* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669527
  • Edition : 8
  • Publishing Year : OCTOBER 1983
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DEATH IS DREADFUL. WE SHOULD BE ABLE TO CONQUER IT. DEATH HAS UNSUBSTANTIATED ME. YES, I WILL TAKE REVENGE! I WILL CONQUER DEATH! I KNOW THE LANGUAGE OF BEING ALONE. NIRAMAYEE LIFTED THE HOLY BOOK. SHE JOINED HER HANDS TO SHOW HER GRATITUDE. THE VERY SAME MOMENT, THE THUNDER STRUCK THE SKIES ABOVE, THERE WAS LIGHTENING; THE THUNDERBOLT FELL EXACTLY ON PANDIT`S MANSION. THE MANSION SHATTERED JUST FOR A MOMENT AND THEN THE VERY NEXT MOMENT THE CEILING COLLAPSED. HUGE CRACKS DEVELOPED BETWEEN THE ADJOINING WALLS. THE HUGE IRON BAR OVER NIRAMAYEE`S HEAD CAME OUT OF ITS PLACE, AND STARTED ITS DESCENT. NIRAMAYEE WAS SCARED TO DEATH. SHE LOST HER SENSES, SHE FORGOT TO SAVE HERSELF BY MOVING TO ONE SIDE. SHE WATCHED HER DEATH IN THE FORM OF THE IRON BAR WITH HUGE ASTONISHMENT. YES, SHE HAD TEASED DEATH BY SETTING HER MIND TO READ THE HOLY BOOK AND NOW DEATH WAS APPROACHING HER SLOWLY. MATKARI`S STORIES FASCINATE THE MIND. THEY ARE SUPERNATURAL, CRYPTIC, YET THEY HAVE A TOUCH OF BEAUTY, PASSION. HE SUCCEEDS IN PROJECTING THE DEPTH AND MEANINGFULNESS OF THE MIND
मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी— मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते..... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसयाच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणाया मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृद्ध दर्शन घडत राहावे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MRUTYUNJAEE#BHAKSHYA#THAMMIAALOCH#KIDE#JUNGLE#HUSHARI#TOKTOKPAKSHI#DIARY#PRIYAKAR#KARTAKARVITA#SHIMPLYATILCHANDANI#DU:SWAPN#CHAMKTYADOLYANCHAMULGA#ROOL#NIROP#DHUKEDHUKE# #रत्नाकर मतकरी# कथासंग्रह# मृत्युंजयी# भक्ष्य# थांब# मी आलोच!# किडे# जंगल# हुशारी# टोक-टोक पक्षी# डायरी# प्रियकर# कर्ता-करविता# शिंपल्यातील चांदणी# दु:स्वप्न# चमकत्या डोळ्यांचा मुलगा# रूळ# निरोप# धुके... धुके
Customer Reviews
  • Rating Starमीना कश्यप शाह

    भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more

  • Rating Starपुस्तकप्रेमी

    मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more

  • Rating StarAaditya Patil

    मृत्युंजयी मोठ्या प्रमाणात सो कॉल्ड बुद्धिजीवी वाचक हा फिक्शनल लिटरेचर कडे जरा हेटाळणीच्या नजरेतच पाहतो . त्यातल्या त्यात काल्पनिक रहस्यकथा म्हटल्यावर तर त्यावर ताशेरे ओढण्यातच ते धन्यता मानतात . पण मराठी साहित्यात एकापेक्षा एक सरस लेखकांनी हा विष अगदी छान हाताळलाय . रत्नाकर मतकरी हे त्यातील एक अग्रगण्य नाव . रहस्यमय कथांचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे रत्नाकर मतकरी . त्यांच्या कथा सरळ सोप्या पण मनाला भिडणाऱ्या असतात . त्यांच्या कथेत रहस्यतेचे धागे इतके सुंदर गुंतविलेले असतात की कथा संपेपर्यंत आपण त्यांनी रंगविलेल्या जगात जाऊन पोहोचतो . मृत्युंजयी ह्या कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत ‌. पैकी `किडे` ही कथा मला व्यक्तिशः खुप आवडली . `जंगल` आणि `किडे` या कथा वाचकाला अस्वस्थ करून सोडतात . `डायरी` , `शिंपल्यातील चांदणी` आणि `प्रियकर` ह्या कथा भावनिक करतात . लेखकांच्या लेखणीचं गुणवैशिष्ट म्हणजे पात्र उभारणी इतकी सशक्त आहे की शेवटपर्यंत त्या व्यक्तिरेखेचे गुणदोष ओळखणे कठीण होऊन बसते . `कर्ता करविता` ह्या कथेमधील वकील हे पात्र याचं एक उदाहरण आहे . जवळपास प्रत्येक कथेतून लेखकांनी सामाजिक जाणिवेचं भान राखलं आहे आणि वाचकाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे . ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मनाचे कंगोरे उलगडणाऱ्या कथा… आहार, निद्रा, भय, मैथुन या माणसाच्या आदिम प्रेरणा आहेत. या प्रेरणा रोजच्या व्यवहारामधून, मानवी आचरणामधून व्यक्त होतात, तेव्हा त्यांचे एकेरी असणे, सुट्यासुट्या स्वरुपात नसते. यातल्या प्रत्येक प्रेरणेच्या व्यक्त होण्याशी मातले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ हे षड्विकार चिकटलेले असतात म्हणूनच मूळच्या मानवी आदिम प्रेरणा आणि सनातन म्हणता येतील, असे मानवी षड्विकार यांच्या सरमिसळीतून आणि सतत गतिमान, बदलणाऱ्या स्वरूपामुळे माणसाचा स्वभाव अनाकलनीय होतो. अनेकदा माणसाचे वागणे - अतर्क्यतेच्या पातळीवर जाते. रत्नाकर मतकरी यांच्या `गूढकथा` या मनोविश्लेषणात्मक आहेत म्हणूनच त्या कथांमध्ये मानवी मनात खोलवर दडून बसलेले `भय` आणि माणसाच्या आचरण, व्यवहारातून व्यक्त होणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रेरणा, प्रवृत्तींचा मिलाफ झालेला आढळतो. म्हणूनच या भयकथा केवळ रहस्यमय, मनोरंजन करणाऱ्या, भीतीने थरकाप उडविणाऱ्या किंवा सुलभ अशा धक्कातंत्राचा उपयोग करुन रहस्यभेद करतात, असे होत नाही. मतकरींच्या गूढकथा संग्रहाची दुसरी आवृत्ती आता प्रकाशित झाली आहे. माणसाच्या मनात क्षणभर चमकून जाणारी अनामिक भीती, (उगीचच) चुकचुकणारी शंकेची पाल, बऱ्याचदा स्वत:लाही न उमगणारे भास-आभास यांना मतकरींच्या गूढकथेस खास स्थान असते. हे सारे घटक उठावदार होऊन त्यांच्या कथेमध्ये स्पष्ट होतात. एरवी आपल्याला अधूनमधून जाणवणाऱ्या आपल्याच मनाच्या खेळांकडे काळजीपूर्वक