* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DWIKHANDITO
  • Availability : Available
  • Translators : VILAS GITAY
  • ISBN : 9789386342065
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 516
  • Language : TRANSLATED FROM BENGALI TO MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DWIKHANDIT IS A THIRD PART OF BANGLADESHI AUTHOR TASLIMA NASREEN’S MEMOIR. IT CONTAINS MAINLY HER LIFE IN THIRTY’S & EXPERIENCES SHE HAD AS AN AUTHOR & DOCTOR. TASLIMA NASREEN’S LIFE IS FULL OF CONTROVERSIES, SUFFERING & BATTLE FOR RIGHTS. SHE PUTS HER MEMORIES IN WORDS IN HER MEMOIR. THIS BOOK NOT ONLY TALKS ABOUT TASLIMA’S LIFE, BUT IT PORTRAITS SITUATION OF WOMEN IN ISLAM.
तसलिमा नासरिन या मूळ बांगलादेशी लेखिकेच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग ‘द्विखंडित.’ या भागात तसलिमांच्या सत्तावीस ते तीस वर्षांपर्यंतच्या वयाची कहाणी आहे. एक साहित्यिक व डॉक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव त्यांनी या भागात सांगितले आहेत. चांगल्या अनुभवांबरोबर आलेले वाईट अनुभवही त्यांनी खूपच स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असणारा सडेतोड व स्पष्टपणा आत्मचरित्र वाचताना जागोजागी जाणवत राहतो. त्यांचे लेखन, त्यात आलेले अडथळे, कौटुंबिक वातावरण, लेखनाला झालेला विरोध, समर्थन, पुरस्काराचे राजकारण त्यांच्या लेखनाचे नेत्यांनी केलेले राजकारण सनातनी समाजातून होणारी टीका अशा सर्व अनुभवांतून जात असताना त्यांची मानसिक स्थिती त्यांनी मांडली आहे. त्यांना स्त्रियांच्या दुरवस्थेविषयी वाटणारी आस्था, त्यातून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्यासाठी केलेले लिखाण, इस्लामवर त्यांनी बेधडकपणे केलेली टीका यामुळे बांगलादेशात त्यांच्याविरुद्ध वातावरण निर्माण झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी, निषेध, मोर्चे... अगदी त्यांचे शिर उडवण्यासाठी इनामही घोषित करण्यात आले; परंतु त्यांनी आपले लिखाण मात्र सुरूच ठेवले. रुग्णसेवा कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहिल्या. जीवनाकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, स्वप्न यांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहिल्या. वैयक्तिक व वैचारिक स्वातंत्र्याला मान देणाऱ्या तसलिमा नासरिन यांचे आत्मचरित्र वाचकाला प्रत्येक पान वाचण्यासाठी उत्सुक करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
TASLIMA NASREEN #BANGLADESH #NATIONAL RELIGION #ISLAM #YASMIN #DHAKA #SHANTI NIKETAN #LFTAAR PARTY #AANAND BAZAR #PATRIKA #SAKAL KAVITA PARISHAD #AVAKASH NIRVACHIT KALAM, GOLLA CHOOT, COULARA, VILAS GEETE
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 02-09-2017

    लेखिकेची संघर्षकथा... बांगलादेशातील महिलांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या, त्यासाठी प्रसंगी धर्माच्या विरोधात लेखन करणाऱ्या, त्यातून मूलतत्त्ववादी तसेच सरकारचा रोष ओढवून घेऊन अनेक जीवघेण्या संकटांना सामोरे गेलेल्या प्रसिद्ध, पण वादग्रस्त लेखिका तसलिमा नसरीन यांनी आपल्या सत्तावीस ते तीस वर्षे वयापर्यंतच्या आयुष्यातील घडामोडी ‘द्विखंडीत’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या ‘अमार मेयेबेला’ या आत्मकथनाचा हा तिसरा भाग आहे. विलास गीते यांनी त्याचा अनुवाद केला आहे. धर्मविरोधी, पुरुषद्वेष्टी अशी संभावना करत तस्लिमा यांच्याविरोधात बांगला देशात जी आंदोलने झाली, जो विरोध झाला, त्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात आहे. त्यांच्या विरोधात निघालेले मोर्चे, दैनिके, नियतकालिकांमधून त्यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेले लेख, मशिदीत नमाजानंतर त्यांना होणारी शिवीगाळ, त्यांचा खून करण्याचा निघालेला