* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANA SARJANA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981285
  • Edition : 4
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN AUTOBIOGRAPHY OF THE SON OF A SCHOOL TEACHER BELONGING TO A TRADITIONAL LARGE FAMILY. COMING FROM A LOW ECONOMICAL STRATA, CREATES MANY HURDLES IN FULFILLING THE DREAMS OF SUCH CHILDREN. ADVERSE CIRCUMSTANCES ALSO GENERATE TENACITY & CREATE A WILL TO SUCCEED. THIS IS THE STORY OF SUCH A PERSON WHO HAS REACHED FROM RAGS TO TAGS, IF NOT RICHES. HE BELIEVED IN MORAL VALUES & HONESTY IN ALL WALKS OF LIFE WHETHER PROFESSIONAL OR SOCIAL. THIS BIOGRAPHY ALSO DEALS WITH OTHER ABSTRACT SUBJECTS LIKE PERSONAL INTERESTS, TIME MANAGEMENT OF A COMMON MAN, BESIDES ALL THE INTERESTING TOPICS OF CREATION OF THE UNIVERSE AND LIFE ON EARTH.
मानवी जीवन ‘त्रिमित’ आहे.जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले) आहे.माणसाचे खरे मोठेपण या तिसऱ्या मितीवर ठरते.अशा व्यक्ती समाजात चारित्र्यसंपन्न आणि आदर्श ठरतात.त्याग, साधेपणा, इतरांच्या गरजांची जाणीव अशा अनेक पैलूंचे दर्शन ज्यांच्या व्यक्तिमत्त्वातून घडते,त्यापैकी डॉ. अनिल गांधी `कनिष्ठिकधिष्ठित` आहेत. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी आपल्या वैद्यकीय विषयाखेरीज, र्आिथक गुंतवणूक, व्यावसायिक नीतिमत्ता, पृथ्वीची व्युत्पत्ती, आदिवासींसाठी आश्रमशाळा, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अशा इतरही विषयांवरील आपले चिंतन व्यक्त केले आहे. एकूणच ही आत्मकथा मननीय, चिंतनीय आणि वाचनीय अशी आहे. डॉ. ह. वि. सरदेसाई
मराठी वाड्मय परिषद, बडोदा यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचे परितोषिक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ANILGANDHI #AFLATUNMENDU #MANASARJANA
Customer Reviews
  • Rating Starसुनीता गोपाळ कृष्णन - जानेवारी २०२१

    आदरणीय डॉ. अनिल गांधी सर मी श्रीमती सुनीता गोपाळ कृष्णन. `मना सर्जना` हि एका प्रामाणिक तज्ञ सर्जन डॉक्टरांची आत्मकथा आहे. लहानपणी ठरवलेले ध्येय आयुष्याच्या प्रवाहात घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. गरीब गरजू लोकांविषयी हि तळमळ हि अंडीवाल्यामधू (पांगोळीची सेवा) दिसून येते. डॉक्टरांचे वाईट अनुभव सातत्याने अनुभवायला येतात, पण तुमच्यासारखे प्रामाणिक डॉक्टर मिळणे हे रुग्णाचे भाग्य मानावे लागेल. हुंड्या बाबतची तुमची ठाम मते किंवा कमाईतील विशिष्ट रक्कम दान करण्याविषयीची तुमची मते खूपच भावतात. समाजात काजवे असंख्य आढळून येतात` सूर्य मात्र एकच असतो आणि त्या निर्गवी सूर्यासारखे तुमचे हे कार्य दिसून येते. अशा सर्जनाची समाजाला नितांत आवश्यकता आहे. ...Read more

  • Rating StarD. S Patil, Dharangaon

    पितृतुल्य आदरणीय डॉ गांधीजी, सस्नेह चरणस्पर्श.... माझ्या सर्जरी च्या निमित्ताने आपली ओळख झाली आणि एक पुरोगामी विचारसरणी,संस्कारक्षम व्यक्तीमत्वाचा झरा ,आदर्श पिता,डॉक्टर , समाज भिमुख व्यक्तिमत्व ची ओळख झाल्याचा आनंद झाला आहे. कृपया, मी आपणावर स्तुती सुमने उधळत आहे असे समजू नये . सर्जरी चे निमित्ताने आपल्याशी वेळोवेळी झालेला संवाद आणि मना सर्जना या पुस्तकातून झालेली आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ... यातून माझ्या भावना प्रकट होत आहेत . सर,जिद्द चिकाटी आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही परिस्थितीत यशाचे शिखर गाठता येते शिवाय मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने कसे करावे याचा आदर्श , मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात.आपल्या वरील संस्कार आणि स्वतहाला असलेल्या जाणिवेतून शिवाय जिज्ञासा ,स्पष्ट ,सत्य जोपासण्याची ऊर्मी असेल तर मदतीचे हात पुढे येतात.हे निश्चितच आहे .माणसाला जिद्द ,मेहनतीची तयारी असेल तर परिस्थिती आडवी येत नाही हा आजच्या तरुणांना आपण आदर्श दिलेला आहे . यशाचे अतिउच्च शिखर गाठले असताना देखील , " ठेविले अनंत तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान " या उक्ती प्रमाणे आपण जगत आहात. आपल्यातील सामाजिक कार्याची जाणीव तर अत्यंत प्रेरणादायी आहे फार कमी लोक अशा प्रकारचे समाजकार्य करतात भिल्ल आदिवासी,समाजाच्या नागरिकांची आरोग्य सेवा,शिक्षणासाठी आश्रमशाळा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे उपक्रम वाखाणण्याजोगी आहेतच आपल्यातील आत्मविश्वास आणि प्रामाणिक कार्यासाठी अनेक हातांनी आपणास सहकार्य केले नव्हे तर अनेकांना आपले कार्यकर्तृत्व बघून सहकार्य करावे असे वाटले ही अभिमानास्पद बाब आहे आपल्या व्यवसायात आपण निष्णात तर आहातच पण त्या सोबत आपण जोपासलेली सामाजिक बांधिलकी वाचून मनभरून येते अनेकांवर आपण फ्री उपचार केले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष आहेत म्हणून शिक्षकांकडून फी न घेणे ,सर्व उपचार फी शिवाय करणे ,, पेशंट ला सर्व प्रकारे सहकार्य,प्रसंगी घरी जावून सर्जरी,एव्हढे धाडस करणारे सर मला वाटते आपणच एकमेव आहात. आपल्या लहानशा मुलाला एका दिव्यांग मुलाला मदत करावीशी वाटणे, बापाने ती पूर्ण करणे नव्हे तर दिव्यांग मुलाचा संसार थाटणे,त्याला स्वतःच्या पायावर उभे करणे, त्याच्या विवाहाचा स्वागत समारंभ आपल्या घरी आयोजित करणे ही बाब सर्वसामान्य माणसाला शक्य नाही त्यासाठी एका विशेष मनाची,आणि प्रेमाची आवश्यकता असते ती आपल्याकडे आपल्या कुटुंबीयांकडे आहे सामान्य नागरिक ते थेट अधिकारी,उद्योगपती ,यांच्याशी जुळलेली आपली नाड, प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीचे द्योतक आहे सर आपल्या या सेवाभावी वृत्तीने अनेक सेवाभावी संस्थांमध्ये आपल्याला काम करण्याची संधी चालून आली आणि आपण निरपेक्ष भावनेने या संधीचे सोने करीत त्या संस्था नावारूपाला आणल्या याचा निश्चितच अभिमान वाटतो. आपण कुटुंबवत्सल देखील आहात आपल्या दैनंदिन कामकाजातून , व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून कुटुंबाकडे ही तेव्हढेच लक्ष दिले यासाठी सौ मावशींचे योगदान देखील मानावे लागेल आपल्या मार्गदर्शन आणि संस्कारातून मुलांनी राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय खेळात प्राविण्य मिळवले सोबतच उच्च शिक्षणापासून देखील मागे राहिले नाहीत आणि आज उच्च पदावर कामकाज करीत आहेत ही आपल्या जाणीवेची आणि संस्काराची देण आहे सर आपल्या एकूणच यशात आणि उंचावलेल्या प्रगतीच्या आलेखात सौ मावशी चा उल्लेख केला नाही तर अपूर्णता जाणवेल." प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्री चा हात असतो" याची जाणीव देखील झालेली आहे ( मावशी म्हणजे लक्ष्मी ,सरस्वती आणि अन्नपूर्णा आहेत याची जाणीव आपल्या पुस्तकातील विचारातून झालेली आहेच) आपले मना सर्जना हे पुस्तक आजच्या तरुणाईने वाचले तर निश्चितच प्रेरणा मिळेल आणि वाचकांमध्ये वैचारिक परिवर्तन होईल. @ आर्थिक नियोजन आणि बचतीचा आपण दिलेला सल्ला मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. @ डॉ बाबा मुळे झालेली आपली ओळख चिरकाल स्मरणात राहील सर्जरीच्या निमित्ताने का असेना पण एका प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची भेट झाल्याचा मनस्वी आनंद आहे. आपण जळगावला आलात तर निश्चित माझ्याकडेही या...धन्यवाद... ...Read more

