* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A-AMITABHCHA
  • Availability : Available
  • ISBN : 9789395477567
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE LEGENDARY ACTOR MR. AMITABH BACHHAN STARTED HIS CAREER ON SILVER SCREEN IN 1969. IN 2019-20 INDIAN CINEMA CELEBRATED THE GOLDEN JUBILEE OF HIS LARGER THAN LIFE CAREER. ON THAT OCCASION MR. G. B. DESHMUKH WROTE A SERIES IN DAILY SAKAL’S ‘SAPTARANG’ [SUNDAY EDITION]. THE SERIES WAS HIGHLY POPULAR AND CONTINUED FOR MORE THAN A YEAR WITH 62 CHAPTERS. HE DISCUSSED VARIOUS ANGLES AND ASPECTS OF AMITJI’S ACTING WITH REFERENCE TO HIS DIRECTORS, CO-ACTORS, DIALOGUE WRITERS, SINGERS ETC. HIS DIALOGUE DELIVERY MADE EVERY WORD POPULAR UTTERED BY HIM STARTING FROM ‘YE POLICE STATION HAI TUMHARE BAP KA GHAR NAHI’ TO THE MOST RECENT ‘ZUND NAHI TEAM KAHIYE’. WE SAW HIS DIALOGUES BECOMING PART OF DAILY LANGUAGE. WE SAW HIM GIVING JUSTICE TO SINGERS LIKE KISHOR KUMAR, MUHOMMAD RAFI ETC. WE THE CINEMA LOVERS BECAME PART OF AMITJI’S JOURNEY. BY DISCUSSING HIS CINEMAS, HIS ACTING PERFORMANCES, ON SCREEN INCIDENTS, HIS SONGS, DIALOGUES THE BOOK WILL GIVE A READER VERY NOSTALGIC FEELING. BECAUSE OUR CHILDHOOD, OUR YOUNG LIFE AND OUR EARLY OLD AGE. ALL ARE CONNECTED WITH THE MR. AMITABH BACHHAN.
१९६९ मध्ये अमिताभ बच्चन यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. या लार्जर दॅन लाईफ कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव २०१९-२० मध्ये झाला. त्या निमित्ताने जी. बी. देशमुख यांनी दै. ‘सकाळ’च्या रविवारीय ‘सप्तरंग’ पुरवणीत ‘अ-अमिताभचा’ हे सदर लिहिले. यातून पन्नास वर्षांत अमितजींनी वठवलेल्या उल्लेखनीय भूमिकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. सव्वा वर्षाच्या काळात ‘अ-अमिताभचा’ ह्या सदरात अमिताभजींच्या एकूण बासष्ठ भूमिकांची चर्चा त्यांनी केली. ‘ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही’ पासून सुरु झालेला त्यांच्या गाजलेल्या संवादांचा सिलसिला `झुंड नहीं टीम कहीये` पर्यंत सातत्याने सुरु आहे. त्यांनी म्हणलेले डायलॉग बोली भाषेचा भाग होताना आपण पाहिले . किशोर कुमार, रफी यांच्या गाण्यांचे पडद्यावर चीज होताना आपण पाहिले. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीशी सिनेमा रसिक समरस होत गेले त्या सगळ्या सिनेमांना, गाण्यांना, संवादांना, आणि अमिताभ यांच्या अभिनयाला उजाळा देणारे पुस्तक- ‘अ-अमिताभचा’.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #जीबीदेशमुख #अअमिताभचा #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE #AAMITABHCHA #GBDESHMUKH
Customer Reviews
  • Rating Starडाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

    परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.

  • Rating Starअर्चना चौधरी, पुणे.

    लेखक आणि माझ्यात एक दिर्घ जनरेशन गॅप आहे. त्यांनी १९८५ मध्ये कामाला सुरवात केली आणि मी तेव्हा जन्माला आले. पण अमिताभचे चित्रपट बघत मोठे झालो आम्ही... त्याची क्रेज वगैरे समजण्याच वय होतं, नव्हतं माहिती नाही, पण....दो और दो पांच, शोले, चुपके चूपके, ान, अमर अकबर अँथनी आजही मनाला आनंद देतात. चिनी कम, पिकू, उंचाई, गुडबाय बघताना त्यांचा स्तर अजूनही जाणवतो.. त्यांना कोरोना झाल्याचं कळताच प्रार्थनेसाठी हात जोडले गेले होते... पण तुमच्या पुस्तकातून जो अमिताभ भेटत आहे तो कोणीतरी वेगळाच वाटला. पुस्तकातलं एक प्रकरण वाचायचं आणि तो चित्रपट बघायचा असा सपाटा लावला आहे... सध्या माझी यु-ट्युब टाईम लाईन अमिताभ समर्पित झाली आहे. तुम्ही सांगितलेल्या जागा परत एकदा बघितल्या जातात. जुने चित्रपट बघताना लॉजिक थोड मागे टाकावं लागत. पण लार्जर दॅन लाईफ आनंद, ती क्रेज परत एकदा अनुभवायचा प्रयत्न करते आहे. पुस्तकांसाठी खूप खूप धन्यवाद. ...Read more

  • Rating Starधिरज देशमुख, अमरावती.

