* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664614
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
COLLECTION OF POEMS
कवितासंग्रह
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UTSAV #UTSAV #उत्सव #POEMS #MARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 04-07-2004

    नितळ... मनस्वी कवितांचा ‘उत्सव’... कविता म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळं देईल पण कविता म्हणजे शब्दांचा उत्सव, व्यक्त होणारं नितळ मन. ज्यातून सरळ थेटपणे भावना व्यक्त होतात. थेट हृदयात उतरणारी आणि मनात राहणारी ती ‘कविता’. अशाच मनस्ी कवितांचा सुप्रिया वकील यांचा ‘उत्सव’ हा संग्रह नुकताच वाचला. कोणताही विशेष आविर्भाव, अभिनिवेश न बाळगता मनगूज सांगणाऱ्या अल्पाक्षरी कविता यांत आहेत. तारुण्यात प्रेमकविता आपसुकच लिहिल्या जातात. आयुष्याचा हा नवथर भर ओसरुन मध्यम वयात प्रवेश केल्यावर मागच्या वळणाकडं पाहिलं की, आपणच आपल्या वर्तनाचं आश्चर्य करू लागतो. त्या वेळच्या बालिश चुका पटतात. अशा वळणावरच्या भावना व्यक्त करताना कवयित्री म्हणते- मागे वळून पाहाता येती डोळ्यांपुढे पुसट पुसट चित्रे कोण कोण कुठली भेटलेली पात्रे मागे वळून पाहाता आपली चूक ठळकपणे दिसते पण आज मनात तिचे समर्थनही असते मनुष्य स्वभावाचे वेगवेगळे रंग... त्याचे अर्थ मन पक्व झाल्यावर खऱ्या अर्थाने जाणवू लागतात. त्याबाबतच्या जाणिवा विस्तारतात. अशावेळी ते शब्दातून व्यक्त होतात- दु:ख दुसऱ्याचे.. असते शीतल मायाही पातळ तितकीच आत नि बाहेर... वेगळेच रंग आपल्या दंग असे जो तो चोच मारण्यात अवघे टपती कसले सोबती जीवनाचे भूतकाळात अगदी जिव्हारी लागलेल्या घटनांकडे पाहाताना आज ती आर्तता... ती ओढ अनेकदा कुठेच दिसत नाही. काठावरून पाण्याचा तळ निरखण्याचा अलिप्तपण त्यात दिसतो. त्या भावनाप शब्दरूप घेतात- हल्ली असं जाणवतं, त्यांच अस्तित्व मनातून कधीच पुसलं गेलंय तो केवळ निमित्तमात्र... एक माध्यम पुन्हा पुन्हा मनात घुटमळू पाहातं ते त्याच्यात पाहिलेल्या माझ्या पहिल्या कोवळ्या तरल प्रेमाचं निर्माल्य व्यवहाराच्या आधारावर जगणाऱ्या या वास्तव दुनियेत नात्याला आत किती महत्त्व उरलंय हे सांगताना कवयित्री म्हणते- व्यवहार येतो तेव्हा नातं कुठ उरतं? खणखण पैशावरच काय ते ठरतं नैतिक देणं आणि कुठले आलेत बंध चमचम रुपया करतो डोळे बंद ‘हायकू’. हा काव्याचा प्रकारही या संग्रहात कवयित्रीनं चांगल्या पद्धतीने हाताळलाय. व्यवहारी जगाची आपली अशी कक्षा आहे तिथं हळवेपणा ही एक मोठी शिक्षा आहे मुरदाडपणासुद्धा कमावलेला गुण आहे आपलं साधपणं पहिलं बाकी मग गौण आहे आशा-निराशेच्या, निरनिराळ्या अनुभवांच्या