* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GEORGE`S PET PIG BREAKS THROUGH THE FENCE INTO THE GARDEN NEXT DOOR - INTRODUCING HIM TO HIS NEW NEIGHBOURS: THE SCIENTIST, ERIC, HIS DAUGHTER, ANNIE AND A SUPER-INTELLIGENT COMPUTER CALLED COSMOS. AND FROM THAT MOMENT GEORGE`S LIFE WILL NEVER BE THE SAME AGAIN, FOR COSMOS CAN OPEN A PORTAL TO ANY POINT IN OUTER SPACE. . . WRITTEN BY SCIENCE EDUCATOR LUCY HAWKING AND HER FATHER - THE MOST FAMOUS SCIENTIST IN THE WORLD - AND ILLUSTRATED BY GARRY PARSONS, GEORGE`S SECRET KEY TO THE UNIVERSE WILL TAKE YOU ON A ROLLER COASTER RIDE THROUGH SPACE TO DISCOVER THE MYSTERIES OF OUR UNIVERSE.
‘जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिव्हर्स’ हे पुस्तक म्हणजे जॉर्ज या शाळकरी मुलाच्या अपूर्व धाडसाची आणि त्याच्या हुशारीची कथा आहे. जॉर्जच्या शेजारी एरिक नावाचे वैज्ञानिक राहायला येतात. त्यांची लहान मुलगी अ‍ॅनी आणि कॉसमॉस हा त्यांचा सुपर कॉम्प्युटर यांच्यासह ते राहत असतात. जॉर्जची एरिक आणि अ‍ॅनीशी घनिष्ठ मैत्री होते. ‘कॉसमॉस’मुळे अंतराळात जाणं एरिक आणि अ‍ॅनी यांना अगदी सहजसाध्य असतं. अ‍ॅनी एरिकच्या चोरून एकदा जॉर्जलाही अंतराळाची सफर घडवते. जॉर्जच्या शाळेतील एक शिक्षक डॉ. रीपर एरिकच्या विरोधात असतात. एरिकची दिशाभूल करून ते एरिकना अंतराळात पाठवतात आणि कॉसमॉसला चोरून नेतात. एरिकचा जीव धोक्यात आहे, हे जॉर्जला समजतं. तो एरिकना वाचवण्यासाठी काय करतो? डॉ. रीपर आणि एरिकमध्ये कोणत्या कारणामुळे शत्रुत्व असतं? जॉर्ज रीपरकडून कॉसमॉसला कसा हस्तगत करतो...याची उत्कंठापूर्ण कहाणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#PRAMODJOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #LUCYHAWKING #STEPHENHAWKING #GEORGESANDBIGBANG #जॉजअँडदबिगबँग #SCIENCEFICTION #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI"
Customer Reviews
  • Rating StarIshwari soliwal

