* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RANGANDHALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669497
  • Edition : 7
  • Publishing Year : OCTOBER 1977
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL OF A SUDDEN, HE GOT UP IN THE MIDDLE OF THE NIGHT AS HE HEARD SOME PROMINENT SOUND AS IF SOME GLASS BROKE SOMEWHERE. HE SEARCHED THE ROOM TO FIND THE ORIGIN OF THE SOUND. WHEN HE REALISED THAT THE SOUND WAS OF THE DOOR BOLT, HE WAS SHOCKED. HE REMEMBERED THAT HE HAD BOLTED THE DOOR SECURELY BUT NOW THE BOLT HAD COME OFF AUTOMATICALLY. THE DOOR STARTED OPENING SLOWLY, AGAIN AUTOMATICALLY. JAGANNATH WAS CONFINED TO THE PLACE WHERE HE WAS, THERE WAS A VERY OLD MAN STANDING AT THE DOOR. HE WAS TOTALLY BALD, NOT EVEN A SINGLE HAIR ON HIS ABNORMALLY LONG HEAD. HIS FACE WAS OVER WRINKLED. THE HIGH CHEEK BONES WERE VERY PROMINENT. HIS BODY RESEMBLED A SKELETON. BUT HIS EYES, THEY WERE SPARKLING AS IF LIKE FIRE. THE OLD MAN LOOKED INTENTLY AT JAGANNATH. JAGANNATH SCREAMED LOUDLY, BUT TO HIS SURPRISE NO VOICE CAME OUT. THE OLD MAN GESTURED HIM TO FOLLOW HIM. JAGANNATH STARTED WALKING. HE DID NOT WANT TO BUT HE HAD LOST ALL CONTROL OVER HIS WILL POWER. HE WANTED TO GATHER ALL HIS STRENGTH, HE WANTED TO RUN AWAY, BUT HIS LEGS WERE NOT OBEYING HIS MIND. WHERE WERE THE TWO LEADING? RATNAKAR MATKARI TAKES HIS READERS TO A NOVEL PLACE, TOTALLY DIFFERENT FROM THE USUAL SIGHTS; HE TAKES THEM TO AN UNKNOWN DESTINATION; TO A FEARSOME, MYSTIC, ANONYMOUS LAND. THE READERS ARE EQUALLY THRILLED. THEY KEEP ON READING PAGE AFTER PAGE HAUNTINGLY.THE STORIES HERE WILL SURELY HYPNOTIZE THE YOUNG READERS.
मध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी ‘खळ्ळ्’ आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती. —आणि दार सावकाश उघडू लागले होते.... जागच्या जागी खिळल्यासारखा, जगन्नाथ ते दृश्य पाहत राहिला. दारात एक जख्ख म्हातारा उभा होता. बोडका. लांबुडक्या डोक्याला तुळतुळीत टक्कल पडलेले, चेहरा सुरकुत्यांनी मढलेला. गालाची हाडे वर आलेली, आणि अस्थिपंजर शरीर. डोळे मात्र निखाऱ्यासारखे चमकत होते. नजर जगन्नाथवर रोखलेली होती. जगन्नाथने किंकाळी मारली, पण ती ओठातून बाहेर फुटलीच नाही. त्या बोडक्या म्हातायाने त्याला आपल्याबरोबर चलण्याची खूण केली. जगन्नाथ चालू लागला. खरेतर त्याला जायचे नव्हते, पण स्वत:च्या इच्छाशक्तीवर जणू त्याचा ताबाच राहिलेला नव्हता. ....