* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANA SARJANA
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788184981285
  • Edition : 4
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN AUTOBIOGRAPHY OF THE SON OF A SCHOOL TEACHER BELONGING TO A TRADITIONAL LARGE FAMILY. COMING FROM A LOW ECONOMICAL STRATA, CREATES MANY HURDLES IN FULFILLING THE DREAMS OF SUCH CHILDREN. ADVERSE CIRCUMSTANCES ALSO GENERATE TENACITY & CREATE A WILL TO SUCCEED. THIS IS THE STORY OF SUCH A PERSON WHO HAS REACHED FROM RAGS TO TAGS, IF NOT RICHES. HE BELIEVED IN MORAL VALUES & HONESTY IN ALL WALKS OF LIFE WHETHER PROFESSIONAL OR SOCIAL. THIS BIOGRAPHY ALSO DEALS WITH OTHER ABSTRACT SUBJECTS LIKE PERSONAL INTERESTS, TIME MANAGEMENT OF A COMMON MAN, BESIDES ALL THE INTERESTING TOPICS OF CREATION OF THE UNIVERSE AND LIFE ON EARTH.
मानवी जीवन ‘त्रिमित’ आहे.जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले) आहे.माणसाचे खरे मोठेपण या तिसऱ्या मितीवर ठरते.अशा व्यक्ती समाजात चारित्र्यसंपन्न आणि आदर्श ठरतात.त्याग, साधेपणा, इतरांच्या गरजांची जाणीव अशा अनेक पैलूंचे दर्शन ज्यांच्या व्यक्तिमत्त्वातून घडते,त्यापैकी डॉ. अनिल गांधी `कनिष्ठिकधिष्ठित` आहेत. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी आपल्या वैद्यकीय विषयाखेरीज, आर्थिक गुंतवणूक, व्यावसायिक नीतिमत्ता, पृथ्वीची व्युत्पत्ती, आदिवासींसाठी आश्रमशाळा, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अशा इतरही विषयांवरील आपले चिंतन व्यक्त केले आहे. एकूणच ही आत्मकथा मननीय, चिंतनीय आणि वाचनीय अशी आहे. डॉ. ह. वि. सरदेसाई
मराठी वाड्मय परिषद, बडोदा यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचे परितोषिक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ANILGANDHI #AFLATUNMENDU #MANASARJANA
Customer Reviews
  • Rating Starसुनीता गोपाळ कृष्णन - जानेवारी २०२१

    आदरणीय डॉ. अनिल गांधी सर मी श्रीमती सुनीता गोपाळ कृष्णन. `मना सर्जना` हि एका प्रामाणिक तज्ञ सर्जन डॉक्टरांची आत्मकथा आहे. लहानपणी ठरवलेले ध्येय आयुष्याच्या प्रवाहात घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. गरीब गरजू लोकांविषयी हि तळमळ हि अंडीवाल्यामधू (पांगोळीची सेवा) दिसून येते. डॉक्टरांचे वाईट अनुभव सातत्याने अनुभवायला येतात, पण तुमच्यासारखे प्रामाणिक डॉक्टर मिळणे हे रुग्णाचे भाग्य मानावे लागेल. हुंड्या बाबतची तुमची ठाम मते किंवा कमाईतील विशिष्ट रक्कम दान करण्याविषयीची तुमची मते खूपच भावतात. समाजात काजवे असंख्य आढळून येतात` सूर्य मात्र एकच असतो आणि त्या निर्गवी सूर्यासारखे तुमचे हे कार्य दिसून येते. अशा सर्जनाची समाजाला नितांत आवश्यकता आहे. ...Read more

  • Rating StarD. S Patil, Dharangaon

    पितृतुल्य आदरणीय डॉ गांधीजी, सस्नेह चरणस्पर्श.... माझ्या सर्जरी च्या निमित्ताने आपली ओळख झाली आणि एक पुरोगामी विचारसरणी,संस्कारक्षम व्यक्तीमत्वाचा झरा ,आदर्श पिता,डॉक्टर , समाज भिमुख व्यक्तिमत्व ची ओळख झाल्याचा आनंद झाला आहे. कृपया, मी आपणावर स्तुती सुमने उधळत आहे असे समजू नये . सर्जरी चे निमित्ताने आपल्याशी वेळोवेळी झालेला संवाद आणि मना सर्जना या पुस्तकातून झालेली आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ... यातून माझ्या भावना प्रकट होत आहेत . सर,जिद्द चिकाटी आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही परिस्थितीत यशाचे शिखर गाठता येते शिवाय मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने कसे करावे याचा आदर्श , मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात.आपल्या वरील संस्कार आणि स्वतहाला असलेल्या जाणिवेतून शिवाय जिज्ञासा ,स्पष्ट ,सत्य जोपासण्याची ऊर्मी असेल तर मदतीचे हात पुढे येतात.हे निश्चितच आहे .माणसाला जिद्द ,मेहनतीची तयारी असेल तर परिस्थिती आडवी येत नाही हा आजच्या तरुणांना आपण आदर्श दिलेला आहे . यशाचे अतिउच्च शिखर गाठले असताना देखील , " ठेविले अनंत तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान " या उक्ती प्रमाणे आपण जगत आहात. आपल्यातील सामाजिक कार्याची जाणीव तर अत्यंत प्रेरणादायी आहे फार कमी लोक अशा प्रकारचे समाजकार्य करतात भिल्ल आदिवासी,समाजाच्या नागरिकांची आरोग्य सेवा,शिक्षणासाठी आश्रमशाळा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे उपक्रम वाखाणण्याजोगी आहेतच आपल्यातील आत्मविश्वास आणि प्रामाणिक कार्यासाठी अनेक हातांनी आपणास सहकार्य केले नव्हे तर अनेकांना आपले कार्यकर्तृत्व बघून सहकार्य करावे असे वाटले ही अभिमानास्पद बाब आहे आपल्या व्यवसायात आपण निष्णात तर आहातच पण त्या सोबत आपण जोपासलेली सामाजिक बांधिलकी वाचून मनभरून येते अनेकांवर आपण फ्री उपचार केले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष आहेत म्हणून शिक्षकांकडून फी न घेणे ,सर्व उपचार फी शिवाय करणे ,, पेशंट ला सर्व प्रकारे सहकार्य,प्रसंगी घरी जावून सर्जरी,एव्हढे धाडस करणारे सर मला वाटते आपणच एकमेव आहात. आपल्या लहानशा मुलाला एका दिव्यांग मुलाला मदत करावीशी वाटणे, बापाने ती पूर्ण करणे नव्हे तर दिव्यांग मुलाचा संसार थाटणे,त्याला स्वतःच्या पायावर उभे करणे, त्याच्या विवाहाचा स्वागत समारंभ आपल्या घरी आयोजित करणे ही बाब सर्वसामान्य माणसाला शक्य नाही त्यासाठी एका विशेष मनाची,आणि प्रेमाची आवश्यकता असते ती आपल्याकडे आपल्या कुटुंबीयांकडे आहे सामान्य नागरिक ते थेट अधिकारी,उद्योगपती ,यांच्याशी जुळलेली आपली नाड, प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीचे द्योतक आहे सर आपल्या या सेवाभावी वृत्तीने अनेक सेवाभावी संस्थांमध्ये आपल्याला काम करण्याची संधी चालून आली आणि आपण निरपेक्ष भावनेने या संधीचे सोने करीत त्या संस्था नावारूपाला आणल्या याचा निश्चितच अभिमान वाटतो. आपण कुटुंबवत्सल देखील आहात आपल्या दैनंदिन कामकाजातून , व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून कुटुंबाकडे ही तेव्हढेच लक्ष दिले यासाठी सौ मावशींचे योगदान देखील मानावे लागेल आपल्या मार्गदर्शन आणि संस्कारातून मुलांनी राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय खेळात प्राविण्य मिळवले सोबतच उच्च शिक्षणापासून देखील मागे राहिले नाहीत आणि आज उच्च पदावर कामकाज करीत आहेत ही आपल्या जाणीवेची आणि संस्काराची देण आहे सर आपल्या एकूणच यशात आणि उंचावलेल्या प्रगतीच्या आलेखात सौ मावशी चा उल्लेख केला नाही तर अपूर्णता जाणवेल." प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्री चा हात असतो" याची जाणीव देखील झालेली आहे ( मावशी म्हणजे लक्ष्मी ,सरस्वती आणि अन्नपूर्णा आहेत याची जाणीव आपल्या पुस्तकातील विचारातून झालेली आहेच) आपले मना सर्जना हे पुस्तक आजच्या तरुणाईने वाचले तर निश्चितच प्रेरणा मिळेल आणि वाचकांमध्ये वैचारिक परिवर्तन होईल. @ आर्थिक नियोजन आणि बचतीचा आपण दिलेला सल्ला मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. @ डॉ बाबा मुळे झालेली आपली ओळख चिरकाल स्मरणात राहील सर्जरीच्या निमित्ताने का असेना पण एका प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची भेट झाल्याचा मनस्वी आनंद आहे. आपण जळगावला आलात तर निश्चित माझ्याकडेही या...धन्यवाद... ...Read more

