* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BREAKING OUT:AN INDIAN WOMANS AMERICAN JOURNEY
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9789387789012
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PADMA DESAI GREW UP IN THE 1930S IN THE PROVINCIAL WORLD OF SURAT, WHERE SHE HAD A SHELTERED AND STRICT UPBRINGING IN A TRADITIONAL GUJARATI ANAVIL BRAHMIN FAMILY. HER ACADEMIC BRILLIANCE WON HER A SCHOLARSHIP TO BOMBAY UNIVERSITY, WHERE THE FIRST HEADY TASTE OF FREEDOM IN THE BIG CITY LED TO TRAGIC CONSEQUENCES???SEDUCTION BY A FELLOW STUDENT WHOM SHE WAS THEN COMPELLED TO MARRY. IN A FAILED ATTEMPT TO END THIS DISASTROUS FIRST MARRIAGE, SHE CONVERTED TO CHRISTIANITY. A SCHOLARSHIP TO AMERICA IN 1955 LAUNCHED HER ON HER LONG JOURNEY TO LIBERATION FROM THE BURDENS AND CONSTRAINTS OF HER LIFE IN INDIA, WITH A GROWING SELF-AWARENESS AND TRANSFORMATION AT MANY LEVELS, AS SHE MADE A NEW LIFE FOR HERSELF, MET AND MARRIED THE CELEBRATED ECONOMIST JAGDISH BHAGWATI, BECAME A MOTHER, AND ROSE TO ACADEMIC EMINENCE AT HARVARD AND COLUMBIA. HOW DID SHE NAVIGATE THE TUMULTUOUS ROAD TO ASSIMILATION IN AMERICAN SOCIETY AND CULTURE? AND WHAT DID SHE RETAIN OF HER INDIAN UPBRINGING IN THE PROCESS? THIS BRAVE AND MOVING MEMOIR, WRITTEN WITH A NOVELIST???S SKILL AT EVOKING PERSONALITIES, PLACES AND ATMOSPHERE, AND A SCHOLAR???S INSIGHTS INTO CULTURE AND SOCIETY, COMMUNITY AND FAMILY.
बंधमुक्त होताना हे आत्मकथन आहे अर्थतज्ज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त पद्मा देसाई यांचे. लेखिकेचा जन्म १९३१ साली गुजरातमधील सुरत या ठिकाणी झाला. २०व्या शतकात एक सामान्य स्त्री ते संशोधक हा प्रवास त्यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक आणि खडतर ठरला. आज एक अर्थतज्ज्ञ म्हणून परिचित असणाऱ्या पद्मा देसाई लहानपणापासूनच शालेय अभ्यासात हुशार होत्या. घरी कडक शिस्त असली तरी शिक्षणासाठी मात्र खूप पाठिंबा होता. त्यामुळे त्यांची शिक्षणातली रुची उत्तरोत्तर वाढत गेली. परंतु वैयक्तिक आयुष्य मात्र संकटे आणि वादळांनी व्यापलेले होते. मुंबई विद्यापिठातून त्यांनी एम.ए.ची पदवी संपादित केली आणि त्याच वेळी त्यांना लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रेमविवाह होता. त्यातून त्यांच्या वाट्याला आली ती केवळ फसवणूक. हे लक्षात यायला त्यांना बराच वेळ लागला. त्या दरम्यान त्यांना शिक्षणानिमित्त अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. भारतीय संस्कृतीत वाढलेल्या लेखिकेला सुरुवातीला अमेरिकेतील संस्कृतीशी जुळवून घेणे खूपच कठीण गेले; परंतु लवकरच लेखिका त्या `ठिकाणी सरावली. तिथल्या संस्कृतीनेच लेखिकेला तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी विचार करण्यास भाग पाडले. डॉक्टरेट करत असताना केब्रिज युनिव्हर्सिटीत राहत असताना, तसेच कोलंबिया कॉलेजमध्ये आलेले अनेक अनुभव लेखिकेने सांगितले आहेत. लेखिकेवर तिचे वडील, आई आणि काकी यांचा आयुष्यभर प्रभाव होता, हे जाणवते. विसाव्या शतकात भारतासारख्या देशात स्त्री म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी काही निर्णय घेणे तेवढे सोपे नव्हते. परंतु समाजाला, परंपरांना न जुमानता लेखिकेने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांपैकी पहिला धर्मांतराचा आणि दुसरा अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांच्याशी दुसरा विवाह करण्याचा. परंपरांच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःला सिद्ध करणाऱ्या या विदुषीचे आत्मचरित्र प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायक ठरेल.