    I like thise book very mach but I don` t undrestant english .😞😞😞

  • Rating StarLOKPRABHA 17-05-2019

    जॉर्जबरोबर विश्वाची सफर... अवकाशाविषयीच्या आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत मानवाने विश्वाच्या पोटातील असंख्य रहस्ये खणून काढली आहेत. तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’चे लेखक, प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग आणि त्यांची मुलग ल्युसी हॉकिंग यांनी मिळून लिहिलेले हे पुस्तक अशा प्रश्नांची उत्तरे देते. एखादे शाळेत शिकू लागणारे लहान मूल त्याच्या भोवतालच्या वातावरणातून, घरात मिळणाऱ्या शिकवणीतून आणि निरीक्षणांमधून खूप काही शिकत असते. घरात ज्या गोष्टींना प्रतिबंध आहे अशा गोष्टींविषयी तर मुलांना जास्तच उत्सुकता असते. अवकाशासंबंधीच्या प्रश्नांनी मुलांनी उत्सुकता दाखवली ते, लहानांच्या या प्रश्नाला मोठ्यांना लहानांच्या पचनी पडेल असे उत्तर देताच येत नाही, कारण वैज्ञानिक भाषेतले उत्तर अगदी कठीण, मग हे देवाने तयार केले असे काहीतरी सांगून वेळ मारून नेली जाते. पण त्याऐवजी सोप्या भाषेत हे मुलांना समजले तर त्यामुळे मुलांच्या उत्सुकतेला खतपाणीच घातले जाते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे काहीतरी विज्ञान - खगोलशास्त्राचे कठीण पुस्तक आहे अशा आविर्भावात न शिरता एका मुलाच्या गोष्टीतून सुरुवात होते. जॉर्ज नावाच्या लहान मुलाचे आईवडील त्याने कायम नैसर्गिक गोष्टीतून शिकावे असाच विचार करत असतात. जॉर्जला नैसर्गिक वातावरणात वाढवायचे म्हणून कॉम्प्युटर, मोटार यापासून त्याला दूर ठेवलेले असते. एवढेच काय, त्यासाठी त्यांनी अगदी घरात वीजसुद्धा घेतलेली नसते. अशा वेळी आत्ताच्या विज्ञानाच्या जगात त्याला अनेक प्रश्न पडणे स्वाभाविक असते. त्याच्या प्रश्नांना वाव मिळते ती शेजारी असलेल्या विज्ञानप्रेमी घरात अपघातानेच शिरल्यावर. या कथेच्या पार्श्वभूमीला धरून ‘जॉर्जेस सिक्रेट की टू युनिव्हर्स’ या पुस्तकात विज्ञानाची वेगवेगळी अनेक रहस्ये अगदी सहजतेने उलगडून दाखवली आहेत. गोष्ट जसजशी पुढे सरकते तसे जॉर्जच्या कुतूहलातून आपल्यालाही अनेक माहीत नसलेल्या गोष्टी समजतात. अगदी ग्रह तारे म्हणजे काय इथपासून ते ताऱ्यांचा जन्म कसा होतो, दीर्घिका म्हणजे नेमके काय, पृथ्वी-चंद्र यांच्याविषयीची अगदी सखोल माहिती, प्रकाश, त्याचा वेग आणि त्या अनुषंगानेच आपल्याला माहिती होत जाणाऱ्या इतर गोष्टी, ज्या खरंतर आपल्याला शाळेत शिकवलेल्या असतात, पण त्यातल्या क्लिष्ट भाषेमुळे आणि अभ्यासाच्या धाकामुळे त्यातली रंजकता कधी कळतच नाही अशा अनेक गोष्टी यातून नव्याने आपल्याला कळतात. जॉर्जच्या गोष्टीसोबत त्याव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या ज्या लहान लहान चौकटी आहेत, त्यामध्ये गोष्टीत येणाऱ्या विषयाची आणखी तपशीलवार माहिती दिली आहे, ती संग्राह्य आहे. कथा जसजशी पुढे जाते तसे जॉर्जचे कुतूहल आणि त्याचे कल्पनाविश्व विस्तारत जाते. त्याला मिळालेल्या नवीन मैत्रिणीच्या कॉसमॉस या संगणकावर ते खूप नव्या गोष्टी शिकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने तो अवकाशातल्या कितीतरी गोष्टी अक्षरश: अनुभवतो. ही माहिती त्याला देणारे वैज्ञानिक एरिक त्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी उत्साहाने त्याला देतात. याच वेळी एरिक यांचं बाह्य अवकाशाबद्दल संशोधन सुरू असतं आणि एकदा तर चक्क कॉसमॉस या संगणकाच्या मदतीने जॉर्ज अवकाशाची सफरसुद्धा करून येतो. जॉर्जची ही माहितीची सफर त्याला आईवडिलांना, इतर शाळासोबत्यांना माहीत नसते. या सफरीमध्ये आपल्या कुतूहलापोटी जॉर्ज कधी कधी आपला जीवही धोक्यात घालतो. जॉर्जच्या शाळेत एकीकडे विज्ञान स्पर्धा सुरू झालेली असते, ज्याचं बक्षीस असतं, एक कॉम्प्युटर पण जॉर्जच्या पालकांना मात्र जॉर्जने या सगळ्यापासून दूर राहावे असेच वाटत असते. तरीही तो या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवतो, मग या स्पर्धेचे काय होते? जॉर्जला कॉम्प्युटर मिळतो का? हे प्रश्न एकीकडे, तर दुसरीकडे एरिक यांच्यासोबत अंतराळात जाऊ लागलेला जॉर्ज तिथे जाऊन काय काय अनुभवतो? कोणकोणत्या धोक्यांना तोंड देतो अशा अगदी गुंग करून टाकणाऱ्या प्रसंगांसोबत जॉर्जच्या निमित्ताने आपल्यालाही या सफरीचा भाग होता येते. जॉर्ज या विश्वात असताना ज्या एरिक यांनी जॉर्जला हे सगळं विश्व दाखवलेलं असतं, त्यांना कुणीतरी त्यांच्यावर असलेल्या रागातून कायमचे नष्ट करण्याचा डाव आखत असतं. एरिकचे बाह्यविश्वाच्या संशोधनाचे काम सुरू असतानाच त्यांना एका कृष्णविवरात अडकण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग नव्याने विज्ञान शिकणाऱ्या जॉर्जला एरिक यांना बाहेर काढायचे साहस करावे लागते. हे वाचताना अगदी थरारक प्रसंगांचा अनुभव मिळतो. विज्ञान आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या मुलांसाठीही ही कादंबरी म्हटली तर अगदी वैज्ञानिक, म्हटली तर अगदी ‘फिक्शन’, शाळेतील विज्ञान क्लिष्ट वाटणाऱ्या मुलांना हे पुस्तक वाचून त्यात नक्की रस निर्माण होईल अशाच पद्धतीने या पुस्तकाची मांडणी आहे. मुलांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. –विशाखा कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 02-12-2018

