* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IN THE NAME OF HONOUR
  • Availability : Available
  • Translators : ULKA RAUT
  • ISBN : 9788184980059
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 103
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NATASHA WAS EVERY INCH A COMMON GIRL, RAISED IN AN ORPHANAGE, A CITIZEN OF RUSSIA, BUT SHE WAS FELICITATED WITH THE AWARD, `CERTIFICATE OF HONOUR`. HER JOURNEY STARTED OUT OF THE LOVE AND CONCERN SHE HAD FOR THE OTHER ORPHANS LIKE HER. AFTER MARRIAGE, SHE AND HER HUSBAND DAVID CAME TO KNOW THAT SHE WOULD NEVER BE ABLE TO CONCEIVE THEIR OWN CHILD. SO, INSTEAD OF CURSING THE DESTINY FOR THEIR BAD LUCK, TOGETHER THEY DECIDED TO DO SOMETHING CONCRETE FOR THE ORPHAN CHILDREN. THEY STARTED SHELTERING THE ORPHANS BY BRINGING THEM HOME, BY BEING THEIR PARENTS. THEY CONTRIBUTED THEIR EFFORTS, MONEY, LOVE; EVERYTHING THEY HAD FOR THE BETTERMENT OF THESE CHILDREN. THIS BOOK REVEALS THE GOOD AND BAD EXPERIENCES THEY HAD DURING THIS JOURNEY.
जून २००२ मध्ये भावाने केलेल्या तथाकथित गुन्ह्याची शिक्षा म्हणून मुख्तार माईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. प्रतिष्ठेपायी घडलेल्या ह्या कृत्याची खबर पाकिस्तानातील पत्रकारांना मिळाल्यानंतर मुख्तार माईची कहाणी उजेडात आली. त्या भयानक बलात्कारानंतर रिवाजाप्रमाणे तिने आत्महत्या करावी अशी अपेक्षा होती. परंतु मुख्तार माईने ती परंपरा मोडली. अभूतपूर्व धैर्य दाखवून तिने बलात्का-यांना कोर्टात खेचलं. पुराण्या रीतिरिवाजांनी जखडलेल्या समाजव्यवस्थेशी मुख्तार माईने असामान्य धैर्याने आणि सर्वस्व पणाला लावून अथक झुंज दिली.खटल्यातील काही आरोपींची सुटका झाल्याने मुख्तार माईच्या जिवाला अजूनही धोका आहेच. असं असलं तरी मुख्तार माईने घाबरून पळ काढलेला नाही. पाकिस्तान सरकारकडून नुकसान भरपाईदाखल जे पैसे मिळाले, त्यातून तिने मुलींसाठी शाळा चालू केली. विशेष म्हणजे ह्या शाळेत ती स्वत:ही मोठ्या उत्साहाने शिकत आहे. ह्या हृदयद्रावक आणि प्रेरणादायक कहाणीमधून मुख्तार माईने आपली कैफियत जगासमोर मांडली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INTHENAMEOFHONOUR #INTHENAMEOFHONOUR #इनदनेमऑफऑनर #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ULKARAUT #उल्काराऊत #MUKHTARMAI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 21-5-2009

    मदर तेरेसा, मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांच्या सान्निध्यात प्रतीत होणारी विशुद्ध महानता मुख्तार मार्इंच्या व्यक्तिमत्त्वातही जाणवते. मीरवाला या लहानशा खेडेगावात राहणारी मुख्तार माई प्रथमदर्शनी शांत, काहीशी बुजरी वाटते. परंतु गावात तिच्याबरोबर फिर असताना ‘बलात्कार, निरक्षरता, स्त्रियांवरील अत्याचार’ याविरुद्ध लढणाऱ्या मुख्तारमधील ताकद जाणवते. साऱ्या पाकिस्तानात, इतकंच नव्हे तर संपूर्ण जगातच तिने सुरू केलेल्या