No Records Found
No Records Found
Keywords
"#BREAKING OUT# PADMA DESAI# SUNANDA AMRAPURKAR# FAMILY# FATHER# MOTHER# CHILDHOOD# ADOLESCENCE# SEDUCTION# DELHI# CONVERSION TO CHRISTIANITY# JAGADISH# ANURADHA# SURAT# MARRIAGE# DIVORCE# AMERICA# PADMA DESAI# ECONOMIST# COLUMBIA# BOMBAY UNIVERSITY# CAMBRIDGE UNIVERSITY #TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #बंधमुक्त होताना# अनुवादित आत्मकथन# सुनंदा अमरापूरकर#गुजराती कुटंब# पद्मा देसाई# सुरतेत जन्म# कुशाग्र बुद्धी# सविता# हंसा : बहिणी# दिनकर : भाऊ# विधवा काकी# मॅट्रिकमध्ये दुसरी# शिक्षणासाठी मुंबई# ‘आरबी’शी ओळख# शारीरिक फसवणूक# अमेरिकेची पेÂलोशिप# दिल्ली स्वूÂल ऑफ इकॉनॉमिक्स# हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी# घटस्फोट# खिचन धर्म# रशियाचा दौरा# अर्थव्यवस्थेचा अभ्यास# जगदीशशी लग्न# अनुराधाचा जन्म# अमेरिकेत स्थायिक... # "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 21-03-2021

    स्त्रीमुक्तीची गाथा... स्वत:च्या निराळेपणाची, ‘स्व’त्वाची प्रखर जाणीव अभिव्यक्त करणे ही विद्यमानकालीन समाज आणि संस्कृतीमधील महत्त्वाची जीवनकेंद्रीय संकल्पना आहे. ‘स्व’त्व-जाणीव’ ही दुहेरी असते. स्वत:चे स्वेतरांशी असणारे सारखेपण आणि इतरांकडून असणारे ेगळेपण जाणवते तेव्हा विकसनशील स्त्री बंधमुक्त होऊ पाहते. वस्तुत: मनुव्यवस्थाशरण समाजात कोणत्याही स्त्रीला ‘स्व’त्वाची जाणीव फारशी नसते. जी असते ती पुरुष संस्कृतीला शरण जाण्यासाठी. स्त्रियांच्या जीवन-जाणिवांमधील वेगळेपण शोधणे म्हणजे त्यांच्या ‘स्व’त्वाचा (स्त्रीत्वाचा नव्हे) शोध घेणे होय. ‘पद्मा देसाई’ यांच्या ‘बंधमुक्त होताना’ या स्वकथनाच्या यादृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. त्यांच्या ‘ब्रेकिंग आऊट’ या इंग्रजी स्वकथनाचा उत्तम अनुवाद मान्यवर अभ्यासक सुनंदा अमरापूरकर यांनी मराठीत केला आहे. पुरुषसत्ताक घटितातून स्त्रीला सहजपणे बंधमुक्त होता येत नाही. त्यात यश मिळतेच असे नाही, परंतु मनसामर्थ्याच्या जोरावर किमान बंधमुक्तीची जाणीव तरी स्त्रीला जोपासावी लागते. पद्मा देसाई यांच्या स्वकथनात विशिष्ट विषय, समस्या, बंध यांचे तपशील येतात. इतकेच नव्हे, तर पारंपरिक हतबल स्त्री आणि बंधमुक्तीचा संघर्ष करणारी स्त्री यांच्या दृष्टिकोनातील मूलभूत फरक या स्वकथनाच्या तळाशी आहे. यात कालिक प्रभाव या घटकाला महत्त्व आहे म्हणून हे लेखन कथा, गोष्ट, कहाणी ठरत नाही. तर ते ‘स्त्रीवादी’ जाणिवेचे दर्शन आहे. ‘एक विचार’ आहे. स्त्री ही समाजात पुरुषांच्या आक्रमक सत्तेशी अनेक प्रकारच्या नात्यांनी अडकलेली आहे. तिची ‘मानुषता’ दग्ध केली गेली आहे. हे जीवशास्त्रीय नसून संस्कृतीनिर्मित आहे. नैसर्गिक शारीरिक रचनेतील भेदामुळे स्त्रीला दुय्यम स्थानी ठेवले गेले आहे. या स्वकथनाच्या