* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IN THE NAME OF HONOUR
  • Availability : Available
  • Translators : ULKA RAUT
  • ISBN : 9788184980059
  • Edition : 3
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 103
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NATASHA WAS EVERY INCH A COMMON GIRL, RAISED IN AN ORPHANAGE, A CITIZEN OF RUSSIA, BUT SHE WAS FELICITATED WITH THE AWARD, `CERTIFICATE OF HONOUR`. HER JOURNEY STARTED OUT OF THE LOVE AND CONCERN SHE HAD FOR THE OTHER ORPHANS LIKE HER. AFTER MARRIAGE, SHE AND HER HUSBAND DAVID CAME TO KNOW THAT SHE WOULD NEVER BE ABLE TO CONCEIVE THEIR OWN CHILD. SO, INSTEAD OF CURSING THE DESTINY FOR THEIR BAD LUCK, TOGETHER THEY DECIDED TO DO SOMETHING CONCRETE FOR THE ORPHAN CHILDREN. THEY STARTED SHELTERING THE ORPHANS BY BRINGING THEM HOME, BY BEING THEIR PARENTS. THEY CONTRIBUTED THEIR EFFORTS, MONEY, LOVE; EVERYTHING THEY HAD FOR THE BETTERMENT OF THESE CHILDREN. THIS BOOK REVEALS THE GOOD AND BAD EXPERIENCES THEY HAD DURING THIS JOURNEY.
जून २००२ मध्ये भावाने केलेल्या तथाकथित गुन्ह्याची शिक्षा म्हणून मुख्तार माईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. प्रतिष्ठेपायी घडलेल्या ह्या कृत्याची खबर पाकिस्तानातील पत्रकारांना मिळाल्यानंतर मुख्तार माईची कहाणी उजेडात आली. त्या भयानक बलात्कारानंतर रिवाजाप्रमाणे तिने आत्महत्या करावी अशी अपेक्षा होती. परंतु मुख्तार माईने ती परंपरा मोडली. अभूतपूर्व धैर्य दाखवून तिने बलात्का-यांना कोर्टात खेचलं. पुराण्या रीतिरिवाजांनी जखडलेल्या समाजव्यवस्थेशी मुख्तार माईने असामान्य धैर्याने आणि सर्वस्व पणाला लावून अथक झुंज दिली.खटल्यातील काही आरोपींची सुटका झाल्याने मुख्तार माईच्या जिवाला अजूनही धोका आहेच. असं असलं तरी मुख्तार माईने घाबरून पळ काढलेला नाही. पाकिस्तान सरकारकडून नुकसान भरपाईदाखल जे पैसे मिळाले, त्यातून तिने मुलींसाठी शाळा चालू केली. विशेष म्हणजे ह्या शाळेत ती स्वत:ही मोठ्या उत्साहाने शिकत आहे. ह्या हृदयद्रावक आणि प्रेरणादायक कहाणीमधून मुख्तार माईने आपली कैफियत जगासमोर मांडली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INTHENAMEOFHONOUR #INTHENAMEOFHONOUR #इनदनेमऑफऑनर #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ULKARAUT #उल्काराऊत #MUKHTARMAI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 21-5-2009

    मदर तेरेसा, मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांच्या सान्निध्यात प्रतीत होणारी विशुद्ध महानता मुख्तार मार्इंच्या व्यक्तिमत्त्वातही जाणवते. मीरवाला या लहानशा खेडेगावात राहणारी मुख्तार माई प्रथमदर्शनी शांत, काहीशी बुजरी वाटते. परंतु गावात तिच्याबरोबर फिर असताना ‘बलात्कार, निरक्षरता, स्त्रियांवरील अत्याचार’ याविरुद्ध लढणाऱ्या मुख्तारमधील ताकद जाणवते. साऱ्या पाकिस्तानात, इतकंच नव्हे तर संपूर्ण जगातच तिने