* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHROMOSOME-6
  • Availability : Available
  • Translators : VAISHALI JOSHI
  • ISBN : 9788177660845
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 512
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHROMOSOME 6 IS A PROPHETIC THRILLER THAT CHALLENGES THE MEDICAL ETHICS OF GENETIC MANIPULATION AND CLONING IN THE JUNGLES OF EQUATORIAL AFRICA, WHERE ONE MISTAKE COULD BRIDGE THE GAP BETWEEN MAN AND APE--AND FOREVER CHANGE THE GENETIC MAP OF OUR EXISTENCE...
शरीरात परक्या पदार्थाचा प्रवेश झाला तर त्याला कडाडून विरोध करायचा, हे याचं कार्य असतं. अडचण अशी होती, की एम्एच्सी हा क्रोमोझोम्-६ च्या छोट्या भागातील फारच छोटा भाग होता. त्यामध्ये आम्लारींच्या लक्षावधी जोड्या असलेल्या कितीतरी रिकाम्या जागा होत्या. या जागांमध्ये इतर शेकडो जनुवंÂ होती. या जनुकांचं कार्य काय आहे, ते केविनला अजिबात ठाऊक नव्हतं. ते जाणून घेण्यासाठी त्यानं अलीकडेच इंटरनेटवर चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला मिळालेली उत्तरं फारच मोघम आणि असमाधानकारक होती. बNयाच संशोधकांचं म्हणणं असं होतं, की क्रोमोझोम्-६ च्या छोट्या भागामध्ये स्नायू आणि हाडांच्या वाढीशी संबंधित अशी जनुवंÂ आहेत. पण यापलीकडे आणखी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKAKIBAND #THEWHISTLEBLOWER #एकाकीबंड #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SINDHUJOSHI #KATHRYN BOLKOVACCARILYNN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 06-05-2001

    उत्क्रांतीवादाला धक्का देणारी रहस्यमय कादंबरी... माकडे, उंदीर, घोडे वगैरेसारख्या प्राण्यांचे मानवावर मुख्यत: वैद्यकीय क्षेत्रात अनंत उपकार आहेत. अनेक प्रकारची औषधे, लशी, प्रतिजैविके ही एकतर प्राण्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या घेतलेल्या चाचण्यांरून बनविली आहेत. याच क्षेत्रात क्रोमोसोम्स म्हणजे रंगसूत्रांवरील जनुके आणि सूक्ष्मात सूक्ष्म अशा प्रथिनांच्या संशोधनावर भर दिला जात आहे. अशाच प्रकारच्या संशोधनात माणसाच्या शरीरातील विशिष्ट क्रोमोसोम्सवरील जनुके शोधून, ती एका जागेवरून दुसरीकडे किंवा एखाद्या प्राण्याच्या शरीरात फलित स्त्रीबीजांमार्फत हलविणे आणि मग त्या प्राण्याच्या वाढीनंतर आरोपण करणे, या विशिष्ट पद्धतीने पेशीसमूह जुळवून घेऊन माणसाचे शरीर त्या अवयवाचा सहजगत्या स्वीकार करते, या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर ‘क्रोमोझोम - ६’ ही इंग्रजी कादंबरी आधारित आहे. गुन्हेगारी विश्वातील एक कुविख्यात गुंड कार्लो फ्रॅंकोनीचा खून होतो. त्याचा मृतदेह न्यूयॉर्कमधील सहकारी शवागारात