* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665635
  • Edition : 12
  • Publishing Year : SEPTEMBER 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 436
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Sub Category : THEATRE, ACTOR, CINEMA
  • Available in Combos :KANCHAN GHANEKAR COMBO SET - 2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`NATH HAA MAZHA` IS ONE OF THE VERY FEW, THOROUGHLY ENGAGING BIOGRAPHIES THAT ALSO QUALIFIES AS A MEMOIR. A TRANSPARENT ACCOUNT OF A FANTASTIC DENTIST-TURNED-ACTOR DR.KASHINATH GHANEKAR, LOVINGLY PENNED BY HIS WIFE KANCHAN GHANEKAR NEE` CHAVAN. DAUGHTER OF SULOCHANA, THE GRAND DAME OF MARATHI CINEMA, KANCHAN WAS A MERE GIRL OF 15 WHEN SHE FELL HEAD-OVER-HEELS IN LOVE WITH DR. GHANEKAR, WHO WAS THEN IN HIS 30S. A MESMERISING NARRATION OF THE JOYS AND PAINS OF UNCONVENTIONAL LOVE, THE BOOK IS NOT JUST A SOLILOQUY OF WHAT TRANSPIRED IN KANCHAN AND GHANEKAR`S LOVE LIFE IN THOSE TWO DECADES. KANCHAN HAS STAYED TRUE TO A BIOGRAPHER`S RESPONSIBILITY BY ALSO LAYING OUT THE CAREER TRAJECTORY OF HER LOVER-TURNED-HUSBAND WHO REMAINED A SUPERSTAR OF MARATHI THEATRE AND CINEMA TILL HIS LAST BREATH. IT GIVES A RIVETING GLIMPSE INTO WHAT MADE THIS ACTOR EXTRAORDINAIRE CUM ENFANT TERRIBLE OF THE MARATHI THEATRE SPHERE, SUCH AN IRRESISTIBLE PERSONA. THIS MESMERISING STORY OF KACHAN GHANEKAR HAS ALSO BEEN ADOPTED AS A MAJOR FILM IN MARATHI TITLED AS ‘ANI DR.KASHINATH GHANEKAR’WHICH WAS A BLOCKBUSTER OF 2018. PROMINENT ACTOR SUBODH BHAVE PORTRAIT DR.KASHINATH GHANEKAR IN THE FILM.
नाथ हा माझा हे व्यक्तिचरित्राच्या धाटणीत लिहिलं गेलेलं विलक्षण आत्मकथन आहे. एका डॉक्टरचं वैद्यकीय पेशाला बगल देत सिनेमाच्या रूपेरी पडद्याला आपलंसं करणं आणि त्यासाठीचा त्याचा संघर्ष यांचं पारदर्शी चित्रण कांचन घाणेकर यांनी मांडलं आहे. तीस वर्षीय डॉ.काशिनाथ घाणेकर आणि त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेली पंधरा वर्षीय कांचन यांची ही प्रीतीगाथा आहे. कांचन आणि डॉ. घाणेकर यांच्यात दोन दशकं फुललेल्या प्रेमाच्या अंकुराची ही गोष्ट बहुआयामी स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि तथाकथित चौकटीबाहेरच्या नात्यांबाबतची सामाजिक मानसिकता यावरही प्रकाश टाकते.एका नायकाच्या जडणघडणीचा काळ ते उतरणीचा काळ, त्यातली घालमेल, तडफड यांचं हृदयस्पर्शी चित्रण यात अनुभवायला मिळतं. डॉ. घाणेकर यांचं हे चरित्र मराठी सिनेसृष्टीलाही प्रेरणादायी ठरलं. या पुस्तकावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून 2018 सालचा हा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BOOKONKASHINATHGHANEKAR #KANCHANGHANEKAR#SULOCHANADIDI #PRABHAKAR PANSHIKAR #BHALJI PENDHARKAR#VAIRKAR#VASANT KANETKAR #RAYGADALA JENVHA JAG YETE #ASHRUNCHI ZALI FULE #HA KHEL SAVALYANCHA #MARATHA TITUKA MELAVAVA#GARAMBICHA BAPU #MADHUCHANDRA#ANANDI GOPAL #SRIRAM LAGOO#ANI DR KASHINATH GHANEKAR# #काशिनाथघाणेकर #कांचन घाणेकर#सुलोचना दीदी#प्रभाकर पणशीकर#भालजी पेंढारकर #वाईरकर#वसंत कानेटकर#रायगडाला जेव्हा जाग येते#अश्रूंची झाली फुले#हा खेळ सावल्यांचा#मराठा तितुका मेळवावा#गारंबीचा बापू #मधुचंद्र#आनंदी गोपाळ#श्रीराम लागू#आणि डॉ काशिनाथ घाणेकर#
Customer Reviews
  • Rating StarPurva प्रभू

