* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR.. UMA KULKARNI DURING THE LAST FOUR DECADES, HAS PUBLISHED MORE THAN 55 TRANSLATED TITLES, COVERING A FEW THOUSAND PAGES. THESE TITLES PERTAIN TO SHORT STORIES, NOVELS, DRAMA, CRITICISM, ETC. ALLMOST ALL MAJOR AUTHORS IN KANNADA LITERATURE HAVE BEEN COVERED.. SHE IS ONE OF THE LEADING PERSONS TRANSLATING CREATIVELY THE LITERARY WORKS FROM KANNADA INTO MARATHI. SHE IS THE AUTHOR OF THE WIDELY READ NOVEL ‘KETKAR VAHINI’, BASED ON REAL LIFE STORY. SHE HAS WRITTEN MANY ARTICLES ON VARIOUS SUBJECTS IN DAILIES, MAGAZINES AND DIVALI SPECIAL SSUES AS WELL. SHE IS THE FIRST CENTRAL SAHITY AKEDEMI TRANSLATION AWARD-WINNER INCLUDING MANY MAJOR AWARDS TOTALING TWENTYSIX. “SAMVADU-ANUVADU” (“COMMUNICATION-TRANSLATION”) IS HER AUTOBIOGRAPHY, MAINLY COVERING HER PERSONAL LIFE AS WELL AS HER VARIED WIDE EXPERIENCES IN THE FIELD OF TRANSLATION. . THIS WORK STARTS WITH HER CHILDHOOD, HER PARENTS, BROTHERS AND SISTER, HER EDUCATION, AND THE SURROUNDING ATMOSPHERE IN BELAGAV TOWN THEN. SHE MARRIED VIRUPAX IN 1970 AND HER NEW LIFE STARTED AT PUNE, A PROGRESSIVE AND CULTURALLY RICH CITY. SHE CONTINUED HER EDUCATION AFTER THE LAPSE OF ABOUT ELEVAN YEARS AFTER HER MARRIAGE AND GOT MASTER’S DEGREE IN ARTS AND PAINTING SUBJECT AND DOCTOR OF LITERATURE DEGREE IN 1992, FOR THE RESEARCH ON DRAVIDIAN TEMPLE ARCHITECTURE AND ITS AESTHETICS. SHE IS A PROFESSIONAL ABSTRACT PAINTER AS WELL. UMA STARTED HER TRANSLATION CAREER SIMULTANEOUSLY IN 1981, WITH THE HELP OF HER HUSBAND, SINCE SHE DID NOT KNOW KANNADA PROPERLY. DURING BOTH OF HER CAREERS UMA WAS EXPOSED TO VARIETY OF KANNADA LITERARY WORKS, DIGNITARIES IN BOTH THE FIELDS. SHE HAD TRAVELED EXTENSIVELY FOR HER RESEARCH FIELD-WORK. SHE NARRATES INTENTLY HER HEART-TOUCHING EXPERIENCES, SIMULTANEOUSLY SHE COMMENTS ON THE LIGHTER SIDE OF HER LIFE AND MAKES THE READERS SMILE. HER RICH CONTEMPLATION OF VARIOUS SUBJECTS IS EXPRESSED VIVIDLY IN THIS AUTOBIOGRAPHY. THIS AUTOGRAPHY HAS NO COMPLAINING TONE. IT CONTAINS NO HURT-FEELINGS AND NO MURMURS. THERE IS NO SELF-JUSTIFICATION ANYWHERE. THE AUTOBIOGRAPHY DOES NOT REST AT HER LIFE-EXPERIENCES ALONE. BUT IT PERSUADES THE READERS TO INTROSPECT. IT THROWS A FRESH LIGHT ON THE HUMAN RELATIONSHIPS, THIS BOOK WITH ITS RICH VIEW-POINT OF LIFE ENRICHES ITS READERS AS WELL.
