* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SWAPNATIL CHANDANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668025
  • Edition : 5
  • Publishing Year : DECEMBER 1973
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 76
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HE WAS JUST 20 YEARS OLD WHEN HE WROTE HIS FIRST FAIRY TALE, `THE FAIRY WITH GOLDEN MIND`. IT WAS ACTUALLY A LOVE STORY WRITTEN BY ONE YOUTH FOR ALL THE YOUNGSTERS. THEN HE KEPT ON WRITING ONE STORY AFTER ANOTHER, INITIALLY THEY ALL SOUNDED TO BE FAIRY TALES, BUT EACH ONE WAS A LOVE STORY, EACH HAVING A UNIQUE FLOW OF LANGUAGE, WITH A RHYTHM, WITH A CHIME, WITH SUCH A PICTURESQUE DESCRIPTION THAT EACH SOUNDED TO BE HAPPENING IN FRONT OF OUR VERY EYES, ROLLING FAST LIKE A MOVIE. SOME STORIES WERE A PERFECT COMBINATION OF LIGHT AND FIGURES. MATKARI`S WORDS POSSESS SUCH IMMENSE POWER. TRULY SPEAKING FAIRY TALES ARE NOT ONLY FOR THE CHILDREN, THEY ARE ACTUALLY MEANT FOR THE YOUNG MINDS. THOSE GROWNUP YOUNG MINDS WHO CAN FEEL THE POETIC ASPECT OF LIFE, WHO CAN SENSE THE BEAUTY AROUND, WHO WANT TO PURSUE THEIR DREAMS, WHO WANT TO COLOUR THE CANVAS OF THEIR LIVES WITH ALL THE SHADES OF SADNESS AND HAPPINESS IN PERFECT HARMONY. THIS FAIRY TALE WILL WORK AS LOVE POEMS FOR THOSE MINDS. LOVE POSSESSES DIVINE HAPPINESS, IT CARRIES THE IMMENSE PAIN OF SEPARATION. BUT LOVE IS MORE THAN THE HAPPINESS AND PAIN. IT IS BEYOND UNDERSTANDING. IT IS SACRIFICE, IT IS PAYING, IT IS CHANGING INSIDE OUT, IT IS A COLOURFUL EXISTENCE. EVERYONE WHO WAS IN LOVE, IS IN LOVE AND WILL BE IN LOVE MUST READ THESE STORIES. THESE ARE THE ONLY OF ITS TYPE WRITTEN BY MATKARI. HE NEVER HANDLED THIS FORM THEREAFTER. THESE STORIES ARE THE PROOF OF HIS SKILLS AS A ROMANTIC WRITER.
जेमतेम विशीचे असताना रत्नाकर मतकरींनी पहिली परिकथा लिहिली : ‘सोनेरी मनाची परी’ अर्थातच, ती प्रेमकथा होती. एका तरुणानं, सगळ्या तरुणांसाठी लिहिलेली. त्या पाठोपाठ आल्या, या संग्रहातल्या इतर परिकथा खरं तर प्रेमकथा. त्यांची कथनशैली अगदीच वेगळी. भाषा लयबद्ध, नादमधुर. इतकी चित्रदर्शी, की जसा एखादा गतीमान चित्रपटच आपल्या नजरेसमोर उलगडतोय. कुठं कुठं तर, छायाचित्रण केलेलं असावं तसं, छायाप्रकाश आणि आकृती यांचे खेळ दिसतात. ही किमया मतकरींच्या शब्दांची. परिकथा केवळ मुलांसाठी नसतात. जे मनानं तरुण आहेत, ज्यांना जीवनातलं काव्य जाणवतं, सौंदर्याचा शोध घ्यावासा वाटतो, सुखदु:खाच्या सर्व छटांमध्ये रंगावंसं वाटतं, त्या प्रौढांसाठी, या जणू कथारूपानं सांगितलेल्या कविता आहेत. प्रेमाविषयीच्या. प्रेमातला अत्युत्कट आनंद, विरहाच्या असह्य वेदना, यांच्याही पलीकडे जाऊन, प्रेमातला त्याग, प्रेमासाठी मोजावी लागणारी विंÂमत, प्रेमामुळे झालेले अंतर्बाह्य बदल, अशा सर्वच प्रेमरंगांची गाथा आहे ही. आज, काल वा उद्या, प्रेमात पडणाया प्रत्येकानं वाचल्याच पाहिजे, अशी या शैलीतल्या, या एवढ्याच कथा मतकरींनी लिहिल्या, आणि साचा मोडून टाकला. त्यांच्या एकूण लिखाणात असा दुसरा संग्रह नाही. एकूण मराठी वाङ्मयातच एकमेवाद्वितीय असा हा कथासंग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA

    परीकथातून घडणाऱ्या वास्तवाचे दर्शन... रत्नाकर मतकरी यांनी १९५९ ते १९६४ च्या दरम्यान नऊ परीकथा लिहिल्या. या परीकथांचा संग्रह ‘सोनेरी मनाची परी’ या नावाने १९७३ साली निघाला. तो बरीच वर्षे दुर्मीळ होता. ‘स्वप्नातील चांदणे’ या नावाने त्याची नवी आवृत्ती नघाली आहे. मुखपृष्ठावर चंद्रमोहन कुलकर्णी यांचे स्वप्नातील चांदण्याच्या आल्हाददायक पार्श्वभूमीवरील ढगांमध्ये अधांतरी झेपावणाऱ्या, तरुण तरुणीचे आकर्षक रुपडे- यामुळे प्रथमदर्शनीच ते मनात भरते. ‘या परीकथा मी एका विशिष्ट भावस्थितीत लिहिल्या. तेव्हा मी नुकताच प्रेमात पडलो होतो. केवळ एका मुलीच्या नव्हे तर सबंध जीवनाच्या’ या प्रस्ताविकाच्या आरंभीच्या ओळींनीच या परीकथांची नजाकत काही आगळीवेगळी असणार, याची मनोमन ग्वाही मिळते आणि ‘सगळे आयुष्य समिधेसारखे जाळून टाकणारा कलंदर शायर उत्कटपणे शायरी करतो, आतडी पिळवटणाऱ्या व्यथेची गझल बनवतो, त्याक्षणी तो दु:खी नसतो, तर दु:खाची चव घेत असतो आणि या चव घेण्यातच त्याला आयुष्याचे समाधान सापडते’ हे निरीक्षण पुढे येते तेव्हा हॅन्स अँडरसनच्या स्वानुभवाधिष्ठित शोकात्म परीकथांच्या वळणावर जाणाऱ्या आशयगर्भ जीवनचिंतनाचीही डूबही या लिखाणाला मिळालेली असणार हे मनावर ठसते. अद्भुत वाटणारी परीकथाही शेवटी आयुष्याचीच कथा मांडते. आयुष्यात नेहमी आढळणारे सत्यच ती वेगळ्या शैलीत, वेगळ्या परिभाषेत मांडते, एक विशिष्ट वातावरण निर्माण करते. परीकथेत येणारी चेटकीण, राजाराणी, राजकन्या, पऱ्या, जादूगार ही पात्रे आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या माणसांचीच प्रतीके असतात. अकारण प्रेम करणारी, दीनदुबळ्यांना निरपेक्ष मदत करणारी, उगाच दुष्टपणाने छळवाद मांडणारी ही पात्रे असतात. पण कधीं ती स्थलकालाच्या मर्यादा लीलया झुगारून देऊ शकतात. काही अलौकिक शक्ती वा सिद्धी त्यांना अवगत असतात, त्यामुळे नेहमीच्या वास्तवापलीकडच्या जगातही ती आपल्याला नेऊन आणतात. चांगले आणि वाईट, पाप आणि पुण्य यांच्यातील संघर्षाची वेगवेगळी रूपे कधी सूक्ष्म, तर कधी अतिरंजित परिप्रेक्ष्यातून दाखवतात. बालपणी वाचलेल्या परीकथा आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यावर नवनवा आशय-संदेश-अर्थ देत पुन:पुन्हा आपल्या जीवनात डोकावत राहतात. मतकरींच्या या परीकथा प्रौढांसाठी आहेत. स्त्री-पुरुष आकर्षणाची वेगवेगळी रूपे त्या दर्शवतात. आणि त्यातील अपरिहार्य ताटातूटही विशाल सहानुभूतीने, सौहार्दाने विश्वात्मक पातळीवर नेऊन ठेवतात. त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि काव्यात्मक शैलीला या परीकथांमध्ये मुक्त, स्वैर संचार करायला पूर्ण मोकळीक मिळालेली आहे. ‘जादूचे फुलपाखरू’ मधील एक लहानशीच सुंदर मुलगी... तिच्या डोळ्यांमध्ये दोन छोटुकल्या चांदण्या वस्तीला येतात. तिच्या उरात एक