* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE GOOD EARTH
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788184983319
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NOBEL LAUREATE PEARL S. BUCK’S EPIC PULITZER PRIZE-WINNING NOVEL AND OPRAH BOOK CLUB SELECTION ABOUT A VANISHED CHINA AND ONE FAMILY’S SHIFTING FORTUNES. THOUGH MORE THAN SEVENTY YEARS HAVE PASSED SINCE THIS REMARKABLE NOVEL WON THE PULITZER PRIZE, IT HAS RETAINED ITS POPULARITY AND BECOME ONE OF THE GREAT MODERN CLASSICS. IN THE GOOD EARTH PEARL S. BUCK PAINTS AN INDELIBLE PORTRAIT OF CHINA IN THE 1920S, WHEN THE LAST EMPEROR REIGNED AND THE VAST POLITICAL AND SOCIAL UPHEAVALS OF THE TWENTIETH CENTURY WERE BUT DISTANT RUMBLINGS. THIS MOVING, CLASSIC STORY OF THE HONEST FARMER WANG LUNG AND HIS SELFLESS WIFE O-LAN IS MUST READING FOR THOSE WHO WOULD FULLY APPRECIATE THE SWEEPING CHANGES THAT HAVE OCCURRED IN THE LIVES OF THE CHINESE PEOPLE DURING THE LAST CENTURY. NOBEL PRIZE WINNER PEARL S. BUCK TRACES THE WHOLE CYCLE OF LIFE: ITS TERRORS, ITS PASSIONS, ITS AMBITIONS AND REWARDS. HER BRILLIANT NOVEL—BELOVED BY MILLIONS OF READERS—IS A UNIVERSAL TALE OF AN ORDINARY FAMILY CAUGHT IN THE TIDE OF HISTORY.
पर्ल बक यांच्या ` द गुड अर्थ ` या जगप्रसिद्ध कादंबरीचा अनुवाद म्हणजेच भारती पांडे यांनी अनुवादित केलेली काली हि कादंबरी होय. ज्या व्यक्तीला वाचता येते तिने हे पुस्तक वाचुन स्वत:मध्ये मुरवून घेतले पाहिजे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये असे धडे घेण्याच्या वेळ केव्हा न केव्हा आलेली असते,असा अभिप्राय या कादंबरीबद्दल मास-मार्केट-पेपर बॅक मध्ये नोंदविण्यात आलेला आहे. वांगलूग आणि त्याच्या कुटूंबाच्या जीवन प्रवासामध्ये सहभागी होऊन जाता यावे, अशा प्रकारचे संवादी लेखन या कांदबरीचे आहे.वांगलूग हा चिनी शेतकरी या कादंबरीचा नायक आहे. त्याच्या लग्नाच्या दिवसापासून या कादंबरीला सुरुवात होते आणि या जीवन प्रवासात प्रौढ झालेली त्याची सुशिक्षित आणि शहरी मुले त्याच्या मरणाची वाट पाहतात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KALI #THEGOODEARTH #काळी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BHARATIPANDE #भारतीपांडे #PEARLBUCK "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK GAOKARI

    पर्ल बक यांच्या ‘द गुड अर्थ’ या जगप्रसिद्ध कादंबरीचा अनुवाद म्हणजेच भारती पांडे यांनी अनुवादित केलेली काळी ही कादंबरी होय. ज्या व्यक्तीला वाचता येते तिने हे पुस्तक वाचून स्वत:मध्ये मुरवून घेतले पाहिजे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये असे धडे घेण्याचीवेळ केव्हा ना केव्हा आलेली असते, असा अभिप्राय या कादंबरीबद्दल मास-मार्केट-पेपर बॅकमध्ये नोंदविण्यात आलेला आहे. वालंगलुंग आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवन प्रवासामध्ये सहभागी होऊन जाता यावे, अशा प्रकारचे संवादी लेखन या कादंबरीचे आहे. वांगलुंग हा चिनी शेतकरी या कादंबरीचा नायक आहे. त्याच्या लग्नाच्या दिवसापासून या कादंबरीला सुरुवात होते आणि या जीवन प्रवासात प्रौढ झालेली त्याची सुशिक्षित आणि शहरी मुले त्याच्या मरणाची वाट पाहतात. इथे ही कादंबरी संपते. अत्यंत विलक्षण असे हे कथानक वांगलुंगच्या जीवनाकडे आपल्याला भावव्याकुळतेने पाहयाला लावते गत जीवनाकडे अतिशय तटस्थपणे पाहणारा वांगलुंग हा संपूर्ण जगात असणाऱ्या शेतकऱ्याचा प्रतिनिधिक नायक वाटतो. ...Read more

  • Rating Starअनिरुद्ध जाधव

    Mind blowing.. book

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more