अनुवादाच्या क्षेत्रात उमातार्इंचा अनुभव खूपच दांडगा आहे. लग्नापर्यंतचा काळ बेळगावात गेल्याने कन्नड भाषा कळत होती, मात्र ती त्यांची बोली भाषा नव्हती. पती विरुपाक्ष मात्र कन्नड बोलणारेच होते. त्यांच्या नोकरीमुळे लग्नानंतर पुण्याच्या वास्तव्यात मित्र परिवारात सकाळ -संध्याकाळ फिरणे, बाहेर जेवणखाण आणि आपसात भरपूर गप्पा, हाच उद्योग होता. या वेळी एकमेकांच्या साहित्यप्रेमाची ओळख पटली. त्याच वेळी कन्नड साहित्यातील शिवराम कारंतांच्या कादंबरीला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यापेक्षा कन्नड भाषेत निराळे काय आहे, याविषयी त्यांना औत्सुक्य होते. विरुपाक्षांनी कारंतांची ही कादंबरी वाचण्यासाठी मागवून घेतली, व त्यातील आशय जमेल तसा उमातार्इंना ते सांगू लागले. सहजच उमाताई त्याचं भाषांकन मराठीत कागदावर उतरवू लागल्या आणि हाच त्यांच्याकडून घडलेला पहिला अनुवाद. लहानपणच्या बेळगावातील वास्तव्याविषयी, तसेच नातेसंबंध, सामाजिक घडामोडी, याविषयीच्या अनुभवाविषयीचे कथन येते. आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाचा समृद्ध करणारा अनुभवही कधी मिस्कीलतेने, कधी गंभीर भाष्य करून त्या सांगतात. आयुष्यात त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांच्या सवयी, स्वभाव बारकाईने सांगून त्यांची आपल्याशीही सहज भेट घडवतात. यात साहित्यिक लेखन, खाद्य पदार्थांची देवाणघेवाण, त्यांचा चित्रकलेचा छंद, नवीन गोष्ट शिकणे या सगळ्याची ओळख होते. नेहमीच्याच ओघवत्या शैलीतील हे वर्णन कन्नड संस्कृतीशी जोडून घेणारे, वाचकांना पुस्तकाशी गट्टी करायला लावणारे आहे. लेखिकेने आयुष्याच्या पूर्वार्धातील बेळगावातील वास्तव्याविषयी, नातेसंबंधांविषयी, सामाजिक घडामोडींविषयीचे कथन; तसेच, आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाच्या समृद्ध करणाऱ्या अनुभवाविषयी केलेले मिस्कील, तर कधी गंभीरही भाष्य.
1) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सर्वोत्कृष्ट आत्मकथानाचा पुरस्कार मिळाला आहे. * म.सा.प.,मंगळवेढा- सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार २०१७ . * अ.भा.म.सा.प., बडोदा - उत्कृष्ट आत्मकथन २०१७. * अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा तर्फे कै. भास्करराव ग. माने अक्षरगौरव साहित्य पुरस्कार २०१७ * साहित्यप्रेमी भगिनी मंडळ , पुणे तर्फे उत्कृष्ट आत्मकथन पुरस्कार २०१७.

No Records Found
No Records Found
Keywords
#KANNADAMARATHITRANSLATOR# #KANNADAMARATHITRANSLATOR #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starराजश्री गायकवाड साळगे

    डाॅ. उमा कुलकर्णी यांची अनेक अनुवादित पुस्तके वाचल्यानंतर त्यांचे `संवादु अनुवादु` हे आत्मकथन वाचण्याची तीव्र इच्छा होती. पुस्तक हातात पडले नि मुखपृष्ठावरील लेखिकेच्या निरागस चेहऱ्याप्रमाणेच त्यांच्या मनाची निरागसता पुस्तकभर जाणवत राहिली. अतिशय समर्प शीर्षक असलेल्या या आत्मकथनात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे लेखिकेला असलेली साहित्याविषयीची उपजत जाण व प्रेम . म्हणूनच कदाचित त्यांचे जीवन साहित्यमय होऊन गेले असावे. `संवादु अनुवादु` या आत्मकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची संयतशैली. दुसऱ्याला सहज मोठेपण देणाऱ्या या अनुवादिकेला मूळ लेखकांइतकीच लोकप्रियता लाभली. जवळपास पंचावन्नपेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद करून सलग साडेतीन दशके त्या सर्जनशील अशा अनुवाद क्षेत्रात रमल्या. बेळगावातील परंपरावादी घरात उमा कुलकर्णी यांचे बालपण गेले. बालपणापासूनच कला, संगीत व वाचनाची त्यांना मनस्वी आवड. लग्नानंतर पती विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या नोकरीनिमित्त त्यांच्यासोबत त्या पुण्यात आल्या. पुण्याच्या शहरी वातावरणात त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. रोज संध्याकाळी फिरायला जाण्याच्या नेमातून झालेल्या गप्पांमधून त्यांना एकमेकांच्या साहित्यप्रेमाची कुणकुण लागली. विरूपाक्ष यांना कन्नड साहित्य वाचण्याची विशेष आवड. कोणतेही पुस्तक वाचले की त्यातील कथानक पत्नीला रंगवून सांगणे हा त्यांचा शिरस्ता. उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद लेखनाची सुरुवातही काहीशी गंमतीशीरच झाली. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डाॅ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीविषयी विरूपाक्ष सांगत असताना उमा यांनी त्यांना कादंबरी वाचून दाखवायचा आग्रह धरला व स्वतःला समजावी यासाठी त्या ती मराठीत लिहू लागल्या. अशाप्रकारे त्यांचा पहिला अनुवाद लिहून झाला! स्वतःला समजावे यासाठी कन्नड कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद, त्यानंतर ती कादंबरी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला अनुवाद व पुढे जीवनाचा अविभाज्य व अपरिहार्य भाग म्हणून केलेला अनुवाद, असा त्यांचा अनुवादलेखनाचा विलक्षण असा प्रवास! विरूपाक्ष कुलकर्णी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचे कन्नडमध्ये तर उमा कुलकर्णी कन्नडमधील साहित्य मराठीत अनुवादित करीत असत. दोघेही अनुवादाच्या दुनियेत इतके रममाण झाले की साहित्य व अनुवाद हा त्यांच्या सहजीवनाचा जणू साथीदार झाला. अनुवादलेखन करत असताना पत्नीच्या नावाने कन्नड लेखकांशी पत्रव्यवहार करणे, त्यांना कानडी भाषा येत नसल्यामुळे रोज पुस्तकाची काही पाने वाचून दाखवणे, ते रेकॉर्ड करून ठेवणे, एखादवेळी एखादा कन्नड शब्द अडला तर तो शब्दकोशात बघून त्याचा अर्थ शोधून ठेवणे या गोष्टी विरूपाक्ष आवडीने करीत. जीवनाच्या जोडीदाराच्या वयाचे मोठेपण मान्य केल्यावर त्यांनीही वयाने लहान असलेल्या आपल्या पत्नीचे लाड पुरवणे (दोघांमध्ये दहा- साडेदहा वर्षांचे अंतर) हे त्यांच्या समंजस सहजीवनाचे गुपित. संध्याकाळी नित्यनियमाने फिरायला जाणे, साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे व समाजकारण, राजकारण यांसारख्या विषयांवर मोकळेपणानेे गप्पा मारणे यातून त्यांच्यातील वैचारिक वीण घट्ट होत गेली. कधी कधी या गप्पांमधूनच लेखकाच्या वाक्यांमधला दडलेला अर्थही त्यांना उमगत गेला. दिवसातील जास्तीत जास्त वेळ लिखाणात घालवणे हा या लेखक दाम्पत्याचा आवडता छंद. लिखाणाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून विरुपाक्ष यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणे ही बाब अजबच. निवृत्तीनंतर सकाळच्या चहा व नाश्त्याची जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे रात्रीच्या शांत झोपेनंतर लेखिकेला सर्जनशील लेखनासाठी सकाळचा मिळालेला वेळ महत्वाचा ठरत असे. डाॅ. शिवराम कारंत यांच्या कांदबरीपासून सुरू झालेला अनुवादलेखनाचा प्रवास एस. एल. भैरप्पा, यु.आर.अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती आणि अगदी अलीकडच्या काळातील वैदेही यांच्यापर्यंत अगदी सहजतेने झाला. कोणत्याही कलाकृतीचा अनुवाद करत असताना अनुवादिका, `त्या लेखकाच्या विचारधारेचे बोट धरून काही पावले पुढे गेलो की नाही`, एवढाच विचार करतात. एक उत्तम वाचक या नात्याने त्या वाचकांच्या बाजूच्या अनुवादिका आहेत. अनुवादात्मक लेखनातून आनंद मिळवणे हेच या लेखकद्वयीचे जीवनध्येय. म्हणूनच सलग साडेतीन दशके लेखिका अनुवादासारख्या वेगळ्या क्षेत्रात रमू शकल्या. पतीच्या आग्रहाखातर त्या कन्नड भाषा शिकल्या. सुरुवातीला वाटणारी धाकधूक आणि नंतर हळूहळू मनातील भीती जाऊन जिभेवर रूळलेली कानडी भाषा त्यांना अनुवादासाठी उपयुक्त ठरली. या लेखनाच्या निमित्ताने कन्नड साहित्यिकांसह मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत यांच्याशीही त्यांचे स्नेहबंध जुळले. सुधाकर देशपांडे, डाॅ. द. दि. पुंडे, पु. ल. देशपांडे, कमल