रूपाने समाजातील सांस्कृतिक घटकांचा अन्वयार्थ स्पष्ट होतो. ‘माणूस’ म्हणून स्त्रीला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवू पाहणाऱ्या कुटुंबाचेही येथे विश्लेषण आहे. सुरत प्रांतातील एका पारंपरिक गुजराती ब्राह्मण कुटुंबात १९३० तीसच्या आसपास पद्मा देसाईचा जन्म आहे. सुरक्षित - कर्मठ वातावरणात या वाढल्या तरी शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर त्यांना विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. मुंबई विद्यापीठात शिकत असताना त्या एका परिचित तरुणाच्या मोहजालात पूर्णपणे फसतात. देसाई यांना परिचिताशी परिस्थितीवश लग्नही करावे लागते. पण पुढे हे वैवाहिक जीवन दु:खाची ‘काहिली’ बनते. त्यांना संबंधातून गुप्तरोग होतो. स्त्री म्हणून तिचे स्वत्व मारले जाते. याविषयी लग्नबंधनातून सुटण्यासाठी पद्मा देसाई खिश्चन धर्मही स्वीकारतात. तथापि इच्छास्वातंत्र्य असूनही त्यांना ‘घटस्फोट’ मिळत नाही. दरम्यान, त्यांना अमेरिकन शिष्यवृत्ती मिळते. हा अंधारातील एक प्रकाश किरणच. जागृत मनाच्या शिक्षणामुळे त्यांना आपल्या स्वत्वाची-सत्त्वाची जाणीव होते. लेखिकेवर तिचे वडील, आई आणि काकी यांचा आयुष्यभर प्रभाव होता. हे जाणवते. विसाव्या शतकात हिंदुस्थानसारख्या देशात स्त्री म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी काही निर्णय घेणे तेवढे सोपे नव्हते. परंतु समाजाला, परंपरांना न जुमानता लेखिकेने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. याच वाटेने जाताना त्यांना एक समंजस अर्थतज्ज्ञ व्यक्त भेटते. दोघे विवाहबद्ध होतात. याबरोबरच हार्वर्ड आणि कोलंबियासारख्या विद्यापीठातून पद्मा देसाई यांना नावलौकिक प्राप्त होतो. अमेरिकेत वास्तव्य केल्यामुळे तेथील जीवनशैली, संस्कृती-समाजाशी एकरूप होतात. तरीही विशेष म्हणजे न विसरता येणारे हिंदुस्थानीत्व. परंपरांच्या बंधनातून मुक्त होऊन स्वत:ला सिद्ध करणाऱ्या या विदुषीचे आत्मचरित्र प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायक ठरेल. – शशिकांत लोखंडे ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 25-08-2018

    विस्तारलेल्या जाणिवांचे कथन... अनेक शतकं कौटुंबिक-सामाजिक दडपणाखाली वावरणाऱ्या भारतीय स्त्रिया साधारणपणे एकोणिसाव्या शतकापासून लिहित्या झाल्या आणि कविता-कथांच्या बरोबरीनं आपल्या आयुष्याचा ताळेबंद जगासमोर मांडण्याइतक्या धीटही झाल्या. स्त्रियांच्या आतमकथनांचा हा प्रवाह गेलं दीडेक शतक भारतीय साहित्यात आपलं स्वतंत्र आणि ठळक अस्तित्व राखत आला आहे आणि स्त्रीलिखित साहित्याची धारा अतिशय बळकट आणि समृद्धही करत आला आहे. याचं कारण ही आत्मकथनं म्हणजे दबलेपण दूर सारणाऱ्या स्त्रियांची एकसुरी अभिव्यक्ती नाही. स्वत:ला ठामपणे व्यक्त करणाऱ्या या प्रत्येकीचं जगणं वेगळं, जगण्याला सामोरं जाण्याची ताकद