    `अ-अमिताभचा` हे पुस्तक मी दोन दिवसांपूर्वीच, वनिता समाज, राजकमल चौक, अमरावती येथून घेतले. जसे कोल्हापूर येथील "बच्चन वेडे कोल्हापुरी" तसेच आम्ही सुद्धा "बच्चन वेडे अमरावतीकर" मी फक्त पुस्तकांविषयीची प्राथमिक प्रस्तावना-रुपी लेखन-प्रपंच आणि आनंद,अभिमान व नमक-हराम, असा पान क्र. 12 पर्यंतचा प्रवास केला. एवढ्यावरच मला हा अभिप्राय दिल्यावाचून चैन पडणार नव्हती, म्हणून वही आणि पेन कधी हाती आले मलाच माझे कळले नाही. लैखकाप्रमाणेच आमच्या सुद्धा प्राथमिक जीवनातील किशोरवयीन ग्रंथी श्री. बच्चन साहेबांच्या सिनेमा-वरच पोसल्या गेल्यात.... सदरील पुस्तकामध्ये, वाचकाला सत्तरीच्या दशकातील अमिताभजींच्या आठवणीत खोलवर नेऊन ठेवणारी लेखकाची शब्द-रचना कमालीची आहे. ह्या पुस्तकामुळे (हो मी या पुस्तकांमुळेच म्हणेल) बच्चन साहेबांच्या सिनेमाचा पुन्हा एकदा आमच्या ड्राइंग हॉल ला तो दमदार आवाज निनांदवावा...या पेक्षा दुसरं काय हवंय. हा अनुभवरुपी ठेवा, लेखकाने आम्हा वाचकांपुढे ठेवल्या-बद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. मी पुन्हा एकदा लेखकाच्या नवीन आणि स्तुत्य उपक्रमास भरभरून शुभेच्छा देतो. ...Read more

  • Rating Starबाळकृष्ण गावडे.

    एखाद्या रहस्य कथे प्रमाणे सलगपणे हे पुस्तक वाचणे शक्यच नाही! एक लेख वाचला कि गेलो फ्लॅश बॅक मधे, बाहेर पडायला जरा वेळ लागतो, पुन्हा परत तेच. पुस्तकाच्या शिर्षका वरूनच आशय आपल्या लक्षात येतो व कुठेही निराशा होत नाही. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्टमांडणी, व आटोपशीर लेखन यामुळे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. लेखक महानायकाच्या प्रेमात असल्याचे पानोपानी जाणवते व लेखकाने ते लपवले किंवा त्याचा इन्कार देखील केलेला नाही. पण हे प्रेम आंधळं नाही, अमिताभ का आवडतो याचे असंख्य दाखलेच दिले आहेत. माझ्यासारख्या अमिताभ प्रेमी ला तर ही लेखमाला आवडणारच पण चुकून एखाद्या अभाग्याला या महानायका विषयी जास्त माहिती नसेल तर हे पुस्तक वाचल्यावर आपण कोणत्या आनंदाला आजवर मुकलो याची जाणीव होऊन नक्कीच नशिबाला दोष देईल. लेखक एके ठिकाणी लिहितात की सगळेच चांगले असल्यावर अजून काय चांगले शोधणार? तरीपण आपण निवडलेले सर्वच चित्रपट, त्यातील भूमिका व बारकावे याला तोड नाही. हृषीदा यांच्या निराळ्या अँग्री यंग मॅन ची तुम्ही ओळख करून दिलीत. अजून दोन चार `सौदागर` किंवा `मैं आझाद हुं` केले असते तर समांतर सिनेमा वाले उर बडवून घेत बसले असते! प्रत्येक लेख मुद्द्याला धरून आहे, नेमका आहे, व वेगळा आहे. लेखकाचे निरीक्षण अफलातून आहे, "तो धावला," पण प्रत्येकवेळी निराळा? हे जाणवायला खास नजर लागते, जी लेखकाकडे आहे. `जंजीर` आणि `खाकी` मधील पोलीस अधिकाऱ्याची तुलना तर लाजवाब! पा, पिकू, पिंक, चे विश्लेषण अप्रतिम. आमचे पण वय अमिताभला बघतच वाढले, पडद्यावर इतर कुणाकडे लक्ष देणे शक्यच नव्हते, या गडबडीत कित्येक गोष्टी आमच्या सामान्य नजरेतून निसटल्या ज्या इतक्या वर्षानंतर लेखकाने नजरेत आणून दिल्या. अमिताभ वर लिहिताना एकूणच सिनेमावर असलेले प्रेम व या विषयातील लेखकाचे ज्ञान नक्कीच दिसून येते. वन मॅन इंडस्ट्री, शेहेनशाह, स्टार ऑफ द मिलेनियम, आणि अशी अनेक बिरूद सार्थ ठरवताना हा माणूस कुठेही कमी पडत नाही. या महान कलाकारा बद्दल लेखकाच्या पोतडीत अजून बरेच काही असेल जे आम्हाला वाचायला नक्की आवडेल. ....... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more