* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664614
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
COLLECTION OF POEMS
कवितासंग्रह
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UTSAV #UTSAV #उत्सव #POEMS #MARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 04-07-2004

    नितळ... मनस्वी कवितांचा ‘उत्सव’... कविता म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळं देईल पण कविता म्हणजे शब्दांचा उत्सव, व्यक्त होणारं नितळ मन. ज्यातून सरळ थेटपणे भावना व्यक्त होतात. थेट हृदयात उतरणारी आणि मनात राहणारी ती ‘कविता’. अशाच मनस्ी कवितांचा सुप्रिया वकील यांचा ‘उत्सव’ हा संग्रह नुकताच वाचला. कोणताही विशेष आविर्भाव, अभिनिवेश न बाळगता मनगूज सांगणाऱ्या अल्पाक्षरी कविता यांत आहेत. तारुण्यात प्रेमकविता आपसुकच लिहिल्या जातात. आयुष्याचा हा नवथर भर ओसरुन मध्यम वयात प्रवेश केल्यावर मागच्या वळणाकडं पाहिलं की, आपणच आपल्या वर्तनाचं आश्चर्य करू लागतो. त्या वेळच्या बालिश चुका पटतात. अशा वळणावरच्या भावना व्यक्त करताना कवयित्री म्हणते- मागे वळून पाहाता येती डोळ्यांपुढे पुसट पुसट चित्रे कोण कोण कुठली भेटलेली पात्रे मागे वळून पाहाता आपली चूक ठळकपणे दिसते पण आज मनात तिचे समर्थनही असते मनुष्य स्वभावाचे वेगवेगळे रंग... त्याचे अर्थ मन पक्व झाल्यावर खऱ्या अर्थाने जाणवू लागतात. त्याबाबतच्या जाणिवा विस्तारतात. अशावेळी ते शब्दातून व्यक्त होतात- दु:ख दुसऱ्याचे.. असते शीतल मायाही पातळ तितकीच आत नि बाहेर... वेगळेच रंग आपल्या दंग असे जो तो चोच मारण्यात अवघे टपती कसले सोबती जीवनाचे भूतकाळात अगदी जिव्हारी लागलेल्या घटनांकडे पाहाताना आज ती आर्तता... ती ओढ अनेकदा कुठेच दिसत नाही. काठावरून पाण्याचा तळ निरखण्याचा अलिप्तपण त्यात दिसतो. त्या भावनाप शब्दरूप घेतात- हल्ली असं जाणवतं, त्यांच अस्तित्व मनातून कधीच पुसलं गेलंय तो केवळ निमित्तमात्र... एक माध्यम पुन्हा पुन्हा मनात घुटमळू पाहातं ते त्याच्यात पाहिलेल्या माझ्या पहिल्या कोवळ्या तरल प्रेमाचं निर्माल्य व्यवहाराच्या आधारावर जगणाऱ्या या वास्तव दुनियेत नात्याला आत किती महत्त्व उरलंय हे सांगताना कवयित्री म्हणते- व्यवहार येतो तेव्हा नातं कुठ उरतं? खणखण पैशावरच काय ते ठरतं नैतिक देणं आणि कुठले आलेत बंध चमचम रुपया करतो डोळे बंद ‘हायकू’. हा काव्याचा प्रकारही या संग्रहात कवयित्रीनं चांगल्या पद्धतीने हाताळलाय. व्यवहारी जगाची आपली अशी कक्षा आहे तिथं हळवेपणा ही एक मोठी शिक्षा आहे मुरदाडपणासुद्धा कमावलेला गुण आहे आपलं साधपणं पहिलं बाकी मग गौण आहे आशा-निराशेच्या, निरनिराळ्या अनुभवांच्या