वेगळी, अनुभव वेगळे, जीवनधारणा वेगळ्या आणि स्वत:ला शोधण्यासाठी प्रत्येकीनं निवडलेली वाटही वेगळी. कुणी पारंपरिक भारतीय चौकटीत राहून आपलं अवकाश शोधू पाहिलं आहे, कुणी व्यवस्थेला थेट आव्हान दिलं आहे, तर कुणी आपल्या प्रखर बुद्धीची, कलागुणांची हाक ऐकत प्रवास करताना स्वत:ला सामाजिक चौकटीपासून पुष्कळ उंच नेलं आहे. ‘बंधमुक्त होताना’ हा पद्मा देसाई यांच्या ‘ब्रेकिंग आउट’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद हे याच प्रकारचं लेखन असलं, तरी ते फक्त ‘स्त्रियांचं आणखी एक आत्मकथन’ नाही. जागतिक स्तरावर नावाजलेल्या अर्थतज्ज्ञ आणि पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या या विदुषीच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्षाचा / यशापयशाचा आलेख म्हणून केवळ या लेखनाकडे पाहता येणार नाही. या संपूर्ण लेखनात एखाद्या कादंबरीसारखी नाट्यमयता असली तरी पद्मा देसाई यांनी अतिशय कसून आणि धीटपणे घेतलेला हा आत्मशोधही आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या एखाद्या स्त्रीने निर्भीडपणे केलेलं हे आत्मपरिक्षण स्वातंत्र्य, परंपरा, कौटुंबिक संस्कार अशा अनेक मूल्यांचीही व्यक्तिगत संदर्भात सखोल चिकित्सा करणारं आहे. पारंपरिक गुजराथी कुटुंबातला पद्मा देसाई यांचा १९३१चा जन्म. मुळातच बुद्धिमान असलेल्या पद्माला पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळते आणि कडक बंधनं असलेल्या घरातून ती प्रथमच स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी मुंबईमध्ये होस्टेलवर राहू लागते. मात्र या स्वातंत्र्याचं आयुष्यभर त्रस्त करणारं मोल तिला चुकवावं लागतं. बरोबर शिकणाऱ्या एका तरुणाच्या मोहजालात अडकून त्याच्याशी लग्न करणं तिला भाग पडतं. या लग्नाने दिलेल्या शारीरिक, मानसिक, भावनिक वेदना पद्मा देसार्इंना पुढची अनेक वर्षं छळत राहिल्या. पुढे जगदीश भगवती यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित, समजूतदार जोडीदारासोबत अमेरिकेत त्यांचं सहजीवन सुरू झालं. हार्वर्ड, कोलंबियासारख्या नामांकित विद्यापीठातून शैक्षणिक मान्यता आणि लौकिकही मिळाला आणि वयाच्या चाळिशीत कन्यारत्नाची प्राप्ती झाली. हा सगळा जीवनप्रवास ‘बंधमुक्त होताना’मध्ये पद्मा देसाई यांनी रेखाटला आहे. मात्र हा प्रवास एकरेषीय नाही. वडील, आई, काकी या लहानपणी जीवनात आलेल्या तीन मोठ्या माणसापासून पती जगदीश आणि मुलगी अनुराधा या पाच व्यक्तींविषयीच्या पाच प्रकरणातून पद्मा देसाई यांचं कौटुंबिक आयुष्य समोर येतं. ज्या फसवणुकीमुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर खोल परिणाम घडवला त्या फसवणुकीला आपण कसे बळी पडलो, तरुण वयातल्या भावनांना आवरू न शकल्यामुळे एका चुकीच्या माणसाच्या जाळ्यात आपण कसे अडकलो, आपण त्याच्यावर प्रेम करतो आहोत, भविष्यात आपल्या आयुष्यात हाच पुरुष राहणार आहे, असा