  • Rating Starसुषमा आत्माराम शार्दुल

    आदरणीय, डॉ. अनिल गांधी सर, सप्रेम नमस्कार मी सुषमा आत्माराम शार्दुल (लग्नानंतरची झारा इम्तियाझ शेख) सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात इंग्रजी हा विषय शिकवते. २०१५ साली माझ्या प्रेगनन्सीच्या काळात मी बऱ्याच डॉक्टरांची आत्मचरित्रे वाचली. त्यातले आपल आत्मचरित्र `मना सर्जना; मला खूपच आवडले. आपण बरीच पुस्तके वाचतो पण त्यातील ठराविक पुस्तके अशी असतात जी आपल्या मनात कायम घर करून जातात. `मना सर्जना` हे याच प्रकारातील पुस्तक (आत्मचरित्र) आहे. त्यावेळेस एखाद्या पुस्तकाविषयी लिहिणे मला सुचलेच नाही. म्हणून मागच्या वर्षापासून ही सुरवात केली आहे. पुस्तकाची प्रस्तावना तसेच आपले मनोगत वाचतांना मनाला एक आनंद व स्फूर्ती मिळते. आपल्यातील प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, गरिबांविषयी असणारे प्रेम, नाविन्यता, जीवनाचे त्रिमिती महत्त्व आणि असे अनेक गूण आपण वाचकापुढे सुंदर पद्धतीने मांडले आहेत. डॉ. ह. वि. सरदेसाई सरांनी प्रस्तावना खूप सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे. तुमच्यातील प्रामाणिकपणा व निर्मळता वाचकास तुमच्या सुरवातीच्या वाक्यानेच येऊन जाते. ``मी मनापासून लिहिलेली, मनातले सांगणारी `मना सर्जना` ही आत्मकथा वाचकापुढे सादर केली आहे. त्याची सर्जरी ज्याची त्याने करायची आहे. पण निदान मला कळावे ही इच्छा.`` सर, पुस्तकातील हे वाक्य मला लाख मोलाचे वाटले. आपले निर्णय व निश्चय आयुष्य घडविणारे असतात. पैशाने सुखाची सगळी साधनं विकत घेता येतात पण मनाचे सुख-समाधान नाही. प्रामाणिकपणा काय असावा, नितिमत्ता काय असावी किंवा एखाद्या गरजूची सेवा मनापासून कशी करावी या सर्वाचे चित्र पुस्तकातील प्रत्येक पानावर व प्रत्येक ओळीवर आहे. आजपर्यंत वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी हे आत्मचरित्र (मनासर्जना) अफलातून आहे. या चार वर्षांच्या काळात ठराविकच पुस्तकांचे शिर्षक लक्षात राहिले त्यातील एक रेखीव पुस्तक व कायम आठवणीत राहिल असेच हे आत्मचरित्र आहे. आमच्याकडे एका बक्षिस समारंभास बीआसी चे शास्त्रज्ञ आले होते. विद्यार्थ्यांना मोटिव्हेट करण्यासाठी त्यांनी एक अनमोल वाक्य म्हटले होते, ``जेव्हा आपण एखाद्या अनुभवी माणसाचे पुस्तक वाचतो म्हणजेच आपल्याला त्याचा ५० ते ६० वर्षांचा अनुभव मिळतो.`` मी या वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे. इतरांना सर्वतोपरी मदत करणे हे तुमच्या संस्कारातच आहे त्यामुळे तुमच्या संस्काराने तुमची मुले व त्यांची पुढची पिढी त्यावर पाऊल ठेवून पुढे जात आहे. डॉक्टर म्हणून व्यवसायातील नितीमत्ता किती महत्त्वाची आहे, केवळ पैसा हाच आयुष्याचा भाग नसून माणुसकी किती महत्त्वाची आहे याचे सुंदर उदाहरण म्हणजेच डॉक्टर अनिल गांधी यांचे जीवन असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. तुमच्या लिखाणात प्रेम, न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा हा ओतप्रोत भरलेला आहे. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल कितीही वाक्य लिहिली तरी ती कमी पडतील. व्यवसायापेक्षा आपण माणूसकी कशी जपली पाहिजे हे तुम्ही खरेच उत्तम पद्धतीने तुमच्या अनुभवातून दाखवून दिले आहे. तुमच्या ८०व्या वाढदिवसाचा फोटो पाहतानां मनात सहज एक प्रश्न निर्माण झाला जर डॉ. अनिल गांधी यांनी लहानपणापासून असा डॉक्टर होण्याचा निग्रह केला नसता तर ही फोटोतील सर्व मंडळी या पदापर्यंत पोहोचली असती का? एकट्या व्यक्तीच्या बदलाने किती पिढ्या बदलू शकतात याचे जीवंत उदाहरण म्हणजे डॉ. अनिल गांधी हे आहेत. विद्यार्थी दशेत व डॉक्टर झाल्यावरही तुम्ही इतरांना केलेली मदत ही खरेच वाखाणण्यासारखी आहे. तुमचे अर्थाविषयीचे विचार वेगवेगळ्या ट्रस्टसाठी केलेले मोलाचे सहकार्य, त्याग स्वत: एक डॉक्टर असतानासुद्धा, वैद्यकीय क्षेत्रातील नितीमत्ता कशी असली पाहिजे हे आणि असे सगळेच विचार वाचकास एक आदर्श व्यक्ती व विचारसरणी देऊन जातात. पुस्तक वाचताना अनेक प्रश्न मनांत होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकात मिळाली याचे मला समाधान आहे. तुमच्या साहित्य परिचय कोषातून पुस्तकांचे विषय व त्यातील थोडक्यात माहिती वाचल्यावर ती सर्वच पुस्तके माझ्या वाचनाच्या आवडीचीच आहेत. सर, तुमच्या लिखाणात बोलण्यात प्रचंड नम्रता, प्रेम, प्रामाणिकपणा, आपुलकी ओतप्रोत भरलेली आहे. अजय सरांची खेळातील व अभ्यासातील आवड यामुळे त्यांनी प्रगतीचे उंच शिखर गाठले आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. एकदा एका पुस्तकात मित्तल ग्रुप आणि श्री. मित्तल सरांविषयी वाचले होते. ५ ते ६ वर्षांपूर्वी जेव्हा मी पुण्यात आले होते तेव्हा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या नावाने बोर्ड होते. पण हेच तुमच्या पुस्तकांतून वाचताना थोडा अभिमान वाटला कारण आपल्या ओळखीची व्यक्ती यांसारख्या मोठ्या माणसांच्या परिचयाची आहे. मला अजून दोन गोष्टी आवर्जून नमूद कराव्याशा वाटतील एक म्हणजे मेहता पब्लिशिंग हाऊस आणि दुसऱ्या तुमच्या पत्नी. मेहता सरांचे तुमच्याशी असणारे नाते खूप सुंदर आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीच्या त्या पत्नी आहेत म्हणून त्या सुंदर आहेत हे म्हणणे चुकीचे आहे कारण तुमचे आयुष्य सुरळीत चालावे यासाठी त्यांनीही अपार कष्ट घेतले आहेत हेही तितकेच खरे हे मान्य करावे लागेल. श्रद्धा व अंधश्रद्धा याविषयीचे तुमचे विचार १०० टक्के बरोबर आहेत. पुस्तकात तुम्ही लिहिलेल्या बालपणीच्या आठवणी (गणित विषय) वाचकास त्यांच्या बालपणीची आठवण करून देतील. परंतु पुढच्या आयुष्यात तुमच्या स्वभावाने अनेक मंडळी (गरीब, श्रीमंत(मनाने) नामवंत) तुमच्याशी जोडली गेली हा भाग वेगळा. शेवटी इतकेच म्हणेन व्यवसायाने जरी आपण मोठे डॉक्टर असाल तरी डॉक्टर कम रायटर ही भूमिका तुम्ही चोख पार पाडली आह़े. तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा. वयाच्या ८०व्या वर्षी जेवढा तजेला आहे हा पुढेही राहील हीच प्रार्थना. ...Read more

  • Rating Star Loksatta 12-6-2010

    वैद्यकीय व्यवसायात ५० वर्षे पूर्ण केलेले निष्णात सर्जन डॉ. अनिल गांधी यांच्या आयुष्यातील विलक्षण अनुभवांचा समावेश असलेल्या अर्थातच डॉक्टरांच्या प्रांजळ आत्मकथनाचे ‘मना सर्जना’चे प्रकाशन उद्या शनिवार पुण्यात होत आहे. माढा येथे जन्म झालेल्या डॉ. गांधी ांचे पुस्तक केवळ त्यांचे आत्मकथन म्हणून नाही, तर गेल्या ५० वर्षांतील घडामोडींचे व वैद्यकीय क्षेत्रातील बदलाचा नोंद घेणारा दस्तावेज म्हणूनही महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, डॉक्टरांचे निकटचे मित्र आणि चरित्रलेखिका चित्रलेखा पुरंदरे अशा अनेक मंडळींच्या आग्रहातून डॉक्टर