* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHAME
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184982060
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN SHE WAS FOURTEEN, JASVINDER SANGHERA WAS SHOWN A PHOTO OF THE MAN CHOSEN TO BE HER HUSBAND. SHE WAS TERRIFIED. SHE’D WITNESSED THE TORMENT HER SISTERS ENDURED IN THEIR ARRANGED MARRIAGES, SO SHE RAN AWAY FROM HOME, GRIEF-STRICKEN WHEN HER PARENTS DISOWNED HER. SHAME IS THE HEART-RENDING TRUE STORY OF A YOUNG GIRL’S ATTEMPT TO ESCAPE FROM A CRUEL, CLAUSTROPHOBIC WORLD WHERE FAMILY HONOUR MATTERED MORE THAN ANYTHING – SOMETIMES MORE THAN LIFE ITSELF. JASVINDER’S STORY IS ONE OF TERRIBLE OPPRESSION, A HARROWING STRUGGLE AGAINST A PUNITIVE CODE OF HONOUR – AND, FINALLY, TRIUMPH OVER ADVERSITY.
‘‘तू आम्हाला मेलीस... तू आम्हाला मेलीस... मेलीस.’’ जन्मदात्या आईबापांनी मला स्वत:पासून कायमचं तोडून टाकावं, एवढा भयंकर अपराध खरोखरच घडला होता का माझ्या हातून? त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळा करपून गेला होता? माझ्या अवघ्या आयुष्याची आहुती देण्याइतका मोठा आहे का हा गुन्हा...?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SHAME #SHAME #शेम #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #JASVINDERSANGHERA "
Customer Reviews
  • Rating StarGayatri Vilas Jadhav

    "शेम” या पुस्तकामध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वाढवलेल्या जसविंदर संघेरा या भारतीय मुलीचे आत्मचरित्र आहे. ही कथा सत्य असून याच्या मुळ लेखिका जसविंदर संघेरा असून त्याचा मराठी मध्ये अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे हि कहाणी भारतीय आणि पा्चात्य संस्कृतींच्या संघर्षावर आधारित आहे.ब्रिटीश आशियाई महिलांवरील गुन्हेगारीसाठी सांस्कृतिक पद्धतींचा कसा वापर करतात हे जगाला सांगणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. जसविंदरचा जन्म डर्बीमधील शीखच्या पारंपारिक घरात झाला होता. तिचे पालक पंजाबमधील परप्रवासी आहेत. त्यांच्या संस्कृतीनुसार पुरुष मुलांना प्रथम प्राधान्य दिले आहे तर महिलांना कुटुंबातील दुय्यम सदस्य मानले गेले. तिच्या घरच्यांना घराण्याची प्रतिष्ठा या गोष्टीचं मोल इतर कुठल्याही गोष्टी पेक्षा अगदी मुलींच्या जिवापेक्षाहि अधिक वाटत होत . इंग्लंडमध्ये जेथे ती मोठी झाली, जसविंदरने तिच्या शाळेतून परदेशी कल्पना आणि वैशिष्ट्ये शिकली. वयाच्या १४ व्या वर्षी जस्सीला तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवला ती घाबरली.आपल्या थोरल्या बहिणीचे लग्न करून झालेला छळ तिने पाहिलं होत . जस्सीला लग्न न्हवत करायचं म्हणून ती घरातून पळून जाते इथून पुढे तिच्या आयुष्यातला प्रवास खूप कठीण होतो खूप वाईट परिस्थिती येते त्याला ती कशी सामोरी जाते , आत्मसन्मानासाठी , एक चांगल मनासारखं जीवन जगण्यासाठीची संघर्ष करणारी कहाणी आहे. या पुस्तकामधला एक परिच्छेद - " या डर्बीच्या रस्त्यावरून आम्ही चालू शकत नाही. तु पळून गेल्यामुळे, हे होत आहे. गुरूद्वारात जाणं तर बंदच झालय. लोक उघड बोलतात. तुझ्यामुळे लोक थूंकतात माझ्या तोंडावर !"काही सेकंद आईचा आवाज थांबला. मला वाटल .झाल वाटत हीच बोलून, पण ती केवळ आवंढा गिळन्यासाठी थांबलेली होती." मेले घराण्याचा नाश केलास... भोगशिल आपल्या कर्माची फळं! बघत रहा.तु आणि तो तुझा चांभांरडा यार, गटारात लोळाल.. तीच लायकी आहे तुमची...!! आयुष्यात काही काही मिळणार नाही तुम्हाला. ऐकतीयेस ना? जेव्हा तुला मुलगी होइल आणि ती अस छिनालपणाने वागेल तेव्हा कळले तुला, की असल्या वेश्येला जन्म देऊन वाढवल्यावर काय वाटतं ते!!!" नक्की वाचा.. ...Read more