हिंदोळ्यावर झुलणारं मन, कधी कधी भूतकाळात सैर करून येणारं कवयित्रीचं मन वर्तमानातल्या आपल्या घरावर खूप प्रेम करतं, त्याबद्दलच्या नैसर्गिक... सहजपणे उमलणाऱ्या प्रेमातून एकरूप होऊन लिहितं... आहे माझं एक शाणंसुरतं घर तिथं नसतो मुळी मला कसला डर माझ्याविना तेही नाही त्याच्यावाचून माही तेही माझ्यासारखी देईल अशी ग्वाही म्हणते म्हणून तर आहे माझं एक... शाणंसुरतं घर नितळ... मनस्वी आणि सोप्या भाषेत मन उलगडून दाखवणारा असा हा संग्रह. -सौ. सुजाता पेंडसे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT

    विविध भावरंगांचा ‘उत्सव’... आपल्या भोवती घडणाऱ्या घटना, अनुभव, निसर्ग, जीवनाचे नित्य नवे रंग यांचे संवेदनशील मनात जे प्रतिबिंब उमटतं त्याचा मुग्ध अविष्कार म्हणजे कविता असते. या प्रतिबिंबातून कविमनाचा जो उद्गार उमटतो तो म्हणजे कविता. अशाच विविध भावरगांनी सुप्रिया वकील यांचा ‘उत्सव’ हा काव्यसंग्रह सजला आहे. सहज सोप्या भाषेत, भडकपणा, शब्दांचा सोस न करता सुप्रिया वकील यांची कविता अकृत्रिमपणे उलगडत राहते... मनाला भिडते. ‘माझे प्रतिबिंब जिच्यात पाहते तिला मी माझी कविता म्हणते’ असं कवयित्रीने म्हटले आहे. ‘उत्सव’ मध्ये तिच्या भावभावनांचे सच्चेपणाचे, समृद्धतेचे प्रतिबिंब ठळकपणे दिसते. त्याचबरोबर आपल्या भोवती सजगपणे पाहणाऱ्या कवयित्रीच्या संवेदनशील मनाने जीवनाचे निसर्गाचे विविध रंग समर्थपणे व्यक्त केले आहेत. त्याचबरोबर कवितांतून व्यक्त होणारे कटू अनुभव, सल, बोचसुद्धा वाचकांच्या मनाला भिडतात. कवयित्रीची अस्वस्थता, व्याकुळता ती शांतपणे पचवताना दिसते. पण हे अनुभव वाचकाला अस्वस्थ करतात. ‘उत्सव’मध्ये काही हायकू व चारोळ्यांचाही समावेश आहे. याही रचना मनस्पर्शी व वैशिष्ट्यपूर्ण झाल्या आहेत. या संग्रहातील ‘एक संध्याकाळ’ मध्ये ‘तुझ्या हातांच्या उबदार शिंपल्यात माझे हात मिटून घेतलेस तेव्हा...’ अशी हळुवार स्निग्ध जाणीव व्यक्त होते, तर लाजल्या वेलीला कळ्यांचा मोहर, पिवळ्या उन्हाला पावसाचा बहर’ असं म्हणत ही कविता निसर्गाशी तन्मय होते. ‘दु:ख दुसऱ्याचे असते, शीतल मायाही पातळ तितकीच’ अशा वस्तवाचा चटका देतानाच सुप्रिया यांच्या कवितेतून ‘केवढ्या चुकीचे केवढे भोगणे, त्याचे ठरविणे हाती नाही’ अशी असाह्यताही व्यक्त होते. ‘रात्रीला केशराचा स्वाद’ देणारी कवयित्रीची कविता प्रत्यक्ष पावसालच भिजायला लावण्याइतकी उत्कट होते. चंद्रमोहन कुलकर्णींनी या संग्रहाचे मुखपृष्ठ देखणे केले असून, शुद्ध मुद्रण, सुबक छपाई यामुळे अंतरंगाइतकंच पुस्तकाचं बाह्यरूपही सुंदर आहे. ‘उत्सव’ काव्यरसिकांना आवडेल हे नक्की! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more