    मुलांसाठी ज्ञानवर्धक विज्ञान कादंबरी... ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या पुस्तकाचे लेखक जागतिक कीर्तीचे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे नुकतेच मार्च महिन्यात निधन झाले. ते आणि त्यांची मुलगी ल्यूसी हॉकिंग यांनी एकत्रितपणे लहान मुलांसाठी काही विज्ञा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’तर्फे त्यांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पहिली कादंबरी म्हणजे ‘जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिव्हर्स’ ही होय. या कादंबरीतून मूलभूत विज्ञान आणि विशेषत: भौतिक विज्ञानातील अनेक संकल्पना या पुस्तकात त्यांनी अतिशय सोप्या करून सांगितल्या आहेत. कादंबरीचा नायक जॉर्ज आणि त्याची मैत्रीण अ‍ॅनी यांच्या माध्यमातून घडलेली ही सफर उत्कंठावर्धक करताना विज्ञानातील तथ्यं दर्जाशी तडजोड न करता लेखकद्वयीने मुलांसमोर ठेवली आहेत. या पुस्तकातील रंजकतेमुळे वाचक त्यात हरवून जातो. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 11-11-2018

    हॉकिंगची दुसरी विज्ञान कादंबरी... जागतिक कीर्तीचे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि त्यांची मुलगी ल्यूसी हॉकिंग यांनी एकत्रितपणे बालवाचकांसाठी लिहिलेलं ‘जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट’ हे पुस्तक म्हणजे ‘जॉर्जेस सिक्रेट टू द युनिव्हर्स’ या यशस्वी पु्तकानंतरचं दुसरं पुस्तक. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’तर्फे याचाही मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला असून, डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी तो केला आहे. जॉर्जच्या धाडसांच्या मालिकेतील हे दुसरं पुस्तकही पहिल्याइतकंच मनोरंजक आणि मूलभूत विज्ञानाची उत्कृष्ट माहिती देणारे आहे. मूलभूत विज्ञान आणि विशेषत: भौतिक विज्ञानातील अनेक संकल्पना या पुस्तकात त्यांनी अतिशय सोप्या करून सांगितल्या आहेत. या विज्ञान कादंबरीत अनेक ठिकाणी महान वैज्ञानिकांबद्दल संदर्भ आले आहेत. जॉर्जची ही पुढची साहससफर वाचकांना नक्कीच आवडेल अशी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more