* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PURVASANDHYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615025
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER THE FIRST THREE POETRY BOOKS LIKE `GONDAN`, `ANOLAKH`, AND JANMAJANHAVI` THIS IS THE NEW POETRY BOOK BY SHANTA SHELKE. THE POEMS UNDER THIS COLLECTION MAKE US REALIZE THAT THE POETESS HAS ACCEPTED THE NEW TREND IN THE WORLD OF POETRY GRACEFULLY, SUCCESSFULLY; AT THE SAME TIME, NOWHERE SHE HAS FORGOTTEN THE AGEOLD TRADITIONS OF MARATHI POEMS. WHILE PRACTICING THE NEW STYLE, SHE GENUINELY GRASPS THE NEW ANGLES, NEW MEANINGS, NEW UNIVERSE OF THE CHANGED STYLE, YET DEEP INSIDE HER POEM REMAINS THE SAME SIMPLE AND CASUAL, SPONTANEOUSLY RELATING THE WORDS TO THE MEANINGFUL STANZAS, ONE AFTER OTHER; WITH THE SAME PASSION.
गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी या कवितासंग्रहानंतर आता शान्ताबाईंचा `पूर्वसंध्या` हा नवीन कवितासंग्रह रसिकांसमोर येत आहे. मराठी कवितेच्या पूर्वपरंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शान्ताबाईंनि नव्या कवितेशीही सुजन रसिकपणाने अनुबंध जोडला आणि तिच्यातली स्वतःला भावलेली वैशिष्टे आत्मसात केली. भाषेची नवी वळणे, आशयसंपृक्तता, वेगळी प्रतीमास्रूश्ती हे सारे त्यांच्या कवितेने स्वतःत मुरवून घेतले, पण हे जुने नावे काव्यासंस्कर घेतानाही त्यांची कविता हि पुन्हा त्यांचीच राहिली. साधी, सरळ, सहजपणे आपले मनोगत व्यक्त करणारी आणि रसिकांशी मोकळ्या जीव्याल्याने बोलणारी....

No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarGeeta Soni

    "पूर्वसंध्या" , हा शांता शेळके यांचा कवितासंग्रह , हे पुस्तक , कोणत्यातरी वाढदिवसाला नवऱ्यानं `भेट` म्हणून दिलेलं, साहजिकच आजही खास `ठेवणीतलं` , आणि `शांताबाई शेळके` यांच्या कवितांचं म्हणून मनाच्या खूप जवळचं सुद्धा. कवितेसारख्या उत्कट साहित्य्रकाराबद्दल , त्यांतही , श्रीमती शांता शेळकेंच्या शब्दसंपन्न कवितांबद्दल अधिकारवाणीनं लिहावं अशी माझी योग्यता मुळीच नाही. मग तरीही या पुस्तकातल्या त्यांच्या कवितांमध्ये मला काय जाणवलं,भावलं, ते लिहिण्याचं धाडस मी कसं काय करत्ये? माहीत नाही. कदाचित शांताबाईंच्या कवितांतून जाणवणारी जिव्हाळ्याची झिलई , भावनांची हळुवार अभिव्यक्ती, त्या कवितांबद्दल माझ्या मनात आपुलकी निर्माण करत असेल का? "कविता" हा साहित्याचा एक गूढरम्य आविष्कार वगैरे असं म्हणतात खरं , पण शांताबाईंच्या आजवर वाचलेल्या कविता,( या पुस्तकातल्या कविता सुद्धा ), मला गूढ नाही, फक्त रम्य च वाटत आल्यायत कायम. किंबहुना ते तसंच असावं म्हणून तर त्यांच्या कितीतरी कविता, गेली अनेक दशकं गाणी होऊन आपल्या मनात रुंजी घालतायत. या संग्रहातली मला आवडलेली त्यांची कविता म्हणजे "तसे तर शब्द". शांताबाईंचं शब्दांवरचं प्रभुत्व आपण सर्व जाणतोच पण "तसेतर शब्द जिवाभावाचे सखेसोबती,श्वासोश्वासाइतके निकट क्षणोक्षणी", "मी तर कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?" या ओळींतून मात्र शांताबाईंची "शब्दां"वरची हुकूमत नाही तर शब्दांप्रती असलेलं त्यांचं मैत्र, सौहार्द, समर्पण , स्वप्रतिभेवरचं विसंबलेपण मान्य करण्याइतकं , मनाचं निर्मळ मोठेपण लक्खपणे जाणवतं. याच संग्रहातली आणखी एक कविता "पाणी". वरवर पाहता निसर्ग कविता वाटावी अशी, पण शेवटाला येतायेता "सप्त सागरांमधून वेडे दिशादिशांतून फिरते कुमारिकेच्या नयनी केंव्हा आसू होऊन उरते" या शेवटच्या ओळीतला थेंबभर अश्रू आपल्या मनात नाना प्रश्न निर्माण करतो, कोणतं दुःख सलत असेल त्या कुमारिकेच्या मनात? वंचनेचं? पोरकेपणाचं? अडवणुकीचं? की आणखी कसलं? या एका ओळीने अगदी आताआतापर्यंत निसर्गकविता वाटणारी , ही कविता एकदम भावकविताच होऊन जाते. याच संग्रहातली "आता नकोसे वाटते" ही कविता , तुमच्याआमच्या जगण्याशी मिळतीजुळती, त्यातल्या शेवटच्या दोन ओळी तर खासच. "मीच का जुळवून येथे आणि तेथे घ्यायचे, सारखे होणे नवे आता नकोसे वाटते" रोजच्या आयुष्यात बऱ्याचदा आपलीही अशी अवस्था होतेच ना? मात्र नेमक्या शब्दांत व्यक्त होता येत नाही, आणि उमटते ती फक्त चिडचिड. या सर्वच कविता वाचताना जाणवते ती शब्दांची सहजता, त्यांचं हळवेपण , आणि उबदार आपलेपण. अशाच मनाला भिडणाऱ्या , आशयघन कवितांचा संग्रहं "पूर्वसंध्या" जमेल तेंव्हा नक्की वाचवा असा. गीता सोनी 6 जून 2020 कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more