* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DWIKHANDIT IS A THIRD PART OF BANGLADESHI AUTHOR TASLIMA NASREEN’S MEMOIR. IT CONTAINS MAINLY HER LIFE IN THIRTY’S & EXPERIENCES SHE HAD AS AN AUTHOR & DOCTOR. TASLIMA NASREEN’S LIFE IS FULL OF CONTROVERSIES, SUFFERING & BATTLE FOR RIGHTS. SHE PUTS HER MEMORIES IN WORDS IN HER MEMOIR. THIS BOOK NOT ONLY TALKS ABOUT TASLIMA’S LIFE, BUT IT PORTRAITS SITUATION OF WOMEN IN ISLAM.
तसलिमा नासरिन या मूळ बांगलादेशी लेखिकेच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग ‘द्विखंडित.’ या भागात तसलिमांच्या सत्तावीस ते तीस वर्षांपर्यंतच्या वयाची कहाणी आहे. एक साहित्यिक व डॉक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव त्यांनी या भागात सांगितले आहेत. चांगल्या अनुभवांबरोबर आलेले वाईट अनुभवही त्यांनी खूपच स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असणारा सडेतोड व स्पष्टपणा आत्मचरित्र वाचताना जागोजागी जाणवत राहतो. त्यांचे लेखन, त्यात आलेले अडथळे, कौटुंबिक वातावरण, लेखनाला झालेला विरोध, समर्थन, पुरस्काराचे राजकारण त्यांच्या लेखनाचे नेत्यांनी केलेले राजकारण सनातनी समाजातून होणारी टीका अशा सर्व अनुभवांतून जात असताना त्यांची मानसिक स्थिती त्यांनी मांडली आहे. त्यांना स्त्रियांच्या दुरवस्थेविषयी वाटणारी आस्था, त्यातून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्यासाठी केलेले लिखाण, इस्लामवर त्यांनी बेधडकपणे केलेली टीका यामुळे बांगलादेशात त्यांच्याविरुद्ध वातावरण निर्माण झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी, निषेध, मोर्चे... अगदी त्यांचे शिर उडवण्यासाठी इनामही घोषित करण्यात आले; परंतु त्यांनी आपले लिखाण मात्र सुरूच ठेवले. रुग्णसेवा कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहिल्या. जीवनाकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, स्वप्न यांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहिल्या. वैयक्तिक व वैचारिक स्वातंत्र्याला मान देणाऱ्या तसलिमा नासरिन यांचे आत्मचरित्र वाचकाला प्रत्येक पान वाचण्यासाठी उत्सुक करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
TASLIMA NASREEN #BANGLADESH #NATIONAL RELIGION #ISLAM #YASMIN #DHAKA #SHANTI NIKETAN #LFTAAR PARTY #AANAND BAZAR #PATRIKA #SAKAL KAVITA PARISHAD #AVAKASH NIRVACHIT KALAM, GOLLA CHOOT, COULARA, VILAS GEETE
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 02-09-2017

    लेखिकेची संघर्षकथा... बांगलादेशातील महिलांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या, त्यासाठी प्रसंगी धर्माच्या विरोधात लेखन करणाऱ्या, त्यातून मूलतत्त्ववादी तसेच सरकारचा रोष ओढवून घेऊन अनेक जीवघेण्या संकटांना सामोरे गेलेल्या प्रसिद्ध, पण वादग्रस्त लेखिका तसलिमा नसरीन यांनी आपल्या सत्तावीस ते तीस वर्षे वयापर्यंतच्या आयुष्यातील घडामोडी ‘द्विखंडीत’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या ‘अमार मेयेबेला’ या आत्मकथनाचा हा तिसरा भाग आहे. विलास गीते यांनी त्याचा अनुवाद केला आहे. धर्मविरोधी, पुरुषद्वेष्टी अशी संभावना करत तस्लिमा यांच्याविरोधात बांगला देशात जी आंदोलने झाली, जो विरोध झाला, त्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात आहे. त्यांच्या विरोधात निघालेले मोर्चे, दैनिके, नियतकालिकांमधून त्यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेले लेख, मशिदीत नमाजानंतर त्यांना होणारी शिवीगाळ, त्यांचा खून करण्याचा निघालेला फतवा या साऱ्याला तोंड देत तस्लिमा कणखरपणे उभ्या राहिल्या. अर्थात काही साहित्यिकांनी, वृत्तपत्रांनी त्यांची बाजू उचलून धरली, पण तरीही देशभरातून होणारा विरोध प्रखर होता. या