  • Rating Starसुषमा आत्माराम शार्दुल

    आदरणीय, डॉ. अनिल गांधी सर, सप्रेम नमस्कार मी सुषमा आत्माराम शार्दुल (लग्नानंतरची झारा इम्तियाझ शेख) सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात इंग्रजी हा विषय शिकवते. २०१५ साली माझ्या प्रेगनन्सीच्या काळात मी बऱ्याच डॉक्टरांची आत्मचरित्रे वाचली. त्यातले आपल आत्मचरित्र `मना सर्जना; मला खूपच आवडले. आपण बरीच पुस्तके वाचतो पण त्यातील ठराविक पुस्तके अशी असतात जी आपल्या मनात कायम घर करून जातात. `मना सर्जना` हे याच प्रकारातील पुस्तक (आत्मचरित्र) आहे. त्यावेळेस एखाद्या पुस्तकाविषयी लिहिणे मला सुचलेच नाही. म्हणून मागच्या वर्षापासून ही सुरवात केली आहे. पुस्तकाची प्रस्तावना तसेच आपले मनोगत वाचतांना मनाला एक आनंद व स्फूर्ती मिळते. आपल्यातील प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, गरिबांविषयी असणारे प्रेम, नाविन्यता, जीवनाचे त्रिमिती महत्त्व आणि असे अनेक गूण आपण वाचकापुढे सुंदर पद्धतीने मांडले आहेत. डॉ. ह. वि. सरदेसाई सरांनी प्रस्तावना खूप सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे. तुमच्यातील प्रामाणिकपणा व निर्मळता वाचकास तुमच्या सुरवातीच्या वाक्यानेच येऊन जाते. ``मी मनापासून लिहिलेली, मनातले सांगणारी `मना सर्जना` ही आत्मकथा वाचकापुढे सादर केली आहे. त्याची सर्जरी ज्याची त्याने करायची आहे. पण निदान मला कळावे ही इच्छा.`` सर, पुस्तकातील हे वाक्य मला लाख मोलाचे वाटले. आपले निर्णय व निश्चय आयुष्य घडविणारे असतात. पैशाने सुखाची सगळी साधनं विकत घेता येतात पण मनाचे सुख-समाधान नाही. प्रामाणिकपणा काय असावा, नितिमत्ता काय असावी किंवा एखाद्या गरजूची सेवा मनापासून कशी करावी या सर्वाचे चित्र पुस्तकातील प्रत्येक पानावर व प्रत्येक ओळीवर आहे. आजपर्यंत वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी हे आत्मचरित्र (मनासर्जना) अफलातून आहे. या चार वर्षांच्या काळात ठराविकच पुस्तकांचे शिर्षक लक्षात राहिले त्यातील एक रेखीव पुस्तक व कायम आठवणीत राहिल असेच हे आत्मचरित्र आहे. आमच्याकडे एका बक्षिस समारंभास बीआसी चे शास्त्रज्ञ आले होते. विद्यार्थ्यांना मोटिव्हेट करण्यासाठी त्यांनी एक अनमोल वाक्य म्हटले होते, ``जेव्हा आपण एखाद्या अनुभवी माणसाचे पुस्तक वाचतो म्हणजेच आपल्याला त्याचा ५० ते ६० वर्षांचा अनुभव मिळतो.`` मी या वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे. इतरांना सर्वतोपरी मदत करणे हे तुमच्या संस्कारातच आहे त्यामुळे तुमच्या संस्काराने तुमची मुले व त्यांची पुढची पिढी त्यावर पाऊल ठेवून पुढे जात आहे. डॉक्टर म्हणून व्यवसायातील नितीमत्ता किती महत्त्वाची आहे, केवळ पैसा हाच आयुष्याचा भाग नसून माणुसकी किती महत्त्वाची आहे याचे सुंदर उदाहरण म्हणजेच डॉक्टर अनिल गांधी यांचे जीवन असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. तुमच्या लिखाणात प्रेम, न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा हा ओतप्रोत भरलेला आहे. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल कितीही वाक्य लिहिली तरी ती कमी पडतील. व्यवसायापेक्षा आपण माणूसकी कशी जपली पाहिजे हे तुम्ही खरेच उत्तम पद्धतीने तुमच्या अनुभवातून दाखवून दिले आहे. तुमच्या ८०व्या वाढदिवसाचा फोटो पाहतानां मनात सहज एक प्रश्न निर्माण झाला जर डॉ. अनिल गांधी यांनी लहानपणापासून असा डॉक्टर होण्याचा निग्रह केला नसता तर ही फोटोतील सर्व मंडळी या पदापर्यंत पोहोचली असती का? एकट्या व्यक्तीच्या बदलाने किती पिढ्या बदलू शकतात याचे जीवंत उदाहरण म्हणजे डॉ. अनिल गांधी हे आहेत. विद्यार्थी दशेत व डॉक्टर झाल्यावरही तुम्ही इतरांना केलेली मदत ही खरेच वाखाणण्यासारखी आहे. तुमचे अर्थाविषयीचे विचार वेगवेगळ्या ट्रस्टसाठी केलेले मोलाचे सहकार्य, त्याग स्वत: एक डॉक्टर असतानासुद्धा, वैद्यकीय क्षेत्रातील नितीमत्ता कशी असली पाहिजे हे आणि असे सगळेच विचार वाचकास एक आदर्श व्यक्ती व विचारसरणी देऊन जातात. पुस्तक वाचताना अनेक प्रश्न मनांत होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकात मिळाली याचे मला समाधान आहे. तुमच्या साहित्य परिचय कोषातून पुस्तकांचे विषय व त्यातील थोडक्यात माहिती वाचल्यावर ती सर्वच पुस्तके माझ्या वाचनाच्या आवडीचीच आहेत. सर, तुमच्या लिखाणात बोलण्यात प्रचंड नम्रता, प्रेम, प्रामाणिकपणा, आपुलकी ओतप्रोत भरलेली आहे. अजय सरांची खेळातील व अभ्यासातील आवड यामुळे त्यांनी प्रगतीचे उंच शिखर गाठले आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. एकदा एका पुस्तकात मित्तल ग्रुप आणि श्री. मित्तल सरांविषयी वाचले होते. ५ ते ६ वर्षांपूर्वी जेव्हा मी पुण्यात आले होते तेव्हा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या नावाने बोर्ड होते. पण हेच तुमच्या पुस्तकांतून वाचताना थोडा अभिमान वाटला कारण आपल्या ओळखीची व्यक्ती यांसारख्या मोठ्या माणसांच्या परिचयाची आहे. मला अजून दोन गोष्टी आवर्जून नमूद कराव्याशा वाटतील एक म्हणजे मेहता पब्लिशिंग हाऊस आणि दुसऱ्या तुमच्या पत्नी. मेहता सरांचे तुमच्याशी असणारे नाते खूप सुंदर आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीच्या त्या पत्नी आहेत म्हणून त्या सुंदर आहेत हे म्हणणे चुकीचे आहे कारण तुमचे आयुष्य सुरळीत चालावे यासाठी त्यांनीही अपार कष्ट घेतले आहेत हेही तितकेच खरे हे मान्य करावे लागेल. श्रद्धा व अंधश्रद्धा याविषयीचे तुमचे विचार १०० टक्के बरोबर आहेत. पुस्तकात तुम्ही लिहिलेल्या बालपणीच्या आठवणी (गणित विषय) वाचकास त्यांच्या बालपणीची आठवण करून देतील. परंतु पुढच्या आयुष्यात तुमच्या स्वभावाने अनेक मंडळी (गरीब, श्रीमंत(मनाने) नामवंत) तुमच्याशी जोडली गेली हा भाग वेगळा. शेवटी इतकेच म्हणेन व्यवसायाने जरी आपण मोठे डॉक्टर असाल तरी डॉक्टर कम रायटर ही भूमिका तुम्ही चोख पार पाडली आह़े. तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा. वयाच्या ८०व्या वर्षी जेवढा तजेला आहे हा पुढेही राहील हीच प्रार्थना. ...Read more

  • Rating Star Loksatta 12-6-2010

    वैद्यकीय व्यवसायात ५० वर्षे पूर्ण केलेले निष्णात सर्जन डॉ. अनिल गांधी यांच्या आयुष्यातील विलक्षण अनुभवांचा समावेश असलेल्या अर्थातच डॉक्टरांच्या प्रांजळ आत्मकथनाचे ‘मना सर्जना’चे प्रकाशन उद्या शनिवार पुण्यात होत आहे. माढा येथे जन्म झालेल्या डॉ. गांधी ांचे पुस्तक केवळ त्यांचे आत्मकथन म्हणून नाही, तर गेल्या ५० वर्षांतील घडामोडींचे व वैद्यकीय क्षेत्रातील बदलाचा नोंद घेणारा दस्तावेज म्हणूनही महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, डॉक्टरांचे निकटचे मित्र आणि चरित्रलेखिका चित्रलेखा पुरंदरे अशा अनेक मंडळींच्या आग्रहातून डॉक्टर