सुरू केलेल्या चळवळीचा डंका वाजतो आहे. मुख्तारच्या कहाणीची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहेच, तिच्या धाकट्या भावावर लफडं केल्याचा खोटा आळ घेण्यात आला. या अपराधासाठी मुख्तारवर सामूहिक बलात्काराची सजा पंचायतीनं फर्मावली. शिक्षेची अंमलबजावणीदेखील तात्काळ करण्यात आली. कुचेष्टा करणाऱ्या जमावाच्या नजरा चुकवीत अर्धवस्त्रावस्थेतील मुख्तार कशीबशी घरी पोहोचली होती. या प्रकारानंतर तिने निमूटपणे आत्महत्या करावी, अशी सर्वांची रास्त अपेक्षा होती. ती अपेक्षा मुख्तार पूर्ण करणारही होती, परंतु नंतर शरमेची जागा संतापाने घेतली. जीव देऊन अपराध्यांना मोकळं सोडण्याऐवजी तिने त्यांना कोर्टात खेचलं. साऱ्या जगासमोर आपली कैफियत मांडली. एवढ्यावरच मुख्तार थांबली असती, तर अन्य असंख्य पीडित स्त्रियांमध्ये तीही एक, असं समजून प्रकरणावर पडदा पडला असता, सुदैवाने तसं झालं नाही. नुकसानभरपाईदाखल मिळालेल्या पैशांमधून मुख्तारने गावात शाळा सुरू केली. जुलमी सरंजामशाहीविरुद्ध लढण्यासाठी लोकशिक्षण हा एकमेव मार्ग आहे. यावर तिचा दृढविश्वास होता. मुख्तारची कहाणी मीदेखील ऐकली होती. २००४ मध्ये पाकिस्तानला गेलो असताना मी तिला भेटण्यासाठी मीरवाला गावाला भेट दिली. (त्या वेळी ती मुख्तरनबीबी या नावाने ओळखली जाई.) इस्लामाबादहून लाहोर, तिथून मुलतान असा विमान प्रवास आणि नंतर अनेक तासांचा मोटार प्रवास, अशी मजल-दरमजल करीत मी मीरवाला गावी पोहोचलो. मीरवालात तेव्हा वीज पोहोचली नव्हती. तिच्या घरी तिचे भाऊ, वडिलांची भेट झाली. ती मात्र मागेच होती. एखादी तडफदार, तेजस्वी स्त्री भेटेल या अपेक्षेने गेलो असतो, तर माझी निराशाच झाली असती. मला ती संकोची स्वभावाची, काहीशी जुन्या वळणाची वाटली. बहुधा ‘बाईने जास्त बोलू नये.’ असा विचार करून ती फारसं बोलत नव्हती. सुरुवातीला तिचे वडील आणि भाऊच माझ्याशी संभाषण करीत होते. नंतर मात्र ती माझ्याबरोबर मोकळेपणाने बोलायला लागली. बलात्कारानंतर वाटलेली शरम, अखंड अश्रू गाळणं. कुटुंबियांची तिच्यामुळे झालेली बेअब्रू याविषयी ती नि:संकोचपणे बोलली. शाळेविषयी ती अतिशय उत्कटपणे सांगत होती. हळूहळू तिने संपूर्ण संभाषणाची सूत्रे स्वत:कडे घेतली. ‘शाळेसाठी पैसे कमी पडताहेत. शिक्षकांचा पगार देण्यासाठी घरातील दागिने विकावे लागले. ‘काय करावं समजेनासं झालंय.’ ती म्हणाली, ‘माझ्या संरक्षणासाठी तैनात केलेले पोलीस आता कंटाळलेत. त्यांच्याकडून ढिलाई झाली तर माझ्या जिवाला धोका आहे.’ असेही ती पुढे म्हणाली. मुलाखत संपल्यावर नंतर तिने मला एका बाजूला नेलं आणि ‘मदत करण्यासाठी’ कळकळीची विनंती केली. तिच्या आवाजात असा काही आवेश होता, की प्रथमदर्शनी बुजरी वाटलेली मुख्तार हीच का, असा विचार माझ्या मनात आला. मी मुख्तारवर लिहिलेला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. अमेरिकेतील वाचक तिच्या कहाणीने हेलावून गेले. मदतीचा ओघ सुरू झाला. ‘चेक पाठवा. मी ते तिच्याकडे पोहोचते करीन.’ मी आनंदीत होऊन जाहीर केलं. ‘मर्सी कॉर्पस’च्या मदतीने मी सारे चेक मुख्तारकडे पाठवले. तब्बल एक लाख साठ हजार डॉलर्स जमले. त्यातून तिने व्हॅन खरेदी केली. अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्कूल बस असा दोन्हीसाठी या व्हॅनचा उपयोग होणार होता. उरलेल्या पैशांमधून माध्यमिक शाळा उभारायचं काम सुरू झालं. नंतर न्यूयॉर्क आणि मीरवाला अशा दोन्ही ठिकाणी मी मुख्तारला अनेकदा भेटलोय. अमेरिकेत ती भव्य मेजवान्या, व्हाइट हाऊसमधील स्वागतसमारंभ, आलिशान हॉटेलात सत्कार अशा प्रसंगी हजर असली, तरी ‘कधी एकदा मायदेशी परतते’ असं तिला वाटत राहतं. एकदा न्यूयॉर्कमधील अतिप्रतिष्ठित लोकांसमवेत मेजवानीला गेली असताना तिने चक्क पाकिस्तानी जेवण मागवलं! अमेरिकेतील अत्याधुनिक वातावरण पाहून तिला धक्का बसेल असं मला वाटलं होतं. ती मात्र सारंच सहजपणे अनुभवत होती. ‘ग्लॅमर’ मासिकात तिच्यावर आलेला लेख आणि फोटो पाहताना ती जराही लाजली वा संकोचली नाही. (ग्लॅमरसारख्या फ्याशनला वाहिलेल्या मासिकातील तिचे संपूर्ण अंग झाकणाऱ्या कपड्यांमधील फोटो, हा एक मोठाच विरोधाभास होता!) न्यूयॉर्कमध्येदेखील तिच्या मस्तकावर आच्छादन असतंच, पाकिस्तानी असल्याचा अभिमान तिच्या वागण्यातून जाणवत असतो. मुख्तारमुळे पाकिस्तानला जगभर प्रसिद्धी आणि सर्वांच्या सदिच्छा मिळाल्या हे खरं असलं तरी पाकिस्तान सरकारने मात्र तिला त्रासच दिला. याची दोन कारणं असतील. पाकिस्तानी समाजव्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगून ती देशाला बदनाम करते आहे असं सरकारला वाटतंय. दुसरं म्हणजे पंजाबमधील बारक्याशा खेडेगावातील एका य:कश्चित अडाणी बाईला जगभर नावलौकिक मिळतोय. तिच्या धाडसाचं कौतुक होतंय, या गोष्टीचा पाकिस्तानी नेत्यांना मत्सर वाटत असावा. परिणामत: त्यांनी सतत तिची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न केला आहे. मुख्तार अमेरिकेत एका परिषदेसाठी जाणार होती. तेव्हाचं उदाहरण घ्या : खुद्द राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी तिने देशाबाहेर जाऊ नये यासाठी ‘एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये तिचं नाव टाकण्याचं फर्मान काढलं. अधिकाऱ्यांनी तिचा पासपोर्ट जप्त केला. त्याबद्दल तिने जाहीर तक्रार केली. परिणामी अधिकाऱ्यांनी तिचं अपहरण करून तिला इस्लामाबादला नेलं. तरीही मुख्तारचा आवाज बंद झाला नाही. राष्ट्राध्यक्ष मुशर्रफची चांगलीच नाचक्की झाली. झुंजार मुख्तारची प्रतिमा अधिकच उजळली. आमना बत्तारकडून समजली ती घटना सर्वात जास्त धक्कादायक आहे. ब्रिगेडियर ईजाज शाह हे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचे अत्यंत निकटचे स्नेही. २००५ मध्ये आमना बत्तारला धमकी देण्यासाठी ते लाहोरला गेले होते. आमना पाकिस्तानी-अमेरिकन डॉक्टर असून, एक मानवी हक्क संघटना चालवते. (www.4anna.org) तिने मुख्तारला सतत प्रोत्साहन दिलं आहे. अमेरिकेच्या वाऱ्यांमध्ये तीच मुख्तारच्या सोबत जाई, तिच्या दुभाष्याचं कामही तीच करीत असे. पाकिस्तानी स्त्रियांच्या हक्कासाठी अखंडपणे झगडत असे. ब्रिगेडियर महाशय आमनाला धमकीवजा ताकीद देताना म्हणाले, ‘तू आणि मुख्तारने सांभाळून वागलेलं बरं. उगाचच संकटांना निमंत्रण कशाला देता?’ मुख्तार आणि आमनाच्या नियोजित न्यूयॉर्क भेटीचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, ‘आम्ही काहीही करू शकतो हे विसरू नका. न्यूयॉर्कमध्ये काळ्या लोकांना थोडे पैसे दिले तर त्या बदल्यात ते आम्ही सांगू त्याचा सहजपणे खून पाडतील.’ या बोलण्याला वर्णद्वेषाचा वास होताच, शिवाय आमना आणि मुख्तारचा अमेरिकेत खून होऊ शकतो, अशी प्रच्छन्न धमकीही त्यामागे होती. मी पाकिस्तान सरकारकडे याविषयी विचारणा केली असता, ब्रिगेडियर शहा आमनाला भेटल्याचं मान्य केलं; परंतु त्यांनी तिला कोणत्याही प्रकारची धमकी दिल्याचं मात्र साफ नाकबूल केलं! २००५ मध्ये मुख्तारचं यूएनमध्ये भाषण होणार होतं. कित्येक आठवड्यांपूर्वी सारी तयारी पूर्ण झाली होती. जाण्यापूर्वी ती माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला आली असतानाच आयोजकांचा फोन आला. ‘पाकिस्तान सरकारच्या आदेशावरून मुख्तारचं भाषण रद्द करण्यात आलं.’ अशी बातमी त्यांनी दिली. पाकिस्तानी नेत्यांनी पुन्हा एकदा स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. अमेरिकेत काही लोकांनीच मुख्तारचं यूएनमधील भाषण ऐकलं असतं, परंतु बंदी घातल्याने न झालेल्या भाषणाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पाकिस्तान सरकारने मुख्तारवर सतत दबाव टाकायचा प्रयत्न केला. तिचा पत्रव्यवहार जप्त केला, फोन टॅप होत असे. सरकारधार्जिण्या वृत्तपत्रांतून कायम तिच्याविषयी बदनामीकारक लेख छापून येत- ती परदेशात जाऊन मजा मारते; ती पाकिस्तान सरकारशी एकनिष्ठ नाही. ती परकीय (माझ्यासारख्या) तसंच भारतीय दलालांच्या तालावर नाचणारी बाहुली असून पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी त्यांना मदत करत असते... वगैरे वगैरे. मुख्तार अतिशय संवेदनशील असल्याने अशा जहरी टीकेमुळे तिला कमालीचा त्रास होई. परंतु नंतर तिच्यामध्ये परिपक्वता आणि कणखरपणा येत गेला. भावांची परवानगी घेतल्याविना ही घराबाहेर पडत नसे हे पूर्वी पाहिलं होतं. परंतु नंतर तिची जगभर भटकंती सुरू झाली. परराष्ट्र मंत्र्यांच्या हातून सत्कार घडू लागले. अशा परिस्थितीत भावांची परवानगी मागणं हा चक्क वेडेपणाच ठरला असता. नीतिनियम तोडून कुठे जायचं हे निर्णय तीच घेऊ लागली. भावांना अर्थातच ही गोष्ट आवडली नाही. त्याची एकमेकांवर माया आहे, परंतु ‘स्त्रीला कितपत स्वातंत्र्य असावं’ या गोष्टीवरून मूलभूत विरोध आहेच. सर्वांनाच यामुळे मानसिक त्रास होत असतो. २००६ साली मार्चमध्ये मी पुन्हा एकदा मीरवाला गावी गेलो. मुख्तारच्या शाळा पाहून मी खूप प्रभावित झालो. बरीच नवीन साधनसामग्री आली होती. इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना चक्क इंग्रजी बोलता येत होतं! उच्च माध्यमिक शाळेचे बांधकाम चालू होतं. प्राथमिक शाळेच्या वार्षिक समारंभामध्ये छोट्या मुलांनी सुंदर नाटुकलं सादर केलं. ‘लवकर विवाह केल्याने होणारे तोटे’ हा विषय होता. (पत्नीचा खून होतो हा सर्वात मोठा तोटा दिसून आला.) मीरवाला गावातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट मला जाणवली. ती म्हणजे मुलींना शाळेतून काढू नये म्हणून मुख्तार त्यांच्या आईवडिलांच्या