* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PURVASANDHYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615025
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER THE FIRST THREE POETRY BOOKS LIKE `GONDAN`, `ANOLAKH`, AND JANMAJANHAVI` THIS IS THE NEW POETRY BOOK BY SHANTA SHELKE. THE POEMS UNDER THIS COLLECTION MAKE US REALIZE THAT THE POETESS HAS ACCEPTED THE NEW TREND IN THE WORLD OF POETRY GRACEFULLY, SUCCESSFULLY; AT THE SAME TIME, NOWHERE SHE HAS FORGOTTEN THE AGEOLD TRADITIONS OF MARATHI POEMS. WHILE PRACTICING THE NEW STYLE, SHE GENUINELY GRASPS THE NEW ANGLES, NEW MEANINGS, NEW UNIVERSE OF THE CHANGED STYLE, YET DEEP INSIDE HER POEM REMAINS THE SAME SIMPLE AND CASUAL, SPONTANEOUSLY RELATING THE WORDS TO THE MEANINGFUL STANZAS, ONE AFTER OTHER; WITH THE SAME PASSION.
गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी या कवितासंग्रहानंतर आता शान्ताबाईंचा `पूर्वसंध्या` हा नवीन कवितासंग्रह रसिकांसमोर येत आहे. मराठी कवितेच्या पूर्वपरंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शान्ताबाईंनि नव्या कवितेशीही सुजन रसिकपणाने अनुबंध जोडला आणि तिच्यातली स्वतःला भावलेली वैशिष्टे आत्मसात केली. भाषेची नवी वळणे, आशयसंपृक्तता, वेगळी प्रतीमास्रूश्ती हे सारे त्यांच्या कवितेने स्वतःत मुरवून घेतले, पण हे जुने नावे काव्यासंस्कर घेतानाही त्यांची कविता हि पुन्हा त्यांचीच राहिली. साधी, सरळ, सहजपणे आपले मनोगत व्यक्त करणारी आणि रसिकांशी मोकळ्या जीव्याल्याने बोलणारी....

No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarGeeta Soni

    "पूर्वसंध्या" , हा शांता शेळके यांचा कवितासंग्रह , हे पुस्तक , कोणत्यातरी वाढदिवसाला नवऱ्यानं `भेट` म्हणून दिलेलं, साहजिकच आजही खास `ठेवणीतलं` , आणि `शांताबाई शेळके` यांच्या कवितांचं म्हणून मनाच्या खूप जवळचं सुद्धा. कवितेसारख्या उत्कट साहित्य्रकाराबद्दल , त्यांतही , श्रीमती शांता शेळकेंच्या शब्दसंपन्न कवितांबद्दल अधिकारवाणीनं लिहावं अशी माझी योग्यता मुळीच नाही. मग तरीही या पुस्तकातल्या त्यांच्या कवितांमध्ये मला काय जाणवलं,भावलं, ते लिहिण्याचं धाडस मी कसं काय करत्ये? माहीत नाही. कदाचित शांताबाईंच्या कवितांतून जाणवणारी जिव्हाळ्याची झिलई , भावनांची हळुवार अभिव्यक्ती, त्या कवितांबद्दल माझ्या मनात आपुलकी निर्माण करत असेल का? "कविता" हा साहित्याचा एक गूढरम्य आविष्कार वगैरे असं म्हणतात खरं , पण शांताबाईंच्या आजवर वाचलेल्या कविता,( या पुस्तकातल्या कविता सुद्धा ), मला गूढ नाही, फक्त रम्य च वाटत आल्यायत कायम. किंबहुना ते तसंच असावं म्हणून तर त्यांच्या कितीतरी कविता, गेली अनेक दशकं गाणी होऊन आपल्या मनात रुंजी घालतायत. या संग्रहातली मला आवडलेली त्यांची कविता म्हणजे "तसे तर शब्द". शांताबाईंचं शब्दांवरचं प्रभुत्व आपण सर्व जाणतोच पण "तसेतर शब्द जिवाभावाचे सखेसोबती,श्वासोश्वासाइतके निकट क्षणोक्षणी", "मी तर कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?" या ओळींतून मात्र शांताबाईंची "शब्दां"वरची हुकूमत नाही तर शब्दांप्रती असलेलं त्यांचं मैत्र, सौहार्द, समर्पण , स्वप्रतिभेवरचं विसंबलेपण मान्य करण्याइतकं , मनाचं निर्मळ मोठेपण लक्खपणे जाणवतं. याच संग्रहातली आणखी एक कविता "पाणी". वरवर पाहता निसर्ग कविता वाटावी अशी, पण शेवटाला येतायेता "सप्त सागरांमधून वेडे दिशादिशांतून फिरते कुमारिकेच्या नयनी केंव्हा आसू होऊन उरते" या शेवटच्या ओळीतला थेंबभर अश्रू आपल्या मनात नाना प्रश्न निर्माण करतो, कोणतं दुःख सलत असेल त्या कुमारिकेच्या मनात? वंचनेचं? पोरकेपणाचं? अडवणुकीचं? की आणखी कसलं? या एका ओळीने अगदी आताआतापर्यंत निसर्गकविता वाटणारी , ही कविता एकदम भावकविताच होऊन जाते. याच संग्रहातली "आता नकोसे वाटते" ही कविता , तुमच्याआमच्या जगण्याशी मिळतीजुळती, त्यातल्या शेवटच्या दोन ओळी तर खासच. "मीच का जुळवून येथे आणि तेथे घ्यायचे, सारखे होणे नवे आता नकोसे वाटते" रोजच्या आयुष्यात बऱ्याचदा आपलीही अशी अवस्था होतेच ना? मात्र नेमक्या शब्दांत व्यक्त होता येत नाही, आणि उमटते ती फक्त चिडचिड. या सर्वच कविता वाचताना जाणवते ती शब्दांची सहजता, त्यांचं हळवेपण , आणि उबदार आपलेपण. अशाच मनाला भिडणाऱ्या , आशयघन कवितांचा संग्रहं "पूर्वसंध्या" जमेल तेंव्हा नक्की वाचवा असा. गीता सोनी 6 जून 2020 कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.