देसाई, अनिल अवचट, कविता महाजन यांचा साहित्यिक व कौटुंबिक सहवास त्यांना लाभला. या आत्मकथनात आत्मप्रौढी, कटुता वा दुराग्रह नाही. उलट अतिशय नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे. मिळालेल्या पुरस्काराने झालेला आनंद उमा कुलकर्णी अगदी निरागसतेने व्यक्त करतात. पण त्याचवेळी मूळ लेखकापेक्षा अनुवादकाला दिले जाणारे दुय्यम स्थान व समीक्षकांनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, ही खंत मात्र त्या व्यक्त करतात. त्यांच्या मते `अनुवादकाला साहित्याची जाण असणं आवश्यक आहे. त्याला वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं गरजेचं आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी असली पाहिजे. त्यात कलाकृतीविषयीचं ममत्व आवश्यक आहे.` याच ममत्वाने त्या लिहीत राहिल्या. त्यामुळेच कदाचित लेखकाला वा त्याच्या कलाकृतीला त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. म्हणूनच देव- धर्माची कल्पना, सामाजिक विकृतीसंदर्भातील भाष्य, स्त्री सामर्थ्याबाबत प्रश्नचिन्ह वा सामाजिक क्लिष्टता यासंदर्भातील संबंधित लेखकांच्या मतमतांतरांमुळे लेखिकेची मते कठोर वा कडवट झाली नाहीत. उलट निःपक्षपातीपणे ती त्या मांडत राहिल्या आणि एका वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद स्वतःबरोबर वाचकांनाही मिळवून देत गेल्या. आत्मकथन वाचताना एक उणीव जाणवते ती म्हणजे अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या अनुभव कथनासोबत प्रसंगानुरूप त्यांची काही छायाचित्रे पुस्तकात असती तर वाचकांसाठी ती पर्वणी ठरली असती. उमा कुलकर्णी या स्वतः उत्तम चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातील निर्मितीच्या अनुभवाविषयी त्यांनी थोडे सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एका विलोभनीय पैलूची वाचकांना ओळख झाली असती. साध्या, सरळ निवेदन शैलीतील या आत्मकथनातून त्यांनी अनुवादकलेचे अनेक पैलू वाचकांपुढे उलगडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या कलाकृतीचा अनुवाद करताना त्या म्हणतात की, `स्त्रियांचे लेखन हा चिंतेचा नसून चिंतनाचा विषय आहे.` हे चिंतन समजून घेण्यासाठी व पुन्हा एकदा स्वतःशी आंतरिक संवाद साधण्यासाठी सर्वांनीच जरूर वाचावे, असे हे कथन आहे. धन्यवाद. ...Read more

  • Rating Starविद्या मक्तल

    स्त्रियांची आत्मचरित्रे मराठी साहित्याचा अनमोल ठेवा आहे. प्रसिद्ध अनुवादक उमा कुलकर्णी त्यांनी `संवादु - अनुवादु` हे आत्मकथन लिहून त्यात मोलाची भर घातली आहे. परत एकदा लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतिचरित्रे` ची आठवण करून देणारे प्रांजळ, प्रामाणिक, पारदरशी, प्रवाही, असे पुस्तक आहे. पंचधाराच्या वाचकांसाठी उमा कुलकर्णी हे नाव नवीन नाही. ह्यापूर्वी के. पी. पूर्णचंद्र तेज ह्या कन्नड लेखकांची उमाताईंनी अनुवादित केलेली `कार्वालो` ही कादंबरी पंचधारातून प्रकाशित झाली होती. विशेष म्हणजे कै. द. प. जोशींनीच त्यांना हि कादंबरी अनुवादासाठी पाठवली होती. पुढे गिरीश कार्नाडांशी त्यांचा परिचय होण्यासाठी कै. द. प. जोशीच कारणीभूत झाले होते. उमाताईंचे पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांनीही ज्ञानपीठ विजेते श्री. शिवराम कारंथ ह्यांची कानडी मुलाखात मराठीत अनुवाद करून पंचधारासाठी उपलब्ध करून दिली होती. एवढेच नाही तर हॆद्राबाद मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या `अनुवादा` वर आधारित एका चर्चासत्रासाठी उमाताईंच्या पर्व आणि `कार्वालो` ह्या दोन अनुवादित कादंबऱ्यांवर चर्चा झाली होती आणि ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख उमाताईंनी ह्या पुस्तकात आवर्जून केला आहे. उमाताईंनी पुस्तकाच्या मनोगतात म्हटले आहे की, "माझ्या अनुवादांपासून माझे जीवन मला वेगळे करता येणार नाही." आणि