SHUBHADA GOGATE

About Author

Birth Date : 02/09/1943
Death Date : 24/01/2026


SHUBHADA GOGATE HAS BEEN WRITING ON VARIOUS TOPICS IN VARIOUS LITERARY PUBLICATIONS FOR ABOUT TWENTY FIVE YEARS. HIS STORIES, NOVELS, ARTICLES ETC. IN MANY SUBJECTS LIKE SCIENCE, HISTORY, MYSTICISM, HEALTH ETC. THE MATERIAL IS PUBLISHED AND ACCREDITED. YANTRARAYANI, HIS FIRST SCIENCE FICTION NOVEL, WON THE MAHARASHTRA GOVERNMENT AWARD FOR BEST SCIENCE FICTION IN 1983.

शुभदा गोगटे सुमारे पंचवीस वर्षे विविध साहित्य प्रसारांमध्ये विविध विषयांवर लेखन करीत आहेत. विज्ञान, इतिहास, गूढ, आरोग्य अशा अनेक विषयांमध्ये त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख इ. साहित्य प्रकाशित झालेले आहे आणि मान्यता मिळवून गेलेले आहे. यंत्रायणी या त्यांच्या पहिल्याच विज्ञानकादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट विज्ञान काल्पनिकेचा १९८३ चा पुरस्कार प्राप्त झाला होता. नॅशनल बुक ट्रस्टने सर्व भारतीय भाषांमधील उत्तम विज्ञानकथांच्या इंग्रजी भाषांतराचे संकलन प्रसिध्द केले; त्यात त्यांची वसुदेवे नेला कृष्ण ही गाजलेली कथा समाविष्ट केलेली आहे. भारतीय रेल्वेच्या पार्श्वभूमीवर असलेल्या त्यांच्या खंड्याळ्याच्या घाटासाठी या ऐतिहासिक कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा आणि गो.नी. दांडेकर पुरस्कृत मृण्मयी पुरस्कार मिळाले. त्याचाच पुढचा भाग असलेली दुसरी कादंबरी सांधा बदलताना हिला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आरोग्य विषयक लेखनामध्ये त्यांचे हृदयविकार निवारण हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरले.
Sort by
Show per page
Items 1 to 8 of 8 total
ASMANI Rating Star
Add To Cart INR 240
CHALA JANUN GHEU YA FENG SHUI Rating Star
Add To Cart INR 60
CHALA JANUN GHEU YA SUKH Rating Star
Add To Cart INR 60
GHAR Rating Star
Add To Cart INR 220
HRIDAYVIKAR NIVARAN Rating Star
Add To Cart INR 400
NIRAMAY YASHASATHI DHYAN Rating Star
Add To Cart INR 140
SANDHA BADALTANA Rating Star
Add To Cart INR 350
VASUDEVE NELA KRISHNA Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more