चळवळीचा डंका वाजतो आहे. मुख्तारच्या कहाणीची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहेच, तिच्या धाकट्या भावावर लफडं केल्याचा खोटा आळ घेण्यात आला. या अपराधासाठी मुख्तारवर सामूहिक बलात्काराची सजा पंचायतीनं फर्मावली. शिक्षेची अंमलबजावणीदेखील तात्काळ करण्यात आली. कुचेष्टा करणाऱ्या जमावाच्या नजरा चुकवीत अर्धवस्त्रावस्थेतील मुख्तार कशीबशी घरी पोहोचली होती. या प्रकारानंतर तिने निमूटपणे आत्महत्या करावी, अशी सर्वांची रास्त अपेक्षा होती. ती अपेक्षा मुख्तार पूर्ण करणारही होती, परंतु नंतर शरमेची जागा संतापाने घेतली. जीव देऊन अपराध्यांना मोकळं सोडण्याऐवजी तिने त्यांना कोर्टात खेचलं. साऱ्या जगासमोर आपली कैफियत मांडली. एवढ्यावरच मुख्तार थांबली असती, तर अन्य असंख्य पीडित स्त्रियांमध्ये तीही एक, असं समजून प्रकरणावर पडदा पडला असता, सुदैवाने तसं झालं नाही. नुकसानभरपाईदाखल मिळालेल्या पैशांमधून मुख्तारने गावात शाळा सुरू केली. जुलमी सरंजामशाहीविरुद्ध लढण्यासाठी लोकशिक्षण हा एकमेव मार्ग आहे. यावर तिचा दृढविश्वास होता. मुख्तारची कहाणी मीदेखील ऐकली होती. २००४ मध्ये पाकिस्तानला गेलो असताना मी तिला भेटण्यासाठी मीरवाला गावाला भेट दिली. (त्या वेळी ती मुख्तरनबीबी या नावाने ओळखली जाई.) इस्लामाबादहून लाहोर, तिथून मुलतान असा विमान प्रवास आणि नंतर अनेक तासांचा मोटार प्रवास, अशी मजल-दरमजल करीत मी मीरवाला गावी पोहोचलो. मीरवालात तेव्हा वीज पोहोचली नव्हती. तिच्या घरी तिचे भाऊ, वडिलांची भेट झाली. ती मात्र मागेच होती. एखादी तडफदार, तेजस्वी स्त्री भेटेल या अपेक्षेने गेलो असतो, तर माझी निराशाच झाली असती. मला ती संकोची स्वभावाची, काहीशी जुन्या वळणाची वाटली. बहुधा ‘बाईने जास्त बोलू नये.’ असा विचार करून ती फारसं बोलत नव्हती. सुरुवातीला तिचे वडील आणि भाऊच माझ्याशी संभाषण करीत होते. नंतर मात्र ती माझ्याबरोबर मोकळेपणाने बोलायला लागली. बलात्कारानंतर वाटलेली शरम, अखंड अश्रू गाळणं. कुटुंबियांची तिच्यामुळे झालेली बेअब्रू याविषयी ती नि:संकोचपणे बोलली. शाळेविषयी ती अतिशय उत्कटपणे सांगत होती. हळूहळू तिने संपूर्ण संभाषणाची सूत्रे स्वत:कडे घेतली. ‘शाळेसाठी पैसे कमी पडताहेत. शिक्षकांचा पगार देण्यासाठी घरातील दागिने विकावे लागले. ‘काय करावं समजेनासं झालंय.’ ती म्हणाली, ‘माझ्या संरक्षणासाठी तैनात केलेले पोलीस आता कंटाळलेत. त्यांच्याकडून ढिलाई झाली तर माझ्या जिवाला धोका आहे.’ असेही ती पुढे म्हणाली. मुलाखत संपल्यावर नंतर तिने मला एका बाजूला नेलं आणि ‘मदत करण्यासाठी’ कळकळीची विनंती केली. तिच्या आवाजात असा काही आवेश होता, की प्रथमदर्शनी बुजरी वाटलेली मुख्तार हीच का, असा विचार माझ्या मनात आला. मी मुख्तारवर लिहिलेला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. अमेरिकेतील वाचक तिच्या कहाणीने हेलावून गेले. मदतीचा ओघ सुरू झाला. ‘चेक पाठवा. मी ते तिच्याकडे पोहोचते करीन.’ मी आनंदीत होऊन जाहीर केलं. ‘मर्सी कॉर्पस’च्या मदतीने मी सारे चेक मुख्तारकडे पाठवले. तब्बल एक लाख साठ हजार डॉलर्स जमले. त्यातून तिने व्हॅन खरेदी केली. अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्कूल बस असा दोन्हीसाठी या व्हॅनचा उपयोग होणार होता. उरलेल्या पैशांमधून माध्यमिक शाळा उभारायचं काम सुरू झालं. नंतर न्यूयॉर्क आणि मीरवाला अशा दोन्ही ठिकाणी मी मुख्तारला अनेकदा भेटलोय. अमेरिकेत ती भव्य मेजवान्या, व्हाइट हाऊसमधील स्वागतसमारंभ, आलिशान हॉटेलात सत्कार अशा प्रसंगी हजर असली, तरी ‘कधी एकदा मायदेशी परतते’ असं तिला वाटत राहतं. एकदा न्यूयॉर्कमधील अतिप्रतिष्ठित लोकांसमवेत मेजवानीला गेली असताना तिने चक्क पाकिस्तानी जेवण मागवलं! अमेरिकेतील अत्याधुनिक वातावरण पाहून तिला धक्का बसेल असं मला वाटलं होतं. ती मात्र सारंच सहजपणे अनुभवत होती. ‘ग्लॅमर’ मासिकात तिच्यावर आलेला लेख आणि फोटो पाहताना ती जराही लाजली वा संकोचली नाही. (ग्लॅमरसारख्या फ्याशनला वाहिलेल्या मासिकातील तिचे संपूर्ण अंग झाकणाऱ्या कपड्यांमधील फोटो, हा एक मोठाच विरोधाभास होता!) न्यूयॉर्कमध्येदेखील तिच्या मस्तकावर आच्छादन असतंच, पाकिस्तानी असल्याचा अभिमान तिच्या वागण्यातून जाणवत असतो. मुख्तारमुळे पाकिस्तानला जगभर प्रसिद्धी आणि सर्वांच्या सदिच्छा मिळाल्या हे खरं असलं तरी पाकिस्तान सरकारने मात्र तिला त्रासच दिला. याची दोन कारणं असतील. पाकिस्तानी समाजव्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगून ती देशाला बदनाम करते आहे असं सरकारला वाटतंय. दुसरं म्हणजे पंजाबमधील बारक्याशा खेडेगावातील एका य:कश्चित अडाणी बाईला जगभर नावलौकिक मिळतोय. तिच्या धाडसाचं कौतुक होतंय, या गोष्टीचा पाकिस्तानी नेत्यांना मत्सर वाटत असावा. परिणामत: त्यांनी सतत तिची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न केला आहे. मुख्तार अमेरिकेत एका परिषदेसाठी जाणार होती. तेव्हाचं उदाहरण घ्या : खुद्द राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी तिने देशाबाहेर जाऊ नये यासाठी ‘एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये तिचं नाव टाकण्याचं फर्मान काढलं. अधिकाऱ्यांनी तिचा पासपोर्ट जप्त केला. त्याबद्दल तिने जाहीर तक्रार केली. परिणामी अधिकाऱ्यांनी तिचं अपहरण करून तिला इस्लामाबादला नेलं. तरीही मुख्तारचा आवाज बंद झाला नाही. राष्ट्राध्यक्ष मुशर्रफची चांगलीच नाचक्की झाली. झुंजार मुख्तारची प्रतिमा अधिकच उजळली. आमना बत्तारकडून समजली ती घटना सर्वात जास्त धक्कादायक आहे. ब्रिगेडियर ईजाज शाह हे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचे अत्यंत निकटचे स्नेही. २००५ मध्ये आमना बत्तारला धमकी देण्यासाठी ते लाहोरला गेले होते. आमना पाकिस्तानी-अमेरिकन डॉक्टर असून, एक मानवी हक्क संघटना चालवते. (www.4anna.org) तिने मुख्तारला सतत प्रोत्साहन दिलं आहे. अमेरिकेच्या वाऱ्यांमध्ये तीच मुख्तारच्या सोबत जाई, तिच्या दुभाष्याचं कामही तीच करीत असे. पाकिस्तानी स्त्रियांच्या हक्कासाठी अखंडपणे झगडत असे. ब्रिगेडियर महाशय आमनाला धमकीवजा ताकीद देताना म्हणाले, ‘तू आणि मुख्तारने सांभाळून वागलेलं बरं. उगाचच संकटांना निमंत्रण कशाला देता?’ मुख्तार आणि आमनाच्या नियोजित न्यूयॉर्क भेटीचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, ‘आम्ही काहीही करू शकतो हे विसरू नका. न्यूयॉर्कमध्ये काळ्या लोकांना थोडे पैसे दिले तर त्या बदल्यात ते आम्ही सांगू त्याचा सहजपणे खून पाडतील.’ या बोलण्याला वर्णद्वेषाचा वास होताच, शिवाय आमना आणि मुख्तारचा अमेरिकेत खून होऊ शकतो, अशी प्रच्छन्न धमकीही त्यामागे होती. मी पाकिस्तान सरकारकडे याविषयी विचारणा केली असता, ब्रिगेडियर शहा आमनाला भेटल्याचं मान्य केलं; परंतु त्यांनी तिला कोणत्याही प्रकारची धमकी दिल्याचं मात्र साफ नाकबूल केलं! २००५ मध्ये मुख्तारचं यूएनमध्ये भाषण होणार होतं. कित्येक आठवड्यांपूर्वी सारी तयारी पूर्ण झाली होती. जाण्यापूर्वी ती माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला आली असतानाच आयोजकांचा फोन आला. ‘पाकिस्तान सरकारच्या आदेशावरून मुख्तारचं भाषण रद्द करण्यात आलं.’ अशी बातमी त्यांनी दिली. पाकिस्तानी नेत्यांनी पुन्हा एकदा स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. अमेरिकेत काही लोकांनीच मुख्तारचं यूएनमधील भाषण ऐकलं असतं, परंतु बंदी घातल्याने न झालेल्या भाषणाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पाकिस्तान सरकारने मुख्तारवर सतत दबाव टाकायचा प्रयत्न केला. तिचा पत्रव्यवहार जप्त केला, फोन टॅप होत असे. सरकारधार्जिण्या वृत्तपत्रांतून कायम तिच्याविषयी बदनामीकारक लेख छापून येत- ती परदेशात जाऊन मजा मारते; ती पाकिस्तान सरकारशी एकनिष्ठ नाही. ती परकीय (माझ्यासारख्या) तसंच भारतीय दलालांच्या तालावर नाचणारी बाहुली असून पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी त्यांना मदत करत असते... वगैरे वगैरे. मुख्तार अतिशय संवेदनशील असल्याने अशा जहरी टीकेमुळे तिला कमालीचा त्रास होई. परंतु नंतर तिच्यामध्ये परिपक्वता आणि कणखरपणा येत गेला. भावांची परवानगी घेतल्याविना ही घराबाहेर पडत नसे हे पूर्वी पाहिलं होतं. परंतु नंतर तिची जगभर भटकंती सुरू झाली. परराष्ट्र मंत्र्यांच्या हातून सत्कार घडू लागले. अशा परिस्थितीत भावांची परवानगी मागणं हा चक्क वेडेपणाच ठरला असता. नीतिनियम तोडून कुठे जायचं हे निर्णय तीच घेऊ लागली. भावांना अर्थातच ही गोष्ट आवडली नाही. त्याची एकमेकांवर माया आहे, परंतु ‘स्त्रीला कितपत स्वातंत्र्य असावं’ या गोष्टीवरून मूलभूत विरोध आहेच. सर्वांनाच यामुळे मानसिक त्रास होत असतो. २००६ साली मार्चमध्ये मी पुन्हा एकदा मीरवाला गावी गेलो. मुख्तारच्या शाळा पाहून मी खूप प्रभावित झालो. बरीच नवीन साधनसामग्री आली होती. इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना चक्क इंग्रजी बोलता येत होतं! उच्च माध्यमिक शाळेचे बांधकाम चालू होतं. प्राथमिक शाळेच्या वार्षिक समारंभामध्ये छोट्या मुलांनी सुंदर नाटुकलं सादर केलं. ‘लवकर विवाह केल्याने होणारे तोटे’ हा विषय होता. (पत्नीचा खून होतो हा सर्वात मोठा तोटा दिसून आला.) मीरवाला गावातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट मला जाणवली. ती म्हणजे मुलींना शाळेतून काढू नये म्हणून मुख्तार त्यांच्या आईवडिलांच्या