खरोखरच हे पुस्तक म्हणजे त्यांच्या फक्त कौटुंबिक जीवन प्रवासाचे कथन नाही तर त्यांनी केलेल्या समृद्ध, संपन्न विपुल अशा `अनुवादांच्या` प्रवासाचे पण कथन आहे. त्यांचे सुविद्य पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांच्या प्रेरणेने व मदतीने उमाताईंनी वाङमयाच्या क्षेत्रातील अनुवादांची वाटचाल केली. त्या उभय पतीपत्नींनी एकमेकांच्या ज्ञानाचा, मतांचा व आवडीनिवडीचा विचार व आदर ठेवून केलेला शांत, सुखी, समाधानी संसार आणि कौटुंबिक जीवन प्रवास ह्या दोन्हींचे लालित्यपूर्ण शैलीत केलेले आत्मकथनपर लेखन म्हणजे `संवादु-अनुवादु` हे पुस्तक होय. सुरुवातीला बेळगावातील बालपण ते लग्नापर्यंतचा काळ म्हणजे रम्य ते बालपण म्हणावे असेच दिवस होते. आईवडिलांची प्रेमळ शिस्त व सुसंसार बहीण -भावंडांशी घट्ट नाते,आत्या, मावशी, काका, काकू व इतर नातेवाईकांचा सुखद सहवास, मैत्रिणींची निखळ मैत्री, शाळा-कॉलेजमधील रम्य दिवस ह्या सर्वांच्या संस्मरणीय आठवणी आहेत. त्या बरोबरच बेळगावचा परिसर - ठळकवाडी, राहते घर, आजूबाजूचा परिसर, प्रसंगानुसार घटना, लोकांची मनोवृत्ती वगैरेचे मनोज्ञ चित्रण केले आहे. आई वडिलांसह सहवासात आलेल्या अनेक व्यक्तींची सुंदर छोटी छोटी शब्दचित्रे त्यांनी रेखाटली आहेत. लग्नानंतर उमाताई पती बरोबर पुण्यात आल्या व पुढे काही वर्षातच त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांचा हा वाङमयीन प्रवास वाचकाला गुंगवून ठाकणार आहे. कानडी साहित्य विश्वातील प्रतिभावंत अशा दिग्गज लेखकांची पुस्तके मराठीत अनुवादित करून त्यांनी मराठीतील अनुवादित साहित्याचे दालन समृद्ध केले. ज्ञानपीठ विजेते शिवराम कारंथ, भैरप्पा, अनंतमुर्ति, कार्नाड, वैदेही, तेजस्वी, सुद्धा मूर्ती वगैरे नामवंत कन्नड लेखकांच्या जवळ जवळ पन्नास ते साठ साहित्यकृती त्यांनी मराठीत अनुवादित केल्या आहेत. लेखनातील ही विपुलता व सातत्य थक्क करणारे आहे. ह्या अनुवादाच्या निमित्ताने झालेल्या ह्या मान्यवर लेखकांच्या भेटी, त्याचा लाभलेला मौलिक सहवास, जुळत गेलेले जिव्हाळयाचे, आत्मयितेचे नाते बऱ्याच साहित्यिक कार्यक्रमासाठी केलेला कानडी मुलुखाचा भरपूर प्रवास, प्रवासातील गमती - जमती, ह्या सर्वांचे रोचक निवेदन केले आहे. कारंथ, भैरप्पा अनेक वेळा त्यांच्या पुण्याच्या घरी येऊन राहिलेले आहेत. भैरप्पांना मराठी वाचकांत लोकप्रिय करण्याचे श्रेय उमाताईंनाच जाते. उमाताईंनाचा स्वभाव शांत, सोज्वळ, समाधानी व अजिबात दुराग्रही नसणारा असल्यामुळे त्यांचा लोकसंग्रही भरपूर आहे. अनुवादाच्या कामगिरीमुळे त्यांचे मराठीत मान्यवर साहित्यिकांशी स्नेहबंध जुळले आहेत. पु.ल. पती-पत्नी, पाध्ये पती-पत्नी, अनिल अवचट, कमल देसाई, माधवी देसाई व अशा अनेकांशी त्यांच्या गाठीभेटी होत. काही जणांशी तर वारंवार भेटी होऊन त्यांच्याशी स्नेहबंध अधिक दृढ झाले. घरातल्या कामवालीशीही त्या आत्मयितेने वागतात. त्यांच्याही आयुष्यात अडचणी आल्या, सुख-दुःखाचे प्रसंग तर प्रत्येकाच्याच जीवनात येत असतात. त्यांनाही मनाविरुद्ध घडणाऱ्या छोट्या-मोठ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, पण त्यामुळे कुणाविषयीही कटुता नाही किंवा आकस मानत नाही. एकदा एक लेखिकेने त्यांच्या एका अनुवादित पुस्तकावर खूप कठोर टीका केली. उमाताई अस्वस्थ झाल्या. त्यांनी सुनीताबाईंना सांगितले. सुनीताबाईंनी त्याकडे लक्ष न देण्यास समजावले. पु.ल. हसत म्हणाले, ` अहो दगड यायला लागेल कि आपले आंबे पिकायला आले समजावे.` उमाताईंचे समाधान झाले. अशा छान, भावमधुर अनेक आठवणी त्यांनी कथन केल्या आहेत. मधल्या काळात त्यांनी एम.ए. पीएचडी. डी. हि केले. एम.