आणल्यानंतर अचानकरीत्या बेपत्ता केला जातो. काही दिवसांनी पाण्यावर तरंगत असलेला एक मृतदेह आणला जातो. त्याच्या शवविच्छेदनानंतर छिन्नविछिन्न केलेल्या यकृताचा शस्त्रक्रिया केलेला एक भाग गुन्हेगारी रोगनिदान तज्ज्ञ डॉ. जॅक स्टेपलटन आणि डॉ. लॉरी मॉन्टगोमेरी यांना आढळतो. त्यासंबंधी त्यांना काही वेगळेच वाटून, ही जोडगोळी या यकृताच्या अनेक चाचण्या घेते. त्याचे उलटसुलट निष्कर्ष निघून शेवटी ते कोठल्यातरी माकडाचा तो झीनोग्राफ्ट असल्याचा तर्क करतात. पोलिसांच्या साहाय्याने धागेदोऱ्यांचा शोध घेत ही जोडगोळी शेवटी आफ्रिका खंडातील इक्वेटोरियाला गिनीमधील कोगो शहरात पोहोचते. याच वेळेस या कोगो शहरातील जेनेनिस या जीव-तंत्रज्ञान कंपनीच्या प्रयोगशाळेतील रेण्वीय जीवशास्त्रज्ञ केविन मार्शल यकृत रोपणाकरता ‘बोनोबो’ जातीच्या एप्स माकडांचा उपयोग करून, त्या माणसाची एक प्रतिकृतीच (किमेरो) तयार होते आणि असे अनेक बोनोबो कोगोजवळील इस्ला फ्रॅन्सेस्का या निर्जन, अस्पर्श जंगल असलेल्या बेटावर सोडले जातात. पण या बोनोबोंबद्दल केविनला वेगळाच संशय येऊ लागतो. शेवटी तो आणि जेनेसिसमधल्या मेलनी आणि कँडेससह तिसऱ्या प्रयत्नांत यशस्वीपणे त्या बेटावर पोहोचतात. केविनची भीती व्यर्थ ठरत नाही. आग निर्माण करणारे, हत्यारे बनवणारे, असे हे बोनोबो म्हणजे ५० लाख वर्षांपूर्वीचे आदिमानव तयार झालेले असतात. हे सर्व अमानवी भयंकर असे घडते. पुन्हा एकदा ही जोडगोळी आणि न्यूयॉर्कवरून आलेली डॉक्टर मंडळी त्या बेटावर कसे पोहोचतात, त्या बोनोबोचे पुढे काय होते, हे रहस्य नक्कीच वाचण्यासारखे आहे. रोमांचकारी घटना वेगाने घडत जातात त्यामुळे वाचण्यातली उत्सुकता पानागणिक वाढतच जाते आणि शेवटी पुढे काय होणार, ही उत्कंठा कायम राहते. इतकी प्रभावी कादंबरी मूळ इंग्रजी लेखक डॉ. रॉबिन कुक यांनी साकारली असून, त्याचा मराठी अनुवाद वैशाली जोशी यांनी तितक्याच प्रभावीपणे आणि समर्थपणे ओघवत्या भाषाशैलीत वाचकांपुढे उभा केला आहे. भौगोलिक परिस्थितीचे भान यावे म्हणून इक्वेटोरियल गिनी आणि कोगोचे नकाशे दिले आहेत आणि एक इंग्रजी-मराठी शब्दसूचीही दिली आहे. पाश्चात्त्य लेखकांनी अनेक वैज्ञानिक कल्पना लढवून यंत्रमानव, परग्रहावरील विश्व, अशा कथा-कादंबऱ्या पूर्वीच लिहिल्या आणि त्या गोष्टी आज आपण प्रत्याक्षात खऱ्या झालेल्या पाहतो आहोत. एके काळी अशक्य असणाऱ्या मनावी जनुकांचा आराखडा आत पूर्णपणे बनविल्याचा क्रांतिकारक शोध नुकताच लागला आहे. त्याच धर्तीवर या क्रोमोझोम - ६ कादंबरीतील वैद्यकीय अमानवी कल्पना नजीकच्या भविष्यात खऱ्या ठरू शकतात याची भीतीयुक्त जाणीव पदोपदी होत राहते. -डॉ. अनिल महाबळ ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (YUVA)