  • Rating StarZEE MARATHI DISHA 18 MAY - 24 MAY 2019

    ‘घराण्याची प्रतिष्ठा क्रूर वास्तव... भारतातील, पंजाबमधील काही कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झाली होती. आपल्या मातृभूमीपासून दूर गेलेल्या, कुटुंबाविना एकट्या पडलेल्यांसाठी जवळची, वेळप्रसंगी आधार देऊ शकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यांचा ज्ञातिसमाज. पजाबमधून इंग्लंडला येऊन स्थायिक झालेले त्यांच्या जातीचे लोक. इंग्लंडमध्ये डर्बी येथे स्थायिक झालेल्या अशाच एका पंजाबी कुटुंबातील मुलीची – जसविंदर संघेराची – ही सत्यकहाणी आहे. ‘शेम’ हे तिचं पुसतक वाचलं की तिच्या संघर्षाची कल्पना येते. चौदा वर्षांची असताना जसविंदरला, तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवण्यात आला. ती घाबरली. ठरवून केलेल्या लग्नानंतर थोरल्या बहिणीचा झालेला छळ तिनं प्रत्यक्ष पाहिला होता. म्हणून ती घरातून पळून गेली. तेव्हापासून तिच्या आईवडिलांनी तिचं नावच टाकलं. ती पळून गेली नसती तर सासरी छळ सोसत जगावं लागलं असतं आणि लग्न मान्य केलं नसतं, तर तिला श्वास कोंडून मारून टाकलं असतं. श्वास कोंडून मारून टाकणाऱ्या क्रूर कुटुंबव्यवस्थेपासून तिनं पळून जाऊन स्वत:ची कशी सुटका करून घेतली, त्याची ही विलक्षण सत्यकहाणी आहे. आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचं अमान्य करून जसविंदरनं तिची मैत्रीण अवतार हिच्या भावाशी, जस्सीशी, एका चांभार मुलाशी लग्न केल्यानं घराण्याच्या प्रतिष्ठेला चिखल फासला म्हणून तिच्या कुटुंबानं तिला वाळीत टाकलं होतं. जमीनदार समजली जाणारी जाट घराण्यातील ही माणसं चांभारांना अस्पृश्य समजतात. अशाच एका हीन कुळातील मुलाशी जसविंदरनं लग्न केलं म्हणून आईवडील खूप संतापले होते. आपल्या अवतीभवती असंही घडत असतं. याची जाणीवही नसलेल्यांनी जसविंदरची ही आत्मकहाणी जरूर वाचावी. ‘घराण्याची प्रतिष्ठा’ ही मुलींच्या जिवापेक्षाही अधिक असते, असं वाटणाऱ्या मनोवृत्तीविरुद्ध लढणारी, आत्मसन्मानासाठी केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. तशीच या परिस्थितीवर मात करून, अशा पीडित स्त्रियांसाठी आधारभूत होण्याचं धाडस दाखवणाऱ्या जसविंदरच्या विजयाची ही कहाणी आहे! - मंगला गोखले ...Read more

  • Rating StarPranjali Gangurde Kolarkar

    जसविंदर संघेरा या ब्रिटन मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेने/लेखिकेने तिथे होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार बद्दल आणि तिने सुरू केलेल्या महिला मदत केंद्र बद्दल आपले अनुभव लिहले आहेत. स्वतः वयाच्या 16 व्या वर्षी मनाविरुद्ध लग्न होणार म्हणून घरसोडून जाऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन महिला आधार केंद्र सुरू केलीत ही स्तुत्य गोष्ट आहे. शेम नावाचे पुस्तक नक्की वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more