फतवा या साऱ्याला तोंड देत तस्लिमा कणखरपणे उभ्या राहिल्या. अर्थात काही साहित्यिकांनी, वृत्तपत्रांनी त्यांची बाजू उचलून धरली, पण तरीही देशभरातून होणारा विरोध प्रखर होता. या साऱ्या कालखंडात त्यांच्या खासगी जीवनातही अनेक घडामोडी घडल्या. त्यांच्या धर्मविरोधी लेखनाला तसेच मुक्त जगण्याला वडिलांचा मोठा विरोध होता. त्यातून तस्लिमा स्वतंत्र राहू लागल्या. वडील आणि त्या यांच्यामध्ये आईची होणारी फरपट, बहीण यास्मीन हिचे रवींद्र संगीताचे वेड, वडिलांचा रोष सहन न झाल्याने तिचे घर सोडून जाणे, तिने तडकाफडकी केलेले लग्न, पहिला पती रुद्र याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरही तस्लिमा यांना त्याच्याविषयी वाटणारे प्रेम, ममत्व, त्याच्या कवितांविषयीचा आदर, रुद्रचा मृत्यू, रुद्रनंतर त्यांच्या आयुष्यात आलेले पुरुष आणि त्यांच्याशी असलेले नाते, या विषयी लेखिकेने मोकळेपणाने कथन केले आहे. सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिक गप्पा, कवी संमेलने, पुस्तकजत्रा यांच्या वर्णनांमधून लेखिकेने बांगलादेशातील साहित्य विश्वाची सफरही घडवून आणली आहे. हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही तर त्या काळातील बांगला देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे चित्रणही यात वाचायला मिळते. -नयना निर्गुण ...Read more

  • Rating StarShabdruchee May 2017

    अस्वस्थ समाजाचा जाहीरनामा... तसलिमा नासरीन बांगलादेशी कादंबरीकार, स्तंभलेखक, कवी आणि स्त्रीवादाच्या ठाम पुरस्कर्त्या. द्विखंडित हे नासरीन यांच्या आत्मकथन मालिकेतील तिसरं पुस्तक. आमार मेयेबेला आणि उधाण वारानंतरचा हा भाग. नासरिन यांनी 1994 मध्ये बांलादेश सोडलं . मुलतत्ववादाला कडाडून विरोध आणि मानवतावादाच्या पुरस्कारानं तसलिमा यांचं नाव जागतिक पातळीवर गाजलं. पण या प्रसिद्धीच्या मागे तीव्र संघर्षाची पार्श्वभूमी आहे. जिचा प्रत्यय द्विखंडित वाचताना येतो. या आत्मकथनात नासरिन यांच्या सामाजिक जीवनसोबत कौटुंबिक भोवताल आणि मित्रपरिवाराच्या गोष्टीही भेटतात. शिप्रा सारख्या मैत्रिणीचं जगणं असो की सुहृदयचं आयुष्य असो, त्यांच्या जीवनाची मांडणी करतानाही नासरिना बांगलादेशातील जीवनाचे निरनिराळे पैलू मांडतात. स्वतःच्या आयुष्याचा आलेख मांडताना त्यांचं समाजभान कुठेही हरवत नाही. बांगलादेशातील समाजजीवनाचं वास्तव दर्शन द्विखंडितच्या पानापानातून स्पष्ट होतं. पहिल्याच प्रकरणात इथल्या कुटुंब नियोजनाच्या प्रक्रियेचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. यात कुटुंब नियोजनाविषयीची इस्लाममधली मानसिकता स्पष्ट होतेच. पण गरिबीच्या शहारे आणणाऱ्या व्यथाही दिसतात. निव्वळ थोड्या चिल्लर पैशासाठी आपलं मातृत्व पणाला लावणाऱ्या बायकांचं चित्रण हेलावून सोडते. त्या लिहितात. ‘एक हलक्या दर्जाची सुती साडी आणि एकशेवीस रुपयांसाठी त्यांची आयुष्यभर निःसंतान राहण्याची तयारी असते. मला समजली माझ्या देशाची गरिबी. मी शहारले. मी रडले.’ जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं गहिरं आकलनही तसलिमा मांडतात. त्यांच्या आयुष्यातली संवेदनशील माणसं आणि त्यांचा मनोव्यापारही प्रत्ययाला येतो. नासरिन यांच्या देहात मुरलेली कवितेवरची श्रद्धा ‘तुला करु शकत नाही स्पर्श’ सारख्या प्रकरणात तीव्रतेनं व्यक्त होते. रुद्रच्या कवितांचे दाखले देताना नासरिन स्वतःच्या भावनांनाही नकळत वाट मोकळी करुन देतात. पण तसलिमांमधली कवियित्रीही यातल्या शब्दा-शब्दातून आपणास भेटते. त्यांच्या गद्यलेखनाच्या कथनशैलीतही कवितेचा प्रवाह अनुभवास येतो. रुद्रविषयी लिहिताना त्या स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहतात. ते निरिक्षण त्या तितक्याच काव्यात्म पद्धतीनं रेखाटतात. त्या म्हणतात... रुद्रबरोबरच्या सुंदर सहजीवनाचं जे रम्य स्वप्न मी पाहिलं होतं, त्या स्वप्नाची राख माझ्या सर्वांगाला चिकटून राहिली होती. रुद्रबरोबर जीवन व्यतीत करणं शक्य नाही