* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UTSAV
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664614
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NA
NA
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UTSAV #UTSAV #उत्सव #POEMS #MARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 04-07-2004

    नितळ... मनस्वी कवितांचा ‘उत्सव’... कविता म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळं देईल पण कविता म्हणजे शब्दांचा उत्सव, व्यक्त होणारं नितळ मन. ज्यातून सरळ थेटपणे भावना व्यक्त होतात. थेट हृदयात उतरणारी आणि मनात राहणारी ती ‘कविता’. अशाच मनस्ी कवितांचा सुप्रिया वकील यांचा ‘उत्सव’ हा संग्रह नुकताच वाचला. कोणताही विशेष आविर्भाव, अभिनिवेश न बाळगता मनगूज सांगणाऱ्या अल्पाक्षरी कविता यांत आहेत. तारुण्यात प्रेमकविता आपसुकच लिहिल्या जातात. आयुष्याचा हा नवथर भर ओसरुन मध्यम वयात प्रवेश केल्यावर मागच्या वळणाकडं पाहिलं की, आपणच आपल्या वर्तनाचं आश्चर्य करू लागतो. त्या वेळच्या बालिश चुका पटतात. अशा वळणावरच्या भावना व्यक्त करताना कवयित्री म्हणते- मागे वळून पाहाता येती डोळ्यांपुढे पुसट पुसट चित्रे कोण कोण कुठली भेटलेली पात्रे मागे वळून पाहाता आपली चूक ठळकपणे दिसते पण आज मनात तिचे समर्थनही असते मनुष्य स्वभावाचे वेगवेगळे रंग... त्याचे अर्थ मन पक्व झाल्यावर खऱ्या अर्थाने जाणवू लागतात. त्याबाबतच्या जाणिवा विस्तारतात. अशावेळी ते शब्दातून व्यक्त होतात- दु:ख दुसऱ्याचे.. असते शीतल मायाही पातळ तितकीच आत नि बाहेर... वेगळेच रंग आपल्या दंग असे जो तो चोच मारण्यात अवघे टपती कसले सोबती जीवनाचे भूतकाळात अगदी जिव्हारी लागलेल्या घटनांकडे पाहाताना आज ती आर्तता... ती ओढ अनेकदा कुठेच दिसत नाही. काठावरून पाण्याचा तळ निरखण्याचा अलिप्तपण त्यात दिसतो. त्या भावनाप शब्दरूप घेतात- हल्ली असं जाणवतं, त्यांच अस्तित्व मनातून कधीच पुसलं गेलंय तो केवळ निमित्तमात्र... एक माध्यम पुन्हा पुन्हा मनात घुटमळू पाहातं ते त्याच्यात पाहिलेल्या माझ्या पहिल्या कोवळ्या तरल प्रेमाचं निर्माल्य व्यवहाराच्या आधारावर जगणाऱ्या या वास्तव दुनियेत नात्याला आत किती महत्त्व उरलंय हे सांगताना कवयित्री म्हणते- व्यवहार येतो तेव्हा नातं कुठ उरतं? खणखण पैशावरच काय ते ठरतं नैतिक देणं आणि कुठले आलेत बंध चमचम रुपया करतो डोळे बंद ‘हायकू’. हा काव्याचा प्रकारही या संग्रहात कवयित्रीनं चांगल्या पद्धतीने हाताळलाय. व्यवहारी जगाची आपली अशी कक्षा आहे तिथं हळवेपणा ही एक मोठी शिक्षा आहे मुरदाडपणासुद्धा कमावलेला गुण आहे आपलं साधपणं पहिलं बाकी मग गौण आहे आशा-निराशेच्या, निरनिराळ्या