* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS A COVER? THE `MAYA` WHICH ENGULFS THE TRUTH IN THE FOLDING OF OBLIVION IS THE COVER. SINCE I GAINED MANHOOD, I HAVE BEEN OFTEN WONDERING ABOUT THE TRUTH AND UNTRUTH, IT HAS MADE MY LIFE IMPOSSIBLE. THIS SAME PROBLEM HAS SURFACED UP ON A NATIONAL LEVEL THROUGH THIS BOOK. IT IS VERY TRUE THAT THOSE WHO ARE LIVING TODAY ARE NOT RESPONSIBLE FOR THE ACTIONS DONE IN THE PAST BY SOMEONE ELSE. BUT IF WE ARE GOING TO TAKE THE CREDIT OF BEING THE DESCENDANTS OF OUR ANCESTORS THEN WE WILL HAVE TO CARRY ON THE RESPONSIBILITIES FOR THE DEEDS DONE BY THEM. MATURITY DOES NOT LIE ONLY IN GAINING FROM HISTORY; ON THE CONTRARY MATURITY IS REVEALED MORE PROPERLY IF ONE SUCCEEDS IN CUTTING THE UMBILICAL CORD BINDING ONE TO THE HISTORY. THIS IS APPLICABLE TO ALL THE HUMAN BEINGS APART FROM HIS OR HER RELIGION, CASTE, CREED, AND PERSONALITY. DR. S.L. BHAIRAPPA.
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला`आवरण` म्हणतात... मला कळायला लागल्यापासून `सत्यअसत्याचा प्रश्न` हा छळणारा प्रश्न आहे... हीच समस्या `आवरण`मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे... ...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating Starसंतोष रंगापुरे

    डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे *आवरण* पुन्हा एकदा शांतपणे आणि विस्ताराने वाचून काढले आणि पुन्हा एकदा तोच अत्यवस्थ करणारा अनुभव आला, डोके सुन्न झाले. आपला धर्म, आपली संस्कृती विसरल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होतात याचे भयचकित करणारे वर्णन भैरप्पा यांनी कले आहे. *आवरण* साठी भैरप्पा यांनी जवळ जवळ 200 ऐतिहासिक आणि दुर्मिळ अशा ग्रंथांचा संदर्भ घेतला आहे, 200 ग्रंथांचा अभ्यास करून सत्याचे अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. भैरप्पा यांच्या सारखे अभ्यासू लेखक आज समाजात आहेत आणि आपल्या धर्माचा, आपल्या अभिमानास्पद संस्कृतीचा परिचय त्यांच्या अफाट लेखणीतून आपल्याला करून देत आहेत याचा खरंच खूप अभिमान वाटतो,भैरप्पा यांचे प्रत्येक पुस्तक वाचून काढण्याचे ठरवलेच आहे. अनेक वेगवेगळ्या इस्लामी राजवटींनी हिंदू संस्कृती, हिंदू मंदिरं विनाश करून संपूर्णपणे नष्ट करण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला आणि तथाकथित पुरोगाम्यांनी याच टीपूला, बाबर ला, औरंगजेब ला भव्य दिव्य दाखवण्याचा सततचा खोटा इतिहास लिहून प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी पण त्यांचीच तळी उचलली कारण त्यांच्या अल्पसंख्य votebank ची त्यांना नेहमीच काळजी वाटत आली आहे. हिंदू votebank ची काळजी करण्याची त्यांना कधीच आवश्यकता वाटली नाही कारण त्यांनी हिंदूना आधीच जातीपातीत विभागून टाकले आहे. त्यामुळे अशा वातावरणात खोट्या इतिहासा बद्दल, इस्लामी उदात्तीकरणा बद्दल इतक्या परखडपणे लिहायला धैर्य लागते आणि भैरप्पांनी ते उदाहरणां सहीत, इतिहासातील अनेक सत्य दाखल्यांसहीत दाखवून दिले आहे. *आवरण* सुरू होते ते लक्ष्मीच्या कहाणी पासून, बंगलोर पासून जवळच असलेल्या गावातून आलेली मुलगी पुण्यात फिल्म इन्स्टिटय़ूट मध्ये शिकता शिकता अमीर नावाच्या मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि पुढे जाऊन इस्लाम स्वीकारून *रझिया* बनते. आधुनिक विचारसरणी आणि चित्रपट क्षेत्रात असल्याने पुढे जाऊन अमीरचे इस्लामिक चालीरीतींना अनुसरून वागणे आणि पुढे जाऊन एकूणच इस्लाम धर्मातील अनेक गोष्टींचा फोलपणा तिला लक्षात येतो. तिचे आप्पा हिंदू धर्माचे अभ्यासक असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मी गावी येते आणि आप्पांची ग्रंथसंपदा चाळत असताना अप्पांचा प्रचंड अभ्यास त्यांची टिपणं पाहून लक्ष्मी स्तब्ध होऊन जाते. इस्लामिक अत्याचारांची मालिका मग ती बाबरी मस्जिद असो, औरंगजेबने काशी विश्वेश्वराचा विध्वंस करून उभी केलेली ज्ञानव्यापी मस्जिद असो किंवा टिपूने हिंदू रयतेवर केलेले अनन्वित अत्याचार असोत या सर्वच गोष्टींनी लक्ष्मी अस्वस्थ होते याच अनुषंगाने खरा इतिहास उजागर करण्यासाठी एक कादंबरी लिहिते, परंतु अशा स्फोटक सत्य लिखाणाला ना साहित्य वर्तुळातून, ना मीडिया कडून कुठूनच तिला सपोर्ट मिळत नाही, उलट अल्पसंख्य votebank दुखावण्याचा प्रयत्न केल्याने तिला अटक करण्याचा प्रयत्न होतो आणि हर प्रकारे त्रास दिला जातो हा संपूर्ण कथाक्रम वाचणे खूपच वेदनादायी आहे. विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणार्‍या मायेला *आवरण* म्हणतात आणि असत्य बिंबवणाऱ्या कार्याला विक्षेप म्हणतात. इतिहास आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो, अनेक संदर्भ दाखवतो पण विदृप इतिहासाची पुनरावृत्ती होऊन द्यायची नसेल तर आपला वर्तमान नक्कीच बदलला पाहिजे, इतिहासातील चुका सुधारल्या पाहिजेत तरच त्या इतिहासाचा काहीतरी उपयोग आहे. *आवरण* च्या पार्श्वभुमीवर आज काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार बनारस ला गेलो असताना स्वतः डोळ्याने पाहिला त्यामुळे पुस्तक वाचताना खूप भरून येत होते जे इतक्या शेकडो वर्षात होऊ शकले नाही ते आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहून ऊर भरून येतो, आता पुढे राममंदिराची घटना देखील तितकीच ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि सुखावणारी असेल. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे *आवरण*, स्वतःला आतून बदलून टाकणारे *आवरण* नक्की वाचा 🙏🏻🙏🏻🙏🏻 संतोष रंगापुरे. ...Read more

