* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN SHE WAS FOURTEEN, JASVINDER SANGHERA WAS SHOWN A PHOTO OF THE MAN CHOSEN TO BE HER HUSBAND. SHE WAS TERRIFIED. SHE’D WITNESSED THE TORMENT HER SISTERS ENDURED IN THEIR ARRANGED MARRIAGES, SO SHE RAN AWAY FROM HOME, GRIEF-STRICKEN WHEN HER PARENTS DISOWNED HER. SHAME IS THE HEART-RENDING TRUE STORY OF A YOUNG GIRL’S ATTEMPT TO ESCAPE FROM A CRUEL, CLAUSTROPHOBIC WORLD WHERE FAMILY HONOUR MATTERED MORE THAN ANYTHING – SOMETIMES MORE THAN LIFE ITSELF. JASVINDER’S STORY IS ONE OF TERRIBLE OPPRESSION, A HARROWING STRUGGLE AGAINST A PUNITIVE CODE OF HONOUR – AND, FINALLY, TRIUMPH OVER ADVERSITY.
‘‘तू आम्हाला मेलीस... तू आम्हाला मेलीस... मेलीस.’’ जन्मदात्या आईबापांनी मला स्वत:पासून कायमचं तोडून टाकावं, एवढा भयंकर अपराध खरोखरच घडला होता का माझ्या हातून? त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळा करपून गेला होता? माझ्या अवघ्या आयुष्याची आहुती देण्याइतका मोठा आहे का हा गुन्हा...?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SHAME #SHAME #शेम #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #JASVINDERSANGHERA "
Customer Reviews
  • Rating StarGayatri Vilas Jadhav

    "शेम” या पुस्तकामध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वाढवलेल्या जसविंदर संघेरा या भारतीय मुलीचे आत्मचरित्र आहे. ही कथा सत्य असून याच्या मुळ लेखिका जसविंदर संघेरा असून त्याचा मराठी मध्ये अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे हि कहाणी भारतीय आणि पा्चात्य संस्कृतींच्या संघर्षावर आधारित आहे.ब्रिटीश आशियाई महिलांवरील गुन्हेगारीसाठी सांस्कृतिक पद्धतींचा कसा वापर करतात हे जगाला सांगणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. जसविंदरचा जन्म डर्बीमधील शीखच्या पारंपारिक घरात झाला होता. तिचे पालक पंजाबमधील परप्रवासी आहेत. त्यांच्या संस्कृतीनुसार पुरुष मुलांना प्रथम प्राधान्य दिले आहे तर महिलांना कुटुंबातील दुय्यम सदस्य मानले गेले. तिच्या घरच्यांना घराण्याची प्रतिष्ठा या गोष्टीचं मोल इतर कुठल्याही गोष्टी पेक्षा अगदी मुलींच्या जिवापेक्षाहि अधिक वाटत होत . इंग्लंडमध्ये जेथे ती मोठी झाली, जसविंदरने तिच्या शाळेतून परदेशी कल्पना आणि वैशिष्ट्ये शिकली. वयाच्या १४ व्या वर्षी जस्सीला तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवला ती घाबरली.आपल्या थोरल्या बहिणीचे लग्न करून झालेला छळ तिने पाहिलं होत . जस्सीला लग्न न्हवत करायचं म्हणून ती घरातून पळून जाते इथून पुढे तिच्या आयुष्यातला प्रवास खूप कठीण होतो खूप वाईट परिस्थिती येते त्याला ती कशी सामोरी जाते , आत्मसन्मानासाठी , एक चांगल मनासारखं जीवन जगण्यासाठीची संघर्ष करणारी कहाणी आहे. या पुस्तकामधला एक परिच्छेद - " या डर्बीच्या रस्त्यावरून आम्ही चालू शकत नाही. तु पळून गेल्यामुळे, हे होत आहे. गुरूद्वारात जाणं तर बंदच झालय. लोक उघड बोलतात. तुझ्यामुळे लोक थूंकतात माझ्या तोंडावर !"काही सेकंद आईचा आवाज थांबला. मला वाटल .झाल वाटत हीच बोलून, पण ती केवळ आवंढा गिळन्यासाठी थांबलेली होती." मेले घराण्याचा नाश केलास... भोगशिल आपल्या कर्माची फळं! बघत रहा.तु आणि तो तुझा चांभांरडा यार, गटारात लोळाल.. तीच लायकी आहे तुमची...!! आयुष्यात काही काही मिळणार नाही तुम्हाला. ऐकतीयेस ना? जेव्हा तुला मुलगी होइल आणि ती अस छिनालपणाने वागेल तेव्हा कळले तुला, की असल्या वेश्येला जन्म देऊन वाढवल्यावर काय वाटतं ते!!!" नक्की वाचा.. ...Read more