अनुभवांच्या हिंदोळ्यावर झुलणारं मन, कधी कधी भूतकाळात सैर करून येणारं कवयित्रीचं मन वर्तमानातल्या आपल्या घरावर खूप प्रेम करतं, त्याबद्दलच्या नैसर्गिक... सहजपणे उमलणाऱ्या प्रेमातून एकरूप होऊन लिहितं... आहे माझं एक शाणंसुरतं घर तिथं नसतो मुळी मला कसला डर माझ्याविना तेही नाही त्याच्यावाचून माही तेही माझ्यासारखी देईल अशी ग्वाही म्हणते म्हणून तर आहे माझं एक... शाणंसुरतं घर नितळ... मनस्वी आणि सोप्या भाषेत मन उलगडून दाखवणारा असा हा संग्रह. -सौ. सुजाता पेंडसे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT

    विविध भावरंगांचा ‘उत्सव’... आपल्या भोवती घडणाऱ्या घटना, अनुभव, निसर्ग, जीवनाचे नित्य नवे रंग यांचे संवेदनशील मनात जे प्रतिबिंब उमटतं त्याचा मुग्ध अविष्कार म्हणजे कविता असते. या प्रतिबिंबातून कविमनाचा जो उद्गार उमटतो तो म्हणजे कविता. अशाच विविध भावरगांनी सुप्रिया वकील यांचा ‘उत्सव’ हा काव्यसंग्रह सजला आहे. सहज सोप्या भाषेत, भडकपणा, शब्दांचा सोस न करता सुप्रिया वकील यांची कविता अकृत्रिमपणे उलगडत राहते... मनाला भिडते. ‘माझे प्रतिबिंब जिच्यात पाहते तिला मी माझी कविता म्हणते’ असं कवयित्रीने म्हटले आहे. ‘उत्सव’ मध्ये तिच्या भावभावनांचे सच्चेपणाचे, समृद्धतेचे प्रतिबिंब ठळकपणे दिसते. त्याचबरोबर आपल्या भोवती सजगपणे पाहणाऱ्या कवयित्रीच्या संवेदनशील मनाने जीवनाचे निसर्गाचे विविध रंग समर्थपणे व्यक्त केले आहेत. त्याचबरोबर कवितांतून व्यक्त होणारे कटू अनुभव, सल, बोचसुद्धा वाचकांच्या मनाला भिडतात. कवयित्रीची अस्वस्थता, व्याकुळता ती शांतपणे पचवताना दिसते. पण हे अनुभव वाचकाला अस्वस्थ करतात. ‘उत्सव’मध्ये काही हायकू व चारोळ्यांचाही समावेश आहे. याही रचना मनस्पर्शी व वैशिष्ट्यपूर्ण झाल्या आहेत. या संग्रहातील ‘एक संध्याकाळ’ मध्ये ‘तुझ्या हातांच्या उबदार शिंपल्यात माझे हात मिटून घेतलेस तेव्हा...’ अशी हळुवार स्निग्ध जाणीव व्यक्त होते, तर लाजल्या वेलीला कळ्यांचा मोहर, पिवळ्या उन्हाला पावसाचा बहर’ असं म्हणत ही कविता निसर्गाशी तन्मय होते. ‘दु:ख दुसऱ्याचे असते, शीतल मायाही पातळ तितकीच’ अशा वस्तवाचा चटका देतानाच सुप्रिया यांच्या कवितेतून ‘केवढ्या चुकीचे केवढे भोगणे, त्याचे ठरविणे हाती नाही’ अशी असाह्यताही व्यक्त होते. ‘रात्रीला केशराचा स्वाद’ देणारी कवयित्रीची कविता प्रत्यक्ष पावसालच भिजायला लावण्याइतकी उत्कट होते. चंद्रमोहन कुलकर्णींनी या संग्रहाचे मुखपृष्ठ देखणे केले असून, शुद्ध मुद्रण, सुबक छपाई यामुळे अंतरंगाइतकंच पुस्तकाचं बाह्यरूपही सुंदर आहे. ‘उत्सव’ काव्यरसिकांना आवडेल हे नक्की! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more