* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS A COVER? THE `MAYA` WHICH ENGULFS THE TRUTH IN THE FOLDING OF OBLIVION IS THE COVER. SINCE I GAINED MANHOOD, I HAVE BEEN OFTEN WONDERING ABOUT THE TRUTH AND UNTRUTH, IT HAS MADE MY LIFE IMPOSSIBLE. THIS SAME PROBLEM HAS SURFACED UP ON A NATIONAL LEVEL THROUGH THIS BOOK. IT IS VERY TRUE THAT THOSE WHO ARE LIVING TODAY ARE NOT RESPONSIBLE FOR THE ACTIONS DONE IN THE PAST BY SOMEONE ELSE. BUT IF WE ARE GOING TO TAKE THE CREDIT OF BEING THE DESCENDANTS OF OUR ANCESTORS THEN WE WILL HAVE TO CARRY ON THE RESPONSIBILITIES FOR THE DEEDS DONE BY THEM. MATURITY DOES NOT LIE ONLY IN GAINING FROM HISTORY; ON THE CONTRARY MATURITY IS REVEALED MORE PROPERLY IF ONE SUCCEEDS IN CUTTING THE UMBILICAL CORD BINDING ONE TO THE HISTORY. THIS IS APPLICABLE TO ALL THE HUMAN BEINGS APART FROM HIS OR HER RELIGION, CASTE, CREED, AND PERSONALITY. DR. S.L. BHAIRAPPA.
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला`आवरण` म्हणतात... मला कळायला लागल्यापासून `सत्यअसत्याचा प्रश्न` हा छळणारा प्रश्न आहे... हीच समस्या `आवरण`मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे... ...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarAbhinav Muley

    बस एकदा नक्कीच वाचावी अशी कादंबरी आपण अभ्यासक्रमात काय इतिहास शिकतो आणि आपल्याला काय शिकवलं बिंबवलं जात हे विचार करायला लावणारी , आदर्श सामाजिक मूल्य शिकवताना सत्यसत्याचा विवेक सदैव अवरणाखाली राहतो की काय असा प्रश्न स्वतःला विचारायला लावणारी कादंरी लेखकाची लेखन शैली आणि अभ्यास आपल्याला वाचताना हरवून टाकते ...Read more

  • Rating StarNishigandha Joshi

    #bookrelatednishi# आत्ताच "आवरण" ही डॉ. एस. एल्. भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली कादंबरी संपवली. वाचून सुन्न होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", लक्ष्मीचे वडील "अप्पाजी", ्यांचे मित्र शेषराय शास्त्री आणि त्यांचा मुलगा प्रोफेसर शास्त्री ही कादंबरीतील प्रमुख पात्रे. कादंबरीचा काळ १९९० नंतरचा आणि त्यासाठी अभ्यासलेल्या ग्रंथांचा काळ साधारण सोळाव्या शतकपासून चा. लक्ष्मीचे धर्म बदलून रझिया होणे आणि आंतरधर्मीय विवाह करणे या संदर्भातून कादंबरीची सुरुवात होते. सत्य इतिहासाचा अभ्यास करत जातानाच राजकारणासाठी तो लपवून खोटा इतिहास लादला जातोय हे सत्य तिच्या तकलादू सुधारणावादी विचारांना हलवून सोडते. जसजशी अभ्यासात खोल बुडत जाते तसतसे तिला आणखीन जोराचे धक्के बसत जातात. बाबरी मशीद पाडली त्याच्या भोवतालचा काळ आणि मुघल सम्राट औरंगजेब याचा काळ यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते. संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा सोळाव्या शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. अल्पसंख्यांक असलेल्या धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही. वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते. कादंबरी पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे. थक्क करणारा लेखकाचा अभ्यास आणि त्याचबरोबर अपरिमित सांस्कृतिक हानी करण्याचे, खरा इतिहास जाणीवपूर्वक दडपण्याचे हे कारस्थान सुज्ञ वाचकाला सुन्न करून टाकते. लेखकाने खरा सर्वधर्म विचार नायिकेच्या तर्फे मांडला आहे जो सशक्त राष्ट्र उभे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त शकतो. कादंबरीचा खरा उद्देश हाच आहे असे मला वाटते. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वाचावी अशी अभ्यासपूर्ण कादंबरी. ©️निशिगंधा 13/10/21. ...Read more

