DR.SANJAY DHOLE

About Author

Birth Date : 06/11/1965


DR. SANJAY DHOLE, PRESENTLY WORKING AS A SENIOR PROFESSOR OF PHYSICS IN THE DEPARTMENT OF PHYSICS AND DIRECTOR, ALUMNI AFFAIRS OF SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY. HIS RESEARCH AREA IS IN NUCLEAR, ACCELERATOR, RADIATION PHYSICS AND NANOMATERIALS AND HAS PUBLISHED MORE THAN 300 RESEARCH PAPERS IN INTERNATIONAL REPUTED JOURNALS. 29 AND 16 STUDENTS HAVE OBTAINED THEIR RESPECTIVE PH.D. AND M.PHIL. DEGREES UNDER HIS GUIDANCE. DR. DHOLE HAS ALSO INVOLVED IN WRITING SCIENCE FICTIONS AND GENERAL ARTICLES AND AT PRESENT SIX BOOKS OF SCIENCE FICTIONS ARE AT HIS CREDIT. HE HAS ALSO PUBLISHED MORE THAN 500 SCIENTIFIC ARTICLES IN VARIOUS NEWSPAPER, SUPPLEMENTS AND MAGAZINES. HIS SCIENCE FICTIONS AND ARTICLES ARE ALSO A PART OF ACADEMIC CURRICULA IN VARIOUS UNIVERSITIES AND SOME STUDENTS ARE ALSO CARRYING OUT THEIR PH.D. WORK ON HIS LITERATURE. HE HAS BEEN AWARDED 11 CREDENTIAL AWARDS IN LITERATURE INCLUDING TWO FROM GOVERNMENT OF MAHARASHTRA AND ONE FROM INDIAN PHYSICS ASSOCIATION.

पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. व सध्या विद्यापीठाच्याच भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत. न्यूक्लिअर, प्रवेगक, किरण, स्मृतिपटले, अर्धवाहक पदार्थ, निर्वाहक पदार्थ, स्फटिके यांसारख्या भौतिकशास्त्रातील उपशाखांमधून संशोधन सुरू. संशोधनानिमित्त विविध देशांमध्ये वास्तव्य व तेथील नामवंत संशोधन संस्थांशी आणि विद्यापीठांशी देवाण-घेवाण. पीएच.डी. (१९) व एम. फिल. (११)च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; शिवाय आठ विद्यार्थी पीएच.डी.साठी कार्यरत. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून १०० हून अधिक संशोधनपेपर प्रकाशित. शैक्षणिक पुस्तकातही लेखन सहभाग. सध्या इंडियन फिजिक्स असोसिएशन (पुणे चॅप्टर)चे अध्यक्ष. जनसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून २०० शास्त्रीय लेख प्रसिद्ध. तसेच आकाशवाणीवरून नाते निसर्गाशी व अणूपासून ताऱ्यापर्यंत या मालिकेअंतर्गत शास्त्रीय श्रुतिका व नभोनाट्य प्रसारित. शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांमध्ये शास्त्रावरील व्याख्याने. विविध वर्तमानपत्रे आणि दिवाळी अंकांमधून ९०हून अधिक विज्ञानकथांचे लेखन. प्रतिशोध व प्रेमाचा रेणू आणि अश्मजीव नावाचे विज्ञानकथासंग्रह प्रसिद्ध. मराठीतील विज्ञानकथा, दरवळ, मोहर, यांनी घडवलं सहस्रक यांसारख्या संपादित प्रकाशनात सहभाग. अंतराळातील मृत्यू या विज्ञानकथेचा पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश, प्रेमाचा रेणू या विज्ञानकथा संग्रहाचा पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात (शैक्षणिक स्वायत्तता) समावेश. सोन्याची खाण या विज्ञानकथेस अखिल भारतीय बाल-कुमार साहित्य संमेलनातर्फे दिला जाणारा गोपीनाथ तळवलकर उत्कृष्ट कथा पुरस्कार (२००५), र. धों. कर्वे, ललित विज्ञान वाङ्‌मयीन पुरस्कार प्रेमाचा रेणू या विज्ञान कथासंग्रहास (२००८). महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड संचालित न. चिं. केळकर ग्रंथालयाचा साहित्य साधना पुरस्कार प्रेमाचा रेणू या विज्ञानकथा संग्रहास (२०१०). अश्मजीव या विज्ञानकथा संग्रहास संत तुकडोजी महाराज ललित विज्ञान वाङ्‌मय पुरस्कार, (२०११). मराठीतून विज्ञान प्रसारासाठी इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे मो. वा. चिपळोणकर पुरस्कार (२०१३). महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेतर्फे विज्ञानविषयक लेखनासाठी गो. आ. परांजपे विशेष ग्रंथकार पुरस्कार, (२०१५).
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 14 total
ANTARALATIL MRUTYU Rating Star
Add To Cart INR 195
ASHMAJEEV Rating Star
Add To Cart INR 240
AVAKASHATIL DOOT ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 275
DIMBHAK Rating Star
Add To Cart INR 195
DR.SANJAY DHOLE COMBO SET - 13 BOOKS Rating Star
Add To Cart INR 3510
DURCHE PRAVASI ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 275
KHUJABA Rating Star
Add To Cart INR 330
PATHLAG ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 275
PLANTON Rating Star
Add To Cart INR 595
PREMACHA RENU Rating Star
Add To Cart INR 200
RAFINOO Rating Star
Add To Cart INR 220
SANKARIT Rating Star
Add To Cart INR 195
12

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more