ए. ला त्यांनी त्यांचा आवडता `चित्रकारी` विषय निवडला व पीएचडी. डी. साठी मंदिरावरील शिल्पकलेसंबंधीचा विषय घेतला. त्यांच्या अभ्यासू स्वभावानुसार त्यांनी दोन्हीतही प्राविण्य मिळविले. आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवली. शिल्पकला पाहण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण करून अनेक मंदिरांना भेटी दिल्या. या कलांमधील मातब्बर लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्या संबंधीच्या अनुभवांचेही सरस वर्णन आहे. त्यांच्या अनुवादित कादंबऱ्यांवर टी. व्ही. मालिका व चित्रपट मराठी व कानडी दोन्ही भाषेत काढले आहेत. त्यापैकी `सोनियाचा उंबरठा` हि मालिका खूप प्रसिद्ध झाली. त्यामुळे त्यांचा टी. व्ही. चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ ह्या सर्वांशी जवळून संबंध यायचा. अनेकांची ओळख झाली. शूटिंग, तेथील वातावरण, कधी त्यांच्या बरोबर प्रवास, वगैरे तेव्हा आलेल्या अनुभवांनाही त्यांनी रंजकतेने मांडले आहे. उमाताईंनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराला व अनुवादकांना मान-सन्मान मिळवून दिला आहे. साहित्य अकादमी दिल्लीचा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार व याशिवाय इतर अनेक कानडी व मराठी भाषेतील पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनुवादाला दुय्यम दर्जा देणाऱ्यांना किंवा दुय्य्यम मानणाऱ्या मानसिकतेला त्या छान समजवतात . त्या लिहितात, "अशावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याची आठवण येते. बहुतेक वेळा साथीसाठी असलेलं तबला हे वाद्य आहे ;पण झाकीर हुसेन किंवा इतर अनेक प्रतिभावान तबलानवाज वाजवायला बसले की, बघता बघता तबला हेच मैफिलींच प्रमुख वाद्य बनून जातं." आणि खरचं आहे, अनुवादक जेव्हा आपल्या कामाविषयी आस्था बाळगतो व निष्ठेने आपले काम करतो तेव्हा त्यांची मानसिकता उत्तमच बनते व तो अधिक जास्त काम करत राहतो. विपुल लेखन करणाऱ्या उमाताई त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. अनुवादाविषयी असणारी तळमळ, निष्ठा आणि त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे आणि मेहनतीचे दर्शन वाचकाला या पुस्तकात प्रकर्षाने होते. अनुवादाच्या या प्रवासात उमाताईंचे पती विरुपाक्ष ह्यांची त्यांना मिळालेली साथ खूप मोलाची आहे आणि हे उमाताईही मानतात. हे दोघे पती-पत्नी एकमेकांना मदत करण्यास सदैव तयार आहेत. कुठेही अहं नाही की तक्रार नाही. सुनीता देशपांडे ह्यांच्या `आहे मनोहर तरी` चा अनुवाद श्री. विरुपाक्ष यांनी कानडीत केला, पण प्रकाशकाने ते उमाताईंच्या नावावर छापण्याची अट घातली. त्यांनी ती पटकन मान्य केली व सुनीताताईंच्या कानावर घातले. त्यांनीही मान्यता दिली. उमाताईंनी हे सर्व प्रांजळपणे पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकात कुठेही आत्मप्रौढीचा सूर नाही की एकमेकांची उणीदुणी काढणारी भावना नाही. दिसते ते फक्त त्या उभयतांचे एकमेकांवरील निर्व्याज प्रेम ! एवढेच नाही तर जगाकडे त्याच प्रेम भावनेतून पाहण्याची निर्मळ वृत्ती ! पुस्तकाची अर्पणपत्रिकाही हृद्य आहे. मुलंबाळं नसल्यामुळे आपण एवढं लेखन करू शकलो असेही त्या सहजपणे लिहितात. लेखनात अनेक ठिकाणी त्यांची चिंतनशीलता दिसते. अगदी गंभीर भाष्य करण्यातही त्यांची सहजता जाणवते. स्वभावातील मिस्किलपणाची झलकही पुस्तकात पाहायला मिळते. एकूणच अनुवादाच्या भरीव कामगिरीमुळे विस्तारित झालेल्या आपल्या सुखद अनुभवविश्वाचे अतिशय प्रामाणिकपणे उमाताईंनी कथन केले आहे. अतिशय रंजकपणे व लालित्यपूर्ण शैलीत लिहिलेले `संवादु-अनुवादु` हे उमाताईंचे पुस्तक एकदा हातात घेतले की खिळवून ठेवणारे आहे. पूर्ण होईपर्यंत खाली ठेवावे वाटत नाही; इतकेच नाही तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. प्रत्येकाने वाचावे असे हे वाचनीय व लक्षणीय पुस्तक आहे.. ...Read more

  • Rating StarPoornima Deshpande

    उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन संवादु अनुवादु वाचन करत आहे. पुस्तक अतिशय सुंदर, मिश्कील विनोदी वाचकांना अंतर्मुख करते.