  • Rating StarUday R. Thombare

    नुकतंच डॉ. एस.एल.भैरप्पा यांचं ` आवरण ` हे पुस्तक अगदी झपाटल्यासारखं वाचून काढलं. पुस्तकाच्या विषयाबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुरुवात आणि शेवट यांत खूप फरक आहे. पण एकदा का पकड घेतली की माणूस अंतर्बाह्य ढवळून निघतो. आपण कधी कल्पनाही केली नसेल असा वषय अगदी मुद्देसूद, अनेक समर्पक संदर्भासहित कादंबरीतून समजावून दिला आहे. खरंतर पचनी पडेल असा विषय नाही. पण मोजक्या पात्रांभोवती फिरणारं कथानक अनेक वास्तवदर्शी गोष्टींचा उलगडा करत जातं आणि आपणही विचारचक्रात अडकत जातो. अशा पद्धतीचं लिखाण पहिल्यांदाच वाचनात आलं आणि खूप भारावून गेलो. अवश्य वाचावं असं पुस्तक. धन्यवाद 🙏🏻 ...Read more

  • Rating StarSandeep Jadhav

    पुस्तक परिचय.... "आवरण" एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" या अतिशय सुंदर कादंबरीनंतर माझ्या वाचनात आलेली "आवरण" ही त्यांची दुसरी कादंबरी. त्यांच्या लिखाणाचं वेगळेपण "साक्षी" या कादंबरी वाचनावेळीच जाणवलं होतं आणि त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली "आवर" ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना. भैरप्पांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं पुस्तक मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. भारतासारख्या अतिशय प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असणाऱ्या देशावर शेकडो वर्षांपूर्वी बऱ्याच परकीय मुस्लिम राजांनी आक्रमणे केली, सत्ता काबीज करून राज्य केलं. त्यांपैकी क्वचितच एखादा अपवाद वगळता सर्वच मुस्लिम राजांनी भारतातील हिंदूंवर इस्लाम लादून त्यांचे जबरदस्तीने इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरीही वेगवेगळ्या मुस्लिम बादशहांनी शेकडो वर्षें प्रयत्न करूनही हजारो वर्षांचा वारसा असणारी हिंदू संस्कृती, परंपरा, हिंदू धर्म टिकून राहिले. हिंदू धर्मातील लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी सर्वच मुस्लिम राजांनी एकच पद्धत वापरली आणि ती म्हणजे हिंदूंची प्रार्थनास्थळे नष्ट करणे, मंदिरे उध्वस्त करणे. यातूनच पुढे औरंजेबाने कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाचे मंदीर जमीनदोस्त करून त्याजागी त्याच मंदिराचे खांब वापरून "ग्याणवापी मस्जिद" उभारली. यातून दुखावला गेलेला हिंदू हळूहळू एकवटू लागला आणि शेवटी इस्लामी सत्ता उलथवून टाकली. हे सत्तांतर होत असताना आणि झाल्यानंतरदेखील इतिहासात असं एकही उदाहरण नाही सापडणार जिथे हिंदू राजाने मुस्लिम लोकांचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलंय किंवा त्यांची प्रार्थनास्थळे नष्ट केलीत. एस. एल. भैरप्पांनी याच मुस्लिम आक्रमणाला आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या विध्वंसाला केंद्रस्थानी ठेवून, बरेच ऐतिहासिक संदर्भ देऊन अगदी तटस्थपणे लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी "आवरण". काही सेक्युलर लोकांना हे वाटणं साहजिक आहे की भैरप्पांनी या कादंबरीतून मांडलेले ऐतिहासिक मुद्दे, ऐतिहासिक घटना आज वर्तमानकाळात वावरताना भारतातील हिंदू-मुस्लिम सलोख्याला घातक ठरू शकतात पण त्यांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागे इतिहासात कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे लोक जबाबदार नाहीत हे जरी खरं असलं, तरी "आपण त्यांचे वारसदार" आहोत अशा भावनेत राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या पुर्वजांनी केलेल्या कर्माची जबाबदारीसुद्धा स्वीकारली पाहिजे हेही तितकेच खरे आहे. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हेसुद्धा परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी अशी ही गोष्ट भैरप्पांनी त्यांच्या या कादंबरी "आवरण" मधून लोकांपुढे आणली आहे. "आवरणचे" आणखी एक वेगळेपण म्हणजे या कादंबरी मधेच जन्म घेणारी आणखी एक कादंबरी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more