* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS A COVER? THE `MAYA` WHICH ENGULFS THE TRUTH IN THE FOLDING OF OBLIVION IS THE COVER. SINCE I GAINED MANHOOD, I HAVE BEEN OFTEN WONDERING ABOUT THE TRUTH AND UNTRUTH, IT HAS MADE MY LIFE IMPOSSIBLE. THIS SAME PROBLEM HAS SURFACED UP ON A NATIONAL LEVEL THROUGH THIS BOOK. IT IS VERY TRUE THAT THOSE WHO ARE LIVING TODAY ARE NOT RESPONSIBLE FOR THE ACTIONS DONE IN THE PAST BY SOMEONE ELSE. BUT IF WE ARE GOING TO TAKE THE CREDIT OF BEING THE DESCENDANTS OF OUR ANCESTORS THEN WE WILL HAVE TO CARRY ON THE RESPONSIBILITIES FOR THE DEEDS DONE BY THEM. MATURITY DOES NOT LIE ONLY IN GAINING FROM HISTORY; ON THE CONTRARY MATURITY IS REVEALED MORE PROPERLY IF ONE SUCCEEDS IN CUTTING THE UMBILICAL CORD BINDING ONE TO THE HISTORY. THIS IS APPLICABLE TO ALL THE HUMAN BEINGS APART FROM HIS OR HER RELIGION, CASTE, CREED, AND PERSONALITY. DR. S.L. BHAIRAPPA.
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला`आवरण` म्हणतात... मला कळायला लागल्यापासून `सत्यअसत्याचा प्रश्न` हा छळणारा प्रश्न आहे... हीच समस्या `आवरण`मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे... ...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating Starसंतोष रंगापुरे

    डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे *आवरण* पुन्हा एकदा शांतपणे आणि विस्ताराने वाचून काढले आणि पुन्हा एकदा तोच अत्यवस्थ करणारा अनुभव आला, डोके सुन्न झाले. आपला धर्म, आपली संस्कृती विसरल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होतात याचे भयचकित करणारे वर्णन भैरप्पा यांनी कले आहे. *आवरण* साठी भैरप्पा यांनी जवळ जवळ 200 ऐतिहासिक आणि दुर्मिळ अशा ग्रंथांचा संदर्भ घेतला आहे, 200 ग्रंथांचा अभ्यास करून सत्याचे अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. भैरप्पा यांच्या सारखे अभ्यासू लेखक आज समाजात आहेत आणि आपल्या धर्माचा, आपल्या अभिमानास्पद संस्कृतीचा परिचय त्यांच्या अफाट लेखणीतून आपल्याला करून देत आहेत याचा खरंच खूप अभिमान वाटतो,भैरप्पा यांचे प्रत्येक पुस्तक वाचून काढण्याचे ठरवलेच आहे. अनेक वेगवेगळ्या इस्लामी राजवटींनी हिंदू संस्कृती, हिंदू मंदिरं विनाश करून संपूर्णपणे नष्ट करण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला आणि तथाकथित पुरोगाम्यांनी याच टीपूला, बाबर ला, औरंगजेब ला भव्य दिव्य दाखवण्याचा सततचा खोटा इतिहास लिहून प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी पण त्यांचीच तळी उचलली कारण त्यांच्या अल्पसंख्य votebank ची त्यांना नेहमीच काळजी वाटत आली आहे. हिंदू votebank ची काळजी करण्याची त्यांना कधीच आवश्यकता वाटली नाही कारण त्यांनी हिंदूना आधीच जातीपातीत विभागून टाकले आहे. त्यामुळे अशा वातावरणात खोट्या इतिहासा बद्दल, इस्लामी उदात्तीकरणा बद्दल इतक्या परखडपणे लिहायला धैर्य लागते आणि भैरप्पांनी ते उदाहरणां सहीत, इतिहासातील अनेक सत्य दाखल्यांसहीत दाखवून दिले आहे. *आवरण* सुरू होते ते लक्ष्मीच्या कहाणी पासून, बंगलोर पासून जवळच असलेल्या गावातून आलेली मुलगी पुण्यात फिल्म इन्स्टिटय़ूट मध्ये शिकता शिकता अमीर नावाच्या मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि पुढे जाऊन इस्लाम स्वीकारून *रझिया* बनते. आधुनिक विचारसरणी आणि चित्रपट क्षेत्रात असल्याने पुढे जाऊन अमीरचे इस्लामिक चालीरीतींना अनुसरून वागणे आणि पुढे जाऊन एकूणच इस्लाम धर्मातील अनेक गोष्टींचा फोलपणा तिला लक्षात येतो. तिचे आप्पा हिंदू धर्माचे अभ्यासक असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मी गावी येते आणि आप्पांची ग्रंथसंपदा चाळत असताना अप्पांचा प्रचंड अभ्यास त्यांची टिपणं पाहून लक्ष्मी स्तब्ध होऊन जाते. इस्लामिक अत्याचारांची मालिका मग ती बाबरी मस्जिद असो, औरंगजेबने काशी विश्वेश्वराचा विध्वंस करून उभी केलेली ज्ञानव्यापी मस्जिद असो किंवा टिपूने हिंदू रयतेवर केलेले अनन्वित अत्याचार असोत या सर्वच गोष्टींनी लक्ष्मी अस्वस्थ होते याच अनुषंगाने खरा इतिहास उजागर करण्यासाठी एक कादंबरी लिहिते, परंतु अशा स्फोटक सत्य लिखाणाला ना साहित्य वर्तुळातून, ना मीडिया कडून कुठूनच तिला सपोर्ट मिळत नाही, उलट अल्पसंख्य votebank दुखावण्याचा प्रयत्न केल्याने तिला अटक करण्याचा प्रयत्न होतो आणि हर प्रकारे त्रास दिला जातो हा संपूर्ण कथाक्रम वाचणे खूपच वेदनादायी आहे. विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणार्‍या मायेला *आवरण* म्हणतात आणि असत्य बिंबवणाऱ्या कार्याला विक्षेप म्हणतात. इतिहास आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो, अनेक संदर्भ दाखवतो पण विदृप इतिहासाची पुनरावृत्ती होऊन द्यायची नसेल तर आपला वर्तमान नक्कीच बदलला पाहिजे, इतिहासातील चुका सुधारल्या पाहिजेत तरच त्या इतिहासाचा काहीतरी उपयोग आहे. *आवरण* च्या पार्श्वभुमीवर आज काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार बनारस ला गेलो असताना स्वतः डोळ्याने पाहिला त्यामुळे पुस्तक वाचताना खूप भरून येत होते जे इतक्या शेकडो वर्षात होऊ शकले नाही ते आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहून ऊर भरून येतो, आता पुढे राममंदिराची घटना देखील तितकीच ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि सुखावणारी असेल. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे *आवरण*, स्वतःला आतून बदलून टाकणारे *आवरण* नक्की वाचा 🙏🏻🙏🏻🙏🏻 संतोष रंगापुरे. ...Read more