  • Rating StarRajeshree Salage

    अनुवादाशी आंतरिक संवाद डाॅ. उमा कुलकर्णी यांची अनेक अनुवादित पुस्तके वाचल्यानंतर त्यांचे `संवादु अनुवादु` हे आत्मकथन वाचण्याची तीव्र इच्छा होती. पुस्तक हातात पडले नि मुखपृष्ठावरील लेखिकेच्या निरागस चेहऱ्याप्रमाणेच त्यांचया मनाची निरागसता पुस्तकभर जाणवत राहिली. अतिशय समर्पक शीर्षक असलेल्या या आत्मकथनात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे लेखिकेला असलेली साहित्याविषयीची उपजत जाण व प्रेम . म्हणूनच कदाचित त्यांचे जीवन साहित्यमय होऊन गेले असावे. `संवादु अनुवादु` या आत्मकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची संयतशैली. दुसऱ्याला सहज मोठेपण देणाऱ्या या अनुवादिकेला मूळ लेखकांइतकीच लोकप्रियता लाभली. जवळपास पंचावन्नपेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद करून सलग साडेतीन दशके त्या सर्जनशील अशा अनुवाद क्षेत्रात रमल्या. बेळगावातील परंपरावादी घरात उमा कुलकर्णी यांचे बालपण गेले. बालपणापासूनच कला, संगीत व वाचनाची त्यांना मनस्वी आवड. लग्नानंतर पती विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या नोकरीनिमित्त त्यांच्यासोबत त्या पुण्यात आल्या. पुण्याच्या शहरी वातावरणात त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. रोज संध्याकाळी फिरायला जाण्याच्या नेमातून झालेल्या गप्पांमधून त्यांना एकमेकांच्या साहित्यप्रेमाची कुणकुण लागली. विरूपाक्ष यांना कन्नड साहित्य वाचण्याची विशेष आवड. कोणतेही पुस्तक वाचले की त्यातील कथानक पत्नीला रंगवून सांगणे हा त्यांचा शिरस्ता. उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद लेखनाची सुरुवातही काहीशी गंमतीशीर झाली. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डाॅ. शिवराम कारंत यांच्या `मुक्कजीची स्वप्ने` या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीविषयी विरूपाक्ष सांगत असताना उमा यांनी त्यांना कादंबरी वाचून दाखवायचा आग्रह धरला व स्वतःला समजावी यासाठी त्या ती मराठीत लिहू लागल्या. अशाप्रकारे त्यांचा पहिला अनुवाद लिहून झाला! स्वतःला समजावे यासाठी कन्नड कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद, त्यानंतर ती कादंबरी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला अनुवाद व पुढे जीवनाचा अविभाज्य व अपरिहार्य भाग म्हणून केलेला अनुवाद, असा त्यांचा अनुवादलेखनाचा विलक्षण असा प्रवास!! विरूपाक्ष कुलकर्णी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचे कन्नडमध्ये तर उमा कुलकर्णी कन्नडमधील साहित्य मराठीत अनुवादित करीत असत. दोघेही अनुवादाच्या दुनियेत इतके रममाण झाले की साहित्य व अनुवाद हा त्यांच्या सहजीवनाचा जणू साथीदार झाला. अनुवादलेखन करत असताना पत्नीच्या नावाने कन्नड लेखकांशी पत्रव्यवहार करणे, त्यांना कानडी भाषा येत नसल्यामुळे रोज पुस्तकाची काही पाने वाचून दाखवणे, ते रेकॉर्ड करून ठेवणे, एखादवेळी एखादा कन्नड शब्द अडला तर तो शब्दकोशात बघून त्याचा अर्थ शोधून ठेवणे या गोष्टी विरूपाक्ष आवडीने करीत. जीवनाच्या जोडीदाराच्या वयाचे मोठेपण मान्य केल्यावर त्यांनीही वयाने लहान असलेल्या आपल्या पत्नीचे लाड पुरवणे (दोघांमध्ये दहा- साडेदहा वर्षांचे अंतर) हे त्यांच्या समंजस सहजीवनाचे गुपित. संध्याकाळी नित्यनियमाने फिरायला जाणे, साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे व समाजकारण, राजकारण यांसारख्या विषयांवर मोकळेपणानेे गप्पा मारणे यातून त्यांच्यातील वैचारिक वीण घट्ट होत गेली. कधी कधी या गप्पांमधूनच लेखकाच्या वाक्यांमधला दडलेला अर्थही त्यांच्या समोर येत गेला. दिवसातील जास्तीत जास्त वेळ लिखाणात घालवणे हा या लेखक दाम्पत्याचा आवडता छंद. लिखाणाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून विरुपाक्ष यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणे ही बाब अजबच. निवृत्तीनंतर सकाळच्या चहा व नाश्त्याची जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे रात्रीच्या शांत झोपेनंतर लेखिकेला सर्जनशील लेखनासाठी मिळालेला तो वेळ महत्वाचा ठरत असे. डाॅ. शिवराम कारंत यांच्या कांदबरीपासून सुरू झालेला अनुवादलेखनाचा प्रवास एस. एल. भैरप्पा, यु.