किरमिजी सुरवटही राहते... वाळूतून पळून आल्यावर समुद्राच्या पाण्यातून एक सुंदर पुरुष तिच्यासमोर हसत उभा राहतो... आणि तिच्या त्या चिमुकल्या किरमिजी सुरवंटाचे सोनेरी फुलपाखरू होऊन फडफडू लागते. ते फुलपाखरू वेळीअवेळी तिच्या स्वप्नात शिरते... तिच्या अंगाखांद्यावर बागडते. ती कॉलेजात जाते तेव्हा वर्गात प्राध्यापक बालकवीची पारव्याची कविता ‘जड उदास लयीत’ रुक्ष करड्या सुरात’ शिकवतात. त्याचप्रमाणे त्यांना फुलराणी कधी नीट शिकवता येत नाही. तिचे लक्ष तुळईवर बसून घुमणाऱ्या पारव्यांच्या जोडीच्या प्रणयाकडे जाते... पर्समधील पत्र वाचताना, तिच्या चेहऱ्यावर हसू फुटते... प्राध्यापक संतापाने लाल होतात, तिच्या बाकाजवळ येऊन ते पत्र ओढून घेतात... फाडून फेकून देतात... तिला रडू फुटते... प्राध्यापक घरी येतात... एक सोनेरी फुलपाखरू खिडकीतून आत येते... खिडकीतून प्राध्यापकांना एक गुलाबी ढग दिसतो. त्यातून ओळखीचा एक सुंदर चेहरा दिसतो... एवढ्यात वर्गातली ती प्रेमपत्र वाचणारी मुलगी दारात उभी असल्याचे त्यांना दिसते. ते क्षणभर बावरतात... घाबरतात. पण ती म्हणते, ‘अय्या, तुमच्या खिडकीतल्या पांगाऱ्याला बहर आला.’ प्राध्यापकांना तो गुलाबी ढग आता सोनेरी दिसू लागतो. आपण फुलराणी शिकवू शकू असे त्यांना वाटते. प्राध्यापकांच्या खोलीत तिचे सोनेरी फुलपाखरू नाचू बागडू लागते. ती त्यांची खोली आवरते. हंगामात मोहोर परत यावा तशी आपली हरवलेली वर्षे परत आलीय, असे प्राध्यापकांना वाटते. ते विचारतात, ‘ही जादू तू कुठे शिकलीस?’ ती म्हणते, ‘हे फुलपाखरू... जादूचे... त्याने केली ही सगळी जादू.’ ‘मला देशील तुझे फुलपाखरू? त्याची मला गरज आहे... मी एकटा आहे.’ ‘हे फुलपाखरू माझे नाही... मावळतीला सागरतीरवर भेटलेल्या तरूणाचे आहे... ते कुणाला देता येणार नाही.’ ती जाते... फुलपाखरूही जाते... खिडकीतून दिसणारा सोनेरी ढग किरमिजी होतो-काळा होतो. पांगाऱ्याचा बहर ओसरतो. फुलराणीची कविता प्राध्यापकांना कधीच नीट शिकविता येत नाही. स्वप्नातील चांदणेमधील राजकन्येच्या जन्मवेळी पऱ्या लक्षावधी विलक्षण स्वप्नांचा चुरा करून उधळतात... ती मोठी होते तसतशी तिची स्वप्ने वाढत जातात. ती वयात येते. तिचे मन शरीरात मावेनासे होणे. रूप लखलखू लागते. चित्त दशदिशांना उडू लागते. तिची सप्तरंगी स्वप्ने तारूण्याचे गूढ मंत्र तिच्या कानात गुणगुणत राहतात... एकदा ती रात्री मिटलेल्या डोळ्यांनी महालाबाहेर पडते. मुख्य दरवाज्याशी शस्त्रधारी पहारेकरी असतो. त्याच्या गळ्यात ती हात घालते. त्याच्या रूंद छातीवरच रेशमी केसांचे डोके ठेवून गाढ झोपी जाते... तो तिला जागे करतो. ती काळेभोर डोळे उघडते. ‘तू माझा आहेस’ म्हणून ती परत झोपी जाते... पहाटे परत ती आपल्या महालात जाते. पांघरूण लपेटून शांत झोपते... रात्रीचे तिला सर्व आठवते. पण समजत नाही... काल रात्री आपल्याला अद्भुत स्वप्न पडले... असे तिला वाटते. ... अशा अनेकरात्री येतात...जातात... स्वप्न अधिक गहिरे होत जाते. पुढे राजा तिचे लग्न ठरवतो. ती म्हणते, ‘माझे लग्न ठरले आहे. करीन लग्न तर त्या माझ्या मनातल्या तरूणाशीच.’ ‘कुठे आहे तो?’ ‘माझ्या स्वप्नात.’ ‘स्वप्नातला तरूण आणायचा कसा? तुझे लग्न लावायचे कसे?’ राजा विचारतो. ‘मग मी तशीच राहीन. एवढे मोठे सम्राट म्हणवता. माझ्या स्वप्नातला तरूण सापडत नाही?’ ती आजारी पडते. खंगू लागते. पहारेकरी अस्वस्थ होतो. तो अवलियाचा पोशाख करून राजाकडे जातो. ‘मी राजकन्येचे दुखणे दूर करीन.’ तो राजकन्येच्या महालात जातो... ‘राजकन्ये, डोळे उघड.’ ती आवाज ओळखते. डोळे उघडते. तो तिला सांगतो, ‘तू प्रेम केलेस खरे, पण ते प्रेम राहिले अंतराळी. तू राहिलीस भूमीवर स्वप्नातून जागी हो, जे अनुभवलेस ते विसरून जा. माझं ऐक. तिन्ही त्रिकाळ चांदणे खरे, पण तुला थोडे ऊन हवे. थोडी सावली हवी.’ तो एवढे सांगून महालाबाहेर पडतो. राज्य सोडून जायचे ठरवतो. राजकन्या स्वप्नातून जागी होते. तोच तो... ती ताडकन उठते. राजवाड्याच्या चौकीपहाऱ्यावर येते. तो तिथे नसतो ती पहारेकऱ्याच्या मागावर निघते... दासी तिला थोपवतात. शिपाई अडवतात... तो तिला दिसतो. धर्मशाळेत... ती त्याला बघते. घट्ट मिठी मारते. तो अजूनही स्वप्नात असतो. ती संपूर्ण जागी असते. प्रेमकथाच, पण ती परीकथेच्या रुपात अशा काव्यात्म पातळीवर पेश केली गेली की, तिची आवाहकता झपाटून टाकते. वाचकांवर गारूड करते. ‘कुंभ’मध्ये वयात आलेल्या शांतीला होणारी स्पर्शांची जाणीव त्याची अपूर्वाई आणि नवऱ्याला जवळ घेण्याची तिला वाटणारी ओढ यांचे चित्रण केले गेले आहे. ‘दोऱ्यांच्या बाजेशीच त्याने तिला गाठले. आणि तोल जात ती दोघेही बाजेवर कोसळली. सकाळ झाली तेव्हा त्याला काहीतरी वेगळे वाटत होते. खूप हुशारी वाटत होती. एकदम नवा साक्षात्कार व्हावा तसे झाले होते. इतके दिवस आपण असे वागत नव्हतो हा किती वेडेपणा झाला...’ अशासूचक, संयमित निवेदनातून या नवदांपत्याच्या पहिल्यावहिल्या मीलनाची नवलाई पकडली आहे. ‘प्रेमातला अत्युंत्कट आनंद, विराहाच्या असह्य वेदना यांच्याही पलीकडे जाऊन प्रेमातला त्याग, प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत, प्रेमामुळे झालेले अंतर्बाह्य बदल अशा सर्वच प्रेमरंगाची गाथा म्हणून हे पुस्तक सौंदर्यवादी रसिकाला गुदगुदल्या करीत राहील. अद्भुताचे मायाजाल दाखवणाऱ्या या कथावास्तवाचे वास्तवही प्रकट करतात. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 22-04-2007

    कथाकार, नाटककार ललित लेखक असणारे रत्नाकर मतकरी यांच्या तारुण्यात त्यांनी पहिली परिकथा लिहिली. ‘सोनेरी मनाची परी’ असे त्या कथेचे नाव होते. या संग्रहातील कथा या त्याच वाटेवरून जातात. परिकथा, प्रेमकथा, स्वप्नकथा, शृंगारकथा, प्रौढकथा असे काहीसे याचे एकूणस्वरूप. सत्यकथा व वीणा मासिकात यापूर्वी सर्व कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. जादूचे फुलपाखरू, दुखऱ्या गुडघ्याची गोष्ट, स्वप्नातील चांदणे, फाटक्या कपड्यातील राजकन्या, लाकडातील चेहरा, वनराणी आणि फूल, कुंभा, कवीची प्रिया, सोनेरी मनाची परी या त्या कथा. चंद्रमोहन कुलकर्णी या रेखाटन व मांडणीतज्ज्ञांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांनी कल्पकता दाखविल्याने पुस्तक देखणे झाले आहे. मुखपृष्ठ हे कथांप्रमाणे नाजूक आहे. -संजय बोरीकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more