  • Rating StarAbhinav Muley

    बस एकदा नक्कीच वाचावी अशी कादंबरी आपण अभ्यासक्रमात काय इतिहास शिकतो आणि आपल्याला काय शिकवलं बिंबवलं जात हे विचार करायला लावणारी , आदर्श सामाजिक मूल्य शिकवताना सत्यसत्याचा विवेक सदैव अवरणाखाली राहतो की काय असा प्रश्न स्वतःला विचारायला लावणारी कादंरी लेखकाची लेखन शैली आणि अभ्यास आपल्याला वाचताना हरवून टाकते ...Read more

  • Rating StarNishigandha Joshi

    #bookrelatednishi# आत्ताच "आवरण" ही डॉ. एस. एल्. भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली कादंबरी संपवली. वाचून सुन्न होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", लक्ष्मीचे वडील "अप्पाजी", ्यांचे मित्र शेषराय शास्त्री आणि त्यांचा मुलगा प्रोफेसर शास्त्री ही कादंबरीतील प्रमुख पात्रे. कादंबरीचा काळ १९९० नंतरचा आणि त्यासाठी अभ्यासलेल्या ग्रंथांचा काळ साधारण सोळाव्या शतकपासून चा. लक्ष्मीचे धर्म बदलून रझिया होणे आणि आंतरधर्मीय विवाह करणे या संदर्भातून कादंबरीची सुरुवात होते. सत्य इतिहासाचा अभ्यास करत जातानाच राजकारणासाठी तो लपवून खोटा इतिहास लादला जातोय हे सत्य तिच्या तकलादू सुधारणावादी विचारांना हलवून सोडते. जसजशी अभ्यासात खोल बुडत जाते तसतसे तिला आणखीन जोराचे धक्के बसत जातात. बाबरी मशीद पाडली त्याच्या भोवतालचा काळ आणि मुघल सम्राट औरंगजेब याचा काळ यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते. संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा सोळाव्या शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. अल्पसंख्यांक असलेल्या धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही. वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते. कादंबरी पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे. थक्क करणारा लेखकाचा अभ्यास आणि त्याचबरोबर अपरिमित सांस्कृतिक हानी करण्याचे, खरा इतिहास जाणीवपूर्वक दडपण्याचे हे कारस्थान सुज्ञ वाचकाला सुन्न करून टाकते. लेखकाने खरा सर्वधर्म विचार नायिकेच्या तर्फे मांडला आहे जो सशक्त राष्ट्र उभे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त शकतो. कादंबरीचा खरा उद्देश हाच आहे असे मला वाटते. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वाचावी अशी अभ्यासपूर्ण कादंबरी. ©️निशिगंधा 13/10/21. ...Read more

  • Rating StarUday R. Thombare

    नुकतंच डॉ. एस.एल.भैरप्पा यांचं ` आवरण ` हे पुस्तक अगदी झपाटल्यासारखं वाचून काढलं. पुस्तकाच्या विषयाबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुरुवात आणि शेवट यांत खूप फरक आहे. पण एकदा का पकड घेतली की माणूस अंतर्बाह्य ढवळून निघतो. आपण कधी कल्पनाही केली नसेल असा वषय अगदी मुद्देसूद, अनेक समर्पक संदर्भासहित कादंबरीतून समजावून दिला आहे. खरंतर पचनी पडेल असा विषय नाही. पण मोजक्या पात्रांभोवती फिरणारं कथानक अनेक वास्तवदर्शी गोष्टींचा उलगडा करत जातं आणि आपणही विचारचक्रात अडकत जातो. अशा पद्धतीचं लिखाण पहिल्यांदाच वाचनात आलं आणि खूप भारावून गेलो. अवश्य वाचावं असं पुस्तक. धन्यवाद 🙏🏻 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more