हिंदोळ्यावर झुलणारं मन, कधी कधी भूतकाळात सैर करून येणारं कवयित्रीचं मन वर्तमानातल्या आपल्या घरावर खूप प्रेम करतं, त्याबद्दलच्या नैसर्गिक... सहजपणे उमलणाऱ्या प्रेमातून एकरूप होऊन लिहितं... आहे माझं एक शाणंसुरतं घर तिथं नसतो मुळी मला कसला डर माझ्याविना तेही नाही त्याच्यावाचून माही तेही माझ्यासारखी देईल अशी ग्वाही म्हणते म्हणून तर आहे माझं एक... शाणंसुरतं घर नितळ... मनस्वी आणि सोप्या भाषेत मन उलगडून दाखवणारा असा हा संग्रह. -सौ. सुजाता पेंडसे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT

    विविध भावरंगांचा ‘उत्सव’... आपल्या भोवती घडणाऱ्या घटना, अनुभव, निसर्ग, जीवनाचे नित्य नवे रंग यांचे संवेदनशील मनात जे प्रतिबिंब उमटतं त्याचा मुग्ध अविष्कार म्हणजे कविता असते. या प्रतिबिंबातून कविमनाचा जो उद्गार उमटतो तो म्हणजे कविता. अशाच विविध भावरगांनी सुप्रिया वकील यांचा ‘उत्सव’ हा काव्यसंग्रह सजला आहे. सहज सोप्या भाषेत, भडकपणा, शब्दांचा सोस न करता सुप्रिया वकील यांची कविता अकृत्रिमपणे उलगडत राहते... मनाला भिडते. ‘माझे प्रतिबिंब जिच्यात पाहते तिला मी माझी कविता म्हणते’ असं कवयित्रीने म्हटले आहे. ‘उत्सव’ मध्ये तिच्या भावभावनांचे सच्चेपणाचे, समृद्धतेचे प्रतिबिंब ठळकपणे दिसते. त्याचबरोबर आपल्या भोवती सजगपणे पाहणाऱ्या कवयित्रीच्या संवेदनशील मनाने जीवनाचे निसर्गाचे विविध रंग समर्थपणे व्यक्त केले आहेत. त्याचबरोबर कवितांतून व्यक्त होणारे कटू अनुभव, सल, बोचसुद्धा वाचकांच्या मनाला भिडतात. कवयित्रीची अस्वस्थता, व्याकुळता ती शांतपणे पचवताना दिसते. पण हे अनुभव वाचकाला अस्वस्थ करतात. ‘उत्सव’मध्ये काही हायकू व चारोळ्यांचाही समावेश आहे. याही रचना मनस्पर्शी व वैशिष्ट्यपूर्ण झाल्या आहेत. या संग्रहातील ‘एक संध्याकाळ’ मध्ये ‘तुझ्या हातांच्या उबदार शिंपल्यात माझे हात मिटून घेतलेस तेव्हा...’ अशी हळुवार स्निग्ध जाणीव व्यक्त होते, तर लाजल्या वेलीला कळ्यांचा मोहर, पिवळ्या उन्हाला पावसाचा बहर’ असं म्हणत ही कविता निसर्गाशी तन्मय होते. ‘दु:ख दुसऱ्याचे असते, शीतल मायाही पातळ तितकीच’ अशा वस्तवाचा चटका देतानाच सुप्रिया यांच्या कवितेतून ‘केवढ्या चुकीचे केवढे भोगणे, त्याचे ठरविणे हाती नाही’ अशी असाह्यताही व्यक्त होते. ‘रात्रीला केशराचा स्वाद’ देणारी कवयित्रीची कविता प्रत्यक्ष पावसालच भिजायला लावण्याइतकी उत्कट होते. चंद्रमोहन कुलकर्णींनी या संग्रहाचे मुखपृष्ठ देखणे केले असून, शुद्ध मुद्रण, सुबक छपाई यामुळे अंतरंगाइतकंच पुस्तकाचं बाह्यरूपही सुंदर आहे. ‘उत्सव’ काव्यरसिकांना आवडेल हे नक्की! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more