आपले अनुभव शब्दबद्ध करायला तयार झाले. चित्रलेखा पुरंदरे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन व संपादन केले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकामुळे डॉक्टरांचा संघर्ष तर वाचकांना समजेलच, त्याचबरोबर डॉक्टर अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार कसे ठरले व आपल्या व्यावसायिक निष्ठांचा विसर पडू न देता अनेक आव्हानांना ते सामोरे कसे गेले हेदेखील लक्षात येईल. पुण्यात अत्यंत गाजलेल्या मंजुश्री सारडा खून प्रकरणाशी डॉ. गांधी यांचा संबंध कसा आला व त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे सारडा खुनातील आरोपी शरद सारडा याला कशी शिक्षा झाली, या घटनाक्रमाची माहिती मिळते. ब. ना. भिडे यांच्यासारख्या कायदेपंडितासमोर डॉक्टरांनी कशी साक्ष दिली व त्यांच्या प्रश्नांच्या फैरींना कसे उत्तर दिले हे सारे यातून समजते. प्रत्येक बाब नियोजनबद्ध रीतीने करणे, इंटर्नशिप पुण्याऐवजी औरंगाबादला का केली, त्यातून काय फायदे झाले ते कळते. त्यापेक्षा डॉक्टर किती प्रारंभापासून नियोजन करत होते व शिस्त आणि नियोजनाचा कसा फायदा होतो हेदेखील समजते. सर्जन म्हणून आलेले अनुभव आणि एक सर्जनशील मनाला आलेल्या अनुभवाच्या सुसंवादाचे रूप म्हणजे हे आत्मकथन आहे. तुमचे पुस्तक वाचून प्रस्तावना लिहायची की नाही असे स्पष्टपणे सांगणाऱ्या डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी पुस्तक हातात घेतले आणि वाचूनच संपवले, मी प्रस्तावना लिहितो, अशी आशीर्वादात्मक दिलेली दाद, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी हस्तलिखित वाचले त्या सगळ्यांची पसंती, यामुळे हे पुस्तक वेगळे ठरले. एकदा पुस्तक लिहायचे ठरल्यावर डॉक्टरांनी अवघ्या एक वर्षात हे पुस्तक पूर्ण केले आहे. शब्दांकन करणाऱ्या चित्रलेख पुरंदरे यांनी या संदर्भात सांगितले की, डॉक्टरांची स्मरणशक्ती अफाट आहे. त्यांनी मला इतकी तपशिलवार माहिती दिली, की कुणीही थक्क होईल. मी त्यांच्या पेशंट्सना भेटले, त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली. प्रत्येक वेळी डॉक्टरांचा वेगळा पैलू मला जाणवला. केवळ स्वतःचे कौतुक करण्याचा त्यांचा कुठेही हेतू नाही. जे जसे घडले ते त्यांनी सांगितले. तसेच त्यांचा विविध विषयांचा अभ्यास व त्यांच्या आवडीचे विषय याबद्दलही त्यांनी यात लिहिले आहे. डॉक्टरांनी आदिवासींसाठी ‘आदिशक्ती’ ट्रस्टच्या माध्यमातून काम केले. आदिवासींसाठी आश्रमशाळा उभी करण्याचे ठरवले तेव्हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पन्नास लाख रुपयांची देणगी दिली. डॉक्टरांचे समाजकार्य बघून जगप्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीनिवास मित्तल यांनीही या कार्याला कशी मदत केली हे सारे या पुस्तकामुळे समजते. आपल्याकडील सुताराच्या ऑपरेशन व त्याच्या औषधासाठी स्वतःचे दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम खर्च करणाऱ्या अनिल गांधी यांच्यासारख्या निःस्पृह माणसाचा मित्तल यांच्यासारख्या कुबेराशी स्नेह कसा जुळला व वृद्धिंगत होत गेला हेही या पुस्तकातून कळते. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा कारभार, वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांना स्पर्श करणारं अर्धशतकाचं हे आत्मचिंतन केवळ एकाच माणसाचं न राहता गेल्या ५० वर्षांतील समाजजीवनातील बदलाचं सक्षमपणे आणि सजगपणे नोंद घेणारं ‘समाजचित्र’च रेखाटणारं पुस्तक ठरतं हे नक्की! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more