    अमेरिकेत ‘बेस्टसेलर’ कादंबऱ्या म्हणजे एक मोठंच प्रकरण आहे. एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी जसे त्याच्यात काही विशिष्ट घटक आवश्यक असतात. तसंच या कादंबऱ्यांचंही असतं आणि चित्रपट किती धंदा खेचतोय याचा जसा दर आठवड्याला आढावा घेण्यात येतो. आदल्या महिन्यातजास्तीत जास्त खपलेल्या पहिल्या दहा पुस्तकांची नावं जाहीर करण्यात येतात. तीच ‘बेस्टसेलर लिस्ट.’ या कादंबऱ्यांमधला विषय अगदी नवा असतो. लेखकाने वर्णन केल्या जाणाऱ्या विषयाचा अगदी सखोल अभ्यास केलेला असतो आणि त्याचं कथानक अत्यंत गतिमान असतं. वाचक गुंतून राहील असं घट्टपणे कथानक बांधलेलं असतं. शिवाय बाकी हमखास यशस्वी मसाला असतोच. पण म्हणजे मसाला हा चटकदारपणासाठी असतो. मुख्य विषयावर लेखकाने प्रचंड मेहनत घेतलेली असते. म्हणून मग त्या कादंबऱ्या जगभर तुफान खपतात आणि लेखकाला श्रीमंत बनवतात. जेफ्री आर्चर, हेरॉल्ड रॉबिन्स, मारिओ पुझो, फ्रेडरिक फोरसिथ, मायकेल क्रायटन हे सध्याचे बेस्टसेलर लेखक आहेत. त्यांच्याच पंक्तीतलं आणखी एक नाव म्हणजे रॉबिन कुक. स्वत: निष्णात डॉक्टर आहेत. साहजिकच त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये वैद्यक शास्त्रीय विश्वातले विषय भन्नाटपणे हाताळलेले असतात. ‘क्रोमोझोम-६’ ही डॉ. रॉबिन कुक यांची अशीच एक भन्नाट कादंबरी. जेनेटिक्स किंवा जनुकशास्त्र या विषयात वाचकाला आरपार घुसवणारी, खिळवून ठेवणारी. डी.एन.ए. हा शब्द आपल्याला माहीतच आहे. व्यक्तीची सगळी आनुवंशिक माहिती डी.एन.ए.मध्ये सांकेतिक भाषेत साठवलेली असते. हे डी.एन.ए. ज्यांच्यामध्ये असतं अशा प्रत्येक पेशीतील लांबट आकाराच्या रचना किंवा समजुतीसाठी म्हणूया डी.एन.ए.च्या डब्या म्हणजे क्रोमोझोम किंवा गुणसूत्रं. गुणसूत्रं एकूण सेहेचाळीस असतात आणि ती नेहमी जोड्यांमध्ये असतात. माणसामध्ये आणि मानवसदृश वानरांमध्ये गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात. सध्या अवयवारोपणाच्या शस्त्रक्रिया सर्रास केल्या जातात. पण अनेकदा रुग्णाचं शरीर तो आरोपित अवयव नाकारलं. कारण त्याच्या शरीरासाठी तो अवयव ही ‘फॉरिन बॉडी’ असते. मग शस्त्रक्रिया फुकट जाते. डॉ. केविन मार्शल या मॉलिक्युलर बायोलॉजी तज्ज्ञाला यावर एक उपाय सुचतो. प्रत्येक माणसाचीच एक प्रतिकृती बनवायची. प्रतिकृतीमधली सगळी गुणसूत्रं ही मूळ व्यक्तीशी मिळतीजुळतीच ठेवायची. म्हणजे मूळ व्यक्तीला गरज लागेल तेव्हा प्रतिकृतीतला अवयव काढून त्याचं आरोपण करता येईल. मूळ व्यक्तीचं शरीर ‘फॉरिन बॉडी’ म्हणून तो नाकारणार नाही. कल्पना तर अफलातून असते. पण ती प्रत्यक्षात उतरवायची कशी? प्रत्येक माणसाची प्रतिकृती घडवायची कशी? निसर्ग हा असा महान शास्त्रज्ञ आहे की दोन जुळी भावंडं देखील तो निराळी घडवतो. डॉ. केविन मार्शलचं यावरचं संशोधन असं की, चिपांझी वानरांमधल्या बोनोबो या जातीमध्ये मानवी