विचार करत अपराधीपणाच्या भावनेपासून स्वत:ला दूर ठेवायचा कसा प्रयत्न करत राहिलो अणि गुप्तरोगासारख्या भयानक आजाराला एकटीने तोंड देताना झालेल्या शारीरिक-मानसिक यातनांतूनही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याकरिता कसा प्रयत्न करत राहिलो या सगळ्याची स्पष्ट आणि थेट मांडणी पद्मा देसाई यांनी केली आहे. मुळातली विलक्षण बुद्धिमत्ता आणि आईकडून मिळालेली जबरदस्त महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर विद्येच्या प्रांतात मिळालेलं यश आणि आधी जगदीश भगवती यांची सोबत मिळाल्यामुळे आणि नंतर मुलगी झाल्यामुळे आयुष्यात आलेला आनंद यांचं विवेचनही या आत्मकथनात आहे. विसाव्या शतकाच्या मध्यात कुटुंब, समाज, लग्नसंबंध अशी सगळी बंधनं तोडून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या आणि तिथल्या भूमीत सापडलेला स्वातंत्र्याचा कंद जपणाऱ्या पद्मा देसाई यांच्या व्यक्तिगत संघर्षाची, अनेक अडथळे पार करून मिळालेल्या त्यांच्या शैक्षणिक-व्यावसायिक यशाची ही कहाणी नुसती वाचनीय नाही, ती विचार करायला लावणारी आहे. पारंपरिक भारतीय कुटुंबातल्या चालीरीती, विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा बदलत गेलेला दृष्टिकोन, कौटुंबिक नातेसंबंध, आई होण्याची जबरदस्त आकांक्षा आणि अमेरिकेत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठीची धडपड, तिथे राहून भारतीय जीवनधारणांकडे, आपल्या आई-वडिलांकडे पाहण्याच्या दृष्टीत झालेला बदल, अमेरिकन जीवनशैलीशी, तिथल्या संस्कृतीशी जुळलेले नातं आणि तरीही भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टींची वाटणारी अथार्थता वाचताना एका भारतीय स्त्रीचा सीमोल्लंघनाचा प्रवास तर उलगडत जातोच, पण तिच्या विस्तारत गेलेल्या जाणिवांचा प्रवासही समोर येतो. स्वत:ला कठोरपणे तपासून पाहणारं हे आत्मकथन भारतीय स्त्रियांच्या आत्मचरित्रांमध्ये वेगळं उठून दिसणारं आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद केला आहे. – वर्षा गजेंद्रगडकर ...Read more

  • Rating Starसकाळ, ३ मे, २०१८

    रशियन अर्थकरण, जागतिक आर्थिक समस्या आदी विषयांतल्या तज्ज्ञ पद्मा देसाई यांचं हे आत्मचरित्रं. पारंपारिक गुजराती कुटुंबात जन्मलेल्या पद्मातार्इंचं आयुष्यच विलक्षण. एका तरुणाच्या मोहजालात फसल्यानं लग्न झालं, नंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी खिस्ती धर्म त्ांनी स्वीकारला. अशातच त्यांना अमेरिकेतली शिष्यवृत्ती मिळाली. या वाटेवर त्यांना एक अर्थतज्ज्ञ भेटले. त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि पुढं हार्वर्ड, कोलंबियासारख्या विद्यापीठांत त्यांनी लौकिक मिळवला. या सगळ्या आयुष्यावर त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे. बे्रविंâग आउट या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more