* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIJDHAM
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667400
  • Edition : 9
  • Publishing Year : SEPTEMBER 1972
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A CALL FROM THE FINAL ADOBE, `NIJDHAM`; ALL THESE SHORT MYSTIC STORIES HAVE CREATED A NEW WAY IN THE HISTORY OF MARATHI LITERATURE. THEY HAVE SUCCEEDED IN HAVING A UNIQUE PLACE WITH THEIR ENIGMATIC ENVIRONMENTS, UNFATHOMABLE SURROUNDINGS, THE EXCLUSIVE DESCRIPTIONS AND A VERY UNCANNY END. MANY OF THE STORIES WERE PRESENTED ON THE STAGE, SOME WERE PICTURIZED AS SERIALS, AND SOME WERE TRANSLATED. FOR TWO GENERATIONS, THEY HAVE EMPOWERED ALL MINDS YOUNG AND OLD. ANY READER WHO HAS READ THEM ONCE WILL NEVER FORGET THOSE YEARS LATER. ON THE CONTRARY, THEY ARE ALIVE IN HIS MINDS AND HE SHARES THEM WITH PEOPLE AROUND. THIS COLLECTION IS EXCLUSIVELY FOR THOSE READERS WHO LOVE CRYPTIC THEMES, FOR THE THREE GENERATIONS, YESTERDAY`S, TODAY`S AND TOMORROW`S.
बोलावणं... निजधाम... जेवणावळ... रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी कथेमध्ये एक नवीन वाट तयार केली. या कथांमधील वातावरणे, चित्रदर्शी वर्णने, माणसाच्या मनातल्या गूढाचा घेतलेला वेध, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि हादरवून टाकणारा शेवट, या साऱ्यांनी मराठी कथेत त्या वेळेपर्यंत अस्तित्वात नसलेले एक विलक्षण कथाविश्व निर्माण केले. यातल्या कथा रंगभूमीवर आल्या, दूरदर्शनवर सादर झाल्या, अनुवादित झाल्या. मुख्य म्हणजे, दोन पिढ्यांच्या मनावर गारूड करून राहिल्या. फार वर्षांपूर्वी वाचलेल्या या कथा वाचकांच्या स्मरणातून कधीच गेल्या नाहीत. उलट त्यांनी त्या इतरांना सतत सांगून जिवंत ठेवल्या. आजच्या तरुणांना तर या गूढकथांचे अधिकाधिक आकर्षण वाटू लागले आहे... या, कालच्या आणि आजच्या व उद्याच्या वाचकांसाठी नव्या स्वरूपात काढलेला गूढकथांचा संग्रह...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarVaishnavi Vaidya

