VIKTOR E. FRANKL

About Author

Birth Date : 26/03/1905
Death Date : 02/09/1997


DR. VIKTOR FRANKL WAS A FAMOUS AUSTRIAN NEUROLOGIST AND PSYCHIATRIST. FROM 1940 TO 1942, HE SERVED AS THE CHIEF OF NEUROLOGY AT THE ROTHSCHILD HOSPITAL. HE SPENT THREE YEARS IN AUSCHWITZ AND OTHER CONCENTRATION CAMPS DURING WORLD WAR II.

डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल हे ऑस्ट्रियातील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट व सायकिअ‍ॅट्रिस्ट होते. १९४० ते १९४२, रॉथशिल्ड हॉस्पिटल येथे त्यांनी न्यूरॉलॉजी विभागाचे सर्वोच्च अधिकारी म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ऑशवित्झ आणि इतर काही यातनातळांवर तीन वर्षे घालवली. १९४६पासून १९७०पर्यंत ते व्हिएन्ना न्यूरॉलॉजिकल पॉलिक्लिनिक येथे मुख्य अधिकारी होते. हार्वर्ड येथे आणि पिट्सबर्ग, सॅन दिएगो आणि डॅलास या विद्यापीठात ते अतिथी प्राध्यापक होते. यु.एस. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांच्यासाठी लोगोथेरपी हा स्वतंत्र विभाग तयार केला. जगभरातील अनेक विद्यापीठांकडून त्यांना २९ डॉक्टरेट्स देऊन सन्मानित करण्यात आले आहे.द अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशन यांनी डॉ. फ्रॅन्कल यांना ऑस्कर फिस्टर पुरस्कार बहाल केला. फ्रॅन्कल यांची आतापर्यंत एकूण ३२ पुस्तके ३४ भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. जगातील पाचही खंडांमध्ये मिळून एकूण २०९ विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत. द अमेरिकन जर्नल ऑफ सायकिअ‍ॅट्रीच्या मताप्रमाणे, डॉ. फ्रॅन्कल यांचे कार्य म्हणजे फ्रॉइड आणि अ‍ॅडलरनंतरचे सर्वांत अर्थपूर्ण विचार आहेत. ऑस्ट्रियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. १९९५ साली व्हिक्टर फ्रॅन्कल यांना त्यांचे जन्मस्थळ व्हिएन्ना येथील सन्माननीय नागरिकत्व प्राप्त झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ARTHACHYA SHODHAT Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more