    It is a very engaging biographie of the legendary Actor Dr. Kashinath Ghanekar. It is written in a very simple language. The marathi movie "Ani Dr. Kashinath Ghanekar"(played by Subodh Bhave) was fantastic. This book has some interesting stories, facs, letters, situations, etc. Opens up about Aai, Baba n Dr. Mentions Dr`s theatre work, films, Dr`s colorful personality (which I have many doubts), about Irawati, having love interest for Dr, childhood, love for each other, various ups, downs, happy, emotional, bad, worst, good situations, a very good human being, Mauritius n Europe tour, tough decisions (marriage proposal), Dr Lagu, `Daru`, धोंडीराम, arrangements for the wedding, after marriage challenges faced, रेश्मा, n Dr`s bad news with the last letter. I feel that the author has provided too many insight stories n letters which were not required. लहान मूल सारख - was too much (I think). ...Read more

  • Rating StarPrakash Chavan

    नाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.

  • Rating StarARTI ATRE KULKARNI

    हे पुस्तक वाचायचे अनेक दिवस मनात होते, मुख्य करून `आणि काशिनाथ घाणेकर` पहिल्यापासून जास्तच. ह्या पुस्तकाचे अनेक जणांनी लिहिलेले परीक्षण वाचले असल्याने उत्सुकता होती. पहिले म्हणजे हे आत्मचरित्र नसून काशिनाथ घाणेकर जीवनात आल्यापासूनच ते त्यांच्या निधापार्यंतचा कांचन ह्यांचा प्रवास आहे. ह्यामध्ये ना त्याआधीचा काळ रंगविलेला आहे ना त्या नंतरचा. हे वाचताना कळते कि कांचन ह्या लेखिका म्हणून लेख लिहीत असत, साहजिकच पुस्तकाची भाषा ओघवती असून प्रसंग एकमेकास जोडलेले आहेत. कांचन ह्यांच्या आई ह्याच क्षेत्रामध्ये असल्याने त्यांचे कुटुंब, आजूबाजूची माणसे हि चित्रपट क्षेत्राशी निगडित आहेत. ह्या पुस्तकामध्ये अनेक त्या काळातील लोकप्रिय माणसांचा उल्लेख होतो, काही घटना सांगताना त्यांच्या स्वभावाचाही अंदाज येतो. हे दडपण लक्षात घेऊन काही प्रसंग उत्तम लिहिलेले आहेत. हे पुस्तक लिहिताना असे जाणवते कि काशिनाथ ह्यांच्या लहरी स्वभावामुळे खरे काशिनाथ वाचकांना नीट समजावे म्हणून लेखिकेने हे लिहिलेले असावे. आज काशिनाथ घाणेकर हे त्यांनी काम केलेल्या चित्रपटामधून लक्षात राहिलेले आहेत. त्यांची नाटके पाहणारे आता वयस्कर किंवा दिवंगत आहेत. पण कांचन ह्यांनी हे पुस्तक लिहिल्यामुळे (आणि त्यांच्यावरील चित्रपटामुळे) आपल्याला `लोकप्रिय` असल्याचा खरा अर्थ समजतो. परंतु ह्या लोकप्रियतेसोबत येणार गर्व, उन्मादता हे सहज पचवता आणि सांभाळता येत नाही, हे नक्कीच! शाळकरी कांचन स्वतःपेक्षा १५ वर्षे जास्त असलेल्या आणि लग्न झालेल्या माणसावर प्रेम करते. सारे काही माहिती असूनही अगदी हा विवाह होणार नाही हे देखील माहिती असताना केलेले एकतर्फी प्रेम हि ह्या पुस्तकाची सुरवात आहे. डॉक्टरांची पहिली पत्नी इरावती ही शिकलेली, देखणी होती. त्यांचा संसार तसा ठीक चालला होता. हा देखील प्रेमविवाहच होता. जर काशिनाथ ह्यांना ह्या विवाहापासून अपत्यप्राप्ती झाली असती (अनेक गर्भपात झाल्याचा उल्लेख आहे.) तर हे चित्र दिसले नसते, असे वाटत राहते. काशिनाथ ह्याचे बायकोवर विसंबून राहणे आणि त्याचवेळी कांचनशी विवाह करण्याची अभिलाषा मनात ठेवणे, हे दोन दगडावर पाय असल्यासारखे वाटते. डॉक्टर अत्यंत शीघ्रकोपी, आत्मकेंद्रित, प्रसिध्दी लोलूप आणि व्यसनी होते असं वर्णन पुस्तकामध्ये केलेले आहे. शिवाय त्यांची असंख्य प्रेम प्रकरणंही होती. हे सारे डॉक्टर मोकळेपणाने सांगत असे. कदाचित हे लिहिले नसते तर आज वाचणाऱ्या वाचकांना हे समजलेही नसते. पुस्तकामध्ये डॉक्टरांना लिहिलेली आणि इतरही काही पत्रे आहेत. कदाचित कांचन ह्यांना ती इथे अशी संपूर्ण पत्रे देण्यामध्ये काही खास हेतू असावा पण ती व्यक्तिगत असल्याने सर्व/काही पत्रे नसती दिली तरीही चालली असती. कांचन आणि काशिनाथ यांचं प्रेम, त्या प्रेमात उभे राहिलेले अडथळे, झालेला विरोध, सहन करावा लागलेला मनस्ताप आणि कांचनची भावनिक फरफट यांचं तपशीलवार चित्रण म्हणजे हे पुस्तक आहे. आई जरी चित्रपटाच्या कामासाठी घराच्या बाहेर असली तरी घराकडे तिचे लक्ष होते. असे असतानाही कांचन आणि काशिनाथ ह्यांचे प्रेम कोणाच्याच लक्षात आले नाही. जेव्हा हे सर्वाना समजले तेव्हा त्यांनी विरोध केला. अनैतिक आणि बेकायदेशीर नात्यात कांचनला अडकू दिले नाही. इरावती ह्यांनी घटस्फोट दिला तेव्हा रीतसर विवाह करून मगच पत्नी होण्यास त्यांनी संमती दिली. १२-१५ वर्षे घुसमट, फरफट सोसावी लागल्याने जेव्हा हा विवाह झाला तेव्हा अति आवड असूनही (वय जास्त झाल्याने) त्यांनी मूल न होण्याचा निर्णय घेतला. कांचन डॉक्टरांची अधिकृत, कायदेशीर पत्नी झाली तरीही १० दिवसांत त्यांच्या अतिरेकी वागण्याला कंटाळून आईकडे परत आली आणि पुढे डॉक्टरपण तिथेच रहायला आले. संसार व्हायचा होता तो असा झाला. अश्याप्रकारे आईच्या छत्राखाली संसार थाटणे आणि डॉक्टरांचे अतिरेकी वागणं झेलणे, जे इरावतीबाईंनी इतकी वर्षे झेललं हे अपयशच आहे, असे वाटते. हे पुस्तक वाचताना आपण कांचन ह्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावून पहात आहोत आणि पुस्तक संपल्यावर आता कांचन `डॉक्टरांची विधवा` म्हणून जगणार, इतकेच वाटत राहते. पुस्तक येथेच संपते, डॉक्टरांच्या निधनाने. डॉक्टर पुन्हा यशस्वी झाले असते तर , डॉक्टर अजून जास्त जगले असते तर, हा विवाह लौकर झाला असता आणि त्यांना अपत्य झाले असते तर ...अशी अनेक जर-तर मनात डोकावत असले तरी पुस्तक वाचून हा विवाह यशस्वी झाला असता असे वाटत नाही. काही पुस्तके अशी असतात कि एकदा वाचविशी वाटतात पण वाचली कि पुन्हा वाचावे असे कधी वाटत नाही, त्यापैकीच हे एक पुस्तक! ...Read more