साऱ्या कालखंडात त्यांच्या खासगी जीवनातही अनेक घडामोडी घडल्या. त्यांच्या धर्मविरोधी लेखनाला तसेच मुक्त जगण्याला वडिलांचा मोठा विरोध होता. त्यातून तस्लिमा स्वतंत्र राहू लागल्या. वडील आणि त्या यांच्यामध्ये आईची होणारी फरपट, बहीण यास्मीन हिचे रवींद्र संगीताचे वेड, वडिलांचा रोष सहन न झाल्याने तिचे घर सोडून जाणे, तिने तडकाफडकी केलेले लग्न, पहिला पती रुद्र याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरही तस्लिमा यांना त्याच्याविषयी वाटणारे प्रेम, ममत्व, त्याच्या कवितांविषयीचा आदर, रुद्रचा मृत्यू, रुद्रनंतर त्यांच्या आयुष्यात आलेले पुरुष आणि त्यांच्याशी असलेले नाते, या विषयी लेखिकेने मोकळेपणाने कथन केले आहे. सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिक गप्पा, कवी संमेलने, पुस्तकजत्रा यांच्या वर्णनांमधून लेखिकेने बांगलादेशातील साहित्य विश्वाची सफरही घडवून आणली आहे. हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही तर त्या काळातील बांगला देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे चित्रणही यात वाचायला मिळते. -नयना निर्गुण ...Read more

  • Rating StarShabdruchee May 2017

    अस्वस्थ समाजाचा जाहीरनामा... तसलिमा नासरीन बांगलादेशी कादंबरीकार, स्तंभलेखक, कवी आणि स्त्रीवादाच्या ठाम पुरस्कर्त्या. द्विखंडित हे नासरीन यांच्या आत्मकथन मालिकेतील तिसरं पुस्तक. आमार मेयेबेला आणि उधाण वारानंतरचा हा भाग. नासरिन यांनी 1994 मध्ये बांलादेश सोडलं . मुलतत्ववादाला कडाडून विरोध आणि मानवतावादाच्या पुरस्कारानं तसलिमा यांचं नाव जागतिक पातळीवर गाजलं. पण या प्रसिद्धीच्या मागे तीव्र संघर्षाची पार्श्वभूमी आहे. जिचा प्रत्यय द्विखंडित वाचताना येतो. या आत्मकथनात नासरिन यांच्या सामाजिक जीवनसोबत कौटुंबिक भोवताल आणि मित्रपरिवाराच्या गोष्टीही भेटतात. शिप्रा सारख्या मैत्रिणीचं जगणं असो की सुहृदयचं आयुष्य असो, त्यांच्या जीवनाची मांडणी करतानाही नासरिना बांगलादेशातील जीवनाचे निरनिराळे पैलू मांडतात. स्वतःच्या आयुष्याचा आलेख मांडताना त्यांचं समाजभान कुठेही हरवत नाही. बांगलादेशातील समाजजीवनाचं वास्तव दर्शन द्विखंडितच्या पानापानातून स्पष्ट होतं. पहिल्याच प्रकरणात इथल्या कुटुंब नियोजनाच्या प्रक्रियेचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. यात कुटुंब नियोजनाविषयीची इस्लाममधली मानसिकता स्पष्ट होतेच. पण गरिबीच्या शहारे आणणाऱ्या व्यथाही दिसतात. निव्वळ थोड्या चिल्लर पैशासाठी आपलं मातृत्व पणाला लावणाऱ्या बायकांचं चित्रण हेलावून सोडते. त्या लिहितात. ‘एक हलक्या दर्जाची सुती साडी आणि एकशेवीस रुपयांसाठी त्यांची आयुष्यभर निःसंतान राहण्याची तयारी असते. मला समजली माझ्या देशाची गरिबी. मी शहारले. मी रडले.’ जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं गहिरं आकलनही तसलिमा मांडतात. त्यांच्या आयुष्यातली संवेदनशील माणसं आणि त्यांचा मनोव्यापारही प्रत्ययाला येतो. नासरिन यांच्या देहात मुरलेली कवितेवरची श्रद्धा ‘तुला करु शकत नाही स्पर्श’ सारख्या प्रकरणात तीव्रतेनं व्यक्त होते. रुद्रच्या कवितांचे दाखले देताना नासरिन स्वतःच्या भावनांनाही नकळत वाट मोकळी करुन देतात. पण तसलिमांमधली कवियित्रीही यातल्या शब्दा-शब्दातून आपणास भेटते. त्यांच्या गद्यलेखनाच्या कथनशैलीतही कवितेचा प्रवाह अनुभवास येतो. रुद्रविषयी लिहिताना त्या स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहतात. ते निरिक्षण त्या तितक्याच काव्यात्म पद्धतीनं रेखाटतात. त्या म्हणतात... रुद्रबरोबरच्या सुंदर सहजीवनाचं जे रम्य स्वप्न मी पाहिलं होतं, त्या स्वप्नाची राख माझ्या सर्वांगाला चिकटून राहिली होती. रुद्रबरोबर जीवन व्यतीत करणं शक्य नाही हे मला समजलं होतं, आम्ही आता एकमेकांकडे पाठ करून उभे आहोत हे मला उमजलं होतं. आता