हात धुवून मागे लागत असे. प्रसंगी रागवायचीसुद्धा. सिद्रा नावाच्या चौथीतील मुलींच्या आईवडिलांनी तिचं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे शाळा बंद! मुख्तारला हे कळताच तिने सूत्रे हाती घेतली. दमदाटी करून त्यांना निर्णय बदलायला लावला. सिद्राची शाळा चालू आहे. तिला शिकून डॉक्टर व्हायचंय. याच कारणासाठी मुख्तारला गाव सोडून कुठेही जायचं नाही. तिला शहरात वा परदेशी सुरक्षितपणे आणि आरामात राहता येईल. परंतु काहीतरी केल्यानं समाधान मिळतंय. याचं मोल कितीतरी अधिक आहे. ध्येयपूर्तीसाठी मुख्तार अथक प्रयत्न करते आहे. अत्यंत व्यथित करणाऱ्या गोष्टी मुख्तारच्या घरी पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून पीडित, दु:खी स्त्रिया मुख्तारला भेटायला येत असतात. ती नक्कीच आपल्याला मदत करील, मार्ग दाखवील अशी आशा बाळगून त्या मिळेल ते वाहन पकडून तिच्या घरी येतात. प्रत्येकीची दर्दभरी कर्मकहाणी वेगळी, पण सर्वांत भयानक प्रकार म्हणजे बाईचं नाक कापून तिला जन्माची अद्दल घडवायची. पाकिस्तानात अशी शिक्षा सर्रास दिली जाते. मुख्तार सर्वांना जमेल तशी मदत करते. त्यांना डॉक्टर अथवा वकील मिळवून देते. काही मार्ग निघेपर्यंत त्या बायका मुख्तारच्या घरीच मुक्कामाला असतात. रोज रात्री किमान दहा-बारा जणी मुख्तारच्या खोलीतच जमिनीवर तिच्या बाजूला पथाऱ्या टाकून झोपायला असतातच. (मुख्तारने तिची कॉट, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नसीम अख्तर यांना दिली आहे.) एकमेकींच्या कुशीत, एकमेकींचं सांत्वन करीत साऱ्याजणी झोपायचा प्रयत्न करतात. अत्यंत कठीण परिस्थिती असली तरी त्यांनी आशा सोडलेली नसते. परिस्थिती बदलते आहे. स्त्रिया अन्यायाचा प्रतिकार करताहेत हे त्यांच्याकडे पाहून पटतं. बलात्कार झालेली स्त्री आत्महत्त्या करून सारं संपवून टाकीत असे. आता मात्र मुख्तारचा कित्ता गिरवणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या डॉक्टर शाझिया खालिदसारख्या स्त्रिया बलात्कार-विरोधी चळवळीचं नेतृत्व करीत आहेत. ‘मुख्तारमुळेच अन्यायाला प्रतिकार करण्याची प्रेरणा मिळाली.’ हे डॉक्टर शाझिया सर्वप्रथम मान्य करते. आत्महत्त्या करण्याऐवजी अत्याचार करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचे प्रकार वाढत चालल्यामुळे मीरवाला भागातील बलात्काराचं प्रमाण कमी होत आहे. स्त्रियांवरील दडपशाही कमी व्हावी यासाठी मुख्तार करीत असलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश येताना दिसून येतंय. पाकिस्तानी मनोवृत्ती बदलते आहे. ‘इन द नेम ऑफ ऑनर’ ही केवळ धैर्य आणि वैफल्य याची कहाणी नसून, त्यातून प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. आत्यंतिक धैर्य आणि मनोनिग्रह यांच्या बळावर मुख्तारने सामूहिक बलात्कारासारख्या भीषण प्रसंगावर मात केली. खचून न जाता झगडली, इतरांना आशेचा किरण दाखवला. मुख्तारला मी महान समजतो, त्याचं हेही एक कारण आहे. लाजऱ्याबुजऱ्या खेडवळ मुख्तारमध्ये मला एका धाडसी, झुंजार ‘हीरो’चा साक्षात्कार होतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more