  • Rating StarZEE MARATHI DISHA 18 MAY - 24 MAY 2019

    ‘घराण्याची प्रतिष्ठा क्रूर वास्तव... भारतातील, पंजाबमधील काही कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झाली होती. आपल्या मातृभूमीपासून दूर गेलेल्या, कुटुंबाविना एकट्या पडलेल्यांसाठी जवळची, वेळप्रसंगी आधार देऊ शकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यांचा ज्ञातिसमाज. पजाबमधून इंग्लंडला येऊन स्थायिक झालेले त्यांच्या जातीचे लोक. इंग्लंडमध्ये डर्बी येथे स्थायिक झालेल्या अशाच एका पंजाबी कुटुंबातील मुलीची – जसविंदर संघेराची – ही सत्यकहाणी आहे. ‘शेम’ हे तिचं पुसतक वाचलं की तिच्या संघर्षाची कल्पना येते. चौदा वर्षांची असताना जसविंदरला, तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवण्यात आला. ती घाबरली. ठरवून केलेल्या लग्नानंतर थोरल्या बहिणीचा झालेला छळ तिनं प्रत्यक्ष पाहिला होता. म्हणून ती घरातून पळून गेली. तेव्हापासून तिच्या आईवडिलांनी तिचं नावच टाकलं. ती पळून गेली नसती तर सासरी छळ सोसत जगावं लागलं असतं आणि लग्न मान्य केलं नसतं, तर तिला श्वास कोंडून मारून टाकलं असतं. श्वास कोंडून मारून टाकणाऱ्या क्रूर कुटुंबव्यवस्थेपासून तिनं पळून जाऊन स्वत:ची कशी सुटका करून घेतली, त्याची ही विलक्षण सत्यकहाणी आहे. आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचं अमान्य करून जसविंदरनं तिची मैत्रीण अवतार हिच्या भावाशी, जस्सीशी, एका चांभार मुलाशी लग्न केल्यानं घराण्याच्या प्रतिष्ठेला चिखल फासला म्हणून तिच्या कुटुंबानं तिला वाळीत टाकलं होतं. जमीनदार समजली जाणारी जाट घराण्यातील ही माणसं चांभारांना अस्पृश्य समजतात. अशाच एका हीन कुळातील मुलाशी जसविंदरनं लग्न केलं म्हणून आईवडील खूप संतापले होते. आपल्या अवतीभवती असंही घडत असतं. याची जाणीवही नसलेल्यांनी जसविंदरची ही आत्मकहाणी जरूर वाचावी. ‘घराण्याची प्रतिष्ठा’ ही मुलींच्या जिवापेक्षाही अधिक असते, असं वाटणाऱ्या मनोवृत्तीविरुद्ध लढणारी, आत्मसन्मानासाठी केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. तशीच या परिस्थितीवर मात करून, अशा पीडित स्त्रियांसाठी आधारभूत होण्याचं धाडस दाखवणाऱ्या जसविंदरच्या विजयाची ही कहाणी आहे! - मंगला गोखले ...Read more

  • Rating StarPranjali Gangurde Kolarkar

    जसविंदर संघेरा या ब्रिटन मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेने/लेखिकेने तिथे होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार बद्दल आणि तिने सुरू केलेल्या महिला मदत केंद्र बद्दल आपले अनुभव लिहले आहेत. स्वतः वयाच्या 16 व्या वर्षी मनाविरुद्ध लग्न होणार म्हणून घरसोडून जाऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन महिला आधार केंद्र सुरू केलीत ही स्तुत्य गोष्ट आहे. शेम नावाचे पुस्तक नक्की वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more