पाहिल्यास जाणवणाऱ्या संभाव्य शक्यतांना रत्नाकर मतकरींच्या लेखणीतून कथारूप प्राप्त होते. म्हणूनच या कथांचा शेवट, म्हणूनच या कथांची सुरुवात, संपूर्ण कथेतील वातावरण आणि कथेची अखेर यांच्यामध्ये परस्परांना छेद देणारे, परस्परविरोधी असे काहीतरी घडते, त्यामुळेच या भयकथांचा शेवट भडक किंवा बटबटीत अशा प्रसंगाने किंवा तद्दन फिल्मी वाटावा असा नाटकी किंवा रंजक प्रकारचा नसतो. आपल्या मनात क्षणार्धात चमकून जाणाऱ्या चित्रविचित्र भावना, विचार, खोलवर दडलेले असुरक्षित असल्याचे भय आणि त्यातून मनात बराच काळ रेंगाळत राहणारी भीतीची भावना, भासआभास आणि या साऱ्यांनाच लगटून येणारे मनातले नाना विचार यांच्यामधून कथेतला घटनाक्रम उलगडत जातो. बऱ्याचदा आपल्या मनातले विचार, भावना आपल्याला चकवतात. त्यांचे स्वरुप आपल्याला नीट स्पष्ट होते. कालांतराने आपल्या विशिष्ट प्रसंगी आपल्या मनात आले, त्या त्यावेळचे विचार, विकार, भावना, त्यामागचे कारण स्वच्छ प्रकारे समजतात. रत्नाकर मतकरींच्या भयकथेत मानवी मनाला लागणारे चकवे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झालेले दिसतात. रत्नाकर मतकरींच्या भयकथांची वैशिष्ट्यपूर्णता लक्षात घेतल्यानंतर त्यांच्या काही कथांची उदाहरणे देणे आवश्यक आहे, असे वाटते. `हडळ` या कथेत खूप दारिद्र्यात जगणारी आई, तिचा आजारग्रस्त, मरणपंथाला लागलेला मुलगा, यांचे चित्रण येते. दु:खी आईचे असहायतेच्या पार्श्वभूमीवर उमटणारे वात्सल्य, मृत्यूनंतर मुलाला अग्नी दिला पाहिजे, त्यासाठी ही आई दुसऱ्या जळत्या चितेतील लाकडे चोरते. बघणारे लोक तिला हडळ समजतात. `हडळ इलीहा` असा एकच कल्लोळ गावात उठतो. चोरी करून मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी चोरी करून लाकडे गोळा करणारी आई घरी येते. पाहते तर तिचा मुलगा उठून बसलाय आणि तिला `आये` म्हणून हाका मारतोय. `हडळ आसंच रे मी - तुजी आये न्हई,` असे म्हणून ही आई रडू लागते. एकाच वेळी कारुण्य, भीती, वात्सल्य, भास-आभास, चकवणारे सत्य, वास्तव अशा अनेक भावभावनांची संमिश्र अभिव्यक्ती या कथेमध्ये झालेली दिसते म्हणून या कथांना `मनोविश्लेषणात्मक भयकथा आणि अर्थातच रंजक नव्हेत अशा कथा असे म्हणावे लागेल. `फँटास्टिक` या कथेत `स्टोरी रायटर` आणि मादक अभिनेत्री `राणी` लालजीला ठार करू पाहतात; पण तो सरणावर जिवंत होतो. इथे आपल्याला वाटते, चला दचकायला लावणारी घटना घडली, आपल्याला धक्का बसलाय, इथे कथा संपलीच की! पण तसे घडत नाही. लालजी वाचला का मेला, हा प्रश्न बाकी उरतोच. याचे उत्तर लेखक वाचकांवर सोपवतो. त्याने हे सारे समजून घ्यावे. आपल्याला स्वत:च्या आणि इतरांच्या संदर्भात घडलेल्या सगळ्या सकारात्मक मानवी भावना, प्रेरणा समजावून घ्यायला, पुन्हा पुन्हा आठवायला आवडते, पण भीती, हिंसा, द्वेष, मत्सर, गर्व, अहंकार, आदी नकारात्मक, त्रासदायक, दु:ख देणाऱ्या त्रासदायक भावनांकडे काळजीपूर्वक पाहायला, नव्हे, विचार करायलासुद्धा आवडत नाही. रत्नाकर मतकरींच्या भयकथा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला लावतात. एका अर्थाने आपणच आपल्याला पुन्हा एकदा नव्या रूपात भेटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more