  • Rating StarKadambari Mate

    ##### नाथ हा माझा ##### कांचन घाणेकर .. जणूकाही मूर्तिमंत प्रेम .... इतके निस्वार्थी प्रेम करणे आणि प्रेमाची इतकी वाट पाहणे हे फक्त कांचन घाणेकरच करू शकतात . पुर्वाश्रमीच्या कांचन चव्हाण .. सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचनादिदि लाटकर चवहाण यांची एकुलती एक कन्या… त्या दहा वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांच निधन झाल्यामुळे मुंबईत आजी व आठ मामेभावंडांसोबत राहात होत्या .. पंधराव्या वर्षी डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या प्रेमात पडलेल्या कांचनबाईंचं लग्न छत्तिसाव्या वर्षी .. त्यावेळी डॉक्टरांचं वय एकावन्न …, काशिनाथ घाणेकर यांचा मृत्यू - वाक्ये कळत नाहित असा प्रेक्षकांनी गिल्ला करताच ब्रॉन्कायटिस व सिगारेट यांनि जर्जर झालेली फुफ्फुसे व हृदय ताण सोसु शकणार नाहित हे माहित असुनही प्रेक्षकांसाठी न पेलवणारा टिपेचा सुर लावतात .. ….प्रयोगानंतर दुसऱ्यादिवशी नागपुरला जाण्यासाठी तयार होत असतानाच ………. एखाद्या नटसम्राटाप्रमाणे जगाच्या रंगभुमीवरुन एक्झीट घेतात ….पोस्टमार्टमचा रिपोर्ट येतो … लंग्ज कंजेस्टेड .. कांचनबाईंचा व त्यांचा तिन वर्षाचा संसार इथे संपतो.. पुढील ओळी खरोखरच कांचन घाणेकरांसाठीच आहेत असे वाटते. उम्रे दराजसे माँग के लाए थे चार दिन । दो आरजु मे कट गये , दो इंतजार में। ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more