आर.अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती आणि अगदी अलीकडच्या काळातील वैदेही यांच्यापर्यंत अगदी सहजतेने झाला. कोणत्याही कलाकृतीचा अनुवाद करत असताना अनुवादिका, `त्या लेखकाच्या विचारधारेचे बोट धरून काही पावले पुढे गेलो की नाही`, एवढाच विचार करतात. एक उत्तम वाचक या नात्याने त्या वाचकांच्या बाजूच्या अनुवादिका आहेत. अनुवादात्मक लेखनातून आनंद मिळवणे हेच या लेखकद्वयीचे जीवनध्येय. म्हणूनच सलग साडेतीन दशके लेखिका अनुवादासारख्या वेगळ्या क्षेत्रात रमू शकल्या. पतीच्या आग्रहाखातर त्या कन्नड भाषा शिकल्या. सुरुवातीला वाटणारी धाकधूक आणि नंतर हळूहळू मनातील भीती जाऊन जिभेवर रूळलेली कानडी भाषा त्यांना अनुवादासाठी उपयुक्त ठरली. या लेखनाच्या निमित्ताने कन्नड साहित्यिकांसह मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत यांच्याशीही त्यांचे स्नेहबंध जुळले. सुधाकर देशपांडे, डाॅ. द. दि. पुंडे, पु. ल. देशपांडे, कमल देसाई, अनिल अवचट, कविता महाजन यांचा साहित्यिक व कौटुंबिक सहवास त्यांना लाभला. या आत्मकथनात आत्मप्रौढी, कटुता वा दुराग्रह नाही. उलट अतिशय नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे. मिळालेल्या पुरस्काराने झालेला आनंद उमा कुलकर्णी अगदी निरागसतेने व्यक्त करतात. पण त्याचवेळी मूळ लेखकापेक्षा अनुवादकाला दिले जाणारे दुय्यम स्थान व समीक्षकांनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, ही खंत मात्र त्या व्यक्त करतात. त्यांच्या मते `अनुवादकाला साहित्याची जाण असणं आवश्यक आहे. त्याला वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं गरजेचं आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी असली पाहिजे. त्यात कलाकृतीविषयीचं ममत्व आवश्यक आहे.` याच ममत्वाने त्या लिहीत राहिल्या. त्यामुळेच कदाचित लेखकाला वा त्याच्या कलाकृतीला त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. म्हणूनच देव- धर्माची कल्पना, सामाजिक विकृतीसंदर्भातील भाष्य, स्त्री सामर्थ्याबाबत प्रश्नचिन्ह वा सामाजिक क्लिष्टता यासंदर्भातील संबंधित लेखकांच्या मतमतांतरांमुळे लेखिकेची मते कठोर वा कडवट झाली नाहीत. उलट निःपक्षपातीपणे त्या ती मांडत राहिल्या आणि एका वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद स्वतःबरोबर वाचकांनाही मिळवून देत गेल्या. आत्मकथन वाचताना एक उणीव जाणवते ती म्हणजे अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या अनुभव कथनासोबत प्रसंगानुरूप त्यांची काही छायाचित्रे पुस्तकात असती तर वाचकांसाठी ती पर्वणी ठरली असती. उमा कुलकर्णी या स्वतः उत्तम चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातील निर्मितीच्या अनुभवाविषयी त्यांनी थोडे सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एका विलोभनीय पैलूची वाचकांना ओळख झाली असती. साध्या, सरळ निवेदन शैलीतील या आत्मकथनातून त्यांनी अनुवादकलेचे अनेक पैलू वाचकांपुढे उलगडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या कलाकृतीचा अनुवाद करताना त्या म्हणतात की, `स्त्रियांचे लेखन हा चिंतेचा नसून चिंतनाचा विषय आहे.` हे चिंतन समजून घेण्यासाठी व पुन्हा एकदा स्वतःशी आंतरिक संवाद साधण्यासाठी सर्वांनीच जरूर वाचावे, असे हे कथन आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more