* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PEARLS OF CHILDHOOD
  • Availability : Available
  • Translators : DR.VINAYA DHARWADKAR
  • ISBN : 9788184984989
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 199
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN JUNE 1939, SHORTLY BEFORE HER 11TH BIRTHDAY, VERA GISSING ESCAPED FROM OCCUPIED CZECHOSLOVAKIA, LEAVING BEHIND HER PARENTS, FAMILY, AND FRIENDS, TO SPEND SIX YEARS IN BRITAIN. THROUGHOUT THE WAR YEARS, VERA KEPT A DIARY, RECORDING HER DAY-TO-DAY EXPERIENCES, HER LONGING FOR HER PARENTS, HER HOPES, AND HER PRAYERS FOR THE FREEDOM OF HER COUNTRY. BY THE TIME SHE RETURNED TO PRAGUE TO SET UP HOME WITH HER AUNT IN 1945, SHE KNEW THAT BOTH HER PARENTS HAD DIEDXHER MOTHER IN BELSEN, HER FATHER ON A DEATH MARCH. SHE CAME BACK TO ENGLAND IN 1949 AND HAS LIVED THERE EVER SINCE. THE MEMORIES AND EMOTIONS REKINDLED BY A REUNION OF THE CZECH SCHOOL IN WALES WHERE SHE WAS EDUCATED ENCOURAGED VERA TO GO BACK TO HER DIARIES AND THE LETTERS FROM HER PARENTS THAT SHE HAD NOT TOUCHED FOR 40 YEARS, RESULTING IN THIS POWERFUL AND MOVING ACCOUNT OF THE LIFE OF ONE CHILD GROWING UP IN EXTRAORDINARY CIRCUMSTANCES.
दुस-या महायुद्धाचा काळ जून, १९३९. व्हेराचा अकरावा वाढदिवस जवळ आलेला असतानाच, अचानक तिला तिचा प्रिय देश सोडून जावं लागतं. आपलं कुटुंब, आई-वडील आणि मित्रमैत्रिणी यांना सोडून व्हेरा सहा वर्षं ब्रिटनमध्ये राहते. ब्रिटनमधल्या वास्तव्याच्या काळात व्हेरा डायरी लिहायला सुरुवात करते. आई-वडिलांपासून झालेली ताटातूट, त्यांच्या आठवणी, तिच्या आशाआकांक्षा, इच्छा आणि देशासाठी तिने केलेल्या प्रार्थना... असे सगळे ती डायरीत टिपत जाते. १९४५मध्ये ती मायदेशात परतते तेव्हा तिचे आई-वडील मरण पावलेले असतात. ती इंग्लंडला परतते; तेव्हा तिच्या मनात पुन्हा त्या आठवणी, त्या भावना आणि तो काळ जागृत होऊ लागतो. आणि ती पुन्हा वळते तिच्या डायरीकडे.... प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढणा-या एका मुलीची ही करुण, हृदय हेलावणारी भावनिक आंदोलनं म्हणजे हे ‘आठवणींचे मोती’!
संगमनेर इतिहास संधोधन मंडळातर्फे `अनंत फंदी साहित्य पुरस्कार २०१४`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 01-06-2018

    महायुद्धाच्या अशाही आठवणी... होलोकास्ट अर्थात ज्यूंचा नरसंहार, दुसऱ्या महायुद्धातील एक काळा इतिहास. हिटलरच्या सत्तापिपासू वृत्तीतून जन्माला आलेला हा प्रकार इतका भयंकर होता की, नाझी फौजांनी जिंकलेल्या प्रत्येक प्रदेशातील जनता भयभीत होत असे. १९३९ सालीझेकोस्लोव्हाकियावर जर्मन फौजांनी कब्जा मिळवला तेव्हा तेथील लोकांमध्येदेखील हीच भावना होती. डायमंड कुटुंबीय त्यांपैकीच एक. नाझींच्या हाती लागून छळछावणीत अडकून पडण्याची, तेथेच प्राण गमावण्याची भीती त्यांनाही होतीच. हजारो बालकेदेखील याच भीतीच्या छायेत होती. पण एका सद्गृहस्थाने प्रचंड मेहनत करून त्यांपैकी ६६९ बालकांना थेट ब्रिटनला नेले. त्यापैकीच एक म्हणजे व्हेरा गिसिंग. म्हणजेच या पुस्तकाची लेखिका. झेकोस्लोव्हाकियात असताना नाझींचा हल्ला, तेथून निघून ब्रिटनला आल्यानंतर नव्या कुटुंबातील वास्तव्य, तेथील पुढील आयुष्य असा सारा प्रवास लेखिकेने या पुस्तकात मांडला आहे. हा केवळ लेखिकेचा प्रवास नाही. तिच्या वाट्याला आलेले दु:ख हे त्याकाळच्या संपूर्ण समाजाचे चित्रण आहे. लेखिकेने जरी स्वत:चा प्रवास मांडला असला तरी त्यात केवळ स्वत:च्या दुखण्याखुपण्याला प्राधान्य दिलेले नाही. व्हेराने तिच्या ब्रिटनमधील सुरुवातीच्या वास्तव्याच्या साऱ्या नोंदी रोजनिशी स्वरूपात मांडून ठेवल्या आहेत. ब्रिटनमध्ये ती तिच्या दत्तक आई-वडिलांबरोबर राहत असली तरी तिची मूळची ओढ तशीच आहे. झेक भाषा, तिचे मूळ गाव याची ओढ तिला सतत छळत असते. देश सोडून आई-वडिलांपासून ताटातूट झालेली मुलगी काय विचार करते याचे प्रत्यंतर तिच्या डायरीत दिसून येते. नंतरच्या काळात तिचा आई-वडिलांबरोबरचा पत्रव्यवहारदेखील या पुस्तकातून उलगडत जातो. व्हेराने तिचे हे सारे अनुभव, रोजनिशी, पत्रे सारे पुस्तकरूपाने १९८८मध्ये ‘पल्र्स ऑफ चाइल्डहूड’ या नावाने प्रकाशित केले आणि यामुळेच ज्या व्यक्तीने त्या ६६९ बालकांना वाचवले तो माणूसदेखील प्रकाशात आला. त्याचे नाव होते निकोलस विन्टन. तो ब्रिटनमधील एक शेअर व्यावसायिक होता. व्हेरा ही त्याने सुटका केलेल्या बालकांतील पहिली ‘मुलगी’. पुढे ती सर्व ६६९ बालके ही विन्टनची मुले म्हणून ओळखली जाऊ लागली. विन्टनला नंतर अनेक मानसन्मान मिळाले. व्हेराची ही कथा अशा साऱ्या आठवणींचा एक मस्त कोलाज आहे. दु:खातून सुखद स्मृतींना जन्म देणारी ही सत्यकथा आहे. –राधिका कुंटे ...Read more

