VIKTOR E. FRANKL

About Author

Birth Date : 26/03/1905
Death Date : 02/09/1997


DR. VIKTOR FRANKL WAS A FAMOUS AUSTRIAN NEUROLOGIST AND PSYCHIATRIST. FROM 1940 TO 1942, HE SERVED AS THE CHIEF OF NEUROLOGY AT THE ROTHSCHILD HOSPITAL. HE SPENT THREE YEARS IN AUSCHWITZ AND OTHER CONCENTRATION CAMPS DURING WORLD WAR II.

डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल हे ऑस्ट्रियातील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट व सायकिअ‍ॅट्रिस्ट होते. १९४० ते १९४२, रॉथशिल्ड हॉस्पिटल येथे त्यांनी न्यूरॉलॉजी विभागाचे सर्वोच्च अधिकारी म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ऑशवित्झ आणि इतर काही यातनातळांवर तीन वर्षे घालवली. १९४६पासून १९७०पर्यंत ते व्हिएन्ना न्यूरॉलॉजिकल पॉलिक्लिनिक येथे मुख्य अधिकारी होते. हार्वर्ड येथे आणि पिट्सबर्ग, सॅन दिएगो आणि डॅलास या विद्यापीठात ते अतिथी प्राध्यापक होते. यु.एस. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांच्यासाठी लोगोथेरपी हा स्वतंत्र विभाग तयार केला. जगभरातील अनेक विद्यापीठांकडून त्यांना २९ डॉक्टरेट्स देऊन सन्मानित करण्यात आले आहे.द अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशन यांनी डॉ. फ्रॅन्कल यांना ऑस्कर फिस्टर पुरस्कार बहाल केला. फ्रॅन्कल यांची आतापर्यंत एकूण ३२ पुस्तके ३४ भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. जगातील पाचही खंडांमध्ये मिळून एकूण २०९ विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत. द अमेरिकन जर्नल ऑफ सायकिअ‍ॅट्रीच्या मताप्रमाणे, डॉ. फ्रॅन्कल यांचे कार्य म्हणजे फ्रॉइड आणि अ‍ॅडलरनंतरचे सर्वांत अर्थपूर्ण विचार आहेत. ऑस्ट्रियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. १९९५ साली व्हिक्टर फ्रॅन्कल यांना त्यांचे जन्मस्थळ व्हिएन्ना येथील सन्माननीय नागरिकत्व प्राप्त झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ARTHACHYA SHODHAT Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more