* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619665
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 1947
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT HAS NOTHING TO DO WITH TODAY`S SYMBOLISM AND THE MYSTICISM IT CREATES. SIMILARLY, ONE MORE THING I LIKED IN THAT POEM. IT IS THAT THE POET DOES NOT WANT TO TEACH THE READER ANYTHING. ONE MORE THING TO BE MENTIONED IS THAT THE GROTESQUE WORSHIP THAT HAS CREPT INTO MARATHI LITERATURE HAS NOT YET HAD ANY EFFECT ON THIS POEM. ALTHOUGH THERE IS A LOT OF LOOSE DECORATION IN THIS POEM, THERE IS NO NEW GENDER SECT IN IT. IT IS, IT IS ONLY, STRAIGHT, PURE, INNOCENT SOUL-SEARCHING!...`
‘...शांताबाईंची कविता मला आवडते; आणि मनापासून आवडते. तिच्यामध्ये जी सहजता आणि प्रसन्नता आहे, ती आजकालच्या इतर काव्यात क्वचितच पाहावयास मिळते. तीमध्ये त्यांच्या मनातील अर्थ अगदी स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला असतो. तो मजावून घेण्यासाठी तिजबरोबर झटापट करावी लागत नाही. आजकालचा प्रतीकवाद आणि त्यामुळे निर्माण होणारे गूढगुंजन तीमध्ये मुळीच नाही. त्याचप्रमाणे आणखीही एक गोष्ट मला त्या कवितेमध्ये आवडली. ती अशी, की कवयित्रीच्या मनात वाचकाला काहीही शिकवावयाचे नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे प्रेषिताचे अवसान तिने आणलेले नाही. तिसरी समाधानाची गोष्ट अशी, की शांताबाईंना आपल्या कवितेमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रांतिकारकत्वाचा अधिकार सांगावयाचा नाही, की वाचकाला धक्के देऊन त्याला जागृत करण्याची महत्त्वाकांक्षाही त्यांनी धरलेली नाही. आणखीही एका गोष्टीचा उल्लेख करावयाचा, म्हणजे मराठी वाङ्मयात डोकावू पाहणाया विकट (GROTESQUE) पूजेचा या कवितेवर काहीही परिणाम अद्यापि झालेला नाही. या कवितेत मोकळा शृंगार पुष्कळच असला, तरी नव्याने येऊ पाहणारा लिंगसंप्रदाय तीमध्ये मुळीच नाही. आहे, तो केवळ, सरळ, शुद्ध, निरागस आत्माविष्कार!...’ –रा. श्री. जोग
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VARSHA #SHANTA #J #SHELAKE #KAVITA #SANGRAH #MI #VIFAL #AAS #PAUS #SRUSHTI #ANI #MI #HIRVAL #PRABHAT #SWAPNA #ANI #JAGRUTI #SHRADDHA #DUPAR #वर्षा #शान्ता #ज. #शेळके #कवितासंग्रह #मी #विफल #आस #पाऊस #सृष्टि #आणि #मी #हिरवळ #प्रभात #स्वप्न #आणि #जागृति #श्रद्धा #दुपार
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-07-2001

    शांत, सौम्य, संयत... शांताबाई शेळके हे नाव मराठी वाचकाला अत्यंत परिचित आहे. शांताबार्इंची कविता असो वा लेख, आपल्याला प्रसन्न, टवटवीत, शैलीदार आणि सकस असं काहीतरी वाचायला मिळणार याची वाचकाला खात्रीच असते. प्रस्तुत ‘वर्षा’ हा शांताबार्इंचा प्रकाशित झलेला पहिला काव्यसंग्रह. १९४७ साली त्याची पहिली आवृत्ती निघाली होती. त्यानंतर तब्बल त्रेपन्न वर्षांनी आता ही दुसरी आवृत्ती निघते आहे. शांताबार्इंवर ‘रविकिरण मंडळा’चा नि त्यातही माधव ज्युलियन यांच्या कवितेचा फार प्रभाव तेव्हा होता. प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या सुरुवातीच्या मनोगतात त्यांनी स्वत:च ही गोष्ट सांगून टाकली आहे. प्रत्यक्षात कविता वाचतानाही आपल्याला जाणवतं की, ‘कवयित्री अद्याप माधव ज्युलियन यांच्या प्रभावाखाली आहे. माधव ज्युलियनांच्या काव्याचं विशिष्ट वळण इथे ठायी ठायी डोकावतं. पण त्याचवेळी कवयित्रीचं आपलं असं काही खास वळणही दिसून येतं. माधवरावांच्या काव्यातला फारसीचा वापर इथे जराही नाही. काव्यसंग्रहाच्या ‘वर्षा’ या नावावरूनच लक्षात येईल की, कवयित्री निसर्गवेडी आहे. निसर्गाच्या सौम्य, शांत, सुंदर रूपाचं वर्णन करणाऱ्या बऱ्याच कविता इथे आहेत. ते ते विशिष्ट निसर्गचित्र रसिकांसमोर नुसतं उभं राहत नाही तर आपण स्वत:च त्या निसर्गचित्रातले एक आहोत; काव्यात वर्णिलेला तो प्रसन्न, हिरवाकंच निसर्ग आपल्याच हृदयात कुठेतरी फुलतो आहे असा रम्य अनुभव वाचकाला येतो आणि हेच तर शांताबार्इंच्या शब्दकळेचं सामर्थ्य आहे. त्यावेळी उदयोन्मुख असलेल्या एका कवयित्रीच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रा. रा. श्री. जोगांसारख्या दर्दी समीक्षकाची प्रस्तावना लाभते यात बरंच काही आलं. प्रा. जोगांची ही प्रस्तावना अगदी नेमक्या शब्दांत शांताबार्इंच्या लेखनातली सारी सौंदर्यस्थळं, सारी सामर्थ्य वाचकांसमोर ठेवते. प्रा. जोग लिहितात, ‘शांताबार्इंची कविता मला आवडते आणि मनापासून आवडते. तिच्यामध्ये जी सहजता आणि प्रसन्नता आहे, ती आजकालच्या इतर काव्यात क्वचितच पाहायला मिळते. तीमध्ये त्यांच्या मनातील अर्थ अगदी स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला असतो. तो समजावून घेण्यासाठी तिजबरोबर झटापट करावी लागत नाही. या कवितेत प्रतीकवाद आणि गूढगुंजन मुळीच नाही. कवयित्रीच्या मनात वाचकाला काहीही शिकवावयाचे नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे प्रेषिताचे अवसान तिने आणलेले नाही. या कवितेत मोकळा शृंगार खूप असला तरी नव्याने येऊ पाहणारा लिंगसंप्रदाय तीमध्ये मुळीच नाही. आहे, तो केवळ सरळ, शुद्धा, निरागस आत्माविषकार!’ १९४७ साली लिहिलेली ही प्रस्तावना आणखी शंभर टक्के समर्पक आहे. प्रा. जोगांनी वर्णिलेले गुण शांताबार्इंच्या लेखणीने आजही जसेच्या तसे जपलेले आहेत किंबहुंना व्यासंग, चिंतन आणि अनुभव यांनी ते गुण अधिकच तेजाळले आहेत. त्याचप्रमाणे दुर्बोधता, प्रेषिताचा आव, गूढगुंजन आणि लिंगसंप्रदाय आदी गुणांचा (!) वाराही शांताबार्इंनी आपल्या लेखणीला लागू दिलेला नाही. वरील सर्व गुणांनी (!) युक्त असलेल्या काव्याचं मराठी साहित्यात सध्या मोठंच प्रस्थ आहे. पण् साहित्यिक, समीक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी (कारण करणार बिचारे? त्यांना पास व्हायचं असतं.) यांच्याखेरीज कुणीही त्या काव्याच्या वाटेला फिरकत नाही. आणि शांताबार्इंचं काव्य सर्वसामान्य मराठी माणूस वाचतो, गुणगुणतो, गातो; त्याच्या रसिकतेचं पोषण त्यातून होतं, यातच सारं काही आलं. मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ आल्हाददायक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 29-07-2001

