* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE BITE OF THE MANGO
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184986327
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE ASTOUNDING STORY OF ONE GIRL`S JOURNEY FROM WAR VICTIM TO UNICEF SPECIAL REPRESENTATIVE. AS A CHILD IN A SMALL RURAL VILLAGE IN SIERRA LEONE, MARIATU KAMARA LIVED PEACEFULLY SURROUNDED BY FAMILY AND FRIENDS. RUMORS OF REBEL ATTACKS WERE NO MORE THAN A DISTANT WORRY. BUT WHEN 12-YEAR-OLD MARIATU SET OUT FOR A NEIGHBORING VILLAGE, SHE NEVER ARRIVED. HEAVILY ARMED REBEL SOLDIERS, MANY NO OLDER THAN CHILDREN THEMSELVES, ATTACKED AND TORTURED MARIATU. DURING THIS BRUTAL ACT OF SENSELESS VIOLENCE THEY CUT OFF BOTH HER HANDS. STUMBLING THROUGH THE COUNTRYSIDE, MARIATU MIRACULOUSLY SURVIVED. THE SWEET TASTE OF A MANGO, HER FIRST FOOD AFTER THE ATTACK, REAFFIRMED HER DESIRE TO LIVE, BUT THE CHALLENGE OF CLUTCHING THE FRUIT IN HER BLOODIED ARMS REINFORCED THE GRIM NEW REALITY THAT STOOD BEFORE HER. WITH NO PARENTS OR LIVING ADULT TO SUPPORT HER AND LIVING IN A REFUGEE CAMP, SHE TURNED TO BEGGING IN THE STREETS OF FREETOWN. IN THIS GRIPPING AND HEARTBREAKING TRUE STORY, MARIATU SHARES WITH READERS THE DETAILS OF THE BRUTAL ATTACK, ITS AFTERMATH AND HER EVENTUAL ARRIVAL IN TORONTO. THERE SHE BEGAN TO PULL TOGETHER THE PIECES OF HER BROKEN LIFE WITH COURAGE, ASTONISHING RESILIENCE AND HOPE.
ही कहाणी आहे सिएरा लिओन देशातल्या छोट्याशा वस्तीत राहणा-या मारिआतू कामाराची. सरकारविरुद्धच्या असंतोषातून बंडखोरांनी पुकारलेल्या युद्धात गावंच्या गावं उद्ध्वस्त होत असतात... संघर्षाच्या वणव्यात निष्पाप रहिवाशांच्या आयुष्याची होळी होत असते... बंडखोर युद्धाच्या उन्मादात निरागस लोकांची हत्या करतात... त्यांचा अनान्वत छळ करतात.अशा युद्धजन्य परिस्थितीच्या दुष्टचक्रात तेरा वर्षांची कोवळी मारिआतू सापडते. युद्धज्वर चढलेले बंडखोर तिचे दोन्ही हात निर्दयपणे छाटून टाकतात. उमलत्या वयातच तिचं आयुष्य विदीर्ण होतं. हालअपेष्टा, आक्रोश, वेदना आणि असाहाय्यता हेच प्राक्तन स्वीकारून तिचा थरारक प्रवास सुरू होतो...परावलंबित्वाकडून स्वावलंबनाकडे...त्या प्रवासाची ही कहाणी! पत्रकार सुसान मॅक्लेलँड यांनी मारिआतूशी अनेक वेळा संवाद साधून तिची ही चित्तथरारक आत्मकथा शब्दांकित केली आहे. आपला यातनादायी प्रवास सांगताना मारिआतूच्या नजरेसमोर असतो, जंगलातला पिकलेला आंबा... जगण्याची उमेद देणारा! मारिआतूनं आपलं आयुष्य फक्त सावरलचं नाही, तर उभारलं... राखेतून झेप घेणा-या फिनिक्ससारखं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SUNANDAAMARAPURKAR #VEDNECHIPHULE # MARIATUKAMARA #SUSANMCCLELLAND #THEBITEOFTHEMANGO
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more