आपले अनुभव शब्दबद्ध करायला तयार झाले. चित्रलेखा पुरंदरे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन व संपादन केले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकामुळे डॉक्टरांचा संघर्ष तर वाचकांना समजेलच, त्याचबरोबर डॉक्टर अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार कसे ठरले व आपल्या व्यावसायिक निष्ठांचा विसर पडू न देता अनेक आव्हानांना ते सामोरे कसे गेले हेदेखील लक्षात येईल. पुण्यात अत्यंत गाजलेल्या मंजुश्री सारडा खून प्रकरणाशी डॉ. गांधी यांचा संबंध कसा आला व त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे सारडा खुनातील आरोपी शरद सारडा याला कशी शिक्षा झाली, या घटनाक्रमाची माहिती मिळते. ब. ना. भिडे यांच्यासारख्या कायदेपंडितासमोर डॉक्टरांनी कशी साक्ष दिली व त्यांच्या प्रश्नांच्या फैरींना कसे उत्तर दिले हे सारे यातून समजते. प्रत्येक बाब नियोजनबद्ध रीतीने करणे, इंटर्नशिप पुण्याऐवजी औरंगाबादला का केली, त्यातून काय फायदे झाले ते कळते. त्यापेक्षा डॉक्टर किती प्रारंभापासून नियोजन करत होते व शिस्त आणि नियोजनाचा कसा फायदा होतो हेदेखील समजते. सर्जन म्हणून आलेले अनुभव आणि एक सर्जनशील मनाला आलेल्या अनुभवाच्या सुसंवादाचे रूप म्हणजे हे आत्मकथन आहे. तुमचे पुस्तक वाचून प्रस्तावना लिहायची की नाही असे स्पष्टपणे सांगणाऱ्या डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी पुस्तक हातात घेतले आणि वाचूनच संपवले, मी प्रस्तावना लिहितो, अशी आशीर्वादात्मक दिलेली दाद, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी हस्तलिखित वाचले त्या सगळ्यांची पसंती, यामुळे हे पुस्तक वेगळे ठरले. एकदा पुस्तक लिहायचे ठरल्यावर डॉक्टरांनी अवघ्या एक वर्षात हे पुस्तक पूर्ण केले आहे. शब्दांकन करणाऱ्या चित्रलेख पुरंदरे यांनी या संदर्भात सांगितले की, डॉक्टरांची स्मरणशक्ती अफाट आहे. त्यांनी मला इतकी तपशिलवार माहिती दिली, की कुणीही थक्क होईल. मी त्यांच्या पेशंट्सना भेटले, त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली. प्रत्येक वेळी डॉक्टरांचा वेगळा पैलू मला जाणवला. केवळ स्वतःचे कौतुक करण्याचा त्यांचा कुठेही हेतू नाही. जे जसे घडले ते त्यांनी सांगितले. तसेच त्यांचा विविध विषयांचा अभ्यास व त्यांच्या आवडीचे विषय याबद्दलही त्यांनी यात लिहिले आहे. डॉक्टरांनी आदिवासींसाठी ‘आदिशक्ती’ ट्रस्टच्या माध्यमातून काम केले. आदिवासींसाठी आश्रमशाळा उभी करण्याचे ठरवले तेव्हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पन्नास लाख रुपयांची देणगी दिली. डॉक्टरांचे समाजकार्य बघून जगप्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीनिवास मित्तल यांनीही या कार्याला कशी मदत केली हे सारे या पुस्तकामुळे समजते. आपल्याकडील सुताराच्या ऑपरेशन व त्याच्या औषधासाठी स्वतःचे दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम खर्च करणाऱ्या अनिल गांधी यांच्यासारख्या निःस्पृह माणसाचा मित्तल यांच्यासारख्या कुबेराशी स्नेह कसा जुळला व वृद्धिंगत होत गेला हेही या पुस्तकातून कळते. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा कारभार, वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांना स्पर्श करणारं अर्धशतकाचं हे आत्मचिंतन केवळ एकाच माणसाचं न राहता गेल्या ५० वर्षांतील समाजजीवनातील बदलाचं सक्षमपणे आणि सजगपणे नोंद घेणारं ‘समाजचित्र’च रेखाटणारं पुस्तक ठरतं हे नक्की! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more