हे मला समजलं होतं, आम्ही आता एकमेकांकडे पाठ करून उभे आहोत हे मला उमजलं होतं. आता ती सारी राख, धूळ, काजळी धुऊन टाकून स्वच्छ व्हायला हवं हेसुद्धा कळत होतं. तरीही काळ जातच राहिला. दिवस भकास उन्हात भाजत राहिले, जळत राहिले, रात्री अंधारात नागिणीसारख्या फूत्कारत राहिल्या आणि मी स्वतःला घेऊन अंगणातल्या अडगळीसारखी बसून राहिले. या जीवनाला घेऊन नक्की कुठं जावं, कुठं गेल्यावर ‘नाही-नाही’ म्हणणारा भणाण वारा माझ्या दिशेनं वेड्यासारखा झपाटत येणार नाही, हे काही समजत नव्हतं. जीवन कधी फुलासारखं, तर कधी दगडासारखं वाटे. हे जीवन कधी माझ्या मानेवर येऊन बसलं मला समजलंच नाही. माझी मान, पाठ या जीवनाच्याच भारामुळे वाकून गेली. या जीवनाला मी नीट ओळखत नव्हते, हे जीवन माझंच होतं; पण माझं नव्हतं. यात जे काही पाणी होतं ते मी अनेक वर्षांपासून दुस-याच्या ओंजळीत ओतून दिलं, स्वतःच्या तहानेचा विचार क्षणभरही माझ्या मनात आला नाही. द्विखंडित वाचताना एका स्त्रीचा व्यक्ती ते समाजजीवन असा पटच उलगडत जातो. तीव्र संवेदनशीलता, तितकचं गहिरं समाजभान यात प्रतिबिंबीत होतं. देश, समाज आणि स्वतःचं जगणं यांची सांगड घालताना गोंधळणाऱ्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हवं. तसलिमांच्या आयुष्यातील अनेक घटना या पुस्तकात साहित्यरुपात अवतरतात. या घटना निव्वळ एका स्त्रिच्या आयुष्यातील सर्वसामान्य घटना नाहीत. तर महिलांबाबत राबवण्यात येणारी धोरणं, त्यांच्या सुरक्षिततेविषयीची अनास्था अशा अनेक अनुषंगिक संदर्भातून मांडण्यात आलेला तो एका सामाजिक व्यवस्थेच्या निर्दयीपणाचा दस्तावेज वाटतो. द्विखंडितमधील प्रकरणाची नावंही तसलिमांच्या वादळी जीवनाची जाणीव देतात. ‘पारलैकिक गाजर’, ‘आम्ही अशाच वाहत जातो’, ‘गोल्लाछूटचा खेळ’, ‘पासपोर्ट जप्त’, ‘मानवरुपी सैतान’आणि ‘फतवा’सारखी प्रकरणे नासरीन यांनी अनुभवलेल्या संघर्षाचं इंत्यभूत चित्रण करतात. हे चित्रण अंगावर शहारे आणतं. अस्वस्थ करतं. अंतर्मूख करतं. आणि तथाकथित सामाजिक जडणघडणीबाबत नवे प्रश्नही उपस्थित करतं. या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी वाचकांना स्त्रीवादी साहित्याच्या नव्या धाटणीचाही परिचय होईल, असा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यातील महत्त्वाचा दस्तावेज असणारे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित करुन मराठी वाचकांना मोठा ठेवा दिला आहे. एका मध्यमवर्गीय घरातील एका साधारण युवतीने कशा प्रकारे अनेक अडचणींना, संकटांना तोंड देत आपल्या आत्मशक्तीचा शोध लावला व ती अप्रतिम तसलिमा नासरिन बनली हे ‘द्विखंडित’ या पुस्तकात दिसते, हीच या पुस्तकाबाबतची महत्त्वाची गोष्ट आहे. या पुस्तकाचे ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्य खूप आहे. केवळ विषयाच्या महत्त्वामुळेच नव्हे, तर प्रसादगुणानेही आत्मकथेच्या या भागाला आकर्षक आणि वाचनीय केले आहे... ‘द्विखंडित’ एकाच वेळी साहित्य, एका असामान्य महिलेची कहाणी व एक देश आणि समाज यांच्यामधल्या वादळाची कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-05-2017

    तसलिमा नासरिन यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या भागाचा हा अनुवाद. तसलिमा यांनी वय वर्षं २७ ते ३० या काळातल्या घटना - घडामोडींवर लिहिलं आहे. त्यांच्या स्त्रीवादी लेखनाला आलेला वेग, त्यांचं स्तंभलेखन, कवितालेखन, कादंबरीलेखन आदी गोष्टींविषयी त्यांनी लिहिल आहे. ‘निर्बाचित कलाम’ हे पुस्तक आणि ‘लज्जा’ ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर बांगलादेशामध्ये तयार झालेलं वातावरण, इतर साहित्यिकांची त्यांच्याबद्दलची मतं, वेगवेगळे वाद, त्या त्या वेळच्या भावना अशा सर्व गोष्टींवर तसलिमा यांनी स्पष्टपणानं लिहिलं आहे. तत्कालीन घडामोडी त्या मांडत असतानाच एक साहित्यिक आणि व्यक्तिमत्त्व घडत जाण्याची प्रक्रियाही त्यातून उलगडत जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more