सर्व शक्ती एकवटून तिथून पळून जावे, असे वाटत होते, पण मनाचे सांगणे पाय मानत नव्हते. कुठे निघाले होते ते दोघे? अगदी नेहमीच्या वास्तवातून रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचे बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पाने उलटत जातो... तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणाया, मतकरींच्या वैशिष्ट्यपूर्ण आगळ्यावेगळ्या गूढकथांचा संग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#रंगांधळा #रत्नाकरमतकरी #कथासंग्रह #वारस #पुलावरचामाणूस #बाकीराहिलाकाळोख #चिखल #हातमोजे #हेड-स्टडी #दोन मुलं #तळ्याकाठचीहिरवळ #झुंबर #म्हातारीचीतरुणमुलगी #इंटरव्ह्य #वशीकरण #जळमटं #तडागेलेलीकाच #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #RANGANDHALA #RATNAKARMATKARI #VARAS #PULAVARACHAMANUS #BAKIRAHILAKALOKH #CHIKHAL #TIDONMUL #ZUMBAR #JALMAT #TADAGELELIKACH #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    थरारक गूढकथा… रत्नाकर मतकरी यांनी गूढकथा लेखनात वेगवेगळे प्रयोग केले. वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. गूढकथा हा लेखन प्रकार घाऊक लेखनाचा नाही; त्यातील कल्पना साचेबंद होता कामा नयेत. त्यात प्रत्येक वेळी काहीतरी नावीन्य हवे याबद्दल ते जागरुक आहेत. मतकरंच्या या कथांमध्ये अतींर्दिय पातळीवरचे वैशिष्टपूर्ण अनुभव येतात. एखाद्या व्यक्तीच्या अकाली व अपघाती मृत्यूनंतर तिच्या अतृप्त इच्छापूर्तीसाठी वा आधीच्या जन्मातील हिशेब वा सूड पूर्ण करण्यासाठी कोणातरी व्यक्तीच्याद्वारे पुन्हा अस्तित्व जाणवणे हा प्रकार मतकरींना बराच विश्वासार्ह वाटत असावा. त्याची वेगवेगळी रूपे त्यांनी अनेक कथांमध्ये दाखवलेली आहेत. ‘रंगांधळा’ मधील आरंभीचीच रंगांधळा हा कथा एका चित्रकाराच्या जीवनावर आहे. रंगनाथ महिंद्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मॉडर्न शैलीतला रंगाशी ताकदीने खेळणारा चित्रकार. त्याच्या चित्रांबद्दल आकर्षण असाणाऱ्या विज्ञानाची प्रध्यापिका असाणाऱ्या तरुणीला वाटते की त्याच्या चित्रातल्या रंगामध्ये एक जिवंतपणा आहे. चित्रात त्या रंगांना एक अपूर्व तेज चढल्यासारखे दिसायचे. त्या रंगांचे एकमेकांशी काही नाते आहे, त्यांची भाषा एकमेकांना समजते आहे. कॅनव्हासवर हा चित्रकार नुसते रंग चोपडीत नाही तर तो रंगांची एक नवी सुष्टी निर्माण करतो आहे असे तिच्या लक्षात येते. त्याच्या लँडस्कोपमध्ये देऊळ, झाड, पाणी, डोंगर यांच्याऐवजी नुसते रंग असत. ‘तुमची चित्रं मला आवडतात पण समजतात असं नाही. ती दृष्टीच मला नाही.’ तेव्हा रंगनाथ तिला आपल्या कलेचे एक गुपित सांगतो. ‘तू हुशार आहेस. मी काही सांगितलं तर ते तुला समजेल... कुणाकडे तरी बोलावे असं खूप वाटायचं, पण ते समजू शकेल असं माणूसचं भेटलं नाही. तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही. माझे डोळे नॉर्मल नाहीत. इतरांना नसलेली एक चमत्करीक दृष्टी त्यात आहे. मला रंग दिसतात. इतरांना दिसतात तेवढेच नाहीत. तर फार वेगळे, फार मोठ्या प्रमाणावर दिसतात.... हे हलत असतात; श्वासोच्छ्वास करीत असतात. जिवंत असतात. नेहमीच्या जगातले रंग रेषांनी बांधलेले असतात. माझ्या चित्रातले रंग रेषांची बंधने सोडून बाहेर पडतात. मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्रं काढता येत नाहीत. रेषा पुसट झाल्या आणि रंगांनीच माझा ताबा घेतला. आणि तेव्हाच मॉर्डन आर्टिस्ट म्हणून माझा लौकिक वाढू लागला. आता मला रंगांवाचून वेगळं मीपण राहिललं नाही. आंधळ्याला काळोख दिसावा, तसा मला रंगाचा स्वत:भोवती पूर आलेला दिसतो. नुसते रंगच मला दिसतात. रेषा कमीत कमी दिसतात. एक प्रकारचा आंधळेपणा म्हणा हा! नुसती चित्रं काढतानाच नव्हे, एरव्हीसुद्धा मला रंगांखेरीज दुसरं काही दिसत नाही. कधी हर्ष होतो कधी भीती वाटते. काय होईल माझं? मी कदाचित रंगांधळा होईल. काही बरंवाईट तू मला आवडतेस. मला समजेल असं वाटतंय म्हणून हे सर्व मी तुला सांगतो आहे. ...लँडस्केप पेंटिंगसाठी रंगनाथ तिला बरोबर घेऊन एका पहाडावर जातो. आकाशात मावळतीच्या वेळी सोनेरी छटा आवरतात. हे बघ लखलखत्या ज्वाला पाऊस, निळा सोनरी पाऊस, गोल्डन ब्ल्यू... धीस इज लाइफ, धीस इज ब्यूटी... करीत तो म्हणतो, ‘मी चाललो! रंगांकडे चाललो’ आणि कड्याच्या टोकावरून पुढे जात राहतो. दुसऱ्या दिवशी खालच्या दरीत त्याचे प्रेत मिळते. छिन्नविच्छिन्न देह. रक्ताचा शिडकावा होऊन लालकाळे पडलेले दगड... ....उजेडात रक्ताने माखलेले ते दगड बघताना तिला विचित्र अनुभव येतो. दगडावरचे वाळलेले ते काळे रक्त पुन्हा लाल होत आहे. आपल्या रोखाने रंगांची लाट चालून येत आहे असे तिला जाणवते. ती बेशुद्ध पडते. ...रात्री तिला आवाज येतो. ‘तू ऐकते आहे ना? इथं दाट काळोख आहे. मी त्या गुदमरतोय. मला रंग हवे आहेत. ‘मी तुझ्या नजरेतून आता रंग पाहीन.... आपल्यात एक नातं आहे. मला रंग पाहू देत. तुझ्या नजरेतून..’ ती घाबरून किंचाळते, ‘नाही नाही... आपल्यात कसलंही नात नाही. तू येऊ नकोस. काळोखातून परत येऊ नकोस.’ ...पण तिला कळून चुकते, तो आपल्या नजरेत आला आहे. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला जाते. सर्वत्र रंगच रंग तिला जाणवतात. ती गॉगल घालते तरी रंग गर्दी करतात. ‘मी आलो आहे. असा आवाज येत राहतो. तो आता जाणार नाही. तो आपल्या डोळ्यात कायमचा राहणार. आपण रंगांधळी होणार रंगाची गुलाम होऊन सारे आयुष्य घालवावे लागणार. ती कॉलेजच्या प्रयोगशाळेत जाते. सारे धैर्य एकवटून डोळ्यात अ‍ॅसिडचे थेंब टाकते. तिची दृष्टी जाते. रंगांच्या त्या लाटांपासून दूर होते. नित्य काळोख तिला सुखाचा वाटतो. ‘या काळोखात रंगनाथाचा आत्मा तडफडत असेल, पण माझ्या डोळ्यांची दारे त्याला बंद केली आहेत.’ असे ती म्हणते. आता ही तिची कहाणी डेड एन्डला येऊन पोहचली आहे असे वाचक म्हणून आपल्याला वाटते. पण नाही. ही कहाणी इथे संपत नाही. एका पार्टीत ही दृष्टीहीन, गॉगल लावलेली तरुणी बघून कोणातरी तरुणाला तिच्याजवळ जावेसे वाटते. त्याला आपल्याबद्दल वाटणारे कुतूहूल तिला जाणवते; आणि आपली ही कहाणी त्याला सांगते. ती कहाणी ऐकल्यावर आपल्यात व तिच्यात एक नवे नाते निर्माण झाले आहे, असे त्याला वाटते. पार्टीहून घरी पोहचल्यावर तो दार उघडतो. खोलीत काळोख नसतो. संबंध खोली निळ्याजांभळ्या रंगांनी झगमगत आहे, असे त्याला दिसते. मतकरी यांनी या कथेला शेवटी दिलेले हे वळण त्यांच्या गूढकथाकारांच्या प्रतिभेची खरी कमाल दाखवते. त्या तरुणीने रंगनाथच्या डोळ्यांना आपल्या डोळ्यातून बघण्यास मज्जाव केला खरा, पण तिच्याच माध्यमातून नवपरिचित तरुणाच्या डोळ्यांचा ताबा घेऊन रंगनाथ आपले अस्तित्व सिद्ध करायला सज्ज झाला होता! रत्नाकर मतकरी यांच्या अत्यंत नावजलेल्या गूढकथामंध्ये ‘रंगांधळा’ गणली जाते. तिची केंद्रीभूत कल्पना खरोखरच नावीन्यपूर्ण आणि चमत्कृतीपूर्ण आहे. वाचकांना शेवटी आणखी एक धक्का देणारी मतकरींचा मास्टर स्ट्रोक या कथेची परिणामकारकता वाढतो. रंगांशी निगडित असणाऱ्या परिचित संवेदनेला मतकरींनी उलटेपालटे करून, ‘रंगाच्या अभावाऐवजी रंगांच्या अतिरंजित जाणिवेचे परिणाम दिले आहे; त्यामुळे चित्रकाराच्या चित्रांवर पडलल्या प्रभावाचे स्वरूपही दाखवले आहे. रंगाचा हा मुक्तसंचार बघणारे रंगनाथचे डोळे, ते त्याच्या मृत्यूनेही बंद होत नाहीत. अतृप्त आत्म्याने आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस संचार करावा त्याप्रमाणे रंगनाथचे हे डोळे त्या तरुणीच्या डोळ्यांचा उपयोग करू पाहतात; तिने ते डोळे निकामी करून घेतल्यावर तिच्यात रस घेणाऱ्या अन्य तरुणाचा ताबा ते घेऊन टाकतात. असा आपल्या पारंपारिक कल्पनेचा वेगळा अविष्कार या कथेत दिसतो. चित्रकाराला दिसणाऱ्या रंगांच्या अचाट वैभवाची चुणूक रंगनाथच्या संवदेनक्षमतेद्वारे मतकरी लक्षात आणून देतात. एखादी कल्पना चौफेर फुलवण्याची,निसर्ग-व्यक्तीरेखा कलाविशेष- भावाविष्कार- भाषविशेष अशा विविध घटकांचे एकजीव रसायन साधण्याची मतकरींची करामत वाचकांना मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरतो. तिच्या अंधत्वाची कल्पना असूनही तो जेव्हा तिच्याजवळ जातो तेव्हा ती त्याला विचारते, ‘तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? नसेल तर नको करू. प्रेमात माणूस फसतं. इतकी सुंदर वाटणारी आणि इतकी डेड्ली गोष्ट जगात दुसरी नसेल. नाही आणखी एक गोष्ट जगात आहे. रंग.. कथा वस्तूत रंग भरायलाही अशी विधाने केली जातात असे वाचकाला वाटते, पण या रंगांचे वेगळे जे अस्तित्व नंतर जाणवते त्यामुळे अशा विधानातले खरे रहस्य पुढे लक्षात येते....