शरीरातील क्रोमोझोम-६ आरोपित करायचा. म्हणजे उदाहरणार्थ, एका बोनोबो नराच्या शरीरातला मूळ क्रोमोझोम-६ काढला आणि डॉ. केविन मार्शलच्या शरीरातला क्रोमोझोम-६ तिथे घातला की, तो नर म्हणजे केविनची प्रतिकृती झाली. भविष्यात केव्हाही केविनला एखादा अवयवाची गरज पडली की, त्या नराच्या शरीरातला हवा तो अवयव काढून त्याचं आरोपण केविनच्या शरीरात करता येईल. डॉ. रेमंड लियॉन्स नावाचा व्यापारी दृष्टीचा डॉक्टर केविनच्या संशोधनावर बेहद्द खूष होतो. त्याच्या दृष्टीने हे संशोधन म्हणजे सोन्याची खाण असते. आफ्रिका खंडातल्या इक्वेटोरियल गिनी या देशातलं घनदाट झाडीचं एक बेट निवडण्यात येतं. तिथे बोनोबो वानरांची वसाहत करण्यात येते. डॉ. केविन मार्शलला एक अत्याधुनिक, सुसज्ज प्रयोगशाळा उभारून देण्यात येते. जगभरातले धनिक स्त्री-पुरुषही डॉ. रेमंडची गिऱ्हाईकं असतात. भरपूर भाडं घेऊन त्या श्रीमंतांची प्रतिकृती निर्माण करणं हा डॉ. रेमंडचा शास्त्रीय धंदा बनतो. हे सारं वैज्ञानिक नितीमत्तेला सोडून असतं. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत गुप्त ठेवण्यात येतो. पण न्यूयॉर्कचा कुख्यात माफिया कार्लो फ्रॅंकोनी याचा खून होतो. त्याचं प्रेत शवागारातून अचानक गायब होतं. परत सापडतं तेव्हा त्या प्रेताचं यकृत छिन्नविछिन्न केलेलं असतं. शवविच्छेदनात तज्ज्ञांना आढळतं की, हे यकृत मूळचं नाही, आरोपित केलेलं आहे. इथून शोधाला सुरुवात होते आणि कथानक डॉ. जॅक स्टेपलटन, डॉ. लॉरी मॉनृगोमेरी, डॉ. केविन मार्शल आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह इक्वेटोरियल गिनीच्या दाट जंगलात घुसतं. शेवट अर्थातच गोड होतो. पण त्या शेवटपर्यंत डॉ. रॉबनि कुक वाचकाला असं काही थरारून टाकतात की, पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. विज्ञानाच्या उपयोगातून माणूस अधिक शहाणा, अधिक जबाबदार बनण्याऐवजी तो अधिकाधिक लोभी बनत चाललाय, पैशासाठी तो अन्य सजीवांच्या आणि अन्य मानवांच्या जिवाशीही खेळ सुरू लागलाय. हे अत्यंत घातक आहे. हा भस्मासूर उलटला तर संपूर्ण मानवजातच धोक्यात येऊ शकते, या वास्तवाचं भान वाचकाला या कादंबरीतून येतं. कोणत्याही उपदेशाचे डोस न पाजता कादंबरीतून हा संदेश वाचकांपर्यंत पोचणं हेच डॉ. रॉबिन कुक याचं यश आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 27-05

    वाचकांसाठी एक वेगळे दालन… निसर्गचक्र आपल्या हाती ठेवण्याचे प्रयत्न विविध संशोधनांच्या निमित्ताने मानवाने सुरू केले आहेत. जिनोम प्रकल्पाच्या यशानंतर आता या प्रकल्पाच्या नैमिकतेविषयी जगभरात प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. मानव निसर्गचक्रात आता खूपच ढवळढवळ करू लागल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. आपल्याला हवा तसा माणूस जन्माला