* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL BHAG 3
  • Availability : Available
  • Translators : AVANTI MAHAJAN
  • ISBN : 9789386745132
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL II OFFERS MORE INSPIRING STORIES TO HELP YOU MASTER THE GAME WE CALL LIFE. TODAY`S TEENS HAVE EVER MORE ISSUES AND SOCIAL PRESSURES TO JUGGLE THAN YOUNG ADULTS JUST 20 YEARS AGO. THIS BOOK, LIKE ITS PREDECESSOR, CAN BE YOUR GUIDE - A BEACON IN THE DARKNESS, A SAFE HAVEN IN A STORM, A WARM HUG IN THE COLD AND A RESPITE FROM LONELINESS. THERE`S NO PREACHING AS TO WHAT YOU SHOULD AND SHOULDN`T DO. INSTEAD, THIS BOOK IS FULL OF TEENS SHARING THEIR EXPERIENCES ON LEARNING TO ACCEPT LIKE, BECOMING THE BEST PERSON YOU CAN BE, BEING HAPPY WITH WHO YOU ARE, AND LOVING YOURSELF - NO MATTER WHAT.
पौगंडावस्था हा माणसाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. पौगंडावस्था म्हणजे मानवी मनोव्यापारांच्या उत्कट भावांदोलनांची सुरुवात असते. तर अशा या उत्कट भावांदोलनांचं वास्तव आणि व्यामिश्र चित्रण ‘चिकनसूप फॉर टीन एज सोल भाग ३’मधील कथांमध्ये केलं आहे. यातील काही कथा पौगंडावस्थेतील प्रेमभावना अधोरेखित करतात, तर काही प्रेमातील विफलता अधोरेखित करतात. काही कथा करुण रसाचा प्रत्यय देतात, तर काही हळुवारपणाचा. पौगंडावस्थेतील मुलांनाही विपरीत परिस्थितीला सामोरं जावं लागतं, असाही सूर काही कथांमधून दिसतो. जसं व्यसनी पालक वाट्याला येणं, त्यांचे अत्याचार सोसायला लागणं, आई-वडिलांचा घटस्फोट, आई किंवा वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर सावत्र आई किंवा सावत्र वडिलांकडून छळ सोसावा लागणे, पाठच्या भावंडांची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागणे, भावंडांपैकी कोणाला कॅन्सर झाल्यामुळे ते दु:ख बघायला लागणे, आई-वडिलांपैकी कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे दु:ख होणे अशा वास्तवतेचाही प्रत्यय देणाऱ्या काही कथा आहेत. त्या मनाला चटका लावून जातात. यातील काही कथा अतूट मैत्रीच्या आहेत. तर काही मैत्रीत आलेल्या वितुष्टाच्याही आहेत. यातून मैत्र भावनेतील उत्कटता आणि मैत्री तुटल्यानंतर झालेलं दु:ख अशा दोन्ही छटा चित्रित केल्या आहेत. पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचं दर्शन घडवणाऱ्या या कथांचं हे संकलन वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरच्या भावभावनांचं उत्कट दर्शन घडवतं. साध्या, सोप्या भाषेतील या कथा वाचनीय अशाच आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHETEENAGESOULBHAG3 #CHICKENSOUPFORTHETEENAGESOULBHAG3 #चिकनसूपफॉरदटीनएजसोल -भाग #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AVANTIMAHAJAN #MARKVICTORHANSENKIMBERLYKIRBERGER "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 15-06-2018

    टीनएजर्सच्या मनाचा आरसा... टीनएजर्सनाच नव्हे, तर प्रौढ वाचकांनाही आपलेसे वाटणारे ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ हे पुस्तक म्हणजे, तारुण्याकडे झुकणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या मनाचा आरसाच आहे. यातल्या कथा छोट्या असल्या तरी मुलांच्या मनात खळबळ माजवण्याची आणित्यावर विचार करायला भाग पाडण्याची ताकद यांच्यात आहे. टीनएज म्हणजेच साधारण पौगंडावस्थेतलं वय. म्हणजे म्हणावं तर अल्लड आणि काहीसं परिपक्वतेच्या मार्गावर आलेलं. या वयात मुलांमुलींमध्ये अनेक मानसिक, शारीरिक, भावनिक आंदोलनं सुरू असतात. पौगंडावस्थेतल्या म्हणजेच टीनएजर्सच्या मनातली हीच आंदोलनं ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकाच्या तिसऱ्या भागात आपल्याला जवळून अनुभवता येतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या कोणत्याही मुलाला वा मुलीला आपल्याच वाटतील अशा या कथा आहेत. जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन आणि किम्बर्ली किर्बर्जर यांच्या चिकन सूप फॉर दे सोल या मूळ इंग्रजी सिरिजमधलं हे पुस्तक अवंती महाजन यांनी आपल्या खास शैलीत मराठीत अनुवादीत केलं आहे. टीनएजमध्ये असलेल्या मुलांच्या मनात शिरताना आलेले अनुभव पुस्तकाच्या चार भागात कथात्मक रूपात मांडले आहेत. कुटुंब, धडा शिकणे, बदल घडवताना आणि परिपक्व होताना अशा चार भागांत विभागलेलं हे पुस्तक टीनएजर्सच्या मनाचा ठाव घेतं, त्याचं सर्वांगसुंदर दर्शन घडवतं. पुस्तकातल्या ‘खुलं मन’, ‘ठसा’, ‘जास्त घट्ट जमीन’, ‘केवढ्याला पडलं’ यांसारख्या आणखीही काही कथा अशाच खूप काही देऊन जाणाऱ्या. आशयाला साजेशी अभिव्यक्ती आणि उत्कृष्ट, मनाला भावणाऱ्या अनुवादाची जोड यामुळे या कथांच्या माध्यमातून पौगंडावस्था उलगडत जाते. टीनएजर्सनाच नव्हे तर, प्रौढ वाचकांनाही आपलेसे वाटणारे हे पुस्तक म्हणजे, तारुण्याकडे झुकणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या मनाचा आरसाच आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या सगळ्याच कथा छोट्या असल्या तरीही मुलांच्या मनात खळबळ माजवण्याची आणि त्यावर विचार करायला भाग पाडण्याची ताकद यांच्यात आहे. कोणत्याही वयातल्या वाचकाला या पुस्तकातल्या प्रत्येक कथेत ‘मी’ नक्कीच दिसतो. वाचताना कुठे तरी ‘अरे, आपल्यालाही असं वाटलं होतं कधी तरी’ ही भावना वाचकाच्या मनात येते, तिथेच हे पुस्तक यशस्वी झाल्याचं समजतं. – चारुता बापट गानू ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.