‘आयरनी’चे दैवदुर्विलासाचे हे प्रलयकारी दर्शन असते. या संग्रहातील ती दोन मुलं, चिखल, पुलावरचा माणूस, झुंबर कथांमध्येही अशाच कल्पना वापरलेल्या आहेत. उत्कंठावर्धक निवेदनशैलीमुळे आणि थरारक कथा कल्पनांमुळे या गूढकथा वाचकांना गुंतवून ठेवतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    थरारक गूढकथा… रत्नाकर मतकरी यांनी गूढकथा लेखनात वेगवेगळे प्रयोग केले. वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. गूढकथा हा लेखन प्रकार घाऊक लेखनाचा नाही; त्यातील कल्पना साचेबंद होता कामा नयेत. त्यात प्रत्येक वेळी काहीतरी नावीन्य हवे याबद्दल ते जागरुक आहेत. मतकरंच्या या कथांमध्ये अतींर्दिय पातळीवरचे वैशिष्टपूर्ण अनुभव येतात. एखाद्या व्यक्तीच्या अकाली व अपघाती मृत्यूनंतर तिच्या अतृप्त इच्छापूर्तीसाठी वा आधीच्या जन्मातील हिशेब वा सूड पूर्ण करण्यासाठी कोणातरी व्यक्तीच्याद्वारे पुन्हा अस्तित्व जाणवणे हा प्रकार मतकरींना बराच विश्वासार्ह वाटत असावा. त्याची वेगवेगळी रूपे त्यांनी अनेक कथांमध्ये दाखवलेली आहेत. ‘रंगांधळा’ मधील आरंभीचीच रंगांधळा हा कथा एका चित्रकाराच्या जीवनावर आहे. रंगनाथ महिंद्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मॉडर्न शैलीतला रंगाशी ताकदीने खेळणारा चित्रकार. त्याच्या चित्रांबद्दल आकर्षण असाणाऱ्या विज्ञानाची प्रध्यापिका असाणाऱ्या तरुणीला वाटते की त्याच्या चित्रातल्या रंगामध्ये एक जिवंतपणा आहे. चित्रात त्या रंगांना एक अपूर्व तेज चढल्यासारखे दिसायचे. त्या रंगांचे एकमेकांशी काही नाते आहे, त्यांची भाषा एकमेकांना समजते आहे. कॅनव्हासवर हा चित्रकार नुसते रंग चोपडीत नाही तर तो रंगांची एक नवी सुष्टी निर्माण करतो आहे असे तिच्या लक्षात येते. त्याच्या लँडस्कोपमध्ये देऊळ, झाड, पाणी, डोंगर यांच्याऐवजी नुसते रंग असत. ‘तुमची चित्रं मला आवडतात पण समजतात असं नाही. ती दृष्टीच मला नाही.’ तेव्हा रंगनाथ तिला आपल्या कलेचे एक गुपित सांगतो. ‘तू हुशार आहेस. मी काही सांगितलं तर ते तुला समजेल... कुणाकडे तरी बोलावे असं खूप वाटायचं, पण ते समजू शकेल असं माणूसचं भेटलं नाही. तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही. माझे डोळे नॉर्मल नाहीत. इतरांना नसलेली एक चमत्करीक दृष्टी त्यात आहे. मला रंग दिसतात. इतरांना दिसतात तेवढेच नाहीत. तर फार वेगळे, फार मोठ्या प्रमाणावर दिसतात.... हे हलत असतात; श्वासोच्छ्वास करीत असतात. जिवंत असतात. नेहमीच्या जगातले रंग रेषांनी बांधलेले असतात. माझ्या चित्रातले रंग रेषांची बंधने सोडून बाहेर पडतात. मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्रं