घालण्यातही कदाचित येत्या काही वर्षांमध्ये मानवाला यश येईल. अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर मानवाच्या या कारवायामुळे यात काय होऊ शकते, याचा एक रोमांचकारी अनुभव देणारी क्रोमोझम् – सिक्य ही कादंबरी विख्यात लेखक डॉ. रॉबिन कुक यांनी लिहिली असून मेहता पब्लिशिंगने सुरू केलेल्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या अनुवाद प्रकल्पाअंतर्गत त्याचा मराठी अनुवादही सादर करण्यात आला आहे. हा मराठी अनुवाद वैशाली जोशी यांनी केला आहे. कादंबरीला सुरुवात होते ती कुख्यात गुंड कार्लो फ्रॅंकोनी याच्या हत्येपासून. या हत्येनंतर त्याचा मृतदेह सरकारी शवागरातून गायब केला जातो. हे प्रतिस्पर्धी गुंड टोळीचे काम असावे, असा कयास सुरुवातीस व्यक्त केला जातो. मात्र या सरकारी शवागारात काम करणारा गुन्हेगारी रोगनिदान तज्ज्ञ डॉ. जॅक स्टेपलटन आणि त्यांची सहकारी डॉ. लॉरी मॉन्टगोमेरी या प्रकरणाचा पिच्छा पुरवितात आणि एका वेगळ्याच व्यापारी कटाचा पर्दाफाश होतो. सरकारी शवागाराला एक मृतदेह सापडतो, ज्याची ओळख पटणे खूपच कठीण असते. त्या मृतदेहामध्ये यकृतारोपण केलेले असते. मात्र अवयवारोपणानंतर तो नवा अवयव शरीराने स्वीकारावा यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा मागमूसही त्या मृतदेहात सापडत नाही. यामुळे सारेच चक्रावून जातात. विविध चाचण्यानंतर तो छिन्नविच्छन्न मृतदेह फ्रॅंकोनीचाच असल्याचे स्पष्ट होते. असे लक्षात येते की, कदाचित विषुवृत्तावरील घनदाट अरण्यात इक्वेटोरियन गिनीमध्ये या घटनेचे मूळ असावे. डॉ. जॅक व डॉ. लॉरी दोघेही तेथे पोहोचतात आणि त्यांना धक्कादायक उलगडा होतो. या कादंबरीचे कथानक दोन समांतर पातळ्यावर पुढे सरकते. दुसरी समांतर पातळी आहे ती, केविन मार्शलशी संबंधित. त्याने हिस्टोकॉपोबिलीटी या विषयावर केलेले संशोधन पाहून डॉ. रेमंडच्या मनात एक वेगळी कल्पना येते. बोनोबो जातीच्या माकडांमधील गुणसूत्रात अवयवारोपण करावाच्या व्यक्तीतील क्रोमोझोम सिक्सचा भाग घालून नवीन माकडाची निर्मिती केली जाते. हे नवे बोनोबो माकड म्हणजे त्या माणसाची दुसरी प्रतिकृतीच असते. दोन ते तीन वर्षांत हे माकड पूर्णपणे वाढल्यानंतर त्याचे वर्षांत हे माकड पूर्णपणे वाढल्यानंतर त्याचे अवयव काढून रुग्णाच्या शरीरात त्याचे रोपण केले जाते. ते त्याच्या प्रतिकृतीचेच रोपण असल्यामुळे रोपण टिकण्यासाठीची औषधे घ्यावी लागत नाहीत. या माकडांच्या व्यवस्थेचा खर्च मोठा असल्याने केवळ श्रीमंत व्यक्तींनाच त्याचा लाभ घेता येतो. ज्या डॉक्टरांकडे श्रीमंत व्यक्ती येतात, त्यांना यात सहभागी करून घेऊन ‘जेनिसिस’ या कंपनीकडून इक्वेटोरियन गिनीमध्ये हा प्रकल्प राबविला जातो. ढोबळ मानाने हेच कादंबरीचे कथानक असले तरी मध्यवर्ती कल्पना असलेल्या बोनोबो माकडांची