    वर्षा : सरळ, शुद्ध, निरागस आत्मविष्कार प्रकट करणारी कविता… शांताबार्इंच्या ‘वर्षा’ या कवितासंग्रहाची ही द्वितीयावृत्ती आहे. १९४७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या काव्यसंग्रहाची ५३ वर्षांनी दुसरी आवृत्ती निघावी, यातच शांताबार्इंच्या कवितेचे ताजेपण प्रतीत ोते. प्रा. रा. श्री. जोग यांच्यासारख्या अभ्यासू समीक्षकांची प्रस्तावना या काव्यसंग्रह लाभली आहे. नवकवितेच्या काळातील शांताबार्इंची कविता सरळ, शुद्ध निरागस आत्मविष्कार प्रकट करणारी आहे. ‘मी साधीभोळी तुळशीची मंजिरी’ असे एका कवितेत शांताबाई लिहितात. हेच वर्णन त्यांच्या कवितेच्या संदर्भात सर्वार्थाने समर्पक वाटते. या संग्रहातील अनेक कवितातून शांताबाई निसर्गाशी सतत संवाद साधताना दिसतात. ‘पाऊस’ ‘सृष्टी आणि मी’, ‘हिरवळ’, ‘लिंब’, ‘संध्याकाळ’, ‘पावसाळी रात’, ‘पावसानंतर’, ‘माझा प्राजक्त’, ‘निसर्ग’ ही कवितांची शीर्षके याचे प्रत्यंतर देतात. निसर्गात त्या हरवतात, भान विसरतात. ‘‘अशी निसर्गासान्निध वसतां जीवनसरिता संथ वाहते, कितीक गेला काळ, तरीही भान मुळी ना मना राहते’’ अशी त्यांची तन्मयता त्यांनी शब्दात प्रकट केली आहे. हृदयातील मधुरभाव, दु:ख, उन्माद, लाजऱ्या भावना त्यांनी या कवितेत ग्रंथित केल्या आहेत. कधी कधी हृदयातील औदासिन्य व अकारण लागलेली हुरहूरही त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. उदासवाणे शेवाळे, पारव्याचे आक्रंदन, निबीड तरूच्या सावल्या उदासवाण्या प्रतिमाही काही काही कवितांतून डोकावतात. याला कारण कवयित्रीची स्वप्नाळू वृत्ती हेच आहे. अमूर्त ध्येयांचा घेतलेला ध्यास त्यांना निराश करतो. ‘माझे मीच घेतले’, हो, मरण हे ओढवून! ध्येये दूरच राहिली आयु चालले सरून’ अशा ओळी यामुळेच त्यांच्या कवितेत डोकावतात. परंतु परमेश्वरावरील श्रद्धा हा त्यांच्या जीवनाचा आधार आहे. उत्कट भावना प्रकट करणाऱ्या या कवितेस बाह्यरचनेचे कोंदणही त्याला अनुरूप असे अतिशय सुंदर लाभले आहे. सहजता व प्रसन्नता या गुणांमुळे कवितेतील अर्थ अगदी स्पष्टपणे त्यांच्या कवितेत प्रकट होतो. हेच शांताबार्इंच्या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. प्रा. सौ. निशा पाटील ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    शांताबार्इंच्या आशावादी कविता… या कवितासंग्रहात जवळजवळ १०० कविता आहेत. कोठलाही अनुभव कवयित्रीला वर्ज्य नाही, त्यामुळे विविध अनुभव व वेगवेगळे विषय त्या साकार करतात. या संग्रहातील सर्व कविता १९४७ पूर्वीच्या आहेत. सर्वसाधारणपणे १९३५ पर्यंतचा ‘रविकिरण’ ंडळाच्या कवितांचा प्रभाव असण्याचा कालखंड. ‘विशाखा’ प्रकाशनानंतर कुसुमाग्रजांचा प्रभाव मराठी कवितेवर पडला. त्यांची कविता रविकिरण मंडळाच्या कवितेपेक्षा वेगळी होती, आणि नवनव्या भावनांनी ती समृद्ध झाली होती. रविकिरण मंडळाने हाताळलेली