  • Rating Star SAMNA 5-1-2014

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व्हेराचा अकरावा वाढदिवस जवळ आलेला असतानाच अचानक तिला तिचा प्रिय देश सोडून जावं लागतं. आपलं कुटुंब, आई-वडील आणि मित्रमैत्रिणी यांना सोडून सहा वर्षे ब्रिटनमध्ये राहिली. ब्रिटनमधल्या वास्तव्याच्या काळात व्हेरा डायरी लिहायला सरुवात करते. आई-वडिलांपासून झालेली ताटातूट, त्यांच्या आठवणी, तिच्या आशा, आकांक्षा, इच्छा आणि देशासाठी तिने केलेल्या प्रार्थना... सर्व डायरीत टिपते. महायुद्ध संपल्यावर ती पुन्हा मायदेशी परतते आणि त्यामागच्या आठवणी, भावना तो काळ जागृत होतो. ती पुन्हा डायरीकडे वळते... तिचीच ही करूण, हृदय हेलावणारी भावनिक आंदोलने म्हणजेच ‘आठवणींचे मोती’. ‘आठवणींचे मोती’च्या मूळ लेखिका व्हेरा गिसिंग मराठी अनुवाद केलाय डॉ. विनया धारवाडकर यांनी. व्हेरा गिसिंग यांनी विविध इंग्रजी प्रकाशकांकडे भाषांतरकार, संपादक म्हणून काम केले. तसेच बालसाहित्यही लिहिले आहे. महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये असताना लिहिलेल्या डायऱ्यांवर आधारित ‘पर्ल्स ऑफ चाइल्डहूड’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजेच ‘आठवणींचे मोती’. दुसऱ्या महायुद्धात बालपणीच कुटुंबाशी ताटातूट झालेल्या ‘व्हेरा गिसिंग’ लेखिका या ज्यू मुलीचा भावपूर्ण प्रवास आहे. हे पुस्तक अमेरिका, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया आणि जर्मनी येथे प्रकाशित झाले आहे. जपानी भाषेतही ते अनुवादित झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेला ‘ऑल माय लव्ह वन्स’ हा चित्रपटही बनविला गेला आहे. माता-पिता नाझींच्या छळछावणीत मृत्युमुखी पडल्यानंतरचा प्रवास डोळ्यात अश्रू उभे करणारा ठरतो. त्या युद्ध काळात जी निष्पाप बालके त्यांच्या घरापासून तोडली गेली, त्या सर्वांचीच ही कहाणी ठरू शकते. ब्रिटनने त्या बालकांना आश्रय दिला, मदत केली आणि त्यांना समजूनही घेतले हे विशेष. सदर पुस्तकात व्हेराच्या कुटुंबाची, घराची, शाळेची, शहराची छायाचित्रेही यात समाविष्ट केलेली आहेत. यात एकूण आठ प्रकरणे आहेत. दोन विभागात ती दिलेली आहेत. लेखिकेचा हा दुःखदायक प्रवास डॉ. विनया धारवाडकर यांनी अतिशय संवेदनशीलतेने साध्या, सोप्या भाषेत मांडलेला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही सत्यकथा मराठीकरण करताना कुठेही बटबटीत वाटत नाही. उलट त्यातील जिवंतपणा प्रत्ययास येतो, ही डॉ. विनया धारवाडकर यांच्या भाषाशैलीची पोचपावती ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more