असणारे आठ तेलुगू महाकवी राजाच्या दरबारी होते. राजा बहुभाषिक, रसिक आणि स्वतः कवी होता. कन्नड असूनही "अमुक्त माल्यदा" हे मधुराभक्तीवर आधारित तेलुगू महाकाव्य कृष्णदेवरायाने लिहिले ज्याची गणना तेलुगुतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. काव्य आणि वीरता ; शस्त्र आणि शास्त्र यांचा असा मिलाफ दुर्मिळच. त्याच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या ठिकाणी अतिभव्य आणि शिल्पकलेनी नटलेली मंदिरं, गोपुरं बांधून हिंदुधर्मीयांच्या गौरवस्थानात भर टाकली गेली. या कादंबरीत राजाच्या आगमनाची वर्दी देणारी ललकारी अशी दिलीये श्रीमत समस्त भुवनाश्रय राजाधिराज राजपरमेश्वर पूर्व पश्चिम दक्षिण समुद्राधीश्वर अरि राजाराम गंडभेरुंड यदुकुल संजात तुळूव वंशोद्भव नरासारायडू तनय श्री विरुपाक्ष पद्माधारक हिंदुधर्म प्रतिष्ठापनाचार्य गो-ब्राह्मण प्रतिपालनाचार्य श्रीकृष्णदेवराय ... कन्नड राज्यारमारमण बहुपराक् कर्नाटकरत्न सिंहासनाधीश्वर बहुपराक् ... साहित्य समारांगण सूत्रधार ... अशा या बहुआयामी कर्तृत्ववान सम्राटाने राज्य कसं वाढवलं, अंतर्गत कालाहांचा सामना कसा केला, महाअमात्य तिम्मरसू यांच्या दक्षतेचा यात सिंहाचा वाटा कसा होता, गुरू व्यासराय आणि गुरुबंधु संत पुरंदारदास यांचं मार्गदर्शन कसं मिळालं, नातेवाईकांनी केलेल्या कपटानेच या राजाचं राजपद कसं गेलं हे सगळं वाचण्यासारखंच आहे. चरित्राची शैली ऐतिहासिक कादंबऱ्यांना साजेशी रसाळ, ओघवती, काव्यमय आहेच. कुठेही विनाकारण प्रसंगला ताणलेलं नाहीये. योग्य ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे पण संदर्भांची चर्चा लांबवून कथेचा ओघ रोखला नाहीये. हे पुस्तक वाचताना शिवाजी महाराज आणि कृष्णदेवराय यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज नाही आणि माझा इतिहासाचा अभ्यास जुजबीच आहे तरीही मला जाणवलेले काही मुद्दे असे - कृष्णदेवरायाला साम्राज्य आयते मिळाले होते; शिवाजी महाराजांनी ते शून्यातून निर्माण केले. कृष्णदेवरायाने साहित्य-संगीत-कला इ. ना उदार आश्रय दिला आणि त्यावर भरपूर खर्च केला. महाराजांना तितकी स्वस्थता दुर्दैवाने मिळाली नाही. पूर्ण देशाला मुसलमानी सत्तेपासून मोकळं करून, दिल्लीपर्यंत साम्राज्य विस्तार करायची "थोरली मसलत" महाराजांचं स्वप्न होतं. पण राया मात्र दक्षिण भारतावर संतुष्ट वाटतो. महाराज जास्त राजकारणचतुर वाटतात. इंग्रज आणि पोर्तुगीजांचा कावाही त्यांनी ओळखला होता. राया मात्र पोर्तुगीज लोकांशी मैत्री जपून होता. बंदुका, घोडे यांच्यासाठी त्यांच्यावर अवलंबून होता. गोव्यात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांकडे काणाडोळा केलेला दिसतो. शांततेच्या काळात स्वतःची ताकद वाढवायचे प्रयत्न महाराजांनी केले. स्वतःचं आरमार बनवलं. हा राया मात्र शांततेच्या काळात नवीन युद्धतंत्रज्ञान, विज्ञान याकडे लक्ष न देता साहित्यचर्चेत त्यांना प्रोत्साहन देण्यात रममाण झाला. राया आणि त्याची प्रजा हिंदु धर्माभिमानी असली तरी महाराजांनी प्रत्येक मावळ्यात व पूर्ण रायतेत निर्माण केलेली "हिंदवी स्वराजयाची" आस, धग मात्र वेगळीच. म्हणूनच राया पायउतार झाल्यावर काहीच वर्षांत सिंहासनाच्या लोभापायी झालेल्या सुंदोपसुंदीत साम्राजाचा अंत झाला. उलट महाराजांच्या मृत्यूनंतर गृहकलह होऊनही महाराष्ट्र पुढची २५ वर्षं औरंगजेबाला पुरून उरला. आणि पुढे पेशव्यांनी महाराजांची "थोरली मसलत" पूर्ण केली. आज साडे तीनशे वर्षांनीही "हिंदवी स्वराज्याची" धग मराठी रक्तात सळसळते आहे. असो माझी मल्लिनाथी पुरे. महान व्यक्ती आपापल्या काळात कालानुरूप महानच असतात. त्यांचं चरीत्र वाचणं नेहमीच मार्गदर्शक असतं. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more