ती सारी राख, धूळ, काजळी धुऊन टाकून स्वच्छ व्हायला हवं हेसुद्धा कळत होतं. तरीही काळ जातच राहिला. दिवस भकास उन्हात भाजत राहिले, जळत राहिले, रात्री अंधारात नागिणीसारख्या फूत्कारत राहिल्या आणि मी स्वतःला घेऊन अंगणातल्या अडगळीसारखी बसून राहिले. या जीवनाला घेऊन नक्की कुठं जावं, कुठं गेल्यावर ‘नाही-नाही’ म्हणणारा भणाण वारा माझ्या दिशेनं वेड्यासारखा झपाटत येणार नाही, हे काही समजत नव्हतं. जीवन कधी फुलासारखं, तर कधी दगडासारखं वाटे. हे जीवन कधी माझ्या मानेवर येऊन बसलं मला समजलंच नाही. माझी मान, पाठ या जीवनाच्याच भारामुळे वाकून गेली. या जीवनाला मी नीट ओळखत नव्हते, हे जीवन माझंच होतं; पण माझं नव्हतं. यात जे काही पाणी होतं ते मी अनेक वर्षांपासून दुस-याच्या ओंजळीत ओतून दिलं, स्वतःच्या तहानेचा विचार क्षणभरही माझ्या मनात आला नाही. द्विखंडित वाचताना एका स्त्रीचा व्यक्ती ते समाजजीवन असा पटच उलगडत जातो. तीव्र संवेदनशीलता, तितकचं गहिरं समाजभान यात प्रतिबिंबीत होतं. देश, समाज आणि स्वतःचं जगणं यांची सांगड घालताना गोंधळणाऱ्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हवं. तसलिमांच्या आयुष्यातील अनेक घटना या पुस्तकात साहित्यरुपात अवतरतात. या घटना निव्वळ एका स्त्रिच्या आयुष्यातील सर्वसामान्य घटना नाहीत. तर महिलांबाबत राबवण्यात येणारी धोरणं, त्यांच्या सुरक्षिततेविषयीची अनास्था अशा अनेक अनुषंगिक संदर्भातून मांडण्यात आलेला तो एका सामाजिक व्यवस्थेच्या निर्दयीपणाचा दस्तावेज वाटतो. द्विखंडितमधील प्रकरणाची नावंही तसलिमांच्या वादळी जीवनाची जाणीव देतात. ‘पारलैकिक गाजर’, ‘आम्ही अशाच वाहत जातो’, ‘गोल्लाछूटचा खेळ’, ‘पासपोर्ट जप्त’, ‘मानवरुपी सैतान’आणि ‘फतवा’सारखी प्रकरणे नासरीन यांनी अनुभवलेल्या संघर्षाचं इंत्यभूत चित्रण करतात. हे चित्रण अंगावर शहारे आणतं. अस्वस्थ करतं. अंतर्मूख करतं. आणि तथाकथित सामाजिक जडणघडणीबाबत नवे प्रश्नही उपस्थित करतं. या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी वाचकांना स्त्रीवादी साहित्याच्या नव्या धाटणीचाही परिचय होईल, असा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यातील महत्त्वाचा दस्तावेज असणारे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित करुन मराठी वाचकांना मोठा ठेवा दिला आहे. एका मध्यमवर्गीय घरातील एका साधारण युवतीने कशा प्रकारे अनेक अडचणींना, संकटांना तोंड देत आपल्या आत्मशक्तीचा शोध लावला व ती अप्रतिम तसलिमा नासरिन बनली हे ‘द्विखंडित’ या पुस्तकात दिसते, हीच या पुस्तकाबाबतची महत्त्वाची गोष्ट आहे. या पुस्तकाचे ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्य खूप आहे. केवळ विषयाच्या महत्त्वामुळेच नव्हे, तर प्रसादगुणानेही आत्मकथेच्या या भागाला आकर्षक आणि वाचनीय केले आहे... ‘द्विखंडित’ एकाच वेळी साहित्य, एका असामान्य महिलेची कहाणी व एक देश आणि समाज यांच्यामधल्या वादळाची कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-05-2017

    तसलिमा नासरिन यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या भागाचा हा अनुवाद. तसलिमा यांनी वय वर्षं २७ ते ३० या काळातल्या घटना - घडामोडींवर लिहिलं आहे. त्यांच्या स्त्रीवादी लेखनाला आलेला वेग, त्यांचं स्तंभलेखन, कवितालेखन, कादंबरीलेखन आदी गोष्टींविषयी त्यांनी लिहिल आहे. ‘निर्बाचित कलाम’ हे पुस्तक आणि ‘लज्जा’ ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर बांगलादेशामध्ये तयार झालेलं वातावरण, इतर साहित्यिकांची त्यांच्याबद्दलची मतं, वेगवेगळे वाद, त्या त्या वेळच्या भावना अशा सर्व गोष्टींवर तसलिमा यांनी स्पष्टपणानं लिहिलं आहे. तत्कालीन घडामोडी त्या मांडत असतानाच एक साहित्यिक आणि व्यक्तिमत्त्व घडत जाण्याची प्रक्रियाही त्यातून उलगडत जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more