वर्तणूक आणि त्यामुळे केविन मार्शलला आलेली शंका यामुळेच कादंबरीला कलाटणी मिळते. माणसाचे गुणसूत्र असलेल्या माकडाची निर्मिती करता करता असा काही तरी घोटाळा होतो की केविन मार्शल व त्याची सहाय्यक मेलिनी यांच्याकडून पूर्णरूपात येणाऱ्या मानवापूर्वीची वानर-मानवाची निर्मिती होते. संघटितपणे रहाणे, आगीचा वापर करणे, शस्त्रांचा वापर करणे या बाबींमुळे ही शंका खरी असल्याचे लक्षात येते. त्यामुळे हा प्रकल्प बंद करावा, असे केविनचे मत असते. मात्र मोठाल्या फायद्यामुळे डॉ. रेमंड आणि त्याच्या सहकाऱ्यांना तो बंद करायचा नसतो. यातच केविन मार्शलचे धाडस आणि त्याच वेळेस डॉ. जॅक आणि त्याच्या सहप्रवाशांचे तिथे पोहोचणे, योगयोगाने एकाच वेळेस होते. या सर्वांना यमसदनी धाडण्याचाच जेनेसिसच्या मुख्य सुरक्षा रक्षकाचा विचार असतो. मात्र एकमेकांच्या मदतीने हे सारेजण निसटतात आणि जाता जाता बोनोबोंनाही विषुवृत्तीय जंगलात सोडून देतात. तब्बल ५२० पांनाच्या या कादंबरीत तीन ते चार ठिकाणीच केवळ शास्त्रीय माहिती मोठ्या प्रमाणावर येते. तिथे कदाचित सामान्य माणसाला वाचताना कंटाळा येऊ शकतो. मात्र ज्याला विज्ञानकथा वाचण्याची सवय आहे. त्याला हा भाग समजून घेण्यात अधिक मजा वाटू शकते. कारण संपूर्ण कादंबरीचे तेच मूळ आहे. त्याच कल्पनेवर पूर्ण कादंबरी घेतलेली आहे. दोन समांतर पातळ्यांवर केलेली कादंबरीची रचनाही उत्तम झाली आहे. त्यामुळे कादंबरीच्या वेगातही समतोल राखण्यात लेखकाला यश आले आहे. कादंबरीच्या अगदी मध्यापर्यंत वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. त्यानंतर बोनोबोंचे गूढ उकलते तरीही पुढे काय हा प्रश्न वाचकाच्या मनात राहतोच. कादंबरीचा शेवट ज्या वेगात करण्यात आला आहे. तो मात्र काहीसा खटकणारा आहे. कादंबरीतील घटना अतिशय वेगात घडत असल्या तरी कादंबरी मात्र तितकी वेगात पुढे जात नाही. यात वावगे काहीच नाही. मात्र हा वेग कादंबरीच्या अंतिम टप्प्यात म्हणजे केविन मार्शल आणि डॉ. जॅक व सहप्रवाशांच्या अटकेजवळ अचानक वाढतो. कादंबरी लवकर संपविण्याच्या घाईच लेखकाला झाली आहे की काय अशी शंका यावी इतपत हा वेग वाढला आहे. मराठी अनुवादाबाबत बोलायचे तर अनुवाद चांगला उतरला आहे. आपण कोणत्या तरी एका कादंबरीचा अनुवाद वाचत आहोत अशी शंका वाचकाच्या मनात येणार नाही. ज्या वैज्ञानिक संकल्पनाचा उल्लेख कादंबरीत आहे. त्यातील महत्त्वाच्या संकल्पना शेवटच्या पानावर शब्दसूचीत देण्यात आल्या आहेत. विविध भाषांतील चांगल्या साहित्याचा अनुवाद आपल्या भाषेत आल्यास एक नवे दालन आपल्या वाचकांसमोर खुले होते, असे अनुवादाच्या बाबतीत नेहमीच म्हटले जाते. त्याचा प्रत्यय क्रोमोझोम् सिक्सचा हा अनुवाद वाचताना वाचकांना निश्चितच येईल. -विनायक परब ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more