आणि बरीच गुळगुळीत झालेली प्रीतीची भावना कुसुमाग्रजांच्या कवितेतून झळाळून उठली. आवाहनाबरोबरच आव्हानही त्या कवितेत होते. त्यावेळी पोवळे, चिंधळे, निकुंब वगैरेसारखे कवी त्याच प्रकारची कविता लिहीत होते. त्यावेळी लिहिल्या गेलेल्या कवितांना ‘अग्नी संप्रदायी’ कविता हे नाव पडले. यज्ञवेदी, ऐरण, वेदी बळी, समिधा अशा जोरकस शब्दात ती व्यक्त होत होती. रविकिरण मंडळाच्या कालखंडानंतर व कुसमुमाग्रजांच्या ऐन बहरात शांता शेळके यांनी कविता लिहिल्या. १९४७ पूर्वी जे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले त्याचे स्वरुप सर्वसाधारणपणे एकसारखेच असे. काही प्रेमविषयक, निसर्ग वर्णनपर, परमेश्वरविषयक तर गूढ असे विविध विषय जरी असले तरी या कविता ‘आत्मनिष्ठ’ असत. त्या काळातील कवितेचा अनुभव घेता शांताबार्इंच्या कवितेवर रविकिरण मंडळ, कुसुमाग्रज व थोडासा, इंदिरा संत यांच्या काव्याचा परिणाम झाला आहे. आपल्या एका लेखात शांताबार्इंनी या परिणामाची नोंद स्वतच केली आहे. काव्यविषयक कविता लिहिणे, ‘मी’ विषयक कविता लिहिणे, हा या काळातील विशेष होता, जीवनानुभव उत्कटतेने अनुभवावा, त्याला चिंतनाची जोड द्यावी, अशा शब्दात आकार द्यावा असे सर्वसाधारणपणे या काळातील निर्मिती प्रक्रियेचे स्वरुप. शांताबार्इंच्या काव्यसंग्रहात अशा कविता आहेत. भोवतालचे विराट वास्तव आणि त्या मानाने आपली लघुता त्यांनी आपल्या ‘मी’ कवितेत व्यक्त केली आहे. या काळात परमेश्वविषयक कविताही लिहिल्या गेल्या. त्यात शांताबार्इंच्या कवितेतून त्यांची परमेश्वर शरणता दिसून येते. ‘हे अधिराज, विफल आस’, शांताबार्इंनी परमेश्वराचे रुप निसर्गात पाहिले आहे, त्यामुळे शुद्ध निसर्ग कविता फारशी आढळत नाही. (रातराणी) सहवासाचे सुख रात्रभर अनुभवल्यावर पहाटे तिला सोडून जाणार नायकही त्यांच्या कवितेत येतो. अशा वेळी ‘स्वप्नाची समाप्ती’ ची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. याप्रमाणेच ‘तुझी माझी दृष्टादृष्ट’ ह्या कवितेत रंगणारा शृंगार पाहण्यासारखा आहे. दोघे एकत्र आल्यावर ते तर भान विसरतातच पण चराचर स्थिर होते, जगाचा विसर पडतो अन् गोड गीत झंकारते. आकाशातील वीज सुद्धा मेघाला बिलगून हा मीलनाचा सोहळा पाहत असते. तरल कल्पना, उत्कंट भावना, त्यांच्या कवितेते पुष्कळदा व्यक्त होतात. ‘पावसाळा राती’ सारखी कविता इंदिरा संतांची आठवण करुन देते. इंदिरा संतांची नायिका जशी चौकटीवर हात ठेवून उभी राहून ‘त्या’ ची प्रतीक्षा करते तशीच चौकटीवर हात ठेवून उभी राहिलेली शांताबार्इंची नायिका असते. ‘भेट हवी जर’ ह्या इंदिरा संतांच्या कवितेशी काही साम्य असलेली कविता ‘पावसाळी रात’ आहे. तर ‘प्रभात’ सारखी शुद्ध निसर्ग कविताही आहे. माधव ज्युलियनांच्या ‘विरह तरंग’ ह्या खंडकाव्याचा प्रभावही जाणवल्याखेरीज राहत नाही. प्रीतीची स्वप्ने पाहणे, रंगून जाणे, भान येताच दचकणे, उदास होणे, असा काही कवितांचा विशेष आहे. प्रत्यक्ष नायक- नायिकांचा शृंगार व त्या अनुषंगाने व्यक्त होणाऱ्या तरल भावना, मनोज्ञ स्वप्नरंजन अधिक आहे, पण