हात धुवून मागे लागत असे. प्रसंगी रागवायचीसुद्धा. सिद्रा नावाच्या चौथीतील मुलींच्या आईवडिलांनी तिचं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे शाळा बंद! मुख्तारला हे कळताच तिने सूत्रे हाती घेतली. दमदाटी करून त्यांना निर्णय बदलायला लावला. सिद्राची शाळा चालू आहे. तिला शिकून डॉक्टर व्हायचंय. याच कारणासाठी मुख्तारला गाव सोडून कुठेही जायचं नाही. तिला शहरात वा परदेशी सुरक्षितपणे आणि आरामात राहता येईल. परंतु काहीतरी केल्यानं समाधान मिळतंय. याचं मोल कितीतरी अधिक आहे. ध्येयपूर्तीसाठी मुख्तार अथक प्रयत्न करते आहे. अत्यंत व्यथित करणाऱ्या गोष्टी मुख्तारच्या घरी पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून पीडित, दु:खी स्त्रिया मुख्तारला भेटायला येत असतात. ती नक्कीच आपल्याला मदत करील, मार्ग दाखवील अशी आशा बाळगून त्या मिळेल ते वाहन पकडून तिच्या घरी येतात. प्रत्येकीची दर्दभरी कर्मकहाणी वेगळी, पण सर्वांत भयानक प्रकार म्हणजे बाईचं नाक कापून तिला जन्माची अद्दल घडवायची. पाकिस्तानात अशी शिक्षा सर्रास दिली जाते. मुख्तार सर्वांना जमेल तशी मदत करते. त्यांना डॉक्टर अथवा वकील मिळवून देते. काही मार्ग निघेपर्यंत त्या बायका मुख्तारच्या घरीच मुक्कामाला असतात. रोज रात्री किमान दहा-बारा जणी मुख्तारच्या खोलीतच जमिनीवर तिच्या बाजूला पथाऱ्या टाकून झोपायला असतातच. (मुख्तारने तिची कॉट, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नसीम अख्तर यांना दिली आहे.) एकमेकींच्या कुशीत, एकमेकींचं सांत्वन करीत साऱ्याजणी झोपायचा प्रयत्न करतात. अत्यंत कठीण परिस्थिती असली तरी त्यांनी आशा सोडलेली नसते. परिस्थिती बदलते आहे. स्त्रिया अन्यायाचा प्रतिकार करताहेत हे त्यांच्याकडे पाहून पटतं. बलात्कार झालेली स्त्री आत्महत्त्या करून सारं संपवून टाकीत असे. आता मात्र मुख्तारचा कित्ता गिरवणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या डॉक्टर शाझिया खालिदसारख्या स्त्रिया बलात्कार-विरोधी चळवळीचं नेतृत्व करीत आहेत. ‘मुख्तारमुळेच अन्यायाला प्रतिकार करण्याची प्रेरणा मिळाली.’ हे डॉक्टर शाझिया सर्वप्रथम मान्य करते. आत्महत्त्या करण्याऐवजी अत्याचार करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचे प्रकार वाढत चालल्यामुळे मीरवाला भागातील बलात्काराचं प्रमाण कमी होत आहे. स्त्रियांवरील दडपशाही कमी व्हावी यासाठी मुख्तार करीत असलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश येताना दिसून येतंय. पाकिस्तानी मनोवृत्ती बदलते आहे. ‘इन द नेम ऑफ ऑनर’ ही केवळ धैर्य आणि वैफल्य याची कहाणी नसून, त्यातून प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. आत्यंतिक धैर्य आणि मनोनिग्रह यांच्या बळावर मुख्तारने सामूहिक बलात्कारासारख्या भीषण प्रसंगावर मात केली. खचून न जाता झगडली, इतरांना आशेचा किरण दाखवला. मुख्तारला मी महान समजतो, त्याचं हेही एक कारण आहे. लाजऱ्याबुजऱ्या खेडवळ मुख्तारमध्ये मला एका धाडसी, झुंजार ‘हीरो’चा साक्षात्कार होतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more