    मी स्वत: अत्यंत घाबरट आहे. अंधार, एकटं राहणे, भुताच्या गोष्टी याच्या पासून मी लाहनपणापासूनच चार हात लांब राहिले. आजही मित्र-मंडळी आणि भावंडांच्या गेट टूगेजर मध्ये ज्या क्षणी हाॅरर गप्पा चालू होतात त्या क्षणी मी गाढ झोपून जाते. माझं मला सुद्धा माझ्या िचित्र सवयीचं अनेकदा हसायला येतं पण शेवटी स्वभावधर्म. या सगळ्या पार्श्वभुमिवर प्रचंड बळ आणि हीम्मत एकवटून मतकरींचे पुस्तक वाचायचे एकदा ठरविले आणि ठाण्याच्या पुस्तक प्रदर्शनातून विकतही घेतले! या लेखनाचं किंबहुना लेखकांचं वैशिष्ट्य म्हणजे, एक प्रकारचं वलय सभोवताली निर्माण होतं आणि आपल्याही नकळत आपण त्या कथानकातलं पात्र होऊन जातो. ती गोष्ट आपलीच आहे किंवा आपल्याच भोवती घडते असं जाणवून देणारा अदृश्य घटक आपल्याच कल्पनाशक्तितून निर्माण होतो. माणसाचे अंतर्मन फार चमत्कारीक असते. त्याचे गुढ आजतागायत कोणाला उलगडलेले नाही. तिथेच तर भिती, रहस्य या सगळ्याचे मुळ दडलेले असते. या पद्धतीच्या साहित्यात मतकरींनी अनन्य साधारण कार्य करून ठेवले आहे. `निजधाम` हा त्यांच्या काही विलक्षण गुढकथांचा संग्रह. सगळ्याच कथा थरकाप उडविणार्या आहेत. विशेष नमुद करावीशी वाटते ती `जेवणावळ` कथा! असं लिखाणं सुचणं हे केवळ महान आहे. प्रत्येक कथा वाचताना शरिरातले सारे इंद्रिय त्या शब्दांच्या ताब्यात असतात. सभोवेतलाच्या खर्या परिस्थितीचा विसर पडतो आणि या कथानकांची भुरळ पडते. भिती हा शब्द या कथांसाठी अतिशय शुल्लक वाटतो. एक महत्त्वाची गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे, आजच्या काळात भुत-प्रेत, पिशाच्छ इत्यादी गोष्टींवरून अनेक लोकांमध्ये असणारे समज, गैरसमज, विचार, मते.... ती ज्याने त्याने ठरवावी पण चांगल्या साहित्याला, साहित्य म्हणूनच पाहावे. मानवी जीवन आणि मन ह्यांच्यात अनेक गोष्टी तर्काच्या पलिकडे आहेत. त्याचा गाभा अजूनही शास्त्रज्ञ पूर्णपणे शोधू शकले नाहीत. या पुस्तकातले एक आवडते वाक्य- `भितीच्या विविध स्वरूपातून मानवी मनाच्या अथांग सागराचा शोध घेणे हेच गुढकथेचे ध्येय असते, मानवी मनाचा शोध हाच साहित्याचा परम उद्देश असतो!` ...Read more

  • Rating Starनितीन जोगळेकर

    श्री रत्नाकर मतकरी हे उत्तम नाट्यलेखक, कथा लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कथामध्ये गूढ, भीतीदायक असे खास काही असायचेच. १९७७ मध्ये आमच्या शालेय शिक्षकांनी वर्गात सांगितलेली जेवणावळ हि कथा कायमची लक्षात आहे. नंतर २०१७ मध्ये आमच्या ऑफिस लायब्ररी निजधाम या पुस्तकात हि कथा वाचायला मिळाली आणि प्रचंड आनंद झाला. त्यांच्या सर्व कथांमध्ये शेवटी एक जबरदस्त twist असायचा, ज्याची आधी पुसटशी कल्पनाही यायची नाही. वाचकांना खिळवून ठेवणारे हे असले विचार त्यांनाकुठून सुचायचे काय माहित. असा चतुरस्त्र लेखक पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. ...Read more

  • Rating Star Shilpa Datar

    रत्नाकर मतकरी हे माझे आवडते गूढकथा लेखक। कितीतरी दिवसांपासून जेवणावळ ही कथा असलेले त्यांचे पुस्तक शोधत होते, ते मिळाले। शाळेत असताना हे पुस्तक वाचले होते। माझी शेजारीच राहणारी मैत्रीण शलाका आणि राजश्री आम्ही या भयकथांवर चर्चा करत असू। सुदैवाने मला लहनपणी मैत्रिणीहि उत्तम वाचक मिळाल्या। त्यामुळं आम्ही भरपूर वाचलं, शालेय वयात पुस्तकांवर चर्चा केल्या। त्यावेळी आमच्यामध्ये जेवणावळ या कथेविषयी चर्चा झाली होती। वाचताना अंगावर सरसरून काटा येणारी कथा। आमची रात्री 12 वाजता ही कथा वाचण्याची तेव्हा पैजही लागली होती। नुकत्याच परत त्या कथा नव्यानं वाचल्या। नव्यानं त्यातले भय अनुभवलं। आणि एका बैठकीत हे पुस्तक वाचून संपवाल्याने आपली वाचनाची आवड तसूभरही कमी झाली नाही, हे जाणवलं। ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more