  • Rating StarAbhinav Muley

    बस एकदा नक्कीच वाचावी अशी कादंबरी आपण अभ्यासक्रमात काय इतिहास शिकतो आणि आपल्याला काय शिकवलं बिंबवलं जात हे विचार करायला लावणारी , आदर्श सामाजिक मूल्य शिकवताना सत्यसत्याचा विवेक सदैव अवरणाखाली राहतो की काय असा प्रश्न स्वतःला विचारायला लावणारी कादंरी लेखकाची लेखन शैली आणि अभ्यास आपल्याला वाचताना हरवून टाकते ...Read more

  • Rating StarNishigandha Joshi

    #bookrelatednishi# आत्ताच "आवरण" ही डॉ. एस. एल्. भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली कादंबरी संपवली. वाचून सुन्न होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", लक्ष्मीचे वडील "अप्पाजी", ्यांचे मित्र शेषराय शास्त्री आणि त्यांचा मुलगा प्रोफेसर शास्त्री ही कादंबरीतील प्रमुख पात्रे. कादंबरीचा काळ १९९० नंतरचा आणि त्यासाठी अभ्यासलेल्या ग्रंथांचा काळ साधारण सोळाव्या शतकपासून चा. लक्ष्मीचे धर्म बदलून रझिया होणे आणि आंतरधर्मीय विवाह करणे या संदर्भातून कादंबरीची सुरुवात होते. सत्य इतिहासाचा अभ्यास करत जातानाच राजकारणासाठी तो लपवून खोटा इतिहास लादला जातोय हे सत्य तिच्या तकलादू सुधारणावादी विचारांना हलवून सोडते. जसजशी अभ्यासात खोल बुडत जाते तसतसे तिला आणखीन जोराचे धक्के बसत जातात. बाबरी मशीद पाडली त्याच्या भोवतालचा काळ आणि मुघल सम्राट औरंगजेब याचा काळ यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते. संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा सोळाव्या शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. अल्पसंख्यांक असलेल्या धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही. वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते. कादंबरी पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे. थक्क करणारा लेखकाचा अभ्यास आणि त्याचबरोबर अपरिमित सांस्कृतिक हानी करण्याचे, खरा इतिहास जाणीवपूर्वक दडपण्याचे हे कारस्थान सुज्ञ वाचकाला सुन्न करून टाकते. लेखकाने खरा सर्वधर्म विचार नायिकेच्या तर्फे मांडला आहे जो सशक्त राष्ट्र उभे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त शकतो. कादंबरीचा खरा उद्देश हाच आहे असे मला वाटते. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वाचावी अशी अभ्यासपूर्ण कादंबरी. ©️निशिगंधा 13/10/21. ...Read more

  • Rating StarUday R. Thombare

    नुकतंच डॉ. एस.एल.भैरप्पा यांचं ` आवरण ` हे पुस्तक अगदी झपाटल्यासारखं वाचून काढलं. पुस्तकाच्या विषयाबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुरुवात आणि शेवट यांत खूप फरक आहे. पण एकदा का पकड घेतली की माणूस अंतर्बाह्य ढवळून निघतो. आपण कधी कल्पनाही केली नसेल असा वषय अगदी मुद्देसूद, अनेक समर्पक संदर्भासहित कादंबरीतून समजावून दिला आहे. खरंतर पचनी पडेल असा विषय नाही. पण मोजक्या पात्रांभोवती फिरणारं कथानक अनेक वास्तवदर्शी गोष्टींचा उलगडा करत जातं आणि आपणही विचारचक्रात अडकत जातो. अशा पद्धतीचं लिखाण पहिल्यांदाच वाचनात आलं आणि खूप भारावून गेलो. अवश्य वाचावं असं पुस्तक. धन्यवाद 🙏🏻 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more