विप्रलंभ शृंगारही आहे. आपण जगतो ते वास्तव आणि आपण निर्मिती करतो त्या कविता यामध्ये खूपच अंतर आहे. याची जाणीव ज्यावेही शांताबार्इंना होते त्यावेळी ‘जा जा कविते’ असे म्हणून कवितेला दूर लोटण्याचा त्या प्रयत्न करतात. कवितेच्या स्वप्नाळू जगाला वास्तवाच्या झळा लागतात तेव्हा कवितेतील भावना फिक्या वाटतात. हा त्यांचा अनुभव आहे, पण त्या निराश होत नाहीत. सर्व कवितांचा आशय आशावादी आहे बहुतेक रोमँटिक कवींना असणारी कलंदर जीवनाची आसक्ती त्यांच्याही कवितेत व्यक्त होते. रोमॅन्टिक कवितेचे सर्व विशेष ह्या कवितेत आहेत. सौंदर्याने भारावून जाणे निसर्गात रमणे, स्वप्नरंजन व क्वचित तात्विक चिंतन इ. सौंदर्यवादाचे विशेष त्यांच्या कवितेत पदोपदी दिसतात. शांताबार्इंनी रविकिरण मंडळाचे विशेष घेतले तरी आंधळे अनुकरण न करता स्वानुभव उत्कंटतेने मांडले म्हणून ही कविता सौंदर्यवादी झाली, त्यातून ‘हर्षलासे फार नाचे वनी मोर....’ अशा संकेतिक ओळी काही कवितेत दिसतात तर ‘सृष्टी व मी’ या काव्यात ‘हाय ओदासीन्य मग’... अशी अनुभूती येते, सौंदर्य पाहून, भव्यता पाहून उदासीन होणे व सौदर्यवादाचा विशेष आहे. यातूनच थोडीशी गूढता निर्माण होते. त्यांच्या काही कविता निसर्गाशी असलेले आपले भावबंध स्पष्ट करतात (‘लिंब’). रिवकिरण मंडळाची प्रेमकविता आणि गोविंदाग्रजांची बरीच स्पष्टोक्ती करणारी कविता त्यांच्या कवितांवर परिणाम करते. गोविंदाग्रजांच्या ‘प्रेम आणि मरण’, ‘फुले वेचली पण’ अशा कवितांचा परिणाम स्पष्ट जाणवतो. एकाकी झुरणारी नायक व नायिका परिपूर्तीसाठी धडपडताना दिसतात. असा उदासीनतेचा सूर ह्या कवितेतून आळवला जातो. या कविता भावगीतासारख्या जबरदस्त आशावाद कुसुमाग्रजांनी मराठीत आणला. त्याचा काही परिणाम शांताबार्इंच्या कवितांवर झालेला दिसतो. बऱ्याच कवितेत स्वप्नरंजन असून नंतर उदासिनतेच्या छाया दाटून आलेल्या दिसतात. माधव ज्युलियन यांच्या ‘गजलांजली’ चा परिणाम त्यावर स्पष्ट दिसतो. हा त्यांचा आवडता कवी आहे. त्यांनी हा काव्यसंग्रह त्यांनाच अर्पण केला आहे. सहाजिकच माधव ज्युलियनांच्या सर्व प्रकारच्या कवितेसारख्या कविता लिहिण्याची त्यांची कांक्षा आहे म्हणूनच ज्युलियनांच्या द्राक्ष कन्येतील रुबायासारखा तर कुसुमाग्रजांच्या जीवनलहरीसारख्या कवितांच्या रचनेचा त्यांनी आधार घेतला आहे. भावकणिकेतही जीवनातील सूक्ष्म तरल अनुभव त्यांनी व्यक्त केला आहे. कधी कधी विरहात जळणाऱ्या नायिकेची मनीषा, ‘माझ्या अंतरंगी सखे तुझ्या भेटीची रे आस’ असे म्हणणारी नायिका आणि रातराणीच्या सुगंधासवे रात्र गेली हे समजताच व्याकूळ झालेली नायिका आपल्याला दिसते. काव्यप्रवाहात शांताबार्इंचे स्वतंत्र स्थान आहे, त्यांची बरीच कविता भावगीते, नाट्यगीते यासारखी असली तरी नावीन्य धारण केलेली आहे. संस्कृत साहित्य व इंग्रजी स्फूट कविता यांच्या मुशीतून ही कविता बाहेर पडली आहे. दोन्ही कवितांचे उत्तम विशेष पचवलेले आहेत. म्हणून ‘वर्षा’ संग्रह वाचताना तो कंटाळवाणा होत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.