काढता येत नाहीत. रेषा पुसट झाल्या आणि रंगांनीच माझा ताबा घेतला. आणि तेव्हाच मॉर्डन आर्टिस्ट म्हणून माझा लौकिक वाढू लागला. आता मला रंगांवाचून वेगळं मीपण राहिललं नाही. आंधळ्याला काळोख दिसावा, तसा मला रंगाचा स्वत:भोवती पूर आलेला दिसतो. नुसते रंगच मला दिसतात. रेषा कमीत कमी दिसतात. एक प्रकारचा आंधळेपणा म्हणा हा! नुसती चित्रं काढतानाच नव्हे, एरव्हीसुद्धा मला रंगांखेरीज दुसरं काही दिसत नाही. कधी हर्ष होतो कधी भीती वाटते. काय होईल माझं? मी कदाचित रंगांधळा होईल. काही बरंवाईट तू मला आवडतेस. मला समजेल असं वाटतंय म्हणून हे सर्व मी तुला सांगतो आहे. ...लँडस्केप पेंटिंगसाठी रंगनाथ तिला बरोबर घेऊन एका पहाडावर जातो. आकाशात मावळतीच्या वेळी सोनेरी छटा आवरतात. हे बघ लखलखत्या ज्वाला पाऊस, निळा सोनरी पाऊस, गोल्डन ब्ल्यू... धीस इज लाइफ, धीस इज ब्यूटी... करीत तो म्हणतो, ‘मी चाललो! रंगांकडे चाललो’ आणि कड्याच्या टोकावरून पुढे जात राहतो. दुसऱ्या दिवशी खालच्या दरीत त्याचे प्रेत मिळते. छिन्नविच्छिन्न देह. रक्ताचा शिडकावा होऊन लालकाळे पडलेले दगड... ....उजेडात रक्ताने माखलेले ते दगड बघताना तिला विचित्र अनुभव येतो. दगडावरचे वाळलेले ते काळे रक्त पुन्हा लाल होत आहे. आपल्या रोखाने रंगांची लाट चालून येत आहे असे तिला जाणवते. ती बेशुद्ध पडते. ...रात्री तिला आवाज येतो. ‘तू ऐकते आहे ना? इथं दाट काळोख आहे. मी त्या गुदमरतोय. मला रंग हवे आहेत. ‘मी तुझ्या नजरेतून आता रंग पाहीन.... आपल्यात एक नातं आहे. मला रंग पाहू देत. तुझ्या नजरेतून..’ ती घाबरून किंचाळते, ‘नाही नाही... आपल्यात कसलंही नात नाही. तू येऊ नकोस. काळोखातून परत येऊ नकोस.’ ...पण तिला कळून चुकते, तो आपल्या नजरेत आला आहे. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला जाते. सर्वत्र रंगच रंग तिला जाणवतात. ती गॉगल घालते तरी रंग गर्दी करतात. ‘मी आलो आहे. असा आवाज येत राहतो. तो आता जाणार नाही. तो आपल्या डोळ्यात कायमचा राहणार. आपण रंगांधळी होणार रंगाची गुलाम होऊन सारे आयुष्य घालवावे लागणार. ती कॉलेजच्या प्रयोगशाळेत जाते. सारे धैर्य एकवटून डोळ्यात अ‍ॅसिडचे थेंब टाकते. तिची दृष्टी जाते. रंगांच्या त्या लाटांपासून दूर होते. नित्य काळोख तिला सुखाचा वाटतो. ‘या काळोखात रंगनाथाचा आत्मा तडफडत असेल, पण माझ्या डोळ्यांची दारे त्याला बंद केली आहेत.’ असे ती म्हणते. आता ही तिची कहाणी डेड एन्डला येऊन पोहचली आहे असे वाचक म्हणून आपल्याला वाटते. पण नाही. ही कहाणी इथे संपत नाही. एका पार्टीत ही दृष्टीहीन, गॉगल लावलेली तरुणी बघून कोणातरी तरुणाला तिच्याजवळ जावेसे वाटते. त्याला आपल्याबद्दल वाटणारे कुतूहूल तिला जाणवते; आणि आपली ही कहाणी त्याला सांगते. ती कहाणी ऐकल्यावर आपल्यात व तिच्यात एक नवे नाते निर्माण झाले आहे, असे त्याला वाटते. पार्टीहून घरी पोहचल्यावर तो दार उघडतो. खोलीत काळोख नसतो. संबंध खोली निळ्याजांभळ्या रंगांनी झगमगत आहे, असे त्याला दिसते. मतकरी यांनी या कथेला शेवटी दिलेले हे वळण त्यांच्या गूढकथाकारांच्या प्रतिभेची खरी कमाल दाखवते. त्या तरुणीने रंगनाथच्या डोळ्यांना आपल्या डोळ्यातून बघण्यास मज्जाव केला खरा, पण तिच्याच माध्यमातून नवपरिचित तरुणाच्या डोळ्यांचा ताबा घेऊन रंगनाथ आपले अस्तित्व सिद्ध करायला सज्ज झाला होता! रत्नाकर मतकरी यांच्या अत्यंत नावजलेल्या गूढकथामंध्ये ‘रंगांधळा’ गणली जाते. तिची केंद्रीभूत कल्पना खरोखरच नावीन्यपूर्ण आणि चमत्कृतीपूर्ण आहे. वाचकांना शेवटी आणखी एक धक्का देणारी मतकरींचा मास्टर स्ट्रोक या कथेची परिणामकारकता वाढतो. रंगांशी निगडित असणाऱ्या परिचित संवेदनेला मतकरींनी उलटेपालटे करून, ‘रंगाच्या अभावाऐवजी रंगांच्या अतिरंजित जाणिवेचे परिणाम दिले आहे; त्यामुळे चित्रकाराच्या चित्रांवर पडलल्या प्रभावाचे स्वरूपही दाखवले आहे. रंगाचा हा मुक्तसंचार बघणारे रंगनाथचे डोळे, ते त्याच्या मृत्यूनेही बंद होत नाहीत. अतृप्त आत्म्याने आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस संचार करावा त्याप्रमाणे रंगनाथचे हे डोळे त्या तरुणीच्या डोळ्यांचा उपयोग करू पाहतात; तिने ते डोळे निकामी करून घेतल्यावर तिच्यात रस घेणाऱ्या अन्य तरुणाचा ताबा ते घेऊन टाकतात. असा आपल्या पारंपारिक कल्पनेचा वेगळा अविष्कार या कथेत दिसतो. चित्रकाराला दिसणाऱ्या रंगांच्या अचाट वैभवाची चुणूक रंगनाथच्या संवदेनक्षमतेद्वारे मतकरी लक्षात आणून देतात. एखादी कल्पना चौफेर फुलवण्याची,निसर्ग-व्यक्तीरेखा कलाविशेष- भावाविष्कार- भाषविशेष अशा विविध घटकांचे एकजीव रसायन साधण्याची मतकरींची करामत वाचकांना मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरतो. तिच्या अंधत्वाची कल्पना असूनही तो जेव्हा तिच्याजवळ जातो तेव्हा ती त्याला विचारते, ‘तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? नसेल तर नको करू. प्रेमात माणूस फसतं. इतकी सुंदर वाटणारी आणि इतकी डेड्ली गोष्ट जगात दुसरी नसेल. नाही आणखी एक गोष्ट जगात आहे. रंग.. कथा वस्तूत रंग भरायलाही अशी विधाने केली जातात असे वाचकाला वाटते, पण या रंगांचे वेगळे जे अस्तित्व नंतर जाणवते त्यामुळे अशा विधानातले खरे रहस्य पुढे लक्षात येते....‘आयरनी’चे दैवदुर्विलासाचे हे प्रलयकारी दर्शन असते. या संग्रहातील ती दोन मुलं, चिखल, पुलावरचा माणूस, झुंबर कथांमध्येही अशाच कल्पना वापरलेल्या आहेत. उत्कंठावर्धक निवेदनशैलीमुळे आणि थरारक कथा कल्पनांमुळे या गूढकथा वाचकांना गुंतवून ठेवतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more